
headline

जामनेर – भारतीय जैन संघटना जामनेर शाखा याच्या तर्फे पितृ दिवस निमित्त
दि.15 जूनला पितृ दिवस निमित्त“यु डोन्ट नो माय डैड”*[“तुम मेरे पापा को नही जानते”] वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते।वक्तृत्व स्पर्धामधे 30 स्पर्धकानी सहभाग घेतला होता आणिसर्वानी प्रेम आणि उत्साहात आपापल्या वडिलांच्या बाबतीत काही कटु कही गोड अनुभव सर्वांसमोर मांडले।स्पर्धेचे निकाल दोन सन्माननीय अतिथी डॉ. पराग पाटील एवं राजुलजी शाह यांनी काढले। त्यांचा पण सत्कार आणि सन्मान केला गेला।या कार्यक्रमाचे प्रायोजक स्व.रतनलालजी मुलचंदजी कोठारी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री इन्दरचंदजी रूपेशकुमारजी कोठारी परिवार,जामनेर यानी केले होते।या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट हेड विकास कोठारी, कुशल बोहरा,सौ.मोना चोरडिया,सौ मनीषा कोठारी यांनी कार्यक्रमात पूर्ण योगदान दिले।स्पर्धेचे विजयी सदस्याना प्रथम पुरस्कार ₹500 द्वितीय पुरस्कार ₹300 तृतीय पुरस्कार ₹200 याप्रमाने तीन्ही गृप मधे वितरित केले।सर्व विजयी प्रतिस्पर्धी चे नाव खालील प्रमाणे आहेग्रुप 1

छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिरास जिल्हाधिकारी यांची उपस्थिती
नेरी दिगर (ता. जामनेर) | दिनांक ०४ जून २०२५ रोजी महसूल मंडळ नेरी अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर ग्रामपंचायत नेरी दिगर येथील महादेव मंदिर सभामंडपात मोठ्या उत्साहात व व्यापक जनसहभागातून संपन्न झाले. या शिबिरात विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून जळगाव जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल, उपविभागीय अधिकारी श्री विनय गोसावी यांच्यासह सर्व विभागांचे तालुका प्रमुख उपस्थित होते. शिबिराची सुरुवात उपविभागीय अधिकारी श्री विनय गोसावी यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी शिबिराच्या उद्दिष्टांबाबत सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी नागरिकांसमोर आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “राजस्व समाधान शिबिरे ही सेवा पुरवठ्यापेक्षा अधिक असून, शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा सशक्त करण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे.” मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांनी अशा शिबिरांच्या फलश्रुतीवर भर देत सांगितले की, “ग्रामस्तरावर अशा उपक्रमांमुळे योजनांची अंमलबजावणी कृतीशीलपणे होते व लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचते.” शिबिरातील विभागनिहाय लाभ: ठळक उपक्रम: कार्यक्रमाची सांगता तहसीलदार श्री नानासाहेब आगळे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. त्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व विभागप्रमुख, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे आभार मानले.

जामनेर तालुक्यातील तेली समाजाचे निस्वार्थ समाजसेवक अजय भाऊ अशोक चौधरी यांची महाराष्ट्रात मोठ्या पदावर नियुक्ती!
जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी सुपडू जाधव जामनेर तालुक्यातील तेली समाजाच्या निस्वार्थ समाजसेवेसाठी सतत कार्यरत असलेल्या अजय भाऊ अशोक चौधरी यांची श्री संताजी नवयुवक मंडळ, महाराष्ट्र राज्य या प्रतिष्ठित संस्थेच्या उत्तर महाराष्ट्र प्रसिद्ध प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषजी घाटे साहेब यांनी त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत चौधरी यांची ही नियुक्ती जाहीर केली. अजय भाऊ चौधरी यांनी तेली समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक कार्यासाठी अनेक वर्षे निस्वार्थ सेवा दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या हिताचे अनेक उपक्रम राबवले गेले आहेत. यावेळी संस्थेचे माहिती अध्यक्ष श्री भटू पुंडलिक नेरकर यांनीही अजय भाऊ चौधरी यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या नियुक्तीमुळे जामनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण असून समाजातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

