JBN Maharashtra News

JBN Maharashtra News Jalgaon मराठी वृत्त वाहिनी

जळगाव जिल्हा ठरतोय सक्षम भागीदार$1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रकल्प व कार्यक्रम व्यवस्थापन युनिट (DPPMU) मार्फत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. महाराष्ट्राच्या $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या ध्येयपूर्तीसाठी जिल्हा जळगावातील यंत्रणांच्या कामगिरीचा सखोल आढावा या बैठकीत घेण्यात आला. आजच्या बैठकीतील प्रमुख मुद्दे:• कृषी, आरोग्य, पर्यटन, वैद्यकीय सुविधा, उद्योग, वीज, जलव्यवस्थापन, शिक्षण आदी १६ क्षेत्रांतील प्रगतीचा तालुका स्तरावर आढावा.• जिल्हास्तरावर संस्थात्मक बांधणी (Institution Building) आणि गुणवत्तापूर्ण सेवा केंद्रांची निर्मिती या दिशेने मार्गदर्शन.• विभागीय समन्वय वाढवणे, कामांच्या वेळेत पूर्ततेसाठी नियोजन, व संकल्पनांची अंमलबजावणी यावर भर.• डेटा आधारित धोरणनिर्मितीसाठी विश्लेषण व प्रगती निर्देशांक तयार करण्याचे निर्देश. महत्त्वाच्या आगामी बैठका:• District Innovation Council ची बैठक – नाविन्यपूर्ण उपक्रमांची निवड व प्रोत्साहन.• Skill & Employment Conclave – कौशल्य विकास संस्था, उद्योग व तरुण यांच्यात समन्वय.• Export Branding Workshop – जळगावातील केळी, सोने, कापूस, प्लास्टिक यांचा आंतरराष्ट्रीय ब्रँडिंगसाठी विशेष योजना.• Infrastructure Taskforce बैठक – वीज, पाणी, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, वाहतूक व पायाभूत सुविधा या क्षेत्रांवर लक्ष. प्रगतिपथावर असलेले महत्त्वाचे उपक्रम:• जळगाव वैद्यकीय हब – आरोग्य सेवांमध्ये खाजगी गुंतवणूक व तांत्रिक पायाभूत सुविधा निर्माण.• केळी क्लस्टरचा विकास – निर्यातक्षम व प्रक्रिया आधारित सुविधा उभारणी.• पशुसंवर्धन क्लिनिक आणि डायल 1962 सेवा – पशु वैद्यकीय आपत्कालीन सेवा अधिक प्रभावी करणे.• MSME व SHG सक्षमीकरण – वित्त, प्रशिक्षण, मार्केट लिंक यामध्ये सहकार्य.• पर्यटन विकास – सापुतडा डोंगररांगा, धार्मिक व सांस्कृतिक स्थळांचा विकास.• शाश्वत शेती व जल व्यवस्थापन – सूक्ष्म सिंचन, जलसंधारण, आणि नवा जल व्यवस्थापन मॉडेल. 📊 DPPMU (District Project & Program Monitoring Unit) मार्फत या सर्व योजनांचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. यातूनच “Vision to Action” चा खरा अर्थ पूर्णत्वास जातो आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक, संस्था, उद्योजक आणि तरुणांनी या परिवर्तनामध्ये आपली भूमिका बजावावी. तुमचे कल्पक विचार, सहकार्य आणि पुढाकारच जिल्ह्याला राज्यात आदर्श बनवतील.

Read More

२५ वर्षांपासून सुरू असलेला शेत रस्त्याचा वाद सामोपचाराने मिटला!– मौजे हिंगणे (न.क.), ता. जामनेर येथे आदर्श समन्वयाची दखल

