उज्वला दिपक तायडे यांची बिनविरोध नगरसेवक पदी निवड,भाजपाची 27-0 च्या दिशेने वाटचाल

जामनेर (प्रतिनिधी) जामनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी आज संपन्न झाली या छाननेत वार्ड क्रमांक 11 ब च्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार उज्वला दीपक तायडे या बिनविरोध झाले आहेत त्यांच्या विरोधातील मंगला – भगवान खोडपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता उमेदवारी अर्जतील प्रतिज्ञापत्र चूक असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननी दरम्यान बाद ठरवला आहे. यामुळे मंत्री गिरीश महाजन यांचे स्वियसहाय्यक दीपक तायडे यांच्या सौभाग्यवती उज्वला दीपक तायडे या बिनविरोध निवड झाल्याची घोषणा याप्रसंगी करण्यात आली.बिनविरोध झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे मतदाना आधीच नगरसेवक पदाचे पहिले खाते उघडले आणि यामुळे सर्वत्र जामनेर तालुक्यामध्ये चर्चेला उधाण आले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी तसेच जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांनी उज्वला दीपक तायडे यांना पुष्पगुच्छ दिले तर भाजपा पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेसमोर फटाके फोडत पुष्पगुच्छ देत विजयी उमेदवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Read More

जामनेर नगरपरिषद निवडणूक : प्रभाग 12-अ मधून अरविंद शांताराम तायडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जामनेर – नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होताच प्रभाग क्रमांक 12-अ मध्ये राजकीय तापमान चढले आहे. अजित पवार गटाकडून अरविंद शांताराम तायडे यांनी आज दिमाखात आपला उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक लढविण्याची अधिकृत घोषणा केली. अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांची उपस्थिती, उत्साह आणि घोषणाबाजी यामुळे परिसरात निवडणुकीची रंगत चांगलीच वाढलेली दिसली. समाजसेवक, सक्रिय युवा नेता म्हणून प्रभागात ठसठशीत ओळख निर्माण केलेले अरविंद तायडे गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत आहेत. नागरिकांशी थेट संवाद, सामाजिक कार्यात सहभाग आणि प्रभागातील मूलभूत सुविधांसाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यांची जनसंपर्काची मजबूत पकड निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना तायडे म्हणाले, “पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता यांसह नागरिकांच्या दैनंदिन अडचणींना प्राधान्य देऊन काम करणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. जनतेचा विश्वास जिंकून त्यांच्या अपेक्षांवर खरे उतरण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.” तायडे यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग 12-अ मध्ये चुरस अधिक तीव्र होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. युवा मतदारांमध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे बोलले जात असून, अंतिम टप्प्यात कोणाच्या बाजूने जनमत कलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read More

शेंदुर्णी नगरपंचायतीच्या निवडणुकीत आज तब्बल ४० जणांनी भरले नामनिर्देशन पत्रनगराध्यक्ष पदासाठी गोविंद अग्रवाल अमृत खलसे यांचेही अर्ज दाखल

शेंदुर्णी ता.जामनेर प्रतिनिधीदि.२ डिसेंबर रोजी होत असलेल्या शेंदुर्णी नगरपंचायतीच्या निवडणुकीत आज नगरपंचायत कार्यालयात उमेदवारांनी प्रचंड गर्दी केली होती.आज तब्बल ४० जणांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले.यात नगराध्यक्ष पदासाठी ४ जणांनी तर सदस्यांसाठी ३६ जणांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.भाजपच्या वतीने निवडणुक लढवणाऱ्यांची मोठी यादी असुन महाविकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी सौ.उज्वला काशिद यांनीही आपला अर्ज दाखल केला असुन भाजपचे दोन दिग्गज नेते गोविंद अग्रवाल अमृत खलसे यांनी सुद्धा आज अर्ज दाखल केले आहेत.पक्षाच्या वतीने आपल्यालाच ए.बी.फॉर्म मिळेल अशी सगळ्याच इच्छुकांची आशा आहे.अजुन काही दिग्गज नेते नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे कळते आहे.मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले उमेदवार यंदाच्या निवडणुकीत मात्र हम साथ साथ है असे चित्र असुन सगळ्याच इच्छुकांनी एकत्रीत आपल्या वार्डात घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला आहे.आता पर्यंत नगराध्यक्ष पदासाठी ५ तर सदस्यांसाठी ४२ जणांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.मतमोजणी अप्पासाहेब र.भा.गरुड महाविद्यालयाच्या इनडोअर स्टेडियम मध्ये होणार आहे.निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नानासाहेब आगळे सहायक निवडणुक अधिकारी मुख्याधिकारी विवेक धांडे हे आहे.

