मा. ना. श्री. गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत भव्य रोगनिदान व शस्त्रक्रिया शिबिर

जामनेर :(प्रतिनिधी) जामनेर तालुक्याचे भाग्यविधाता म्हणून ओळखले जाणारे मा. ना. श्री. गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त कमल फाउंडेशन, जामनेर यांच्या वतीने भव्य मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार दि. 17 मे 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत एकलव्य माध्यमिक विद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज नगर, जळगाव रोड, जामनेर येथे पार पडणार आहे.या शिबिरात विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कॅन्सर, हृदयरोग, हाडांचे विकार, मूत्ररोग, न्यूरोसर्जरी, जनरल सर्जरी, बालरोग, स्त्रीरोग, नेत्र तपासणी आदी विभागातील नामांकित तज्ज्ञ डॉक्टर नागरिकांची तपासणी करणार आहेत.शिबिरात डॉ. निलेश चांडक, डॉ. प्रितेश कोठारी, डॉ. मनोज पाटील, डॉ. मनोज टोके, डॉ. टी. पी. महाजन, डॉ. सचिन साठे, डॉ. भूषण पाटील, डॉ. निखिल पाटील, डॉ. रविंद्र सुखक्कर, डॉ. अभिनव नाईक, डॉ. मृण्णा सोमाणी, डॉ. सौरभ पाटील, डॉ. सतीष चौधरी, डॉ. नेहा काबरा, डॉ. गिरधारी जेधे तसेच डॉ. पांडुरंग अल्टाट यांसारखे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.शिबिरासाठी येताना नागरिकांनी आपले जुने वैद्यकीय रिपोर्ट सोबत आणावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.या उपक्रमास कमल हॉस्पिटल व मॅटर्निटी होम, जामनेर यांचे सहकार्य लाभले असून भारतीय जनता पार्टी, जामनेर यांचे विशेष सहकार्य आहे. आयोजनाची जबाबदारी कमल फाउंडेशन, जामनेर यांनी स्वीकारली आहे.

Read More

निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार एस.एस.सी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

पळसखेडे मिराचे, प्रतिनिधी : धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी, शेंदुर्णी संचलित निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालय, पळसखेडे मिराचे येथे फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेत सेमी व मराठी माध्यमातून प्रथम पाच क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज दि. 9 मे रोजी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री व्ही. आर. पाटील सर प्रमुख उपस्थित होते. तसेच इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक श्री व्ही. डी. पाटील सर, श्री जी. पी. पाटील सर, श्री पी. के. राजपूत सर, श्री व्ही. ए. पाटील सर, सीनियर क्लार्क श्री के. आर. सोनवणे भाऊसाहेब तसेच ग्रंथपाल श्री डी. एस. बोरसे सर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. यावेळी विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी मुख्याध्यापक आदरणीय नानासाहेब यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत यशाची परंपरा कायम राखण्यासाठी मेहनत, सातत्य व शिस्त यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते.

Read More

जिकरा न्यू उर्दू विद्यालयाचा दहावीला 98.40 टक्के निकालकु. मिसबाह शेख विद्यालयात प्रथम; यशाबद्दल सर्वत्र कौतुक

जामनेर, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात जिकरा एज्युकेशन सोसायटी संचलित जिकरा न्यू उर्दू माध्यमिक विद्यालय, जामनेर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयाचा एकूण निकाल 98.40 टक्के लागल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परीक्षेत कु. मिसबाह आसिफ शेख हिने 84.80 टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला. कु. अहेनिश नईम खान हिने 83.40 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर मोहम्मद अकदस निसार अहमद यांनी 83.20 टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक संपादन केला. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रहीम शेख तसेच सचिव जाकीर शेख यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे प्राचार्य इरशाद खान सर व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन करून त्यांच्या यशात मोलाचा वाटा उचलला. तसेच संस्थेच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला असून परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Read More

