Latest posts

All
fashion
lifestyle
sports
tech

जामनेर न्यायालयात प्रजासत्ताक दिनी संविधान उद्देशिकेचे वाचन

जामनेर न्यायालयात प्रजासत्ताक दिनी संविधान उद्देशिकेचे वाचनयेथील न्यायालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त…

रेल्वे अपघातात जवानाचा दुर्दैवी मृत्यू ,मूळ गावी दोंदवाडे (ता. जामनेर, जि. जळगाव) येथे शासकीय इतमामात अंत्यविधी पार पडला

प्रतिनिधी श्रीरामपूर – भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले वीर जवान गणर…

तयारीला लागा… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मोठा निर्णय! सुप्रीम कोर्टात काय घडलं?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून सध्या राज्यात मोठे राजकीय वादळ उठले…

निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

पळासखेडे मिराचे – धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी लिमिटेड,…

अलवर (राजस्थान) येथे आयोजित खासदार क्रीडा महोत्सवास; केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित..

अलवर (राजस्थान) येथे स्थानिक लोकसभा खासदार व केंद्रीय पर्यावरण, वने…

ज्ञानगंगा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ग्रामपंचायतींना शैक्षणिक क्षेत्रभेट

ता.जामनेर __ : ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील ग्रामपंचायतींना…

जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षणात जामनेर तालुक्याचे प्रा.समीर घोडेस्वार व प्रा.सचिन गडाख यांना प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र देऊन सन्मानित:

जामनेर: महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक…

Latest Youtube

Popular

₹2 हजारांवरील UPI व्यवहारांवर 0.4% MDR; 15 ऑक्टोबरपासून नवे नियम
सोना इस्टेटजवळ पाण्याचा टँकर नाल्यात पलटी; चालक घटनास्थळावरून पसार
गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त जामनेरमध्ये रक्तदान शिबिर; १०९ रक्तदात्यांचे योगदान
शिक्षक सन्मान सोहळ्यात मुख्याध्यापक जयप्रकाश पाटील यांचा गौरव

Latest posts

नि.पं.पाटील विद्यालयात संस्था वर्धापन दिन साजरा

पळासखेडे मिराचे दि १७ जुलै २०२५(प्रतिनिधी ) नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे मिराचे शाळेत मातृहृदयी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन पवार हे होते. सर्वप्रथम कै.आचार्य बापूसो. गजाननराव गरुड व कै. अण्णासाहेब भास्करराव गरूड यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष , संस्था संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेचा इतिहास व प्रगती विषयी माहिती दिली.त्यानंतर विद्यार्थ्याची वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.विद्यालयाचे पर्यवेक्षक जे.आर.पाटील यांनी कै. आचार्य बापूंना अभिप्रेत असलेला विद्यार्थी याबद्दल मत व्यक्त केले.विद्यालयातील उपशिक्षक एस. जे. सोनवणे यांनी मनोगतात संस्थेची स्थापना व व्याप्ती याबद्दल विद्यार्थ्यांची हितगुज केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन पवार यांनी अध्यक्ष भाषणात कै.आचार्य गजाननराव बापूंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्था संचालक व सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील,चंद्रशेखर काळे,अब्दुल नबी तांबोळी,डी. पी .पाटील, संजू पवार,.शालिक पाटील,अशोक माळी,बळीराम माळी,लता पाटील हे मान्यवर उपस्थित होते.वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक – हर्षाली प्रवीण पाटील द्वितीय क्रमांक – हितेश वर्जन चव्हाण तृतीय क्रमाक – ओम संतोष चौधरी यांनी मिळविला. त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.त्याप्रसंगी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना व गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी 50 शालेय गणवेश वाटप करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाने ,सर्व शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष जी.पी. पाटील यांनी केले तर आभार व्ही. डी. पाटील यांनी मानले.

