नि.पं.पाटील विद्यालयात संस्था वर्धापन दिन साजरा
पळासखेडे मिराचे दि १७ जुलै २०२५(प्रतिनिधी ) नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे मिराचे शाळेत मातृहृदयी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन पवार हे होते. सर्वप्रथम कै.आचार्य बापूसो. गजाननराव गरुड व कै. अण्णासाहेब भास्करराव गरूड यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष , संस्था संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेचा इतिहास व प्रगती विषयी माहिती दिली.त्यानंतर विद्यार्थ्याची वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.विद्यालयाचे पर्यवेक्षक जे.आर.पाटील यांनी कै. आचार्य बापूंना अभिप्रेत असलेला विद्यार्थी याबद्दल मत व्यक्त केले.विद्यालयातील उपशिक्षक एस. जे. सोनवणे यांनी मनोगतात संस्थेची स्थापना व व्याप्ती याबद्दल विद्यार्थ्यांची हितगुज केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन पवार यांनी अध्यक्ष भाषणात कै.आचार्य गजाननराव बापूंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्था संचालक व सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील,चंद्रशेखर काळे,अब्दुल नबी तांबोळी,डी. पी .पाटील, संजू पवार,.शालिक पाटील,अशोक माळी,बळीराम माळी,लता पाटील हे मान्यवर उपस्थित होते.वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक – हर्षाली प्रवीण पाटील द्वितीय क्रमांक – हितेश वर्जन चव्हाण तृतीय क्रमाक – ओम संतोष चौधरी यांनी मिळविला. त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.त्याप्रसंगी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना व गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी 50 शालेय गणवेश वाटप करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाने ,सर्व शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष जी.पी. पाटील यांनी केले तर आभार व्ही. डी. पाटील यांनी मानले.
एसीबी कारवाईनंतरही वावडदा किट वाटप केंद्र सुरूच; आर्थिक गैरव्यवहार व चौकशीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
JBN महाराष्ट्र NEWSप्रतिनिधी जामनेर जळगाव : वावडदा (JBN महाराष्ट्र NEWS प्रतिनिधी जामनेर ) येथील शासकीय किट वाटप केंद्रावर नुकत्याच झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईनंतरही संबंधित केंद्र पुन्हा सुरू करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार, लाभार्थ्यांची कथित लूट तसेच प्रशासनाच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनानुसार, दि. ४ जून २०२६ रोजी वावडदा येथील शासकीय किट वाटप केंद्रावर एसीबीने कारवाई करून १०० रुपयांची लाच स्वीकारताना एका तरुणीला अटक केली होती. तिच्याकडून २६ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणातील संबंधित मालक किंवा जबाबदार व्यक्तींवर कोणतीही कारवाई न झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तक्रारदारांनी असा आरोप केला आहे की, चाळीसगाव, पाचोरा, अमळनेर, एरंडोल, भुसावळ, चोपडा, जामनेर, मुक्ताईनगर आदी भागांतील केंद्रे बंद ठेवून केवळ वावडदा व धरणगाव केंद्रांवरच जिल्हाभरातील लाभार्थ्यांना केवायसीसाठी बोलावले जाते. केवायसीच्या नावाखाली लाभार्थ्यांकडून प्रत्येकी ५० रुपये प्रमाणे तीन फॉर्मसाठी १५० रुपये घेतले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.तसेच, लाभार्थ्यांना किटचे साहित्य त्याच दिवशी देणे अपेक्षित असताना त्यांना पुन्हा काही दिवसांनी बोलावून त्याच प्रक्रियेसाठी पुन्हा पैसे आकारले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. काही दलालांकडून घरपोच सेवेच्या नावाखाली प्रत्येकी ५०० ते १५०० रुपये वसूल केले जात असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. निवेदनात केंद्रांवरील सुविधांच्या अभावाचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना उन्हात तासन्तास उभे राहावे लागत असून पिण्याचे पाणी, सावली किंवा बसण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.