गोद्री येथे शांततामत वातावरणात सर्वव धर्मीय शिव जयंती साजरी समाजसेवक अक्षय पाटील यांचे अमोल सहकार्य

तोंडापूर ता. जामनेर येथून जवळच असलेल्या गोद्री येथे सर्व समज बांधवामार्फत डी जे च्या तालावर नाचत अतिशय शांततापूर्ण वातावरणात पोलीस संरक्षण शिवाय शिव जयंती साजरी करण्यात आली.या वेळी गोद्री येथील समाजसेवक अक्षय पाटील याच्या हस्ते गावाच्या वतीने ग्रामपंचायत आवारातील छत्रपती शिवाजी महाराष्ट्रचंच्या आश्वावृढ पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी अक्षय पाटील यांच्या वतीने संपूर्ण गावाला अन्नदान करण्यान्त आले, तसेच गावातील युनूस तडवी, रुबाब तडवी, विष्णू कोळी, प्रकाश कोळी, गणेश देशमुख, सागर कोळी,गजानन पाटील, निखिल कोळी, चेतन कोळी, यांचे सहकार्य लाभले. विशेष म्हणजे गोद्री येथील शिवजयंतीसाठी पुण्याहून सत्त्यम कड, ऋतिक चव्हाण, आनंद कड,रुपेश कड,तुषार बचचे,अजित रागडे,जगदीश हलडेकर,मिनीनाथ गव्हाणे उपस्थित होते

Read More

भागदारा येथील २५ वर्षीय तरुणाचा अपघात जागीच मूत्यू….

जे. बी. एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर तालुक्यातील कोदोली रस्त्यावर डांगी फॉर्मजवळ आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात जीवन जगन्नाथ चव्हाण (जोगी), वय २५, रा. भागदारा या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. होंडा लिओ मोटरसायकल व रिक्षाची जोरदार धडक होऊन हा अपघात घडला.मिळालेल्या माहितीनुसार, जीवन चव्हाण हे व्यवसायाने सेंटिंग कामगार होते. त्यांचे आई-वडील दोघेही हयात नाहीत. त्यांच्या मागे पत्नी, ४ वर्षांचा मुलगा आणि ३ वर्षांची मुलगी असा कुटुंबाचा आधार असलेली दोन लहान मुले आहेत. अचानकच आलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.धडकेत डोक्याला गंभीर मार बसल्याने जीवन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. विवाहित असून कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.स्थानिक नागरिकांकडून शासनाने या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.या अपघातामुळे भागदारा परिसरात शोककळा पसरली आहे.

Read More

निर्मल इंटरनॅशनल स्कूलची श्रेया महालपुरे चमकली! विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड..!

प्रतिनिधीगजानन क्षीरसागरलोहारा तालुका पाचोरापाचोरा:-क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या विद्यमाने तथा जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव यांच्या मार्फत आयोजित जिल्हास्तर शालेय कॅरम स्पर्धेत निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या कु. श्रेया विनोद महालपुरे हिने १७ वर्षे वयोगटात उल्लेखनीय कामगिरी सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या झळाळत्या यशामुळे आता ती नाशिक येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.श्रेयाच्या या यशाने संपूर्ण शाळा परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. संस्थेच्या अध्यक्षा मा. वैशालीताई सुर्यवंशी, सचिव श्री. नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्य श्री. गणेश राजपूत, जनसंपर्क अधिकारी श्री. आय. बी. सिंग, उपप्राचार्य श्री. प्रदिप सोनवणे, समन्वयक सौ. स्नेहल पाटील व प्रशासकीय अधिकारी श्री. संतोष पाटील यांनी श्रेयाचे मन:पूर्वक अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.या यशामागे क्रीडा शिक्षक श्री. गणेश मोरे, श्री. नंदू पाटील, श्री.प्रवीण मोरे व श्री. सोमनाथ माळी यांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा असून, त्यांच्या अथक परिश्रमाचे फळ श्रेयाने विभागीय पातळीवरील संधीच्या रूपाने प्राप्त केले आहे.श्रेयाच्या या कामगिरीमुळे निर्मल इंटरनॅशनल स्कूलने पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रात आपली गुणवत्ता आणि प्राविण्य सिद्ध केले आहे .

