नि.पं.पाटील विद्यालयात संस्था वर्धापन दिन साजरा
पळासखेडे मिराचे दि १७ जुलै २०२५(प्रतिनिधी ) नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे मिराचे शाळेत मातृहृदयी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन पवार हे होते. सर्वप्रथम कै.आचार्य बापूसो. गजाननराव गरुड व कै. अण्णासाहेब भास्करराव गरूड यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष , संस्था संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेचा इतिहास व प्रगती विषयी माहिती दिली.त्यानंतर विद्यार्थ्याची वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.विद्यालयाचे पर्यवेक्षक जे.आर.पाटील यांनी कै. आचार्य बापूंना अभिप्रेत असलेला विद्यार्थी याबद्दल मत व्यक्त केले.विद्यालयातील उपशिक्षक एस. जे. सोनवणे यांनी मनोगतात संस्थेची स्थापना व व्याप्ती याबद्दल विद्यार्थ्यांची हितगुज केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन पवार यांनी अध्यक्ष भाषणात कै.आचार्य गजाननराव बापूंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्था संचालक व सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील,चंद्रशेखर काळे,अब्दुल नबी तांबोळी,डी. पी .पाटील, संजू पवार,.शालिक पाटील,अशोक माळी,बळीराम माळी,लता पाटील हे मान्यवर उपस्थित होते.वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक – हर्षाली प्रवीण पाटील द्वितीय क्रमांक – हितेश वर्जन चव्हाण तृतीय क्रमाक – ओम संतोष चौधरी यांनी मिळविला. त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.त्याप्रसंगी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना व गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी 50 शालेय गणवेश वाटप करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाने ,सर्व शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष जी.पी. पाटील यांनी केले तर आभार व्ही. डी. पाटील यांनी मानले.
अवघ्या काहीच दिवसात बाप्पा आपल्या घरी येणार आहेत यानिमित्त खास पोस्ट
गणपतीची मुर्ती कशी असावी ???* बरेच जण आता आपल्या घरी बाप्पाला आणण्यासाठी मूर्ती बुकिंग करायला जातात तर त्यामध्ये काय पाहिलं जावं याची थोडक्यात माहिती खालील प्रमाणे 👇👇👇👇👇👇 १) गणपती १ फुटांपेक्षा जास्त मोठी मुर्ती नसावी,२) मुर्ती एका व्यक्तीला सहज उचलुन नेता व आणता आली पाहिजे,३) सिंहासनावर किंवा लोडाला टेकुन बसलेल्या विश्राम अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम.४) साप, गरुड, मासा, किंवा युद्ध करतांना व चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये,५) शिवपार्वती च्या मांडीवर बसलेला गणपती मुळीच घेऊ नये,कारण शिव पार्वती ची पुजा लिंगस्वरुपातच केली जाते शास्त्रात मुर्ती निषिद्ध आहे,६) गणेश मुर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घरी आणूनये,७) गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मुर्ती मधे देवत्व येत नाही,तोवर ती केवळ माती समजावी.विधीवत प्राणप्रतिष्ठा करावी,८) मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याअगोदर काही कारणास्तव मुर्ति भंग झाल्यास अजिबात घाबरू नये, त्या मुर्तीस दहीभात नैवेद्य दाखवून त्वरीत विसर्जन करावे, व दुसरी मुर्ती आणुण प्रतिष्ठापना करावी, मनात कोणतेही भय व शंका आणुनये.