मानसिंग आप्पांचा ८१ वर्षांचा सुवर्णप्रवास — सहस्रचंद्र दर्शनाचा अनोखा गौरव सोहळा संपन्न..!

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरबोदवड प्रतिनिधीआज आत्मसन्मान फाउंडेशन, बोदवड येथे आपल्या सर्वांचे आदरणीय माझ्या परिवाराचे कायम ऋणानुबंध असलेले गो.बा.ढाके महाविद्याल ऐणगावचे सेवानिवृत्त प्रयोगशाळा सहाय्यक उत्सवमूर्ती मा. मानसिंग आप्पा पाटील यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. हा कार्यक्रम आप्पांच्या परिवाराने घडवून आणला.या प्रसंगी मंचावर ॲड. जगनदादा लोखंडे, पुरुषोत्तम गड्डम सर, गोपालजी अग्रवाल, डॉ. विजय पाटील, डॉ. सुधीर पाटील, भरत आप्पा पाटील, पवन राजे पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री. रोहन लोखंडे यांनी केले. प्रस्ताविक भरतसिंह राजपूत यांनी मांडले तर आभार प्रदर्शन अतुल पाटील व विशाल पाटील यांनी केले.व्यासपीठावरील मान्यवरांनी मा. मानसिंग आप्पा पाटील यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर प्रकाश टाकत त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. 🌿 पर्यावरण प्रेमी संजय वराडे यांच्या हस्ते फणस वृक्षाची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश देण्यात आला.आप्पांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आत्मसन्मान फाउंडेशन येथील मनोयात्रींना स्नेहभोजन देण्यात आले. या आनंददायी सोहळ्याला आप्पांचा संपूर्ण परिवार व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री महेंद्रसिंग सर व संपूर्ण परिवार यांनी परिश्रम घेतले.हा सोहळा म्हणजे केवळ वाढदिवस नव्हे, तर एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा सन्मान आणि जीवनमूल्यांचा उत्सव होता.

Read More

वाकडी येथे महिला मुतारीचे बांधकाम बोगस

वाकडी.ता.जामनेर.दि.२२/०२/०२६ वाकडी येथे बसस्थानक परिसरात मध्ये सहा महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महिला मुतारी बांधकाम करण्यात आले होते, मात्र निकृष्ट दर्जाचे झाल्याने आज रोजी महिला मुतारीची दुरवस्था झाली आहे,मुतारी च्या आजूबाजूला अवैध धंदे गावठी,देशी,इंग्लिश,दारू विक्री होताना मोठ्या प्रमाणात होत आहे त्याचा त्रास महिला वर्ग व विध्यार्थी याना होत आहे महिला व शाळेकरी विद्यार्थ्यांनी लघुशंकेसाठी कोठे जावे हा प्रश्न निर्माण झाला आहे, महिला मुतारीचे बांधकाम करुन सहा महिने सुध्दा झाले नसले तरी , मुतारी ही नदी किनारी असल्याने मुतारी मध्ये मोठे पोकळ ढिगाळ पडले आहे,खालून मोठे बोगदे पडल्याने उतार निर्माण होवून एखादी महिला किंवा विद्यार्थ्यांनी लघुशंकेसाठी जर मुतारी मध्ये गेली तर पाय घसरून पडण्याचा संभव आहे,मुतारी मध्ये भराव न टाकता बोगस काम करून मोकळे झाले आहे त्यामुळे बसस्थानक परिसरात दुसऱ्या लघुशंकेसाठी जागा नाही,यामुळे महिलांमध्ये भिंतीचे वातावरण आहे,या बसस्थानक परिसरात परिसरातील कर्णफाटा, राहेरा, कासली,गोराडखेडा,शेंगोळा,चिंचखेडा,हिवरखेडा,लोणी जाणाऱ्या महिला वर्ग व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थांबतात त्यांना हि त्रास सहन करावा लागत असल्याने स्थानिक ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी याकडे लक्ष्य देवून दुरवस्था झालेल्या मुतारीचे बांधकाम पुन्हा करावे अशी मागणी महिला करतांना दिसत आहे.