Read More

जि.प.मराठी शाळा वाकडी येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी संदीप परदेशी यांची निवड

वाकडी.ता.जामनेर.दि.११/१०/२५ जि.प.मराठी शाळा येथे शालेय व्यवस्थापन समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली, यावेळी अध्यक्षपदी संदीप परदेशी व उपाध्यक्ष अक्रम तडवी यांची निवड करण्यात आली,जि.प.मराठी मुलांची केंद्र शाळेची नूतन व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली,ही व्यवस्था समितीची रचना पालकांमधून शासकीय निर्देशानुसार करण्यात आली, सर्वानुमते शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संदीप परदेशी,तर उपाध्यक्षपदी अक्रम तडवी यांची निवड करण्यात आली,सदर वाकडी केंद्रचे केंद्र प्रमुख ज्ञानेश्वर पाटील,मुख्याध्यापक प्रल्हाद शिंदे, यांच्या अध्यक्षतेखाली उत्तम प्रकारे पार पडली, तसेच सभेकरिता पालक वर्ग देखील उपस्थित होते,यामधून व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद मराठी शाळा वाकडी मुलांचे पालक आनंदा जोशी,कोमल सिंग राजपूत,गौतम लोखंडे, अतुल न्हावी,सौ.सोनाली कोळी,सौ.जयश्री बिडके,शकीला तडवी,सौ.ज्योती कोळी,सौ.उज्जला राजपूत, युवराज बिजागरे, रमेश गायकवाड,या मान्यवरांनी समितीवर करण्यात आली,सदर सभेची रुपरेखा सुर्याजी काकडे यांनी मांडली यांनी यावेळी उपस्थित ज्ञानेश्वर कवडे,शेखर महाजन,प्रकाश कुमावत आदी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते

Read More

माजी सभापतींच्या पतीची आत्महत्या; चिठ्ठ्या सापडल्याने गूढ वाढले

जामनेर, ता.२२ (प्रतिनिधी) जामनेर शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. सोनबर्डी परिसरातील एका निर्जनस्थळी माजी सभापती सुनंदाबाई पाटील यांचे पती प्रल्हाद पाटील (वय ६२, रा. मोयखेडा, ता. जामनेर) यांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली असून, मयत प्रल्हाद पाटील यांच्या खिशात काही चिठ्ठ्या सापडल्याची प्राथमिक माहिती मिळत असल्याने आत्महत्येमागील गूढ वाढले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मोयखेडा येथील रहिवासी असलेले प्रल्हाद पाटील यांनी आज संध्याकाळी सोनबर्डी परिसराच्या मागील बाजूस असलेल्या एका निर्जनस्थळी झाडाला गळफास लावून आपले जीवन संपवले. प्रल्हाद पाटील हे व्यवसायाने शिक्षक होते आणि त्यांनी २०२१ साली स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्याच सुमारास त्यांच्या पत्नी सुनंदाबाई पाटील जामनेर पंचायत समितीच्या सभापती म्हणून कार्यरत होत्या.घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्रल्हाद पाटील यांनी आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठ्यांमुळे आत्महत्येमागे काही कारण असावे असा पोलिसांना संशय आहे. जामनेर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.प्रल्हाद पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून आणि तीन नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येने मोयखेडा आणि जामनेर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Read More

अंशतः अनुदानित शिक्षकांना मोठा दिलासा! मुख्यमंत्री फडणवीस यांचा शब्द – ‘शिक्षकांना न्याय मिळणार’आ. किशोर दराडे सत्यजित तांबे यांच्या पुढाकाराने शिक्षक आमदारांची मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक; अधिवेशनात तोडग्याची हमी

