Headlines

Latest posts

All
fashion
lifestyle
sports
tech

जामनेर न्यायालयात प्रजासत्ताक दिनी संविधान उद्देशिकेचे वाचन

जामनेर न्यायालयात प्रजासत्ताक दिनी संविधान उद्देशिकेचे वाचनयेथील न्यायालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त…

रेल्वे अपघातात जवानाचा दुर्दैवी मृत्यू ,मूळ गावी दोंदवाडे (ता. जामनेर, जि. जळगाव) येथे शासकीय इतमामात अंत्यविधी पार पडला

प्रतिनिधी श्रीरामपूर – भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले वीर जवान गणर…

तयारीला लागा… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मोठा निर्णय! सुप्रीम कोर्टात काय घडलं?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून सध्या राज्यात मोठे राजकीय वादळ उठले…

निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

पळासखेडे मिराचे – धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी लिमिटेड,…

अलवर (राजस्थान) येथे आयोजित खासदार क्रीडा महोत्सवास; केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित..

अलवर (राजस्थान) येथे स्थानिक लोकसभा खासदार व केंद्रीय पर्यावरण, वने…

ज्ञानगंगा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ग्रामपंचायतींना शैक्षणिक क्षेत्रभेट

ता.जामनेर __ : ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील ग्रामपंचायतींना…

जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षणात जामनेर तालुक्याचे प्रा.समीर घोडेस्वार व प्रा.सचिन गडाख यांना प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र देऊन सन्मानित:

जामनेर: महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक…

Latest Youtube

Popular

वर्डी-अडावद रस्त्यावर वनविभागाची धडक कारवाई; सागवान तस्करीचा डाव उधळलादुचाकीवरून अवैध लाकूड वाहतूक करणारा संशयित अंधाराचा फायदा घेत पसार; ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त
रावेर तालुक्यात २२ वर्षीय विवाहितेवर अत्याचार; संशयित आरोपी अटकेत
यावलमध्ये सागवान लाकडावर वनविभागाची धडक कारवाई; सात नग जप्त
यावलला राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात

Latest posts

नि.पं.पाटील विद्यालयात संस्था वर्धापन दिन साजरा

पळासखेडे मिराचे दि १७ जुलै २०२५(प्रतिनिधी ) नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे मिराचे शाळेत मातृहृदयी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन पवार हे होते. सर्वप्रथम कै.आचार्य बापूसो. गजाननराव गरुड व कै. अण्णासाहेब भास्करराव गरूड यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष , संस्था संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेचा इतिहास व प्रगती विषयी माहिती दिली.त्यानंतर विद्यार्थ्याची वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.विद्यालयाचे पर्यवेक्षक जे.आर.पाटील यांनी कै. आचार्य बापूंना अभिप्रेत असलेला विद्यार्थी याबद्दल मत व्यक्त केले.विद्यालयातील उपशिक्षक एस. जे. सोनवणे यांनी मनोगतात संस्थेची स्थापना व व्याप्ती याबद्दल विद्यार्थ्यांची हितगुज केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन पवार यांनी अध्यक्ष भाषणात कै.आचार्य गजाननराव बापूंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्था संचालक व सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील,चंद्रशेखर काळे,अब्दुल नबी तांबोळी,डी. पी .पाटील, संजू पवार,.शालिक पाटील,अशोक माळी,बळीराम माळी,लता पाटील हे मान्यवर उपस्थित होते.वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक – हर्षाली प्रवीण पाटील द्वितीय क्रमांक – हितेश वर्जन चव्हाण तृतीय क्रमाक – ओम संतोष चौधरी यांनी मिळविला. त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.त्याप्रसंगी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना व गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी 50 शालेय गणवेश वाटप करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाने ,सर्व शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष जी.पी. पाटील यांनी केले तर आभार व्ही. डी. पाटील यांनी मानले.

