नि.पं.पाटील विद्यालयात संस्था वर्धापन दिन साजरा
पळासखेडे मिराचे दि १७ जुलै २०२५(प्रतिनिधी ) नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे मिराचे शाळेत मातृहृदयी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन पवार हे होते. सर्वप्रथम कै.आचार्य बापूसो. गजाननराव गरुड व कै. अण्णासाहेब भास्करराव गरूड यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष , संस्था संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेचा इतिहास व प्रगती विषयी माहिती दिली.त्यानंतर विद्यार्थ्याची वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.विद्यालयाचे पर्यवेक्षक जे.आर.पाटील यांनी कै. आचार्य बापूंना अभिप्रेत असलेला विद्यार्थी याबद्दल मत व्यक्त केले.विद्यालयातील उपशिक्षक एस. जे. सोनवणे यांनी मनोगतात संस्थेची स्थापना व व्याप्ती याबद्दल विद्यार्थ्यांची हितगुज केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन पवार यांनी अध्यक्ष भाषणात कै.आचार्य गजाननराव बापूंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्था संचालक व सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील,चंद्रशेखर काळे,अब्दुल नबी तांबोळी,डी. पी .पाटील, संजू पवार,.शालिक पाटील,अशोक माळी,बळीराम माळी,लता पाटील हे मान्यवर उपस्थित होते.वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक – हर्षाली प्रवीण पाटील द्वितीय क्रमांक – हितेश वर्जन चव्हाण तृतीय क्रमाक – ओम संतोष चौधरी यांनी मिळविला. त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.त्याप्रसंगी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना व गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी 50 शालेय गणवेश वाटप करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाने ,सर्व शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष जी.पी. पाटील यांनी केले तर आभार व्ही. डी. पाटील यांनी मानले.
जामनेर येथील रवींद्र माधवराव महाजन यांना कृषीभूषण पुरस्कार
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry’s standard
जिल्हास्तरीय भुलाबाई महोत्सवात तोरनाळा शाळा प्रथम
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry’s standard
एस बी देशमुख यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry’s standard
जि.प.शाळा सोनाळे येथे शिक्षण परिषद पार पडली
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry’s standard
वाकडी येथे महिला मुतारीचे बांधकाम बोगस
वाकडी.ता.जामनेर.दि.२२/०२/०२६ वाकडी येथे बसस्थानक परिसरात मध्ये सहा महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महिला मुतारी बांधकाम करण्यात आले होते, मात्र निकृष्ट दर्जाचे झाल्याने आज रोजी महिला मुतारीची दुरवस्था झाली आहे,मुतारी च्या आजूबाजूला अवैध धंदे गावठी,देशी,इंग्लिश,दारू विक्री होताना मोठ्या प्रमाणात होत आहे त्याचा त्रास महिला वर्ग व विध्यार्थी याना होत आहे महिला व शाळेकरी विद्यार्थ्यांनी लघुशंकेसाठी कोठे जावे हा प्रश्न निर्माण झाला आहे, महिला मुतारीचे बांधकाम करुन सहा महिने सुध्दा झाले नसले तरी , मुतारी ही नदी किनारी असल्याने मुतारी मध्ये मोठे पोकळ ढिगाळ पडले आहे,खालून मोठे बोगदे पडल्याने उतार निर्माण होवून एखादी महिला किंवा विद्यार्थ्यांनी लघुशंकेसाठी जर मुतारी मध्ये गेली तर पाय घसरून पडण्याचा संभव आहे,मुतारी मध्ये भराव न टाकता बोगस काम करून मोकळे झाले आहे त्यामुळे बसस्थानक परिसरात दुसऱ्या लघुशंकेसाठी जागा नाही,यामुळे महिलांमध्ये भिंतीचे वातावरण आहे,या बसस्थानक परिसरात परिसरातील कर्णफाटा, राहेरा, कासली,गोराडखेडा,शेंगोळा,चिंचखेडा,हिवरखेडा,लोणी जाणाऱ्या महिला वर्ग व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थांबतात त्यांना हि त्रास सहन करावा लागत असल्याने स्थानिक ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी याकडे लक्ष्य देवून दुरवस्था झालेल्या मुतारीचे बांधकाम पुन्हा करावे अशी मागणी महिला करतांना दिसत आहे.
