Headlines

जामनेर – टाकळी बुद्रुक येथे दुर्दैवी घटना – 43 वर्षीय युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू

जामनेर तालुक्यातील टाकळी (बुद्रुक) गावात शुक्रवारी (दि. २२ ऑगस्ट) संध्याकाळच्या सुमारास भीषण घटना घडली. गावातील निलेश मुरलीधर माळी (वय ४३) या व्यक्तीचा विहिरीत बुडून मृत्यू झाला असून, ही घटना गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त करत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मृत निलेश माळी आपल्या काही मित्रांसह गावाबाहेरील एका विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. दरम्यान त्याने विहिरीत उडी घेतली असता, डोक्याला जोराचा मार लागून तो बेशुद्ध झाला. त्यामुळे त्याला पाण्यातून वर येता आले नाही आणि त्याचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.घटनेनंतर मित्र व ग्रामस्थांनी तातडीने प्रयत्न करून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर त्याला तातडीने जामनेर येथील सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले.

Read More

भारतीय स्वातंत्र्य दिवस आणि भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री शांतीलाल मुथा यांच्या वाढदिवस हा दुहेरी संयोग

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर यानिमित्त जामनेर शाखेचे सर्व पदाधिकारी जळगाव जवळील दीपस्तंभ फाउंडेशनच्या “मनोबल प्रकल्पाला” भेट देऊन सदर प्रकल्पाला ₹ 11000 चा धनादेश देऊन मदत केली. देशामध्ये कुठेही नैसर्गिक आपत्ती असल्यास सढळ हाताने मदत करणारे संघटनेचे सर्वेसर्वा शांतीलालजी मुथा सरांना आतापर्यंत खूप सारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.मुथा सरांनी वाघोली येथे भूकंपग्रस्त, अनाथ,आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य यांच्यासाठी निवासी वसतिगृह आणि 1 ली ते 12 वी पर्यंत मोफत शिक्षण पूर्ण करू शकतात अशी सुविधा केली आहे.आजपर्यंत 4500 विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. मनोबल हा भारतातील पहिला पूर्ण निवासी प्रशिक्षण प्रकल्प आहे, जो स्पर्धा परीक्षा आणि व्यक्तिमत्व विकासासाठी मोफत कोचिंग पुरवतो.विशेषत: दिव्यांग व्यक्ती, अनाथ विद्यार्थी, ट्रान्स युवक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी जळगावपासून फक्त 5 किमी अंतरावर असलेल्या कुसुंबा गावात सुमारे 3 एकर (1,00,000 चौरस फूट) परिसरात हा प्रकल्प वसलेला आहे.आजपावेतो 1,385 पेक्षा अधिक दिव्यांग विद्यार्थी, 224 अनाथ विद्यार्थी, आणि 3,940 आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांना आधार देऊन स्वयंरोजगार,शासकीय नोकऱ्या आणि खाजगी क्षेत्रात रोजगार, अशा प्रकारे प्रभावी करिअर मार्गदर्शन देण्यात येतो. सदर कार्यक्रमात विनयजी पारख सर आणि सौ संगीता मंडलेचा यांनी संघटनेबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात बीजेसचे विनयजी पारख-राज्य उपाध्यक्ष,सुमित मुनोत-खानदेश उपाध्यक्ष, विकास कोठारी-जिल्हा उपाध्यक्ष, संकल्प लोढा-शहर सचिव,दर्शन बागमार-सदस्य,तसेच सौ संगीता मंडलेचा-महिला जिल्हा सचिव,सौ मनीषा कोठारी-सदस्य,सौ वंदना चोरडिया-सदस्य,सौ जयश्री लोढा-सदस्य,मनोबलचे मातोश्री सुमती महाजन,राजेंद्र पाटील सर,सिद्धेश्वर देशमुख आणि कर्मचारी वर्ग आदी हे उपस्थित होते

