नि.पं.पाटील विद्यालयात संस्था वर्धापन दिन साजरा
पळासखेडे मिराचे दि १७ जुलै २०२५(प्रतिनिधी ) नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे मिराचे शाळेत मातृहृदयी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन पवार हे होते. सर्वप्रथम कै.आचार्य बापूसो. गजाननराव गरुड व कै. अण्णासाहेब भास्करराव गरूड यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष , संस्था संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेचा इतिहास व प्रगती विषयी माहिती दिली.त्यानंतर विद्यार्थ्याची वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.विद्यालयाचे पर्यवेक्षक जे.आर.पाटील यांनी कै. आचार्य बापूंना अभिप्रेत असलेला विद्यार्थी याबद्दल मत व्यक्त केले.विद्यालयातील उपशिक्षक एस. जे. सोनवणे यांनी मनोगतात संस्थेची स्थापना व व्याप्ती याबद्दल विद्यार्थ्यांची हितगुज केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन पवार यांनी अध्यक्ष भाषणात कै.आचार्य गजाननराव बापूंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्था संचालक व सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील,चंद्रशेखर काळे,अब्दुल नबी तांबोळी,डी. पी .पाटील, संजू पवार,.शालिक पाटील,अशोक माळी,बळीराम माळी,लता पाटील हे मान्यवर उपस्थित होते.वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक – हर्षाली प्रवीण पाटील द्वितीय क्रमांक – हितेश वर्जन चव्हाण तृतीय क्रमाक – ओम संतोष चौधरी यांनी मिळविला. त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.त्याप्रसंगी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना व गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी 50 शालेय गणवेश वाटप करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाने ,सर्व शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष जी.पी. पाटील यांनी केले तर आभार व्ही. डी. पाटील यांनी मानले.
भावना महत्त्वाच्या की सत्यस्थितीला महत्त्व द्यावे?
माणसाच्या आयुष्यात भावना आणि सत्यस्थिती या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. भावना आपल्या मनाला दिशा देतात, तर सत्यस्थिती आपल्याला वास्तवाची जाणीव करून देते. अनेकदा आपण या दोन्हींच्या संघर्षात अडकतो. अशा वेळी प्रश्न पडतो—भावनांना महत्त्व द्यावे की सत्यस्थितीला? भावना माणसाला माणूस बनवतात. प्रेम, माया, जिव्हाळा, विश्वास आणि सहानुभूती यांमुळे नाती टिकून राहतात. जर आयुष्यात फक्त तर्क आणि वास्तव असेल, पण भावना नसतील, तर नात्यांमध्ये उब राहणार नाही. एखाद्याच्या वेदना समजून घेण्यासाठी केवळ सत्य पुरेसे नसते; त्यासाठी संवेदनशील मनही आवश्यक असते. परंतु प्रत्येक निर्णय फक्त भावनांच्या आधारावर घेतला, तर त्याचे परिणाम नेहमीच योग्य असतील असे नाही. भावना क्षणभंगुर असू शकतात. रागाच्या भरात घेतलेला निर्णय, अती प्रेमापोटी केलेला त्याग किंवा भीतीमुळे सोडून दिलेली संधी—हे सर्व पुढे पश्चात्तापाचे कारण ठरू शकते. म्हणूनच सत्यस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. सत्यस्थिती कधीकधी कठोर असते, पण ती वास्तव असते. वास्तवाकडे दुर्लक्ष करून फक्त भावनांमध्ये जगल्यास आपण स्वतःलाच फसवू शकतो. उदाहरणार्थ, एखादे नाते केवळ भावनिक जडणघडणीमुळे टिकवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात सतत अपमान, अविश्वास किंवा अन्याय असेल, तर वास्तव स्वीकारणेच योग्य ठरते. सत्य कडू असले तरी तेच पुढे जाण्याचा मार्ग दाखवते. याचा अर्थ भावना निरर्थक आहेत, असा नाही. भावना आणि सत्यस्थिती यांचा समतोल साधणे हीच खरी शहाणपणाची गोष्ट आहे. भावना आपल्याला मानवता शिकवतात, तर सत्यस्थिती आपल्याला योग्य निर्णय घेण्याची ताकद देते. भावना हृदयाचा आवाज असतात आणि सत्यस्थिती विवेकाचा. आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेताना हृदय आणि बुद्धी यांचा संवाद होणे आवश्यक आहे; संघर्ष नव्हे. शेवटी, भावना आणि सत्यस्थिती यांपैकी एकाची निवड करण्यापेक्षा, सत्याचा स्वीकार करताना भावनांचा आदर करणे आणि भावना जपत वास्तवाचा स्वीकार करणे अधिक योग्य आहे. कारण केवळ भावनांवर जगता येत नाही आणि केवळ वास्तवावरही आनंदी राहता येत नाही. संतुलनातच जीवनाचे खरे सौंदर्य दडलेले आहे.