Read More

प्रभाग क्रमांक 12 मधून राजू चौधरी इच्छुक

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी सुपडू जाधवजामनेर शहरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असूनअनेक इच्छुक उमेदवार आपले उमेदवारी पक्षाकडून जाहीर व्हावे अशी मागणी करत आहेत. परंतु वाकी रोडवरील रहिवासी व राजू ऑटो गॅरेज चे संचालक राजू ईश्वरलाल चौधरी हे कोणत्याही पक्षाला उमेदवारी न मागता प्रभाग क्रमांक 12 मधून अपक्ष उमेदवार म्हणून लढणार आहेत.सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर म्हणून राहिलेले राजू ईश्वरलाल चौधरी हे नेहमी सामाजिक कार्यात व इतरांच्या सुखदुःखात सहभागी असतात सर्वांना परिचित असलेले राजू चौधरी हे एक व्यावसायिक असून त्यांचा चांगला जनसंपर्क आहे त्यामुळे त्यांनी कोणत्याही पक्षाकडे तिकीटाची सरळ मागणी न करता आपल्या परीने अपक्ष उमेदवार म्हणून आपण लढणार आहोत असे सांगितले. त्यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे प्रभागातील राजकिय समीकरण चांगलेच बदलू शकते राजू चौधरी यांच्या अपक्ष उमेदवारामुळे कोणाला फायदा व कोणाला तोटा होईल हे आता येणाऱ्या काळातच समजेल राजू चौधरी यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चा रंगू लागले आहे त्यामुळे समीकरणे हे निश्चित बदलणार आहेत.

Read More

दुभाजकावर धडकून कारने घेतला पेटगर्भवती पत्नीचा जळून मृत्यू ; पती जखमीअर्ध्यावरती डाव मोडला . . . अधुरी एक कहाणीपहूर – वाकोद मार्गावर घडली दुर्घटना