गोद्री येथे शांततामत वातावरणात सर्वव धर्मीय शिव जयंती साजरी समाजसेवक अक्षय पाटील यांचे अमोल सहकार्य
तोंडापूर ता. जामनेर येथून जवळच असलेल्या गोद्री येथे सर्व समज बांधवामार्फत डी जे च्या तालावर नाचत अतिशय शांततापूर्ण वातावरणात पोलीस संरक्षण शिवाय शिव जयंती साजरी करण्यात आली.या वेळी गोद्री येथील समाजसेवक अक्षय पाटील याच्या हस्ते गावाच्या वतीने ग्रामपंचायत आवारातील छत्रपती शिवाजी महाराष्ट्रचंच्या आश्वावृढ पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी अक्षय पाटील यांच्या वतीने संपूर्ण गावाला अन्नदान करण्यान्त आले, तसेच गावातील युनूस तडवी, रुबाब तडवी, विष्णू कोळी, प्रकाश कोळी, गणेश देशमुख, सागर कोळी,गजानन पाटील, निखिल कोळी, चेतन कोळी, यांचे सहकार्य लाभले. विशेष म्हणजे गोद्री येथील शिवजयंतीसाठी पुण्याहून सत्त्यम कड, ऋतिक चव्हाण, आनंद कड,रुपेश कड,तुषार बचचे,अजित रागडे,जगदीश हलडेकर,मिनीनाथ गव्हाणे उपस्थित होते
समाजासाठी येणारे काळ जोखमीचा नंदकिशोर साखला
जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर प्रतिनिधी – सध्याची सामाजिक स्थिती पाहता येणारा काळ हा समाजासाठी जोखमीचा असेल, असे मत भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर साखला यांनी व्यक्त केले. ते साक्री तालुक्यातील बळासाने तीर्थ क्षेत्रात खानदेश विभागातर्फे आयोजीत खानदेश विभागाच्या पदाधिकारी व कार्यकर्ता स्नेह मिलनात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीओम विश्वकल्याण विमलनाथ तीर्थभूमी ट्रस्टचे खजिनदार व पंचायत समिती सदस्य महावीर जैन होते. नमस्कार महामंत्राने व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.खानदेश उपाध्यक्ष स्व. लतीश जैन यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पित केली.प्रास्ताविक खानदेश विभाग अध्यक्ष प्रा.चंद्रकांत डागा यांनी केले.साखला पुढे म्हणाले, समाजातील समस्या ओळखणे, त्यावर वैज्ञानिक पद्धतीने संशोधन करून उपाय सुचविणे ही संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांची कार्यशैली राहिली आहे. चाळीस वर्षापासून निरंतर हे काम सुरू आहे. समाजात अनेक बदल झाले आहेत. मुला-मुलींमध्ये शैक्षणिक स्तर भिन्न झाला आहे. मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवल्याने समस्या वाढल्या आहेत. कुटुंब व्यवस्था उध्वस्त होत आहे. त्यासाठी आपल्या व्यवहाराने संस्काराने राहणीमानाच्या पद्धतीने सुरक्षा कवच निर्माण करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय सचिव दीपक चोपडा यांनी संघटनेच्या पाया मजबूत करण्यासाठी संघटने बारा महिन्यात 14 कार्यक्रम दिले हे कार्यक्रम यशस्वी करणे प्रत्येक शाखेचे आद्य कर्तव्य असल्याचे सांगितले. राज्य महासचिव प्रवीण पारख यांनी, कार्यकर्ता हा संघटनेचा आत्मा आहे.समाजकारणात करता करता अनेक जण राजकारणात गेले. खानदेशात पंचवीस शाखा कार्यरत असून वर्षभरात 120 फाउंडेशन कार्यक्रम त्यांनी घेतले. महाराष्ट्रातील एकूण कार्यक्रमात 40% हिस्सा आहे.राज्य उपाध्यक्ष विनय पारखे यांनी येत्या वर्षात खानदेशाने किती कार्यक्रम घेतले पाहिजे याचे टार्गेट दिले. माजी राज्य उपाध्यक्ष हरकचंद बोरा यांनी संघटनेने नव्याने सुरू केलेले पारिवारीक अदालत विषयी माहिती दिली. राज्य सचिव विजय दुगड यांनी संघटनेचे कार्यक्रम घेण्याचे आव्हान केले. डॉक्टर कांतीलाल टाटीया यांनी संघटनेने पाण्याच्या संदर्भात केलेल्या कार्याची व संघटनेचे महत्व विशद केले तर जयश्री गोगड यांनी अंकाचे महत्व सांगितले.