याशिवाय, संबंधित कंत्राटदाराला यापूर्वी ब्लॅकलिस्ट करण्यात आले होते, तरीही त्याच्याच माध्यमातून पुन्हा काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एसीबी कारवाईनंतर अवघ्या काही दिवसांतच ऑनलाइन केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आल्याने संपूर्ण प्रकरणाची आर्थिक चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असताना काही केंद्रांवर वाटप प्रक्रिया सुरू असल्याने आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.हे निवेदन संतोष ज्ञानेश्वर पाटील, कैलास सुरेश ताडे, मंगल युवराज पाटील, प्रविण शिवाजी मराठे, जितेंद्र बारी व महबूब सिंग राजपूत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले आहे. संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
जामनेर येथे अत्याधुनिक जी. एम. फिजिओथेरपी सेंटर व नव्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण
जामनेर येथे अत्याधुनिक जी. एम. फिजिओथेरपी सेंटर व नव्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण जामनेर (प्रतिनिधी): जामनेर शहरातील न्यू रुबीस्टार हॉस्पिटलच्या वतीने अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज जी. एम. फिजिओथेरपी सेंटर तसेच नव्या सुसज्ज रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे जामनेर व परिसरातील नागरिकांना अधिक दर्जेदार, आधुनिक आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. न्यू रुबीस्टार हॉस्पिटलने आरोग्यसेवेच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि प्रशिक्षित तज्ज्ञांच्या माध्यमातून जी. एम. फिजिओथेरपी सेंटर सुरू केले आहे. या केंद्रामध्ये विविध शारीरिक व्याधी, दुखापतीनंतरचे पुनर्वसन, सांधेदुखी, मणक्यांचे आजार तसेच इतर फिजिओथेरपी उपचार आधुनिक पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याचबरोबर रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीची सेवा मिळावी यासाठी नव्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेचेही लोकार्पण करण्यात आले. या रुग्णवाहिकेमुळे गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार केंद्रात पोहोचविणे अधिक सोयीचे होणार असून आरोग्यसेवेची गुणवत्ता आणखी उंचावणार आहे. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण उपचार सेवा आणि रुग्णकेंद्रित दृष्टिकोन यांच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना सक्षम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या न्यू रुबीस्टार हॉस्पिटलच्या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या स्तुत्य उपक्रमासाठी न्यू रुबीस्टार हॉस्पिटलच्या संपूर्ण व्यवस्थापन, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाचे नागरिकांनी अभिनंदन केले असून, भविष्यातही अशाच दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
भुसावळ रेल्वे मंडळ अंतर्गत विविध विकास कामांसंदर्भात डीआरएम कार्यालय, भुसावळ येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आढावा बैठक घेतली…
मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ अंतर्गत रेल्वे विभागातील विविध विकास कामे व समस्यांसंदर्भात डीआरएम कार्यालय, भुसावळ येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत तसेच डीआरएम श्री. पुनित अग्रवाल यांच्या समवेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत रावेर लोकसभा मतदारसंघातील सर्व रेल्वे स्थानकांवरील तसेच भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्रगतीपथावर असलेल्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच “पाचोरा–जामनेर” पीजे रेल्वे विस्तारीकरण प्रकल्प आणि “भुसावळ ते खंडवा” तिसरी व चौथी रेल्वे लाईन साठी सुरू असलेल्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेबाबतही चर्चा करण्यात आली. रावेर लोकसभा क्षेत्रातील नांदुरा, मलकापूर, बोदवड, वरंगाव, निंभोरा, सावदा व रावेर आदी प्रमुख स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसुविधांसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. रेल्वे प्रकल्पांमुळे शेतजमिनी बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या अडचणींचीही दखल घेण्यात आली असून, त्या प्रश्नांचे लवकरात लवकर निराकरण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी स्पष्ट सूचना दिल्या.
