मा. ना. श्री. गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत भव्य रोगनिदान व शस्त्रक्रिया शिबिर

जामनेर :(प्रतिनिधी) जामनेर तालुक्याचे भाग्यविधाता म्हणून ओळखले जाणारे मा. ना. श्री. गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त कमल फाउंडेशन, जामनेर यांच्या वतीने भव्य मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार दि. 17 मे 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत एकलव्य माध्यमिक विद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज नगर, जळगाव रोड, जामनेर येथे पार पडणार आहे.या शिबिरात विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कॅन्सर, हृदयरोग, हाडांचे विकार, मूत्ररोग, न्यूरोसर्जरी, जनरल सर्जरी, बालरोग, स्त्रीरोग, नेत्र तपासणी आदी विभागातील नामांकित तज्ज्ञ डॉक्टर नागरिकांची तपासणी करणार आहेत.शिबिरात डॉ. निलेश चांडक, डॉ. प्रितेश कोठारी, डॉ. मनोज पाटील, डॉ. मनोज टोके, डॉ. टी. पी. महाजन, डॉ. सचिन साठे, डॉ. भूषण पाटील, डॉ. निखिल पाटील, डॉ. रविंद्र सुखक्कर, डॉ. अभिनव नाईक, डॉ. मृण्णा सोमाणी, डॉ. सौरभ पाटील, डॉ. सतीष चौधरी, डॉ. नेहा काबरा, डॉ. गिरधारी जेधे तसेच डॉ. पांडुरंग अल्टाट यांसारखे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.शिबिरासाठी येताना नागरिकांनी आपले जुने वैद्यकीय रिपोर्ट सोबत आणावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.या उपक्रमास कमल हॉस्पिटल व मॅटर्निटी होम, जामनेर यांचे सहकार्य लाभले असून भारतीय जनता पार्टी, जामनेर यांचे विशेष सहकार्य आहे. आयोजनाची जबाबदारी कमल फाउंडेशन, जामनेर यांनी स्वीकारली आहे.

Read More

निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार एस.एस.सी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

पळसखेडे मिराचे, प्रतिनिधी : धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी, शेंदुर्णी संचलित निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालय, पळसखेडे मिराचे येथे फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेत सेमी व मराठी माध्यमातून प्रथम पाच क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज दि. 9 मे रोजी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री व्ही. आर. पाटील सर प्रमुख उपस्थित होते. तसेच इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक श्री व्ही. डी. पाटील सर, श्री जी. पी. पाटील सर, श्री पी. के. राजपूत सर, श्री व्ही. ए. पाटील सर, सीनियर क्लार्क श्री के. आर. सोनवणे भाऊसाहेब तसेच ग्रंथपाल श्री डी. एस. बोरसे सर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. यावेळी विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी मुख्याध्यापक आदरणीय नानासाहेब यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत यशाची परंपरा कायम राखण्यासाठी मेहनत, सातत्य व शिस्त यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते.

Read More

जिकरा न्यू उर्दू विद्यालयाचा दहावीला 98.40 टक्के निकालकु. मिसबाह शेख विद्यालयात प्रथम; यशाबद्दल सर्वत्र कौतुक

जामनेर, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात जिकरा एज्युकेशन सोसायटी संचलित जिकरा न्यू उर्दू माध्यमिक विद्यालय, जामनेर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयाचा एकूण निकाल 98.40 टक्के लागल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परीक्षेत कु. मिसबाह आसिफ शेख हिने 84.80 टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला. कु. अहेनिश नईम खान हिने 83.40 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर मोहम्मद अकदस निसार अहमद यांनी 83.20 टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक संपादन केला. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रहीम शेख तसेच सचिव जाकीर शेख यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे प्राचार्य इरशाद खान सर व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन करून त्यांच्या यशात मोलाचा वाटा उचलला. तसेच संस्थेच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला असून परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Read More

गरुड विद्यालयाची एसएससी परीक्षेत गरुड झेपशेंदुर्णी ता.जामनेर प्रतिनिधीविद्यालयाची गौरी शिनकर तालुक्यातून द्वितीय,सेमी विभागाचे प्रथम पाच विद्यार्थी शेंदुर्णी केंद्रातून प्रथम

