Headlines

पोलीस यंत्रणा कोमात,लोहारा परिसरात अवैध धंदे जोरात

प्रतिनिधी(गजानन क्षीरसागरलोहारा तालुका पाचोरालोहारा गावासह ग्रामीण भागातील गावोगावी अवैध धंदे जोरात सुरू आहेत, सट्टा,पत्ता,विषारी हातभट्टी दारू विक्री सुरू आहे. त्याचबरोबर विना परवाना देशी-विदेशी दारू विक्रीही जोमात चालू आहे. या विषारी हातभट्टी दारूमुळे अनेकजण मरण पावले आहेत. तर अनेकजण मरणाच्या दारावर आहेत. अनेकांचे दारूमुळे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या अवैध दारू विक्रेत्यांवर किरकोळ कारवाई केली जाते, तर या पकडलेल्या किती दारू विक्रेत्यांवर कोणत्या विभागात गुन्हे दाखल होतात. हा संशोधनाचा विषय आहे. अनेकवेळा महिन्यातून एकदा राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी खासगी गाडी घेऊन येतात. दारू विक्री करणार्‍यांना पकडतात. त्यांच्याकडून हजार रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंत रोख रक्कम घेऊन त्यांना त्याच ठिकाणी सोडून देतात. ही अवैध हातभट्टी दारू व विना परवाना देशी-विदेशी दारू विक्री राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी विभाग व पोलीस यंत्रणा यांच्या आशीर्वादाने जोमात सुरू आहे. याचा त्रास महिला, सर्वसामान्य नागरिक यांना होत आहे. गावामध्ये भांडण तंटे , मारामाऱ्या , दारू पिऊन अश्लील भाषेत शिवीगाळ करणे यामुळे लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. लोहारा गावात गल्ली-बोळात व्यावसायिकांनी हातभट्टी व देशी-विदेशी दारू विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. या विक्रेत्यांना हातभट्टी दारू पुरवठा करण्यासाठी तालुक्यातील अनेक भागात हातभट्टीचे केंद्रही सुरू केले आहेत. ही हातभट्टी दारू युरिया काही रासायनिक व केमिकल वापरून तयार केलेली असते. त्यातच खराब गूळ, इतर रासायनिक केमिकल यामुळे या दारूचा उग्र वास येत असतो. तसेच ही दारू कसल्याही भांड्यात, बाटल्यात, डब्यात व ट्यूबमध्ये भरली जाते. यामुळे ही दारू विषारी झाली आहे. ही हातभट्टी दारू ओढ्याला, डोंगरदर्‍या, झाडी यामध्ये राजरोसपणे उत्पादन केली जाते. याकडे पोलीस लक्ष देत नाही कारण त्यांचे फक्त हप्ते वसुलीवर लक्ष असते. लोहारा बस स्टँड परिसरामध्ये सट्टा पिढीचे,गावठी दारूचे दुकाने मोठ्या ताटात थाटले आहेत, पोलिसांना वेळेवर हफ्ते मिळत असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही असा सूर सर्वसामान्य जनतेमधून निघत आहे.सट्टा,गावठी दारूमुळे युवा पिढी बरबाद होतेय, तरुण मुले बापाच्या अगोदर स्वर्गवासी होत आहेत त्यांच्या घराचा आधार हिरावला जात आहे लोहारा दूर क्षेत्रामध्ये असलेले पोलीस कर्मचारी फक्त हप्ते घेण्यासाठी असतात का असा सवाल सर्वसामान्य जनता करीत आहे. लोहारा गावात आतापर्यंत झालेल्या चोरी प्रकरणांचा तपास का लागत नाही हा देखील एक संशोधनाचा विषय आहे. लोहारा परिसरातील अवैध धंदे लवकरात लवकर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून बंद करावेत अशी मागणी लोहारा परिसरातील गावकऱ्यांमधून होत आहे.