**कार्यक्रम दरम्यान नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार सन्मानपत्र देऊन केला.ललित रमनलाल छाजेड(शहादा), दीपक प्रवीणजी डांगी (जामनेर), धीरज ओस्तवाल(शेंदुर्णी), देवेंद्र चंदनमल जैन (नंदुरबार),अमर जैन(जळगांव), निर्मल कोठारी( भुसावळ), नितीन जैन (मुक्ताईनगर )जयश्री विनोदकुमार पगारिया (साक्री) तर विविध क्षेत्रात नियुक्ती झालेल्या राजेंद्र टाटिया (साक्री जैन संघ अध्यक्ष),चंद्रकांत डागा(ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या राज्य कार्यकारिणी सदस्य),जोशीला पगारिया(गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या केंद्रीय महिला अध्यक्ष)मनोज डागा(अखिल भारतीय खरतरगछ परिषद राष्ट्रीय उपाध्यक्ष), सुमित मुनोत(समस्त ज़िला समन्वयक), जयश्री गोगड (एस्ट्रॉलॉजर) यांचा सत्कार शॉल, माळा देऊन मान्यवरांच्या हस्ते केला गेला.**सन 2025मध्ये जिल्ह्यात सर्वाधिक फाउंडेशन कार्यक्रम घेतल्या बद्दलतळोदा,जामनेर व शिंदखेडा शाखेचे अध्यक्ष राहूल जैन, कुशल बोहरा,सौ मोना चोरड़िया व मयुर ओस्तवाल यांचा त्यांच्या टीम सह ट्रॉफी देऊन सत्कार केला.नवनिर्वाचित नगरसेवक ललित छाजेड, जयश्री पगारिया यांनी मनोगत व्यक्त केले तर सूत्रसंचालन जळगाव महिला जिल्हाध्यक्ष सोनाली कोठारी तर आभार विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत यांनी मानले.
वाकडी गरुड विद्यालयात शिव जयंती सोहळा उत्साहात संपन्न
शेंदूर्णी (दि. १९ फेब्रुवारी २०२६) – शेंदूर्णी येथील धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटी लि., शेंदूर्णी संचलित अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपशिक्षक श्री व्ही. बी. पाटील सर होते. प्रारंभी अध्यक्ष तसेच श्री दीपकभाऊ परदेशी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. अध्यक्षांचे स्वागत विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री ए. डी. राजपूत सर यांनी केले.जयंतीनिमित्त विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि दूरदर्शी राज्यकारभाराविषयी प्रभावी मनोगते व्यक्त केली. तसेच विद्यार्थिनींनी गीतगायनातून महाराजांना मानाचा मुजरा अर्पण केला.उपशिक्षक श्री आर. एस. चौधरी सर यांनी आपल्या भाषणातून शिवरायांची थोरवी वर्णन केली व कवितेद्वारे मानवंदना दिली. अध्यक्षीय भाषणात श्री व्ही. बी. पाटील सर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडत त्यांच्या आदर्श राज्यपद्धती, सर्वधर्मसमभाव व लोककल्याणकारी धोरणांचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ए. एस. पाटील मॅडम यांनी केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री एस. एम. भुरट सर व श्रीमती व्ही. एस. पाटील यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री जे. एम. नाईक सर यांनी केले.याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
बोदवड (प्रतिनिधी) – कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बोदवड येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. सामाजिक बांधिलकी व राष्ट्रसेवेची जाणीव विद्यार्थ्यांनी कृतीतून व्यक्त करत एकूण २५ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. मिठूलालजी अग्रवाल यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे सचिव मा. श्री. विकासभाऊ कोटेचा प्रमुख उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. अरविंद चौधरी