नि.पं.पाटील विद्यालयात संस्था वर्धापन दिन साजरा
पळासखेडे मिराचे दि १७ जुलै २०२५(प्रतिनिधी ) नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे मिराचे शाळेत मातृहृदयी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन पवार हे होते. सर्वप्रथम कै.आचार्य बापूसो. गजाननराव गरुड व कै. अण्णासाहेब भास्करराव गरूड यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष , संस्था संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेचा इतिहास व प्रगती विषयी माहिती दिली.त्यानंतर विद्यार्थ्याची वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.विद्यालयाचे पर्यवेक्षक जे.आर.पाटील यांनी कै. आचार्य बापूंना अभिप्रेत असलेला विद्यार्थी याबद्दल मत व्यक्त केले.विद्यालयातील उपशिक्षक एस. जे. सोनवणे यांनी मनोगतात संस्थेची स्थापना व व्याप्ती याबद्दल विद्यार्थ्यांची हितगुज केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन पवार यांनी अध्यक्ष भाषणात कै.आचार्य गजाननराव बापूंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्था संचालक व सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील,चंद्रशेखर काळे,अब्दुल नबी तांबोळी,डी. पी .पाटील, संजू पवार,.शालिक पाटील,अशोक माळी,बळीराम माळी,लता पाटील हे मान्यवर उपस्थित होते.वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक – हर्षाली प्रवीण पाटील द्वितीय क्रमांक – हितेश वर्जन चव्हाण तृतीय क्रमाक – ओम संतोष चौधरी यांनी मिळविला. त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.त्याप्रसंगी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना व गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी 50 शालेय गणवेश वाटप करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाने ,सर्व शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष जी.पी. पाटील यांनी केले तर आभार व्ही. डी. पाटील यांनी मानले.
आठवणींच्या भिंतीवर आयुष्य हा शब्द वाचण्यापेक्षा… तो जगण्यात खरी मजा आहे!
आठवणींच्या भिंतीवर आयुष्य हा शब्द लिहिणं खूप सोपं असतं; पण त्या शब्दामागे असलेलं आयुष्य खरंच जगणं, त्यातील प्रत्येक क्षण मनापासून अनुभवणं आणि प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकणं, हे च खरं आयुष्य असतं. आपल्या आयुष्यात अनेक दिवस येतात आणि निघून जातात. काही दिवस आनंद देतात, काही डोळ्यांत पाणी आणतात, तर काही दिवस आपल्याला आयुष्यभरासाठी एखादा धडा देऊन जातात. काळ पुढे जात राहतो आणि शेवटी उरतात त्या फक्त आठवणी. पण प्रश्न असा आहे की, उद्या आठवणींच्या भिंतीकडे मागे वळून पाहताना