Read More

शिवसाई कन्स्ट्रक्शन ची हुकूमशाही सुरुकायद्याला न मानणाऱ्या या शिवसाई कंट्रक्शन ने माजवला हुकूमशाहीचा तांडव

दिनांक 01/112025 जे बी एन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (जब्बार तडवी) अवैध वृक्षतोड करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजने चे ही बोगस काम करून वाजवले रोड चे तीन तेरा.. मात्र अभियंता.. उप अभियंता गाढ झोपेत. या हुकूमशाहीला कंटाळून शेतकरी त्रस्त झाला आहे.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील नांदा. तांडा ते चारूतांडा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सध्याला कोट्यावधी रुपयांचे रोड चे काम सुरू आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे बोगस काम सुरू असून या कामावरती थातूरमातूर मुरूम निकृष्ट दर्जाचे बोगस मटेरियल वापरले जात आहे. त्यावरती रोलर ने व्यवस्थित दबाई केली जात नाही.त्यामुळे पूर्ण गिट्टी वरती पडलेली आहे तसेच या रोडला कोणतीही साईड ड्रम नाली काढलेली नाही त्यामुळे या ठिकाणी पाणी साचून शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची व शेताची मोठी हानी होऊन नुकसान होत आहे असा संताप जनक प्रकार शेतकऱ्यांनी सांगितला आहे. तसेच मुरमाचे खोदकाम सुरू असताना शिवसाई या कंट्रक्शनच्या मालकाने कोणतीही परवानगी न घेता सर्रासपणे अवैध रित्या सागवान,लिंब, व इतर प्रजातीच्या वृक्षांची सर्रासपणे पोकलँड च्या साह्याने कत्तल करून हुकूमशाही चा तांडव माजवलेला आहे. शिवसाई कंट्रक्शन हे बोगस काम करून कोट्यावधी रुपयांचा शासनाला चुना लावून शिवसाई कंट्रक्शन फक्त पैसा कमाविण्याचे एक गोरख धंदा करीत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले .मागील वर्षी याच कंट्रक्शन ने नांदा.गाव येथे पुलाचे निकृष्ट दर्जाचे बोगस काम केले होते.त्या संदर्भामध्ये गावकऱ्यांनी हे बोगस काम अडविले सुद्धा होते. व अनेक ग्रामस्थांची तक्रार सुद्धा होती त्याच पद्धतीने परत या रोडचे पूर्ण बोगस काम शिवसाई कंट्रक्शन ने सुरू केलेले आहे तरी या हुकूमशाही करणाऱ्या शिवसाई कंट्रक्शन वरती तात्काळ शासनाने, प्रशासनाने कारवाई करण्यात यावी अशी ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे. अवैध कत्तल केलेल्या वृक्षांचा पंचनामा अजिंठा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत सावळदबारा वन परिमंडळ च्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी हजर होऊन पंचनामा करून पुढील कारवाईसाठी तपास सुरू आहे

Read More

जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द परिसरात ढगफुटी:शेतकऱ्याचे अतोनात नुकसान-राष्टवादी कॉग्रेस नेत्यांची पाहणी, भरपाईसाठी शासनाला इशारा….

जे. बी. एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी-सुपडू जाधव आज बेटावद खुर्द परिसरात ढगफुटी झाल्यावर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे सर तालुका अध्यक्ष किशोर आप्पा पाटील बेटावद खुर्द परिसरात शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी केली शासनाने त्वरित पंचनामे करून योग्य भरपाई न दिल्यास लवकरच शेतकऱ्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चाचे आयोजन करू असा शब्द शेतकऱ्यांना दिला

