Headlines

Latest posts

All
fashion
lifestyle
sports
tech

जामनेर न्यायालयात प्रजासत्ताक दिनी संविधान उद्देशिकेचे वाचन

जामनेर न्यायालयात प्रजासत्ताक दिनी संविधान उद्देशिकेचे वाचनयेथील न्यायालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त…

रेल्वे अपघातात जवानाचा दुर्दैवी मृत्यू ,मूळ गावी दोंदवाडे (ता. जामनेर, जि. जळगाव) येथे शासकीय इतमामात अंत्यविधी पार पडला

प्रतिनिधी श्रीरामपूर – भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले वीर जवान गणर…

तयारीला लागा… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मोठा निर्णय! सुप्रीम कोर्टात काय घडलं?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून सध्या राज्यात मोठे राजकीय वादळ उठले…

निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

पळासखेडे मिराचे – धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी लिमिटेड,…

अलवर (राजस्थान) येथे आयोजित खासदार क्रीडा महोत्सवास; केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित..

अलवर (राजस्थान) येथे स्थानिक लोकसभा खासदार व केंद्रीय पर्यावरण, वने…

ज्ञानगंगा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ग्रामपंचायतींना शैक्षणिक क्षेत्रभेट

ता.जामनेर __ : ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील ग्रामपंचायतींना…

जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षणात जामनेर तालुक्याचे प्रा.समीर घोडेस्वार व प्रा.सचिन गडाख यांना प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र देऊन सन्मानित:

जामनेर: महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक…

Latest Youtube

Popular

जामनेरमध्ये भीषण रिक्षा अपघात; चार ते पाच महिला आणि तीन पुरुष जखमी
समृद्धी महामार्गावर मध्यरात्री थरार! धावत्या कारचे टायर फोडून कुटुंबाला लुटले; तब्बल १८ लाखांचा मुद्देमाल लंपास
धुळे | आक्षेपार्ह स्टेटसवरून दोन गटांत वाद; दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी
साखर विक्रीच्या नियमांत मोठा बदल; मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Latest posts

नि.पं.पाटील विद्यालयात संस्था वर्धापन दिन साजरा

पळासखेडे मिराचे दि १७ जुलै २०२५(प्रतिनिधी ) नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे मिराचे शाळेत मातृहृदयी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन पवार हे होते. सर्वप्रथम कै.आचार्य बापूसो. गजाननराव गरुड व कै. अण्णासाहेब भास्करराव गरूड यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष , संस्था संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेचा इतिहास व प्रगती विषयी माहिती दिली.त्यानंतर विद्यार्थ्याची वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.विद्यालयाचे पर्यवेक्षक जे.आर.पाटील यांनी कै. आचार्य बापूंना अभिप्रेत असलेला विद्यार्थी याबद्दल मत व्यक्त केले.विद्यालयातील उपशिक्षक एस. जे. सोनवणे यांनी मनोगतात संस्थेची स्थापना व व्याप्ती याबद्दल विद्यार्थ्यांची हितगुज केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन पवार यांनी अध्यक्ष भाषणात कै.आचार्य गजाननराव बापूंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्था संचालक व सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील,चंद्रशेखर काळे,अब्दुल नबी तांबोळी,डी. पी .पाटील, संजू पवार,.शालिक पाटील,अशोक माळी,बळीराम माळी,लता पाटील हे मान्यवर उपस्थित होते.वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक – हर्षाली प्रवीण पाटील द्वितीय क्रमांक – हितेश वर्जन चव्हाण तृतीय क्रमाक – ओम संतोष चौधरी यांनी मिळविला. त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.त्याप्रसंगी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना व गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी 50 शालेय गणवेश वाटप करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाने ,सर्व शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष जी.पी. पाटील यांनी केले तर आभार व्ही. डी. पाटील यांनी मानले.