यांनी मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी विचारांचा उल्लेख केला. समाजहितासाठी निःस्वार्थ सेवा करण्याची प्रेरणा युवकांनी घ्यावी, असे प्रतिपादन त्यांनी केले. रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचे कार्य युवकांनी करावे, असेही त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. नितेश सावदेकर यांनी केले. रक्तदानाचे वैज्ञानिक, सामाजिक व आरोग्यविषयक महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, रक्तदानामुळे शरीरातील रक्तनिर्मिती प्रक्रिया सक्रिय राहते आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीची मदत मिळते. शिवजयंतीनिमित्त समाजोपयोगी कार्यातून अभिवादन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. रक्तसंकलनाची जबाबदारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने पार पाडली. डॉ. कृष्णाई सोळंकी, डॉ. विद्या शिरसाट तसेच तंत्रज्ञ श्री. सागर पाटील, श्री. दीपक होनमाने, श्री. प्रदीप पाडवी, श्री. प्रभाकर पाटील व श्री. जगन्नाथ जाधव यांनी अत्यंत दक्षतेने रक्तसंकलन प्रक्रिया पूर्ण केली. सर्व रक्तदात्यांची पूर्वतपासणी करून वैद्यकीय नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शरद पाटील यांनी केले. आयोजनासाठी डॉ. मनोज निकाळजे, प्रा. अजित पाटील, प्रा. तुषार सोनवणे, प्रा. ज्ञानेश्वर, प्रा. अखिलेश यादव, प्रा. शुभम चौधरी, महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. वंदना नंदवे व श्री. अतुल पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. रा.से.यो. स्वयंसेवक दीक्षा कोकाटे, दिव्या चौधरी, दिव्या वंजारी, रुची धांडे, संजना धांडे, प्राजक्ता दांदडे, अक्षय कोकाटे यांनी नोंदणी, नियोजन व शिस्तबद्ध व्यवस्थापनात उल्लेखनीय योगदान दिले. शिबिराच्या शेवटी सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व अल्पोपहार देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमातून “रक्तदान हेच जीवनदान” हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यात आला. रक्तदान ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून मानवतेची जिवंत अभिव्यक्ती आहे. युवकांनी वाढदिवस, जयंती किंवा राष्ट्रीय सण अशा विशेष प्रसंगी रक्तदान करून समाजाशी असलेली नैतिक बांधिलकी जपावी, असे आवाहन प्रा. नितेश सावदेकर यांनी केले.
पिंपरी नांदू (ता. मुक्ताईनगर) येथे उत्साहात शिवजयंती साजरी
पिंपरी नांदू (ता. मुक्ताईनगर) – पिंपरी नांदू ग्रामपंचायतच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. गावातील मुख्य चौकात उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सरपंच प्रतिभा पाटील, उपसरपंच योगेश कोळी तसेच सदस्य भागवत पाटील, किशोर पेटारे, विशाल चौधरी, प्रतिभा निकम व दिनकर निकम यांच्या उपस्थितीत श्री हरी चौधरी व हरी कोळी यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. मधुकर भोई यांनी आरती केली तर अतुल चौधरी यांनी श्रीफळ फोडून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी विनोद भोई, आजिनाथ कोळी, शांताराम चौधरी, प्रमोद भोई, चिंधूलाल भोई, वैभव भोई, रितेश कोळी, चेतन न्यावी, विजय कोळी, मयूर कोळी, गणेश कोळी यांच्यासह गावातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत अधिकारी कैलास भगत, ग्रामपंचायत शिपाई समाधान कोळी तसेच पाणीपुरवठा कर्मचारी विकास कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले.