Read More

छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकविला…

जेबीएन महाराष्ट्र न्यूजप्रतिनिधी जामनेर प्रतिनिधी. जब्बार तडवी दिनांक 01/11 /2025 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व कलागुणांना चालना देणारी आमची संस्था. संस्थाध्यक्ष भाऊराव कोलते पा.जय कालंका देवी शिक्षण संस्था संचलित छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थीनी तिने जिल्हास्तरीय एथलेटिक्स स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून तृतीय क्रमांक मिळवून संस्थेचा बहूमान वाढविला संस्थेच्या वतीने विद्यार्थिनीचा व क्रीडा शिक्षकांचा जाहीर सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत दरवर्षीय राज्यातील विविध शाळेतून क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात या क्रीडा स्पर्धेमध्ये प्रत्येक तालुक्यातून एक विद्यार्थिनी सोनम तडवी या विद्यार्थिनीने हा बहुमान पटकावून ही जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये तालुकास्तरावरती प्रथम क्रमांक पटकावला होता. यामधून विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होती ग्रामीण भागातील अतिशय होतकरू आदिवासी समाजातील अतिशय कष्टाळू व गरीब कुटुंबातील ही विद्यार्थिनी असून अभ्यासात हुशार असणारी परिस्थितीवर मात करत आपल्या कला व मेहनतीच्या बळावर तीन हजार मीटर स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळून शाळेचा व संस्थेचा बहुमान वाढवला. सोनम तडवी हिनी माध्यमांशी बोलताना सांगितले की मी दररोज व्यायाम व सकस आहार आणि कठोर मेहनत हेच माझ्या यशाचे गुपित असून यासाठी मला शाळेतील प्राचार्य संस्थाचालक व क्रीडाशिक्षकांचे वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन लाभले आहे त्यांच्या या मार्गदर्शनामुळेच मी आज हे यश मिळू शकले त्याबद्दल तिच्या घरच्यांनी व तिने स्वतः शाळेचे व संस्थेचे विशेष आभार मानले.जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे पार पडल्या सोनम कबीर तडवी बारावी वाणिज्य या मुलीने तृतीय क्रमांक पटकवून विद्यार्थ्यांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला त्याबद्दल संस्थाध्यक्ष भाऊराव कोलते व संचलाक मंडळ यांनी तिच्या जाहिर सत्कार केला तिच्या यशाबद्दल प्राचार्य नारायण कोलते यांनी क्रीडा शिक्षक जय राम घोती व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ही कामगिरी अतिशय चांगल्या प्रकारे बजावल्यामुळे त्यांचा सुद्धा सन्मान केला. या विद्यार्थिनीला माध्यमिक शिक्षणापासून क्रीडा शिक्षक विजय सिंग राजपूत भास्कर कमांड सुदामसिंगराठोड व डॉ. प्रा.जयराम घोती यांचे विशेष मार्गदर्शन होते याबद्दल सर्वांचे अभिनंदन करून आभार जीवन कोलते यांनी मानले.

Read More

भगवान सेना तर्फे डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी

भगवान सेना तर्फे डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी जामनेर (प्रतिनिधी)जामनेर तालुक्यातील भगवान सेना तर्फे डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात भगवान सेना प्रतिनिधींनी यांनी जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन सादर केले.या वेळी भगवान सेना जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, तालुकाध्यक्ष गजानन वासुदेव घ्यार, ज्येष्ठ समाजसेवक वसंत व्यवहारे, दत्तात्रेय नामदेव पाटील, प्रदीप तुकाराम पाटील, अतुल सुभाष पढार व शहराध्यक्ष जितेंद्र श्रीराम काळे उपस्थित होते.भगवान सेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यूमागील कारणांचा शोध घेऊन संबंधितांना शिक्षा होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत. या निवेदनावर शासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

Read More

जिल्हा परिषद प्रशाला अजिंठा येथे १९ वर्षांनंतर स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न