आपल्याला काय दिसणार आहे? फक्त जगण्याची धावपळ…की मनापासून जगलेले काही सुंदर क्षण? आज आपण अनेकदा ‘उद्या’च्या विचारात ‘आज’ हरवून बसतो. थोडं अजून कमावू, मग फिरायला जाऊ… थोडं स्थिर होऊ, मग मनासारखं जगू… वेळ मिळाला की कुटुंबासोबत बसू… अशी अनेक कारणं देत आपण वर्तमान पुढे ढकलत राहतो. पण आयुष्याला ‘नंतर’ नावाचा कोणताही हमखास दिवस मिळत नाही. म्हणूनच आयुष्य म्हणजे केवळ श्वास घेण्याचं नाव नाही; तर प्रत्येक श्वासाचा अर्थ शोधण्याचं नाव आहे. आपल्या माणसांसोबत मनापासून हसणं, एखाद्या मित्रासोबत अचानक केलेली भटकंती, आई-वडिलांसोबत घालवलेला निवांत वेळ, मुलांच्या छोट्या छोट्या आनंदात सहभागी होणं, पावसात भिजताना मनमोकळं हसणं, निसर्गाच्या सान्निध्यात काही क्षण स्वतःसोबत घालवणं… हेच तर आयुष्य आहे. महागड्या वस्तू, मोठं घर, पैसा आणि प्रसिद्धी यांची किंमत नक्कीच आहे; पण शेवटी मनाला समाधान देतात त्या वस्तू नव्हे, तर त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी. कधी कधी एखादा जुना फोटो हातात येतो आणि आपण काही क्षणांसाठी भूतकाळात जातो. त्या फोटोमध्ये कदाचित साधे कपडे असतात, साधं घर असतं, परिस्थितीही साधी असते; पण चेहऱ्यावर असलेलं समाधान मात्र आजच्या अनेक सुखसोयींपेक्षा मोठं वाटतं. कारण त्या क्षणी आपण जगलो होतो… फक्त दिवस ढकलला नव्हता. आयुष्याची खरी श्रीमंती बँकेतील पैशात नसते, तर मनात साठवलेल्या सुंदर आठवणींमध्ये असते. म्हणून प्रत्येक दिवसाला एक सुंदर आठवण बनवण्याचा प्रयत्न करा. ज्यांच्यावर प्रेम करता त्यांना ते आजच सांगा. ज्यांच्याशी बोलायचं आहे त्यांना आजच फोन करा. ज्यांना भेटायचं आहे त्यांना आजच भेटा. कारण वेळ निघून गेल्यावर ‘काश…’ हा शब्द खूप मोठा वाटतो. आयुष्य खूप छोटं आहे. त्यात राग, अहंकार, गैरसमज आणि तक्रारींसाठी फारशी जागा नाही. मनातलं ओझं कमी करा, नात्यांना जपा, चुका माफ करा आणि स्वतःलाही माफ करायला शिका. कारण एक दिवस आपणही आठवणींच्या भिंतीवर उभे राहून आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहणार आहोत. तेव्हा आपल्या मनात एकच प्रश्न असावा— “मी आयुष्य फक्त जगलो का… की खरंच अनुभवलं?” म्हणूनच… आठवणींच्या भिंतीवर ‘आयुष्य’ हा शब्द वाचण्यात नाही, तर त्या भिंतीवर सुंदर आठवणींचे रंग भरत जगण्यात खरी मजा आहे. आजचा दिवस पुन्हा मिळणार नाही.म्हणून तो तक्रारीत नाही, तर आनंदात जगा.लोक काय म्हणतील यापेक्षा मन काय म्हणतं ते ऐका.कारण शेवटी लोकांच्या आठवणींपेक्षा आपल्या मनात उरलेल्या आठवणीच आपल्यासोबत राहतात. आयुष्य मोठं असण्यापेक्षा ते सुंदर असणं महत्त्वाचं…आणि सुंदर आयुष्य जगण्यासाठी योग्य वेळ म्हणजे — ‘आज!’