शेंदुर्णी, प्रतिनिधी : धी. शेंदुर्णी से. एज्युकेशन को-ऑप. सोसायटी संचलित आ.ग.र. गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, शेंदुर्णी येथील एसएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विद्यालयाने 94.90 टक्के इतका उल्लेखनीय निकाल मिळविला आहे. विशेष म्हणजे सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विद्यालयातून एकूण 471 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 447 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षेत 201 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य संपादन केले असून 34 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. सेमी माध्यमातून कु. गौरी गोपाल शिनकर हिने 97 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला. कु. मानसी अमोल पाटील व कु. गौरी संजय आगे यांनी प्रत्येकी 96.40 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. कु. स्नेहल दगडू घनघाव हिने 96 टक्के गुणांसह तृतीय, कु. वैष्णवी मोहन पाटील हिने 95.60 टक्के गुणांसह चतुर्थ तर चि. दर्शन मनोज कापुरे याने 94.80 टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला. मराठी माध्यमातून चि. हितेश दीपचंद जाधव याने 90.20 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला. कु. खुशी सुनील डांबरे हिने 89.60 टक्के गुणांसह द्वितीय, कु. मयुरी गणेश पाटील हिने 89 टक्के गुणांसह तृतीय, कु. हर्षाली अमर सूर्यवंशी हिने 87 टक्के गुणांसह चतुर्थ तर कु. चेतना हिम्मत मोहने हिने 86.60 टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजयरावजी गरुड, व्हॉइस चेअरमन आबासो भीमराव शेळके, सचिव काकासो सागरमलजी जैन, सहसचिव दादासो यू.यू. पाटील, कार्यालयीन सचिव भाऊसो दीपकजी गरुड, वस्तीगृह सचिव गो.गो. सूर्यवंशी, महिला संचालिका ताईसो उज्वला काशीद तसेच सर्व संचालक मंडळ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती पी.एस. पाटील, उपप्राचार्य बी.एम. कुमावत, पर्यवेक्षक जे.एस. जुबंळे, विनोद पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Read More

जामनेरात स्विमिंग पुलाच्या आउटलेट असलेल्या चेंबर मध्ये ५ वर्षाच्या मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू.दर्शनपार्क व एकुलती गावावर शोककळा.

जामनेर (प्रतिनिधी):- येथील सोनेश्वर मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या स्विमिंग पुलाच्या आउटलेट असलेल्या हौदात ५ वर्ष वय असलेल्या कार्तिक ऊर्फ उत्कर्ष गणेश पाटील या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दी.३ रोजी संध्याकाळी ठीक ५ ते ६ वाजेच्या सुमारास घडली आहे.त्याचे सविस्तर असे की, मूळचे एकुलती येथील रहिवाशी व हल्ली दर्शन पार्क येथे स्थाईक असलेले व संजय दादा गरूड यांच्या संस्थेत तोंडापूर येथे क्लार्क म्हणून कार्यरत असलेले गणेश पाटील हे आपल्या ५ वर्षाच्या कार्तिक व आपल्या मुलीसह स्विमिंग पुलात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेले होते. संध्याकाळी पोहण्याचा आनंद घेतल्या नंतर ते ओले झालेले कपडे बदलवण्यासाठी आपल्या मुलांना घेऊन रूम मध्ये गेले होते. मात्र कार्तिक हा त्यांची नजर चुकवून आउटलेटचे वाहते पाणी बघून त्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी पुढे पुढे जात आउटलेटचे पाणी ज्या ठिकाणी जमा होते. त्या चेंबर पर्यन्त गेला असता त्याचा चेंबर मध्ये तोल जाऊन तो चेंबर मध्ये असलेल्या पाण्यात बुडाल्याची माहिती स्थानिक रहिवाश्यांनी दिली असून एक मिनिटही न सोडणाऱ्या गणेश पाटील व त्यांच्या फॅमिलिवर मात्र कार्तिकच्या जाण्याने वज्रघात झाला आहे. या ठिकाणी घडलेल्या घटनेची चर्चा होताच कार्तिकला शोधण्यासाठी बरेच लोक स्विमिंग पुलाच्या पाण्यात उतरून शोध घेत होते. मात्र आउटलेटच्या पाण्याकडे कोणाचेही लक्ष न गेल्याने कार्तिकला शोधायला बराच वेळ लागला त्यामुळे त्याला जीवदान देता आले नाही. अशी खंत उपस्थित शोध कार्य करणाऱ्या लोकांनी व्यक्त केली आहे. तरीही त्याठिकाणी सुरक्षितता म्हणून ज्या ठेकेदाराला कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. त्यांचे ट्रेनर वा सिक्युरिटी गार्ड त्या ठिकाणी नसल्याची चर्चा शहरात होतांना दिसून येत आहे. कदाचीत त्यामुळे कार्तिक चा जीव वाचवता आला असता अशी खंत व्यक्त करतांना जामनेर नागरीक दिसून येत आहे.कार्तिक च्या पच्च्यात आई, वडील, काका, आजी, आजोबा, काका,काकू आणि ११ वर्षाची बहीण असा परिवार आहे.