🌿निसर्ग… माझा गुरु
सुगरण पक्ष्याच्या घरट्यातून शिकलेली जिद्द आणि चिकाटी निसर्ग माणसाला खूप काही शिकवतो. त्याच्या प्रत्येक रूपातून जीवनाचा एखादा नवा धडा मिळत असतो. तुम्ही या सुंदर निसर्गाकडून काय शिकलात? मला माहित नाही; पण मी मात्र निसर्गाकडून खूप काही शिकलो आहे.सुगरण पक्ष्याचे घरटे माझ्या आयुष्याची एक सुंदर प्रेरणा ठरले आहे. या छोट्याशा पक्ष्याकडून मी जिद्द, चिकाटी आणि पुन्हा उभं राहण्याची ताकद शिकलो. पक्ष्याने बांधलेले घरटे उध्वस्त करण्यासाठी अनेकदा वादळे येतात; मात्र प्रत्येक संकटानंतर तो पुन्हा नव्याने आपले घरटे बांधतो. परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार न मानण्याचा संदेश हा पक्षी आपल्याला देतो.२०२३ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘ABC डायरी’ या माझ्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरही सुगरण पक्ष्याचा फोटो आहे. या पक्ष्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले आणि म्हणूनच त्या पुस्तकात सुगरण पक्ष्यावर जवळपास सहा प्रकरणे लिहिली आहेत.निसर्ग मला सतत काही ना काही शिकवत गेला आणि त्यातूनच माझे साहित्य अधिक समृद्ध होत गेले.
चिपळूणजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक; ३० ते ४० प्रवासी जखमी
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात शनिवारी भीषण बस अपघाताची घटना घडली. अंबाडास खांदाट जंक्शनजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात तब्बल ३० ते ४० प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.धडक इतकी भीषण होती की दोन्ही बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. जखमी प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले.जखमींना रुग्णालयात दाखलअपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने चिपळूण ग्रामीण रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.अपघात कसा झाला?प्राथमिक माहितीनुसार, रत्नागिरी-कुडाळ आणि चिपळूण-खेड मार्गावर धावणाऱ्या दोन एसटी बस अंबाडास खांदाट जंक्शनजवळ समोरासमोर आल्या. त्यानंतर दोन्ही बसची जोरदार धडक झाली.मात्र, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. चालकाचा निष्काळजीपणा, रस्त्याची परिस्थिती किंवा अन्य कोणते कारण होते का, याची चौकशी केली जात आहे.घटनास्थळी मदतकार्यअपघातानंतर वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी यासाठी स्थानिक नागरिकांनीही मदत केली.या दोन्ही घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, संबंधित यंत्रणांकडून घटनांची चौकशी सुरू आहे.
कोयना एक्स्प्रेसमधून धुराचे लोट; प्रवाशांनी धडाधड मारल्या उड्या, नेमकं काय घडलं?