Read More

₹2 हजारांवरील UPI व्यवहारांवर 0.4% MDR; 15 ऑक्टोबरपासून नवे नियम

पेट्रोल, रेल्वे, दूरसंचार, विमा यांसारख्या निवडक सेवांसाठी ₹5 निश्चित MDR; ग्राहकांकडून थेट शुल्क वसूल करता येणार नाही नवी दिल्ली : देशभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या डिजिटल पेमेंट प्रणालींपैकी एक असलेल्या UPI व्यवहारांच्या शुल्करचनेत महत्त्वाचा बदल होणार आहे. 15 ऑक्टोबर 2026 पासून निवडक Person-to-Merchant (P2M) UPI व्यवहारांवर Merchant Discount Rate (MDR) लागू करण्यात येणार आहे. नव्या नियमांनुसार ₹2,000 पेक्षा जास्त रकमेच्या पात्र व्यापारी व्यवहारांवर साधारणपणे 0.4 टक्के MDR आकारला जाईल. मात्र, हा शुल्कभार ग्राहकाकडून थेट वसूल करता येणार नाही. ₹2 हजारांपर्यंतचे UPI व्यवहार पूर्वीप्रमाणेच शुल्कमुक्त नव्या नियमांमध्ये ₹2,000 पर्यंतच्या पात्र P2M UPI व्यवहारांवर MDR लागू होणार नाही. त्यामुळे दैनंदिन स्वरूपातील किराणा, हॉटेल, दुकान किंवा इतर छोट्या खरेदीसाठी ₹2,000 पर्यंत UPI पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना या बदलाचा परिणाम होणार नाही. NPCIच्या माहितीनुसार, UPI P2M व्यवहारांपैकी 95 टक्क्यांहून अधिक व्यवहार ₹2,000 किंवा त्यापेक्षा कमी रकमेचे आहेत. त्यामुळे बहुतांश दैनंदिन व्यवहार या शुल्काच्या कक्षेबाहेर राहतील. ₹2 हजारांपेक्षा जास्त व्यवहारांवर 0.4 टक्के MDR ₹2,000 पेक्षा जास्त रकमेच्या पात्र Person-to-Merchant व्यवहारांवर 0.4 टक्के MDR लागू होईल. उदाहरणार्थ, ₹3,000 च्या व्यवहारावर 0.4 टक्के दरानुसार ₹12 MDR होईल, तर ₹50,000 च्या व्यवहारावर ₹200 MDR होऊ शकतो. मात्र, मोठ्या व्यवहारांसाठी MDRची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ₹75,000 किंवा त्याहून अधिक रकमेच्या व्यवहारावर MDR कमाल ₹300 प्रति व्यवहार इतकाच राहील. म्हणजे व्यवहाराची रक्कम त्यापेक्षा जास्त असली तरी MDR ₹300 पेक्षा अधिक आकारला जाणार नाही. ग्राहकाच्या खात्यातून 0.4 टक्के रक्कम कापली जाणार का? या नव्या नियमाबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, MDR हा व्यापारी बाजूवरील शुल्क आहे. ग्राहकाच्या UPI पेमेंटमधून स्वतंत्रपणे 0.4 टक्के रक्कम कापण्याची तरतूद या चौकटीत नाही. केंद्र सरकारनेही व्यापाऱ्यांनी हा खर्च ग्राहकांवर टाकू नये, याबाबत बँकांना व संबंधित यंत्रणांना निर्देश दिले आहेत. त्यामुळे “₹2,000 पेक्षा जास्त UPI पेमेंट केले की ग्राहकाच्या खात्यातून 0.4 टक्के अतिरिक्त पैसे कट होतील”, असा सरसकट दावा चुकीचा ठरतो. पेट्रोल, रेल्वे, विमा, दूरसंचार सेवांसाठी ₹5 निश्चित MDR काही विशिष्ट व्यापारी श्रेणींसाठी 0.4 टक्क्यांऐवजी प्रति पात्र व्यवहार ₹5 निश्चित MDR ठेवण्यात आला आहे. यामध्ये रेल्वे, दूरसंचार, विमा आणि इंधन (पेट्रोल/डिझेल) यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. या श्रेणीतील ₹2,000 पेक्षा जास्त पात्र UPI व्यवहारांवर ₹5 MDR लागू होईल. मात्र, हा MDR व्यापाऱ्याच्या बाजूचा शुल्क असून, त्याचा अर्थ ग्राहकाने प्रत्येक पेट्रोल किंवा रेल्वे व्यवहारावर ₹5 अतिरिक्त देणे असा होत नाही. व्यक्ती-ते-व्यक्ती UPI व्यवहारांवर परिणाम नाही एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला UPIद्वारे पैसे पाठवले, म्हणजेच Person-to-Person (P2P) व्यवहार केला, तर या नव्या MDRचा त्यावर परिणाम होणार नाही. व्यक्ती-ते-व्यक्ती UPI व्यवहार पूर्वीप्रमाणेच शुल्कमुक्त राहतील. छोट्या व्यापाऱ्यांनाही दिलासा नव्या चौकटीत छोट्या व्यापाऱ्यांसाठीही सवलतीची तरतूद आहे. UPI QR कोडद्वारे महिन्याला ₹1 लाखांपर्यंतची रक्कम स्वीकारणाऱ्या पात्र छोट्या व्यापाऱ्यांना MDRमधून सूट देण्यात आली आहे. यामुळे छोट्या दुकानदारांवरील अतिरिक्त व्यवहारखर्चाचा परिणाम कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शेअर्स आणि म्युच्युअल फंडसह भांडवली बाजारातील व्यवहारांसाठी स्वतंत्र दर सामान्य P2M व्यवहारांपेक्षा काही आर्थिक व्यवहारांसाठी स्वतंत्र MDR रचना करण्यात आली आहे. भांडवली बाजाराशी संबंधित पात्र UPI व्यवहारांसाठी 0.02 टक्के MDR निश्चित करण्यात आला असून, त्यावरही ₹300 प्रति व्यवहार कमाल मर्यादा ठेवण्यात आली आहे. 15 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी NPCIने जाहीर केलेली ही सुधारित MDR चौकट 15 ऑक्टोबर 2026 पासून लागू होणार आहे. त्यामुळे मोठ्या रकमेचे UPIद्वारे व्यापारी व्यवहार करणाऱ्या व्यवसायांना त्यांच्या पेमेंट व्यवस्थेत या बदलाची तयारी करावी लागणार आहे. दुसरीकडे, ₹2,000 पर्यंतचे P2M व्यवहार आणि P2P व्यवहार शुल्कमुक्तच राहणार असल्याने सामान्य UPI वापरावर व्यापक परिणाम होणार नाही. थोडक्यात :• ₹2,000 पर्यंतचे पात्र P2M UPI व्यवहार — MDR नाही• ₹2,000 पेक्षा जास्त पात्र P2M व्यवहार — 0.4% MDR• ₹75,000 व त्यावरील व्यवहार — कमाल ₹300 MDR• रेल्वे, दूरसंचार, विमा, इंधन इ. निवडक श्रेणी — ₹5 निश्चित MDR• व्यक्ती-ते-व्यक्ती UPI व्यवहार — शुल्कमुक्त• पात्र छोट्या व्यापाऱ्यांना — MDRमधून सूट• ग्राहकांकडून MDR थेट वसूल करण्याची तरतूद — नाही