खडकी ता. जामनेर येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी
खडकी गावात संत सेवालाल महाराज जयंती भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरी करण्यात आली. यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक वेशभूषा आणि स्वच्छता अभियान राबवत गावकऱ्यांनी एक आदर्श उपक्रम साकारला. संपूर्ण गावाच्या सहभागातून झालेल्या या उपक्रमामुळे सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन सुशील भाऊ नाईक यांनी केले होते. कार्यक्रमाला राज्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन तसेच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली.गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे जयंती उत्सवाला भव्य स्वरूप प्राप्त झाले.
जळगाव महानगरपालिका स्थायी समितीत अरविंद देशमुख यांची निवड
जळगाव (प्रतिनिधी) – पहूर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून राजकारणात आलेल्या अरविंद देशमुख यांनी जळगाव शहराच्या राजकारणात पुन्हा एकदा आपली छाप पाडली आहे. जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी विजय मिळवल्यानंतर आता सुमारे 2000 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्प असलेल्या महानगरपालिकेच्या स्थायी समितीवर त्यांची निवड झाली आहे.महानगरपालिकेची स्थायी समिती ही आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. शहरातील विकासकामे, विविध प्रकल्पांची मंजुरी, खर्चाचे नियोजन आणि आर्थिक धोरणांबाबतचे महत्त्वपूर्ण निर्णय या समितीत घेतले जातात. त्यामुळे देशमुख यांची या प्रभावी समितीत झालेली निवड जळगाव शहरासाठी आणि त्यांच्या समर्थकांसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.अरविंद देशमुख यांची ओळख केवळ नगरसेवक म्हणून मर्यादित नसून ते महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू सहकारी व ‘संकटमोचक’ कार्यकर्ता म्हणूनही ओळखले जातात. जिल्ह्यातील विविध राजकीय घडामोडींमध्ये त्यांनी प्रभावी नियोजन व संघटन कौशल्य दाखवत नेतृत्वाला बळकटी दिली आहे.स्थायी समितीतील त्यांच्या कामगिरीकडे आता जळगावकरांचे लक्ष लागले असून, शहराच्या विकासाला गती देण्यासाठी ते ठोस आणि परिणामकारक निर्णय घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शेंदुणी येथे गरुड विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
जामनेर तालुक्यातील ‘धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को ऑप सोसायटी लिमिटेड’, शेंदुर्णी संचालित आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी ता जामनेर जि जळगांव येथील शाळेच्या प्रांगणात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न.कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजयरावजी गरुड होते.प्रमुख वक्ते हर्षल पाटील, संस्थेचे सचिव काकासो सागरमल जैन, संस्थेचे सह सचिव दादासो यु यु पाटील, शेंदुर्णी नगरपंचायत स्विकृत सदस्य बापुसाहेब शांताराम गुजर, माजी उपसभापती (पंस,जामनेर) अण्णासो सुधाकर बारी, कार्यालयीन सचिव भाऊसाहेब दिपकराव गरुड, लोकमत प्रतिनिधि दिपक जाधव, पुण्यनगरीचे पत्रकार विलास आहेरे, लोकशाहीचे प्रतिनिधि ॲड देवेंद्र पारळकर, माजी उप-मुख्याध्यापक एच डी चौधरी, प्राचार्य आर एस चौधरी, उप-मुख्याध्यापक बी एम कुमावत, पर्यवेक्षक जे एस जुबळे, विनोद पाटील, आदि उपस्थित.