दि.२७.१०.२५२००५-०६च्या बॅचच्या माजी शिक्षक – विद्यार्थ्यांची शाळेत गाठीभेट,आठवणींना उजाळाअजिंठा येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे तब्बल १९वर्षांनंतर २००५-०६ च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात पार पडला.दिनांक २६ ऑक्टोंबर रोजी आयोजित या सोहळ्यासाठी माजी विद्यार्थी सकाळी ९.०० वाजता आपल्या जुन्या शाळेत एकत्र जमले आणि शाळेच्या आठवणींनी सर्वांचे डोळे पाणावले,कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेत नियमित परिपाठ घेण्यात आला. त्यामध्ये प्रतिज्ञा, प्रार्थना, राष्ट्रगीत आणि सुविचार घेण्यात आले. यानंतर शिक्षकांनी सर्वांना संस्कारपूर्ण जीवनाचे मार्गदर्शन केले. “कुटुंबात कसे राहावे, सासू-सासरे व आई-वडिलांचा आदर करावा, मोबाईलचा वापर मर्यादित ठेवावा आणि एकमेकांना नेहमी मदत करून संपर्कात राहावे” असे मौल्यवान विचार शिक्षकांनी मांडले.कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणी, अनुभव आणि शिक्षणानंतरच्या प्रवासाबद्दल मनोगत व्यक्त केले. माझा हा बेंच… तू इथे बसायचास…अशा जुन्या आठवणींनी शाळेच्या वर्गखोल्यांत भावनिक वातावरण निर्माण झाले. एकमेकांच्या कुटुंबांविषयी, व्यवसायांविषयी माहिती देत सर्वांनी बालपणीच्या दिवसांना उजाळा दिला.या स्नेहमिलन सोहळ्यास अध्यक्षस्थानी कुलकर्णी सर होते. मार्गदर्शन निळकंठ लोसरवार सर, शंकर गाडेकर सर, राजेंद्र सरदार सर, अण्णा जगताप सर, बनकर मॅडम, श्रीरामवार मॅडम, बोरसे मॅडम, रवी गौंड सर, विजय कालभिले, पवार सर, सोनावणे सर, पाटील मॅडम, काळे मॅडम, शारदा मॅडम व सीमा मॅडम यांनी केले.कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन डॉ. शवर्षा देशमुख,संध्या झलवार यांनी केले.या सोहळ्यात अश्विनी खंडेलवाल, विद्या देशमुख, नलिनी जाधव, ज्योती तायडे, उज्वला लाड, वैशाली पोळ, सोनू राठोड, पूजा वैष्णव, माया नैनाव, दिपाली चव्हाण, सुषमा मानकर, अंकिता चोंडिये, आरती झलवार, अनिता गुप्ता, अनिता आगवाल, भारती झलवार, तसेच विष्णू मुके शास्त्री (पत्रकार), दिपक मुके, विनोद सोनावणे, राहुल सपकाळ, अंकुश लोखंडे, गोपाल पैठणकर, सागर ढाकरे, राजू कासुधने, इम्रान शेख, जफर, अभिषेक, चेतन कुमावत, रितेश माली, विशाल खंडेलवाल, निलेश पवार आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.शिक्षकांना कार्यक्रमाची आठवण म्हणून माजी विद्यार्थ्यांनी समूह छायाचित्र फ्रेम भेटवस्तू म्हणून दिली,कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी शाळेतील शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि पुढील काळात असे स्नेहमेलन आयोजित करण्याचा निर्धार केला,प्रत्येक मनुष्य आजीवन विद्यार्थीच असतो. शाळेतील सुवर्णक्षणांनी आज पुन्हा एकदा आम्हा सर्वांना बालपणात नेले,” असे उपस्थित विद्यार्थ्यांनी भावनिकपणे सांगितलेस्नेह मिलन एक ऊर्जा देणारा कार्यक्रम. माणूसपण जपणाऱ्या व संस्कार घडवणाऱ्या अशा प्रेरक व मार्गदर्शक कार्यक्रमांचे आयोजन प्रत्येक शाळेमधून व्हायला हवे.

Read More

जामठी येथील महाजन विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा – “आठवणींचा सोहळा २०२५” उत्साहात संपन्न..