Read More

सोना इस्टेटजवळ पाण्याचा टँकर नाल्यात पलटी; चालक घटनास्थळावरून पसार

सुदैवाने जीवितहानी टळली; अपघातामुळे परिसरात काही काळ खळबळ जामनेर :JBN महाराष्ट्र News शहरातील सोना इस्टेटजवळ पाण्याचा टँकर नाल्यात पलटी झाल्याची घटना घडली. टँकर पलटी झाल्यानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पाण्याचा टँकर सोना इस्टेट परिसरातून जात असताना अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर टँकर रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात जाऊन पलटी झाला. या घटनेमुळे परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली. टँकर नाल्यात पलटी झाल्यानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चालक नेमका कोण होता आणि अपघात कशामुळे झाला, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाल्याची माहिती नाही. संबंधित यंत्रणेकडून घटनेची पाहणी करून पुढील कार्यवाही केली जात आहे. अपघातानंतर फरार झालेल्या चालकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. अपघातामुळे टँकरचे नुकसान झाले असून, तो नाल्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या घटनेमुळे सोना इस्टेट परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.

Read More

गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त जामनेरमध्ये रक्तदान शिबिर; १०९ रक्तदात्यांचे योगदान

जे बी एन महाराष्ट्र न्यूज | जामनेरप्रतिनिधी : सुपडू जाधव जामनेर : शहरातील शास्त्रीनगर भागात श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गजानन महाराज भक्त परिवाराच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराच्या चौथ्या वर्षी तब्बल १०९ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. गजानन महाराज भक्त परिवाराच्या वतीने दरवर्षी पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. याच सामाजिक भावनेतून यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रेडप्लस ब्लड सेंटर फाउंडेशन यांच्या माध्यमातून रक्तसंकलन करण्यात आले. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तदानातून जीवन वाचविण्यास हातभार लागावा, या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. भक्त परिवारातील कार्यकर्ते, नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिबिराच्या आयोजनासाठी सहकार्य केले. यावेळी ह.भ.प. एकनाथ महाराज चवरे, एकनाथ मिस्तरी, संजय महाजन, राहुल भाऊ चव्हाण, विकास पाटील, ईश्वर प्रल्हाद चवरे, शंकर सातवे, भैय्या परिट, माधव चव्हाण, कैलास पालवे, नाना सातवे, महेंद्र बाविस्कर (मा. उपनगराध्यक्ष), दिलीप खोडपे सर (मा. जिल्हा परिषद सदस्य), बाबुराव हिवराळे (नगरसेवक), चंद्रकांत शिंदे (नगरसेवक), पप्पू भाऊ पाटील, सचिन बोरसे, प्रदीप गायके, रविंद्र बंडे, नामदेव पालवे, डॉ. विनोद भोई, जगदीश बैरागी, संतोष सोनवणे, संजय पालवे, गोकुळ साळुंके, युवराज माळी, जयवंत पर्वते, विकास माळी, आकाश साळुंखे यांच्यासह गजानन महाराज भक्त परिवारातील नागरिक व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. गजानन महाराज भक्त परिवाराच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांचे उपस्थितांनी कौतुक केले. भक्तीबरोबरच समाजसेवेची परंपरा जपणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Read More