श्री प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ फार्मसी येथे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
जामनेर पासून सुमारे २ मैल अंतरावर स्थित श्री प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेज अँड रिसर्च, पळासखेडे येथे दिनांक ८ ते ९ जानेवारी २०२५ दरम्यान दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. पहिल्या दिवशी या कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे सचिव श्री. मनोजकुमारजी कावडिया यांच्या अध्यक्षते मध्ये करण्यात आले. उद्घाटन समारंभाच्या वेळी संस्थेचे सचिव तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मयुर भुरट, डी. फार्मसीचे विभाग प्रमुख डॉ. सुनील बावस्कर, उपप्राचार्य प्रा. प्रफुल्ल पाटील हे उपस्थित होते. यावेळी प्राचार्य आणि सचिव यांनी आपल्या भाषणातून व्यक्तिमत्व विकास आणि इंग्रजी भाषेचे महत्त्व यावर विद्यार्थ्यांना संबोधित केले. या कार्यशाळेसाठी प्रा. किशोर सोनवणे (सारस्वत इंग्लिश अकॅडमी, सुरत) आणि प्रा. चिंतन सोनवणे (तोलानी मेरीटाइम इन्स्टिट्यूट, पुणे) यांना अतिथी व्याख्याते म्हणून बोलवण्यात आलेले होते. पहिल्या दिवशी सकाळ सत्रामध्ये प्रा. चिंतन सोनवणे यांनी मुलाखतीचे तंत्र आणि रिझ्युमे लिहिणे या मुद्द्यांवर चतुर्थी वर्ष बी. फार्मसी आणि द्वितीय वर्ष डी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर दुपारच्या सत्रामध्ये प्रा. किशोर सोनवणे यांनी व्यक्तिमत्व विकास आणि संवाद कौशल्य या विषयावर प्रथम वर्ष बी. फार्मसी आणि प्रथम वर्ष डी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशीप्रा. किशोर सोनवणे यांनी‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ अंतर्गत सर्व शिक्षकांना अध्यापन कौशल्य तसेच महाविद्यालयाच्या विकासासाठी आणि यशस्वीतेसाठी आवश्यक असणाऱ्या मुद्द्यांवर प्रशिक्षण दिले. तसेच दुपारच्या सत्रामध्ये प्रा. चिंतन सोनवणे यांनी‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ अंतर्गत सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महाविद्यालयात काम करत असताना प्रामाणिकपणा, एकमेकांमधील समन्वय, सहकार्य आणि एकसंघ कार्यप्रणाली या विषयांवर प्रशिक्षण दिले.या दोन दिवसीय कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मयुर भुरट यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अशोक अग्रवाल, डॉ. भुषण गायकवाड आणि डॉ. संजय नागदेव यांनी मेहनत घेतली.

मोठी बातमी! पुढच्या वर्षापासून देशात जनगणना सुरू होऊ शकते; केंद्र सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत
केंद्र सरकारकडून करण्यात येत असलेल्या जनगणनेची (Census) माहिती समोर आली आहे. पुढील वर्षापासून देशात जनगणना सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जनगणना 2025 पासून सुरू होईल आणि 2026 पर्यंत चालेल. 2021 मध्ये जनगणना होणार होती. परंतु, कोविड महामारीमुळे जनगणना पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे देशात पुढच्या वर्षात जनगणना करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत मोदी सरकार आहे, अशी माहिती मिळत आहे. पुढच्या वर्षापासून देशात जनगणना केली जाणार असून आता आता जनगणनेचे चक्रही बदलणार आहे. आत्तापर्यंत 1991, 2001, 2011 इत्यादी दशकाच्या सुरुवातीला दर दहा वर्षांनी जनगणना केली जात होती. पण, आता 2025 नंतर पुढील जनगणना 2035, 2045, 2055 अशी केली जाणार आहे. जनगणना पूर्ण झाल्यानंतर लोकसभेच्या जागांचं सीमांकन सुरू होईल, 2028 पर्यंत सीमांकन प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. अनेक विरोधी पक्षांकडून जात जनगणनेची मागणी होत आहे, मात्र सरकारनं अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही. जनगणनेत धर्म आणि वर्ग विचारले जातात. सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि जमातीची गणना केली जाते. यावेळी लोकांना ते कोणत्या पंथाचे अनुयायी आहेत, हे देखील विचारलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ, कर्नाटकात, लिंगायत, जे सामान्य श्रेणीतील आहेत, ते स्वतःला एक वेगळा पंथ मानतात. त्याचप्रमाणे अनुसूचित जातींमध्ये वाल्मिकी, रविदासी, असे विविध पंथ आहेत. म्हणजेच धर्म, वर्ग आणि पंथाच्या आधारावर जनगणना करण्याच्या मागणीवर सरकार विचार करत आहे, अशी माहिती मिळत आहे.