नाशिक (प्रतिनिधी) – राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांच्या लढ्याला मोठे यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक विभागाचे शिक्षक आमदार आ. किशोर दराडे सत्यजित तांबे यांच्या आग्रही पुढाकाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शिक्षक आमदारांची निर्णायक बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ठाम शब्द देत, “शिक्षकांवर अन्याय होणार नाही. शासनाकडून विलंब झाला असला, तरी यंदाच्या अधिवेशनात शिक्षकांना निश्चित दिलासा मिळेल,” अशी ग्वाही दिली.आ. किशोर दराडे यांचा आक्रमक पाठपुरावाशिक्षकांच्या मागण्यांसाठी आ. किशोर दराडे यांनी नाशिकमध्ये शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर त्यांनी थेट राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वाशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला. आ. सत्यजित तांबे, विक्रम काळे आ. किरण सरनाईक आणि आ. जयंत तासगावकर यांच्यासह त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आणि शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना गती देण्याची मागणी केली.मुख्यमंत्र्यांचे आश्वासनमुख्यमंत्र्यांनी 14 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर झालेल्या 20% वाढीव वेतन अनुदानाच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी रखडल्याची बाब मान्य केली. “लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल,” असे सांगत त्यांनी शिक्षकांना दिलासा दिला. आगामी अधिवेशनात आर्थिक आणि प्रशासकीय अडथळे दूर करून शिक्षकांच्या मागण्यांवर ठोस तोडगा काढण्याचे प्राधान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.शिक्षकांमध्ये नव्या आशेचा संचारमुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे आंदोलनात सहभागी शिक्षकांमध्ये उत्साह आणि नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे. नाशिकसह राज्यभरातील शिक्षक संघटना एकजुटीने लढत असून, आ. किशोर दराडे यांच्या राजकीय पाठबळामुळे आंदोलनाला बळ मिळाले आहे. अधिवेशनात शिक्षकांना न्याय मिळण्याची अपेक्षा आता वाढली आहे.‘शिक्षकांचा लढा यशस्वी होणार!’या सकारात्मक घडामोडींमुळे शिक्षकांचा आवाज आता शासनापर्यंत पोहोचला असून, अधिवेशनातील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.यासाठी महासंघाचे अध्यक्ष डॉ संजय शिंदे , ‘शिक्षक सेना प्रा. संजय चव्हाण ,शिक्षक समन्वय संघाच्या वतीने अनिल परदेशी, सुभाष पवार, कर्तरसिंग ठाकूर, रवी पवार ,प्रकाश तायडे, तसेच जुक्टो संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील गरुड ,शैलेश राणे ,नंदन वळींकार, सुनील सोनार यासह मोहन चकोर आधी पदाधिकारी यांनी आमदार किशोर दराडे, सत्यजित तांबे, विक्रम काळे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

Read More

जामनेर येथून आरोपीस अटक – बेटावद खुर्द (ता. जामनेर) येथे केली होती घरफोडी

जे.बी.एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजळगाव: बेटावद खुर्द (ता. जामनेर) येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी समीर उर्फ बाल्या याला जामनेर येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले असून, पोलिस प्रशासनाने पुन्हा एकदा सिद्ध केले की, कायद्यापासून कोणीही सुटू शकत नाही. दि. ८ फेब्रुवारी २०२५ रोजी बेटावद खुर्द (ता. जामनेर) येथे घरफोडीची घटना घडली होती. अज्ञात व्यक्तीने एका बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू लंपास केल्या होत्या. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस क्रमांक ६०/२०२५, भादंवि कलम ३०५ , 331 (४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. गुप्त माहितीवरून जामनेरमध्ये अटक: गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता, आरोपी जामनेर येथे लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामनेर येथे सापळा रचून आरोपीला अटक केली. पोलीस प्रशासनाची जलद कारवाई: 🔹 घरफोडीप्रकरणी तपास सुरू असताना, आरोपी जामनेर येथे असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.🔹 स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.🔹 बेटावद खुर्द (ता. जामनेर) येथील घरफोडी प्रकरणातील हा मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हेगारांवर वचक निर्माण करणारी पोलीस यंत्रणा या यशस्वी कारवाईमुळे पोलिस प्रशासनाने दाखवून दिले की, गुन्हेगार कितीही लपण्याचा प्रयत्न करत असले तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाहीत. पोलिसांच्या या त्वरित हालचालीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष योगदान: या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक डोमाळे , पो.हे.का विनोद पाटील , पो.ना रणजीत जाधव, पो.का ईश्वर पाटील, पो.का राहुल महाजन तसेच जामनेर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या उत्कृष्ट समन्वयामुळे आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली. पोलिसांचा नागरिकांना संदेश: ➡ कोणतीही संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.➡ गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.➡ घरफोडी, चोरी यासारख्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क आहे. गावकऱ्यांकडून पोलिसांचे कौतुक: या जलद कारवाईमुळे बेटावद खुर्द (ता. जामनेर) आणि जामनेर परिसरातील नागरिकांनी जळगाव पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे भविष्यात अशा कठोर कारवाया सुरूच राहाव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ➡ “कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Read More