९) कुटुंबात किंवा नात्यात मृत्यु झाल्यास सुतकात घरातील व्यक्ती ऐवजी, शेजारी, मित्रमंडळी यांचे करवी पुजा नैवेद्य दाखवून घ्यावा,गणपती विसर्जनाची घाई करू नये,१०) गणपती प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद व मद्य मांसाहार अजिबात करू नये,११) गणपती ला साधा भाजी भाकरीचा नैवेद्य रोज दाखवला तरी चालतो, केवळ आंबट व तिखट पदार्थ नसावेत, दही+साखर+भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे,१२) कोकणात मालवण भागात गौरी सणाला गौराईला मटणाचा नैवेद्य दाखवला जातो, ही अत्यंत विकृत प्रथा आहे, गौरी ही साक्षात आदिशक्ती पार्वती आहे, पार्वतीला निषिद्ध पदार्थांचा नैवेद्य दाखवून राक्षसी उपासना करू नका, मुर्ख प्रथा बंद कराव्यात,१३) *विसर्जन मिरवणूक काढतांना टाळ मृदंग अभंग म्हणत परमात्म्याला निरोप द्या,**अश्लील नृत्य व गाणी वाजवून विकृत चाळे करू नका !* आणि वरील गोष्टी जर जमणार नसतील तर गणपती बसवून त्याची विटंबना करू नका 🙏 🌷 *गणपती बाप्पा मोरया*🌷
1 महिना साखर खाणे बंद केल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या थक्क करणारे फायदे
आजकाल आपल्या रोजच्या आहारात साखरेचे (Added Sugar) प्रमाण खूप वाढले आहे. चहा, कॉफी, मिठाई, बिस्किटे, केक, कोल्ड ड्रिंक्स आणि अनेक पॅकबंद अन्नपदार्थांमध्ये साखरेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. जर एखाद्या व्यक्तीने सलग 30 दिवस म्हणजेच 1 महिना साखर न खाण्याचा किंवा तिचे प्रमाण अत्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला, तर शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतात. सुरुवातीच्या काही दिवसांत गोड खाण्याची तीव्र इच्छा (Sugar Cravings) होऊ शकते, परंतु हळूहळू शरीर या बदलाशी जुळवून घेते. 1 महिना साखर सोडल्यास शरीरावर काय परिणाम होतात, ते खालीलप्रमाणे: Effects Of Quitting Sugar On Body : 1 महिना साखर सोडण्याचे प्रमुख फायदेगोड खाण्याची सवय कमी होते : सुरुवातीचे काही दिवस वारंवार गोड खावेसे वाटू शकते. परंतु हळूहळू शरीराला कमी साखरेची सवय होते. यानंतर फळांसारखे नैसर्गिक गोड पदार्थही पूर्वीपेक्षा जास्त गोड आणि चवदार वाटू लागतात. वजन कमी होण्यास मदत : गोड पदार्थांमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते. कोल्ड ड्रिंक्स, मिठाई, बेकरी प्रॉडक्ट्स आणि साखरेचे पेय बंद केल्याने शरीरात जाणाऱ्या अतिरिक्त कॅलरीज थांबतात, ज्यामुळे वजन वेगाने कमी होण्यास मदत होते. दिवसभर टिकून राहणारी ऊर्जा : जास्त गोड खाल्ल्यानंतर शरीरात अचानक एनर्जी वाढल्यासारखी वाटते, पण थोड्याच वेळात रक्तातील साखर वेगाने खाली येते आणि थकवा जाणवतो. साखर बंद केल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते आणि दिवसभर उत्साह टिकून राहतो. दातांचे आरोग्य सुधारते : साखरेमुळे तोंडात घातक बॅक्टेरिया वाढतात, जे आम्ल (Acid) तयार करून दातांना कीड (Cavity) लावतात. 1 महिना साखर बंद केल्याने दातांचे आरोग्य उत्तम राहते. त्वचेमध्ये सुधारणा आणि पिंपल्स कमी : जास्त साखरेच्या सेवनामुळे शरीरात दाह (Inflammation) वाढतो, ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. साखर सोडल्याने त्वचा अधिक ताजी आणि चमकदार दिसू लागते. आहाराच्या उत्तम सवयी : 1 महिना साखर न खाल्ल्याने आपल्याला कळून येते की आपण रोज किती अनावश्यक गोड खात होतो. यामुळे पॅकबंद पदार्थांवरील ‘Added Sugar’ चे लेबल वाचण्याची आणि संतुलित आहार घेण्याची चांगली सवय लागते. जर तुम्हाला मधुमेह (Diabetes) किंवा इतर आरोग्य समस्या असतील, तर आहारात असा कोणताही मोठा बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.🩺आरोग्य हीच खरी संपत्ती!
