नि.पं.पाटील विद्यालयात संस्था वर्धापन दिन साजरा
पळासखेडे मिराचे दि १७ जुलै २०२५(प्रतिनिधी ) नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे मिराचे शाळेत मातृहृदयी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन पवार हे होते. सर्वप्रथम कै.आचार्य बापूसो. गजाननराव गरुड व कै. अण्णासाहेब भास्करराव गरूड यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष , संस्था संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेचा इतिहास व प्रगती विषयी माहिती दिली.त्यानंतर विद्यार्थ्याची वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.विद्यालयाचे पर्यवेक्षक जे.आर.पाटील यांनी कै. आचार्य बापूंना अभिप्रेत असलेला विद्यार्थी याबद्दल मत व्यक्त केले.विद्यालयातील उपशिक्षक एस. जे. सोनवणे यांनी मनोगतात संस्थेची स्थापना व व्याप्ती याबद्दल विद्यार्थ्यांची हितगुज केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन पवार यांनी अध्यक्ष भाषणात कै.आचार्य गजाननराव बापूंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्था संचालक व सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील,चंद्रशेखर काळे,अब्दुल नबी तांबोळी,डी. पी .पाटील, संजू पवार,.शालिक पाटील,अशोक माळी,बळीराम माळी,लता पाटील हे मान्यवर उपस्थित होते.वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक – हर्षाली प्रवीण पाटील द्वितीय क्रमांक – हितेश वर्जन चव्हाण तृतीय क्रमाक – ओम संतोष चौधरी यांनी मिळविला. त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.त्याप्रसंगी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना व गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी 50 शालेय गणवेश वाटप करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाने ,सर्व शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष जी.पी. पाटील यांनी केले तर आभार व्ही. डी. पाटील यांनी मानले.
अखील भारतीय विद्यापीठ कुस्ती वतायकांदो स्पर्धात हरियाणा व ओडिसा राज्यात होणाऱ्या स्पर्धेसाठी गरुड महाविद्यालयातील खेळाडूंची निवड
अ. र.भा गरुड कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णी येथील कु. गौरी कुमावत (SYBSC ) कू हर्षदा चौधरी TYBsc व कु.लोचाना चौधरी SYBsc यांची निवड कुरुक्षेत्र हरियाणा येथे होणाऱ्या अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली व कु. गौरी कुमावत हिची निवड तयकांदो स्पर्धेसाठी बालासोर ओडिसा राज्यात होणाऱ्या अखिल भारतीय स्पर्धेसाठी निवड झालीयशस्वी विद्यार्थिनीचे अभिनंदन शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. दादासाहेब संजयराव भास्करराव गरुड, व्हा. चेअरमन मा. आबासाहेब भीमराव शामराव शेळके तसेच संस्थेचे सचिव मा. काकासाहेब सागरमलजी जैन, सहसचिव दादासाहेब यू.यू पाटील सर, कार्यालयीन सचिव भाऊसाहेब दीपकजी गरुड , सर्व संचालक मंडळ व सर्व संस्था परिवार , महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रा. डॉ.संजय भोळे , उपप्राचार्य डॉ. श्याम साळुंखे डॉ.अमर जावळे प्रा.आप्पा महाजन सर क्रीडा संचालक प्रा.डॉ.महेश पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी अभिनंदन केले
जामनेर येथे राष्ट्रीय लोकन्यायालयात ३६० प्रकरणांचा निकाल
जामनेर, दि. १४ मार्च २०२६ – मा. उच्च न्यायालय मुंबई तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन जामनेर येथे करण्यात आले. तालुका विधी सेवा समिती जामनेर तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालय जामनेर यांच्या वतीने या लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या लोकन्यायालयात मोठ्या प्रमाणावर पक्षकारांनी उपस्थिती दर्शविली. तहसील कार्यालय, महसूल विभाग, राष्ट्रीयकृत बँका, खाजगी पतसंस्था/बँका, बीएसएनएल, नगरपालिका, नगरपरिषद, महावितरण तसेच जामनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. सदर लोकन्यायालयात वादपूर्व प्रकरणे तसेच न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. वादपूर्व प्रकरणांपैकी ३०४ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यामध्ये २,०४,३६० रुपये इतक्या रकमेची तडजोड करण्यात आली. तसेच न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण ५६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. दिवाणी व फौजदारी तडजोडयोग्य प्रकरणांमध्ये ९०,८०० रुपये इतक्या रकमेची तडजोड करण्यात आली. वादपूर्व व न्यायालयीन प्रलंबित अशी मिळून एकूण ३६० प्रकरणे निकाली काढण्यात आली असून दोन्ही प्रकारच्या प्रकरणांमध्ये मिळून २,०५,३७,८८७ रुपये इतक्या रकमेची तडजोड करण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
पुरुषांकडे शक्तीच मातृत्व असलं तरीही जगात मातृत्वाची शक्ती ही महिलांकडेच आहे.म्हणून समाजात वावरतांना महिला म्हणून जबाबदारीने वागा.–अँड.शुभांगी फासे.