Read More

जामनेर तालुका – अतिवृष्टीग्रस्त क्षेत्राची पाहणी

जामनेर तालुक्यातील रोटवद , नाचणखेडा व लाखोली परिसरातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राची पाहणी दिनांक १८.०८.२०२५ रोजी मा. अपर जिल्हाधिकारी श्री. विजयकुमार ढगे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार जामनेर ,स्थानिक पदाधिकारी व अधिकारी कर्मचारी यांच्यासमवेत करण्यात आली. सदर पाहणी दरम्यान संबंधित गावाचे सरपंच, पोलिस पाटील, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, साहाय्यक कृषी अधिकारी, महसूल मंडळ अधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. बाधित कुटुंबांची पाहणी अतिवृष्टीमुळे मौजे लाखोली येथील कुटुंब प्रमुख उस्मान तेजबशहा फकीर, शांताबाई देवराम चौधरी, नामदेव काशिनाथ पाटील व माणिक भील यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झालेले आहे. याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. शेती नुकसानीची पाहणी• मौजे भिलखेडा शिवार गट क्र. 35/3 धारक श्री. विद्याधर रघुनाथ पाटील• मौजे नाचणखेडा शिवार गट क्र. 8 धारक श्री. विलास अशोक चौधरी• मौजे रोटवद शिवार गट क्र. 29, 184, 274, 193, 194 व 190 धारक श्री. भारत काशीनाथ देशमुख, सौ. कमलाबाई शालिक देशमुख, सौ. मीना भगवान देशमुख, श्री. विजय शालिक देशमुख, श्री. शालिक गोवा देशमुख व श्री. राजू शालिक देशमुख यांच्या शेतशिवारालगतच्या नाल्यात पूरस्थिती निर्माण होऊन कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आले. प्रशासनाचे निर्देश मा. अपर जिल्हाधिकारी यांनी बाधित शेतकरी व नागरिकांशी संवाद साधून शासन स्तरावर करण्यात येत असलेल्या मदत व उपाययोजना याबाबत माहिती दिली. तसेच संबंधित ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून प्रस्ताव सादर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

Read More

श्रावण सोमवारी सर्पराजाचे श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरात दर्शन, पाळधी येथील सर्पमित्र नाना माळी यांच्याकडून जीवदान.

पहूर (ता. जामनेर) :श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी पहूर येथील देवळी आणि गोगडी नद्यांच्या संगमावरील श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरात एका अनोख्या प्रसंगाचे साक्षीदार भाविक झाले. मंदिराच्या गाभाऱ्यात सर्पराजाने दर्शन दिले .सायंकाळी पूजा-अर्चेच्या वेळी मंदिरात अचानक सात ते आठ फूट लांबीचा साप दिसून आला. तात्काळ या घटनेची माहिती पाळधी येथील सर्पमित्र नाना माळी यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येत अत्यंत शिताफीने व काळजीपूर्वक सापाला पकडले. त्यांनी सांगितले की हा साप धामण जातीचा बिनविषारी असून तो मानवाला धोका पोहोचवत नाही.सर्पराजाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या साहसी व पर्यावरणपूरक कार्याबद्दल श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टतर्फे ईश्वर हिवाळे,बाबुराव घोगडे यांनी सर्पमित्र नाना माळी व त्यांचे सहकारी प्रा.ईश्वर चोरडिया यांचे अभिनंदन केले. त्यांच्या पर्यावरण रक्षणाच्या कार्याची उपस्थित भाविकांनी स्तुती केली.सर्प व पर्यावरणाचे रक्षण ही काळाची गरज आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

Read More

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,क्रीडा व युवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणेजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव द्वारा आयोजित तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत वाकोद विद्यालयाचे यश