पाळधी बायपासवर भीषण अपघात; कंटेनर पलटी, दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू
जळगाव : पाळधी ते तरसोद बायपास महामार्गावर बुधवार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरचा अचानक ताबा सुटल्याने कंटेनर रस्त्यावर पलटी झाला. याचवेळी दुचाकीवरून जाणारा दोनगाव बुद्रुक येथील एक तरुण कंटेनरखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर पाळधी बायपासमार्गे जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. काही क्षणांतच कंटेनर रस्त्यावर पलटी झाला. त्याचवेळी दुचाकीवरून जाणारा तरुण कंटेनरच्या खाली आल्याने हा भीषण अपघात घडला. अपघातात दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातामुळे बायपास मार्गावरील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा व पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. कंटेनरचा ताबा नेमका कोणत्या कारणामुळे सुटला, तसेच अपघातामागे इतर कोणते कारण होते का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या दुर्दैवी घटनेत तरुणाचा मृत्यू झाल्याने दोनगाव बुद्रुक परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. टीप : मृत तरुणाचे नाव अधिकृतरीत्या उपलब्ध नसल्याने ते नमूद केलेले नाही.
वाकडी परीसरात महिनाभरापासून पावसाचा खंड; मका, कपाशीसह पिके धोक्यात
वाकडी.ता.जामनेर.दि.०९/०९/२६वाकडी परिसरात जवळपास एकमहिन्यापासून पावसाने दडी मारल्याने बहरात आलेल्या पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मक्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, कडधान्य पिकांचीही फुलगळ झाल्याने उत्पादनाची आशा मावळली आहे.कोरडवाहू शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा आधार असलेल्या कपाशी पिकालाही फुलपाती गळतीचा फटका बसत असून,आगामी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांची माती झाल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे, पावसाच्या प्रतीक्षेत झोकात आलेल्या मक्याला पाण्या अभावी दाणे भरले नाहीत, परिणामी दाणे विरहित कणसे आता जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे, कडधान्य पिके बहरात आल्यानंतर फुलगळती झाल्याने उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे, कपाशीवरही फुलपाती गळती सुरू आहे,खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत,एक महिन्यांपासून पाऊस नाही, यावर शेतकऱ्यांच्या समस्यांचा परिस्थितीजन्य आवाज उठवून त्याचे वेळेवर निराकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत,शासनाने योग्य वेळी मदत केल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार नाही,अशी शेतकरी बांधव करीत आहेनिसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या पदरी दरवर्षी कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ येतो,मात्र, शेतमालाला योग्य भाव मिळाल्यास शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने जीवन जगता येईल,यंदा तर खरीप हंगाम हातचा गेल्याचे चित्र आहे, शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी,अशी चर्चा शेतकरी करीत आहेत.
🌿 सातपुड्याच्या जंगल परिसरात गांजा शेतीचा पर्दाफाश; १७५ झाडे जप्त
अडावद : सातपुड्याच्या जंगल परिसरात पिकांच्या आड लपवून सुरू असलेल्या अवैध गांजा शेतीवर अडावद पोलिसांनी धडक कारवाई केली. देवगड शिवारातील वनविभागाच्या कंपाउंड क्रमांक १६९ परिसरात सोयाबीन व तुरीच्या पिकाच्या आड गांजाची लागवड करण्यात आल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले. गोपनीय माहितीच्या आधारे अडावद पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी पोलिसांना गांजाची तब्बल १७५ हिरवीगार झाडे आढळून आली. पोलिसांनी पंचनामा करून ही सर्व झाडे जप्त केली. जप्त गांजाचे एकूण वजन १ किलो ३१० ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत २६ हजार २०० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी देवसिंग रावळ्या बारेला (वय ४४) याला पोलिसांनी अटक केली असून अडावद पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ‘नशामुक्त भारत’ आणि ‘ड्रग्स फ्री जळगाव’ अभियानांतर्गत करण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अडावद पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंधारे करीत आहेत. पिकांच्या आड लपवून गांजा शेती करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
🔴 BREAKING NEWS | जामनेरला नवे पोलीस निरीक्षक
रायगडहून आलेले निवृत्ती बो-हाडे यांच्या हाती जामनेरच्या कायदा-सुव्यवस्थेची कमान! जामनेर | प्रतिनिधी जामनेर पोलीस ठाण्याला अखेर नवे प्रभारी पोलीस निरीक्षक मिळाले असून निवृत्ती भिमराव बो-हाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बो-हाडे साहेब यापूर्वी रायगड जिल्ह्यातील माणगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. आता जामनेरची कायदा-सुव्यवस्था, गुन्हेगारीवर नियंत्रण आणि अवैध धंद्यांवर कारवाईची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असणार आहे. दरम्यान, JBN News चे संचालक किरण सोनवणे व प्रतिनिधी संतोष भिसे यांनी नवनियुक्त पोलीस निरीक्षक बो-हाडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जामनेरकरांच्या अपेक्षा वाढल्या! नव्या पोलीस निरीक्षकांकडून गुन्हेगारी व अवैध धंद्यांवर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे. JBN NEWS “रायगडहून जामनेरमध्ये एंट्री; बो-हाडेंच्या हाती आता कायदा-सुव्यवस्थेची कमान!”