शिक्षक सन्मान सोहळ्यात मुख्याध्यापक जयप्रकाश पाटील यांचा गौरव

जळगाव : बन्सल क्लासेस, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक सन्मान सोहळ्यात निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक जयप्रकाश रामराव पाटील यांचा गौरव करण्यात आला. जळगाव येथील हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास आदरणीय खासदार स्मिताताई वाघ तसेच भारत सरकार, संरक्षण मंत्रालय, दिल्ली येथील अधिकारी आदरणीय सौरभजी चितलांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न तसेच विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये दिलेल्या योगदानाची दखल घेत मुख्याध्यापक जयप्रकाश पाटील यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बन्सल क्लासेसचे संचालक आदरणीय हेमंत दिलीप आगीवाल यांचीही प्रमुख उपस्थिती होती. शिक्षकांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या योगदानाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक जयप्रकाश पाटील यांच्या या सन्मानाबद्दल निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या कार्याचा झालेला हा गौरव विद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यामुळे नवी ऊर्जा मिळणार आहे.

Read More

जामनेर पोलिसांची अवैध दारूविक्रीविरोधात मोठी कारवाई; तीन ठिकाणी हातभट्ट्या उद्ध्वस्त

गारखेडा, ओझर खुर्द व मोहाडी येथे पोलिसांच्या तीन पथकांची धडक कारवाई; सुमारे १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट, तीन आरोपी ताब्यात जामनेर : अवैध दारूविक्री तसेच हातभट्टी दारू निर्मितीला आळा घालण्यासाठी जामनेर पोलिसांकडून सुरू असलेल्या विशेष मोहिमेला वेग आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवशी तीन स्वतंत्र पथके तयार करून गारखेडा, ओझर खुर्द आणि मोहाडी येथे धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी गावांमध्ये अवैधरीत्या सुरू असलेल्या हातभट्ट्यांचा शोध घेत त्या उद्ध्वस्त केल्या. दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य, कच्चा माल तसेच इतर मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला. तिन्ही कारवायांमध्ये मिळून सुमारे १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधातील या विशेष मोहिमेसाठी जामनेर पोलिसांनी तीन स्वतंत्र पथके तयार केली होती. प्रत्येक पथकाने संबंधित गावात मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई केली. गारखेडा, ओझर खुर्द आणि मोहाडी येथे केलेल्या या स्वतंत्र कारवायांमध्ये हातभट्टी दारू निर्मितीचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईत तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध पद्धतीने दारू तयार करून तिची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील अवैध दारू निर्मिती व विक्रीवर पोलिसांकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. अशा प्रकारच्या अवैध व्यवसायाची माहिती मिळाल्यास त्यावर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या असून, अवैध दारूविक्रीविरोधातील कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. जामनेर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध दारूविक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, परिसरातील हातभट्ट्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे या कारवाईतून दिसून आले आहे.