Read More

वर्डी-अडावद रस्त्यावर वनविभागाची धडक कारवाई; सागवान तस्करीचा डाव उधळलादुचाकीवरून अवैध लाकूड वाहतूक करणारा संशयित अंधाराचा फायदा घेत पसार; ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त

चोपडा | प्रतिनिधी :चोपडा तालुक्यातील वर्डी-अडावद मार्गावर सागवान लाकडाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या पथकाने रात्रीच्या वेळी कारवाई करत मोठ्या प्रमाणात सागवान लाकूड जप्त केले. या कारवाईदरम्यान दुचाकीवरून लाकूड वाहून नेणाऱ्या व्यक्तीचा पाठलाग करण्यात आला; मात्र अंधाराचा फायदा घेत त्याने दुचाकी आणि लाकूड रस्त्यावरच सोडून तेथून पळ काढला.मिळालेल्या माहितीनुसार, ४ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास वनपथकाला वर्डी-अडावद रस्त्यावर सागवानाच्या अनधिकृत वाहतुकीबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार वनपथकाने परिसरात गस्त वाढवून संशयित वाहनावर लक्ष ठेवले. काही वेळाने सागवानाचे अनघड लाकूड घेऊन जाणारी दुचाकी वनकर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली.पथकाने दुचाकीचा पाठलाग सुरू करताच संशयिताने वाहन थांबवून त्यावर असलेले लाकूड रस्त्याच्या कडेला सोडले आणि अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला. वनकर्मचाऱ्यांनी परिसराची तपासणी केली असता सागवानाचे मोठे ८० नग आणि लहान २० नग अनघड लाकूड आढळून आले.वनविभागाने घटनास्थळावरून अंदाजे ४० हजार रुपये किमतीची मोटारसायकल आणि सागवान लाकूड असा एकूण ४२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. जप्त केलेला मुद्देमाल पुढील कारवाईसाठी चोपडा येथे जमा करण्यात आला आहे.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईही कारवाई उपवनसंरक्षक सौरभ सहार, सहाय्यक वनसंरक्षक एम. बी. पाटील आणि अडावद वनक्षेत्रपाल प्रशांत सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वनपाल योगेश सालुंखे, वनरक्षक गजानन कोईगडे, सुशांत पावरा, हर्षल जोशी, वाहनचालक राजेश जोशी, राजू पाटील तसेच अडावद राऊंड स्टाफने सहभाग घेतला.दरम्यान, घटनास्थळावरून पसार झालेल्या संशयिताचा वनविभागाकडून शोध सुरू असून, जप्त केलेल्या लाकडाचा स्रोत आणि वाहतुकीबाबतही तपास केला जात आहे. सागवानाची अवैध तोड आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात वनविभागाने कारवाईचा बडगा उगारल्याने परिसरातील अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Read More

रावेर तालुक्यात २२ वर्षीय विवाहितेवर अत्याचार; संशयित आरोपी अटकेत

रावेर | प्रतिनिधीरावेर तालुक्यातील एका गावात २२ वर्षीय विवाहितेवर तिच्याच घरात घुसून अत्याचार केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून रावेर पोलिस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पीडित विवाहित महिला घरात एकटी असल्याची संधी साधून संशयित आरोपी अरुण भागवत यवत्तकर हा तिच्या घराजवळ आला. त्यानंतर त्याने कथितरीत्या बेकायदेशीरपणे घरात प्रवेश केला. घराचा दरवाजा आतून बंद करून घेतल्यानंतर त्याने पीडितेवर मारहाण करून तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.घटनेनंतर पीडितेने धाडस करून पोलिसांकडे धाव घेतली आणि संपूर्ण प्रकाराची माहिती देत तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत रावेर पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध बलात्कारासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सखाराम कांबळे करीत आहेत. घटनेमागील नेमके कारण, आरोपी व पीडितेची ओळख व संबंध तसेच घटनेशी संबंधित इतर बाबींचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून तपासातील अधिक माहिती आणि पुढील कायदेशीर कारवाईबाबत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.

Read More

यावलमध्ये सागवान लाकडावर वनविभागाची धडक कारवाई; सात नग जप्त

यावल : शहरालगतच्या खडकाई नदीपात्र परिसरात प्रोसोपिस बाभळीच्या झुडपांमध्ये लपवून ठेवण्यात आलेले सागवान लाकूड वनविभागाच्या पथकाने कारवाई करून जप्त केले. या कारवाईत सागवानाचे सात नग आढळून आले.वनविभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.२० वाजता गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने खडकाई नदीपात्र परिसरात पाहणी केली. यावेळी बाभळीच्या झुडपांमध्ये लपवून ठेवलेले सागवान लाकूड निदर्शनास आले.पंचांच्या उपस्थितीत केलेल्या पाहणीत सागवानाचे ७ नग, एकूण ०.१९२ घनमीटर घनफळाचे लाकूड आढळून आले. त्याची अंदाजे नुकसान किंमत ३,६३३ रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.वनविभागाने पंचनामा करून सदर सागवान कटसाईजचा माल जप्त केला. जप्त केलेला माल शासकीय वाहनाद्वारे मुख्य विक्री केंद्र, यावल येथे ताबा पावतीद्वारे जमा करण्यात आला.या प्रकरणी वनगुन्हा क्र. १९/२०२६, दिनांक ०३/०९/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली असून, पुढील आवश्यक पंचनामा व जबाब नोंदविण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.