जामनेरात रिपब्लिकन पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटनकेंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या शुभहस्ते संपन्न; शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती
जामनेर | प्रतिनिधी :जामनेर शहरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष भगवान सोनवणे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे शनिवारी सायंकाळी ५ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात भव्य उद्घाटन करण्यात आले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारताचे सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या शुभहस्ते या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.या उद्घाटन सोहळ्याला जामनेर तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाचे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त परिसरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.उद्घाटन कार्यक्रमाला रणजीत जोरे, गणेश सपकाळ, शेखर सुखाडे, यादव सुखाडे, विक्रम बनोडे, दादाराव मेहे, गोपाळ सपकाळ, नितीन सपकाळ, एकनाथ सपकाळ, प्रदीप लोखंडे पंचरासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.नवीन जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जामनेर तालुक्यातील नागरिकांच्या विविध प्रश्नांना व समस्यांना वाचा फोडण्यासाठी, तसेच पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. उद्घाटनानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. जामनेर परिसरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्याला नवसंजीवनी मिळेल आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी हे जनसंपर्क कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
रक्षा खडसेंकडून नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाची कौटुंबिक जबाबदारी स्वीकारत सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण
राजकारणाच्या पलीकडे परिवाराचे नाते महत्त्वाचे; शरद पवारांच्या उपस्थितीने अमृत महोत्सवाला मिळाला मान भाजपमध्ये मी, राष्ट्रवादीत नाथाभाऊ; विचारधारा वेगळी असली तरी कौटुंबिक नाते कायम असल्याचे स्पष्ट भाजप आमदार गैरहजर राहिल्याची खंत नाही; आले आणि न आलेल्या सर्व नेत्यांबद्दल रक्षा खडसेंनी व्यक्त केला आदर बऱ्याच दिवसांपासून अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. हा अमृत महोत्सव एक परिवार म्हणून साजरा केला जात आहे. आज निखिल आपल्यात नाही, तरी प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांकडून असा उत्सव साजरा व्हावा, अशी अपेक्षा असते. घरातील सदस्य म्हणून आणि निखिलच्या जागी मी आहे. नाथाभाऊंनी मला नेहमी मुलीसारखे प्रेम दिले आहे. त्यामुळे ही माझी जबाबदारी आहे, असे मी मानते. राजकारण वेगळे आहे आणि राजकारणाच्या पलीकडे परिवाराची एक जबाबदारी असते. त्यामुळे यावेळी सर्वांनी ठरवले की, नाथाभाऊंचा अमृत महोत्सव साजरा केला पाहिजे. नाथाभाऊंनी अनेक वर्षे भारतीय जनता पक्षात काम केले आहे. आज ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. मात्र, राजकारणाच्या पलीकडे सर्व पक्षांतील नेत्यांशी त्यांची ओळख आणि संबंध आहेत. अनेक कार्यकर्त्यांसोबत त्यांनी काम केले आहे. त्यामुळे त्यांनी या व्यासपीठावर यावे आणि त्यांचा मानसन्मान व्हावा, अशी अनेकांची इच्छा होती. नाथाभाऊंसोबत अनेकांनी काम केले आहे. त्या निमित्ताने का होईना, त्यांचा उल्लेख आणि सन्मान झाला पाहिजे. याच अनुषंगाने सर्वपक्षीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारे राजकारणाचा रंग देण्यात आलेला नाही. हा पूर्णपणे पारिवारिक संबंधातून आयोजित केलेला कार्यक्रम आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांसह विविध पक्षांचे अनेक नेते या ठिकाणी आले. प्रत्येकाला ज्या वेळी सोयीचे झाले, त्या वेळी ते येथे येऊन गेले. ही अमृतभूमी कोथळी ही आदिशक्ती मुक्ताईची भूमी आहे आणि याच भूमीत नाथाभाऊंचा जन्म झाला. त्यामुळे या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुक्ताईच्या आशीर्वादाने मी असो किंवा नाथाभाऊ असोत, आज मोठ्या पदावर राहून समाजसेवा करण्याची संधी मिळत आहे. हा मुक्ताईचा आशीर्वाद आहे. त्यामुळे परिवारातील एक सदस्य म्हणून मी भागवत सप्ताहातही सहभागी झाले. ऑन : भारतीय जनता पक्षाचा एकही आमदार कार्यक्रमाला उपस्थित नाही मला राजकारणावर बोलायचे नाही. मात्र, एवढेच सांगू इच्छिते की, मी किंवा आमच्या परिवारातर्फे प्रत्येकाला निमंत्रण देण्यात आले होते. नाथाभाऊंना शुभेच्छा देण्यासाठी आतापर्यंत अनेक लोक येऊन गेले आहेत. कोणी येत