Maharashtra
जामनेर येथून आरोपीस अटक – बेटावद खुर्द (ता. जामनेर) येथे केली होती घरफोडी
जे.बी.एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजळगाव: बेटावद खुर्द (ता. जामनेर) येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी समीर उर्फ बाल्या याला जामनेर येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले असून, पोलिस प्रशासनाने पुन्हा एकदा सिद्ध केले की, कायद्यापासून कोणीही सुटू शकत नाही. दि. ८ फेब्रुवारी २०२५ रोजी बेटावद खुर्द (ता. जामनेर) येथे घरफोडीची घटना घडली होती. अज्ञात व्यक्तीने एका बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू लंपास केल्या होत्या. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस क्रमांक ६०/२०२५, भादंवि कलम ३०५ , 331 (४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. गुप्त माहितीवरून जामनेरमध्ये अटक: गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता, आरोपी जामनेर येथे लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामनेर येथे सापळा रचून आरोपीला अटक केली. पोलीस प्रशासनाची जलद कारवाई: 🔹 घरफोडीप्रकरणी तपास सुरू असताना, आरोपी जामनेर येथे असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.🔹 स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.🔹 बेटावद खुर्द (ता. जामनेर) येथील घरफोडी प्रकरणातील हा मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हेगारांवर वचक निर्माण करणारी पोलीस यंत्रणा या यशस्वी कारवाईमुळे पोलिस प्रशासनाने दाखवून दिले की, गुन्हेगार कितीही लपण्याचा प्रयत्न करत असले तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाहीत. पोलिसांच्या या त्वरित हालचालीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष योगदान: या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक डोमाळे , पो.हे.का विनोद पाटील , पो.ना रणजीत जाधव, पो.का ईश्वर पाटील, पो.का राहुल महाजन तसेच जामनेर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या उत्कृष्ट समन्वयामुळे आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली. पोलिसांचा नागरिकांना संदेश: ➡ कोणतीही संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.➡ गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.➡ घरफोडी, चोरी यासारख्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क आहे. गावकऱ्यांकडून पोलिसांचे कौतुक: या जलद कारवाईमुळे बेटावद खुर्द (ता. जामनेर) आणि जामनेर परिसरातील नागरिकांनी जळगाव पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे भविष्यात अशा कठोर कारवाया सुरूच राहाव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ➡ “कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
जामनेर बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांचा दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्रांवर डल्ला..
जामनेर,दि.17. प्रतिनिधी~ जामनेरहून भुसावळ ला जाणाऱ्या बस मध्ये चढणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मंगळसूत्र लंपास केल्याची घटना घडली असून जामनेर बस स्थानक परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे पोलीस प्रशासनाने नियमित पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांतून केल्या जात आहे.∆सविस्तर वृत्त असे की,आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास जामनेर बस स्थानकात पुणे~भुसावळ बस क्र.MH.20,BL.4020 उभी होती आणि या ठिकाणी जामनेर हून कुऱ्हा(पानाचे) येथे जाण्यासाठी उभ्या असलेल्या जयश्री पाटील व प्रतिभा तायडे या दोन महिला बस मध्ये गर्दीत चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केले.चोरी झाल्याचा प्रकार लक्षात येताच या दोन्ही महिलांनी बस मधील प्रवाशांची ड्रायव्हर , कंडक्टर यांना झडती घ्यायला सांगितले.परंतु काहीही मिळून आले नाही.या दोन्ही महिलांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठत घडलेला प्रकार सांगितला.दोन्ही महिलांच्या फिर्यादी वरून जामनेर पोलीसात अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.राज्य सरकारने महिलांना एस.टी. प्रवास भाड्यात सवलत दिल्याने दिवसा गणिक एस.टी.ने प्रवास करणाऱ्यात महिला प्रवाशांची संख्या वाढत आहे.राज्यातील प्रत्येक बस स्थानका वर बसने प्रवास करणाऱ्या पुरुषां पेक्षा महिलांची अधिक गर्दी पाहायला मिळत आहे.सध्या लग्न सराई चे दिवस असून प्रत्येक बस स्थानकात प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे,या गर्दीचा फायदा घेत चोरीच्या घटना घडत आहेत.जामनेर बस स्थानकावर देखील प्रवाश्यांची दररोज गर्दी पाहायला मिळत आहे.गेल्या काही दिवसां पासून या बस स्थानकावर चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दर दिवसाआड येथे चोरीच्या घटना घडत आहेत.कुणाचा खिसा कापला जातो,तर कुणाची बॅग लंपास तर कुणाच्या गळ्यातील मंगळसूत्र,चैन,कानातील दागिन्यांवर चोरटे बिनधास्त डल्ला मारत असतात.सध्या बाजारपेठेत सोन्याचे दर हे दिवसागणिक गगनाला भिडत असून सर्वसामान्यांना आजघडीला सोने खरेदी करणे अवक्या बाहेरची बाब असतांना चोरट्यांची मात्र या चोरी सत्रामुळे चांगलीच चांदी होत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.काही वर्षांपूर्वी जुने बस स्थानक असताना या बस स्थानक परिसरात होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण रोखण्यासाठी स्वतंत्र पोलीस चौकी कार्यरत होती.मात्र नवीन बस स्थानक झाल्या नंतर या ठिकाणी एखादा पोलीस कर्मचारी देखील कार्यरत नसल्याने चोरट्यांचे चांगलेच फावले आहे.चोऱ्यांचे प्रमाण रोखण्यासाठी जामनेर पोलीस स्टेशनच्या वतीने या बस स्थानकावर नियमित दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून केल्या जात आहे.