Read More

यावलला राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात

यावल : यावल शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या महत्त्वाकांक्षी कामाला अखेर सुरुवात झाली आहे. गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावरील सुमारे ६ किलोमीटरच्या रस्त्याच्या कामासाठी तब्बल १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.यावल शहरातील भुसावळ टी-पॉईंट परिसरात आयोजित कार्यक्रमात या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच केंद्रीय बाल कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला.शहरातून जाणाऱ्या या मार्गावर वाहतुकीची वाढती वर्दळ लक्षात घेता चौपदरीकरणाची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. या कामामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतच वाहनचालकांना अधिक सुरक्षित आणि सुकर प्रवास करता येणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.या रस्त्याच्या कामासाठी नागरिक आणि स्थानिकांकडूनही सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. अखेर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने यावल परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.भूमिपूजन कार्यक्रमाला यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उज्जैनसिंग राजपूत, उपसभापती दीपक चौधरी, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी हिरालाल चौधरी, कुऱ्हा येथील माजी सभापती हर्षल पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य आर. जी. पाटील (नाना), माजी जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापती रविंद्र पाटील, भाजप यावल मंडळ अध्यक्ष सागर कोळी, किनगाव मंडळ अध्यक्ष अनिल पाटील यांच्यासह यावल नगरपालिकेच्या गटनेत्या नंदाताई महाजन, नगरसेविका कल्पना वाणी, वर्षा येवले, नयनवर तसेच कुऱ्हा येथील संचालिका कांचन फालक आणि विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर यावल शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून, परिसराच्या विकासालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

Read More

चिमुकल्यांच्या हाती खडू अन् वर्गात ‘गुरुजी’; पाळधी केंद्र शाळेत अनोखा शिक्षक दिनविद्यार्थ्यांनी साकारली शिक्षकांची भूमिका; शिक्षकांचा महाराष्ट्रीयन संस्कृतीनुसार सन्मान

पाळधी, दि. ५ सप्टेंबर : जामनेर तालुक्यातील पाळधी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत एक दिवसासाठी अध्यापनाची धुरा सांभाळली. चिमुकल्यांच्या हाती खडू आणि वर्गात ‘गुरुजी’ अशी आगळीवेगळी अनुभूती विद्यार्थ्यांसह शिक्षकांना मिळाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेतून विविध विषयांचे अध्यापन केले. शिक्षक म्हणून वर्गासमोर उभे राहण्याचा अनुभव घेताना विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि वक्तृत्वकौशल्य विकसित झाले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक किरण सपकाळे, शिक्षक अमित मुंडे, जितेंद्र नाईक, सतीश बावस्कर, रविंद्र क्षिरसागर, वाघ सर, तसेच सौ. जाधव, सौ. नंदा आपर, सौ. ज्योती पाटील, सौ. सुतार आणि सौ. वाघुळदे यांचा शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने महाराष्ट्रीयन संस्कृतीनुसार रुमाल, टोपी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर चोरडिया यांनी केले, तर आभार प्रदर्शन शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपाल वाणी, उपाध्यक्ष संदीप पाटील, प्रवीण माळी, विनोद शिंदे, सौ. शीतल शिंदे तसेच इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.

Read More

पाळधी केंद्रात केंद्रस्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धा संपन्न