सिंदखेडराजा ते पाचाड दरम्यान राष्ट्रमाता जिजाऊ महाअभिवादन यात्रेचे आयोजनराजमाता जिजाऊ यांचे माहेरचे वंशज शिवाजीराजे जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक यात्रा
जामनेर, प्रतिनिधी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दिनांक १५ ते १७ जून २०२६ दरम्यान “राष्ट्रमाता जिजाऊ महाअभिवादन यात्रा २०२६” चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थळ असलेल्या ऐतिहासिक सिंदखेडराजा येथून यात्रेला प्रारंभ होणार असून किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील त्यांच्या समाधीस्थळी यात्रेची सांगता होणार आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे माहेरचे वंशज तथा जाधव घराण्याचे वारसदार शिवाजीराजे जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही ऐतिहासिक यात्रा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतील शिवभक्त, इतिहासप्रेमी, शिवकार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होणार आहेत. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांचा जागर, शिवचरित्राचा प्रचार-प्रसार आणि स्वराज्याच्या मूल्यांचे संवर्धन हा या यात्रेचा प्रमुख उद्देश आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागांना जोडणारी ही यात्रा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक एकात्मतेचा संदेश देणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यासह जामनेर तालुक्यातील सर्व शिवप्रेमी, शिवभक्त, युवक, महिला तसेच विविध सामाजिक संघटनांनी या ऐतिहासिक महाअभिवादन यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यात्रा समन्वयक राहुल चव्हाण व कैलास पाटील यांनी केले आहे. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या कार्याचा गौरव आणि स्वराज्याच्या प्रेरणादायी इतिहासाचे स्मरण करून देणारी ही यात्रा राज्यभरातील शिवप्रेमींसाठी एक ऐतिहासिक पर्व ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
गोव्यात महाराष्ट्रातील 150 कार्यकर्त्यांचा सहभाग,बीजेएसचा भ्रमण कार्यक्रम संपन्न
जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर जामनेर प्रतिनिधी सुपडू जाधव जामनेर (वा.) – 40 वर्षापूर्वी स्थापित भारतीय जैन संघटना गेल्या चार वर्षापासून आपल्यात परिवर्तन करण्यासाठी संस्थापक शांतीलाल मुथा व मॅनेजिंग डायरेक्टर कोमल जैन प्रयत्नशील आहे. या साठी बारा महिन्यात 14 फोंडेशन कार्यक्रम दिलेत. त्याचाच एक भाग म्हणून भ्रमण हा कार्यक्रम असून राज्य अध्यक्ष केतन शाह व राज्य महासचिव प्रवीण पारख यांनी आपल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांसाठी गोवा येथे आयोजित केला होता.चार दिवशीय भ्रमण या कार्यक्रमात राज्यातील बारा विभागांपैकी सात विभागातील 18 जिल्ह्यातील एकूण 150 कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.यात खानदेशातून 29 पदाधिकारी व कार्यकर्ते होते.कार्यक्रमाच्या पाहिल्या दिवशी सर्व कार्यकर्त्यांचा परिचय करवून घेतला. या प्रसंगी राज्य अध्यक्ष केतन भाई म्हणाले, या कार्यक्रमामुळे कार्यकर्त्याचा आपसात व्यापार उद्यम वाढेल,आपसात प्रेम,स्नेह बरोबरच नात्यात रूपांतर होऊ शकेल व जे नविन कार्यकर्ते आले आहेत त्यांना बीजेएसचा 40 वर्षाचा इतिहास कळेल. यावेळी मंचावर राज्य महासचिव प्रवीण पारख,राज्य उपाध्यक्ष विनय पारख, राज्य सचिव विजय दुगड,खानदेश विभाग अध्यक्ष प्रा.चंद्रकांत डागा माजी राज्य उपाध्यक्ष हरकचंद बोरा यांनी मनोगत तर सूत्रसंचालन राज्य कार्यकारणी सदस्य संतोष बम्ब यांनी केले.जामनेर येथून खानदेश विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत,महिला सदस्य स्नेहल मुनोत,मनीषा कोठारी,वंदना चोरड़िया,आदि सदस्य गोवा भ्रमण साठी गेले होते.दुसऱ्या दिवशी बालाजी,मंगेशी मंदिर, ओल्ड गोवा चर्च, डोना पोला, कृज वरून परत आलो. तिसऱ्या दिवशी जैन मंदिर, डॉल्फिन पॉईंट, आगुदा फोर्ट, बागा ब्रीज करून रात्री हौजी गेम मध्ये सर्वांनी सहभाग घेतला.