Read More

अटलांटा प्रकरण मुख्यमंत्र्यांचे फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश

जळगाव (नितीन सोनवणे) : मुंबईतील वर्षा बंगला येथे आज सायंकाळी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत जळगाव महानगरपालिकेशी संबंधित अटलांटा कन्स्ट्रक्शन प्रकरणाला निर्णायक वळण मिळाले.जळगाव शहर पोलीस ठाण्यात अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध नगरसेवक अरविंद देशमुख यांनी यापूर्वीच फौजदारी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत महापालिकेची आर्थिक फसवणूक, विश्वासघात आणि कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.आज या पार्श्वभूमीवर नामदार गिरीश महाजन आमदार राजू मामा भोळे, नंदू आडवाणी, मनोज काळे आणि तक्रारदार नगरसेवक अरविंद देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत अरविंद देशमुख यांनी स्वतः दाखल केलेल्या तक्रारीचा सविस्तर संदर्भ मांडत प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट केली.मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण बाब गांभीर्याने ऐकून घेतल्यानंतर तात्काळ दखल घेत जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढोरे यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधत सरकारी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले, अशी माहिती समोर आली आहे.या आदेशामुळे अटलांटा प्रकरणातील तपास प्रक्रियेला अधिकृत गती मिळणार असून, महापालिका प्रशासनाकडून थेट कारवाई होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, आधीच नगरसेवक अरविंद देशमुख यांनी दाखल केलेल्या तक्रारीमुळे या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित झाली होती; आता त्याच संदर्भावर शासनस्तरावरून ठोस पाऊल उचलले गेल्याने दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.जळगाव शहरात या घडामोडीमुळे मोठी राजकीय व प्रशासकीय हालचाल निर्माण झाली असून, संपूर्ण प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read More

सकल मराठा समाज बैठक जामनेर येथे उत्साहात पार पडली

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर प्रतिनिधीजामनेर येथे सकल मराठा समाजाची महत्वाची बैठक उत्साहात व संघटनात्मक वातावरणात पार पडली. आगामी राज्यव्यापी कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर समाजबांधवांना संघटित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.राजमाता जिजाऊ यांच्या माहेरचे वंशज शिवाजी राजे जाधव यांचे मार्गदर्शनशिवाजी राजे जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनात राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज अधोरेखित केली.राजमाता जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेडराजा ते स्मृतीस्थळ पाचाड (रायगड) या जिजाऊ अभिवादन यात्रेत जामनेर तालुक्यातून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले. ही यात्रा केवळ श्रद्धेची नसून मराठा समाजाच्या एकतेचे व विचारप्रसाराचे प्रभावी माध्यम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. अशोक शिंदे यांचे विचारअशोक शिंदे यांनी आपल्या भाषणात मराठा समाजाने आपल्या गौरवशाली इतिहासाची जाणीव कायम ठेवावी, असे आवाहन केले.राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांवर आधारित संघटनात्मक कार्य उभारणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.छत्रपती शिवाजी ब्रिगेड अन्यायाविरुद्ध ठामपणे आवाज उठवत असून समाजाच्या प्रत्येक प्रश्नात सक्रियपणे हस्तक्षेप करत आहे. समाजातील एकोपा वाढवून न्यायासाठी लढण्याची भूमिका अधिक मजबूत करण्याचे त्यांनी आवाहन केले. अध्यक्षीय भाषण – प्रकाश पाटीलकार्यक्रमाचे अध्यक्ष भाग्योदय कलेक्शनचे श्री. प्रकाश पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठा समाजातील तरुणांना उद्योग-व्यवसाय क्षेत्रात पुढे येण्याचे आवाहन केले.छोटा असो वा मोठा व्यवसाय, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक तरुण उद्योजकाच्या पाठीशी संपूर्ण मराठा समाज ठामपणे उभा आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक – राहुल चव्हाणकार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल चव्हाण यांनी केले.त्यांनी सांगितले की, १४ जून ते १७ जून दरम्यान होणाऱ्या जिजाऊ अभिवादन यात्रेसाठी ग्रामपातळीवर बैठका आयोजित करून मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. मागील तीन वर्षांपासून आपण यात्रेत सहभागी होत आहोत, मात्र यंदा विक्रमी सहभाग नोंदवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. इतर मान्यवरांची उपस्थितीया बैठकीस अशोक आप्पा जाधव, समाधान वाघ, सुपडू पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.बैठकीत दिलीप खोडपे सर, व्ही.पी. पाटील सर, पप्पू पाटील, कैलास पाटील, ईश्वर पवार, अशोक पाटील, दिलीप पाटील, ईश्वर चवरे, रवि बंडे, सागर पाटील, दिपक पाटील, राहुलरॉय मुळे, सागर मराठे यांच्यासह असंख्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनकार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल ठोंबरे यांनी केले.या बैठकीतून मराठा समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी ठोस दिशा देण्यात आली असून, आगामी जिजाऊ अभिवादन यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात जनसहभाग घडवून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Read More

