जामनेर नगरपरिषद निवडणूक : प्रभाग 12-अ मधून अरविंद शांताराम तायडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जामनेर – नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होताच प्रभाग क्रमांक 12-अ मध्ये राजकीय तापमान चढले आहे. अजित पवार गटाकडून अरविंद शांताराम तायडे यांनी आज दिमाखात आपला उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक लढविण्याची अधिकृत घोषणा केली. अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांची उपस्थिती, उत्साह आणि घोषणाबाजी यामुळे परिसरात निवडणुकीची रंगत चांगलीच वाढलेली दिसली. समाजसेवक, सक्रिय युवा नेता म्हणून प्रभागात ठसठशीत ओळख निर्माण केलेले अरविंद तायडे गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत आहेत. नागरिकांशी थेट संवाद, सामाजिक कार्यात सहभाग आणि प्रभागातील मूलभूत सुविधांसाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यांची जनसंपर्काची मजबूत पकड निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना तायडे म्हणाले, “पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता यांसह नागरिकांच्या दैनंदिन अडचणींना प्राधान्य देऊन काम करणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. जनतेचा विश्वास जिंकून त्यांच्या अपेक्षांवर खरे उतरण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.” तायडे यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग 12-अ मध्ये चुरस अधिक तीव्र होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. युवा मतदारांमध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे बोलले जात असून, अंतिम टप्प्यात कोणाच्या बाजूने जनमत कलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read More

शेंदुर्णी नगरपंचायतीच्या निवडणुकीत आज तब्बल ४० जणांनी भरले नामनिर्देशन पत्रनगराध्यक्ष पदासाठी गोविंद अग्रवाल अमृत खलसे यांचेही अर्ज दाखल

शेंदुर्णी ता.जामनेर प्रतिनिधीदि.२ डिसेंबर रोजी होत असलेल्या शेंदुर्णी नगरपंचायतीच्या निवडणुकीत आज नगरपंचायत कार्यालयात उमेदवारांनी प्रचंड गर्दी केली होती.आज तब्बल ४० जणांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले.यात नगराध्यक्ष पदासाठी ४ जणांनी तर सदस्यांसाठी ३६ जणांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.भाजपच्या वतीने निवडणुक लढवणाऱ्यांची मोठी यादी असुन महाविकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी सौ.उज्वला काशिद यांनीही आपला अर्ज दाखल केला असुन भाजपचे दोन दिग्गज नेते गोविंद अग्रवाल अमृत खलसे यांनी सुद्धा आज अर्ज दाखल केले आहेत.पक्षाच्या वतीने आपल्यालाच ए.बी.फॉर्म मिळेल अशी सगळ्याच इच्छुकांची आशा आहे.अजुन काही दिग्गज नेते नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे कळते आहे.मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले उमेदवार यंदाच्या निवडणुकीत मात्र हम साथ साथ है असे चित्र असुन सगळ्याच इच्छुकांनी एकत्रीत आपल्या वार्डात घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला आहे.आता पर्यंत नगराध्यक्ष पदासाठी ५ तर सदस्यांसाठी ४२ जणांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.मतमोजणी अप्पासाहेब र.भा.गरुड महाविद्यालयाच्या इनडोअर स्टेडियम मध्ये होणार आहे.निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नानासाहेब आगळे सहायक निवडणुक अधिकारी मुख्याधिकारी विवेक धांडे हे आहे.

Read More

प्रभाग क्रमांक 12 मधून राजू चौधरी इच्छुक

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी सुपडू जाधवजामनेर शहरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असूनअनेक इच्छुक उमेदवार आपले उमेदवारी पक्षाकडून जाहीर व्हावे अशी मागणी करत आहेत. परंतु वाकी रोडवरील रहिवासी व राजू ऑटो गॅरेज चे संचालक राजू ईश्वरलाल चौधरी हे कोणत्याही पक्षाला उमेदवारी न मागता प्रभाग क्रमांक 12 मधून अपक्ष उमेदवार म्हणून लढणार आहेत.सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर म्हणून राहिलेले राजू ईश्वरलाल चौधरी हे नेहमी सामाजिक कार्यात व इतरांच्या सुखदुःखात सहभागी असतात सर्वांना परिचित असलेले राजू चौधरी हे एक व्यावसायिक असून त्यांचा चांगला जनसंपर्क आहे त्यामुळे त्यांनी कोणत्याही पक्षाकडे तिकीटाची सरळ मागणी न करता आपल्या परीने अपक्ष उमेदवार म्हणून आपण लढणार आहोत असे सांगितले. त्यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे प्रभागातील राजकिय समीकरण चांगलेच बदलू शकते राजू चौधरी यांच्या अपक्ष उमेदवारामुळे कोणाला फायदा व कोणाला तोटा होईल हे आता येणाऱ्या काळातच समजेल राजू चौधरी यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चा रंगू लागले आहे त्यामुळे समीकरणे हे निश्चित बदलणार आहेत.