गरुड विद्यालयाची एसएससी परीक्षेत गरुड झेपशेंदुर्णी ता.जामनेर प्रतिनिधीविद्यालयाची गौरी शिनकर तालुक्यातून द्वितीय,सेमी विभागाचे प्रथम पाच विद्यार्थी शेंदुर्णी केंद्रातून प्रथम

शेंदुर्णी, प्रतिनिधी : धी. शेंदुर्णी से. एज्युकेशन को-ऑप. सोसायटी संचलित आ.ग.र. गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, शेंदुर्णी येथील एसएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विद्यालयाने 94.90 टक्के इतका उल्लेखनीय निकाल मिळविला आहे. विशेष म्हणजे सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विद्यालयातून एकूण 471 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 447 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षेत 201 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य संपादन केले असून 34 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. सेमी माध्यमातून कु. गौरी गोपाल शिनकर हिने 97 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला. कु. मानसी अमोल पाटील व कु. गौरी संजय आगे यांनी प्रत्येकी 96.40 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. कु. स्नेहल दगडू घनघाव हिने 96 टक्के गुणांसह तृतीय, कु. वैष्णवी मोहन पाटील हिने 95.60 टक्के गुणांसह चतुर्थ तर चि. दर्शन मनोज कापुरे याने 94.80 टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला. मराठी माध्यमातून चि. हितेश दीपचंद जाधव याने 90.20 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला. कु. खुशी सुनील डांबरे हिने 89.60 टक्के गुणांसह द्वितीय, कु. मयुरी गणेश पाटील हिने 89 टक्के गुणांसह तृतीय, कु. हर्षाली अमर सूर्यवंशी हिने 87 टक्के गुणांसह चतुर्थ तर कु. चेतना हिम्मत मोहने हिने 86.60 टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजयरावजी गरुड, व्हॉइस चेअरमन आबासो भीमराव शेळके, सचिव काकासो सागरमलजी जैन, सहसचिव दादासो यू.यू. पाटील, कार्यालयीन सचिव भाऊसो दीपकजी गरुड, वस्तीगृह सचिव गो.गो. सूर्यवंशी, महिला संचालिका ताईसो उज्वला काशीद तसेच सर्व संचालक मंडळ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती पी.एस. पाटील, उपप्राचार्य बी.एम. कुमावत, पर्यवेक्षक जे.एस. जुबंळे, विनोद पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Read More

जामनेरात स्विमिंग पुलाच्या आउटलेट असलेल्या चेंबर मध्ये ५ वर्षाच्या मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू.दर्शनपार्क व एकुलती गावावर शोककळा.