ब्रेड खायला आवडतो?; विकत घेताना ‘ही’ गोष्ट नक्की करा अन्यथा होईल आरोग्याचं मोठं नुकसान…..*
🍞🍞🍞🥪🥪 नाश्त्यात अनेकांना ब्रेड खायला आवडतो. काहींना ब्राऊन ब्रेड आवडतो तर काहींना व्हाईट ब्रेड आवडतो. पण हे कितपत आरोग्यदायी आहे हे खूप कमी लोकांना माहिती असेल. नकळत लोक लो क्वॉलिटीचा ब्रेड खाऊन आपल्या आरोग्याशी खेळतात. ब्रेडच्या क्वालिटीबाबत जाणून घ्यायचं असल्यास ब्रेड पॅकेटवरील लेबल वाचा. पॅकेज्ड ब्रेड आणि त्याच्या ब्रँडबद्दल अनेक महत्त्वाची माहिती या लेबलवर दिलेली आहे. अशा परिस्थितीत जेव्हाही तुम्ही दुकानातून ब्रेड खरेदी कराल तेव्हा पॅकेटवरील लेबल नक्की चेक करा. ब्रेड बनवण्याच्या प्रक्रियेत, यीस्ट एक्टिव्ह करण्यासाठी साखर आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही ब्रेड खरेदी करता तेव्हा ब्रेडमध्ये साखर मिसळली आहे का हे पाहण्यासाठी लेबल तपासा. स्वीटनर म्हणून वापर केलेल्या गोष्टी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असल्याचं सिद्ध होतं. साखरेप्रमाणेच ब्रेडसाठीही मीठ लागते. बऱ्याचदा ब्रँड चव वाढवण्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त मीठ घालतात, ज्यामुळे ते एडिटिव्हसारखं काम करतं. मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार, ब्रेडच्या एका स्लाइसमध्ये १००-२०० मिलीग्रामपेक्षा जास्त सोडियम नसावं. अशा परिस्थितीत, एकूण मीठाचे प्रमाण तपासण्यासाठी लेबल तपासा. ब्राऊन ब्रेड, गव्हाचा ब्रेड आणि मल्टी-ग्रेन ब्रेड हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे असा विचार करून आपण अनेकदा घेतो. पण अनेक कारखान्यांमध्ये ब्रेड बनवताना इतर प्रकारचे पीठही गव्हाच्या पिठात मिसळले जाते. हे केले जाते जेणेकरून ब्रेड अधिक चवदार आणि आर्थिक बनू शकेल. त्यामुळे जेव्हाही तुम्ही ब्रेड खरेदी करता तेव्हा ब्रेडचे पॅकेट नक्की तपासा की ते बनवण्यासाठी कोणते पदार्थ वापरले गेले आहेत याची माहिती मिळेल. ब्रेड खरेदी करताना सर्वप्रथम त्यावरची एक्सपायरी डेट चेक करा. त्या तारखेनंतर ब्रेड खाऊ नका. या तारखेनंतर ब्रेड खराब होण्याची प्रक्रिया सुरू होते असं म्हटलं जातं. त्यामुळे त्रास होऊ शकतो. ब्रेड ताजा असतानाच चवीला उत्तम लागतो. बरेच ब्रँड ब्रेडची चव आणि ताजेपणा वाढवण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह आणि एडिटीव्ह वापरतात. हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. अशा परिस्थितीत, शक्य तितका एडिटीव्ह असलेला ब्रेड टाळा. फायबर हे ब्रेडच्या सर्वात लोकप्रिय घटकांपैकी एक आहे. प्रोसेसिंग करताना फायबर निघून जातं. जे आरोग्यासाठी चांगलं नसतं, म्हणून, लेबलवर नमूद केलेल्या फायबरचं प्रमाण नक्की चेक करा
जामनेर तालुक्यात सरपंच आरक्षणाचा तक्ता जाहीर; ३७ ग्रामपंचायतींचे आरक्षण स्पष्ट
जामनेर | प्रतिनिधीजामनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी सन २०२५ ते २०३० या कालावधीकरिता सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. दिनांक ७ व ८ सप्टेंबर २०२६ रोजीच्या आरक्षण सोडतीनुसार संबंधित ग्रामपंचायतींचे अंतिम आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.या आरक्षण तक्त्यानुसार विविध ग्रामपंचायतींमध्ये सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC), नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तसेच अनुसूचित जमाती अशा प्रवर्गांसाठी सरपंचपद राखीव करण्यात आले आहे.