जामनेर तालुक्यातील मौजे हिंगणे (न.क.) येथे तब्बल २५ वर्षांपासून सुरू असलेला शेत रस्त्याचा वाद अखेर तहसील कार्यालय, जामनेर येथे दिनांक ०३ जुलै २०२५ रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान सामोपचाराने व आपसी समजुतीने निकाली काढण्यात आला. सदर वाद सन २००० पासून विविध न्यायालयात, तसेच मा. उच्च न्यायालयात देखील सुरू होता. या वादात गट क्र. २८ चे धारक प्रमिलाबाई विजयसिंग पाटील व इतर व गट क्र. ५३ चे प्रतिवादी कवरसिंग दयाराम पाटील यांच्यात शेत रस्त्याच्या वहिवाटीबाबत दीर्घकाळ संघर्ष सुरू होता. स्थानिक पातळीवर पोलीस पाटील सुभाष जुलालसिंग पाटील, तसेच जामनेर नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर यांनी मध्यस्थीचे महत्त्वपूर्ण कार्य पार पाडून दोन्ही पक्षकारांमध्ये समेट घडवून आणला. या सामोपचाराच्या निमित्ताने तहसीलदार जामनेर (नानासाहेब आगळे) यांच्या हस्ते दोन्ही पक्षकारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व गावातील नागरिकांनी याचे विशेष कौतुक केले. 🟩 प्रशासनाकडून विशेष आवाहन:जामनेर तालुक्यातील इतर शेतकरी बांधवांनी देखील शेत शिवारातील पानंद रस्ते, शेत रस्त्यांचे वाद व वहिवाट विषयक प्रश्न सामोपचारातून सोडवावेत, जेणेकरून न्यायालयीन खर्च, वेळ व मनस्ताप वाचेल आणि गावांमध्ये सामाजिक सलोखा व विकासास चालना मिळेल. अशा प्रकारचे समंजस निर्णय हा इतर गावांसाठीही आदर्श ठरेल

Read More

युवानेते विश्वजीत पाटील यांची जळगाव ग्रामीण राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी निवड, पक्षवाढी साठी व युवकांच्या विकासाच्या दृष्टीने जोमाने काम करणार विश्वजीत पाटील.

जामनेर तालुक्यातील पाळधी येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवानेते विश्वजीत मनोहर पाटील यांची खासदार शरदचंद्र पवार यांच्या आदेशाने तसेच प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या मान्यतेनुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी विश्वजीत मनोहर पाटील यांची नियुक्ती केली आहे. यावेळी निवडीचे पत्र देताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, युवकचे प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख हे उपस्थित होते. यावेळी जळगाव ग्रामीण चे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विश्वजीत पाटील यांनी बोलतांना सांगितले की, खा.शरदचंद्र पवार यांच्या विचारानुसार पक्षाचे ध्येय धोरणे घराघरात पोहचविण्याचे कार्य करणार असून पक्षाला बळकटी देऊन पक्ष वाढविण्याचे काम करणार आहे.तसेच युवकांचे प्रश्न व सर्वसामान्य युवकांच्या विकासाच्या दृष्टीने काम करणार असल्याचे सांगितले. त्यांच्या या निवडीचे जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे संपर्क प्रमुख डॉ.मनोहर पाटील,ज्येष्ठ नेते दिलीप खोडपे,दिगंबर दादा पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हार्दिक अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Read More

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर दक्षता पथकांची होणार स्थापना

मुंबई, : राज्यातील बांधकाम कामगारांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून त्यांच्याकडून आर्थिक फसवणूक करण्यासह शासनाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या बोगस बांधकाम कामगार आणि दलालांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध भागातून लोकप्रतिनिधी व बांधकाम कामगारांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नोंदणी, कीट वाटप व अन्य बाबतीत गैरप्रकार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून आता राज्यभरात जिल्हास्तरावर कामगारांची पडताळणी करण्यासाठी दक्षता पथके स्थापन करून प्रभावी तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. प्रत्येक विभागात, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा कार्यालय प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र जिल्हास्तरीय दक्षता पथक गठीत करण्यात येणार आहे. या पथकांचे कार्यक्षेत्र मात्र त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्याऐवजी दुसऱ्या जिल्ह्यावर असेल, जेणेकरून कारवाई अधिक निष्पक्ष आणि प्रभावी राहील. दक्षता पथकांना नेमून दिलेल्या जिल्ह्यांमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे होणारी नोंदणी, नोंदणीसाठी पैसे मागण्याचे प्रकार तसेच खोटे दाखले सादर करून मिळविले जाणारे लाभ या बाबींवर लक्ष केंद्रित करून तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. संबंधित दलालांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल. या मोहिमेसाठी क्षेत्रीय कार्यालयांना वाहन भाडेतत्वावर घेण्याची परवानगी देण्यात आली असून, तपासणीसाठी आवश्यक इतर खर्चही प्रशासकीय निधीतून नियमानुसार करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय दक्षता पथक प्रमुखांनी त्यांच्या कारवाईचा सविस्तर अहवाल विभागीय प्रमुखांना सादर करावयाचा आहे. विभागीय प्रमुख सर्व जिल्ह्यांचे अहवाल एकत्र करून आपल्या अभिप्रायासह मंडळ मुख्यालयास सादर करतील.ही विशेष तपासणी मोहीम प्रथम टप्प्यात १० जुलै, २०२५ अखेरपर्यंत राबविली जाणार आहे. या तपासणी दरम्यान ज्यांना काही तक्रारी असतील त्यांना त्या दक्षता पथकाकडे देता येतील. प्रत्येक पथकाने दरमहा किमान एक तपासणी करणे बंधनकारक असून, त्या तपासण्यांचे संकलित अहवाल मंडळास दरमहा सादर करणे आवश्यक राहील. या निर्णयामुळे राज्यातील बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्या दलालांवर प्रभावी आळा बसेल, अशी अपेक्षा कामगारमंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी व्यक्त केली आहे.