जामनेर (प्रतिनिधी):- येथील सोनेश्वर मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या स्विमिंग पुलाच्या आउटलेट असलेल्या हौदात ५ वर्ष वय असलेल्या कार्तिक ऊर्फ उत्कर्ष गणेश पाटील या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दी.३ रोजी संध्याकाळी ठीक ५ ते ६ वाजेच्या सुमारास घडली आहे.त्याचे सविस्तर असे की, मूळचे एकुलती येथील रहिवाशी व हल्ली दर्शन पार्क येथे स्थाईक असलेले व संजय दादा गरूड यांच्या संस्थेत तोंडापूर येथे क्लार्क म्हणून कार्यरत असलेले गणेश पाटील हे आपल्या ५ वर्षाच्या कार्तिक व आपल्या मुलीसह स्विमिंग पुलात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेले होते. संध्याकाळी पोहण्याचा आनंद घेतल्या नंतर ते ओले झालेले कपडे बदलवण्यासाठी आपल्या मुलांना घेऊन रूम मध्ये गेले होते. मात्र कार्तिक हा त्यांची नजर चुकवून आउटलेटचे वाहते पाणी बघून त्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी पुढे पुढे जात आउटलेटचे पाणी ज्या ठिकाणी जमा होते. त्या चेंबर पर्यन्त गेला असता त्याचा चेंबर मध्ये तोल जाऊन तो चेंबर मध्ये असलेल्या पाण्यात बुडाल्याची माहिती स्थानिक रहिवाश्यांनी दिली असून एक मिनिटही न सोडणाऱ्या गणेश पाटील व त्यांच्या फॅमिलिवर मात्र कार्तिकच्या जाण्याने वज्रघात झाला आहे. या ठिकाणी घडलेल्या घटनेची चर्चा होताच कार्तिकला शोधण्यासाठी बरेच लोक स्विमिंग पुलाच्या पाण्यात उतरून शोध घेत होते. मात्र आउटलेटच्या पाण्याकडे कोणाचेही लक्ष न गेल्याने कार्तिकला शोधायला बराच वेळ लागला त्यामुळे त्याला जीवदान देता आले नाही. अशी खंत उपस्थित शोध कार्य करणाऱ्या लोकांनी व्यक्त केली आहे. तरीही त्याठिकाणी सुरक्षितता म्हणून ज्या ठेकेदाराला कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. त्यांचे ट्रेनर वा सिक्युरिटी गार्ड त्या ठिकाणी नसल्याची चर्चा शहरात होतांना दिसून येत आहे. कदाचीत त्यामुळे कार्तिक चा जीव वाचवता आला असता अशी खंत व्यक्त करतांना जामनेर नागरीक दिसून येत आहे.कार्तिक च्या पच्च्यात आई, वडील, काका, आजी, आजोबा, काका,काकू आणि ११ वर्षाची बहीण असा परिवार आहे.

Read More

जामनेर -भारतीय जैन संघटनेची व्यापारी सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर प्रतिनिधीजामनेर येथील व्यपाऱ्यांना उद्योग-व्यवसायात अधिक सक्षम बनविण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या व व्यापारी एसोसिएशन यांच्या वतीने विशेष कार्यशाळेचे येथील महावीर भवन मध्ये आयोजन करण्यात आले.खानदेशात तळोदा,शहादा,शिरपूर, धुळे,शिंदखेडा, पाचोरा , जळगांव या सात ठिकाणी कार्यशाळा होऊन जामनेर येथील ही 8 वी कार्यशाळा असून, राज्य अध्यक्ष केतन शहा, राज्य महासचिव प्रवीण पारख यांच्या मार्गदर्शनाने व उपाध्यक्ष विनय पारख, खानदेश विभाग अध्यक्ष प्रा.चंद्रकांत डागा यांच्या प्रयत्नाने केले गेले असल्याचे विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत यांनी सांगितले.कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक म्हणून सुनील भवरीलालजी गादीया यानी सहकार्य केले.या कार्यशाळेत उद्योजकतेसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सखोल माहिती देण्यात आली.कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून निरंजन जैन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी उद्योग-व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांची माहिती, त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया, तसेच कर्जासाठी लागणारी सिक्युरिटी (हमी) याबाबत सविस्तर विवेचन केले. योजनांमध्ये आवश्यकता नसते, तर काही योजना मर्यादित सिक्युरिटी घेतली जाते, माहिती त्यांनी दिली. या सेमिनारला ओसवाल जैन संघचे सचिव ईश्वरलालजी साबद्रा,पारसनाथ देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष प्रकाश सैतवाल,व्यापारी एसोसिएशन व किराना अध्यक्ष ताराचंद झांवर, उपाध्यक्ष पुखराज डांगी, एमआयडीसी अध्यक्ष सुभाष बोहरा, अड़त अध्यक्ष प्रकाश कोठारी,कृषि अध्यक्ष प्रदीप लोढ़ा, डॉक्टर्स अध्यक्ष डॉ कांतिलाल ओस्तवाल,मेडिकल अध्यक्ष पंढरी पाटिल,कपड़े व्यापारी अध्यक्ष संजय चिंचकर,सीए उपाध्यक्ष अनिल मुनोत कार्यशाळेला उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज़िला उपाध्यक्ष विकास कोठारी, जामनेर शहर अध्यक्ष कुशल बोहरा, उपाध्यक्ष अभिनंदन जैन,सदस्य विकास ललवानी,मयूर पोरवाल,संजय ललवानी,कुणाल चंडालिया,महिला सदस्य मनीषा कोठारी,वंदना चोरड़िया , भाग्यश्री लुंकड आदि सदस्यंनी प्रयत्न केले.कार्यशाळेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांना शासकीय योजनांविषयी स्पष्ट व उपयुक्त माहिती मिळाली असून,भविष्यात उद्योग वृद्धीसाठी या मार्गदर्शनाचा मोठा फायदा होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.सूत्र संचालन वंदना चोरड़िया आणि आभार प्रदर्शन डॉ कांतिलाल ओस्तवाल यानी केले.

