जळगाव महानगरपालिका स्थायी समितीत अरविंद देशमुख यांची निवड

जळगाव (प्रतिनिधी) – पहूर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून राजकारणात आलेल्या अरविंद देशमुख यांनी जळगाव शहराच्या राजकारणात पुन्हा एकदा आपली छाप पाडली आहे. जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी विजय मिळवल्यानंतर आता सुमारे 2000 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्प असलेल्या महानगरपालिकेच्या स्थायी समितीवर त्यांची निवड झाली आहे.महानगरपालिकेची स्थायी समिती ही आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. शहरातील विकासकामे, विविध प्रकल्पांची मंजुरी, खर्चाचे नियोजन आणि आर्थिक धोरणांबाबतचे महत्त्वपूर्ण निर्णय या समितीत घेतले जातात. त्यामुळे देशमुख यांची या प्रभावी समितीत झालेली निवड जळगाव शहरासाठी आणि त्यांच्या समर्थकांसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.अरविंद देशमुख यांची ओळख केवळ नगरसेवक म्हणून मर्यादित नसून ते महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू सहकारी व ‘संकटमोचक’ कार्यकर्ता म्हणूनही ओळखले जातात. जिल्ह्यातील विविध राजकीय घडामोडींमध्ये त्यांनी प्रभावी नियोजन व संघटन कौशल्य दाखवत नेतृत्वाला बळकटी दिली आहे.स्थायी समितीतील त्यांच्या कामगिरीकडे आता जळगावकरांचे लक्ष लागले असून, शहराच्या विकासाला गती देण्यासाठी ते ठोस आणि परिणामकारक निर्णय घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Read More

शेंदुणी येथे गरुड विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

जामनेर तालुक्यातील ‘धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को ऑप सोसायटी लिमिटेड’, शेंदुर्णी संचालित आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी ता जामनेर जि जळगांव येथील शाळेच्या प्रांगणात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न.कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजयरावजी गरुड होते.प्रमुख वक्ते हर्षल पाटील, संस्थेचे सचिव काकासो सागरमल जैन, संस्थेचे सह सचिव दादासो यु यु पाटील, शेंदुर्णी नगरपंचायत स्विकृत सदस्य बापुसाहेब शांताराम गुजर, माजी उपसभापती (पंस,जामनेर) अण्णासो सुधाकर बारी, कार्यालयीन सचिव भाऊसाहेब दिपकराव गरुड, लोकमत प्रतिनिधि दिपक जाधव, पुण्यनगरीचे पत्रकार विलास आहेरे, लोकशाहीचे प्रतिनिधि ॲड देवेंद्र पारळकर, माजी उप-मुख्याध्यापक एच डी चौधरी, प्राचार्य आर एस चौधरी, उप-मुख्याध्यापक बी एम कुमावत, पर्यवेक्षक जे एस जुबळे, विनोद पाटील, आदि उपस्थित.कार्यक्रमाची सुरुवात ईश्वस्तवन व स्वागत गिताने तसेच मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती, ब्रम्हीभूत हरी प्रसाद महाराज, संस्थेचे विश्वस्त आचार्य गजाननराव गरुड, संस्थेचे प्रेरणास्रोत अण्णासो भास्कराव खंडेराव गरुड आदिंच्या प्रतिमांचे पुजन तसेच माल्यार्पण करून करण्यात आली.सदर प्रसंगी मान्यवरांचे प्रेमवस्त्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य आर एस चौधरी यांनी केले.विद्यार्थी मनोगत खुशी डामरे, अविनाश चव्हाण, अमोल चव्हाण यांनी करत शाळेबदल तसेच शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.शिक्षक मनोगत एल पी मोहणे यांनी व्यक्त केले.सदर प्रसंगी गांधी रिसर्च फाउंडेशन,जळगांव यांच्या वतीने गांधी विचार परीक्षेत जिल्ह्यात यश संपादन केल्याबद्दल सई मराठे, मानसी पाटील या विद्यार्थ्यांनींना पदक व प्रमाणप्रत्र देऊन गौरवण्यात आले.अतिथी मार्गदर्शन काकासाहेब सागरमल जैन यांनी करत मुलांचे मन जिंकून अनेक प्रेरणादायी उदाहणे दिली.प्रमुख वक्ते हर्षल पाटील यांनीही मुलांशी संवाद साधून येणाऱ्या परीक्षेबाबत योग्य मार्गदर्शन करत काॅफी पासून दुर रहा, अपयशाने खचुन जाऊ नका, भाषेमधील साम्यता, कला साहित्य यांच्याशी जोडलेले रहा, जगन तुमचे समृद्ध करा, शब्दांचे सामर्थ्य, बाजारामध्ये चातुर्याने पैसे कसे कमाऊ शकता आदी मुद्द्यांवरही विद्यार्थ्यांशी संवाद साधला.कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासाहेब संजयरावजी गरुड विद्यार्थी यांनी काॅफी मुक्त परीक्षेला सामोरे जाण्याबाबत, संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढीला महत्व दिले, अपयशाने खचुन न जाता यशाची पहीली पायरी बनवा पुढे स्पर्धात्मक परीक्षा देण्याबाबत मागदर्शन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुत्रंसचलन पी जी पाटील यांनी केले.शेवटी आभार डी बी पाटील यांनी मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