Read More

जळगाव महानगरपालिका स्थायी समितीत अरविंद देशमुख यांची निवड

जळगाव (प्रतिनिधी) – पहूर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून राजकारणात आलेल्या अरविंद देशमुख यांनी जळगाव शहराच्या राजकारणात पुन्हा एकदा आपली छाप पाडली आहे. जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी विजय मिळवल्यानंतर आता सुमारे 2000 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्प असलेल्या महानगरपालिकेच्या स्थायी समितीवर त्यांची निवड झाली आहे.महानगरपालिकेची स्थायी समिती ही आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. शहरातील विकासकामे, विविध प्रकल्पांची मंजुरी, खर्चाचे नियोजन आणि आर्थिक धोरणांबाबतचे महत्त्वपूर्ण निर्णय या समितीत घेतले जातात. त्यामुळे देशमुख यांची या प्रभावी समितीत झालेली निवड जळगाव शहरासाठी आणि त्यांच्या समर्थकांसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.अरविंद देशमुख यांची ओळख केवळ नगरसेवक म्हणून मर्यादित नसून ते महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू सहकारी व ‘संकटमोचक’ कार्यकर्ता म्हणूनही ओळखले जातात. जिल्ह्यातील विविध राजकीय घडामोडींमध्ये त्यांनी प्रभावी नियोजन व संघटन कौशल्य दाखवत नेतृत्वाला बळकटी दिली आहे.स्थायी समितीतील त्यांच्या कामगिरीकडे आता जळगावकरांचे लक्ष लागले असून, शहराच्या विकासाला गती देण्यासाठी ते ठोस आणि परिणामकारक निर्णय घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Read More

जामनेर तालुक्यातील २० नागरिकांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी,४ हजारांहून अधिक नागरिकांना मिळाला लाभ

जळगाव : राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या ‘गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षा’च्या माध्यमातून जामनेर तालुक्यात आरोग्य सेवेचा मोठा यज्ञ सुरू आहे. नुकतेच या अभियानांतर्गत २० रुग्णांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या. विशेष म्हणजे, या उपक्रमाद्वारे आतापर्यंत ४ हजार पेक्षा अधिक नागरिकांच्या डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टीदान देण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभागया मोहिमेत तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने आपली सेवा बजावली. यामध्ये प्रामुख्याने डॉ. प्रवीण पाटील, डॉ. मयूरी राठोड, डॉ. प्रियंका पाटील, डॉ. सोबीया अन्सारी, डॉ. विलास बाविस्कर यांनी रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या. टीम वर्क आणि समन्वयशस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले. यामध्ये इनचार्ज सिस्टर सुनीता वक्ते, अधिपरिचारक सागर कोळी आणि हिरा पालवी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या संपूर्ण अभियानाचे नियोजन आणि अंमलबजावणी ‘गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षा’चे समन्वयक तथा आरोग्यदूत पै. शिवाजी रामदास पाटील आणि समाजसेविका रुचिता चौधरी यांनी केली. खाजगी रुग्णालयातील शस्त्रक्रियेचा खर्च परवडत नसलेल्या ग्रामीण भागातील गरजू नागरिकांसाठी हे अभियान वरदान ठरत आहे. ‘प्रत्येकाला उत्तम आरोग्य आणि दृष्टी मिळावी’ या ध्येयाने प्रेरित होऊन हे कार्य अविरत सुरू असून, लाभार्थ्यांनी मंत्री गिरीश महाजन आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार मानले आहेत.

Read More

प्रभाग क्रमांक 12 मधून राजू चौधरी इच्छुक

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी सुपडू जाधवजामनेर शहरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असूनअनेक इच्छुक उमेदवार आपले उमेदवारी पक्षाकडून जाहीर व्हावे अशी मागणी करत आहेत. परंतु वाकी रोडवरील रहिवासी व राजू ऑटो गॅरेज चे संचालक राजू ईश्वरलाल चौधरी हे कोणत्याही पक्षाला उमेदवारी न मागता प्रभाग क्रमांक 12 मधून अपक्ष उमेदवार म्हणून लढणार आहेत.सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर म्हणून राहिलेले राजू ईश्वरलाल चौधरी हे नेहमी सामाजिक कार्यात व इतरांच्या सुखदुःखात सहभागी असतात सर्वांना परिचित असलेले राजू चौधरी हे एक व्यावसायिक असून त्यांचा चांगला जनसंपर्क आहे त्यामुळे त्यांनी कोणत्याही पक्षाकडे तिकीटाची सरळ मागणी न करता आपल्या परीने अपक्ष उमेदवार म्हणून आपण लढणार आहोत असे सांगितले. त्यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे प्रभागातील राजकिय समीकरण चांगलेच बदलू शकते राजू चौधरी यांच्या अपक्ष उमेदवारामुळे कोणाला फायदा व कोणाला तोटा होईल हे आता येणाऱ्या काळातच समजेल राजू चौधरी यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चा रंगू लागले आहे त्यामुळे समीकरणे हे निश्चित बदलणार आहेत.