Read More

जामनेरमध्ये भीषण रिक्षा अपघात; चार ते पाच महिला आणि तीन पुरुष जखमी

जामनेर | प्रतिनिधीजामनेर शहरातील भुसावळ रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ शुक्रवारी सायंकाळी एका प्रवासी रिक्षाचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात चार ते पाच महिला आणि तीन पुरुष जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.अपघाताची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नसून, वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.

Read More

समृद्धी महामार्गावर मध्यरात्री थरार! धावत्या कारचे टायर फोडून कुटुंबाला लुटले; तब्बल १८ लाखांचा मुद्देमाल लंपास

सिन्नर | प्रतिनिधीमुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या कुटुंबाला दरोडेखोरांनी लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना सिन्नर तालुक्यात समोर आली आहे. महामार्गावर धारदार वस्तू टाकून कारचे टायर फोडण्यात आले. कार थांबताच दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांनी प्रवाशांना धमकावत त्यांच्याकडील सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि मौल्यवान वस्तू लुटल्याची माहिती आहे. या घटनेत सुमारे १८ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे वृत्त आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर परिसरातील समृद्धी महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. दरोडेखोरांनी महामार्गावर धारदार वस्तू पसरवून ठेवल्याचा संशय आहे. त्यावरून काही वाहनांचे टायर फुटले. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्याच्या कडेला गाडी थांबवावी लागली.याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगरकडून प्रवास करणाऱ्या एका कुटुंबाच्या कारचेही टायर फुटले. अचानक टायर पंचर झाल्याने चालकाने कार थांबवली. मात्र, कार थांबताच परिसरात आधीपासून दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांनी संधी साधली.शस्त्रांचा धाक दाखवत लूटदरोडेखोरांनी कुटुंबातील सदस्यांना शस्त्रांचा धाक दाखवून धमकावले. त्यानंतर त्यांच्या जवळील सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू जबरदस्तीने काढून घेतल्या. या संपूर्ण प्रकारामुळे कुटुंबीयांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली.या दरोड्यात सुमारे १८ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे समोर आले आहे. घटना घडल्यानंतर दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.पोलिसांकडून तपास सुरूघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, महामार्गावरील कॅमेरे आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांकडून तपास केला जात आहे.समृद्धी महामार्गावर यापूर्वीही चोरी, दरोडा आणि इतर गुन्हेगारी घटनांची नोंद झाली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महामार्गावर पोलिसांची गस्त वाढवावी आणि संवेदनशील ठिकाणी अधिक सुरक्षा व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Read More

धुळे | आक्षेपार्ह स्टेटसवरून दोन गटांत वाद; दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी

धुळे : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा परिसरात आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. वादाचे रूपांतर दगडफेकीत झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील स्टेटसच्या कारणावरून दोन गट आमनेसामने आले. वाद वाढल्यानंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक झाल्याचे समोर आले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून, परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक ती कारवाई सुरू आहे. सोशल मीडियावरील अफवा किंवा आक्षेपार्ह पोस्टमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांनी संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.या प्रकरणात नेमके किती जण जखमी झाले आणि किती जणांवर कारवाई झाली, याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

Read More

साखर विक्रीच्या नियमांत मोठा बदल; मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय

साठेबाजीला बसणार चाप, सप्टेंबरपासून साखर कारखान्यांसाठी पंधरवड्याचा विक्री कोटा नवी दिल्ली | प्रतिनिधी देशातील साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि साखरेच्या साठेबाजीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने साखर विक्रीच्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर २०२६ पासून साखर कारखान्यांसाठी असलेली मासिक कोटा पद्धत रद्द करून पंधरवड्याची (Fortnightly) विक्री कोटा पद्धत लागू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे बाजारात साखरेचा पुरवठा नियमित राहण्यास मदत होणार असून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याच्या प्रकारांना आळा बसण्याची शक्यता आहे. महिन्याऐवजी आता पंधरवड्याचा कोटा सध्या साखर कारखान्यांना महिन्याच्या आधारावर साखर विक्रीचा कोटा दिला जातो. मात्र, काही ठिकाणी महिन्याच्या सुरुवातीला विक्री झालेली साखर प्रत्यक्षात महिन्याच्या शेवटी उचलली जात असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले. त्यामुळे बाजारात काही काळ साखरेची उपलब्धता कमी भासून कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची शक्यता होती. ही परिस्थिती टाळण्यासाठी सरकारने आता पंधरवड्याच्या आधारावर साखर विक्रीचा कोटा निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या पद्धतीत कारखान्यांना त्यांच्या वाटपातील किमान ४० टक्के साखर पहिल्या आठवड्यात विकावी लागणार असून उर्वरित साखर त्यानंतरच्या आठवड्यात विकावी लागेल. विकलेली साखर ७ दिवसांत पाठवावी लागणार केवळ साखर विक्री करून ती कारखान्यातच पडून राहू नये, यासाठी सरकारने आणखी एक महत्त्वाचा नियम केला आहे. विक्री झालेली साखर सात दिवसांच्या आत कारखान्यातून डिस्पॅच करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे साखर कारखान्यांपासून व्यापारी, वितरक आणि पुढे किरकोळ बाजारापर्यंत साखरेचा प्रवाह वेगाने होण्यास मदत होईल. साठेबाजीवर सरकारची करडी नजर साखरेच्या वाढलेल्या किमतीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने साखर साठ्याची देशव्यापी तपासणीही सुरू केली आहे. काही साखर कारखान्यांकडे त्यांच्या मासिक अहवालात दाखवलेल्या साठ्यापेक्षा प्रत्यक्षात अधिक साखर असल्याचे तपासणीत आढळल्याचे सरकारने म्हटले आहे. याशिवाय, काही कारखाने त्यांना मंजूर केलेल्या कोट्यापेक्षा कमी साखर विकत असल्याचेही निदर्शनास आले. अशा प्रकारांमुळे बाजारातील पुरवठा कृत्रिमरीत्या कमी होऊ शकतो, असे सरकारचे म्हणणे आहे. ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता दरम्यान, सरकारच्या उपाययोजनांनंतर साखरेच्या एक्स-मिल किमतीत अलीकडच्या दिवसांत सुमारे २० टक्क्यांची घट झाल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. किरकोळ बाजारातील दरही खाली येण्यास सुरुवात झाली असून त्याचा फायदा पुढील काळात ग्राहकांना मिळण्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकारच्या मते, देशात साखरेची कमतरता नसून साठेबाजी आणि सट्टेबाजीमुळे दरवाढीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे पंधरवड्याचा कोटा, सात दिवसांत डिस्पॅच आणि साठ्याची तपासणी या उपायांमुळे बाजारातील साखरेचा पुरवठा अधिक पारदर्शक आणि नियमित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Read More

एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफी २०२६ मध्ये आर्यन बाविस्करची सुवर्ण कामगिरी; आदर्श शिक्षक एस. डी. भावसार यांच्याकडून विशेष गौरव

जळगाव | प्रतिनिधीएशियन ओपन शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग ट्रॉफी २०२६ मध्ये चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावणाऱ्या आर्यन सुजीत बाविस्कर याच्या यशाचा जळगावमध्ये विशेष गौरव करण्यात आला.देहरादून येथे झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आर्यनने ज्युनियर ई बॉईज ५०० मीटर आणि ३३३ मीटर या दोन्ही प्रकारांत सुवर्णपदक पटकावले. उपलब्ध वृत्तांनुसार, ३३३ मीटरची शर्यत आर्यनने ३५.४७ सेकंदांत पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळवला.या स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी एकूणच दमदार कामगिरी केली. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसापर्यंत भारताच्या खात्यात ७ सुवर्ण, ५ रौप्य आणि ७ कांस्य अशी एकूण १९ पदके जमा झाली होती.आर्यनच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याचे मार्गदर्शक व आदर्श शिक्षक एस. डी. भावसार यांच्या वतीने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. ग्रामीण व स्थानिक पातळीवरून पुढे येत आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्याच्या यशामुळे परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.आर्यनच्या यशामागे त्याचे पालक, प्रशिक्षक आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. त्याच्या या कामगिरीमुळे जळगाव जिल्ह्यातील युवा खेळाडूंनाही प्रेरणा मिळणार आहे.