“महिला सन्मानाच्या मुद्द्यावर दिल्लीत निर्धाराचा एल्गार; रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत महिला प्रतिनिधींची प्रभावी एकजूट” Strap – महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ संसद ते रस्त्यापर्यंत आवाज बुलंद; देशभरातील महिला खासदार व कार्यकर्त्यांचा व्यापक सहभाग

नवी दिल्ली, 18 April 2026 महिला सक्षमीकरण आणि राजकीय प्रतिनिधित्वाच्या प्रश्नावर राजधानी दिल्लीमध्ये महिला लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र येत प्रभावी उपस्थिती नोंदवली. महिला आरक्षणाशी संबंधित विषयावर व्यापक जनजागृती घडवून आणण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. या आंदोलनात विविध स्तरांवरील महिला नेतृत्वाने सहभाग नोंदवला. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, महाराष्ट्रातील मंत्री मेघना बोर्डीकर, तसेच भाजप नेत्या बांसुरी स्वराज यांच्यासह अनेक महिला खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या उपस्थितीमुळे हा उपक्रम केवळ राजकीय कार्यक्रम न राहता महिला सक्षमीकरणाच्या व्यापक सामाजिक अभिव्यक्तीमध्ये परिवर्तित झाला. महिला प्रतिनिधींनी शांततापूर्ण पद्धतीने मोर्चा काढत आपली भूमिका मांडली. हा मोर्चा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानाच्या दिशेने नेण्यात आला होता. महिला आरक्षणाशी संबंधित घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या दरम्यान मोठ्या प्रमाणावर महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत महिलांच्या प्रतिनिधित्वाच्या प्रश्नाला प्राधान्य देण्याची मागणी केली. घटनाक्रमादरम्यान काही ठिकाणी परिस्थिती नियंत्रित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून आवश्यक ती पावले उचलण्यात आली. सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखत परिस्थिती हाताळण्यात आली. काही महिला प्रतिनिधींना तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेण्यात आले तसेच जमाव पांगवण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करण्यात आला. या आंदोलनादरम्यान काही ठिकाणी प्रतिकात्मक स्वरूपात निषेध नोंदवण्यासाठी फलक, पोस्टर्स तसेच पुतळा दहनासारख्या माध्यमांचा वापर करण्यात आला. महिला प्रतिनिधींनी या माध्यमातून महिलांच्या अधिकारांबाबतचा मुद्दा ठळकपणे मांडला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले की,“महिलांचे सक्षमीकरण हा राष्ट्राच्या प्रगतीचा आधारस्तंभ आहे. महिलांना निर्णयप्रक्रियेत अधिकाधिक स्थान मिळणे आवश्यक आहे. हा विषय कोणत्याही राजकीय सीमांपलीकडचा असून, देशातील प्रत्येक महिलेला समान संधी मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.” त्याचप्रमाणे उपस्थित महिला नेतृत्वानेही महिला आरक्षणाचा मुद्दा व्यापक दृष्टीकोनातून पाहण्याची आवश्यकता अधोरेखित केली. महिलांना राजकीय आणि धोरणात्मक स्तरावर अधिक प्रभावी भूमिका मिळावी, यासाठी सर्व घटकांनी सकारात्मक सहकार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. लोकसभेत महिला आरक्षणाशी संबंधित घटनाक्रमानंतर हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर पुन्हा चर्चेत आला असून, महिलांच्या प्रतिनिधित्वाच्या प्रश्नाला अधिक गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सुरू झालेली ही व्यापक जनचळवळ आगामी काळात अधिक विस्तारेल आणि महिलांच्या सहभागाला नवे आयाम देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Read More

