Latest posts

All
fashion
lifestyle
sports
tech

जामनेर न्यायालयात प्रजासत्ताक दिनी संविधान उद्देशिकेचे वाचन

जामनेर न्यायालयात प्रजासत्ताक दिनी संविधान उद्देशिकेचे वाचनयेथील न्यायालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त…

रेल्वे अपघातात जवानाचा दुर्दैवी मृत्यू ,मूळ गावी दोंदवाडे (ता. जामनेर, जि. जळगाव) येथे शासकीय इतमामात अंत्यविधी पार पडला

प्रतिनिधी श्रीरामपूर – भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले वीर जवान गणर…

तयारीला लागा… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मोठा निर्णय! सुप्रीम कोर्टात काय घडलं?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून सध्या राज्यात मोठे राजकीय वादळ उठले…

निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

पळासखेडे मिराचे – धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी लिमिटेड,…

अलवर (राजस्थान) येथे आयोजित खासदार क्रीडा महोत्सवास; केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित..

अलवर (राजस्थान) येथे स्थानिक लोकसभा खासदार व केंद्रीय पर्यावरण, वने…

ज्ञानगंगा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ग्रामपंचायतींना शैक्षणिक क्षेत्रभेट

ता.जामनेर __ : ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील ग्रामपंचायतींना…

जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षणात जामनेर तालुक्याचे प्रा.समीर घोडेस्वार व प्रा.सचिन गडाख यांना प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र देऊन सन्मानित:

जामनेर: महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक…

Latest Youtube

Popular

वाकडी परीसरात महिनाभरापासून पावसाचा खंड; मका, कपाशीसह पिके धोक्यात
🌿 सातपुड्याच्या जंगल परिसरात गांजा शेतीचा पर्दाफाश; १७५ झाडे जप्त
🔴 BREAKING NEWS | जामनेरला नवे पोलीस निरीक्षक
ब्रेड खायला आवडतो?; विकत घेताना ‘ही’ गोष्ट नक्की करा अन्यथा होईल आरोग्याचं मोठं नुकसान…..*

Latest posts

नि.पं.पाटील विद्यालयात संस्था वर्धापन दिन साजरा

पळासखेडे मिराचे दि १७ जुलै २०२५(प्रतिनिधी ) नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे मिराचे शाळेत मातृहृदयी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन पवार हे होते. सर्वप्रथम कै.आचार्य बापूसो. गजाननराव गरुड व कै. अण्णासाहेब भास्करराव गरूड यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष , संस्था संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेचा इतिहास व प्रगती विषयी माहिती दिली.त्यानंतर विद्यार्थ्याची वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.विद्यालयाचे पर्यवेक्षक जे.आर.पाटील यांनी कै. आचार्य बापूंना अभिप्रेत असलेला विद्यार्थी याबद्दल मत व्यक्त केले.विद्यालयातील उपशिक्षक एस. जे. सोनवणे यांनी मनोगतात संस्थेची स्थापना व व्याप्ती याबद्दल विद्यार्थ्यांची हितगुज केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन पवार यांनी अध्यक्ष भाषणात कै.आचार्य गजाननराव बापूंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्था संचालक व सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील,चंद्रशेखर काळे,अब्दुल नबी तांबोळी,डी. पी .पाटील, संजू पवार,.शालिक पाटील,अशोक माळी,बळीराम माळी,लता पाटील हे मान्यवर उपस्थित होते.वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक – हर्षाली प्रवीण पाटील द्वितीय क्रमांक – हितेश वर्जन चव्हाण तृतीय क्रमाक – ओम संतोष चौधरी यांनी मिळविला. त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.त्याप्रसंगी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना व गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी 50 शालेय गणवेश वाटप करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाने ,सर्व शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष जी.पी. पाटील यांनी केले तर आभार व्ही. डी. पाटील यांनी मानले.