Read More

संतापलेल्या लहान भावाने चाकूने भोसकून थोरल्या भावाला संपवलं

जामनेर |प्रतिनिधी लहान भाऊ समीरने रोखण्याचा प्रयत्न केला असता दारूड्या मोहनने त्यालाही शिवीगाळ करत चाकूने मारण्याची धमकी दिली, ज्यामुळे वातावरण तापले.दारूसाठी झालेल्या वादातून भावानेच केलेल्या सख्ख्या भावाच्या हत्येची थरारक घटना समोर आली आहे. दारूच्या व्यसनामुळे घरात सतत गोंधळ घालणाऱ्या 21 वर्षीय मोहन चिंताराम बांते या तरुणावर त्याच्याच लहान भावाने चाकूने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोहनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या काही तासांत आरोपी लहान भाऊ समीर चिंताराम बांते (वय 19 वर्षे) याला अटक केली आहे. नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिनीमातानगर भागात ही घटना घडली.आईकडे पैशांची मागणी अन् घरातील सामानाची नासधूस मिळालेल्या माहितीनुसार, मृत मोहनला दारूचे प्रचंड व्यसन होते. तो काहीही कामधंदा करत नव्हता. दारूसाठी तो रोज आई-वडिलांकडे पैशांसाठी तगादा लावत असे. बुधवारी रात्री 9 च्या सुमारास मोहन दारूच्या नशेत घरी आला आणि त्याने आईकडे पुन्हा पैशांची मागणी सुरू केली. पैसे देण्यास नकार मिळताच त्याने आई-वडिलांना अश्लील शिवीगाळ करत घरातील वस्तूंची तोडफोड सुरू केली. तसेच, वस्तू घराबाहेर फेकण्यासही सुरुवात केली. लहान भाऊ समीरने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता मोहनने त्यालाही शिवीगाळ करत चाकूने मारण्याची धमकी दिली, ज्यामुळे वातावरण तापले.संतप्त समीरकडून चाकूने वार; पोलिसात गुन्हा दाखल थोरल्या भावाच्या रोजच्या त्रासाला आणि धमकीला कंटाळलेल्या समीरने संतापाच्या भरात चाकू घेऊन येत मोहनवर हल्ला चढवला. या हल्ल्यात मोहनच्या मान, पाठ, पोट आणि हातावर गंभीर जखमा झाल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मोहनला नातेवाईकांनी शेजाऱ्यांच्या मदतीने तातडीने मेयो दाखल केले. डॉक्टरांनी रुग्णालयात उपचारादरम्यान 3 ते 4 तासांतच त्याला मृत घोषित केले. कळमना पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली हत्येचा गुन्हा दाखल करून समीरला अटक केली असून हल्ल्यात वापरलेला चाकू जप्त केला आहे.

Read More

सरपंचाचा गावठी कट्ट्यातून भर चौकात हवेत गोळीबार; यावल पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

जामनेर | प्रतिनिधीयावल तालुक्यातील डांभुर्णी गावातील चौकात हवेत गोळीबार केल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. कोळन्हावी गावचे सरपंच विकास उर्फ गोटू सोळुंके यांनी गावठी कट्ट्यातून हवेत गोळी झाडल्याचा आरोप असून, या प्रकरणी यावल पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, डांभुर्णी येथील चौकात ही घटना घडली. सार्वजनिक ठिकाणी अचानक गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी संशयित सरपंच विकास उर्फ गोटू सोळुंके यांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून गावठी कट्टा आणि संबंधित साहित्य जप्त करण्यात आले आहे का, तसेच गोळीबार नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, याचा तपास पोलीस करत आहेत.दरम्यान, भर चौकात हवेत गोळीबार झाल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेमागे नेमके कारण काय होते, गोळीबाराच्या वेळी अन्य कोणी उपस्थित होते का आणि शस्त्र त्यांच्याकडे कसे आले, याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.याप्रकरणी यावल पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली असून, पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील तपास सुरू आहे. तपासातून गोळीबाराचे नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण तपशील समोर येणार आहे.