आहे, तर कोणी येऊन गेले आहे. त्यामुळे कार्यक्रमामध्ये राजकारणाचा कोणताही उल्लेख न करता सर्वांना निमंत्रण देण्याचे काम आम्ही केले. काहींनी फोनवरून शुभेच्छा दिल्या, तर काही जण प्रत्यक्ष येऊन गेले. ऑन : शरद पवार आणि भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी केला सत्कार मला भारतीय जनता पक्षाकडून तीन वेळा संधी मिळाली. तीन वेळा खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि आज मी केंद्रीय मंत्री आहे. त्यामुळे माझ्या पक्षाचा आणि माझ्या नेत्यांचा मला अभिमान आहे. मात्र, त्या पलीकडे जाऊन मी या घरची सून आहे. त्यामुळे या संदर्भातील माझे कर्तव्य मी नक्कीच पार पाडत आहे. नाथाभाऊंची खूप इच्छा होती की, त्यांचा अमृत महोत्सव साजरा व्हावा. त्यामुळे परिवारातील सदस्य म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे. शेवटी काहीही झाले तरी हा आमचा परिवार आहे. आमचे एकमेकांशी असलेले नाते कोणापासूनही लपलेले नाही. हे सर्वांना माहीत आहे. नाथाभाऊ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि मी भारतीय जनता पक्षात आहे. ते त्यांच्या पक्षाचे काम करत आहेत आणि मी माझ्या पक्षाचे काम करत आहे. त्यांची विचारधारा राष्ट्रवादी काँग्रेससोबत जोडलेली आहे, तर मी भाजपची कार्यकर्ता आहे. भाजपने माझ्यासाठी खूप काही केले आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवून आम्ही हा कार्यक्रम सर्वपक्षीय ठेवला आहे, जेणेकरून सर्वांचा मानसन्मान व्हावा. गेल्या पाच-सहा दिवसांपासून मी एक सून आणि परिवारातील सदस्य म्हणून या कार्यक्रमात सहभागी झाले आहे. मुक्ताईनगर मतदारसंघातील जनतेची सेवा करण्यासाठी हे सात दिवस मी परिवारातील एक सदस्य म्हणून काम करत आहे.
एकनाथराव खडसे यांचा अमृतमहोत्सव
: जाणकार यांचे सध्या काय चाललंय? : खडसे यांच्या अमृत महोत्सवाला भाजप किंवा महायुतीचा एकही मोठा नेता उपस्थित नाही पंकजा मुंडे यांचाही दौरा अचानक रद्द भाजपसह महायुतीचे नेते अनुपस्थित राहिले ? मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस लक्ष्मण हाके ओबीसींनी आता एकत्र येण्याची वेळ जरांगे यांच्यामागे ग्रामीण जनतेचे संघटन आहे. ओबीसी समाज खूप मोठा आहे, परंतु आपल्यात अद्याप तशी एकजूट आणि संघटनात्मक बांधणी दिसत नाही. आपण सर्वांनी एकत्र येऊन संघटन मजबूत करणे गरजेचे आहे. सरकार आणि जरांगे यांच्यातील संवाद कमी पडतेय का? 8
अमळनेर–गलवाडे रोडवर भीषण अपघात; उभ्या डंपरला दुचाकीची जोरदार धडक, दोघांचा जागीच मृत्यू
अमळनेर | प्रतिनिधीअमळनेर तालुक्यातील अमळनेर–गलवाडे रोडवर उभ्या असलेल्या डंपरला मागून दुचाकीने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी, ३० ऑगस्ट रोजी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर–गलवाडे मार्गावर डंपर रस्त्यावर उभा होता. याच दरम्यान मागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीची डंपरच्या मागील बाजूस जोरदार धडक झाली. धडक एवढी भीषण होती की, दुचाकीवरील दोघांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेमुळे रस्त्यावर काही काळ मोठी गर्दी झाली होती. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर अमळनेर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मृतांची ओळख, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला आणि डंपर रस्त्यावर कोणत्या परिस्थितीत उभा होता, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.या अपघातामुळे अमळनेर–गलवाडे मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, रस्त्यावर अशा प्रकारे वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
कोळंबा येथे २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी घेतला गळफास; चोपडा ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
चोपडा | प्रतिनिधीचोपडा तालुक्यातील कोळंबा येथे एका २५ वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ललिता विजय कोळी (वय २५, रा. बुडगाव, ता. चोपडा; सध्या कोळंबा, ता. चोपडा) या कोळंबा येथे राहत होत्या. त्यांनी राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली.ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चोपडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती समोर आली आहे.घटनेची माहिती उपजिल्हा रुग्णालयातील सीएमओ डॉ. सुरेश पाटील यांनी पोलिसांना फोनद्वारे दिली. त्यानंतर चोपडा ग्रामीण पोलिसांनी आवश्यक ती कायदेशीर कारवाई करत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.या महिलेने आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, चोपडा ग्रामीण पोलिस पुढील तपास करीत आहेत.