Read More

वाकडी परीसरात महिनाभरापासून पावसाचा खंड; मका, कपाशीसह पिके धोक्यात

वाकडी.ता.जामनेर.दि.०९/०९/२६वाकडी परिसरात जवळपास एकमहिन्यापासून पावसाने दडी मारल्याने बहरात आलेल्या पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मक्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, कडधान्य पिकांचीही फुलगळ झाल्याने उत्पादनाची आशा मावळली आहे.कोरडवाहू शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा आधार असलेल्या कपाशी पिकालाही फुलपाती गळतीचा फटका बसत असून,आगामी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांची माती झाल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे, पावसाच्या प्रतीक्षेत झोकात आलेल्या मक्याला पाण्या अभावी दाणे भरले नाहीत, परिणामी दाणे विरहित कणसे आता जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे, कडधान्य पिके बहरात आल्यानंतर फुलगळती झाल्याने उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे, कपाशीवरही फुलपाती गळती सुरू आहे,खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत,एक महिन्यांपासून पाऊस नाही, यावर शेतकऱ्यांच्या समस्यांचा परिस्थितीजन्य आवाज उठवून त्याचे वेळेवर निराकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत,शासनाने योग्य वेळी मदत केल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार नाही,अशी शेतकरी बांधव करीत आहेनिसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या पदरी दरवर्षी कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ येतो,मात्र, शेतमालाला योग्य भाव मिळाल्यास शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने जीवन जगता येईल,यंदा तर खरीप हंगाम हातचा गेल्याचे चित्र आहे, शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी,अशी चर्चा शेतकरी करीत आहेत.

Read More

🌿 सातपुड्याच्या जंगल परिसरात गांजा शेतीचा पर्दाफाश; १७५ झाडे जप्त

अडावद : सातपुड्याच्या जंगल परिसरात पिकांच्या आड लपवून सुरू असलेल्या अवैध गांजा शेतीवर अडावद पोलिसांनी धडक कारवाई केली. देवगड शिवारातील वनविभागाच्या कंपाउंड क्रमांक १६९ परिसरात सोयाबीन व तुरीच्या पिकाच्या आड गांजाची लागवड करण्यात आल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले. गोपनीय माहितीच्या आधारे अडावद पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी पोलिसांना गांजाची तब्बल १७५ हिरवीगार झाडे आढळून आली. पोलिसांनी पंचनामा करून ही सर्व झाडे जप्त केली. जप्त गांजाचे एकूण वजन १ किलो ३१० ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत २६ हजार २०० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी देवसिंग रावळ्या बारेला (वय ४४) याला पोलिसांनी अटक केली असून अडावद पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ‘नशामुक्त भारत’ आणि ‘ड्रग्स फ्री जळगाव’ अभियानांतर्गत करण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अडावद पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंधारे करीत आहेत. पिकांच्या आड लपवून गांजा शेती करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Read More

🔴 BREAKING NEWS | जामनेरला नवे पोलीस निरीक्षक

रायगडहून आलेले निवृत्ती बो-हाडे यांच्या हाती जामनेरच्या कायदा-सुव्यवस्थेची कमान! जामनेर | प्रतिनिधी जामनेर पोलीस ठाण्याला अखेर नवे प्रभारी पोलीस निरीक्षक मिळाले असून निवृत्ती भिमराव बो-हाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बो-हाडे साहेब यापूर्वी रायगड जिल्ह्यातील माणगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. आता जामनेरची कायदा-सुव्यवस्था, गुन्हेगारीवर नियंत्रण आणि अवैध धंद्यांवर कारवाईची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असणार आहे. दरम्यान, JBN News चे संचालक किरण सोनवणे व प्रतिनिधी संतोष भिसे यांनी नवनियुक्त पोलीस निरीक्षक बो-हाडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जामनेरकरांच्या अपेक्षा वाढल्या! नव्या पोलीस निरीक्षकांकडून गुन्हेगारी व अवैध धंद्यांवर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे. JBN NEWS “रायगडहून जामनेरमध्ये एंट्री; बो-हाडेंच्या हाती आता कायदा-सुव्यवस्थेची कमान!”