कार्यक्रमाची सुरुवात ईश्वस्तवन व स्वागत गिताने तसेच मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती, ब्रम्हीभूत हरी प्रसाद महाराज, संस्थेचे विश्वस्त आचार्य गजाननराव गरुड, संस्थेचे प्रेरणास्रोत अण्णासो भास्कराव खंडेराव गरुड आदिंच्या प्रतिमांचे पुजन तसेच माल्यार्पण करून करण्यात आली.सदर प्रसंगी मान्यवरांचे प्रेमवस्त्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य आर एस चौधरी यांनी केले.विद्यार्थी मनोगत खुशी डामरे, अविनाश चव्हाण, अमोल चव्हाण यांनी करत शाळेबदल तसेच शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.शिक्षक मनोगत एल पी मोहणे यांनी व्यक्त केले.सदर प्रसंगी गांधी रिसर्च फाउंडेशन,जळगांव यांच्या वतीने गांधी विचार परीक्षेत जिल्ह्यात यश संपादन केल्याबद्दल सई मराठे, मानसी पाटील या विद्यार्थ्यांनींना पदक व प्रमाणप्रत्र देऊन गौरवण्यात आले.अतिथी मार्गदर्शन काकासाहेब सागरमल जैन यांनी करत मुलांचे मन जिंकून अनेक प्रेरणादायी उदाहणे दिली.प्रमुख वक्ते हर्षल पाटील यांनीही मुलांशी संवाद साधून येणाऱ्या परीक्षेबाबत योग्य मार्गदर्शन करत काॅफी पासून दुर रहा, अपयशाने खचुन जाऊ नका, भाषेमधील साम्यता, कला साहित्य यांच्याशी जोडलेले रहा, जगन तुमचे समृद्ध करा, शब्दांचे सामर्थ्य, बाजारामध्ये चातुर्याने पैसे कसे कमाऊ शकता आदी मुद्द्यांवरही विद्यार्थ्यांशी संवाद साधला.कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासाहेब संजयरावजी गरुड विद्यार्थी यांनी काॅफी मुक्त परीक्षेला सामोरे जाण्याबाबत, संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढीला महत्व दिले, अपयशाने खचुन न जाता यशाची पहीली पायरी बनवा पुढे स्पर्धात्मक परीक्षा देण्याबाबत मागदर्शन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुत्रंसचलन पी जी पाटील यांनी केले.शेवटी आभार डी बी पाटील यांनी मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.
वाकडी येथे बसस्थानक परिसरासह अवैध धंदे दारुचा व सट्टाचा महापूर
====================वाकडी.ता.जामनेर.दि.०३/०२/२६ वाकडी बसस्थानक सह परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारुचा महापूर सुरू असून यात अनेकांचे संसार उद्धवस्त झाले,बसस्थानक परिसरात खुले आम अवैधधंदे बोकाळाले असतांनाही या दारु विक्रेत्यांवर पोलीसांकडून कुठलेही कार्यवाही होत नसल्याने गावातील नागरिक ञस्त झाले आहे, महिला वर्ग शालेय विध्यार्थी हैराण झाले आहे गावात गेल्या अनेक दिवसांपासून गावांच्या चारही बाजूंनी अवैध दारुची खुलेआम विक्री होत असून यात अनेक जवान तरुण व्यसनाच्या आहारी गेले आहे , मुली-बाळीचे संसार उद्धवस्त होत आहे, बराच मुली विधवा झाल्या आहेत, त्याचे संसार उघड्यावर पडले आहे नवीन निवडुन आलेल्या सरपंच व सभासदांना च्या वतीने गावातील दारू बंद व्हावी यासाठी पहूर पोलिस ठाणे येथे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लेखी ठराव दिला, काही वेळा पुरती वाकडी येथील दारुवाल्याचे धाबे दणाणले होते, परंतु पुन्हा देशी दारूचा महापूर बसस्थानक परिसरात चालू आहे,त्याच्यावर कोण्याच्याही लगाम नाही, किंवा दचक नाही, बसस्थानक परिसरात देशी, इंग्लिश,गावठी, दारूचा महापूर चालू आहे, दारू विक्रेत्यांवर पोलीसांच्या वचक दिसून येत नाही असे गावकरी मधून चर्चा करताना दिसत आहेत ,अवैध दारू विक्रेत्यांनी धुमाकूळ घातला आहे त्यावर वरिष्ठ स्तरांवर कार्यवाही अशी मागणी गावकरी करीत आहेत.