दि.02/08/2025 वार शनिवार जामनेर येथे ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय आज 14 वर्ष,17 वर्ष,19 वर्ष वयोगटातील मुले व मुली तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या. यात राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयातील14 वर्षे वयोगटात (मुले)52 किलो वजन गटात कु. कार्तिक रणजीत सोनेत17 वर्ष वयोगटात (मुले)48 किलो वजन गटात कु. गोपाल आनंद सोनेत19 वर्ष वयोगटात(मुली) 57 किलो वजन गटात कुमारी गायत्री रणजीत सोनेत विजय होऊन जिल्हास्तरावर निवड झाली या निवडीबद्दल संस्थेचे चेअरमन आदरणीय दादासाहेब श्री. संजयरावजी गरुड संस्थेचे व्हा. चेअरमन आबासाहेब श्री.भीमराव शेळके संस्थेचे सचिव काकासाहेब श्री.सागरमलजी जैन संस्थेचे सहसचिव दादासो श्री.यु.यु.पाटील संस्थेचे कार्यालयीन सचिव भाऊसाहेब श्री.दीपकरावजी गरुड ,वस्तीगृह सचिव सूर्यवंशी भाऊसाहेब संस्थेचे सर्व संचालक मंडळ जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष आदरणीय श्री. अशोक भाऊ जैन जैन फॉर्म वाकोद व्यवस्थापक आदरणीय श्री. विनोद सिंहजी राजपूत गावचे सरपंच, पोलीस पाटील, पंचक्रोशीतील गावकरी,खेळाडूंचे पालक शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस.टी.चिंचोले पर्यवेक्षक श्री एन.टी.पाटील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वस्तीगृहाचे कर्मचारी, यांनी खेळाडूचे कौतुक केले.

Read More

तोंडापूरच्या जैन विद्यालयात टिळक, साठे यांना अभिवादन

अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित निबंध स्पर्धेत् लहान गटातून श्रद्धा, तर मोठ्या गटातून दिव्या पाटील प्रथम———————————- तोंडापूर ता जामनेरयेथील शेंदुर्णी शिक्षण संस्था संचलित श्रीमती र सु जैन माध्यमिक विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सतीश देशमुख होते तर व्यासपीठावर मुख्याध्यापक पी डी रोनखेडे के एस माळी एस पी पाटील उपस्थित होतेयावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जामनेर तालुका यांच्या माध्यमातून आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करून प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली या परीक्षेचे समन्वयक व परीक्षक म्हणून आर सी लोडते यांनी काम केलेअंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल275 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलालहान गटप्रथम : श्रद्धा अनिल रायपूरेद्वितीय : लोकेश सुपडू जिरीतृतीय : सृष्टी मनोज चौधरी मोठा गटप्रथम : दिव्या दीपक पाटीलद्वितीय : गणेश संजय काटकरतृतीय : वैशाली धनराज गव्हले, गायत्री गव्हारेदोन्ही गटातून 16 विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आलेयावेळी आर एस पाटील के व्ही देशमुख मुख्याध्यापक पी डी रोनखेडे यांनी मनोगतातून मार्गदर्शन केले याप्रसंगी पार्थ पाटील वैभवी मुके कोमल गव्हाणे आदी विद्यार्थ्यांनी देखील मनोगते व्यक्त केले .श्री देशमुख यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले सूत्रसंचलणं आर सी लोडते यांनी केले तर आभार अमोल साळुंके यांनी मानलेकार्यक्रमावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Read More

महसूल सप्ताह २०२५ अंतर्गत “हरित शिवरस्ता” उपक्रम — सोनारी – मालदाभाडी रस्त्यावर दुतर्फा वृक्षारोपण!

जामनेर तालुका महसूल विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या महसूल सप्ताह २०२५ अंतर्गत सोनारी – मालदाभाडी शिवरस्त्यावर दुतर्फा वृक्ष लागवड मोहीम मोठ्या उत्साहात पार पडली. या उपक्रमामागील उद्देश शिवरस्त्याच्या अधिकृत हद्दीत कोणतेही अतिक्रमण होऊ नये आणि पर्यावरणपूरक व हरित ग्रामविकासास चालना देणे हा होता. यासाठी मोजणी विभागाने निश्चित केलेल्या सीमारेषेनुसार रस्ता हद्द निश्चित करून, त्या दोन्ही बाजूंनी वृक्षारोपण करण्यात आले. या प्रेरणादायी उपक्रमात मंडळ अधिकारी मालदाभाडी, ग्राम महसूल अधिकारी मालदाभाडी, सोनारी व वाघारी, सोनारी व मालदाभाडी येथील सरपंच, पोलीस पाटील, तसेच ग्रामस्थांचे उत्स्फूर्त सहकार्य लाभले. कार्यक्रमात शेकडो वृक्षांची लागवड करण्यात आली. “झाडे लावा, झाडे जगवा”, “शिवरस्त्याला हरित कवच” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या उपक्रमाच्या माध्यमातून महसूल विभागाने एक नवा पायंडा पाडत, शासनाच्या महसूल रस्त्यांच्या जतनासोबतच हरित विकासाचा नवा मार्ग निर्माण केला आहे. स्थानिक ग्रामपंचायतीमार्फत वृक्षांची देखभाल व संरक्षणाची जबाबदारीही स्वीकारण्यात आली आहे. ⸻ “हरित शिवरस्ता – सुरक्षित व सुंदर ग्रामविकासाचा पाया!”