भावना महत्त्वाच्या की सत्यस्थितीला महत्त्व द्यावे?
माणसाच्या आयुष्यात भावना आणि सत्यस्थिती या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. भावना आपल्या मनाला दिशा देतात, तर सत्यस्थिती आपल्याला वास्तवाची जाणीव करून देते. अनेकदा आपण या दोन्हींच्या संघर्षात अडकतो. अशा वेळी प्रश्न पडतो—भावनांना महत्त्व द्यावे की सत्यस्थितीला? भावना माणसाला माणूस बनवतात. प्रेम, माया, जिव्हाळा, विश्वास आणि सहानुभूती यांमुळे नाती टिकून राहतात. जर आयुष्यात फक्त तर्क आणि वास्तव असेल, पण भावना नसतील, तर नात्यांमध्ये उब राहणार नाही. एखाद्याच्या वेदना समजून घेण्यासाठी केवळ सत्य पुरेसे नसते; त्यासाठी संवेदनशील मनही आवश्यक असते. परंतु प्रत्येक निर्णय फक्त भावनांच्या आधारावर घेतला, तर त्याचे परिणाम नेहमीच योग्य असतील असे नाही. भावना क्षणभंगुर असू शकतात. रागाच्या भरात घेतलेला निर्णय, अती प्रेमापोटी केलेला त्याग किंवा भीतीमुळे सोडून दिलेली संधी—हे सर्व पुढे पश्चात्तापाचे कारण ठरू शकते. म्हणूनच सत्यस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. सत्यस्थिती कधीकधी कठोर असते, पण ती वास्तव असते. वास्तवाकडे दुर्लक्ष करून फक्त भावनांमध्ये जगल्यास आपण स्वतःलाच फसवू शकतो. उदाहरणार्थ, एखादे नाते केवळ भावनिक जडणघडणीमुळे टिकवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात सतत अपमान, अविश्वास किंवा अन्याय असेल, तर वास्तव स्वीकारणेच योग्य ठरते. सत्य कडू असले तरी तेच पुढे जाण्याचा मार्ग दाखवते. याचा अर्थ भावना निरर्थक आहेत, असा नाही. भावना आणि सत्यस्थिती यांचा समतोल साधणे हीच खरी शहाणपणाची गोष्ट आहे. भावना आपल्याला मानवता शिकवतात, तर सत्यस्थिती आपल्याला योग्य निर्णय घेण्याची ताकद देते. भावना हृदयाचा आवाज असतात आणि सत्यस्थिती विवेकाचा. आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेताना हृदय आणि बुद्धी यांचा संवाद होणे आवश्यक आहे; संघर्ष नव्हे. शेवटी, भावना आणि सत्यस्थिती यांपैकी एकाची निवड करण्यापेक्षा, सत्याचा स्वीकार करताना भावनांचा आदर करणे आणि भावना जपत वास्तवाचा स्वीकार करणे अधिक योग्य आहे. कारण केवळ भावनांवर जगता येत नाही आणि केवळ वास्तवावरही आनंदी राहता येत नाही. संतुलनातच जीवनाचे खरे सौंदर्य दडलेले आहे.