जे. बी. एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी-सुपडू जाधवजामठी, दि. २५ ऑक्टोबर (वार्ताहर)श्रीमती चि. स. महाजन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामठी येथे “माजी विद्यार्थी मेळावा – आठवणींचा सोहळा २०२५” हा सोहळा अत्यंत उत्साहवर्धक आणि भावनिक वातावरणात माजी विद्यार्थ्यांच्या स्वखर्चातून मोठ्या आनंदात पार पडला. या उपक्रमाने सन २०१० बॅचमधील माजी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शालेय जीवनातील सुवर्ण क्षणांची अनुभूती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. कैलास सत्रे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव श्री. भगवान महाजन, संचालक श्री. बी. इ. भुसारी, श्री. बी. सी. शेळके,श्री एम.ए.सत्रे तसेच मुख्याध्यापक श्री. पी. पी. पवार उपस्थित होते.कार्यक्रमास निवृत्त मुख्याध्यापक व शिक्षकवृंदांपैकी श्री. के. आर. पाटील, श्री. के. एस. बारी, श्री. एस. आर. तायडे, श्री. एस. टी. कोळी, श्री. एस. डी. महाजन, श्री. बी. डी. दांडगे, श्री. पी. डी. पाटील, श्री. पी. एस. सरोदे,श्री. जी.बी. गावंडे,श्रीमती पी. एस. पाटील, श्री. एस. एस. पाटील, श्री. जी. एस. पाटील, श्री. एन. पी. चौधरी, श्री. व्ही. आर. चौधरी,श्री.ए.आर.जंगले,श्री.एस.व्ही.पंडीत,श्री.के.बी.महाजन,श्री.अमित परखड, \ श्री.डि.यु.राठोड, श्री.सुधाकर गाढे, श्री. बावस्कर, श्री. गोरे श्री.चांगदेव सपकाळ तसेच शाळेतील सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन कोमल शर्मा व रोहन लोखंडे यांनी प्रभावीपणे केले.माजी विद्यार्थ्यांकडून विद्यालय परिसरात विविध फळझाडांची रोपं लावण्यात आली. तसेच २०१० च्या माजी विद्यार्थी संघातर्फे शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांना विशेष मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय यावेळी करून दिला.कार्यक्रमात श्री. के. आर. पाटील व श्री. एस. आर. तायडे यांनी आपली मनोगते व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा दिला. श्री. के. एस. बारी यांनी विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव एक सुंदर कविता सादर करून सर्वांना भावविभोर केले आणि मनोगत व्यक्त केले. तसेच श्रीमती पी. एस. पाटील मॅडम यांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व आनंद व्यक्त केला.माजी विद्यार्थ्यांनी स्वखर्चाने शाळेला ज्ञानदिप व मोठा फोकस लाईट यावेळी सप्रेम भेट दिला. मनोगतात श्री. रोहन लोखंडे यांनी १५ वर्षांनी संस्थेचा झालेला आमूलाग्र कायापालट, शिक्षकांच्या गोड आठवणी आणि शाळेबद्दलचे आत्मीय संबंध यांचा भावपूर्ण उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, “शाळा ही फक्त शिक्षणाची जागा नसून आयुष्याच्या पाया रचणारे मंदिर आहे. आज पुन्हा त्या आठवणींमध्ये रमण्याचा योग आला, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.” अध्यक्षीय भाषणात श्री. कैलास सत्रे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, संस्कार व सामाजिक जबाबदारी यांवर सखोल प्रकाश टाकला. त्यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. रोहन लोखंडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.या मेळाव्यामुळे विद्यालयाचा परिसर पुन्हा एकदा आनंद, आठवणी आणि भावनांनी ओथंबून गेला.

Read More

22 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या !

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर प्रतिनिधीजामनेर तालुक्यातील चिंचखेडा (तपोवन) येथील एका उच्चशिक्षित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र खळबळ उडाली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत तरुणाचे नाव शेखर श्रीराम पाटील (वय २२) असे आहे. तो बी.एस्सी. शिक्षण पूर्ण करून शेती करत होता. आज सकाळी शेखर शेतात गेला, परंतु काही वेळाने त्याने शेतातच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तत्काळ पोलिसांना याची खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उपविभागीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. शेखरच्या कुटुंबात आई-वडील आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. अभ्यासू आणि शांत स्वभावाचा म्हणून तो ओळखला जात होता. त्याच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. जामनेर पोलिस ठाण्याचे पथक पुढील तपास करीत आहे.