Read More

ब्रेड खायला आवडतो?; विकत घेताना ‘ही’ गोष्ट नक्की करा अन्यथा होईल आरोग्याचं मोठं नुकसान…..*

🍞🍞🍞🥪🥪 नाश्त्यात अनेकांना ब्रेड खायला आवडतो. काहींना ब्राऊन ब्रेड आवडतो तर काहींना व्हाईट ब्रेड आवडतो. पण हे कितपत आरोग्यदायी आहे हे खूप कमी लोकांना माहिती असेल. नकळत लोक लो क्वॉलिटीचा ब्रेड खाऊन आपल्या आरोग्याशी खेळतात. ब्रेडच्या क्वालिटीबाबत जाणून घ्यायचं असल्यास ब्रेड पॅकेटवरील लेबल वाचा. पॅकेज्ड ब्रेड आणि त्याच्या ब्रँडबद्दल अनेक महत्त्वाची माहिती या लेबलवर दिलेली आहे. अशा परिस्थितीत जेव्हाही तुम्ही दुकानातून ब्रेड खरेदी कराल तेव्हा पॅकेटवरील लेबल नक्की चेक करा. ब्रेड बनवण्याच्या प्रक्रियेत, यीस्ट एक्टिव्ह करण्यासाठी साखर आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही ब्रेड खरेदी करता तेव्हा ब्रेडमध्ये साखर मिसळली आहे का हे पाहण्यासाठी लेबल तपासा. स्वीटनर म्हणून वापर केलेल्या गोष्टी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असल्याचं सिद्ध होतं. साखरेप्रमाणेच ब्रेडसाठीही मीठ लागते. बऱ्याचदा ब्रँड चव वाढवण्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त मीठ घालतात, ज्यामुळे ते एडिटिव्हसारखं काम करतं. मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार, ब्रेडच्या एका स्लाइसमध्ये १००-२०० मिलीग्रामपेक्षा जास्त सोडियम नसावं. अशा परिस्थितीत, एकूण मीठाचे प्रमाण तपासण्यासाठी लेबल तपासा. ब्राऊन ब्रेड, गव्हाचा ब्रेड आणि मल्टी-ग्रेन ब्रेड हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे असा विचार करून आपण अनेकदा घेतो. पण अनेक कारखान्यांमध्ये ब्रेड बनवताना इतर प्रकारचे पीठही गव्हाच्या पिठात मिसळले जाते. हे केले जाते जेणेकरून ब्रेड अधिक चवदार आणि आर्थिक बनू शकेल. त्यामुळे जेव्हाही तुम्ही ब्रेड खरेदी करता तेव्हा ब्रेडचे पॅकेट नक्की तपासा की ते बनवण्यासाठी कोणते पदार्थ वापरले गेले आहेत याची माहिती मिळेल. ब्रेड खरेदी करताना सर्वप्रथम त्यावरची एक्सपायरी डेट चेक करा. त्या तारखेनंतर ब्रेड खाऊ नका. या तारखेनंतर ब्रेड खराब होण्याची प्रक्रिया सुरू होते असं म्हटलं जातं. त्यामुळे त्रास होऊ शकतो. ब्रेड ताजा असतानाच चवीला उत्तम लागतो. बरेच ब्रँड ब्रेडची चव आणि ताजेपणा वाढवण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह आणि एडिटीव्ह वापरतात. हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. अशा परिस्थितीत, शक्य तितका एडिटीव्ह असलेला ब्रेड टाळा. फायबर हे ब्रेडच्या सर्वात लोकप्रिय घटकांपैकी एक आहे. प्रोसेसिंग करताना फायबर निघून जातं. जे आरोग्यासाठी चांगलं नसतं, म्हणून, लेबलवर नमूद केलेल्या फायबरचं प्रमाण नक्की चेक करा