Read More

जामनेर-पहूर मार्गावर ४०७ टेम्पोचा भीषण अपघात; दोन हमालांचा जागीच मृत्यू

शेंदुर्णीजवळ टायर फुटल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती; पोषण आहाराच्या गोण्यांसह हमाल रस्त्यावर फेकले गेल्याचे वृत्त जामनेर : जामनेर-पहूर मार्गावर शेंदुर्णीजवळ मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी शालेय पोषण आहाराचे साहित्य घेऊन जाणाऱ्या ४०७ टेम्पोचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत वाहनासोबत असलेल्या दोन हमालांचा जागीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित ४०७ टेम्पोमध्ये शालेय पोषण आहाराच्या गोण्या भरून नेण्यात येत होत्या. शेंदुर्णीजवळ वाहनाचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर टेम्पो रस्त्यावर उलटला. अपघाताची तीव्रता एवढी होती की वाहनातील पोषण आहाराच्या गोण्यांसह दोन हमाल बाहेर फेकले गेल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण, मृतांची ओळख आणि इतर तपशीलांची अधिकृत माहिती पोलिसांच्या पंचनामा व तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. गोण्यांवर बसून प्रवास केल्याची माहिती अपघातानंतर सर्वाधिक गंभीर बाब समोर आली ती म्हणजे वाहनातील दोन हमाल पोषण आहाराच्या गोण्यांवर बसून प्रवास करत असल्याची माहिती. मालवाहू वाहनामध्ये कामगारांना अशा प्रकारे बसवून नेण्यात आले होते का, याचा तपास होणे आवश्यक आहे. जर तपासामध्ये हमालांना मालाच्या गोण्यांवर बसवून नेल्याचे स्पष्ट झाले, तर त्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. मालवाहू वाहनात प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी सुरक्षित व्यवस्था करण्यात आली होती का, त्यांना अधिकृत आसनव्यवस्था होती का आणि वाहतूकदाराकडून सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यात आले होते का, याची चौकशी होणे गरजेचे आहे. शासकीय पोषण आहाराच्या वाहतुकीवरही प्रश्नचिन्ह या अपघातामुळे केवळ वाहनचालकाची जबाबदारी नव्हे, तर शालेय पोषण आहाराच्या वाहतुकीची संपूर्ण कार्यपद्धती तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. संबंधित वाहनातून पोषण आहार नेमका कुठून कुठे पाठविण्यात येत होता, त्यासाठी वाहतूक आदेश कोणी दिला होता, संबंधित वाहनाची नियुक्ती कशा पद्धतीने करण्यात आली होती आणि वाहतूकदाराला कोणत्या अटी व नियम लागू करण्यात आले होते, याची पडताळणी होणे आवश्यक आहे. हा पोषण आहार पाचोरा येथून पाठविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे माल कुठून उचलण्यात आला, कोणत्या शाळा किंवा वितरण केंद्रांसाठी तो पाठविण्यात आला होता, मालाचे प्रमाण किती होते आणि त्या वाहतुकीसाठी अधिकृत कागदपत्रे कोणती होती, याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. वाहनाच्या कागदपत्रांसह तांत्रिक तपासाची गरज अपघाताचे प्राथमिक कारण टायर फुटणे सांगितले जात असले, तरी टायर फुटण्यामागील नेमके कारण काय होते, याचाही तांत्रिक तपास आवश्यक आहे. वाहनाची यांत्रिक स्थिती, टायरची अवस्था, ब्रेक व इतर यंत्रणा, वाहनाची फिटनेस स्थिती, वाहनावर असलेले वजन आणि वाहनाचा वेग या सर्व बाबी तपासल्यानंतरच अपघातामागील नेमकी कारणे स्पष्ट होऊ शकतील. त्याचबरोबर वाहनाची आरसी, विमा, फिटनेस प्रमाणपत्र, परमिट तसेच चालकाचा परवाना वैध होता का, याचीही तपासणी होणे आवश्यक आहे. वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेण्यात आला होता का, याचाही तपास महत्त्वाचा ठरणार आहे. दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर या दुर्घटनेत दोन हमालांचा जीव गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या कामगारांचा अशा दुर्घटनेत मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबाच्या भवितव्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. संबंधित कुटुंबांना शासनाकडून किंवा संबंधित यंत्रणेकडून मदत मिळणार का, याकडेही आता लक्ष लागले आहे. वाहतूक सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर जामनेर-पहूर मार्गावर घडलेल्या या दुर्घटनेमुळे मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मालवाहू वाहनामध्ये कामगारांना सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष करून प्रवास करावा लागत असेल, तर भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित विभागाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून पंचनामा व तपासाची प्रक्रिया करण्यात येत असून, अपघाताचे नेमके कारण आणि दुर्घटनेसाठी कोणाची जबाबदारी निश्चित होते, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Read More