पाळधी : इंग्रजी भाषेचे ज्ञान, शब्दसंपदा व अचूक शब्दलेखन कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने समूह साधन केंद्र, पाळधी अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या केंद्रस्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळास्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेतून प्रत्येक गटातील प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांची केंद्रस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी जि. प. केंद्र शाळा, पाळधी येथे झालेल्या केंद्रस्तरीय स्पर्धेत विविध गटांतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत आपले इंग्रजी शब्दलेखन कौशल्य दाखवून दिले. स्पर्धेतील गटनिहाय विजेते विद्यार्थी पुढीलप्रमाणे— गट क्र. १🥇 देवांश निलेश धनगर — जि. प. शाळा, सुनसगाव खुर्द🥈 कृष्णा अमोल पाटील — जि. प. शाळा, सोनाळे गट क्र. २🥇 संस्कृती समाधान पाटील — जि. प. शाळा, माळपिंप्री🥈 वंशराज समाधान धनगर — जि. प. शाळा, सुनसगाव खुर्द गट क्र. ३🥇 ऐश्वर्या दीपक पाटील — जि. प. शाळा, सोनाळे🥈 मंगेश कृष्णा लांडगे — जि. प. शाळा, माळपिंप्री गट क्र. ४🥇 हर्षदा विशालसिंग पाटील — जि. प. शाळा, देवपिंप्री🥈 प्रगती संजय तिरमली — जि. प. शाळा, माळपिंप्री या स्पर्धेसाठी श्री. मुरलीधर बोंडे, श्री. मानसिंग परदेशी, श्री. किरण सपकाळे आणि श्री. संदीप सोनार यांनी स्पर्धा परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्रप्रमुख श्री. बाबुराव धुंदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले. इंग्रजी भाषेच्या सबलीकरणासाठी राबविण्यात आलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांना आपले भाषिक कौशल्य सादर करण्याची प्रभावी संधी मिळाली. विजेत्या विद्यार्थ्यांचे सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले, आता हे विजेते स्पर्धक तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग घेतील. त्यांच्या यशाबद्दल संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Read More

वाकडी केंद्रस्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेत उदय शिंदे प्रथम

वाकडी, दि. ४ सप्टेंबर : जि.प. केंद्रशाळा वाकडी येथे शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी केंद्रस्तरीय स्पेलिंग बी (स्पेलिंग पाठांतर) स्पर्धेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वाकडी केंद्रातील एकूण अकरा शाळांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची व स्मरणशक्तीची कसोटी पाहणारी ही स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. मोठ्या गटातून जि.प. शाळा चिंचखेडे ता. वा. येथील इयत्ता पाचवीचा अत्यंत गुणी व हुशार विद्यार्थी उदय सुरेश शिंदे याने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. उदयच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशामध्ये त्याचे वर्गशिक्षक श्री. सोपान किसन पारधी सर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. तसेच जि.प. शाळा चिंचखेडे येथील सर्व शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती तसेच संपूर्ण गावातून उदयचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी केंद्रसमन्वयक श्री. संदीप पाटील सर, केंद्रप्रमुख श्री. नामदेव पाटोळे सर तसेच वाकडी केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते. स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून वाकडी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक श्री. चौधरी सर यांनी उत्कृष्टपणे काम पाहिले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणाऱ्या अशा स्पर्धांमुळे त्यांच्यातील आत्मविश्वास, स्मरणशक्ती आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित होत असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

Read More

जामनेर : एकुलती गावात दारूबंदीसाठी महिलांचा आक्रमक पवित्रा; पोलिस ठाण्यावर मोर्चाचा इशारा

जामनेर | प्रतिनिधीजामनेर तालुक्यातील एकुलती गावात अवैध दारूविक्रीविरोधात महिलांनी आक्रमक भूमिका घेतली असून, गावात दारूबंदी लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अवैध दारूविक्रीमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.गावातील काही भागात अवैध पद्धतीने दारूविक्री सुरू असल्याने त्याचा मोठा परिणाम कुटुंबांवर आणि विशेषतः महिलांवर होत असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. घरातील वस्तू व धान्य विकून दारू पिण्याचे प्रकार तसेच तरुणांमध्ये वाढत असलेल्या व्यसनाधीनतेमुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.दारूविक्री बंद करण्याबाबत यापूर्वीही संबंधित यंत्रणेकडे अर्ज व तक्रारी करण्यात आल्याचे महिलांनी सांगितले. मात्र, अपेक्षित कारवाई होत नसल्याने महिलांनी आता थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.महिलांच्या म्हणण्यानुसार, पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दारूबंदीबाबत कारवाई करण्यासाठी दोन दिवसांची अल्टिमेटम देण्यात आली आहे. या कालावधीत गावातील अवैध दारूविक्री बंद न झाल्यास पोलिस ठाण्यासमोर साडी-चोळी व बांगड्यांचा भेट देत आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.यासोबतच शेंदुर्णी क्षेत्रातील ‘सुतार’ नामक कर्मचाऱ्याच्या पाठबळाने हा अवैध व्यवसाय सुरू असल्याचा आरोप महिलांनी केला असून, संबंधित कर्मचाऱ्याची तातडीने पोलिस मुख्यालयात बदली करण्याची मागणीही करण्यात आली आहे.दरम्यान, महिलांच्या या आक्रमक भूमिकेमुळे गावातील दारूबंदीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलिस प्रशासन या तक्रारींची दखल घेऊन अवैध दारूविक्रीविरोधात काय कारवाई करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Read More