Read More

जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द परिसरात ढगफुटी:शेतकऱ्याचे अतोनात नुकसान-राष्टवादी कॉग्रेस नेत्यांची पाहणी, भरपाईसाठी शासनाला इशारा….

जे. बी. एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी-सुपडू जाधव आज बेटावद खुर्द परिसरात ढगफुटी झाल्यावर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे सर तालुका अध्यक्ष किशोर आप्पा पाटील बेटावद खुर्द परिसरात शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी केली शासनाने त्वरित पंचनामे करून योग्य भरपाई न दिल्यास लवकरच शेतकऱ्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चाचे आयोजन करू असा शब्द शेतकऱ्यांना दिला

Read More

छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकविला…

जेबीएन महाराष्ट्र न्यूजप्रतिनिधी जामनेर प्रतिनिधी. जब्बार तडवी दिनांक 01/11 /2025 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व कलागुणांना चालना देणारी आमची संस्था. संस्थाध्यक्ष भाऊराव कोलते पा.जय कालंका देवी शिक्षण संस्था संचलित छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थीनी तिने जिल्हास्तरीय एथलेटिक्स स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून तृतीय क्रमांक मिळवून संस्थेचा बहूमान वाढविला संस्थेच्या वतीने विद्यार्थिनीचा व क्रीडा शिक्षकांचा जाहीर सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत दरवर्षीय राज्यातील विविध शाळेतून क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात या क्रीडा स्पर्धेमध्ये प्रत्येक तालुक्यातून एक विद्यार्थिनी सोनम तडवी या विद्यार्थिनीने हा बहुमान पटकावून ही जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये तालुकास्तरावरती प्रथम क्रमांक पटकावला होता. यामधून विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होती ग्रामीण भागातील अतिशय होतकरू आदिवासी समाजातील अतिशय कष्टाळू व गरीब कुटुंबातील ही विद्यार्थिनी असून अभ्यासात हुशार असणारी परिस्थितीवर मात करत आपल्या कला व मेहनतीच्या बळावर तीन हजार मीटर स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळून शाळेचा व संस्थेचा बहुमान वाढवला. सोनम तडवी हिनी माध्यमांशी बोलताना सांगितले की मी दररोज व्यायाम व सकस आहार आणि कठोर मेहनत हेच माझ्या यशाचे गुपित असून यासाठी मला शाळेतील प्राचार्य संस्थाचालक व क्रीडाशिक्षकांचे वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन लाभले आहे त्यांच्या या मार्गदर्शनामुळेच मी आज हे यश मिळू शकले त्याबद्दल तिच्या घरच्यांनी व तिने स्वतः शाळेचे व संस्थेचे विशेष आभार मानले.जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे पार पडल्या सोनम कबीर तडवी बारावी वाणिज्य या मुलीने तृतीय क्रमांक पटकवून विद्यार्थ्यांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला त्याबद्दल संस्थाध्यक्ष भाऊराव कोलते व संचलाक मंडळ यांनी तिच्या जाहिर सत्कार केला तिच्या यशाबद्दल प्राचार्य नारायण कोलते यांनी क्रीडा शिक्षक जय राम घोती व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ही कामगिरी अतिशय चांगल्या प्रकारे बजावल्यामुळे त्यांचा सुद्धा सन्मान केला. या विद्यार्थिनीला माध्यमिक शिक्षणापासून क्रीडा शिक्षक विजय सिंग राजपूत भास्कर कमांड सुदामसिंगराठोड व डॉ. प्रा.जयराम घोती यांचे विशेष मार्गदर्शन होते याबद्दल सर्वांचे अभिनंदन करून आभार जीवन कोलते यांनी मानले.