जामनेर पोलिसांची मोठी कारवाई; 2.94 लाखांचा गांजा जप्त

5 किलो 352 ग्रॅम गांजा जप्त; शिंगाईत परिसरातील संशयिताविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा जामनेर : प्रतिनिधी JBN NEWS जामनेर पोलिसांनी अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात मोठी कारवाई करत 5 किलो 352 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत 2 लाख 94 हजार 360 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई 14 सप्टेंबर 2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर पोलीस ठाण्याच्या पथकाला शिंगाईत शिवारात गांजाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून जामनेर–भुसावळ रोडवरील सुशीला एजन्सीजवळील रामा हॉटेल परिसरात कारवाई केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी हिरवट-तपकिरी रंगाचा पाने, फुले व बिया असलेला 5 किलो 352 ग्रॅम गांजा जप्त केला. या गांजाची बाजारातील किंमत 2,94,360 रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात भगवान हिरामन सूर्यवंशी, रा. शिंगाईत, ता. जामनेर याच्या ताब्यातून गांजा मिळून आल्याचे पोलिसांच्या प्रेस नोटमध्ये नमूद आहे. पोलिसांची चाहूल लागताच संशयिताने अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचेही पोलिसांनी सांगितले. संबंधित व्यक्ती गांजा स्वतःच्या ताब्यात ठेवून ग्राहकांना नशेसाठी विक्री करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध NDPS कायदा 1985 मधील कलम 8(C) व 20(B) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची मोठी किंमत लक्षात घेता जामनेर पोलिसांची ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई ही कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे, स.पो.नि. स्वप्निल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे, पोहेकॉ/358 उमेश चौधरी, पोको/2103 सचिन महाजन, पोको/1730 योगेश पाटील, पोको/3235 विशाल लाड आणि पोको/2295 अनमोल पाटील यांच्या पथकाने सहभाग घेतला. जामनेर पोलिसांच्या या कारवाईमुळे शहर व परिसरातील अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी काळातही अवैध धंदे व अमली पदार्थांच्या विक्रीविरोधातील कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Read More

सण-उत्सवात जनतेच्या सुरक्षेसाठी पोलिसांची अहोरात्र धावपळ

गणेश स्थापनेच्या गर्दीत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षक बोऱ्हाडे स्वतः रस्त्यावर; रात्री उशिरापर्यंत अवैध धंद्यांवरही कारवाई जामनेर : सण-उत्सव म्हटला की सर्वसामान्य नागरिकांच्या आनंदाला आणि उत्साहाला उधाण येते. मात्र, याच काळात नागरिकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, वाहतूक सुरळीत राहावी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस यंत्रणा अहोरात्र कार्यरत असते. पोलिसांची ही धावपळ आपण अनेकदा ऐकतो; मात्र त्यामागची मेहनत प्रत्यक्ष पाहिली की पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम करावासा वाटतो. जामनेर शहरात गणेश स्थापनेच्या निमित्ताने मंगळवारी विविध ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये आणि गणेशभक्तांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी जामनेर पोलीस ठाण्याचे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक निवृत्ती भिमराव बोऱ्हाडे हे स्वतः रस्त्यावर उतरून पोलीस कर्मचाऱ्यांसोबत कर्तव्य बजावताना दिसून आले. एकीकडे रस्त्यावरील गर्दी आणि वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी पार पाडत असतानाच दुसरीकडे शहराबाहेरील एका हॉटेलमध्ये अवैधरित्या गांजा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने संबंधित ठिकाणी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईनंतर रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सण-उत्सवाच्या काळात नागरिक आपल्या कुटुंबीयांसोबत आनंद साजरा करत असताना, पोलीस मात्र आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी घरापासून दूर असतात. त्यांच्या कुटुंबीयांना त्यांची वाट पाहत असतानाही नागरिकांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था यालाच प्राधान्य दिले जाते. “सदरक्षणाय खलनिग्रहणाय” या पोलीस दलाच्या ब्रीदवाक्याप्रमाणेच सज्जनांचे रक्षण आणि समाजकंटकांचा बंदोबस्त करण्याचे काम पोलीस यंत्रणा करताना दिसत आहे. जामनेर पोलिसांची ही कर्तव्यनिष्ठा आणि अहोरात्र सुरू असलेली धावपळ निश्चितच कौतुकास्पद आहे. गणेशोत्सवातील नागरिकांचा आनंद अबाधित ठेवण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरलेले पोलीस निरीक्षक बोऱ्हाडे आणि त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी यांचे कार्य खरोखरच सलाम करण्यासारखे आहे.