Read More

शेंदुर्णी येथे प.पू. हरिप्रसाद महाराज पुण्यतिथी संगीत रजनीसह उत्साहात साजरी

शेंदुर्णी ता.जामनेर,येथे कमल किसन नगरात दादासाहेब संजयरावजी गरुड यांच्या निवासस्थानापासून परमपूज्य कै.हरिप्रसाद महाराज यांच्या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी,हरिप्रसाद महाराज यांच्या पणती विजया वाजपेयी यांची प्रमुख उपस्थिती होती प्रथमतःपालखी सोहळ्याचे पूजन व माल्यार्पण पंडित दादा गरुड, दादासाहेब संजयरावजी गरुड, ताईसो सरोजिनी गरुड,राहुल गरुड,शिवराज गरुड,स्नेहदीपजी गरुड,प्रियानंदा गरुड,रक्षंदा गरुड,माधुरी चव्हाण मॅम,कोमल देशमुख मॅम,यांच्या समवेत महेश भदाणे व सौ.उमा भदाने यांच्या हस्ते पूजन व मल्ल्यार्पण करण्यात आले.याप्रसंगी ढोल ताशांच्या गजरात दिंडी सोहळ्याची मिरवणूक वाजत गाजत संपूर्ण गावभर काढण्यात आली.या अनुषंगाने लेझीम पथक,टिपरी पथक,वृक्षदिंडी,एनसीसी कॅडेट पथक,यासह संत ज्ञानेश्वर,मुक्ताई, सोपानदेव निवृत्ती यांनी चालविलेली निर्जीव भिंत वेशभूषा आरास देखावा त्याचबरोबर विठ्ठल रुक्माई वेशभूषा देखावा या सर्वांचे,आरास देखावाउभारण्यात आले.या सर्व दिंडी सोहळ्याची सांगता वीस देवडी जवळ करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत दादासो यु.यु.पाटील, शांताराम बापू गुजर, सुधाकर आण्णा बारी,शिवपूजे मॅडम,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.चौधरी सर, गरुड प्राथमिक च्या मुख्याध्यापिका सौ.दामिनी गरुड, पर्यवेक्षक व्ही.एम.शिरपुरे,विनोद पाटील इत्यादी उपस्थित होते. या निमित्ताने प्राचार्य आर.एस चौधरी यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कारासह हरिप्रसाद महाराज यांच्या पणती विजया वाजपेयी यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार बरोबर आर एस चौधरी यांनी हरिप्रसाद महाराज यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला.याबरोबर रात्रीच्या कीर्तन सोहळ्यात ह.भ.प.पांडुरंग महाराज आवरकर यांनी त्यांचे अमृत बोल कथन केले. संध्या रजनी कार्यक्रम दादासाहेब संजयरावजी गरुड,काकासो.सागरमल जैन,शांताराम बापू गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत संगीत रजनी कार्यक्रम घेण्यात आला.याप्रसंगी संगीत विशारद श्रीमती मीनाक्षी शर्मा,उर्मिला ताई शिवपुजे,सुरेश भाऊ गर्गे,तबलावादक पांडुरंग पाटील, सोपान पाटील,एडॅ.पारळकर,दिग्विजय सूर्यवंशी व इतर पत्रकार बांधव,गाव परिसरातील,नागरिक,रसिक स्रोते शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक, प्राध्यापिका यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही एम शिरपुरे यांनी केले तर आभार डी.बी पाटील यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Read More