Read More

शेंदूर्णी सूतगिरणीला गती देण्यासाठी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक

मुंबई, दि. ७ एप्रिल (प्रतिनिधी) — जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सहकारी सूतगिरणीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी मंत्रालयात मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात ही बैठक झाली.बैठकीत वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्रीकृष्ण पवार यांनी सूतगिरणीच्या सद्यस्थितीचा आढावा सादर करत कामकाजातील अडचणी व प्रलंबित मुद्द्यांची सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सूतगिरणीच्या कार्यपद्धती, तांत्रिक बाबी व उत्पादन क्षमतेसंदर्भात चर्चा केली.सूतगिरणीसमोरील अडचणी दूर करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत मंत्री श्री. महाजन यांनी वस्त्रोद्योग विभागाला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यामुळे सूतगिरणीच्या कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.या बैठकीस वस्त्रोद्योग आयुक्त श्री. संजय दैने, मंत्री (वस्त्रोद्योग) यांचे खाजगी सचिव श्री. प्रल्हाद रोडे, मंत्री श्री. महाजन यांचे खाजगी सचिव जयराज कारभारी, प्रादेशिक उपआयुक्त श्री. दीपक खांडेकर, कक्ष अधिकारी श्री. हरीशकुमार कांबळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी ऑनलाइन प्रणालीद्वारे उपस्थित होते.सदर बैठकीत सूतगिरणीच्या प्रगतीसाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला असून, लवकरच ठोस निर्णयांची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read More

जळगावात गॅस सिलेंडर वितरणावर निर्बंध; ‘घरपोच’ सेवेला प्राधान्य देण्याचे निर्देश

जळगाव (प्रतिनिधी) : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन पुरवठ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून, याचा परिणाम देशांतर्गत गॅस वितरण व्यवस्थेवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गॅस सिलेंडरच्या पॅनिक बुकिंग आणि साठेबाजीला आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत.जिल्ह्यातील काही गॅस एजन्सींकडून थेट कार्यालय किंवा गोडाऊनमधून सिलेंडर वितरण केले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठी गर्दी होत असून सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. तसेच, प्रतीक्षा यादीत फेरफार होऊन काळाबाजाराला खतपाणी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.याच पार्श्वभूमीवर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या जळगाव येथील सेल्स ऑफिसरना सूचना देण्यात आल्या आहेत.महत्त्वाचे निर्देश पुढीलप्रमाणे :गॅस एजन्सी कार्यालय किंवा गोडाऊनवरून थेट सिलेंडर वितरण तात्काळ बंद करावे. सर्व ग्राहकांना केवळ ‘घरपोच’ (Home Delivery) पद्धतीनेच सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत.वितरण प्रक्रियेत पारदर्शकता ठेवून कोणत्याही प्रकारचा तुटवडा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी.नियमबाह्य काम करणाऱ्या एजन्सींवर तातडीने तपासणी करून कठोर कारवाई करावी.या निर्णयामुळे ग्राहकांना सुरक्षित आणि सुव्यवस्थित पद्धतीने गॅस पुरवठा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे संभाव्य गोंधळ, काळाबाजार आणि गर्दीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार आहे.