Read More

राज्यमंत्र्यांच्या अंगरक्षकावर लैंगिक शोषणाचा गुन्हा; महिलेचा गंभीर आरोप, फोटो-व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

नागपूर हादरले; लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप, गुन्हा दाखल होताच आरोपी पसार जामनेर | प्रतिनिधी नागपूरमध्ये राज्यमंत्र्यांच्या अंगरक्षकाविरोधात लैंगिक शोषणाच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाल्याने पोलिस आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजय सदाशिव सलामे असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, तो महाराष्ट्राचे राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचा अंगरक्षक असल्याचे वृत्त आहे. रामटेक पोलिस ठाण्यात एका महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा आरोप तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, सुमारे दोन वर्षांपूर्वी तिची अजय सलामे याच्याशी ओळख झाली. त्यानंतर तो तिच्या संपर्कात राहू लागला. सलामे विवाहित असतानाही त्याने आपल्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले आणि या आश्वासनाच्या आधारे वारंवार लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिलेने लग्नासाठी आग्रह धरल्यानंतर सलामे टाळाटाळ करू लागला. त्यानंतर तिने लग्नाबाबत जाब विचारला असता, तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पिस्तुलाचा धाक दाखवल्याचाही आरोप या प्रकरणात महिलेने आणखी गंभीर आरोप केले आहेत. सलामेने पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याचे तिने पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. मात्र, हे सर्व आरोप असून त्यांची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे धाव पीडित महिलेने नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार तसेच एसडीपीओ रमेश बरकते यांच्याकडे तक्रार केली. तक्रारीची गंभीर दखल घेतल्यानंतर रामटेक पोलिसांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर पोलिसांनी अजय सलामेविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला. गुन्हा दाखल होताच आरोपी पसार गुन्हा दाखल झाल्यानंतर अजय सलामे पसार झाल्याचे वृत्त आहे. रामटेक पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असून, या प्रकरणातील पुरावे आणि महिलेने केलेल्या आरोपांची तपासणी केली जात आहे. या प्रकरणात आणखी एका महिलेविरोधातही गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप कोणालाही अटक झाल्याचे वृत्त नाही. यापूर्वीही अंगरक्षक म्हणून काम अजय सलामे याने यापूर्वी माजी खासदार कृपाल तुमाने यांचा अंगरक्षक म्हणूनही काम केल्याची माहिती वृत्तांतून समोर आली आहे. सध्या तो राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या सुरक्षेत कार्यरत असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणामुळे पोलिस विभागासह राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे. महत्त्वाचे : महिलेने केलेले आरोप हे सध्या पोलिस तपासाचा विषय आहेत. आरोपी दोषी असल्याचे न्यायालयीन निर्णय होईपर्यंत त्याला कायद्यानुसार निर्दोष मानले जाते.

Read More

सुरतमध्ये भाजप नेत्याच्या सुनेचा संशयास्पद मृत्यू; अंतर्वस्त्रात सुसाईड नोट आढळल्याची माहिती