Read More

पोलीस यंत्रणा कोमात,लोहारा परिसरात अवैध धंदे जोरात

प्रतिनिधी(गजानन क्षीरसागरलोहारा तालुका पाचोरालोहारा गावासह ग्रामीण भागातील गावोगावी अवैध धंदे जोरात सुरू आहेत, सट्टा,पत्ता,विषारी हातभट्टी दारू विक्री सुरू आहे. त्याचबरोबर विना परवाना देशी-विदेशी दारू विक्रीही जोमात चालू आहे. या विषारी हातभट्टी दारूमुळे अनेकजण मरण पावले आहेत. तर अनेकजण मरणाच्या दारावर आहेत. अनेकांचे दारूमुळे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या अवैध दारू विक्रेत्यांवर किरकोळ कारवाई केली जाते, तर या पकडलेल्या किती दारू विक्रेत्यांवर कोणत्या विभागात गुन्हे दाखल होतात. हा संशोधनाचा विषय आहे. अनेकवेळा महिन्यातून एकदा राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी खासगी गाडी घेऊन येतात. दारू विक्री करणार्‍यांना पकडतात. त्यांच्याकडून हजार रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंत रोख रक्कम घेऊन त्यांना त्याच ठिकाणी सोडून देतात. ही अवैध हातभट्टी दारू व विना परवाना देशी-विदेशी दारू विक्री राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी विभाग व पोलीस यंत्रणा यांच्या आशीर्वादाने जोमात सुरू आहे. याचा त्रास महिला, सर्वसामान्य नागरिक यांना होत आहे. गावामध्ये भांडण तंटे , मारामाऱ्या , दारू पिऊन अश्लील भाषेत शिवीगाळ करणे यामुळे लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. लोहारा गावात गल्ली-बोळात व्यावसायिकांनी हातभट्टी व देशी-विदेशी दारू विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. या विक्रेत्यांना हातभट्टी दारू पुरवठा करण्यासाठी तालुक्यातील अनेक भागात हातभट्टीचे केंद्रही सुरू केले आहेत. ही हातभट्टी दारू युरिया काही रासायनिक व केमिकल वापरून तयार केलेली असते. त्यातच खराब गूळ, इतर रासायनिक केमिकल यामुळे या दारूचा उग्र वास येत असतो. तसेच ही दारू कसल्याही भांड्यात, बाटल्यात, डब्यात व ट्यूबमध्ये भरली जाते. यामुळे ही दारू विषारी झाली आहे. ही हातभट्टी दारू ओढ्याला, डोंगरदर्‍या, झाडी यामध्ये राजरोसपणे उत्पादन केली जाते. याकडे पोलीस लक्ष देत नाही कारण त्यांचे फक्त हप्ते वसुलीवर लक्ष असते. लोहारा बस स्टँड परिसरामध्ये सट्टा पिढीचे,गावठी दारूचे दुकाने मोठ्या ताटात थाटले आहेत, पोलिसांना वेळेवर हफ्ते मिळत असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही असा सूर सर्वसामान्य जनतेमधून निघत आहे.सट्टा,गावठी दारूमुळे युवा पिढी बरबाद होतेय, तरुण मुले बापाच्या अगोदर स्वर्गवासी होत आहेत त्यांच्या घराचा आधार हिरावला जात आहे लोहारा दूर क्षेत्रामध्ये असलेले पोलीस कर्मचारी फक्त हप्ते घेण्यासाठी असतात का असा सवाल सर्वसामान्य जनता करीत आहे. लोहारा गावात आतापर्यंत झालेल्या चोरी प्रकरणांचा तपास का लागत नाही हा देखील एक संशोधनाचा विषय आहे. लोहारा परिसरातील अवैध धंदे लवकरात लवकर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून बंद करावेत अशी मागणी लोहारा परिसरातील गावकऱ्यांमधून होत आहे.