Read More

जामनेर तालुक्यात सरपंच आरक्षणाचा तक्ता जाहीर; ३७ ग्रामपंचायतींचे आरक्षण स्पष्ट

जामनेर | प्रतिनिधीजामनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी सन २०२५ ते २०३० या कालावधीकरिता सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. दिनांक ७ व ८ सप्टेंबर २०२६ रोजीच्या आरक्षण सोडतीनुसार संबंधित ग्रामपंचायतींचे अंतिम आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.या आरक्षण तक्त्यानुसार विविध ग्रामपंचायतींमध्ये सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC), नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तसेच अनुसूचित जमाती अशा प्रवर्गांसाठी सरपंचपद राखीव करण्यात आले आहे.आरक्षणाच्या तक्त्यात पळासखेडे बु., काळखेडे, टाकळी बु., तोरगाव, कादोळी, वाकी बु., बिलवाडी, सामरोद, देवळसगाव, जंगीपुरा, लेलेगाव, पिंपळगाव गो., शेरी, चिंचोली पिंप्री, वाघारी, वाकडी, जळांद्री बु., सोनाळे, भागादरे, सावखेडे, वाकी खु., लोणी, केकतभिंभोरा, बेटावद बु., राजणी, हिरवखेडा न वा यांसह पुढील ग्रामपंचायतींचा समावेश आहे.आरक्षण निश्चित झाल्याने आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणत्या गावात कोणत्या प्रवर्गाला सरपंचपदाची संधी मिळणार, याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार तसेच ग्रामस्थांचे आता आरक्षणाच्या तक्त्याकडे लक्ष लागले आहे.विशेष म्हणजे, सरपंचपदाच्या आरक्षणामुळे अनेक गावांमध्ये महिला आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना नेतृत्वाची संधी मिळणार आहे. शासनाच्या नियमानुसार आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, संबंधित ग्रामपंचायतींमध्ये आगामी राजकीय समीकरणांनाही यामुळे वेग येण्याची शक्यता आहे

Read More

🚨 ब्रेकिंग | JBN महाराष्ट्र NEWS

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट; नशिराबादमध्ये चेन्नई सायबर क्राईमची धडक! AIच्या मदतीने बनावट व्हिडिओ अन् पोस्ट प्रसारित केल्याचा संशय; होमगार्डची चौकशी सुरू नशिराबाद | प्रतिनिधी तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नावाचा वापर करून सोशल मीडियावर कथित बनावट अकाउंट तयार केल्याच्या प्रकरणाचे धागेदोरे आता जळगाव जिल्ह्यातील नशिराबादपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी चेन्नई वेस्ट झोन सायबर क्राईम पोलिसांचे पथक नशिराबाद पोलीस ठाण्यात दाखल झाले असून, स्थानिक पोलिसांच्या मदतीने होमगार्ड मोहम्मद जुनेद शेख कुतुबुद्दीन यांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. 🔴 AIच्या माध्यमातून बनावट कंटेंट तयार केल्याचा संशय मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने अथवा त्यांच्या ओळखीचा आभास निर्माण करणारे सोशल मीडिया अकाउंट तयार करण्यात आले होते. या अकाउंटवरून AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार केलेले व्हिडिओ, डिजिटल छायाचित्रे आणि विविध पोस्ट प्रसारित करण्यात आल्याचा संशय आहे. हा डिजिटल कंटेंट नेमका कोणी तयार केला? त्यामागे कोण व्यक्ती किंवा यंत्रणा आहे? याचा शोध घेण्यासाठी चेन्नई सायबर पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू असल्याची माहिती आहे. 🔎 IP लॉगपासून मोबाईल क्रमांकापर्यंत तपास तपासादरम्यान संबंधित सोशल मीडिया अकाउंटचे IP लॉग, लिंक्ड अकाउंट्स, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, सबस्क्रायबर तपशील आणि वापरण्यात आलेली डिजिटल उपकरणे यांची माहिती तपासली जात असल्याचे समोर आले आहे. बनावट अकाउंट कोणत्या ठिकाणाहून आणि कोणत्या उपकरणावरून ऑपरेट करण्यात आले? त्याद्वारे किती डिजिटल कंटेंट प्रसारित करण्यात आला? याचाही तपास केला जात आहे. 👮 होमगार्डची चौकशी; सहभाग अद्याप स्पष्ट नाही चेन्नईच्या सायबर क्राईम पथकाने नशिराबाद पोलीस ठाण्यात दाखल होऊन होमगार्ड मोहम्मद जुनेद शेख यांची चौकशी सुरू केल्याची माहिती आहे. मात्र, या प्रकरणात त्यांचा नेमका सहभाग आहे की नाही, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. त्यांच्या डिजिटल उपकरणांचा या प्रकरणाशी संबंध आहे का, याचीही तपासणी केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. ⚠️ नशिराबादमध्ये चर्चेला उधाण चेन्नईतील सायबर क्राईम पथक थेट नशिराबादमध्ये दाखल झाल्याने परिसरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बनावट अकाउंट नेमके कोणी तयार केले? AIच्या माध्यमातून तयार केलेला कंटेंट कोणाच्या सांगण्यावरून प्रसारित करण्यात आला? या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता चेन्नई सायबर क्राईमच्या तपासातून समोर येणार आहेत. टीप : या प्रकरणातील संबंधित व्यक्तीचा सहभाग अद्याप अधिकृतरीत्या सिद्ध झालेला नसून, पुढील माहिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Read More