Read More

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांची धडक कारवाई

हद्दपार गुन्हेगारासह ५५ जणांवर कारवाई; ११ अजामीनपात्र वॉरंट तामील पाचोरा : आगामी गणेशोत्सव शांततेत व निर्विघ्नपणे पार पडावा तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पाचोरा पोलिसांनी सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी पहाटे ३ ते सकाळी ६.३० वाजेपर्यंत पाचोरा शहर तसेच ग्रामीण हद्दीत व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत ५ पोलीस अधिकारी, २५ पोलीस अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाचा सहभाग होता. या कारवाईदरम्यान पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार, शरीर व मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल असलेले आरोपी तसेच अवैध धंद्यांशी संबंधित संशयितांच्या ठिकाणी अचानक तपासणी व झडती घेण्यात आली. ५५ रेकॉर्डवरील आरोपींवर कारवाई कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी अभिलेखावरील एकूण ५५ गुन्हेगारांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. गणेशोत्सवाच्या काळात कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य अथवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणारी कृती करू नये, याबाबत त्यांना कडक समज देण्यात आली. हद्दपार गुन्हेगारावर गुन्हा दाखल पाचोरा शहरातून हद्दपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार मुख्तार शेख उर्फ धाड्या हा पोलिसांना हद्दीत आढळून आला. त्याच्याविरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली. ११ अजामीनपात्र वॉरंट तामील न्यायालयात प्रलंबित असलेल्या विविध प्रकरणांतील ११ अजामीनपात्र वॉरंट (NBW) पोलिसांनी यशस्वीरीत्या तामील केले. त्यामुळे प्रलंबित आरोपींवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला. अवैध दारू विक्रीवर धाड पोलिसांनी प्रोहिबिशन रेड अंतर्गत अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्धही कारवाई केली. या कारवाईत २२ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोवंश वाहतूक व बेकायदेशीर शस्त्राविरुद्धही कारवाई मोहिमेदरम्यान अवैध गोवंश वाहतुकीप्रकरणी एक कारवाई, तर आर्म्स ॲक्टअंतर्गत बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी एक कारवाई करण्यात आली. पोलिसांचा स्पष्ट इशारा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता व कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या, कायदा हातात घेणाऱ्या तसेच अवैध धंदे चालविणाऱ्या असामाजिक घटकांची कोणतीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पाचोरा पोलिसांकडून देण्यात आला आहे. गणेशोत्सव काळात अशाच प्रकारे धडक तपासणी, कॉम्बिंग ऑपरेशन आणि पोलिसांचे पेट्रोलिंग यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Read More