Read More

जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द परिसरात ढगफुटी:शेतकऱ्याचे अतोनात नुकसान-राष्टवादी कॉग्रेस नेत्यांची पाहणी, भरपाईसाठी शासनाला इशारा….

जे. बी. एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी-सुपडू जाधव आज बेटावद खुर्द परिसरात ढगफुटी झाल्यावर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे सर तालुका अध्यक्ष किशोर आप्पा पाटील बेटावद खुर्द परिसरात शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी केली शासनाने त्वरित पंचनामे करून योग्य भरपाई न दिल्यास लवकरच शेतकऱ्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चाचे आयोजन करू असा शब्द शेतकऱ्यांना दिला

Read More

जामठी येथील महाजन विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा – “आठवणींचा सोहळा २०२५” उत्साहात संपन्न..

जे. बी. एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी-सुपडू जाधवजामठी, दि. २५ ऑक्टोबर (वार्ताहर)श्रीमती चि. स. महाजन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामठी येथे “माजी विद्यार्थी मेळावा – आठवणींचा सोहळा २०२५” हा सोहळा अत्यंत उत्साहवर्धक आणि भावनिक वातावरणात माजी विद्यार्थ्यांच्या स्वखर्चातून मोठ्या आनंदात पार पडला. या उपक्रमाने सन २०१० बॅचमधील माजी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शालेय जीवनातील सुवर्ण क्षणांची अनुभूती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. कैलास सत्रे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव श्री. भगवान महाजन, संचालक श्री. बी. इ. भुसारी, श्री. बी. सी. शेळके,श्री एम.ए.सत्रे तसेच मुख्याध्यापक श्री. पी. पी. पवार उपस्थित होते.कार्यक्रमास निवृत्त मुख्याध्यापक व शिक्षकवृंदांपैकी श्री. के. आर. पाटील, श्री. के. एस. बारी, श्री. एस. आर. तायडे, श्री. एस. टी. कोळी, श्री. एस. डी. महाजन, श्री. बी. डी. दांडगे, श्री. पी. डी. पाटील, श्री. पी. एस. सरोदे,श्री. जी.बी. गावंडे,श्रीमती पी. एस. पाटील, श्री. एस. एस. पाटील, श्री. जी. एस. पाटील, श्री. एन. पी. चौधरी, श्री. व्ही. आर. चौधरी,श्री.ए.आर.जंगले,श्री.एस.व्ही.पंडीत,श्री.के.बी.महाजन,श्री.अमित परखड, \ श्री.डि.यु.राठोड, श्री.सुधाकर गाढे, श्री. बावस्कर, श्री. गोरे श्री.चांगदेव सपकाळ तसेच शाळेतील सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन कोमल शर्मा व रोहन लोखंडे यांनी प्रभावीपणे केले.माजी विद्यार्थ्यांकडून विद्यालय परिसरात विविध फळझाडांची रोपं लावण्यात आली. तसेच २०१० च्या माजी विद्यार्थी संघातर्फे शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांना विशेष मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय यावेळी करून दिला.कार्यक्रमात श्री. के. आर. पाटील व श्री. एस. आर. तायडे यांनी आपली मनोगते व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा दिला. श्री. के. एस. बारी यांनी विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव एक सुंदर कविता सादर करून सर्वांना भावविभोर केले आणि मनोगत व्यक्त केले. तसेच श्रीमती पी. एस. पाटील मॅडम यांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व आनंद व्यक्त केला.माजी विद्यार्थ्यांनी स्वखर्चाने शाळेला ज्ञानदिप व मोठा फोकस लाईट यावेळी सप्रेम भेट दिला. मनोगतात श्री. रोहन लोखंडे यांनी १५ वर्षांनी संस्थेचा झालेला आमूलाग्र कायापालट, शिक्षकांच्या गोड आठवणी आणि शाळेबद्दलचे आत्मीय संबंध यांचा भावपूर्ण उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, “शाळा ही फक्त शिक्षणाची जागा नसून आयुष्याच्या पाया रचणारे मंदिर आहे. आज पुन्हा त्या आठवणींमध्ये रमण्याचा योग आला, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.” अध्यक्षीय भाषणात श्री. कैलास सत्रे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, संस्कार व सामाजिक जबाबदारी यांवर सखोल प्रकाश टाकला. त्यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. रोहन लोखंडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.या मेळाव्यामुळे विद्यालयाचा परिसर पुन्हा एकदा आनंद, आठवणी आणि भावनांनी ओथंबून गेला.