ग्रामीण विकासात आजच्या युवतींची भूमिका मोलाची

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जनविश्वास सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात संजयदादा गरुड यांचे प्रतिपादन शेंदुर्णी येथील आप्पासाहेब रघुनाथराव गरुड महाविद्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संयुक्त आयोजित सजग युवती-सक्षम युवती उपक्रमाच्या व्याख्यान कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संजयदादा गरुड यांनी अध्यक्षपदावरून ग्रामीण भागातील रचनेत आणि विकासात युवतींचा सहभाग आणि भूमिका अत्यंत मोलाची आहे असे मत मांडले.युवती केवळ कुटुंबाचा नव्हे,तर ग्रामीण समाजाचा देखील अविभाज्य घटक असल्याने त्यांनी आत्मविश्वासाने आपल्या क्षेत्रात भरारी घेतली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या जनविश्वास सप्ताहामागील विवेचन युवती काँग्रेसच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षा कु.भाग्यश्री विवेकानंद ठाकरे यांनी मांडले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर नाना पाटील,जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शिंदे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव थोरात,शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे सचिव सागरमल जैन,युवा नेते स्नेहदीप गरुड,नगरसेवक धीरज जैन तसेच जंगीपूरा येथील उपसरपंच मनोज पाटील यांची विशेष उपस्थिती होती. चौकट (1)अत्यंत मौलिक विषयांवर युवतींना मिळाले मार्गदर्शन : या उपक्रमात युवतींसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.ॲड.केतन सोनार यांनी ‘सोशल मीडिया हाताळताना युवतींनी घ्यावयाची काळजी’ या विषयावर दैनंदिन घडामोडी,फेक न्यूज,ऑनलाइन फसवणूक याविषयी सजग राहण्याच्या दृष्टीने सउदाहरण विदयार्थीनींना अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात व्याख्यान दिले.ॲड. उमेश मराठे यांनी ‘युवती व कौशल्य विकास कार्यक्रमातून उपलब्ध संधी’ या विषयावर विवेचन करताना कौशल्य विकास म्हणजे केवळ पार्लर किंवा शिवणकाम पुरते मर्यादित नसून, सामाजिक आणि व्यवसायिक क्षेत्रातही युवतींना अनेक संधी असल्याचे असे आपल्या व्याख्यानातून नमूद केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.संजय भोळे, आर.एस. चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन दिनेश थोरात यांनी केले तर आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य साळुंखे यांनी मानले. चौकट (2) वटवृक्षारोपण व दहा युवतींना रोपांची जबाबदारी : ‘एक झाड माझ्या दादांचं…!’ या उपक्रमांतर्गत राष्ट्रवादी युवती काँग्रेसने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दहा विद्यार्थिनींना वटवृक्षाचे रोप भेट देत त्यांच्याकडून जगविण्याचे वचन घेतले. यावेळी संस्थेच्या आवारात अध्यक्ष श्री. संजयदादा गरुड यांच्याहस्ते वटवृक्ष लावण्यात आले तृप्ती बारी,रोहिणी गुजर,नेहा न्हावी, वृषाली पाटील, गायत्री पाटील, कोमल म्हस्के, सानिया गुजर, निकिता पाटील, आरती पाटील आणि योगेश्वरी वाघ या दहा युवतींनी झाडांचे संगोपन करण्याचा संकल्प केला.

Read More

संत शिरोमणी सावता माळी महाराज पुण्यतिथी समाधी सोहळ्याचे पाळधी येथे आयोजन.

श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त पाळधी तालुका जामनेर येथे भव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमांमध्ये गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा मार्फत आदर्श कामगार पुरस्कार २०२५ मिळवलेल्या व आपल्या गावचे भूमिपुत्र गरवारे टेक्निकल फायबर इंडस्ट्रीज वाई येथे कार्यरत असणारे श्री दत्तात्रय खंडू जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला.सामाजिक कार्यक्रमांमध्ये श्री दत्तात्रय जाधव यांचा नेहमीच एक चांगला उत्कृष्ट सहभाग असतो, ज्यामध्ये वृक्षारोपण असेल शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत असेल समाजकार्य असेल या सर्वांची दखल घेऊन श्री संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून माळी समाज पंच अध्यक्ष श्री दगडू आनंदा माळी व उपाध्यक्ष देवेंद्र गोरे तसेच गावातील माजी सरपंच दिगंबर माळी ग्रामपंचायत सदस्य दीपक माळी पंच कमिटी व समाज बांधव यांच्या हस्ते सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता..

Read More
error: Don't Try To Copy !!