जामनेर बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांचा दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्रांवर डल्ला..

जामनेर,दि.17. प्रतिनिधी~ जामनेरहून भुसावळ ला जाणाऱ्या बस मध्ये चढणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मंगळसूत्र लंपास केल्याची घटना घडली असून जामनेर बस स्थानक परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे पोलीस प्रशासनाने नियमित पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांतून केल्या जात आहे.∆सविस्तर वृत्त असे की,आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास जामनेर बस स्थानकात पुणे~भुसावळ बस क्र.MH.20,BL.4020 उभी होती आणि या ठिकाणी जामनेर हून कुऱ्हा(पानाचे) येथे जाण्यासाठी उभ्या असलेल्या जयश्री पाटील व प्रतिभा तायडे या दोन महिला बस मध्ये गर्दीत चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केले.चोरी झाल्याचा प्रकार लक्षात येताच या दोन्ही महिलांनी बस मधील प्रवाशांची ड्रायव्हर , कंडक्टर यांना झडती घ्यायला सांगितले.परंतु काहीही मिळून आले नाही.या दोन्ही महिलांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठत घडलेला प्रकार सांगितला.दोन्ही महिलांच्या फिर्यादी वरून जामनेर पोलीसात अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.राज्य सरकारने महिलांना एस.टी. प्रवास भाड्यात सवलत दिल्याने दिवसा गणिक एस.टी.ने प्रवास करणाऱ्यात महिला प्रवाशांची संख्या वाढत आहे.राज्यातील प्रत्येक बस स्थानका वर बसने प्रवास करणाऱ्या पुरुषां पेक्षा महिलांची अधिक गर्दी पाहायला मिळत आहे.सध्या लग्न सराई चे दिवस असून प्रत्येक बस स्थानकात प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे,या गर्दीचा फायदा घेत चोरीच्या घटना घडत आहेत.जामनेर बस स्थानकावर देखील प्रवाश्यांची दररोज गर्दी पाहायला मिळत आहे.गेल्या काही दिवसां पासून या बस स्थानकावर चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दर दिवसाआड येथे चोरीच्या घटना घडत आहेत.कुणाचा खिसा कापला जातो,तर कुणाची बॅग लंपास तर कुणाच्या गळ्यातील मंगळसूत्र,चैन,कानातील दागिन्यांवर चोरटे बिनधास्त डल्ला मारत असतात.सध्या बाजारपेठेत सोन्याचे दर हे दिवसागणिक गगनाला भिडत असून सर्वसामान्यांना आजघडीला सोने खरेदी करणे अवक्या बाहेरची बाब असतांना चोरट्यांची मात्र या चोरी सत्रामुळे चांगलीच चांदी होत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.काही वर्षांपूर्वी जुने बस स्थानक असताना या बस स्थानक परिसरात होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण रोखण्यासाठी स्वतंत्र पोलीस चौकी कार्यरत होती.मात्र नवीन बस स्थानक झाल्या नंतर या ठिकाणी एखादा पोलीस कर्मचारी देखील कार्यरत नसल्याने चोरट्यांचे चांगलेच फावले आहे.चोऱ्यांचे प्रमाण रोखण्यासाठी जामनेर पोलीस स्टेशनच्या वतीने या बस स्थानकावर नियमित दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून केल्या जात आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!