चौथ्या दिवशी समापनला बीजेएसच्या मॅनेजिंग डायरेक्टर कोमल, गोवा राज्य अध्यक्ष भरत पाटील, राज्य सचिव राजू देवरकर यांची उपस्थिती लाभली.यावेळी कोमल जैन म्हणाल्या, बीजेएस ही केवळ संघटना नसून एक परिवार आहे.परिवाराच्या समस्या लक्षात घेऊन, त्याचा खोलवर अभ्यास करून उपाय शोधून त्यावर अंमलबजावणी केली जाते.12 राज्यात 50 हजार कार्यकर्ते या साठी सज्ज आहेत. पती पत्नीच्या संबंधातील वाद सोडण्यासाठी पारिवारिक अदालत, परिणय पथ, दिल का जिकशा स्मार्ट गर्ल्स, कपल डेव्हलपमेंट असे कार्यक्रम नवीन रूपात आले, याच बरोबर पाणी, नैसर्गिक आपत्ती, शिक्षण यात ही संघटना कार्यरत आहे. पूर्ण चार दिवस शाकाहारी भोजन, राहण्याची उत्तम व्यवस्था राज्याध्यक्ष केतन शाह, प्रवीण पारख यांनी केली. रविवारी ता.31रोजी सर्वांनी आपसात जड अंतःकरणाने निरोप दिला.
जामनेर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम ८ गुन्हे दाखल; जवळपास २ लाखांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट, अवैध दारू व्यवसायिकांमध्ये खळबळ
बुधवार, 3 जून, 2026जामनेर प्रतिनिधी सुपडू जाधव जामनेर तालुक्यात अवैध गावठी दारू निर्मिती व विक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी आणि व्यापक धडक मोहीम राबवत हातभट्टी व्यवसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये सलग छापेमारी करून विभागाने ८ गुन्हे दाखल केले असून जवळपास २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून घटनास्थळीच नष्ट करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून परिसरात कायद्याचा धाक निर्माण झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय उपआयुक्त उषा वर्मा यांच्या आदेशानुसार तसेच जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीमराबविण्यात आली. अवैध मद्यनिर्मिती,साठवणूक आणि विक्री रोखण्यासाठीविभागाने विशेष पथकाची नियुक्ती करूनतालुक्यातील संवेदनशील भागांमध्येनियोजनबद्ध कारवाई केली. या मोहिमेत राज्यउत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक के. एन.गायकवाड, दुय्यम निरीक्षक एस. पी. कुटेतसेच जवान योगेश राठोड यांनी सक्रियसहभाग घेतला. पथकाने २९ मे ते २ जून याकालावधीत जामनेर तालुक्यातील नेरी, शेंदुर्णी,पळासखेडा, नाचणखेडा आणि भागदरा यागावांमध्ये सलग छापेमारी करून अवैधहातभट्ट्यांचा शोध घेत कारवाईकेली. कारवाईदरम्यान पथकाला मोठ्याप्रमाणात गावठी दारू निर्मिती सुरू असल्याचेआढळून आले. छाप्यांमध्ये २८५ लिटर तयारगावठी दारू जप्त करण्यात आली. याशिवायदारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे ४ हजार२६० लिटर कच्चे रसायन (वॉश) देखील जप्तकरण्यात आले. या सर्व मुद्देमालाची एकूणअंदाजित किंमत १ लाख ९८ हजार ८८० रुपयेइतकी असल्याचे विभागाने स्पष्ट केलेआहे. विशेष म्हणजे, जप्त केलेली गावठी दारूव कच्चे रसायन यामुळे नागरिकांच्याआरोग्यास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन संपूर्ण मुद्देमाल घटनास्थळीच नष्ट करण्यात आला. त्यामुळे अवैध मद्यनिर्मितीचे संभाव्य जाळे उद्ध्वस्त करण्यात विभागाला यश आले आहे. या प्रकरणात संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार एकूण ८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू असून अवैध मद्यनिर्मिती व विक्री साखळीतील इतर संबंधितांचा शोध घेण्याचे कामही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्रीविरोधातील कारवाया यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ग्रामीण भागात हातभट्टी व्यवसायाला आळा घालण्यासाठी नियमित छापेमारी, गुप्त माहिती संकलन आणि विशेष मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे विभागाने सांगितले. दरम्यान, जामनेर तालुक्यातील या धडक कारवाईमुळे अवैध दारूव्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडूनही या कारवाईचे स्वागत केले जात आहे. कायद्याचे उल्लंघन करून गावठीदारू निर्मिती करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या यशस्वी मोहिमेमुळे अवैधमद्यनिर्मितीविरोधातील लढ्याला नवीधार मिळाल्याचे मानले जात आहे.