पहूर ता जामनेर रस्ता दुभाजकावर धडकलेल्या कारने क्षणात पेट घेतला आणि भडकलेल्या ज्वाळांमध्ये गर्भवती मातेचा दुर्दैवी जळून मृत्यू झाला तर कारचालक पती जखमी झाल्याची दुर्घटना जळगाव – छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग ७५३ एफ वर पहूर वाकोद दरम्यान दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली .याबाबत अधिक माहिती अशी की , संग्राम मोरे ( रा . पूलमखेडा , ता . जि . बुलढाणा ) हे भुसावळ तालुक्यातील सासूरवाडीहून छत्रपती संभाजीनगरकडे पहूरमार्गे पत्नी जान्हवी संग्राम मोरे यांच्यासह मारुती ग्रँड व्हिटारा कारने जात होते . दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांची कार वाकोद नजीक येताच समोरच्या डिव्हाइडरवर धडकली .कार डिव्हायडर वर धडकताच मोठा आवाज झाला आणि क्षणात गाडीने पेट घेतला . काही कळायच्या आतच कारमधून प्रचंड ज्वाला आणि धुराचे लोट बाहेर पडू लागले . अशाच अवस्थेत वाहनचालक संग्राम मोरेबाहेर पडले मात्र कार मध्ये असलेल्या त्यांच्या पत्नी जान्हवी संग्राम मोरे ( वय २१ वर्षे ) या मात्र आगीच्या ज्वाळांनी होरपळून जागीच मृत्युमुखी पडल्या . घटना घडतात महामार्गावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश पाटील , परेश महाजन यांच्यासह स्थानिक नागरिक व ये -जा करणाऱ्या प्रवाशांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला .घटनेची माहिती मिळताच पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कोठारे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली .जखमी अवस्थेत असलेले संग्राम मोरे यांना तात्काळ पहूर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले . डॉ .राहुल निकम ,डॉ . जितेंद्र राजपूत ऋषिकेश भालेराव व सहकार्यांनी प्रथमोपचार केले .पुढील उपचारासाठी संग्राम पाटील यांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे . मयत जान्हवी मोरे यांचे शवविच्छेदन पहूर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले . दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ . राहुल निकम यांच्या खबरीवरून पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कोठारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे . अग्निशमन दलाचे प्रयत्न –शेंदुर्णी नगर परिषदेच्या अग्निशमन दलास घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते . वाकोद येथील रहिवाशांनी देखील टँकरद्वारे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला . उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट –दरम्यान पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहाम यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली . अर्ध्यावरती डाव मोडला . . . अधुरी एक कहाणी मार्च महिन्यात जान्हवी आणि संग्राम यांचा विवाह झाला होता . सुखी संसाराचे स्वप्न रंगवत लवकरच आपण आई होणार असल्याची चाहूल जान्हवी यांना लागली होती . मात्र दुर्दैवाने सहा महिन्यांचे बाळ उदरात असताना कारमध्येच अग्निज्वाळांच्या भडक्यामुळे जान्हवी मोरे यांची प्राणज्योत मालवली . कारमध्ये सीएनजी गॅस ?नेमका स्पोट कशामुळे झाला ? याबाबत घटनास्थळी वेगवेगळे तर्क लावले जात होते . कार सीएनजी गॅस इंधनावर होती की पेट्रोलवर याविषयी आरटीओ इन्स्पेक्शन मधून माहिती समोर येणार आहे . तथापि या घटनेमुळे पहूर आणि वाकोद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .

Read More

जामनेर तालुक्यात महाविकास आघाडीची बैठक संपन्न — नगरपालिका निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय

जामनेर (प्रतिनिधी) :जामनेर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक प्रकाश पाटील यांच्या मातोश्री निवासस्थानी पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा गट) आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन आगामी नगरपालिका निवडणूक एकत्रितपणे, महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला. या बैठकीस शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख श्री. योगीराज पाटील, जिल्हा संघटक अशोकभाऊ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपभाऊ खोडपे, डिके दादा पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष किशोर पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख ॲड. प्रकाश पाटील, उपतालुकाप्रमुख सुधाकर शेठ सराफ, शहरप्रमुख निशामुद्दीन शेठ, नानाभाऊ जंजाळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष एस. टी. पाटील, सौ. ज्योत्स्ना विसपुते, ॲड. चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीत सर्व पक्षांनी एकजुटीने काम करण्याचा आणि जामनेर नगरपालिकेत सत्ता प्रस्थापित करण्याचा निर्धार व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत जामनेरमधील राजकीय समीकरणांमध्ये चुरस वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

Read More

जामनेर : सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधवजामनेर शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले श्री. प्रदीप गायके, श्री. मनोज महाले, श्री. जीवन सपकाळ, प्रवीण गावंडे, यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.जामनेर निवास स्थानी महाराष्ट्राचे मंत्री श्री. गिरीशभाऊ महाजन यांनी नवागत कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत बाविस्कर, ज्येष्ठ नेते श्री. जे. के. चव्हाण, जामनेर शहर मंडल अध्यक्ष श्री. रविंद्र झाल्टे, जिल्हा सरचिटणीस श्री. आतिष झाल्टे, श्री. जितेंद्र पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाची जामनेर शहरातील संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.