Read More

पंढरपूरात राज्यस्तरीय पुरस्कारांचा जल्लोषविविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव – भगवंत पांडुरंगाच्या साक्षीने सोहळ्याला उत्साहाची उधाण – वाकडी च्या बाळु जोशी याना सन्मानित

वाकडी.ता.जामनेर.दि.२/०४/२६सांस्कृतिक, सामाजिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत ३१ मार्च २०२६ रोजी पंढरपूर येथे “राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २०२६” मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित भव्य सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले त्यात बाळू जोशी वाकडी ता जामनेर दैनिक सकाळ चे पत्रकार यांना हि सन्मानित करण्यात आले . या सोहळ्याचे खास आकर्षण ठरल्या त्या प्रसिद्ध निवेदिका ऐश्वर्या चासकर ! आपल्या ओघवत्या, प्रभावी आणि हृदयस्पर्शी निवेदन शैलीने महाराष्ट्रभर प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या ऐश्वर्या चासकर यांना या मंचावर सन्मानित करण्यात आले. त्यांच्या आवाजातील जादू, मंचावरील आत्मविश्वास आणि प्रत्येक कार्यक्रमाला उंची देण्याची कला यामुळे त्या आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. त्यांच्या सन्मानावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना भरभरून दाद दिली. या सोहळ्यात महाराष्ट्र समाज भूषण, आदर्श पत्रकार, आदर्श शिक्षक, सेवा धन्वंतरी भूषण, कृषी भूषण, कलारत्न भूषण, गानसम्राज्ञी, साहित्यभूषण, अभियंता भूषण, भारत भूषण, आदर्श माता, शौर्य पुरस्कार, पर्यावरण पुरस्कार, साहित्यरत्न, काव्य भूषण, आदर्श लेखक, वृक्षमित्र, आरोग्यदूत, क्रीडारत्न, नारिशक्ती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महाराष्ट्र रत्न, जीवन गौरव, उत्कृष्ट सरपंच, आदर्श शेतकरी, संत तुकाराम महाराज जीवन गौरव पुरस्कार, महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार, यांसारख्या अनेक मानाच्या पुरस्कारांनी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यात आला. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, अध्यात्मिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, कृषी वैद्यकीय, पत्रकारिता, पोलिस सेवा तसेच देशसेवेसाठी योगदान देणारे सैनिक, युवा वर्ग आणि शौर्य दाखवणाऱ्या बालकांनाही या सोहळ्यात राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन संतराज पॅलेस, विसावा मंदिराशेजारी, बुलेट शोरूम समोर, पुणे रोड, पंढरपूर येथे करण्यात आले होते. भगवंत पांडुरंगाच्या पवित्र भूमीत झालेल्या या सोहळ्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच आध्यात्मिक उंची लाभली. उपस्थितांना पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभघेता आला तसेच कार्यक्रमानंतर स्वादिष्ट भोजनाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. या प्रसंगी श्री संत शिरोमणी सावता महाराजांचे 19 वे वंशज सावता महाराज वसेकर, पंढरपूरच्या नगराध्यक्ष प्रणिती भालके, वनरक्षक अधिकारी अनिता शिंदे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अॅड. प्रणव परिचारक, द युवा ग्रामीण पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख, ऐकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनंत कराड राष्ट्रीय महिला अध्यक्षा कल्पना पवार, राज्याध्यक्ष शकील मनियार, सचिव बाळासाहेब कोठुळे, महिला सचिव मंगलताई सासवडे, महाराष्ट्राची भूमी मुख्य संपादक आनंद बारवकर, सोलापूर जिल्हा कार्यकारणी, पुणे जिल्हा कार्यकारणी, सांगली जिल्हा कार्यकारिणी, जळगाव जिल्हा कार्यकारिणी, यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम नसून, समाजातील कर्तृत्वाला सलाम करणारा, प्रेरणा देणारा आणि नवचैतन्य निर्माण करणारा ठरला. विशेषतः ऐश्वर्या चासकर यांच्या निवेदनामुळे कार्यक्रमाला एक ग्लॅमर आणि अभिमानाची झळाळी प्राप्त झाली.