Read More

वाकडी येथे बसस्थानक परिसरासह अवैध धंदे दारुचा व सट्टाचा महापूर

====================वाकडी.ता.जामनेर.दि.०३/०२/२६ वाकडी बसस्थानक सह परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारुचा महापूर सुरू असून यात अनेकांचे संसार उद्धवस्त झाले,बसस्थानक परिसरात खुले आम अवैधधंदे बोकाळाले असतांनाही या दारु विक्रेत्यांवर पोलीसांकडून कुठलेही कार्यवाही होत नसल्याने गावातील नागरिक ञस्त झाले आहे, महिला वर्ग शालेय विध्यार्थी हैराण झाले आहे गावात गेल्या अनेक दिवसांपासून गावांच्या चारही बाजूंनी अवैध दारुची खुलेआम विक्री होत असून यात अनेक जवान तरुण व्यसनाच्या आहारी गेले आहे , मुली-बाळीचे संसार उद्धवस्त होत आहे, बराच मुली विधवा झाल्या आहेत, त्याचे संसार उघड्यावर पडले आहे नवीन निवडुन आलेल्या सरपंच व सभासदांना च्या वतीने गावातील दारू बंद व्हावी यासाठी पहूर पोलिस ठाणे येथे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लेखी ठराव दिला, काही वेळा पुरती वाकडी येथील दारुवाल्याचे धाबे दणाणले होते, परंतु पुन्हा देशी दारूचा महापूर बसस्थानक परिसरात चालू आहे,त्याच्यावर कोण्याच्याही लगाम नाही, किंवा दचक नाही, बसस्थानक परिसरात देशी, इंग्लिश,गावठी, दारूचा महापूर चालू आहे, दारू विक्रेत्यांवर पोलीसांच्या वचक दिसून येत नाही असे गावकरी मधून चर्चा करताना दिसत आहेत ,अवैध दारू विक्रेत्यांनी धुमाकूळ घातला आहे त्यावर वरिष्ठ स्तरांवर कार्यवाही अशी मागणी गावकरी करीत आहेत.

Read More

जैन इंटरनॅशनल स्कूल, जामनेर येथे विज्ञान व भाषा प्रदर्शन उत्साहात संपन्न

जामनेर | प्रतिनिधीजैन इंटरनॅशनल स्कूल, जामनेर येथे दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी विज्ञान तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी विषयांचे प्रदर्शन उत्साहात पार पडले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक मॉडेल्स, प्रयोग, भाषाविषयक चार्ट, कविता तसेच सर्जनशील लेखन सादर करून आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे सचिव आदरणीय श्री. मनोज कुमारजी कावडिया व संस्थेचे सदस्य आदरणीय श्री. मयूर कावडिया प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका फिरोजा खान मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रदर्शनास शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना व सादरीकरणाचे कौतुक केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, भाषिक कौशल्ये तसेच सर्जनशीलतेला चालना मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Read More

माळपिंपरी येथील कृषीदुतांनी मधुरम नर्सरीला दिली भेट. नर्सरी व्यवस्थापनाची माहिती घेतली जाणून.