“मी काहीच केले नाही, तरी ‘तीसमारख्यां’ माझ्याच जाळ्यात अडकले!” — ना. संजय सावकारेंचा चौधरी बंधूंवर जोरदार हल्लाबोल“

“मी काहीही करत नाही, नेहमीच मला हवे तसे घडते; यातूनच आता स्वतःला तिसमारखां समजणारे माझ्याच जाळ्यात अडकले” — मंत्री संजय सावकारेभुसावळ : भुसावळच्या राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोपांना चांगलाच रंग चढला असून, वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांनी चौधरी बंधूंना लक्ष्य करत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. “मी काहीच केले नाही, तरी ‘तीसमारखां’ माझ्याच जाळ्यात अडकले!” अशा शब्दांत सावकारे यांनी चौधरी बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला.एका कार्यक्रमादरम्यान बोलताना ना. सावकारे यांनी आपल्या राजकीय विरोधकांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत, “मी काहीही न करता नेहमीच मला हवे तसे घडते. यातूनच आता स्वतःला तिसमारखां समजणारे माझ्याच जाळ्यात अडकले,” असे वक्तव्य केले.त्यांच्या या विधानामुळे भुसावळच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. सावकारे यांनी केलेल्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणत्या राजकीय घडामोडींकडे आहे, याबाबत स्थानिक राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.चौधरी बंधूंवर टीकेची धारयावेळी सावकारे यांनी चौधरी बंधूंच्या राजकीय भूमिकेवर आणि त्यांच्या हालचालींवर जोरदार टीका केली. “मी काहीही करत नाही, तरी परिस्थिती माझ्या बाजूने निर्माण होते,” या आशयाचे वक्तव्य करत त्यांनी विरोधकांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.सावकारे यांच्या वक्तव्यामुळे आगामी काळात भुसावळमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः चौधरी बंधू आणि सावकारे गटातील राजकीय समीकरणांवर या वक्तव्याचा काय परिणाम होतो, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.“तिसमारखां” वक्तव्याची जोरदार चर्चासावकारे यांच्या भाषणातील “तिसमारखां माझ्याच जाळ्यात अडकले” हा उल्लेख सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. विरोधकांना थेट आव्हान देणाऱ्या या वक्तव्यामुळे सोशल मीडिया तसेच स्थानिक राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.दरम्यान, सावकारे यांच्या या आरोपांवर चौधरी बंधूंकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे भुसावळच्या राजकारणात ‘सावकारे विरुद्ध चौधरी’ संघर्षाला पुन्हा धार येण्याची चिन्हे दिसत आहेत.