आरक्षणाच्या तक्त्यात पळासखेडे बु., काळखेडे, टाकळी बु., तोरगाव, कादोळी, वाकी बु., बिलवाडी, सामरोद, देवळसगाव, जंगीपुरा, लेलेगाव, पिंपळगाव गो., शेरी, चिंचोली पिंप्री, वाघारी, वाकडी, जळांद्री बु., सोनाळे, भागादरे, सावखेडे, वाकी खु., लोणी, केकतभिंभोरा, बेटावद बु., राजणी, हिरवखेडा न वा यांसह पुढील ग्रामपंचायतींचा समावेश आहे.आरक्षण निश्चित झाल्याने आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणत्या गावात कोणत्या प्रवर्गाला सरपंचपदाची संधी मिळणार, याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार तसेच ग्रामस्थांचे आता आरक्षणाच्या तक्त्याकडे लक्ष लागले आहे.विशेष म्हणजे, सरपंचपदाच्या आरक्षणामुळे अनेक गावांमध्ये महिला आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना नेतृत्वाची संधी मिळणार आहे. शासनाच्या नियमानुसार आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, संबंधित ग्रामपंचायतींमध्ये आगामी राजकीय समीकरणांनाही यामुळे वेग येण्याची शक्यता आहे
🚨 ब्रेकिंग | JBN महाराष्ट्र NEWS
मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट; नशिराबादमध्ये चेन्नई सायबर क्राईमची धडक! AIच्या मदतीने बनावट व्हिडिओ अन् पोस्ट प्रसारित केल्याचा संशय; होमगार्डची चौकशी सुरू नशिराबाद | प्रतिनिधी तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नावाचा वापर करून सोशल मीडियावर कथित बनावट अकाउंट तयार केल्याच्या प्रकरणाचे धागेदोरे आता जळगाव जिल्ह्यातील नशिराबादपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी चेन्नई वेस्ट झोन सायबर क्राईम पोलिसांचे पथक नशिराबाद पोलीस ठाण्यात दाखल झाले असून, स्थानिक पोलिसांच्या मदतीने होमगार्ड मोहम्मद जुनेद शेख कुतुबुद्दीन यांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. 🔴 AIच्या माध्यमातून बनावट कंटेंट तयार केल्याचा संशय मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने अथवा त्यांच्या ओळखीचा आभास निर्माण करणारे सोशल मीडिया अकाउंट तयार करण्यात आले होते. या अकाउंटवरून AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार केलेले व्हिडिओ, डिजिटल छायाचित्रे आणि विविध पोस्ट प्रसारित करण्यात आल्याचा संशय आहे. हा डिजिटल कंटेंट नेमका कोणी तयार केला? त्यामागे कोण व्यक्ती किंवा यंत्रणा आहे? याचा शोध घेण्यासाठी चेन्नई सायबर पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू असल्याची माहिती आहे. 🔎 IP लॉगपासून मोबाईल क्रमांकापर्यंत तपास तपासादरम्यान संबंधित सोशल मीडिया अकाउंटचे IP लॉग, लिंक्ड अकाउंट्स, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, सबस्क्रायबर तपशील आणि वापरण्यात आलेली डिजिटल उपकरणे यांची माहिती तपासली जात असल्याचे समोर आले आहे. बनावट अकाउंट कोणत्या ठिकाणाहून आणि कोणत्या उपकरणावरून ऑपरेट करण्यात आले? त्याद्वारे किती डिजिटल कंटेंट प्रसारित करण्यात आला? याचाही तपास केला जात आहे. 