जामनेर – प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यापासून तो त्याच्या कर्तृत्वासाठी श्रेष्ठच आहे.मग तो पुरुष असो व स्त्री.उलट काही बाबतीत स्त्रिया या पुरुषांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत.असंख्य क्षेत्रात महिला आज प्रतिनिधित्व करीत आहेत.त्याच बरोबरीने महिलांसाठीचे अधिकार त्यांचे कायदे हे देखील त्यांच्या लक्षात आणून देणे गरजेचे आहे.आज महिलांवरील अत्याचारांच प्रमाण वाढलेलं आहे,तुम्ही शिक्षणाबरोबर स्वतःच्या संरक्षणासाठी स्वयंसिद्ध प्रशिक्षण घ्या.कोणत्याही नात्यात येतांना स्वतःवर असलेल्या जबाबदारी चं भान ठेवा.आणि तिच्या नकार हा कायम नाहीच असतो, नकाराला होकार समजू नका.जी.एम.नर्सिंग इन्स्टिट्यूट,जामनेर तर्फे महीला दिनानिमित्त विशेष शैक्षणिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी जामनेर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय,जामनेर येथील अधिवक्ता आणि युवा व्याख्याता अँड.शुभांगी विठ्ठल फासे या प्रमुख वक्त्या तसेच अँड.आदित्य देशमुख हे देखिल या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यानंतर अॅड.फासे यांनी विद्यार्थ्यांना महीला सक्षमीकरण आणि सामाजिक जीवन मूल्य,कायदेशीर जागरूकता आणि जबाबदार नागरिकत्व या विषयांवर अत्यंत प्रभावी व समजण्यास सोपी अशी माहिती दिली.विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून सक्रिय सहभाग नोंदवला.तसेच अॅड.देशमुख यांनी देखील विद्यार्थ्यांना लहान बालकांसंबंधीचे कायदे (पॉक्सो कायदा) वर मार्गदर्शन केले.महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा.अश्विनी चौधरी यांनी वक्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नागरी जाणीवा व मानवी मूल्यांची दृढ पायाभरणी होत असल्याचे सांगितले.
जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील यांना राज्यस्तरीय ‘शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ प्रदान
नाशिक येथे संपन्न झालेल्या एका भव्य कार्यक्रमात जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील यांना शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने राज्यस्तरीय “शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाला नाशिक शहराच्या महापौर हिमगौरी आडके-आहेर प्रमुख उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन सन्माननीय न्यायमूर्ती वसंतराव शिवराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी वीरपत्नी हर्षदा खैरनार, हेमंत धात्रक नामको बँकेचे चेअरमन आप्पासाहेब संतोष मराठे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच जळगाव जिल्ह्यातील अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.शैक्षणिक, सामाजिक आणि संघटनात्मक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जितेंद्र पाटील यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.दरम्यान, त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आम्ही स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करून मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
संत निरंकारी मंडळातर्फे “मिशन अमृत – स्वच्छ जल, स्वच्छ मन” अंतर्गत सफाई अभियान
जे बी एन महाराष्ट्र न्यूज, जामनेरजामनेर प्रतिनिधी सद्गुरु बाबा हरदेव सिंग जी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त संत निरंकारी मंडळाच्या वतीने “मिशन अमृत – स्वच्छ जल, स्वच्छ मन” या उपक्रमांतर्गत जामनेर शहर व तालुक्यात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जामनेर ब्रांच सेवादल युनिट क्रमांक १३५९ अंतर्गत सर्व सेवादल सदस्यांनी एकत्र येत दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी (रविवार) सोनबर्डी येथे जामनेर शहराच्या पाणीपुरवठा जलकुंभ परिसरात सफाई मोहीम राबवली. आदरणीय सौ. साधनाताई गिरीशजी महाजन (प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा) यांच्या प्रेरणेने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. या वेळी सेवादल युनिट १३५९ चे अधिकारी रतनसिंग परदेशी (सेवादल संचालक), प्रवीणजी शिंदे यांच्यासह देविदासजी पाटील, रवींद्र शिंदे, शंकर माळी, आबाजी पाटील तसेच सेवादलाचे सर्व सदस्य व बंधू-भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आबाजी पाटील सर यांनी सर्वांचे आभार मानले. या उपक्रमासाठी जामनेर नगर परिषद तसेच पाणीपुरवठा प्रमुख संजय सोनार आणि फिल्टर हाऊस ऑपरेटर अशोक माळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. जर हवे असेल तर मी याला अजून थोडी “पेपर स्टाइल” हेडलाईन व लहान करून न्यूज फॉरमॅटमध्येही करून देऊ शकतो.
विटनेर येथे स्व. ललितदादा हरीशेठ साठे यांच्या स्मरणार्थ एक्वा पाणपोईचे लोकार्पण
विटनेर (ता.जळगांव ) – गावाचे सुपुत्र स्वर्गीय ललितदादा हरीशेठ साठे यांच्या स्मरणार्थ विटनेर येथे उभारण्यात आलेल्या एक्वा पाणपोईचे लोकार्पण मा. ना. गुलाबराव पाटील (पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, महाराष्ट्र शासन तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा) यांच्या हस्ते संपन्न झाले.गावकऱ्यांच्या वतीने उभारण्यात आलेली ही पाणपोई नागरिकांना शुद्ध व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणार असून, येणाऱ्या उन्हाळ्यात ग्रामस्थांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. स्व. ललितदादा साठे यांनी गावाच्या सामाजिक, शैक्षणिक व विकासकामांत दिलेल्या योगदानाची आठवण यावेळी मान्यवरांनी कृतज्ञतापूर्वक केली.कार्यक्रमास मा. श्री. पप्पूदादा सोनवणे (जि.प. सदस्य), मा. श्री. हरीशेठ साठे (माजी पं. स. सभापती), मा. श्री. साहेबरावदादा वराडे (माजी पं.स. सदस्य), नेहाताई ललित साठे (लोकनियुक्त सरपंच, विटनेर), मा. श्री. रमेशआप्पा पाटील, मा. श्री. शिवराज पाटील, मा. श्री. पी. के. पाटील तसेच गावातील व पंचक्रोशीतील मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात स्व. ललितदादा साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत, समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती जपण्याचा संकल्प व्यक्त केला.
प्र. प्राचार्य डॉ. संजय वामनराव भोळे यांना उत्कृष्ट प्राचार्य व प्रा. डॉ.योगिता चौधरी यांना उत्कृष्ट समन्वय पुरस्कार मिळाल्या बद्दल सत्कार……
शेंदुर्णी ता.जामनेर महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आयोजित करिअर कट्टा अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य डॉ. संजय वामनराव भोळे यांना उत्कृष्ट प्राचार्य व प्रा. डॉ.योगिता चौधरी यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट सह समन्वय पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचा सत्कार मा.श्री मनोज चौधरी उपमहापौर, महापालिका, जळगाव यांच्या हस्ते करण्यात आला . त्यांच्या सोबत मा.श्री चंद्रशेखर पाटील स्थायी समिती सभापती, महापालिका जळगाव ,मा.श्री दिपक सूर्यवंशी, शहर उपाध्यक्ष जळगाव ,श्री.गजानन देशमुख, माजी नगरसेवक,श्री शिवाजी पाटील, शिक्षण संस्था चालक धरणगाव,श्री मनोज कोळपकर, गृहरक्षक समादेशक, जळगाव ,नगरसेवक श्री संजय देविदास सूर्यवंशी , शेंदुर्णी , तसेच शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन मा .दादासाहेब संजयराव गरुड वप्रा. सुनील गरुड सर, जळगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आला.सत्कार व सन्मान केल्याबद्दल प्र.प्राचार्य डॉ. संजय भोळे व प्रा. डॉ. योगिता चौधरी यांनी त्यांचे आभार व्यक्त केले
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची तब्येत अचानक बिघडली; मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू
महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान गुरुवारी (दि. ५ मार्च २०२६) विधानभवनात कामकाज सुरू असताना मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची अचानक तब्येत खालावली. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबई येथील सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालय व संशोधन केंद्र येथे दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे नेते व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रुग्णालयात भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून आमदार पाटील यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या. सध्या रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती त्यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी यांनी दिली आहे.
