Headlines

Latest posts

All
fashion
lifestyle
sports
tech

जामनेर न्यायालयात प्रजासत्ताक दिनी संविधान उद्देशिकेचे वाचन

जामनेर न्यायालयात प्रजासत्ताक दिनी संविधान उद्देशिकेचे वाचनयेथील न्यायालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त…

रेल्वे अपघातात जवानाचा दुर्दैवी मृत्यू ,मूळ गावी दोंदवाडे (ता. जामनेर, जि. जळगाव) येथे शासकीय इतमामात अंत्यविधी पार पडला

प्रतिनिधी श्रीरामपूर – भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले वीर जवान गणर…

तयारीला लागा… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मोठा निर्णय! सुप्रीम कोर्टात काय घडलं?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून सध्या राज्यात मोठे राजकीय वादळ उठले…

निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

पळासखेडे मिराचे – धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी लिमिटेड,…

अलवर (राजस्थान) येथे आयोजित खासदार क्रीडा महोत्सवास; केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित..

अलवर (राजस्थान) येथे स्थानिक लोकसभा खासदार व केंद्रीय पर्यावरण, वने…

ज्ञानगंगा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ग्रामपंचायतींना शैक्षणिक क्षेत्रभेट

ता.जामनेर __ : ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील ग्रामपंचायतींना…

जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षणात जामनेर तालुक्याचे प्रा.समीर घोडेस्वार व प्रा.सचिन गडाख यांना प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र देऊन सन्मानित:

जामनेर: महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक…

Latest Youtube

Popular

जामनेर -भारतीय जैन संघटनेची व्यापारी सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न
खरीप हंगाम २०२६ नियोजनासाठी कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक
खरीप हंगाम २०२६साठी जळगावात युरिया खतांची पहिली रेक दाखल
समता व सामाजिक एकात्मतेचा आदर्श; जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष विवाह नोंदणी संपन्न

Latest posts

नि.पं.पाटील विद्यालयात संस्था वर्धापन दिन साजरा

पळासखेडे मिराचे दि १७ जुलै २०२५(प्रतिनिधी ) नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे मिराचे शाळेत मातृहृदयी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन पवार हे होते. सर्वप्रथम कै.आचार्य बापूसो. गजाननराव गरुड व कै. अण्णासाहेब भास्करराव गरूड यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष , संस्था संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेचा इतिहास व प्रगती विषयी माहिती दिली.त्यानंतर विद्यार्थ्याची वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.विद्यालयाचे पर्यवेक्षक जे.आर.पाटील यांनी कै. आचार्य बापूंना अभिप्रेत असलेला विद्यार्थी याबद्दल मत व्यक्त केले.विद्यालयातील उपशिक्षक एस. जे. सोनवणे यांनी मनोगतात संस्थेची स्थापना व व्याप्ती याबद्दल विद्यार्थ्यांची हितगुज केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन पवार यांनी अध्यक्ष भाषणात कै.आचार्य गजाननराव बापूंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्था संचालक व सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील,चंद्रशेखर काळे,अब्दुल नबी तांबोळी,डी. पी .पाटील, संजू पवार,.शालिक पाटील,अशोक माळी,बळीराम माळी,लता पाटील हे मान्यवर उपस्थित होते.वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक – हर्षाली प्रवीण पाटील द्वितीय क्रमांक – हितेश वर्जन चव्हाण तृतीय क्रमाक – ओम संतोष चौधरी यांनी मिळविला. त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.त्याप्रसंगी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना व गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी 50 शालेय गणवेश वाटप करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाने ,सर्व शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष जी.पी. पाटील यांनी केले तर आभार व्ही. डी. पाटील यांनी मानले.