जामनेरच्या बाजारपेठेत ६५ वर्षीय दुकानदारावर हल्ला; लोखंडी फायटरने कपाळावर वार

जुन्या भांडणाचा वाद पुन्हा उफाळला; सहा जणांविरुद्ध जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल* *फायटर, लाठी-काठीने मारहाणीचा आरोप: आरोपी अद्याप मोकाट* *Anchor :* जुन्या भांडणाच्या कारणातून वाद उफाळून येत ६५ वर्षीय किराणा दुकानदारावर लोखंडी फायटर, लाठी-काठीने हल्ला केल्याची घटना जामनेर शहरातील बाजारपेठ परिसरात घडली. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमराव रामजी जाधव हे जामनेर शहरातील बाजारपेठ परिसरात किराणा दुकान चालवतात. २९ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून संशयित आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला. यावेळी संदीप भिमलाल पवार याने लोखंडी फायटरने जाधव यांच्या कपाळावर आणि डाव्या बरगडीवर वार केल्याचा आरोप आहे. तसेच इतर आरोपींनी शिवीगाळ करत लाठी-काठीने मारहाण करून दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी संदीप पवारसह सहा जणांविरुद्ध दंग्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या कोणालाही अटक झालेली नाही. पुढील तपास जामनेर पोलीस करीत आहेत.

Read More

सकाळची नवी सुरुवात… नव्या आशा, नवी स्वप्ने!

प्रत्येक सकाळ ही आपल्या आयुष्यातील एक नवीन सुरुवात असते. कालचा दिवस कितीही कठीण गेला असला, कितीही अडचणी आल्या असल्या किंवा काही चुका झाल्या असल्या, तरी सकाळचा उगवता सूर्य आपल्याला पुन्हा एकदा नव्या उमेदीने उभे राहण्याची प्रेरणा देतो. कालच्या चुका हा अनुभव असतो, तर आजचा दिवस ही स्वतःला सिद्ध करण्याची संधी असते.सकाळच्या प्रसन्न वातावरणात मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते. पक्ष्यांचा किलबिलाट, उगवत्या सूर्याची कोवळी किरणे आणि निसर्गातील शांतता आपल्याला सकारात्मक विचार करण्यास शिकवते. म्हणूनच दिवसाची सुरुवात जर चांगल्या विचारांनी, सकारात्मक दृष्टिकोनाने आणि आत्मविश्वासाने केली, तर दिवसभरातील प्रत्येक कामात उत्साह आणि आनंद जाणवतो.आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी निराश होऊ नका. प्रत्येक अडचणीमागे एक शिकवण असते आणि प्रत्येक नवीन दिवस आपल्याला काहीतरी चांगले करण्याची संधी देतो. काल काय घडले यापेक्षा आज आपण काय करणार आहोत, हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे भूतकाळातील चुका विसरून भविष्याची सुंदर स्वप्ने मनात ठेवत वर्तमानातील प्रत्येक क्षण आनंदाने जगायला हवा.सकारात्मकतेचा धरूया हात,नव्या ध्येयाची करूया सुरुवात!हसत-खेळत जगा प्रत्येक क्षण,प्रसन्न राहो सदैव तुमचे तन-मन.आपल्या मनात चांगले विचार असतील, मेहनत करण्याची तयारी असेल आणि स्वतःवर विश्वास असेल, तर कोणतेही ध्येय अशक्य नाही. म्हणून आजच्या या नव्या दिवसाची सुरुवात नवीन आशा, नवीन विचार आणि नवीन स्वप्नांसह करूया.🌞 आजचा उगवलेला दिवस तुमच्या आयुष्यात आनंद, समाधान, उत्तम आरोग्य, नवीन संधी आणि भरभरून यश घेऊन येवो. प्रत्येक क्षण आनंदाने जगा आणि प्रत्येक संधीचे सोने करा.🌺 शुभ सकाळ!आपला आजचा दिवस आनंदमय, उत्साही आणि यशस्वी जावो!

Read More
error: Don't Try To Copy !!