Read More

🚨 जामनेरमध्ये पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन; १८९ आरोपी पोलिसांच्या रडारवर!

जामनेर | प्रतिनिधीआगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जामनेर पोलिसांनी ७ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता जामनेर पोलीस ठाणे, पहूर पोलीस ठाणे व फत्तेपूर पोलीस ठाणे हद्दीत मोठे कोम्बिंग ऑपरेशन राबविले.पोलीस अधीक्षक चाळीसगाव, पोलीस अधीक्षक जळगाव तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत संबंधित पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये एकूण १८९ आरोपी पोलिसांच्या हाती लागले. त्यामध्ये जामनेर पोलीस ठाणे हद्दीत ७२, पहूर हद्दीत ६४ तर फत्तेपूर हद्दीत ५३ आरोपींची तपासणी करण्यात आली.कारवाईदरम्यान पोलिसांनी १९ अवैध/संशयास्पद बाबींवर कारवाई करत तब्बल ₹५ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच ५ जणांविरुद्ध NBW (नॉन-बेलेबल वॉरंट) बजावण्यात आले.https://youtu.be/hhqLuo9B3Hc?si=ZUSetyJt2lNRnM8I📌 कारवाईचा तपशीलजामनेर: ७२ आरोपी तपासले; ६ कारवाया; ₹१.७० लाखांचा मुद्देमाल; १० मोटारसायकली व १ रिक्षा संशयित.पहूर: ६४ आरोपी तपासले; १० कारवाया; ₹२.५० लाखांचा मुद्देमाल; २० मोटारसायकली; ४ NBW.फत्तेपूर: ५३ आरोपी तपासले; ३ कारवाया; ₹१.५० लाखांचा मुद्देमाल; २२ मोटारसायकली; १ NBW.एकूण: १८९ आरोपी; १९ कारवाया; ₹५.७० लाखांचा मुद्देमाल; ५२ मोटारसायकली व १ रिक्षा संशयित; ५ NBW.दरम्यान, कोम्बिंग ऑपरेशनमध्ये मिळून आलेल्या आरोपींवर पुढील कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून, संशयित मोटारसायकलींच्या कागदपत्रांची पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.सण-उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Read More

स्त्रीभ्रूणाला पोटातच मारण्याचा प्रकार उघडकीस?

गर्भलिंग निदान करून गर्भपाताचा गंभीर आरोप; बुलढाण्यात खळबळ बुलढाणा : जिल्ह्यात बेकायदेशीर गर्भलिंग निदान करून त्यानंतर गर्भपात केला जात असल्याच्या गंभीर आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. गर्भातील बाळाचे लिंग तपासून, त्यानुसार गर्भपातासाठी प्रक्रिया केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकारामुळे आरोग्य विभागाच्या देखरेखीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही ठिकाणी सोनोग्राफीच्या माध्यमातून गर्भाचे लिंग जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय आहे. त्यानंतर गर्भपातासाठी आवश्यक औषधे अथवा वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून दिले जात असल्याचे आरोपही समोर येत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. भारतामध्ये गर्भलिंग निदान करून त्याच्या आधारे गर्भपात करणे कायद्याने गंभीर गुन्हा आहे. गर्भधारणेपूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यासाठी PCPNDT कायदा लागू आहे. या कायद्यांतर्गत गर्भाचे लिंग सांगणे, विचारणे किंवा त्यासाठी मदत करणे यावर कठोर कारवाईची तरतूद आहे. बुलढाणा जिल्ह्यात यापूर्वीही बेकायदेशीर गर्भलिंग निदानाच्या संशयावरून PCPNDT पथकाकडून कारवाया करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सध्याच्या आरोपांचीही प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली जाते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात सोनोग्राफी केंद्रे, संबंधित वैद्यकीय व्यक्ती, गर्भपातासाठी वापरली जाणारी औषधे तसेच त्यांचा पुरवठा याबाबत तपास होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. जर गर्भलिंग निदान करून त्यानंतर गर्भपात केल्याचे पुरावे तपासात आढळले, तर संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अशा प्रकारांमुळे मुलगा-मुलगी समानतेच्या संकल्पनेला धक्का बसत असून स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रभावी पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे. केवळ कारवाईपुरते मर्यादित न राहता अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सोनोग्राफी केंद्रांची नियमित तपासणी, नोंदींची पडताळणी आणि संशयास्पद प्रकरणांवर तातडीने चौकशी करण्याची मागणी होत आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत पुष्टी संबंधित तपास यंत्रणेकडून होणे बाकी असून, चौकशीनंतरच नेमका प्रकार आणि त्यातील दोषी कोण हे स्पष्ट होणार आहे.