Read More

जामनेर -भारतीय जैन संघटनेची व्यापारी सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर प्रतिनिधीजामनेर येथील व्यपाऱ्यांना उद्योग-व्यवसायात अधिक सक्षम बनविण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या व व्यापारी एसोसिएशन यांच्या वतीने विशेष कार्यशाळेचे येथील महावीर भवन मध्ये आयोजन करण्यात आले.खानदेशात तळोदा,शहादा,शिरपूर, धुळे,शिंदखेडा, पाचोरा , जळगांव या सात ठिकाणी कार्यशाळा होऊन जामनेर येथील ही 8 वी कार्यशाळा असून, राज्य अध्यक्ष केतन शहा, राज्य महासचिव प्रवीण पारख यांच्या मार्गदर्शनाने व उपाध्यक्ष विनय पारख, खानदेश विभाग अध्यक्ष प्रा.चंद्रकांत डागा यांच्या प्रयत्नाने केले गेले असल्याचे विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत यांनी सांगितले.कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक म्हणून सुनील भवरीलालजी गादीया यानी सहकार्य केले.या कार्यशाळेत उद्योजकतेसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सखोल माहिती देण्यात आली.कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून निरंजन जैन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी उद्योग-व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांची माहिती, त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया, तसेच कर्जासाठी लागणारी सिक्युरिटी (हमी) याबाबत सविस्तर विवेचन केले. योजनांमध्ये आवश्यकता नसते, तर काही योजना मर्यादित सिक्युरिटी घेतली जाते, माहिती त्यांनी दिली. या सेमिनारला ओसवाल जैन संघचे सचिव ईश्वरलालजी साबद्रा,पारसनाथ देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष प्रकाश सैतवाल,व्यापारी एसोसिएशन व किराना अध्यक्ष ताराचंद झांवर, उपाध्यक्ष पुखराज डांगी, एमआयडीसी अध्यक्ष सुभाष बोहरा, अड़त अध्यक्ष प्रकाश कोठारी,कृषि अध्यक्ष प्रदीप लोढ़ा, डॉक्टर्स अध्यक्ष डॉ कांतिलाल ओस्तवाल,मेडिकल अध्यक्ष पंढरी पाटिल,कपड़े व्यापारी अध्यक्ष संजय चिंचकर,सीए उपाध्यक्ष अनिल मुनोत कार्यशाळेला उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज़िला उपाध्यक्ष विकास कोठारी, जामनेर शहर अध्यक्ष कुशल बोहरा, उपाध्यक्ष अभिनंदन जैन,सदस्य विकास ललवानी,मयूर पोरवाल,संजय ललवानी,कुणाल चंडालिया,महिला सदस्य मनीषा कोठारी,वंदना चोरड़िया , भाग्यश्री लुंकड आदि सदस्यंनी प्रयत्न केले.कार्यशाळेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांना शासकीय योजनांविषयी स्पष्ट व उपयुक्त माहिती मिळाली असून,भविष्यात उद्योग वृद्धीसाठी या मार्गदर्शनाचा मोठा फायदा होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.सूत्र संचालन वंदना चोरड़िया आणि आभार प्रदर्शन डॉ कांतिलाल ओस्तवाल यानी केले.

Read More

खरीप हंगाम २०२६ नियोजनासाठी कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक

जळगाव, दि. ८ एप्रिल —(प्रतिनिधी)आगामी खरीप हंगाम २०२६च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांचा वेळेवर व पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्यासाठी मागणीपेक्षा अधिक खत पुरवठ्याचा कोटा कृषी आयुक्तालयाकडून मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली. कृषी विकास अधिकारी श्री. पद्मनाभ म्हस्के यांनी खत पुरवठा व वितरणाचे सविस्तर नियोजन सादर केले. शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता खतांची अनावश्यक साठवणूक टाळावी तसेच जमिनीच्या आरोग्यपत्रिकेनुसार व पिकांच्या गरजेनुसारच खत खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.खत विक्रेत्यांना आधार संलग्न (e-POS) प्रणालीद्वारेच विक्री करणे आणि अचूक बिलिंग ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. साठेबाजी किंवा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.बैठकीत कृषी विभाग, पोलीस प्रशासन, रेल्वे विभाग, वाहतूकदार व शेतकरी संघटनांमध्ये समन्वय राखून खत पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यावर भर देण्यात आला.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. कुरबान तडवी, कृषी विकास अधिकारी श्री. पद्मनाभ म्हस्के, मोहीम अधिकारी श्री. अविनाश खैरनार, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री. विकास बोरसे यांच्यासह पोलीस अधिकारी, खत कंपन्यांचे प्रतिनिधी, रेल्वे अधिकारी व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.“खरीप हंगामात शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासन सज्ज असून खत साठा पुरेसा आहे. पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त निविष्ठा वितरणाला आमचे प्राधान्य आहे,” असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