👮 होमगार्डची चौकशी; सहभाग अद्याप स्पष्ट नाही चेन्नईच्या सायबर क्राईम पथकाने नशिराबाद पोलीस ठाण्यात दाखल होऊन होमगार्ड मोहम्मद जुनेद शेख यांची चौकशी सुरू केल्याची माहिती आहे. मात्र, या प्रकरणात त्यांचा नेमका सहभाग आहे की नाही, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. त्यांच्या डिजिटल उपकरणांचा या प्रकरणाशी संबंध आहे का, याचीही तपासणी केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. ⚠️ नशिराबादमध्ये चर्चेला उधाण चेन्नईतील सायबर क्राईम पथक थेट नशिराबादमध्ये दाखल झाल्याने परिसरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बनावट अकाउंट नेमके कोणी तयार केले? AIच्या माध्यमातून तयार केलेला कंटेंट कोणाच्या सांगण्यावरून प्रसारित करण्यात आला? या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता चेन्नई सायबर क्राईमच्या तपासातून समोर येणार आहेत. टीप : या प्रकरणातील संबंधित व्यक्तीचा सहभाग अद्याप अधिकृतरीत्या सिद्ध झालेला नसून, पुढील माहिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
“मी काहीच केले नाही, तरी ‘तीसमारख्यां’ माझ्याच जाळ्यात अडकले!” — ना. संजय सावकारेंचा चौधरी बंधूंवर जोरदार हल्लाबोल“
“मी काहीही करत नाही, नेहमीच मला हवे तसे घडते; यातूनच आता स्वतःला तिसमारखां समजणारे माझ्याच जाळ्यात अडकले” — मंत्री संजय सावकारेभुसावळ : भुसावळच्या राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोपांना चांगलाच रंग चढला असून, वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांनी चौधरी बंधूंना लक्ष्य करत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. “मी काहीच केले नाही, तरी ‘तीसमारखां’ माझ्याच जाळ्यात अडकले!” अशा शब्दांत सावकारे यांनी चौधरी बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला.एका कार्यक्रमादरम्यान बोलताना ना. सावकारे यांनी आपल्या राजकीय विरोधकांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत, “मी काहीही न करता नेहमीच मला हवे तसे घडते. यातूनच आता स्वतःला तिसमारखां समजणारे माझ्याच जाळ्यात अडकले,” असे वक्तव्य केले.त्यांच्या या विधानामुळे भुसावळच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. सावकारे यांनी केलेल्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणत्या राजकीय घडामोडींकडे आहे, याबाबत स्थानिक राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.चौधरी बंधूंवर टीकेची धारयावेळी सावकारे यांनी चौधरी बंधूंच्या राजकीय भूमिकेवर आणि त्यांच्या हालचालींवर जोरदार टीका केली. “मी काहीही करत नाही, तरी परिस्थिती माझ्या बाजूने निर्माण होते,” या आशयाचे वक्तव्य करत त्यांनी विरोधकांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.सावकारे यांच्या वक्तव्यामुळे आगामी काळात भुसावळमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः चौधरी बंधू आणि सावकारे गटातील राजकीय समीकरणांवर या वक्तव्याचा काय परिणाम होतो, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.“तिसमारखां” वक्तव्याची जोरदार चर्चासावकारे यांच्या भाषणातील “तिसमारखां माझ्याच जाळ्यात अडकले” हा उल्लेख सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. विरोधकांना थेट आव्हान देणाऱ्या या वक्तव्यामुळे सोशल मीडिया तसेच स्थानिक राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.दरम्यान, सावकारे यांच्या या आरोपांवर चौधरी बंधूंकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे भुसावळच्या राजकारणात ‘सावकारे विरुद्ध चौधरी’ संघर्षाला पुन्हा धार येण्याची चिन्हे दिसत आहेत.