🌿निसर्ग… माझा गुरु
सुगरण पक्ष्याच्या घरट्यातून शिकलेली जिद्द आणि चिकाटी निसर्ग माणसाला खूप काही शिकवतो. त्याच्या प्रत्येक रूपातून जीवनाचा एखादा नवा धडा मिळत असतो. तुम्ही या सुंदर निसर्गाकडून काय शिकलात? मला माहित नाही; पण मी मात्र निसर्गाकडून खूप काही शिकलो आहे.सुगरण पक्ष्याचे घरटे माझ्या आयुष्याची एक सुंदर प्रेरणा ठरले आहे. या छोट्याशा पक्ष्याकडून मी जिद्द, चिकाटी आणि पुन्हा उभं राहण्याची ताकद शिकलो. पक्ष्याने बांधलेले घरटे उध्वस्त करण्यासाठी अनेकदा वादळे येतात; मात्र प्रत्येक संकटानंतर तो पुन्हा नव्याने आपले घरटे बांधतो. परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार न मानण्याचा संदेश हा पक्षी आपल्याला देतो.२०२३ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘ABC डायरी’ या माझ्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरही सुगरण पक्ष्याचा फोटो आहे. या पक्ष्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले आणि म्हणूनच त्या पुस्तकात सुगरण पक्ष्यावर जवळपास सहा प्रकरणे लिहिली आहेत.निसर्ग मला सतत काही ना काही शिकवत गेला आणि त्यातूनच माझे साहित्य अधिक समृद्ध होत गेले.
चिपळूणजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक; ३० ते ४० प्रवासी जखमी
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात शनिवारी भीषण बस अपघाताची घटना घडली. अंबाडास खांदाट जंक्शनजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात तब्बल ३० ते ४० प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.धडक इतकी भीषण होती की दोन्ही बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. जखमी प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले.जखमींना रुग्णालयात दाखलअपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने चिपळूण ग्रामीण रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.अपघात कसा झाला?प्राथमिक माहितीनुसार, रत्नागिरी-कुडाळ आणि चिपळूण-खेड मार्गावर धावणाऱ्या दोन एसटी बस अंबाडास खांदाट जंक्शनजवळ समोरासमोर आल्या. त्यानंतर दोन्ही बसची जोरदार धडक झाली.मात्र, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. चालकाचा निष्काळजीपणा, रस्त्याची परिस्थिती किंवा अन्य कोणते कारण होते का, याची चौकशी केली जात आहे.घटनास्थळी मदतकार्यअपघातानंतर वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी यासाठी स्थानिक नागरिकांनीही मदत केली.या दोन्ही घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, संबंधित यंत्रणांकडून घटनांची चौकशी सुरू आहे.
कोयना एक्स्प्रेसमधून धुराचे लोट; प्रवाशांनी धडाधड मारल्या उड्या, नेमकं काय घडलं?
कोल्हापूर-मुंबई मार्गावरील कोयना एक्स्प्रेसमध्ये अचानक धूर निघू लागल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. शनिवारी सायंकाळच्या सुमारास खंडाळा घाट परिसरातून कर्जतच्या दिशेने जात असताना रेल्वेच्या एका डब्याजवळून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले.धूर वाढत असल्याचे पाहून काही प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक प्रवाशांनी घाईघाईने सामान घेऊन रेल्वेतून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. काही प्रवासी घाबरून धावत्या परिस्थितीत खाली उतरल्याचे सांगण्यात येत आहे.नेमकं काय घडलं?प्राथमिक माहितीनुसार, रेल्वेच्या इंजिन अथवा संबंधित यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने धूर निघाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धूर दिसताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. काही वेळ रेल्वे परिसरात धुराचे लोट पसरले होते.घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू केली. प्रवाशांना सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.मोठी दुर्घटना टळलीया घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, अचानक धूर निघाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण तपासले जात आहे.