Read More

खरीप हंगाम २०२६साठी जळगावात युरिया खतांची पहिली रेक दाखल

खरीप हंगाम २०२६साठी जळगावात युरिया खतांची पहिली रेक दाखलजळगाव, दि. ८ एप्रिल —(प्रतिनिधी ) खरीप हंगाम २०२६च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खतांचा वेळेवर व पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला असून, आज युरिया खतांची पहिली रेक जिल्ह्यात दाखल झाली.या रेकद्वारे सुमारे २६५० मेट्रिक टन युरिया खत जिल्ह्यासाठी प्राप्त झाले आहे. सदर खत पुरवठा Rashtriya Chemicals & Fertilizers (RCF) कंपनीमार्फत करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन खत साठ्याची पाहणी केली तसेच कंपनी प्रतिनिधी, वाहतूकदार व हमाल प्रतिनिधींशी संवाद साधून उतरवणूक आणि वितरण प्रक्रियेचा आढावा घेतला.खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले आहेत. खतांची विक्री आधार संलग्न (e-POS) प्रणालीद्वारेच करण्याचे आदेश देण्यात आले असून, साठवणूक, वाहतूक व विक्री प्रक्रियेत कोणतीही अनियमितता होऊ नये यासाठी यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेत, रास्त दरात आणि आवश्यक प्रमाणात खत उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.जिल्हा प्रशासनाने खतांचा तुटवडा भासू नये यासाठी सातत्याने नियोजन व पाठपुरावा सुरू ठेवला असून, या उपक्रमामुळे जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला बळकटी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.“शेतकऱ्यांची सोय आणि कृषी निविष्ठांची वेळेवर उपलब्धता ही प्रशासनाची प्राथमिकता आहे. खत विक्रीत पारदर्शकता राखण्यासाठी तांत्रिक प्रणालीचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,” असे जिल्हा प्रशासनाने नमूद केले.

Read More

समता व सामाजिक एकात्मतेचा आदर्श; जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष विवाह नोंदणी संपन्न

जळगाव, दि. ९ एप्रिल — (प्रतिनिधी ) समाजातील भेदभाव दूर करून सर्वसमावेशकतेला चालना देणाऱ्या ‘दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजने’च्या उद्दिष्टांना अधोरेखित करणारा एक आदर्श विवाह सोहळा आज जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे पार पडला.तांदलवाडी (ता. रावेर) येथील श्री. महेंद्र श्रीराम पाटील (दिव्यांग) आणि श्रीमती दमयंती दिनकर कुंवर (अव्यंग) यांनी नोंदणी पद्धतीने विवाह करून सामाजिक समता, परस्पर स्वीकार आणि एकात्मतेचा संदेश दिला. या विवाहामुळे समाजासमोर एक सकारात्मक व प्रेरणादायी उदाहरण उभे राहिले आहे. या प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी नवदांपत्याची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांच्या उज्ज्वल, सुखमय वैवाहिक जीवनासाठी मंगलकामना व्यक्त केल्या. दिव्यांग व सुदृढ व्यक्तींच्या अशा विवाहांमुळे सामाजिक समतोल राखण्यास मदत होत असून दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणाला बळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.राज्य शासनाच्या धोरणानुसार अशा दांपत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. सामाजिक रूढींना छेद देणारा हा विवाह ‘समावेशक समाजा’कडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. “विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा मिलाफ नसून तो सामाजिक बदलाचा एक महत्त्वाचा घटक आहे. महेंद्र आणि दमयंती यांनी स्वीकारलेला हा मार्ग इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल,” असे मत जिल्हा प्रशासनाने व्यक्त केले.

Read More

सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीतील विद्यार्थिनीवर अत्याचार; संतप्त ग्रामस्थांनी मास्तरला दिला चोप

सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीतील विद्यार्थिनीवर अत्याचार; संतप्त ग्रामस्थांनी मास्तरला दिला चोप 🌷जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर 🌷 दिनांक ,:6/04/2026 रोजि बुलढाणा जिल्ह्यातील लोणी गवळी गावातील एका प्राथमिक शाळेत असा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला. आहे एका 58 वर्षीय नराधमाने तिसरी मध्ये शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला त्यानंतर, गावकऱ्यांनी संबंधित शिक्षकाला चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील लोणी गवळी गावातील प्राथमिक शाळेत तिसरीत शिकणाऱ्या एका नऊ वर्षीय विद्यार्थिनीसोबत 58 वर्षीय शिक्षकाने लैंगिक अत्याचार केला. सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. घटना गावातील नागरिकांना माहीत पडताच शेकडोंचा जमाव शाळेवर चालून गेला. गावातील नागरिक आणि महिलांनी या शिक्षकाला चांगलाच चोप देत . तात्काळ या घटनेची माहिती डोनगाव पोलिसांना देण्यात आली त्यानंतर नराधम आरोपी शिक्षक महादेव आत्माराम मानतोडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, गावकरी पोलिसांना या शिक्षकाला घेऊन जाण्यास नकार करत होते व गेल्या तीन तासांपासून शाळेत तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, शेवटी पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत काढत या आरोपी शिक्षकाला डोनगाव पोलीस स्थानकात आणले आहे, सध्या गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे हा नराधम शिक्षक येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहे. सेवानिवृत्तीला अवघा दीड महिना बाकी असताना आणि वयोवृद्ध असतानाही नराधम शिक्षकाने शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा फासण्याचं काम केलंय. सध्या जानेफळ पोलीस स्थानकाच्या बाहेर मोठी गर्दी असून शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Read More

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सहकारी सूतगिरणीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी मंत्रालयात मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

मुंबई, दि. ७ एप्रिल (प्रतिनिधी) — जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सहकारी सूतगिरणीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी मंत्रालयात मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात ही बैठक झाली.बैठकीत वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्रीकृष्ण पवार यांनी सूतगिरणीच्या सद्यस्थितीचा आढावा सादर करत कामकाजातील अडचणी व प्रलंबित मुद्द्यांची सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सूतगिरणीच्या कार्यपद्धती, तांत्रिक बाबी व उत्पादन क्षमतेसंदर्भात चर्चा केली. सूतगिरणीसमोरील अडचणी दूर करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत मंत्री श्री. महाजन यांनी वस्त्रोद्योग विभागाला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यामुळे सूतगिरणीच्या कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.या बैठकीस वस्त्रोद्योग आयुक्त श्री. संजय दैने, मंत्री (वस्त्रोद्योग) यांचे खाजगी सचिव श्री. प्रल्हाद रोडे, मंत्री श्री. महाजन यांचे खाजगी सचिव जयराज कारभारी, प्रादेशिक उपआयुक्त श्री. दीपक खांडेकर, कक्ष अधिकारी श्री. हरीशकुमार कांबळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी ऑनलाइन प्रणालीद्वारे उपस्थित होते.सदर बैठकीत सूतगिरणीच्या प्रगतीसाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला असून, लवकरच ठोस निर्णयांची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read More

ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासह महसूल प्रशासनाला गती देण्यासाठी जिल्हादंडाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पोलीस पाटलांसाठी एक दिवसीय विशेष कार्यशाळा

जळगाव, दि. ७ एप्रिल (प्रतिनिधी) — ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासह महसूल प्रशासनाला गती देण्यासाठी जिल्हादंडाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पोलीस पाटलांसाठी एक दिवसीय विशेष कार्यशाळा जिल्हा नियोजन सभागृहात उत्साहात पार पडली. या कार्यशाळेस जिल्हाभरातील पोलीस पाटलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी श्री. श्रीमंत हारकर, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते तसेच अपर जिल्हादंडाधिकारी श्रीमती वैशाली चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विविध विभागांच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी पोलीस पाटलांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.महसूल प्रशासनासंदर्भात उपविभागीय दंडाधिकारी (फैजपूर) श्री. बबन काकडे यांनी पोलीस पाटलांची भूमिका स्पष्ट केली, तर उपविभागीय पोलीस अधिकारी (जळगाव) श्री. नितीन गणापुरे यांनी गुन्हे नियंत्रणासाठी पोलीस दलाशी समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. नरवीर रावळ यांनी आपत्तीच्या काळात प्रथम प्रतिसादक म्हणून पोलीस पाटलांची जबाबदारी विशद केली. तसेच उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती अर्चना मोरे यांनी आचारसंहिता पालन व सुरक्षित मतदान प्रक्रियेतील कर्तव्यांबाबत माहिती दिली.गाव पातळीवर प्रशासन व नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील कार्यरत असून त्यांच्या सजगतेमुळे ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ होते. या कार्यशाळेमुळे त्यांच्या कामकाजात अधिक स्पष्टता व गती येणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.“पोलीस पाटील हे गावातील प्रशासनाचे डोळे आणि कान आहेत. त्यांच्या सजगतेमुळेच ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्थेचे पालन सुलभ होते,” असे जिल्हा प्रशासनाने नमूद केले.जिल्हा प्रशासनाने अशा प्रशिक्षणात्मक उपक्रमांद्वारे ग्रामीण प्रशासन अधिक सक्षम व उत्तरदायी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Read More