आठवणीतला ऑफलाइन काळ आणि आजचं ऑनलाइन जीवन…

जामनेर प्रतिनिधी | JBN महाराष्ट्र NEWS एक काळ असा होता, जेव्हा मोबाईल नव्हता, इंटरनेट नव्हतं; पण माणसांकडे एकमेकांसाठी भरपूर वेळ होता. आज सगळं काही ऑनलाइन झालंय, मात्र त्या जुन्या आठवणींची ऊब अजूनही मनाला सुखावते…एक काळ असा होता, जेव्हा माणूस खरंच ‘ऑफलाइन’ जगायचा. मोबाईल नव्हता, टीव्ही नव्हता, इंटरनेट नव्हतं आणि प्रत्येक क्षण सोशल मीडियावर दाखवण्याची गरजही नव्हती. घरात एखादा फोन असला तरी तो श्रीमंतांच्या घरातच असायचा. गरिबाच्या घरात साधेपणा होता; पण त्या साधेपणातही समाधान होतं.रात्र झाली की घरातला दिवा लावून सगळे एकत्र बसायचे. उन्हाळा असला की घराबाहेर मोकळ्या हवेत गप्पा रंगायच्या. अंगणात किंवा ओट्यावर बसून शेजारी-पाजारी सुख-दुःखाच्या गोष्टी सांगायचे. कुणाच्या घरात एखादा पाहुणा आला की तो फक्त त्या घराचा पाहुणा राहत नसे, तर संपूर्ण गल्लीचा पाहुणा व्हायचा.बालपण म्हणजे खेळ, माती आणि मित्रांची संगत…त्या काळात मनोरंजनासाठी मोबाईलची गरज नव्हती. कबड्डी, खो-खो, लगोरी, चोर-पोलीस, डब्बा ऐसपैस, लंगडी असे कितीतरी खेळ मुलं मनापासून खेळायची. सकाळी घरातून बाहेर पडलेलं मूल संध्याकाळी आईने आवाज दिल्यावरच घरी परतायचं.कधी पतंग उडवायची, कधी सायकलवरून गावभर फिरायचं, तर कधी मित्रांसोबत मैदानात तासन्‌तास खेळायचं. पडल्यावर खरचटलं तरी पुन्हा उठून खेळायला सुरुवात व्हायची. त्या खेळांमध्ये शरीराची ताकद वाढायची आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे मैत्रीची नाती घट्ट व्हायची.सण म्हणजे आनंदाचा खरा उत्सव…दिवाळी, पाडवा, भाऊबीज, पोळा अशा सणांची वर्षभर आतुरतेने वाट पाहिली जायची. दिवाळीत वर्षातून एकदा फटाके फोडण्याची मजा काही वेगळीच होती. मामाच्या गावाला जाणं, नातेवाईकांना भेटणं, एकत्र फराळ करणं आणि घराघरात जाऊन शुभेच्छा देणं—हा सगळा आनंद प्रत्यक्ष अनुभवता यायचा.आज एका क्लिकवर शुभेच्छा पाठवता येतात; पण पूर्वी शुभेच्छा देण्यासाठी माणसं स्वतःच्या पायाने एकमेकांच्या घरी जायची. त्या भेटीतला आनंद, आपुलकी आणि जिव्हाळा वेगळाच होता.लग्न असो वा छोटासा आनंद… सगळे सहभागी व्हायचेगावात कुणाच्या घरात लग्न असेल तर पंधरा दिवस आधीपासूनच तयारी सुरू व्हायची. घरातील मंडळींबरोबर शेजारी-पाजारीही कामाला लागायचे. कुणी स्वयंपाकात मदत करायचं, कुणी पाहुण्यांची व्यवस्था करायचं, तर कुणी इतर जबाबदाऱ्या सांभाळायचं.माणसांमध्ये टिकून होती ती आपुलकी, जिव्हाळा आणि एकमेकांसाठी उभं राहण्याची भावना.पण काळ बदलला…ऑफलाइन जग ऑनलाइन झालं…आज मोबाईलच्या एका क्लिकवर संपूर्ण जग आपल्या हातात आलं आहे. बाजारात जाण्यापासून ते खरेदी करण्यापर्यंत, शिक्षणापासून मनोरंजनापर्यंत आणि नातेवाईकांशी संवाद साधण्यापासून शुभेच्छा देण्यापर्यंत सगळं काही ऑनलाइन झालं आहे.आज सेल्फी, स्टेटस, रील्स, व्हिडिओ कॉल आणि सोशल मीडिया हे जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. आपण दिवसभर ऑनलाइन असतो; पण कधी कधी आपल्या जवळच्या माणसांसाठी मात्र वेळ नसतो.पूर्वी एखाद्या मित्राला भेटण्यासाठी आपण त्याच्या घरी जायचो. आज त्याच्या ऑनलाइन असण्याचा हिरवा दिवा पाहूनच समाधान मानतो. पूर्वी सणाच्या दिवशी घराघरात भेटी व्हायच्या; आज शुभेच्छांचा एक मेसेज काही सेकंदांत शेकडो लोकांपर्यंत पोहोचतो.तंत्रज्ञानाने जीवन नक्कीच सोपं केलं आहे. ऑनलाइन जगामुळे वेळ वाचला, अंतर कमी झालं आणि अनेक सुविधा आपल्या हाताशी आल्या. पण या सगळ्या सुविधांच्या गर्दीत आपण माणसांमधला संवाद आणि नात्यांमधली उब हरवू नये, हेही तितकंच महत्त्वाचं आहे.थोडं पुन्हा ‘ऑफलाइन’ जगूया…जुना काळ परत येणार नाही. ते दिवस, ते खेळ, ती अंगणातली गप्पा, मित्रांची टोळी आणि सणांची लगबग पुन्हा तशीच अनुभवता येणार नाही. पण त्या काळातील साधेपणा, माणुसकी, आपुलकी आणि नात्यांची किंमत आपण आजही जपू शकतो.कधीतरी मोबाईल बाजूला ठेवूया. कुटुंबासोबत बसूया. मित्रांना प्रत्यक्ष भेटूया. मुलांना मैदानात खेळू देऊया. सण फक्त स्टेटसवर न ठेवता तो आपल्या माणसांसोबत साजरा करूया.कारण शेवटी आयुष्याची खरी आठवण मोबाईलच्या गॅलरीत नसते; ती आपल्या मनात जपलेली असते.ऑनलाइन जगणं गरजेचं आहे, पण कधीतरी थोडं ‘ऑफलाइन’ जगणंही तितकंच आवश्यक आहे…!

Read More
error: Don't Try To Copy !!