जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर
जामनेर प्रतिनिधी
जामनेर येथे सकल मराठा समाजाची महत्वाची बैठक उत्साहात व संघटनात्मक वातावरणात पार पडली. आगामी राज्यव्यापी कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर समाजबांधवांना संघटित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
राजमाता जिजाऊ यांच्या माहेरचे वंशज शिवाजी राजे जाधव यांचे मार्गदर्शन
शिवाजी राजे जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनात राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज अधोरेखित केली.
राजमाता जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेडराजा ते स्मृतीस्थळ पाचाड

(रायगड) या जिजाऊ अभिवादन यात्रेत जामनेर तालुक्यातून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले. ही यात्रा केवळ श्रद्धेची नसून मराठा समाजाच्या एकतेचे व विचारप्रसाराचे प्रभावी माध्यम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अशोक शिंदे यांचे विचार
अशोक शिंदे यांनी आपल्या भाषणात मराठा समाजाने आपल्या गौरवशाली इतिहासाची जाणीव कायम ठेवावी, असे आवाहन केले.
राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांवर आधारित संघटनात्मक कार्य उभारणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी ब्रिगेड अन्यायाविरुद्ध ठामपणे आवाज उठवत असून समाजाच्या प्रत्येक प्रश्नात सक्रियपणे हस्तक्षेप करत आहे. समाजातील एकोपा वाढवून न्यायासाठी लढण्याची भूमिका अधिक मजबूत करण्याचे त्यांनी आवाहन केले.
अध्यक्षीय भाषण – प्रकाश पाटील
कार्यक्रमाचे अध्यक्ष भाग्योदय कलेक्शनचे श्री. प्रकाश पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठा समाजातील तरुणांना उद्योग-व्यवसाय क्षेत्रात पुढे येण्याचे आवाहन केले.
छोटा असो वा मोठा व्यवसाय, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करणे

आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक तरुण उद्योजकाच्या पाठीशी संपूर्ण मराठा समाज ठामपणे उभा आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक – राहुल चव्हाण
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल चव्हाण यांनी केले.
त्यांनी सांगितले की, १४ जून ते १७ जून दरम्यान होणाऱ्या जिजाऊ अभिवादन यात्रेसाठी ग्रामपातळीवर बैठका आयोजित करून मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. मागील तीन वर्षांपासून आपण यात्रेत सहभागी होत आहोत, मात्र यंदा विक्रमी सहभाग नोंदवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
इतर मान्यवरांची उपस्थिती
या बैठकीस अशोक आप्पा जाधव, समाधान वाघ, सुपडू पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत दिलीप खोडपे सर, व्ही.पी. पाटील सर, पप्पू पाटील, कैलास पाटील, ईश्वर पवार, अशोक पाटील, दिलीप पाटील, ईश्वर चवरे, रवि बंडे, सागर पाटील, दिपक पाटील, राहुलरॉय मुळे, सागर मराठे यांच्यासह
असंख्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल ठोंबरे यांनी केले.
या बैठकीतून मराठा समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी ठोस दिशा देण्यात आली असून, आगामी जिजाऊ अभिवादन यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात जनसहभाग घडवून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