जळगावात पोलीस पाटलांसाठी विशेष कार्यशाळा; कायदा-सुव्यवस्थेला बळकटी

जळगाव, दि. ७ एप्रिल (प्रतिनिधी) — ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासह महसूल प्रशासनाला गती देण्यासाठी जिल्हादंडाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पोलीस पाटलांसाठी एक दिवसीय विशेष कार्यशाळा जिल्हा नियोजन सभागृहात उत्साहात पार पडली. या कार्यशाळेस जिल्हाभरातील पोलीस पाटलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी श्री. श्रीमंत हारकर, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते तसेच अपर जिल्हादंडाधिकारी श्रीमती वैशाली चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विविध विभागांच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी पोलीस पाटलांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.महसूल प्रशासनासंदर्भात उपविभागीय दंडाधिकारी (फैजपूर) श्री. बबन काकडे यांनी पोलीस पाटलांची भूमिका स्पष्ट केली, तर उपविभागीय पोलीस अधिकारी (जळगाव) श्री. नितीन गणापुरे यांनी गुन्हे नियंत्रणासाठी पोलीस दलाशी समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. नरवीर रावळ यांनी आपत्तीच्या काळात प्रथम प्रतिसादक म्हणून पोलीस पाटलांची जबाबदारी विशद केली. तसेच उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती अर्चना मोरे यांनी आचारसंहिता पालन व सुरक्षित मतदान प्रक्रियेतील कर्तव्यांबाबत माहिती दिली.गाव पातळीवर प्रशासन व नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील कार्यरत असून त्यांच्या सजगतेमुळे ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ होते. या कार्यशाळेमुळे त्यांच्या कामकाजात अधिक स्पष्टता व गती येणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.“पोलीस पाटील हे गावातील प्रशासनाचे डोळे आणि कान आहेत. त्यांच्या सजगतेमुळेच ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्थेचे पालन सुलभ होते,” असे जिल्हा प्रशासनाने नमूद केले.जिल्हा प्रशासनाने अशा प्रशिक्षणात्मक उपक्रमांद्वारे ग्रामीण प्रशासन अधिक सक्षम व उत्तरदायी करण्याचा निर्धार व्यक्त केला.[10:03 am, 9/4/2026] Kiran Jio Number: मुंबई, दि. ७ एप्रिल (प्रतिनिधी) — जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सहकारी सूतगिरणीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी मंत्रालयात मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात ही बैठक झाली.बैठकीत वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्रीकृष्ण पवार यांनी सूतगिरणीच्या सद्यस्थितीचा आढावा सादर करत कामकाजातील अडचणी व प्रलंबित मुद्द्यांची सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सूतगिरणीच्या कार्यपद्धती, तांत्रिक बाबी व उत्पादन क्षमतेसंदर्भात चर्चा केली.सूतगिरणीसमोरील अडचणी दूर करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत मंत्री श्री. महाजन यांनी वस्त्रोद्योग विभागाला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यामुळे सूतगिरणीच्या कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.या बैठकीस वस्त्रोद्योग आयुक्त श्री. संजय दैने, मंत्री (वस्त्रोद्योग) यांचे खाजगी सचिव श्री. प्रल्हाद रोडे, मंत्री श्री. महाजन यांचे खाजगी सचिव जयराज कारभारी, प्रादेशिक उपआयुक्त श्री. दीपक खांडेकर, कक्ष अधिकारी श्री. हरीशकुमार कांबळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी ऑनलाइन प्रणालीद्वारे उपस्थित होते.सदर बैठकीत सूतगिरणीच्या प्रगतीसाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला असून, लवकरच ठोस निर्णयांची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read More

शेंदूर्णी सूतगिरणीला गती देण्यासाठी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक

मुंबई, दि. ७ एप्रिल (प्रतिनिधी) — जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सहकारी सूतगिरणीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी मंत्रालयात मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात ही बैठक झाली.बैठकीत वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्रीकृष्ण पवार यांनी सूतगिरणीच्या सद्यस्थितीचा आढावा सादर करत कामकाजातील अडचणी व प्रलंबित मुद्द्यांची सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सूतगिरणीच्या कार्यपद्धती, तांत्रिक बाबी व उत्पादन क्षमतेसंदर्भात चर्चा केली.सूतगिरणीसमोरील अडचणी दूर करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत मंत्री श्री. महाजन यांनी वस्त्रोद्योग विभागाला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यामुळे सूतगिरणीच्या कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.या बैठकीस वस्त्रोद्योग आयुक्त श्री. संजय दैने, मंत्री (वस्त्रोद्योग) यांचे खाजगी सचिव श्री. प्रल्हाद रोडे, मंत्री श्री. महाजन यांचे खाजगी सचिव जयराज कारभारी, प्रादेशिक उपआयुक्त श्री. दीपक खांडेकर, कक्ष अधिकारी श्री. हरीशकुमार कांबळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी ऑनलाइन प्रणालीद्वारे उपस्थित होते.सदर बैठकीत सूतगिरणीच्या प्रगतीसाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला असून, लवकरच ठोस निर्णयांची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read More

पॅरागॉनकडून महिला उत्पाद श्रेणीवर कॅशबॅक ऑफर;आधुनिक फॅशनकडे अधिक भर

मुंबई, एप्रिल २०२६: भारतातील विश्वासार्ह पादत्राणे ब्रँड पॅरागॉन फुटवेअर यांनी महिलां उत्पाद श्रेणीवर कॅशबॅक ऑफर जाहीर केली आहे. या उपक्रमाचा उद्देश महिला ग्राहकांना खरेदीस प्रोत्साहन देणे आणि आधुनिक, फॅशनप्रधान डिझाइन्स अधिक सुलभ करणे हा आहे.या ऑफरअंतर्गत ग्राहकांना सुलभ क्यूआर-आधारित प्रक्रियेद्वारे हमखास रु. ३० तत्काळ कॅशबॅक मिळणार आहे. प्रत्येक उत्पादनाच्या टॅगवर स्क्रॅच-सक्षम क्यूआर कोड दिलेला आहे. हा कोड स्कॅन करून कॅशबॅक पृष्ठावर जाता येते. व्हाउचर कोड आणि आवश्यक माहिती भरल्यानंतर ग्राहक सहजपणे कॅशबॅक मिळवू शकतात. यामुळे खरेदीचा अनुभव अधिक सोपा आणि मूल्यवर्धित होतो.पॅरागॉनची महिला उत्पाद श्रेणी हा आधुनिक ट्रेंडनुसार आणि आकर्षक डिझाइन्सवर आधारित आहे. आजच्या महिला ग्राहकांना केवळ आरामदायक आणि टिकाऊ पादत्राणेच नव्हे, तर विविधता, शैली आणि सध्याच्या फॅशनशी सुसंगतता देखील अपेक्षित असते. या उपक्रमाद्वारे पॅरागॉन आपल्या महिला उत्पाद श्रेणी अधिक व्यापक ग्राहकवर्गापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.सध्या एकूण विक्रीत १५–२० टक्के योगदान देणाऱ्या या विभागाचा वाटा पुढील तीन वर्षांत ४० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. यामुळे या विभागात कंपनीचा वाढता भर अधोरेखित होतो.या उपक्रमाबाबत बोलताना, पॅरागॉन फुटवेअरचे मार्केटिंग आणि आयटी विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष सचिन जोसेफ म्हणाले, “महिला उत्पाद श्रेणी हा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शैली, आराम आणि दैनंदिन वापरासाठी उपयुक्तता यांचा समतोल साधणारी उत्पादने देण्यावर आम्ही भर देत आहोत. कॅशबॅक उपक्रमाद्वारे अधिकाधिक ग्राहकांना आमच्या आधुनिक आणि विविध प्रकारच्या पादत्राणांचा अनुभव घेण्यास प्रोत्साहन मिळेल. विविध बाजारपेठांतील महिलांसाठी फॅशनप्रधान पादत्राणे अधिक सुलभ करण्यावर आमचा सातत्याने भर राहील.”*विविध प्रकारच्या उत्पादनांनी सजलेल्या पोर्टफोलिओसह पॅरागॉन ग्राहकांच्या गरजेनुसार उपयुक्त डिझाइन, दैनंदिन आराम आणि विश्वासार्ह गुणवत्ता प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. येत्या काळात महिला उत्पाद श्रेणी हा कंपनीच्या उत्पन्नवाढीसह ब्रँडच्या नव्या प्रतिमेला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!