Read More

जामनेरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला धक्का — राज्य संघटक राहुल चव्हाण यांचा भाजपात प्रवेश

जामनेर (प्रतिनिधी) जामनेरच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण करणारी घटना आज घडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्य संघटक आणि निष्ठावान कार्यकर्ते राहुल चव्हाण यांनी आज पक्षाच्या सर्व पदांवरून व सदस्यत्वावरून राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश जामनेर येथे पार पडला असून, कार्यक्रमास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत राहुल चव्हाण यांनी अधिकृतरित्या भाजपचा झेंडा हाती घेतला. या प्रसंगी भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राहुल चव्हाण यांच्या प्रवेशामुळे जामनेरच्या स्थानिक राजकारणात नवीन राजकीय समीकरणे आकार घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेतील सक्रिय व प्रभावी पदाधिकारी म्हणून ओळखले जाणारे चव्हाण यांचा पक्षत्याग हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. भाजपात प्रवेशानंतर राहुल चव्हाण यांनी सांगितले की, “मंत्री गिरीश महाजन यांच्या विकासाच्या राजकारणाने प्रेरित होऊन मी भाजपात प्रवेश केला आहे. जनतेच्या हितासाठी आणि जामनेरच्या सर्वांगीण विकासासाठी मी कार्य करणार आहे.” या प्रवेशामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जामनेरमधील राजकीय समीकरणे अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Read More

वाकडी येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी-फत्तेपूर मंडळ कृषी अधिकारी श्री.एस.एस.लोहार

वाकडी.ता.जामनेर.दि.३०/०९/०२५ वाकडी येथे प्रामुख्याने भरपूर शेतकऱ्यांचे कपाशी पिकांचे नुकसान झाले ,अतिवृष्टी अकस्मात संकटामुळे शेतकरी हा हवालदिल झाला आहे,या आठवड्यातील अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे कपाशी, सोयाबीन,तूर,मका,केळी इतर कडधान्ये,या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, बराच ठिकाणी शेतजमीनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, यावेळी फत्तेपूर मंडळ कृषी अधिकारी श्री.एस.एस.लोहार, सहाय्यक कृषी अधिकारी श्री.राजेश नाईक, वाकडी पोलीस पाटील घनश्याम पाटील यांनी आज वाकडी येथील शेतकरी बाजीराव जोशी यांच्या शेतात जावून पिकांची पाहणी तसेच वाकडी परिसरात प्रत्यक्ष शेतात जावून सर्व भागाची पाहणी केली,वाकडी येथील तलाठी परशुराम पवार, कोतवाल वैभव न्हावी यांनी शेतात जावून पिकांची पाहणी करून पंचनामे केली आहे,कुठला नुकसान ग्रस्त शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, वाकडी येथील शेतकऱ्यांच्या लवकर अहवाल तयार करावा अशी मागणी शेतकरी बांधव करीत आहेत.

Read More

मासिक पाळी लाज नाही, अभिमान आहे – मीनल करनवाल

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधव सेवापंधरवड्यानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयंतीपासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत जामनेर सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत महिलांचे सशक्तीकरण आणि उत्तम आरोग्य सेवा यासाठी “स्वस्थ नारी सशक्त परिवार” हे अभियान राबवले जात आहे.या अभियानाअंतर्गत शेंदुर्णी येथे महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व वैयक्तिक स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करून सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी जि.प. सदस्य संजयदादा गरुड यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, शेंदुर्णी नगरपरिषद मुख्याधिकारी विवेक धांडे, इंडियन डेंटल असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष डॉ. आशिष महाजन, गोदावरी मेडिकल कॉलेजचे डॉ. जतिन बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.“मासिक पाळी ही शाप नसून वरदान आहे. सर्व महिलांनी व किशोरवयीन मुलींनी या विषयावर मोकळेपणाने बोलले पाहिजे. मासिक पाळी लाज नसून अभिमान आहे. स्त्रीने स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे,” असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी मनोगतात केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी केले तर आभार वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहितकुमार जोहरे यांनी मानले. सूत्रसंचालन पी.जे. पाटील यांनी केले.महिला आरोग्य अधिकारी डॉ. पल्लवी राऊत यांनी किशोरवयीन मुलींना मासिक पाळीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. आदित्य पाटील, डॉ. श्रद्धा पाटील, गजानन माळी, राजश्री पाटील, सूर्यभान पाटील, विजया पाटील, अनुरथ रहाडे, योगेश पाटील, सुधाकर माळी, संयम हिवाळे, दीपक मोरे, ईश्वर कोळी, मंजू जवळे, रेखा इंगळे, विजय बेलदार आदींनी परिश्रम घेतले.

Read More

देव्हारी फाटा ते चक्रधर स्वामी मंदिर रस्त्यावर अतिक्रमण व घाणीच्या साम्राज्याचा प्रश्न; ग्रामस्थांचा आमरण उपोषणाचा इशारा.