लोहारा येथे मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न.विजेते र्धकांना रोख बक्षिसे, ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
लोहारा ता.पाचोरामहात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्ताने समता,बंधुता,सदाचार व शांतीचा संदेश देण्यासाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन दादाश्री विश्व लॉन्स डॉ जे जी पंडित माध्यमिक विद्यालय पाचोरा रोड लोहारा येथे आयोजित करण्यात आले होते. रेबीन कापून स्पर्धेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. खुला गट वय १६ ते ४०रन अप ६ किलोमीटर, प्रथम बक्षीस दीपक भोई शेंदुर्णी, द्वितीय क्रमांक बक्षीस गोपाल कोळी ,तृतीय क्रमांक सौरव राजपूत, तीन किलोमीटर खुल्या गटात प्रथम बक्षीस सुरज माळी शाहपुरा द्वितीय बक्षीस हर्षल भोई शेंदुर्णी तृतीय बक्षीस कराड नवघरे शेंदुर्णी 200 मीटर स्पर्धेत शालेय मुलांच्या गटात प्रथम बक्षीस प्रथमेश धोबी लोहारा, द्वितीय बक्षीस प्रितेश कुंभार लोहारा तृतीय बक्षीस भूषण मीना कासमपुरा 200 मीटर मुलींच्या गटात प्रथम बक्षीस निहार राजपूत कासमपुरा,द्वितीय बक्षीस मोनाली कोळी लोहारा ,तृतीय बक्षीस डिंपल थोरात कासमपुरा. 100 मीटर शालेय मुलींच्या गटात प्रथम बक्षीस दुर्गेश्वरी परदेशी कासमपुरा,द्वितीय बक्षीस खुशी गोंधळे लोहारा ,तृतीय बक्षीस विशाखा खाटीक लोहारा. 100 मीटर शालेय गट मुलांचा प्रथम बक्षीस आसिफ पिंजारी लोहारा,द्वितीय बक्षिस मोहन कोळी लोहारा, तृतीय बक्षीस सार्थक चौधरी लोहारा, या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी यशोदाबेन मोदी कृषीभूषण कृषीरत्न विश्वासराव पाटील, ,डॉ सागर गरुड,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, सरपंच अक्षय जैस्वाल, डॉ प्रितेश चौधरी,विकासो चेअरमन प्रभाकर चौधरी, माजी सरपंच अमृत चौधरी, माजी मुख्याध्यापक अ अ पटेल, ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण माळी, भोसंडे गुरुजी, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर देशमुख, सुरेश चौधरी, पत्रकार दीपक पवार, रमेश शेळके, चंद्रकांत पाटील, दिलीप चौधरी, ज्ञानेश्वर राजपूत, गजानन क्षीरसागर, अनिल तडवी, उपस्थित होते. स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून तडवी सर,धोनी सर,गायकवाड सर, गुजर सर, पी .एम.सुर्वे सर यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी उमेश देशमुख,नंदू सुर्वे,हितेश पालीवाल,रमेश कोळी,नाना चौधरी,गुणवंत सरोदे,सुनील बाविस्कर,भूषण शिवदे, यांनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम कलाल यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन भाजपाचे जेष्ठ नेते शरद सोनार,ईश्वर देशमुख, सुरेश चौधरी,जनजागृती बहुउद्देशीय संस्था लोहारा यांनी केले होते.