कोल्हापूर-मुंबई मार्गावरील कोयना एक्स्प्रेसमध्ये अचानक धूर निघू लागल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. शनिवारी सायंकाळच्या सुमारास खंडाळा घाट परिसरातून कर्जतच्या दिशेने जात असताना रेल्वेच्या एका डब्याजवळून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले.धूर वाढत असल्याचे पाहून काही प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक प्रवाशांनी घाईघाईने सामान घेऊन रेल्वेतून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. काही प्रवासी घाबरून धावत्या परिस्थितीत खाली उतरल्याचे सांगण्यात येत आहे.नेमकं काय घडलं?प्राथमिक माहितीनुसार, रेल्वेच्या इंजिन अथवा संबंधित यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने धूर निघाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धूर दिसताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. काही वेळ रेल्वे परिसरात धुराचे लोट पसरले होते.घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू केली. प्रवाशांना सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.मोठी दुर्घटना टळलीया घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, अचानक धूर निघाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण तपासले जात आहे.
खाकी वर्दीतच PSI ने उचललं टोकाचं पाऊल! धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात पोलीस दलाला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पोलीस उपनिरीक्षकाने (PSI) धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पोलीस विभागासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित PSI यांनी खाकी वर्दीत असतानाच हे टोकाचे पाऊल उचलल्याचे वृत्त आहे. धावत्या रेल्वेसमोर उडी घेतल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. PSI यांनी आत्महत्या करण्यापूर्वी कोणाला काही सांगितले होते का, तसेच कोणत्या परिस्थितीत त्यांनी हे पाऊल उचलले, याचा तपास केला जात आहे.दरम्यान, पोलीस अधिकाऱ्याच्या अशा प्रकारच्या मृत्यूमुळे हिंगोली पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचे नेमके कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
जामनेर न्यायालयात कायदेविषयक शिबीर संपन्न
जामनेर प्रतिनिधीसध्याच्या काळात व्यसनाधीनता खुप मोठी समस्या निर्माण झाली असुन विशेषतः युवक वर्गात खुप व्यसन दिसत आहे.गुडखा,गांजा,चरस,दारु यांचा सऱ्यास वापर आता शहर आणि खेड्यात सुद्धा जास्त वाढत आहे.यामुळे घरात, समाजात वाद, भांडणे निर्माण होतात .पैशाचा अपव्यय होऊन गुन्हेगारी सुद्धा वाढत चालली आहे.यामुळे समाजातील,घरात तेढ निर्माण होऊन सगळ्यांचेच नुकसान होत आहे.तेव्हा युवकांनी व्यवसनांपासुन दुर रहावे असे आवाहन जामनेर येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा जामनेर तालुका विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती यु.एस.वानखडे यांनी केले आहे.जामनेर न्यायालयात जामनेर तालुका विधी सेवा प्राधिकरण व जामनेर तालुका वकिल संघाच्या विद्यमाने विधी सेवा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ॲड.तृप्ती देठे यांनी आपल्या भाषणात युवकांमधील वाढती व्यसनाधीनता त्यांचे परिणाम तसेच याबाबत असलेले कायदे यांची सविस्तर माहिती दिली.यावेळी जामनेर तालुका वकिल संघाचे अध्यक्ष ॲड.कमलाकर बारी सचिव ॲड.डिगंबर गोतमारे तसेच सर्व वकिल बांधव, भगिनी,नागरिक न्यायालयीन कर्मचारी वर्ग उपस्थित होते.सुत्रसंचलन ॲड.एस.आर.पाटील तर आभार ॲड.देवेंद्र पारळकर यांनी मानले.