Read More

खाजगी क्लासमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; राज्य महिला आयोगाने घेतली तात्काळ दखल

बीड (प्रतिनिधी):बीड जिल्ह्यातील एका खाजगी क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा दोन प्राध्यापकांनी विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने संबंधित पोलिसांना तातडीचे निर्देश दिले आहेत. राज्य महिला आयोगाने बीड पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवून, संबंधित क्लासचे सीसीटीव्ही फुटेज तात्काळ ताब्यात घ्यावे, आरोपींना अटक होईपर्यंत क्लासची इमारत सील करावी, आणि इतर विद्यार्थिनींना विश्वासात घेऊन त्यांच्याकडूनही अशा प्रकारच्या तक्रारी असल्यास त्याचा संवेदनशीलतेने तपास करावा, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तसेच पीडित मुलीच्या तक्रारीची गंभीरतेने दखल घेऊन तिचे समुपदेशन करण्यात यावे, अशी ही शिफारस आयोगाने केली आहे. आयोगाच्या अध्यक्षा यांच्या निर्देशानुसार हे पत्र पाठवण्यात आले असून, संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना या प्रकरणी त्वरित कारवाई करून अहवाल आयोगाकडे पाठवण्यास सांगितले आहे. राज्य महिला आयोगाच्या सचिव दुर्गा माळी यांनी पाठवलेल्या या पत्रात, महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील अशा घटनांमध्ये तत्काळ आणि नियमबद्ध कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल असून आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी तपास पथक तयार करण्यात आले आहे.

Read More

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत बस पास योजना” अंतर्गत शालेय विद्यार्थिनींना बस पास वाटप – जामनेर आगार आपल्या दारी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जामनेर, ता. २६ जून – महाराष्ट्र शासनाच्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत बस पास वाटप योजने” अंतर्गत आज मोराड, बिलवाडी आणि मेणगाव या गावांमध्ये “जामनेर आगार आपल्या दारी” या अभिनव संकल्पनेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थिनींसाठी बस पासचे वाटप करण्यात आले. स्नेहदीप गरुड फाउंडेशन आणि जामनेर बस आगार यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित या उपक्रमात गावोगावी विद्यार्थिनींसाठी मोफत बस पास वितरणाची व्यवस्था करण्यात आली. या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी आवश्यक असणारी सुरक्षित व सुलभ प्रवास सेवा मिळणार आहे. कार्यक्रमास युवानेते स्नेहदीपभाऊ संजय राव गरुड यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्यासोबत गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक, पोलीस पाटील, तसेच गरुड महाविद्यालयाचे मुख्याध्यापक र.एस. चौधरी सर व सहकारी शिक्षक, गावातील प्रतिष्ठित पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जामनेर बस आगार तसेच शेंदुर्णी बस स्थानकाचे प्रतिनिधी श्री. भारुडे व मनोज पाटील यांनी विद्यार्थिनींना योजना आणि प्रवास व्यवस्थेबाबत माहिती दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना शिक्षणात अधिक संधी प्राप्त होणार असून, शासनाच्या या उपक्रमाचा ग्रामीण भागात सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