सोयगाव / जेबीएन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी ….. देव्हारी फाटा ते चक्रधर स्वामी मंदिर गेट या मुख्य रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाबाबत व गेटसमोर साचलेल्या घाणीबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. वारंवार अर्ज करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.ग्रामपंचायत सोयगाव व पंचायती समितीकडून देखील या संदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला होता. तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. या मुख्य रस्त्याने संपूर्ण गावची ये-जा असून रस्ता अरुंद झाल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, चक्रधर स्वामी मंदिर गेटसमोर मोठ्या प्रमाणात घाण-कचरा टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले असून ग्रामस्थांनी तातडीने कारवाईची मागणी केली आहे. या सर्व बाबींवर लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास येत्या २४ सप्टेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. भारत नप्ते, संदीप काळे, अभय पुजारी, बारकू गावडे, घनश्याम शिंदे, राहुल पुजारी, गोपाल कुरंकार, शुभम पुजारी, आकाश कळसकर, राहुल न्हावी, प्रदिप काळे, संजय गिरी, गोपाल गाडवे, प्रशांत ठिकाणी, योगेश गायकवाड, संजय काळे, महेश खडके, संदीप कोलते, राजू गलबले, पवन कुल्ले, मधुकर गावडे आदी ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

Read More

तहसिलदाराची बनावट सही, २९ लाख ६३ हजारांत सरकारलाच महसूल सहायकाने ‘कूळ’ दाखवले !जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपी हर्षल पाटील फरार

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर जामनेर येथील तहसिलदारांच्या स्वाक्षरीचा बनावट पध्दतीने वापर करुन जामनेर मथील वर्ग २ ची शेतजमिन वर्ग १ मध्ये रुपांतर करुन शासनाचा २१ लाख ६३ हजार २८५ रुपयांचा महसूल बुडवून फसवणूक केल्या प्रकरणी जामनेर तहसिल कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी (कुळ कायदा) हर्षल विश्वनाथ पाटील यांच्या विरुध्द जामनेर पोलीस ठाण्यात शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल होताच हर्षल पाटील हा अधिकारी फरार झाल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी जामनेरचे तहसिलदार नानासाहेब आगळे यांच्या फिर्यादीवरुन हर्षल पाटील यांच्याविरुध्द जामनेर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या धक्कादायक प्रकरणाची अधिक माहिती अशी की, जामनेर येथील गट क्र. ८३६/२ ही शेत जमिन मालक अर्जदार नाजीयाबी शेख सत्तार, शेख फरहान हिसामुद्दीन यांनी वर्ग २ प्रकाराची जमिन वर्ग १ प्रकारात व्हावी म्हणून तहसिलदार जामनेर यांना अर्ज सादर केला होता. त्यांच्या अर्जावरुन वर्ग २ ची शेत जमिन वर्ग १ मध्ये करण्यासाठी नजराणा भरणा आवश्यक होते. जमिनीचे बाजारमूल्य ४३ लाख २६ हजार ५७० रुपये एवढे आहे. त्यानुसार ५० टक्के नजराणा रक्कम म्हणून २१ लाख ६३ हजार २८५ रुपये शासकीय कोषागारात भरणा केल्याशिवाय जमिनीची नोंद अथवा रुपांतर वर्ग एक मध्ये करता येणार नाही, असा आदेश तहसिलदार जामनेर यांनी दिला. त्यांच्या आदेशावर अर्जदारांनी एवढी मोठी रक्कम आम्हाला ५० टक्के नजराणा भरणा शक्य नाही, असे लेखी कळविले. त्यामुळे तहसिलदार जामनेर यांनी त्यांचा अर्ज निकाली काढला. या प्रकरणात सहाय्यक महसूल अधिकारी हर्षल पाटील यांनी फेरफार करुन तहसिलदार जामनेर यांचा स्वाक्षरीचा दुरुपयोग केला. तसेच नजराणा रकमेचा भरणा बँकेत केल्याचे बनावट दस्तावेज तयार केले. ही बाब तहसिलदार जामनेर यांच्या तपासणीत आढळून आल्यानंतर हर्षल पाटील याचे बिंग फुटले. त्यामुळे त्याने फसवणूक केल्याचे व बनावट दस्ताऐवज केल्याचे कबूल करीत तहसिलदार जामनेर यांना विनंती केली. तथापी हे प्रकरण धक्कादायक आणि गंभीर असल्याने हर्षल पाटील यांच्या विरुध्द तहसिलदार जामनेर यांनी रितसर फिर्याद दाखल केली. त्यामुळे हर्षल पाटील विरुध्द विविध कलमाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!