जामनेर (प्रतिनिधी):- डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथील अंतिम वर्षातील कृषिदूत सुशांत जाधव, पवन बुवा , संग्राम पवार आणि सौरभ पाटील यांनी प्राचार्य डॉ. शैलेश तायडे आणि कार्यक्रम समन्वयक प्रा. बी. एम गोणशेटवाड , कार्यक्रम अधिकारी प्रो. व्हि.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मधुरम नर्सरी येथे भेट देऊन गट चर्चा प्रात्यक्षिक राबविले. मधुरम नर्सरीचे संचालक मा.श्री.योगेश पाटील यांनी रोपवाटिका (Nursery) व्यवस्थापन म्हणजे बियाणे, कलमे यांपासून रोपे तयार करणे, त्यांची योग्य निगा राखणे (पाणी, खत, कीटकनाशके), आणि योग्य पद्धतीने विक्री करणे यासाठीचे नियोजन होय. यशस्वी नर्सरीसाठी वनस्पतींची गरज, सिंचन, खत व्यवस्थापन, तापमान नियंत्रण, रोग-कीड नियंत्रण आणि मार्केटिंगचे ज्ञान आवश्यक आहे, ज्यात नियोजनबद्ध काम आणि रोपांविषयीची आवड यांची माहिती जाणून घेतली.

Read More

जामनेर तालुक्यातील २० नागरिकांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी,४ हजारांहून अधिक नागरिकांना मिळाला लाभ

जळगाव : राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या ‘गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षा’च्या माध्यमातून जामनेर तालुक्यात आरोग्य सेवेचा मोठा यज्ञ सुरू आहे. नुकतेच या अभियानांतर्गत २० रुग्णांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या. विशेष म्हणजे, या उपक्रमाद्वारे आतापर्यंत ४ हजार पेक्षा अधिक नागरिकांच्या डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टीदान देण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभागया मोहिमेत तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने आपली सेवा बजावली. यामध्ये प्रामुख्याने डॉ. प्रवीण पाटील, डॉ. मयूरी राठोड, डॉ. प्रियंका पाटील, डॉ. सोबीया अन्सारी, डॉ. विलास बाविस्कर यांनी रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या. टीम वर्क आणि समन्वयशस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले. यामध्ये इनचार्ज सिस्टर सुनीता वक्ते, अधिपरिचारक सागर कोळी आणि हिरा पालवी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या संपूर्ण अभियानाचे नियोजन आणि अंमलबजावणी ‘गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षा’चे समन्वयक तथा आरोग्यदूत पै. शिवाजी रामदास पाटील आणि समाजसेविका रुचिता चौधरी यांनी केली. खाजगी रुग्णालयातील शस्त्रक्रियेचा खर्च परवडत नसलेल्या ग्रामीण भागातील गरजू नागरिकांसाठी हे अभियान वरदान ठरत आहे. ‘प्रत्येकाला उत्तम आरोग्य आणि दृष्टी मिळावी’ या ध्येयाने प्रेरित होऊन हे कार्य अविरत सुरू असून, लाभार्थ्यांनी मंत्री गिरीश महाजन आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार मानले आहेत.

Read More

करिअरच्या नव्या क्षितिजांकडे प्रेरणादायी वाटचाल-निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये रोटरी क्लबतर्फे व्याख्यान…!

पाचोरा :रोटरी क्लब पाचोरा-भडगावच्या वतीने “करिअरच्या विविध संधी” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये करण्यात आले. समाजहितासाठी नेहमीच उपक्रम राबवणाऱ्या रोटरी क्लबने विद्यार्थ्यांच्या भविष्यास दिशा देणारा हा उपक्रम राबवला.या कार्यक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या अमर्याद संधींविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. “प्रामाणिकपणा, सातत्य आणि परिश्रम या तीन मंत्रांनी यशाचे शिखर गाठता येते,” असा प्रेरणादायी संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि ध्येयदर्शन दिले.या प्रसंगी निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्षा मा. वैशालीताई सूर्यवंशी, निर्मल सीड्सचे संचालक डॉ. जे. सी. राजपूत, शाळेचे सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, रोटरी क्लब पाचोरा-भडगावचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली, सचिव डॉ. अजयसिंग परदेशी, प्राचार्य गणेश राजपूत, तसेच रोटरी उपप्रांतपाल भरत सिनकर, डॉ. प्रशांत सांगडे, डॉ. सिद्धांत तेली, डॉ. स्वप्नील पाटील, पिंकी जिनोदिया, लक्ष्मण जाधव, शाळेचे जनसंपर्क अधिकारी आय. बी. सिंग, समन्वयिका स्नेहल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली यांनी आपल्या भाषणात सांगितले की,“एकजुटीने आणि सेवाभावाने कार्य केल्यास कोणताही उपक्रम यशस्वी ठरतो; समाजसेवा हीच खरी समाधानाची दिशा आहे.”कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि आभारप्रदर्शन शाळेच्या समन्वयिका स्नेहल पाटील यांनी केले.करिअरविषयक मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांच्या मनात नव्या उमेद, नवे विचार आणि उज्ज्वल भविष्याचे स्वप्न उजळून निघाले.