Read More

मका खरेदीत अडवणूक: तक्रार करा!जामनेर बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांचे आवाहन….

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधवजामनेर,समितीत मका खरेदी करताना व्यापान्यांकडून ओलसर असल्याचे कारण पुढे करून तो कमी दराने खरेदी करणे किंवा शेतकऱ्यांची अडवणूक करणे असे प्रकार केले जात असतील तर त्याची बाजार समितीकडे तक्रार करावी. जेणेकरून बाजार समिती प्रशासनाला संबंधित दोषी व्यापाऱ्याच्या विरोधात कारवाई करता येईल, असे आवाहन येथील बाजार समितीचे सभापती अशोक पाटील व सचिव प्रसाद पाटील यांनी केले आहे.सभापती श्री. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की या हंगामातील मक्याचा पेरा वाढल्याने उत्पादन वाढण्याची स्थिती आहे. परंतु बहुतांश शेतकरी एकाचवेळी मका विक्रीसाठी आणत असल्याने मका खरेदी केंद्रावर प्रचंड गर्दी होत आहे. विक्रीसाठी आणलेल्या मक्यामधील आर्द्रता तुर्तास जास्त असल्याने हा मका चाळविण्यासाठी बऱ्याच खरेदीदारांकडे जागेची अडचण आहे. त्यामुळे मका खरेदीत अडचणी उद्भवत आहेत, अनेक शेतकरी बांधवांनी त्यांचा मका हमी भावापेक्षा कमी दरात खरेदी होत असल्याच्या व व्यापाऱ्यांकडून त्यांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी आपला मका ‘एफएक्यू’ दर्जानुसार वाळवून सुकवून व टप्प्याटप्याने विक्रीसाठी आणावा, जेणेकरून आपली गैरसोय होणार नाही अथवा आर्द्रतेच्या अतिरिक्त प्रमाणामुळेआर्थिक नुकसान होणार नाही. बरेच शेतकरी ओला मका विक्रीची घाई करतात. त्यांनी देखील बाजारभावाचा व विक्री योग्य स्थितीचा अंदाज घेऊन घाबरून न जाता, योग्य वेळी माल विक्री करावा, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस राज्यात वादळी वारा व पावसाची शक्यता आहे. याचाही विचार करून मका विक्रीची घाई करू नये असे आवाहनही सभापती अशोक पाटील व सचिव प्रसाद पाटील यांनी केले आहे.

Read More

पाचोरा-भडगाव तालुक्याच्या आढावा बैठकीत कार्यसम्राट आमदार मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शन..!

प्रतिनिधी (गजानन क्षीरसागर)पाचोरा: -आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज पाचोरा येथील निर्मल सीड्सच्या कृषीदालनात चाळीसगावचे कार्यसम्राट आमदार मंगेशजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचोरा-भडगाव मतदारसंघातील आढावा बैठक उत्साहात पार पडली. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची रणनीती, संघटनात्मक बळकटी, तसेच गट आणि कार्यकर्त्यांची भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीदरम्यान आमदार मंगेश चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, “निवडणुका या फक्त राजकीय नव्हेत, तर विकासाचा आराखडा ठरवणाऱ्या असतात. प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाच्या विचारधारेसह विकासाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावा.” त्यांनी संघटनशक्ती आणि तळागाळातील संवादाचे महत्त्व अधोरेखित करत कार्यकर्त्यांना उत्साहाने कामाला लागण्याचे आवाहन केले.या बैठकीत काही नव्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेशही आमदार चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. बैठकीत दिलीपभाऊ वाघ, वैशालीताई सुर्यवंशी, अमोलभाऊ शिंदे, प्रताप हरी पाटील, अमोल नाना पाटील, मधुभाऊ काटे, सुभाष पाटील, संजय नाना वाघ, गोविंद शेलार, दीपक माने, शोभाताई तेली, अनिल पाटील, विनोद नेरकर यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.या आढावा बैठकीमुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवी उर्मी आणि संघटनात्मक एकात्मता जाणवली.

Read More
error: Don't Try To Copy !!