50 खोके एकदम ओके’ ही घोषणा गुन्हा नाही, हायकोर्टाने रद्द केला एफआयआर
‘पन्नास खोके एकदम ओके’ अशा घोषणा देत शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर आंदोलन करणाऱ्या वकिलाविरोधात नोंदवलेला गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केला. सरकारने अपेक्षाभंग केल्यास उद्रेक तर होणारच असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. जळगावच्या धरणागाव येथील पोलीस ठाण्यात नोंदवलेला हा गुन्हा रद्द करण्यासाठी ॲड. शरद माळी यांनी याचिका केली होती. न्या. विभा पंकणवाडी व न्या. एस. जी. चपळगावकर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवत ॲड. माळी यांच्याविरोधातील गुन्हा रद्द केला. प्रत्येक आंदोलन शांततेचा भंग करत नाही सामाजिक शांतता कायम ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले होते, असा दावा पोलिसांनी केला होता. मात्र प्रत्यके आंदोलन हे सामाजिक शांततेचा भंग करण्यासाठी केलेले नसते, असे खडे बोल खंडपीठाने पोलिसांना सुनावले. काय आहे प्रकरण… गेल्या वर्षी मार्च महिन्यात आमदार सत्तार हे जळगाव जिह्याच्या दौऱयावर होते. त्यावेळी ॲड. माळी यांच्यासह अन्य शिवसैनिकांनी (उद्वव बाळासाहेब ठाकरे) मंत्री सत्तार यांच्या वाहनाच्या ताफ्यावर कापूस व रिकामे खोके फेकले. ’50 खोके एकदम ओके’ अशा घोषणा दिल्या, असा ठपका ठेवत शिवसैनिकांविरोधात (उद्वव बाळासाहेब ठाकरे) गुन्हा नोंदवण्यात आला होता. नाहक त्रास देण्यासाठी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे हा गुन्हा रद्द करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. ती न्यायालयाने मान्य केली. आरोपात तथ्य नाही मंत्री सत्तार यांच्या ताफ्याला चुकीच्या पद्धतीने प्रतिबंध केले, असा पोलिसांचा आरोप होता. मात्र आंदोलकांनी मंत्री सत्तार यांच्या वाहनांचा ताफा अडवला व मंत्री यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले, असा तपशील नोंदवलेल्या गुन्ह्यात नाही. त्यामुळे आंदोलकांवरील हा आरोप मान्य करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

मुंबई महामार्गावरील खड्डे कंत्राटदाराला भाेवले!
नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गावर पडलेले खड्ड्यांवरून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (न्हाई) ने टोल कंत्राटदारावर कारवाईचा बडगा उगारला आहे. घोटी व पडघा या टोलनाक्यांवर रविवारपासून (दि.२०) पुढील ९५ दिवस कंत्राटदाराला टोलवसुलीस बंदी घालण्यात आली आहे. ही टोलवसुली प्राधिकरण करणार असून वसुलीच्या रक्कमेतून खड्डे बुजविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चालूवर्षी मान्सूनने जोरदार हजेरीसाेबत नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील खड्डयांचा विषय राज्यभर गाजला. इगतपूरी तालूक्यातील गोंदे-वडपे (जिल्हा ठाणे) पर्यंत महामार्गाची अक्षरक्ष: चाळण झाली. परिणामी अडीच ते तीन तासांच्या प्रवासासाठी ८ ते ९ तासांचा कालावधी लागत होता. त्यामुळे महामार्गावरील खड्डे थेट विधीमंडळ अधिवेशनात गाजले. अनेक मंत्र्यांसह आमदारांनी रस्तेमार्गे प्रवास टाळून थेट नाशिकहुन रेल्वेमार्गेच मुंबई गाठण्यास सुरवात केली होती. दुसरीकडे महामार्गावरील खड्यांमुळे शरीराची हाडे खिळखिळी होतानाच वाहनांचे नुकसान होत असल्याने नाशिककर प्रवाशांमध्ये रोष होता. खड्यांच्या समस्येवरुन नाशिककरांनी आंदोलन उभारण्याची तयारी केली होती. दरम्यान माजी खासदार हेमंत गाेडसे यांनी घोटी टोलनाक्यावर आंदोलन करत कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांनी स्वतंत्र बैठका घेत खड्डे बुजविण्यासंदर्भात अधिकाऱ्यांचे कान टोचले होते. प्रसंगी कारवाईचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला होता. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या यंत्रणेने ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भर पावसात खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले होते. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आता थेट खड्यांच्या प्रश्नावरून कंत्राटदारावरच कारवाईचा बडगा उगारत ९५ दिवस टोलवसुलीला बंदी करण्यात आली. त्यामुळे उशिराने का होईना प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. ७६ कोटींमधून दुरुस्ती टोल कंत्राटदारावरील कारवाईबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी त्यास दुजोरा दिला आहे. रविवारपासून (दि.२०) पुढील ९५ दिवस महामार्ग प्राधिकरण घोटी व पडघा टोलनाक्यावर वसुली करणार आहे. याकाळात सुमारे ७६ कोटी रुपयांचा महसुल गोळा होणार आहे. या निधीतून गोंदे ते वडपे या महामार्गाची दुरुस्ती व खड्डे बुजविण्याचे काम केले जाईल.