अलवर (राजस्थान) येथे आयोजित खासदार क्रीडा महोत्सवास; केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित..
अलवर (राजस्थान) येथे स्थानिक लोकसभा खासदार व केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री श्री. भूपेंद्र यादव जी यांच्या मार्फत आयोजित “खासदार क्रीडा महोत्सव” कार्यक्रमास आज केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्या. यावेळी त्यांनी स्पर्धक व उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, अलवर खासदार क्रीडा महोत्सव ही केवळ क्रीडा स्पर्धा नाही, तर युवाशक्तीचा उत्साह, खिलाडूवृत्ती आणि निरोगी भारताच्या निर्धाराचे प्रतीक आहे. पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी जी यांच्या ‘खेलो इंडिया’ आणि ‘फिट इंडिया’ मोहिमेला पुढे नेण्यासाठी क्रीडा महाकुंभ हे एक सशक्त माध्यम आहे. युवा खेळाडूंचा उत्साह, परिश्रम आणि संघर्ष पाहून मला पूर्ण विश्वास वाटला की भारताचे भविष्य क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील कलागुणांना पुढे येण्याची मोठी संधी मिळत आहे असे उद्गार त्यांनी काढले. या भव्य कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी यावेळी स्थानिक खासदार व केंद्रीय मंत्री श्री. भूपेंद्र यादव जी यांचे यावेळी अभिनंदन करून सर्व सहभागी स्पर्धकांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
रेल्वे अपघातात जवानाचा दुर्दैवी मृत्यू ,मूळ गावी दोंदवाडे (ता. जामनेर, जि. जळगाव) येथे शासकीय इतमामात अंत्यविधी पार पडला
प्रतिनिधी श्रीरामपूर – भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले वीर जवान गणर जयवंत दिलीप परदेशी (आर्मी क्रमांक- 21022154X) यांचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना 16 जानेवारी 2025 रोजी रात्री 8.00 वाजता घडली. जयवंत परदेशी हे श्रीरामपूर येथे आपल्या आजी-आजोबांच्या भेटीसाठी आले असताना अचानक समोरून येणाऱ्या गाडीची धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची नोंद घेतली. जवानाचे पार्थिव शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, श्रीरामपूर येथे पाठवण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर भारतीय सैन्यदलाने त्यांच्या पार्थिवाला सन्मानपूर्वक त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले. गणर जयवंत दिलीप परदेशी हे कलकत्ता येथे सैन्यदलात कार्यरत होते. सुट्टीसाठी श्रीरामपूर येथे आले असताना रेल्वे अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 7.15 वाजता त्यांच्या मूळ गावी दोंदवाडे (ता. जामनेर, जि. जळगाव) येथे शासकीय इतमामात आणि चालीरीतीनुसार अंत्यविधी पार पडला. त्यानंतर आज 25 जानेवारी 2025 रोजी दशक्रिया विधी कार्यक्रम संपन्न झाला असून तेरवीचा बछडीचा कार्यक्रम मंगळवार, 22 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. घटनेनंतर नामदार गिरीश महाजन यांच्या पत्नी साधनाताई महाजन यांनी कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि कुटुंबाला धीर दिला. वीर जवान जयवंत दिलीप परदेशी हे कुटुंबातील एकमेव कमावते होते. त्यांच्या पश्चात आई-वडील व एक बहीण असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली असून कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन
जामनेर विधानसभा मतदार संघात आज राष्ट्रीय मतदार दिवस अनुषंगाने आज कार्यक्रम घेण्यात येऊन उपस्थित मतदारांना शपथ देण्यात आली.तसेच मतदार यादी पुनरीक्षण कामकाज उत्कृष्टपणे पूर्ण केल्याबद्दल मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. मतदार यादी पुनरिक्षण कामकाज उत्कृष्ट केलेबद्दल खालील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना गौरविण्यात आले आहे. यादी भाग – १ सुरेश वामन गोपाळयादी भाग – ५० विलास देवलाल तागवालेयादी भाग – ६८ विजय सुकराम कोळीयादी भाग – ८१ शेख बिलाल शेख अहमदयादी भाग -१०६ राजूसिंग पंचमसिंग चौधरीयादी भाग -११३ समाधान मारोती किरोतेयादी भाग -१८५ साजिद अहमद अ.रशीदयादी भाग -२०२ मुकुंद भगवान वारंगेयादी भाग – २५८ संजीव त्र्यंबक बारीयादी भाग – ३३४ संतोष तुळशीराम वरखड
