वाकडी येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी-फत्तेपूर मंडळ कृषी अधिकारी श्री.एस.एस.लोहार

वाकडी.ता.जामनेर.दि.३०/०९/०२५ वाकडी येथे प्रामुख्याने भरपूर शेतकऱ्यांचे कपाशी पिकांचे नुकसान झाले ,अतिवृष्टी अकस्मात संकटामुळे शेतकरी हा हवालदिल झाला आहे,या आठवड्यातील अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे कपाशी, सोयाबीन,तूर,मका,केळी इतर कडधान्ये,या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, बराच ठिकाणी शेतजमीनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, यावेळी फत्तेपूर मंडळ कृषी अधिकारी श्री.एस.एस.लोहार, सहाय्यक कृषी अधिकारी श्री.राजेश नाईक, वाकडी पोलीस पाटील घनश्याम पाटील यांनी आज वाकडी येथील शेतकरी बाजीराव जोशी यांच्या शेतात जावून पिकांची पाहणी तसेच वाकडी परिसरात प्रत्यक्ष शेतात जावून सर्व भागाची पाहणी केली,वाकडी येथील तलाठी परशुराम पवार, कोतवाल वैभव न्हावी यांनी शेतात जावून पिकांची पाहणी करून पंचनामे केली आहे,कुठला नुकसान ग्रस्त शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, वाकडी येथील शेतकऱ्यांच्या लवकर अहवाल तयार करावा अशी मागणी शेतकरी बांधव करीत आहेत.

Read More

मासिक पाळी लाज नाही, अभिमान आहे – मीनल करनवाल

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधव सेवापंधरवड्यानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयंतीपासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत जामनेर सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत महिलांचे सशक्तीकरण आणि उत्तम आरोग्य सेवा यासाठी “स्वस्थ नारी सशक्त परिवार” हे अभियान राबवले जात आहे.या अभियानाअंतर्गत शेंदुर्णी येथे महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व वैयक्तिक स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करून सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी जि.प. सदस्य संजयदादा गरुड यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, शेंदुर्णी नगरपरिषद मुख्याधिकारी विवेक धांडे, इंडियन डेंटल असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष डॉ. आशिष महाजन, गोदावरी मेडिकल कॉलेजचे डॉ. जतिन बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.“मासिक पाळी ही शाप नसून वरदान आहे. सर्व महिलांनी व किशोरवयीन मुलींनी या विषयावर मोकळेपणाने बोलले पाहिजे. मासिक पाळी लाज नसून अभिमान आहे. स्त्रीने स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे,” असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी मनोगतात केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी केले तर आभार वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहितकुमार जोहरे यांनी मानले. सूत्रसंचालन पी.जे. पाटील यांनी केले.महिला आरोग्य अधिकारी डॉ. पल्लवी राऊत यांनी किशोरवयीन मुलींना मासिक पाळीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. आदित्य पाटील, डॉ. श्रद्धा पाटील, गजानन माळी, राजश्री पाटील, सूर्यभान पाटील, विजया पाटील, अनुरथ रहाडे, योगेश पाटील, सुधाकर माळी, संयम हिवाळे, दीपक मोरे, ईश्वर कोळी, मंजू जवळे, रेखा इंगळे, विजय बेलदार आदींनी परिश्रम घेतले.

Read More

देव्हारी फाटा ते चक्रधर स्वामी मंदिर रस्त्यावर अतिक्रमण व घाणीच्या साम्राज्याचा प्रश्न; ग्रामस्थांचा आमरण उपोषणाचा इशारा.

सोयगाव / जेबीएन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी ….. देव्हारी फाटा ते चक्रधर स्वामी मंदिर गेट या मुख्य रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाबाबत व गेटसमोर साचलेल्या घाणीबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. वारंवार अर्ज करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.ग्रामपंचायत सोयगाव व पंचायती समितीकडून देखील या संदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला होता. तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. या मुख्य रस्त्याने संपूर्ण गावची ये-जा असून रस्ता अरुंद झाल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, चक्रधर स्वामी मंदिर गेटसमोर मोठ्या प्रमाणात घाण-कचरा टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले असून ग्रामस्थांनी तातडीने कारवाईची मागणी केली आहे. या सर्व बाबींवर लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास येत्या २४ सप्टेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. भारत नप्ते, संदीप काळे, अभय पुजारी, बारकू गावडे, घनश्याम शिंदे, राहुल पुजारी, गोपाल कुरंकार, शुभम पुजारी, आकाश कळसकर, राहुल न्हावी, प्रदिप काळे, संजय गिरी, गोपाल गाडवे, प्रशांत ठिकाणी, योगेश गायकवाड, संजय काळे, महेश खडके, संदीप कोलते, राजू गलबले, पवन कुल्ले, मधुकर गावडे आदी ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