Read More

गरुड विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर एस चौधरी यांना निरोप

गरुड विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर एस चौधरी यांना निरोप धी.शेंदुर्णी से.एज्यु.को-ऑप सोसायटी संचलित,आ.ग.र.गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी येथे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर एस चौधरी यांच्या शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीतील प्रदीर्घ अशा सेवेनंतर वयो काल मर्यादे नुसार सरांना सेवापूर्तीनिमित्त निरोप देण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव काकासो.सागरमलजी जैन यांच्या समवेत संस्थेचे सहसचिव दादासो यु यु पाटील, शेंदुर्णी शहराचे प्रथम नागरिक गोविंद जी अग्रवाल,माजी शिक्षक आमदार सुधीरजी तांबे,प्रमुख व्याख्याते माजी शिक्षणाधिकारी निळकंठजी गायकवाड,युवा नेतृत्व भैय्यासाहेब स्नेहदीपजी गरुड,ज.जि.माध्य. शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष एस.डी भिरुड, महिला संचालिका उज्वलाताई काशीद,ज.जि माध्यमिक पतपेढी माजी अध्यक्ष संभाजी पाटील मार्गदर्शक जुक्टो संघटना बापूसो.सुनील गरुड वस्तीगृह सचिव गो.गो.सूर्यवंशी , ज जि माध्यमिक पतपेढी माजी अध्यक्ष आर एच बाविस्कर, अध्यक्ष मुख्याध्यापक संघ जळगांव गोपाल पाटील,जि प्रे सो चेअरमन दगडू विष्णू पाटील, शेदुणी संस्थेचे सह सचिव यु यु पाटील चेअमन वस्तीगृह किशोर मानसिंग पाटील, शेंदुणी संस्था संचालक विजयराव ज्ञानदेवराव गरुड जिल्हा मुख्याध्यापक संघ सचिव आर ए पाटील मुख्याध्यापक जामनेर तालुका अध्यक्ष प्रमोद खलसे, माजी उपसभापती सुधाकर अण्णा बारी माजी पचायत सदस्य डाॅ किरण सुर्यवंशी, प्रदिप धनगर, प्राचार्य संजय भोळे, एस के पाटील जुक्टो संघना जळगांव शैलेश राणे, ए ए पटेल, जैन चाॅरिटीजचे व्यवस्थापक विनोद सिंह राजपूत, ज जि माध्यमिक पतपेढी संचालक सिध्देश्र्वर वाघुळदे, जे पी सपकाळ, जावळेसर, भावेश अहिरवार, आबा पाटील, नाईक सर आरिफ सर या मान्यवरांसह अनेक मान्यवर व्यास मंचावर उपस्थित होते.प्रथमतः कार्यक्रमाचे प्रास्ताविक किमान कौशल्य विभागाचे प्रमुख शैलेंद्र शेळके यांनी प्रास्ताविकात चौधरी सरांच्या जीवन प्रवासाबद्दल माहिती कथन करत.सरांचे वडील प्राथमिक शिक्षक होते तर पाचवीत असतानाच पितृछत्र हरपल्याने संघर्षमय जीवन जगत असताना त्यांच्या मातोश्री अंजनाबाई या नाचनखेडा गावात सतत दहा वर्ष वि. का. सोसा. संचालिका म्हणून कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं शेंदुर्णी संस्थेत 1991 पासून तर आजतागायत 34 वर्ष 7 महिने एवढा मोठा कालावधी शिक्षक, पर्यवेक्षक, उप मुख्याध्यापक प्राचार्य कमऀचारी प्रतिनिधि,इथपर्यंत इमाने इतबारे सरांनी पार पाडला.