Read More

लुबाडलेले 1600 रुपये काही मिनिटांतच सैनिकाच्या खात्यात परत

पाचोरा – निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारिता हे लोकशाहीचे चौथे स्तंभ म्हणून ओळखले जाते, याचे जिवंत उदाहरण नुकतेच पाचोरा येथे पाहायला मिळाले पत्रकार संदीप महाजन यांनी अनधिकृत रेल्वे तिकीट एजंटकडून भारतीय सैनिकाची करण्यात आलेली आर्थिक लुबाडणूक उघडकीस आणताच संबंधित भामट्याने युद्धजन्य परिस्थिती काळात अफरातफरीत केलेली फसवणूक लपवण्यासाठी केवळ काही मिनिटांतच सैनिकाच्या खात्यात 1600 रुपये परत वर्ग केले.ही घटना आहे पिंपरी सार्वे येथील रहिवासी आणि सध्या CISF मध्ये कार्यरत असलेल्या जवान प्रदीप बाविस्कर यांच्या बाबतीत. देशात युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्यामुळे जवानांना तातडीने त्यांच्या सेवास्थळी परत हजर राहण्याचे आदेश मिळाले होते. या घाईत त्यांनी रेल्वे तिकीट काढण्यासाठी पाचोरा येथील तिकीट एजंटची मदत घेतली. मात्र त्या एजंटने एका सामान्य तिकिटासाठी वाजवी रक्कमेपेक्षा तब्बल 1600 रुपये जास्त रक्कम आकारून लुबाडणूक केली.या प्रकाराची माहिती पत्रकार संदीप महाजन यांना मिळताच त्यांनी या विषयावर सखोल चौकशी केली आणि समाजमाध्यमांद्वारे, तसेच ‘ध्येय न्यूज’च्या माध्यमातून ही धक्कादायक बातमी सर्वांसमोर आणली. पत्रकारितेतील जबाबदारी आणि लोकहितासाठी त्यांनी दाखवलेली तत्परता पाहून ही बातमी काही वेळातच व्हायरल झाली. बातमीचा समाजावर, प्रशासनावर आणि संबंधित एजंटवर इतका परिणाम झाला की, संबंधित एजंटने काही मिनिटांत जवानाच्या खात्यावर 1600 रुपयांची रक्कम परत पाठवली.ही घटना ही केवळ पत्रकाराच्या सचोटीची विजयगाथा नाही, तर हे एक जिवंत उदाहरण आहे की सत्याचे धारदार लेखणीसमोर अन्याय करणाऱ्यांची लाचारी उघड होते. पत्रकार महाजन यांनी या प्रकरणात कोणत्याही आमिषाला बळी न पडता, केवळ सैनिकाचा हक्क परत मिळावा या हेतूने ही बातमी उघडकीस आणली.या प्रकरणानंतर शहरातील जनमानसात पत्रकार महाजन यांच्या कार्याची भरभरून स्तुती होत असून अनेकांनी सोशल मीडियावर “हीच खरी पत्रकारिता” असे म्हटले आहे. शिवाय, यामुळे भविष्यात या आणि अशाप्रकारे लूट करणाऱ्या अनधिकृत रेल्वे एजंटांचा धसका बसेल व सामान्य नागरिकांची लुबाडणूक टळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.प्रशासनाने सुद्धा या भामट्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. पत्रकारिता म्हणजे केवळ माहिती पोहोचवणे नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्याचे हत्यार आहे, याचे हे अत्यंत प्रभावी उदाहरण आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!