वाकडी गरुड विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी. एस. पाटील यांना राज्यस्तरीय “महाराष्ट्र भूषण २०२६” पुरस्कार
जामनेर (प्रतीनिधी) वाकडी गरुड विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री पी. एस. पाटील (अप्पासाहेब) यांना उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल राज्यस्तरीय “महाराष्ट्र भूषण २०२६” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निसर्ग मित्र समिती जळगाव व सार्वजनिक सेवा मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने हा सन्मान प्रदान करण्यात आला. नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते श्री पाटील सरांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री पी. एस. पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक व पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, “पाणी अडवा–पाणी जिरवा” उपक्रम, पशू-पक्षी संवर्धन तसेच प्रदूषणमुक्त दिवाळी अभियान यांसारखे उपक्रम प्रभावीपणे राबवून समाजात जनजागृती केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय सन्मान देण्यात आला. या कार्यक्रमास जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष, संचालक मंडळ तसेच सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. श्री पी. एस. पाटील यांना मिळालेल्या या गौरवाबद्दल धी शेंदूर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी चे चेअरमन आदरणीय दादासाहेब संजयराव गरुड, उपाध्यक्ष आबासाहेब भीमराव शेळके, सचिव सागरमल जैन, सहसचिव यु. यु. पाटील, कार्यालयीन सचिव भाऊसाहेब दिपक गरुड व सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले. तसेच अण्णासाहेब भास्करराव गरुड माध्यमिक विद्यालय चे पर्यवेक्षक श्री ए. डी. राजपूत, सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही पाटील सरांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
टाकळी (ता. जामनेर) येथे धनाई बालक मंदिरच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
टाकळी (ता. जामनेर) येथे धनाई बालक मंदिरचे संचालक श्रीकांत अहिरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तसेच इयत्ता आठवीतील एन.एम.एम.एस. परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. एन.एम.एम.एस. परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी दर्शन समाधान मोरे, हर्षल गणेश जाधव, तेजस राहुल दुसाने व रितेश मुरलीधर सपकाळ यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत कठोर परिश्रम व सातत्य यांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मुला-मुलींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. या कार्यक्रमासाठी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र काका पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, महेंद्र भाऊ बाविस्कर (नगरसेवक, जामनेर), कमलाकर भाऊ पाटील (मा. सभापती), नवल भाऊ पाटील राजपूत (माजी सभापती), सदाशिव चौरे सर, इंदिराबाई ललवाणी (उपमुख्याध्यापक, जामनेर), सुपडू सोनार (सेवानिवृत्त शिक्षक, टाकळी), डॉ. राहुल माळी (शांताई हॉस्पिटल, जामनेर), अरुण सातव सर (सातव क्लासेस, जामनेर), प्रा.ईश्वर चोरडिया, प्रा. सागर बाविस्कर,आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रामकृष्ण सर गायकवाड (सेवानिवृत्त शिक्षक) यांनी भूषविले. तसेच बाळूभाऊ चौरे (ग्रामपंचायत सदस्य), सारंगधर अहिरे (माजी सरपंच), समाधान वराडे, दीपक बाविस्कर, रमेश वराडे, पवन महाजन, उमेश बंडे तसेच गावातील इतर प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन धनाई क्लासेसचे संचालक श्रीकांत अहिरे सर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.