Read More

राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद;

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा जाहीर राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद; जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा जाहीर मुंबई (प्रतिनिधी):राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तारखांची अधिकृत घोषणा करण्यात आली. या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली असून प्रशासकीय तयारीलाही वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १६ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक प्रक्रिया जाहीर होणार असून त्याच दिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १६ ते २१ जानेवारीदरम्यान पार पडणार आहे. अर्जांची छाननी २२ जानेवारी रोजी केली जाणार आहे. उमेदवारांना २७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारी घेता येणार असून त्यानंतर दुपारी ३.३० नंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती आयोगाने दिली. दरम्यान, निवडणुका शांततेत व पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निवडणुकांकडे राज्यातील राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून येत्या काही दिवसांत प्रचाराला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read More

भारतीय जैन संघटनेतर्फे जामनेरला बालकांसाठी विविध कार्यक्रम संपन्न

जे. बी. एन महाराष्ट्र न्यूज जामनेर( जामनेर -प्रतिनिधी )- येथील भारतीय जैन संघटनेतर्फे बाल दिनानिमित्त पाच वर्षापासून ते वीस वर्षापर्यंतच्या बालकांसाठी महावीर भवन येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन बाल दिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात बालकांसाठी खो-खो,संगीत खुर्ची,रस्सीखेच,पास कप खेळांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धाही ठेवण्यात आल्या होत्या या स्पर्धेत 115 बालकांनी सहभाग नोंदविला. ज्या मुलांनी स्पर्धेत विजय मिळवला त्यांना बक्षिसे देण्यात आली. राकेश हिरालालजी संचेती हे प्रायोजक म्हणून होते.जळगाव जिल्हा महिला विंग जिल्हाध्यक्षा सोनल कोठारी यांनी सुत्रसंचलन केले. खानदेश विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत, जिल्हा उपाध्यक्ष विकास कोठारी, माजी जिल्हा कार्याध्यक्ष शितल लोढा, जय बोहरा, रितेश कोठारी, विशाल ओस्तवाल एवं बीजेएस महिला अध्यक्षा सौ. मोना चोरडीया, सदस्या सौं जयश्री लोढा, सौ. सोनाली सिसोदीया, महावीर पाठशाळा प्राध्यापक सौ. वनमाला कोठारी, सौ वैशाली बागमार, सौ. सपना ब्रम्हेचा, सौ. ऊषा पोरवाल, सौ. रोशनी भंडारी, सौ.शितल संचेती, सौ. नमिता चोपडा,आदी पदाधीकारी उपस्थित होते. प्रोजेक्ट हेड म्हणून विकास ललवाणी, सौ दिपाली चोरडिया यांनी काम पाहीले.

Read More

भागदारा येथील २५ वर्षीय तरुणाचा अपघात जागीच मूत्यू….

जे. बी. एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर तालुक्यातील कोदोली रस्त्यावर डांगी फॉर्मजवळ आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात जीवन जगन्नाथ चव्हाण (जोगी), वय २५, रा. भागदारा या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. होंडा लिओ मोटरसायकल व रिक्षाची जोरदार धडक होऊन हा अपघात घडला.मिळालेल्या माहितीनुसार, जीवन चव्हाण हे व्यवसायाने सेंटिंग कामगार होते. त्यांचे आई-वडील दोघेही हयात नाहीत. त्यांच्या मागे पत्नी, ४ वर्षांचा मुलगा आणि ३ वर्षांची मुलगी असा कुटुंबाचा आधार असलेली दोन लहान मुले आहेत. अचानकच आलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.धडकेत डोक्याला गंभीर मार बसल्याने जीवन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. विवाहित असून कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.स्थानिक नागरिकांकडून शासनाने या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.या अपघातामुळे भागदारा परिसरात शोककळा पसरली आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!