पुनर्वसनाच्या प्रलंबित प्रश्नांना मिळणार गती; जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक आढावा बैठक
पुनर्वसनाच्या प्रलंबित प्रश्नांना मिळणार गती; जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक आढावा बैठकजळगाव, दि. २ जून (प्रतिनिधी) जिल्ह्यातील पुनर्वसन विषयक प्रलंबित प्रश्नांचा तातडीने निपटारा करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित विभागांची व्यापक आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पुनर्वसित गावठाणांतील विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली.बैठकीत पात्र लाभार्थ्यांना भूखंड वाटप, पुनर्वसित क्षेत्रातील रस्ते, पाणीपुरवठा व वीज यांसारख्या नागरी सुविधांची सद्यस्थिती, भूमी अभिलेख विभागाकडे प्रलंबित असलेल्या जमीन मोजणीची प्रकरणे, न्यायालयीन बाबी तसेच प्रकल्पग्रस्तांच्या स्थानिक अडचणींचा तपशीलवार आढावा घेण्यात आला.यावेळी जिल्हा अधीक्षक (भूमी अभिलेख), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), उपजिल्हाधिकारी, पाटबंधारे, मध्यम प्रकल्प व धरण विभागाचे कार्यकारी अभियंते, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच उपअधीक्षक भूमी अभिलेख हे प्रत्यक्ष व दूरचित्रवाणी प्रणालीद्वारे (व्हीसी) उपस्थित होते.प्रकल्पग्रस्तांचे हित लक्षात घेऊन सर्व विभागांनी परस्पर समन्वय वाढवून प्रलंबित विषयांना गती द्यावी व निर्धारित कालमर्यादेत त्यांची पूर्तता करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. या बैठकीमुळे जिल्ह्यातील पुनर्वसनाशी संबंधित अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बोदवड शहरातील पाणीपुरवठा विहिरीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
बोदवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ईदगाह परिसरातील रस्त्यालगत असलेल्या विहिरीला अद्याप सुरक्षा जाळी बसविण्यात आलेली नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गंभीर बाबीकडे नगर पंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शहर विकास आघाडीने केला आहे. शहर विकास आघाडीच्या म्हणण्यानुसार, संबंधित विहिरीत भविष्यात एखादा प्राणी किंवा पक्षी पडल्यास पाणी दूषित होण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. यापूर्वी सारोळा पाणीपुरवठा योजनेच्या टाकीत बैल पडून मृत झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. पाणीपुरवठा विहिरीवर त्वरित सुरक्षा जाळी बसविण्याची मागणी करत शहर विकास आघाडीने नगर पंचायत प्रशासनाला इशारा दिला आहे. मागणीची दखल न घेतल्यास शहरभर “भीक मागो आंदोलन” छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, या आरोपांबाबत नगर पंचायत प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
अतिवृष्टी अनुदानासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन; आठ दिवसांत निधी वर्गाचे आश्वासन