Read More

‘योग करा, निरोगी रहा’ मंत्राने इंदिराबाई ललवाणी विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा

जामनेर, दि. २१ जून २०२५ –इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,जामनेरपुरा येथे अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. सकाळी ७ वाजता शासकीय प्रोटोकॉलनुसार योग सत्राला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. समीर घोडेस्वार यांनी करताना “करो योग, रहो निरोग” या संकल्पनेवर आधारित योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावले. या कार्यक्रमात ओंकार, प्रार्थना, विविध योगासन, प्राणायाम, फेसिंग योग, हास्य योग, टाळ्यांचा व्यायाम आणि ध्यान यासारख्या अनेक प्रकारांचे सविस्तर प्रात्यक्षिक प्रा. समीर घोडेस्वार यांनी दिले. विद्यार्थ्यांनी या सर्व कृती हसत-खेळत आत्मसात केल्या. प्रा.दिनेश महाजन यांनी संतुलित आहाराचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम समजावून सांगितले, तर प्रा.सुमित काबरे यांनी फास्ट फूड व पॅकबंद पदार्थांचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांसमोर मांडले. कार्यक्रमास मुख्याध्यापक एस.आर. चव्हाण, उपमुख्याध्यापक एस.एन. चवरे, उपप्राचार्य प्रा.के.एन.मराठे, उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.के.डी. निमगडे, पर्यवेक्षक प्रा.जी.जी.अत्तरदे, माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक व्ही.जी.महाजन, पर्यवेक्षक पी.पी.चौधरी यांची विशेष उपस्थिती व मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन क्रीडा विभाग प्रमुख जी.सी.पाटील यांनी तर आभार प्रदर्शन बी.पी.बेनाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशामध्ये आर जी चौधरी, किशोर चौधरी, प्रितेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले. योग हा भारतीय संस्कृतीचा आत्मा असून तो नियमित केल्यास विद्यार्थी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम होतील, असा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला.

Read More

कुऱ्हाड ता पाचोरा येथे भारतीय जनता पार्टी विकसित भारत संकल्प सभा संपन्न

लोहारा ता. पाचोरा दि.१९कुऱ्हाड ता पाचोरा येथे भारतीय जनता पार्टी विकसित भारत संकल्प सभा संपन्नपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाखालील भाजपा सरकारला अकरा वर्षे पूर्ण झाली.विकसित भारताचा अमृत काळ सेवा, सुशासन ,गरीब कल्याणाची या अकरा वर्षाच्या काळातील लेखा जोखा मांडण्यासाठी मा. नामदार गिरीषभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शना खाली विकसित भारत संकल्प सभेचे आयोजन कुऱ्हाड येथे दि.१९ रोजी आयोजन करण्यात आले.या सभेचे अध्यक्ष पाचोरा तालुक्याचे माजी आमदार दिलीप ओंकार वाघ हे होते. सभेचे वक्ते जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, पंचायत समिती माजी सभापती सुभाष पाटील, कैलास चौधरी, शरद सोनार हे होते. यावेळी क्त्यांनी मोदीजींच्या काळात झालेली विकास कामे सांगितले. , तसेच कलम 35 अ,देशातील जनतेच्या भावनांची कदर करून ३७० वे कलम रद्द करण्याचा धाडसी निर्णय मोदी सरकारने घेऊन दाखवला. भारताने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला भारतीय सैन्य दलाने ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडले. पहलगाममधील दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानप्रेरित होता हे भारताने जगाला ठणकावून सांगितले.तसेच शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना, महा डीबीटी द्वारे शेतकऱ्यांना मिळणारे थेट अनुदान, शेतीसाठी लागणारे उपकरणे जसे की ट्रॅक्टर, रोटर, पेरणी यंत्र, उज्वला योजनेत मोफत गॅस सिलेंडर. तसेच शेतकऱ्यां साठी मागेल त्याला सोलर, सूर्य घर योजना, प्रधानमंत्री घरकुल आवास योजना कुठलीही पायपीट न करता मिळत असल्याचे सांगितले. खाजगी वाहनधारकांना तीन हजार रुपयां मध्ये वर्ष भारतासाठी नॅशनल हायवे वरील टोल साठी पास मिळत आहे.देशात ८० कोटी गरीब जनतेला दरमहा पाच किलो अन्नधान्य मोफत दिले जात आहे. अश्या अनेक योजना मोदीजींच्या काळात जनतेला मिळत आहे.मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा गेल्या अकरा वर्षांत कायापालट झाला आहे व होतो आहे. मोदी यांच्या नेतृत्वावर देशातील जनतेचा मोठा विश्वास आहेच, यापुढेही जनता त्यांना साथ देईल असा आम्हाला विश्वास आहे असे वक्त्यांनी सांगितले.यावेळी भाजपा पाचोरा पूर्व अध्यक्ष शोभाताई तेली,भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस मुकेश पाटील,शेतकी संघ संचालक शिवदास तात्या पाटील, प्रकाश पाटील, नरू बापू पाटील तसेच लोहारा-कुऱ्हाड-गोराडखेडा गटातील शेतकरी, नागरिक, भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते , गट प्रमुख, गण प्रमुख, शक्ती प्रमुख, केंद्रप्रमुख , बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख , विभागातील सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन, सदस्य ग्रामपंचायत सदस्य उपस्थितीत होते.प्रास्ताविक शरद सोनार, सूत्रसंचालन कैलास चौधरी तर आभार चंद्रकांत पाटील यांनी मानले.