जामनेर -भारतीय जैन संघटनेची व्यापारी सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर प्रतिनिधीजामनेर येथील व्यपाऱ्यांना उद्योग-व्यवसायात अधिक सक्षम बनविण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या व व्यापारी एसोसिएशन यांच्या वतीने विशेष कार्यशाळेचे येथील महावीर भवन मध्ये आयोजन करण्यात आले.खानदेशात तळोदा,शहादा,शिरपूर, धुळे,शिंदखेडा, पाचोरा , जळगांव या सात ठिकाणी कार्यशाळा होऊन जामनेर येथील ही 8 वी कार्यशाळा असून, राज्य अध्यक्ष केतन शहा, राज्य महासचिव प्रवीण पारख यांच्या मार्गदर्शनाने व उपाध्यक्ष विनय पारख, खानदेश विभाग अध्यक्ष प्रा.चंद्रकांत डागा यांच्या प्रयत्नाने केले गेले असल्याचे विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत यांनी सांगितले.कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक म्हणून सुनील भवरीलालजी गादीया यानी सहकार्य केले.या कार्यशाळेत उद्योजकतेसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सखोल माहिती देण्यात आली.कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून निरंजन जैन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी उद्योग-व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांची माहिती, त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया, तसेच कर्जासाठी लागणारी सिक्युरिटी (हमी) याबाबत सविस्तर विवेचन केले. योजनांमध्ये आवश्यकता नसते, तर काही योजना मर्यादित सिक्युरिटी घेतली जाते, माहिती त्यांनी दिली. या सेमिनारला ओसवाल जैन संघचे सचिव ईश्वरलालजी साबद्रा,पारसनाथ देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष प्रकाश सैतवाल,व्यापारी एसोसिएशन व किराना अध्यक्ष ताराचंद झांवर, उपाध्यक्ष पुखराज डांगी, एमआयडीसी अध्यक्ष सुभाष बोहरा, अड़त अध्यक्ष प्रकाश कोठारी,कृषि अध्यक्ष प्रदीप लोढ़ा, डॉक्टर्स अध्यक्ष डॉ कांतिलाल ओस्तवाल,मेडिकल अध्यक्ष पंढरी पाटिल,कपड़े व्यापारी अध्यक्ष संजय चिंचकर,सीए उपाध्यक्ष अनिल मुनोत कार्यशाळेला उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज़िला उपाध्यक्ष विकास कोठारी, जामनेर शहर अध्यक्ष कुशल बोहरा, उपाध्यक्ष अभिनंदन जैन,सदस्य विकास ललवानी,मयूर पोरवाल,संजय ललवानी,कुणाल चंडालिया,महिला सदस्य मनीषा कोठारी,वंदना चोरड़िया , भाग्यश्री लुंकड आदि सदस्यंनी प्रयत्न केले.कार्यशाळेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांना शासकीय योजनांविषयी स्पष्ट व उपयुक्त माहिती मिळाली असून,भविष्यात उद्योग वृद्धीसाठी या मार्गदर्शनाचा मोठा फायदा होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.सूत्र संचालन वंदना चोरड़िया आणि आभार प्रदर्शन डॉ कांतिलाल ओस्तवाल यानी केले.

Read More

सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीतील विद्यार्थिनीवर अत्याचार; संतप्त ग्रामस्थांनी मास्तरला दिला चोप

सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीतील विद्यार्थिनीवर अत्याचार; संतप्त ग्रामस्थांनी मास्तरला दिला चोप 🌷जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर 🌷 दिनांक ,:6/04/2026 रोजि बुलढाणा जिल्ह्यातील लोणी गवळी गावातील एका प्राथमिक शाळेत असा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला. आहे एका 58 वर्षीय नराधमाने तिसरी मध्ये शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला त्यानंतर, गावकऱ्यांनी संबंधित शिक्षकाला चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील लोणी गवळी गावातील प्राथमिक शाळेत तिसरीत शिकणाऱ्या एका नऊ वर्षीय विद्यार्थिनीसोबत 58 वर्षीय शिक्षकाने लैंगिक अत्याचार केला. सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. घटना गावातील नागरिकांना माहीत पडताच शेकडोंचा जमाव शाळेवर चालून गेला. गावातील नागरिक आणि महिलांनी या शिक्षकाला चांगलाच चोप देत . तात्काळ या घटनेची माहिती डोनगाव पोलिसांना देण्यात आली त्यानंतर नराधम आरोपी शिक्षक महादेव आत्माराम मानतोडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, गावकरी पोलिसांना या शिक्षकाला घेऊन जाण्यास नकार करत होते व गेल्या तीन तासांपासून शाळेत तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, शेवटी पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत काढत या आरोपी शिक्षकाला डोनगाव पोलीस स्थानकात आणले आहे, सध्या गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे हा नराधम शिक्षक येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहे. सेवानिवृत्तीला अवघा दीड महिना बाकी असताना आणि वयोवृद्ध असतानाही नराधम शिक्षकाने शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा फासण्याचं काम केलंय. सध्या जानेफळ पोलीस स्थानकाच्या बाहेर मोठी गर्दी असून शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!