सामरोद जि. प. शाळेत ‘शाळा स्वच्छता अभियान’ उत्साहातगावकरी, ग्रामपंचायत व पोलीस पाटील यांचा सक्रिय सहभाग
सामरोद | प्रतिनिधी सामरोद येथील जिल्हा परिषद शाळेत ‘शाळा स्वच्छता अभियान’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या अभियानात ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील, शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेत श्रमदान केले. या वेळी शाळेच्या परिसरातील क्रीडांगण व बागेची स्वच्छता करण्यात आली. परिसरातील कचरा गोळा करून त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले. विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत शिक्षकांनी आरोग्य व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमात सरपंच व पोलीस पाटील यांनी ‘स्वच्छ शाळा, समृद्ध गाव’ या संकल्पनेवर मार्गदर्शन केले. शाळा हे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचे केंद्र असून शाळेचा परिसर स्वच्छ व सुंदर राहिल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्यासोबतच अभ्यासातील एकाग्रताही वाढते, असे त्यांनी सांगितले. गावकरी, लोकप्रतिनिधी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन श्रमदान केल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वच्छतेचा संदेश दिला. अभियानाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकवृंदाने अभियानात सहभागी झालेल्या सर्व ग्रामस्थ, सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत सदस्यांचे आभार मानले.
गोपाल भंडारी सह समाजसेवकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा विरोधकांचा डाव फसला; पोलिस ठाण्यातील तक्रार मागे ; ग्रामसभेत माफीनामा
शहादा प्रतिनिधी : ग्रामपंचायत शहाणा येथील कथित गैरव्यवहार/भ्रष्टाचाराबाबत चौकशी होऊ नये, संबंधित व्यक्तींवर प्रशासकीय कारवाई होऊ नये, ग्रामसभा होऊ नये, ग्रामपंचायतीच्या कारभाराची माहिती ग्रामस्थांना मिळू नये तसेच श्री. सुनील सुळे यांच्याविरुद्ध दाखल तक्रारीवर कारवाई होऊ नये, या उद्देशाने शहादा मतदार संघाचे माजी अपक्ष उमेदवार गोपाल सुरेश भंडारी, जितेंद्र पारासिंग भंडारी, दीपक तडवी, पवनसिंग पवार, जगदीश डुडवे, सोमनाथ सुळे, जामसिंग सुळे सह समाजसेवकांविरूद्ध पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील पोलिस ठाणे शहादा येथे दिनांक २६/८/२०२६ रोजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य , ग्रामसेवक,दिव्यांग कर्मचारी सुनील सुळे सह काही समाजकंटकांनी दिलेली तक्रार अखेर मागे घेण्यात आली आहे. याऊलट मौजे शहाणा, ता. शहादा येथील ग्रामस्थ, महिला, शेतकरी व विद्यार्थी आपणास नमूद करतो की, दिनांक २६/०८/२०२६ रोजी काही व्यक्तींनी आमच्याविरुद्ध तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन, सामाजिक अशांतता निर्माण करणे, सोशल मीडिया व व्हॉट्सॲपद्वारे बदनामी व दमदाटी करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, शेतकऱ्यांना शासकीय योजनांपासून वंचित ठेवणे, गावाची बदनामी करणे व शांतता भंग करणे इत्यादी गंभीर आरोपांची तक्रार पोलीस स्टेशन शहादा येथे केली आहे. सदर तक्रारीतील आरोप हे खोटे, तथ्यहीन व दिशाभूल करणारे असून त्याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत.ग्रामपंचायत शहाणा येथील कथित भ्रष्टाचाराबाबत होणारी चौकशी व दिनांक २७/०८/२०२६ रोजी आयोजित ग्रामसभा रोखण्यासाठी तसेच श्री. सुनील सुळे, कृषी सहाय्यक, मंदाणे गट, ता. शहादा यांच्या विरोधातील कथित भ्रष्टाचाराच्या तक्रारीवर कारवाई होऊ नये म्हणून समाजसेवक व ग्रामस्थांविरुद्ध खोटे व तथ्यहीन आरोप करून बदनामी, दमदाटी व सामाजिक असंतोष निर्माण करणाऱ्या संबंधित व्यक्तींविरुद्ध चौकशी करून गुन्हे दाखल करून कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार गोपाल भंडारी सह शहाणा गावातील अनेक ग्रामस्थांनी पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे शहादा येथे दिनांक २७/८/२०२६ रोजी दाखल केली आहे. त्यामुळे विरोधकांचा डाव चांगलाच फसला आहे.