Read More

वर्डी-अडावद रस्त्यावर वनविभागाची धडक कारवाई; सागवान तस्करीचा डाव उधळलादुचाकीवरून अवैध लाकूड वाहतूक करणारा संशयित अंधाराचा फायदा घेत पसार; ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त

चोपडा | प्रतिनिधी :चोपडा तालुक्यातील वर्डी-अडावद मार्गावर सागवान लाकडाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या पथकाने रात्रीच्या वेळी कारवाई करत मोठ्या प्रमाणात सागवान लाकूड जप्त केले. या कारवाईदरम्यान दुचाकीवरून लाकूड वाहून नेणाऱ्या व्यक्तीचा पाठलाग करण्यात आला; मात्र अंधाराचा फायदा घेत त्याने दुचाकी आणि लाकूड रस्त्यावरच सोडून तेथून पळ काढला.मिळालेल्या माहितीनुसार, ४ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास वनपथकाला वर्डी-अडावद रस्त्यावर सागवानाच्या अनधिकृत वाहतुकीबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार वनपथकाने परिसरात गस्त वाढवून संशयित वाहनावर लक्ष ठेवले. काही वेळाने सागवानाचे अनघड लाकूड घेऊन जाणारी दुचाकी वनकर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली.पथकाने दुचाकीचा पाठलाग सुरू करताच संशयिताने वाहन थांबवून त्यावर असलेले लाकूड रस्त्याच्या कडेला सोडले आणि अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला. वनकर्मचाऱ्यांनी परिसराची तपासणी केली असता सागवानाचे मोठे ८० नग आणि लहान २० नग अनघड लाकूड आढळून आले.वनविभागाने घटनास्थळावरून अंदाजे ४० हजार रुपये किमतीची मोटारसायकल आणि सागवान लाकूड असा एकूण ४२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. जप्त केलेला मुद्देमाल पुढील कारवाईसाठी चोपडा येथे जमा करण्यात आला आहे.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईही कारवाई उपवनसंरक्षक सौरभ सहार, सहाय्यक वनसंरक्षक एम. बी. पाटील आणि अडावद वनक्षेत्रपाल प्रशांत सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वनपाल योगेश सालुंखे, वनरक्षक गजानन कोईगडे, सुशांत पावरा, हर्षल जोशी, वाहनचालक राजेश जोशी, राजू पाटील तसेच अडावद राऊंड स्टाफने सहभाग घेतला.दरम्यान, घटनास्थळावरून पसार झालेल्या संशयिताचा वनविभागाकडून शोध सुरू असून, जप्त केलेल्या लाकडाचा स्रोत आणि वाहतुकीबाबतही तपास केला जात आहे. सागवानाची अवैध तोड आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात वनविभागाने कारवाईचा बडगा उगारल्याने परिसरातील अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!