लोहारी येथे मेंढपाळ धनगर कुटुंबावर दुःखाचा डोंगर.. वीज कोसळून 11 वर्षीय मुलासह दोन बकऱ्या मृत्युमुखी.
प्रतिनिधी.गजानन क्षीरसागरपाचोरा.लोहारी तालुका पाचोरा येथेमेंढपाळ धनगर समाजातील गोरख शिवराम शिंगाडे वय वर्ष 11 यांचे आज दिनांक 18 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 9:30 वाजता लोहारी बुद्रुक येथे गट क्रमांक 15 मध्ये अंगावर वीज कोसळून अकस्मात निधन झाले तसेच आई मंगलाबाई शिवराम शिंगाडे या जखमी झाल्या असून दोन बकऱ्या या मृत्युमुखी पडले आहेत. या घटनेमुळे मेंढपाळ धनगर कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून त्या ठिकाणी लोहारी सरपंच प्रवीण पाटील यांनी पिंपळगाव पोलीस स्टेशनला कॉल करून तात्काळ पंचनामा करून घेतला. पाचोरा येथे शवविचेदन करण्यात आले. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी पिंपराळा (नांदगाव) येथे वाहन रवाना झाले. या कुटुंबाला तात्काळ शासनाकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी सर्कल अधिकारी एम एस पाटील , लोहारी सरपंच प्रवीण पाटील, पिंपळगाव पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल नरेश नरवडे,माणुसकी ग्रुपचे गजानन क्षीरसागर, आधार खाटीक ,यांनी मदत कार्य केले.

पाळधी गावातील परतीच्या पाऊसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान,शासकीय पंचनामे करण्याची शेतकरी वर्गाची मागणी.
पाळधी गावातील परतीच्या पाऊसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान,शासकीय पंचनामे करण्याची शेतकरी वर्गाची मागणी. जामनेर तालुक्यातील पाळधी व सूनसगाव फाटा या परिसरात झालेल्या परतीच्या पाऊसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.यावेळी शेतातील केळी,मका,कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी वर्ग हवाल दिलं झाला आहे.आधीच या वर्षी जास्तीच्या पाऊसमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले असून त्यात परतीच्या पाऊस ने जोरदार तडाखा दिल्यामुळे शेतकर्यांचे पार कंबरडे मुडले आहे.या झालेल्या नुकसानीचे शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी बांधव करीत आहे.

टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू नायजेरियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पेट्रोल टँकरमध्ये झालेल्या भीषण स्फोटात ९४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत मृत्यांची संख्या आणखी वाढण्याची भीती आहे. ५० जण गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ही घटना उत्तर नायजेरिया येथील जिगावा राज्यातील एका गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल टँकरचा अपघात झाला होता. चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटल्याने हा टँकर रस्त्यात उलटला. यावेळी टँकरमधून पेट्रोलची गळती सुरू झाली,यावेळी पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी गर्दी केली. लोक पेट्रोल गोळा करत होते. यावेळी अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटात ९४ जणांचा मृत्यू झाला. मिळालेली माहिती अशी, टँकर उलटल्यानंतर स्थानिक लोकांनी त्यातून पेट्रोल भरण्यास सुरुवात केली. त्यानंतर मोठा स्फोट होऊन आग लागली. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले. ही घटना बुधवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताशी संबंधित एक व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये संपूर्ण परिसरात मोठी आग दिसत आहे. घटनास्थळी मृतदेह विखुरलेले दिसत आहेत. जखमींना जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नायजेरियातील बहुतांश अपघात हे खराब रस्त्यांमुळे होतात. गेल्या महिन्यात, नायजेरियाच्या उत्तर-मध्य नायजर राज्यात इंधन टँकर आणि ट्रकची धडक झाली. टक्कर झाल्यानंतर एक स्फोट झाला, यामध्ये किमान ४८ जणांचा मृत्यू झाला होता. नायजेरियाच्या फेडरल रोड सेफ्टी कॉर्प्सने दिलेल्या माहितीनुसार, २०२० मध्ये पेट्रोल टँकर अपघाताची १५०० हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली. या अपघातांमध्ये ५३५ जणांचा मृत्यू झाला तर १,१४२ जण जखमी झाले.
- 1
- 2