Read More

पळासखेडे मिराचे येथे विकसित भारत का अमृत काल सेवा ११ सालनिमित्त पंचायत चौपाल सभेचे

पळासखेडे(प्रतिनिधी)जामनेर तालुक्यातील पळासखेडे मिराचे येथे विकसित भारत का अमृत काल सेवा सुशासन गरीब कल्याण के ११ साल निमित्त पंचायत चौपाल सभेचे आयोजन करण्यात आले होते मा ना पंत प्रधान नरेंद्र जी मोदी सरकारने भारतीय जनते साठी केलेल्या कल्याणकारी योजना हिताची कामे देश्याला प्रगती पथावर नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची माहिती वक्त्यांनी दिली राम मंदीर ३७० कलम ऑपरेशन सिंदूर अश्या अनेक गोष्टी उपस्थीत नागरिकांसमोर मांडल्या.कार्यक्रमांचे अध्यक्ष स्थानी प्रा शरद पाटील होते तर जामनेर पश्चिम मंडल अध्यक्ष कमलाकर भाऊ पाटील गट नेते अमर भाऊ पाटील अण्णा भाऊ पिठोडे संजय निराधार चे अध्यक्ष भगवान भाऊ इंगळे भैय्या शेठ अस्लम शेख अन्वर शेख शबीर शेख आशिष भाऊ रवी भाऊ पाचपोळे निवृत्ती भाऊ पाटील गोविंद भाऊ राजपूत संजय भाऊ पवार मंगल राजपूत अर्जुन मगर अरुण पवार विजू भाऊ पाटील व इतर मंडळी उपस्थित होते सूत्र संचालन रवि हडप यांनी केले तर आशिष दामोदर यांनी आभार व्यक्त केले

Read More

आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत भुसावळ येथे ‘योग संगम’ कार्यक्रमाचे आयोजन

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून “एक पृथ्वी, एक स्वास्थ्य के लिए योग” या धरतीवर या वर्षीचा ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन च्या “योग संगम” कार्यक्रमाचे आयुष मंत्रालय, भारत सरकार, सेंट्रल रेल्वे, भुसावळ विभाग व जिल्हाधिकारी जळगाव आणि भारतीय खेळ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत, भुसावळ येथील सेन्ट्रल रेल्वे मैदान येथे दि.२१ जून रोजी सकाळी ६ वा. आयोजित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री श्री.संजयजी सावकारे, भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडे, जळगाव जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, भारतीय खेळ प्राधिकरण क्षेत्रीय निदेशक श्री.पांडुरंग चाटे, श्री. राजेंद्र फातले यांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे. सदर ‘योग संगम’ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भुसावळ शहर व परिसरातील इच्छुक नागरिकांनी दि.२१ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या आधी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!