Read More

तहसिलदाराची बनावट सही, २९ लाख ६३ हजारांत सरकारलाच महसूल सहायकाने ‘कूळ’ दाखवले !जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपी हर्षल पाटील फरार

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर जामनेर येथील तहसिलदारांच्या स्वाक्षरीचा बनावट पध्दतीने वापर करुन जामनेर मथील वर्ग २ ची शेतजमिन वर्ग १ मध्ये रुपांतर करुन शासनाचा २१ लाख ६३ हजार २८५ रुपयांचा महसूल बुडवून फसवणूक केल्या प्रकरणी जामनेर तहसिल कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी (कुळ कायदा) हर्षल विश्वनाथ पाटील यांच्या विरुध्द जामनेर पोलीस ठाण्यात शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल होताच हर्षल पाटील हा अधिकारी फरार झाल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी जामनेरचे तहसिलदार नानासाहेब आगळे यांच्या फिर्यादीवरुन हर्षल पाटील यांच्याविरुध्द जामनेर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या धक्कादायक प्रकरणाची अधिक माहिती अशी की, जामनेर येथील गट क्र. ८३६/२ ही शेत जमिन मालक अर्जदार नाजीयाबी शेख सत्तार, शेख फरहान हिसामुद्दीन यांनी वर्ग २ प्रकाराची जमिन वर्ग १ प्रकारात व्हावी म्हणून तहसिलदार जामनेर यांना अर्ज सादर केला होता. त्यांच्या अर्जावरुन वर्ग २ ची शेत जमिन वर्ग १ मध्ये करण्यासाठी नजराणा भरणा आवश्यक होते. जमिनीचे बाजारमूल्य ४३ लाख २६ हजार ५७० रुपये एवढे आहे. त्यानुसार ५० टक्के नजराणा रक्कम म्हणून २१ लाख ६३ हजार २८५ रुपये शासकीय कोषागारात भरणा केल्याशिवाय जमिनीची नोंद अथवा रुपांतर वर्ग एक मध्ये करता येणार नाही, असा आदेश तहसिलदार जामनेर यांनी दिला. त्यांच्या आदेशावर अर्जदारांनी एवढी मोठी रक्कम आम्हाला ५० टक्के नजराणा भरणा शक्य नाही, असे लेखी कळविले. त्यामुळे तहसिलदार जामनेर यांनी त्यांचा अर्ज निकाली काढला. या प्रकरणात सहाय्यक महसूल अधिकारी हर्षल पाटील यांनी फेरफार करुन तहसिलदार जामनेर यांचा स्वाक्षरीचा दुरुपयोग केला. तसेच नजराणा रकमेचा भरणा बँकेत केल्याचे बनावट दस्तावेज तयार केले. ही बाब तहसिलदार जामनेर यांच्या तपासणीत आढळून आल्यानंतर हर्षल पाटील याचे बिंग फुटले. त्यामुळे त्याने फसवणूक केल्याचे व बनावट दस्ताऐवज केल्याचे कबूल करीत तहसिलदार जामनेर यांना विनंती केली. तथापी हे प्रकरण धक्कादायक आणि गंभीर असल्याने हर्षल पाटील यांच्या विरुध्द तहसिलदार जामनेर यांनी रितसर फिर्याद दाखल केली. त्यामुळे हर्षल पाटील विरुध्द विविध कलमाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Read More

जामनेर तहसिल कार्यालयात तालुकास्तरीय लोकशाही दिन –तहसिलदार श्री आगळे यांनी नागरिकांच्य ऐकुन घेतल्या समस्या तक्रारी

जामनेर – ( प्रतिनिधी )जामनेर तहसिल कार्यालयाततालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले .या प्रसंगी नागरिकांच्या विविध विभागाशी संबंधित समस्या व तक्रारींची संक्षिप्त चौकशी करून आवश्यक कार्यवाही तहसिलदार श्री नाना साहेब आगळे यांच्या कडून करण्यात आली.यावेळी नायब तहसिलदार , इतर विभागाचे अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते . विभागप्रमुखांनी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या व तातडीने निराकरणासाठी पावले उचलली. लोकशाही दिनाच्या माध्यमातून शासन-प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक परिणामकारक होत आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!