विद्यार्थी हित कर्तव्य म्हणजे राज्य पातळी ते राष्ट्रीय पातळीपर्यंत सरांचे विद्यार्थी खेळामध्ये चमकलेत. त्यांच्या धर्मपत्नी चित्राताई तसेच मुलगा दिनेश व मुलगी प्रियंका या आपल्या कुटुंबाला वेळ देत त्यांनी सामाजिक कार्य तसेच शिक्षक संघटनांच्या माध्यमातून शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम सरांनी केले.तसेच समाजाशी एकरूप होऊन सामाजिक बांधिलकी त्यांनी जोपासल्याचे प्रास्ताविकातून शेळके सरांनी व्यक्त केले.तद्नंतर,बऱ्याच मान्यवरांनी सरांच्या जीवनकार्याची यशोगाथा सांगितली त्यात,गोविंदजी अग्रवाल,निळकंठजी गायकवाड,सुधीरजी तांबे,संभाजी पाटील, सुनिल गरड, यु यु दादा पाटील या मान्यवरांसह विद्यार्थी मनोगतात भाग्यश्री नाईक,अथर्व पाटील यांनी सरांच्या आठवणींना उजाळा दिला.तसेच सत्कारार्थी मनोगतात सरांनी देखील आपल्या भावनांच्या वाटा मोकळ्या करत आपल्यावर प्रेम करणाऱ्या प्रेमी जणांचे तसेच संस्थेचे श्रद्धास्थान आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड अण्णासाहेब भास्करराव गरुड, तसेच दादासाहेब संजय रावजी गरुड व संस्था यांच्या ऋणात राहून मी सदैव संस्थेच्या हित जोपासण्यासाठी तत्पर असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केले. तद्नंतर अध्यक्षीय मनोगतात शेंदुणी संस्थेचे सचिव काकासो.सागरमल जैन यांनी देखील आपले भावनिक विचार मांडले, प्रमुख उपस्थित मान्यवरांसह उपनगराध्यक्ष शरद बारी,नगरसेवक शांताराम बापू गुजर,टी.जे पाटील, नगरसेविकापती सुनील शिनकर माजी सरपंच नाचणखेडे हर्षल पाटील,सरपंच कैलास पाटील राजेंद्र पाटील सोयब पटेल अरुण कुलकर्णी, संजय गोतमारे,राजेद्र चौधरी, सुनिल चौधरी,,,एन ओ पाटील,सर,सुनंदाताई,बडोला हायस्कूल मुख्याध्यापिका श्रीमती पी एन पाटील,जुक्टो संघटनेचे शैलेश राणे,जे पी सपकाळे,व्ही के चौधरी,एस एस पाटील, एस टी पाटील, पी पी पाटील,एस के पाटील, पी आर गरुड, पी एल पाटील, राठी बापू, एस टी चिचोले,एस आर निकम, ए व्ही पाटील,पत्रकार विलास अहिरे, पंडित सर,एस टी पाटील,संगमनेर येथील महेश दिघे या मान्यवरांसह आप्तेष्ट नातेवाईक व इतर मित्र परिवार तसेच संस्थेतील आजी-माजी मुख्याध्यापक,महाविद्यालयाचे प्राचार्य, संजय भोळे,उप प्राचार्य,श्याम साळुंखे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उप प्राचार्य बी एम कुमावत, पर्यवेक्षक जे.एस.जुबंळे, विनोद पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.सरांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा दादासाहेब संजयरावजी गरुड तसेच भाऊसो.दीपक जी गरुड व इतर पत्रकार बांधव, शिक्षक आमदारकिशोरजी दराडे, ग स सोसायटी अध्यक्ष अजबसिंग पाटील या मान्यवरांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा कळविल्याचे समजले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.जी. पाटील यांनी केले तर आभार पी.पी. पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

Read More
error: Don't Try To Copy !!