जळगाव : अतिवृष्टी अनुदान वेळेत न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे धाव घेत अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांना निवेदन सादर केले. लवकरात लवकर निधी न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर निधी वर्ग करण्यात येईल असे आश्वासन दिले. याशिवाय शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महसूल अधिकारी अंगद कासटकर यांचीही भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. कासटकर यांनी जामनेर तहसीलदारांशी तत्काळ दूरध्वनीवरून चर्चा केली आणि येत्या आठ दिवसांत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट निधी वर्ग करण्यात येईल असे स्पष्ट केले. या आंदोलनात सुभाष ठोंबरे, अविनाश पाटील, गोपाल कदम, समाधान चौधरी, प्रकाश ठोंबरे, अशोक ढगे, रामचंद्र पवार, अजय मराठे आणि विशाल भगत यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
जामनेर – बीजेएस कार्यकर्ता सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर प्रतिनिधीभारतीय जैन संघटनेच्या(बीजेएस)40 वर्षाच्या इतिहासात प्रथमतः ग्राउंड लेव्हलच्या कार्यकर्त्यांसाठी कार्यकर्ता सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रम संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या प्रेरणेने व मॅनेजिंग डायरेक्टर कोमल जैन यांच्या मार्गदर्शनाने दिनांक 7 मे 2026 रोजी संध्याकाळी 5 ते 8 या दरम्यान आधी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून 288 पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतला.कार्यक्रमाची सुरुवात नमस्कार महामंत्राने करून सुरुवातीला संघटनेच्या सामुदायिक विवाह कार्यक्रम ज्यात शांतीलाल मुथा यांच्या मुलांचा विवाह केला होता. त्यानंतर परिचय संमेलन, 1993 मधील लातूर भूकंप,जम्मू कश्मीर अंदमान निकोबार, नेपाळ , मेळघाट येथील कामे, 2018 मध्ये पाण्याच्या संदर्भात बुलढाणा येथे पायलट प्रोजेक्ट,2024 मध्ये भारतातील 100 शहरे जल पर्याप्त म्हणून पर्यंत घेतले, 2019 पासून मूल्यवर्धन शिक्षण, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार आदी कामांची माहिती कोमल जैन यांनी दिली.यानंतर संघटना परिवार व नातेसंबंध, मूल्य आणि आचरण,प्राकृतिक संसाधनाचे रक्षण, शिक्षण विकास, नैसर्गिक आपत्ती, आरोग्य संपदा व भ्रमण या 7 बाबींवर काम करीत असल्याचे सांगितले.संघटनेच्या बास्केटमध्ये वर्षभरातील 14फाउंडेशन कार्यक्रम याशिवाय स्मार्ट गर्ल,एमएसएमई,परिणय पथ,कपल एम्पॉवरमेंट आदी व नव्याने येत असलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली. तसेच शाखा म्हणजे काय,स्थापना कशी करावी, कार्यकारणी किती सदस्यांची असावी, आर्थिक नियोजन कसे करावे याबाबत ऊहापोह केला गेला. देशात बारा राज्यात संघटनेची कार्य असून एकूण 700 शाखा व 50 हजार कार्यकर्ते आहेत.राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी पंकज चोपडा दिनेश पालरेचा, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष केतन शहा, राज्य महासचिव प्रवीण पारख,राज्य उपाध्यक्ष विनय पारख, राज्य सचिव, राज्य कार्यकारणीखान्देश विभाग अध्यक्ष प्रा.चंद्रकांत डागा ,अशोक राखेचा,विभाग उप अध्यक्ष सुमित मुनोत, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष अल्पेश जैन,जलगांव जिल्हा सचिव दर्शन जैन,जामनेर महिला अध्यक्ष मोना चोरड़िया आणि मुख्य कार्यालयाकडून अमित ढाणे,अभिजीत पेटकर, विविध शाखांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते.असे प्रशिक्षण नियमितपणे सुरू राहणार असल्याचे कोमल जैन यांनी सांगितले.