ग्रामसभेत याबाबत संबंधितांनी जाहीर माफी मागितली आहे.तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, गोपाल सुरेश भंडारी हे गाव व समाजहितासाठी काम करणारे व्यक्ती असून ते ग्रामस्थांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. गोपाल भंडारी किंवा त्यांचे साथीदार तडीपार नाहीत ते चांगले समाजसेवक आहेत.जितेंद्र पारासिंग भंडारी, दीपक तडवी, पवनसिंग पवार, जगदीश डुडवे, सोमनाथ सुळे, जामसिंग डेमा सुळे तसेच समस्त ग्रामस्थ, महिला, शेतकरी व विद्यार्थी हे गावाच्या विकासासाठी कार्यरत असून ग्रामस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात.ते कोणालाही धमकी देणे, शासकीय कामात अडथळा आणणे किंवा गावात अशांतता निर्माण करणे, खंडणी मागणे असा कोणताही प्रकार करत नाहीत.सुनील सुळे, कृषी सहाय्यक, यांच्या सांगण्यावरून खोटा तक्रार अर्ज देण्यात आला असून तक्रार अर्जावर आमच्या खोट्या सह्या करण्यात आल्या आहेत. तक्रार अर्ज रद्द करण्यात यावा व फाईल बंद करण्यात यावा .
जामनेरमध्ये भीषण रिक्षा अपघात; चार ते पाच महिला आणि तीन पुरुष जखमी
जामनेर | प्रतिनिधीजामनेर शहरातील भुसावळ रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ शुक्रवारी सायंकाळी एका प्रवासी रिक्षाचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात चार ते पाच महिला आणि तीन पुरुष जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.अपघाताची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नसून, वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.
समृद्धी महामार्गावर मध्यरात्री थरार! धावत्या कारचे टायर फोडून कुटुंबाला लुटले; तब्बल १८ लाखांचा मुद्देमाल लंपास
सिन्नर | प्रतिनिधीमुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या कुटुंबाला दरोडेखोरांनी लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना सिन्नर तालुक्यात समोर आली आहे. महामार्गावर धारदार वस्तू टाकून कारचे टायर फोडण्यात आले. कार थांबताच दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांनी प्रवाशांना धमकावत त्यांच्याकडील सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि मौल्यवान वस्तू लुटल्याची माहिती आहे. या घटनेत सुमारे १८ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे वृत्त आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर परिसरातील समृद्धी महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. दरोडेखोरांनी महामार्गावर धारदार वस्तू पसरवून ठेवल्याचा संशय आहे. त्यावरून काही वाहनांचे टायर फुटले. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्याच्या कडेला गाडी थांबवावी लागली.याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगरकडून प्रवास करणाऱ्या एका कुटुंबाच्या कारचेही टायर फुटले. अचानक टायर पंचर झाल्याने चालकाने कार थांबवली. मात्र, कार थांबताच परिसरात आधीपासून दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांनी संधी साधली.शस्त्रांचा धाक दाखवत लूटदरोडेखोरांनी कुटुंबातील सदस्यांना शस्त्रांचा धाक दाखवून धमकावले. त्यानंतर त्यांच्या जवळील सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू जबरदस्तीने काढून घेतल्या. या संपूर्ण प्रकारामुळे कुटुंबीयांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली.या दरोड्यात सुमारे १८ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे समोर आले आहे. घटना घडल्यानंतर दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.पोलिसांकडून तपास सुरूघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, महामार्गावरील कॅमेरे आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांकडून तपास केला जात आहे.समृद्धी महामार्गावर यापूर्वीही चोरी, दरोडा आणि इतर गुन्हेगारी घटनांची नोंद झाली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महामार्गावर पोलिसांची गस्त वाढवावी आणि संवेदनशील ठिकाणी अधिक सुरक्षा व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.