पती आणि कथित प्रेयसीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा; पोलिसांकडून तपास सुरू Jamner | प्रतिनिधी गुजरातमधील सुरत येथे भाजपच्या माजी महिला पदाधिकाऱ्याच्या २४ वर्षीय सुनेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निधी सिंह असे मृत महिलेचे नाव असून, २५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी तिचा मृतदेह घरातील बेडरूममध्ये फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निधी सिंह ही बिहारमधील मुजफ्फरपूर येथील रहिवासी होती. सुमारे दोन वर्षांपूर्वी तिचे सौरभ सिंह (२६) याच्यासोबत लग्न झाले होते. मात्र, लग्नानंतर सौरभचे दुसऱ्या एका महिलेसोबत कथित प्रेमसंबंध असल्याचा आरोप निधीच्या कुटुंबीयांनी केला आहे. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घरी परतल्यानंतर मृतदेह आढळला पोलिसांच्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट रोजी सौरभची आई शशी सिंह घरी परतल्यानंतर त्यांना निधी बेडरूममध्ये फासावर लटकलेल्या अवस्थेत दिसली. त्यावेळी घरात अन्य कोणीही उपस्थित नसल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती त्यांनी पती संजय सिंह आणि मुलगा सौरभ यांना दिली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. निधीच्या मृत्यूची माहिती मिळताच तिचा भाऊ आदित्य कुमार सुरत येथे दाखल झाला. त्याने सौरभ सिंह आणि त्याच्या कथित मैत्रिणीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. बाहेरील संबंधांमुळे वाद? निधीच्या कुटुंबीयांच्या आरोपानुसार, सौरभ आणि संबंधित महिलेचे लग्नापूर्वीपासूनच संबंध होते. लग्नानंतर निधीला या कथित संबंधांची माहिती मिळाल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद वाढले. कुटुंबीयांनी सौरभला हे संबंध संपवण्यास सांगितले होते, मात्र तरीही संबंध सुरू असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अंतर्वस्त्रात सुसाईड नोट आढळल्याची माहिती या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. शवविच्छेदनादरम्यान निधीच्या अंतर्वस्त्रांमध्ये सुसाईड नोट आढळल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. ही चिठ्ठी निधीने जाणूनबुजून लपवून ठेवली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या चिठ्ठीत नेमके काय लिहिले आहे आणि तिच्या मृत्यूशी त्याचा संबंध काय आहे, याचा तपास सध्या सुरू आहे. कडोदरा पोलिसांनी निधीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे सौरभ सिंह आणि त्याच्या कथित मैत्रिणीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाच्या सर्व बाजूंचा तपास सुरू आहे. निधीच्या मृत्यूमागे नेमके कारण काय होते, सुसाईड नोटमध्ये काय नमूद आहे आणि कुटुंबीयांनी केलेले आरोप कितपत खरे आहेत, याचा उलगडा पोलिसांच्या तपासानंतरच होणार आहे.

Read More

जळगाव रेल्वे स्थानकावर शिवाजीनगरकडील नवी तिकीट खिडकी सुरू; प्रवाशांची मोठी गैरसोय टळणार

Jamner | प्रतिनिधीजळगाव रेल्वे स्थानकाच्या उत्तर बाजूस, शिवाजीनगरकडील प्रवेशद्वाराजवळ प्रवाशांसाठी नूतनीकृत आरक्षित रेल्वे तिकीट खिडकी सुरू करण्यात आली आहे. गुरुवारपासून ही सुविधा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली असून, त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या मुख्य तिकीट खिडकीवर होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.जळगाव रेल्वे स्थानकावर दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची ये-जा असते. विशेषतः सकाळी, सुट्टीच्या दिवसांत तसेच सण-उत्सवांच्या काळात तिकीट खिडकीवर मोठी गर्दी होत असल्याने प्रवाशांना बराच वेळ रांगेत उभे राहावे लागत होते. अनेकदा वेळेअभावी प्रवाशांची गैरसोयही होत होती.ही समस्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगरकडील प्रवेशद्वाराजवळ नवीन तिकीट खिडकीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या खिडकीवर संगणकीकृत पद्धतीने आरक्षित रेल्वे तिकिटांची सुविधा उपलब्ध होणार आहे.गर्दीचे व्यवस्थापन होण्यास मदतनवीन तिकीट खिडकी सुरू झाल्यामुळे स्थानकाच्या मुख्य भागातील तिकीट खिडकीवरील प्रवाशांचा दबाव कमी होण्याची शक्यता आहे. विशेषतः शिवाजीनगर परिसरातून स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना आता तिकीट काढण्यासाठी स्थानकाच्या मुख्य भागापर्यंत जाण्याची गरज भासणार नाही.प्रवाशांकडून समाधान व्यक्तनवीन सुविधेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून तिकीट काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. शिवाजीनगरकडील नागरिक आणि रेल्वे प्रवाशांनी या सुविधेचे स्वागत केले असून, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!