Read More

निवडणुकांचा वाजला बिगूल 2 डिसेंबरला मतदान 3 डिसेंबरला निकाल

1.आज पासून आचारसंहिता सुरू2.१० नोव्हेंबरला नामनिर्देशक पत्र भरता येणार.3.आयोगाच्या वेबसाईटवर इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज भरू शकतील.4.निवडणूक ईव्हीएम द्वारा होणार.5.१ कोटी ७ लाख ३हजार ५७६ मतदार हक्क बजावतील.6.दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टार असणार-आयोग7.१७ नोव्हेंबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख8.२ डिसेंबरला मतदान,३ डिसेंबरला मतमोजणी.9.मतदारांच्या सोयीसाठी मोबाईल ॲप निवडणूक आयोग10.मतदारसंघ निहाय मतदार याद्या ७ नोव्हेंबरला प्रसिद्ध होतील*.11.२४६नगरपरिषदा ४२ नगरपंचायती निवडणुकांची घोषणा12.उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी तारीख २१ नोव्हेंबर २०२५13.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम तारीख १७ नोव्हेंबर

Read More

देवदूत म्हणून धावला पंकज रक्तदान करून वाचविले 15 वर्षीय मुलीचे प्राण..

प्रतिनिधीजामनेर तालुक्यातील मोयखेडा दिगर येथील गजानन कानळजे ‘रा. मोयखेडा दिगर यांची 15 वर्षाची मुलगी आजारी असल्याने रुबी हॉस्पिटल येथे उपचार घेत होती उपचारादरम्यान तिला अर्जंट दुर्मिळ हे AB- निगेटिव्ह रक्तगट असलेला प्लेटलेटची गरज होती परंतु संपूर्ण जळगाव मधील ब्लड बँक शोधून सुद्धा ब्लड मिळत नव्हती तेव्हा मात्र संपूर्ण परिवार हताश होऊन मुलीच्या वडिलांच्या व नातेवाईकांच्या डोळ्यात पाणी आले आणि नातेवाईकांनी व्हाट्सअप च्या माध्यमातून शोध सुरू केला एबी निगेटिव्ह रक्तगटाचा नातेवाईकांनी व्हाट्सअप ग्रुप मध्ये रक्तदाता हवाय असा मेसेज व्हायरल केला.जामनेर शहरातील एका व्हाट्सअप ग्रुप मध्ये अर्जंट एबी निगेटिव्ह रक्तदाता हवाय असा मेसेज पाळधी येथील तरुण पंकज धनगर याने बघितला कोणताही क्षणाचा विलंब न करतात्या मुलीच्या वडिलांना कॉल करून विचारणा केली असता त्या मुलीचे वडील ढसाढसा रडायला लागले व माझ्या मुलीला वाचवा असे विनवणी करू लागले तेव्हापंकज धनगर तात्काळ जळगाव येथील रेड क्रॉस ब्लड बँकेत जाऊन पंकज धनगर यांनी आपले अमूल्य रक्तदान करून त्या मुलीचे प्राण वाचवले.यावेळी कमलाकर पाटील,नितीन धनगर,सर्व रेडक्रॉस ब्लड बँक कर्मचारी उपस्थित होते.पंकज हा देवदूत म्हणून वेळेवर आला व मुलीचा जीव वाचवला या मदतीवरून माणुसकीवरचा विश्वास अजून दृढ झाला असेच म्हणावे लागेल.त्या मुलीला अजून पाच AB- निगेटिव्ह रक्तगट असलेला रक्तदाता हवाय कुणी एबी निगेटिव्ह रक्तदाता असेल त्यांनी डॉ देवानंद सरताळे 8975661500 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Read More

पोलीस यंत्रणा कोमात,लोहारा परिसरात अवैध धंदे जोरात

प्रतिनिधी(गजानन क्षीरसागरलोहारा तालुका पाचोरालोहारा गावासह ग्रामीण भागातील गावोगावी अवैध धंदे जोरात सुरू आहेत, सट्टा,पत्ता,विषारी हातभट्टी दारू विक्री सुरू आहे. त्याचबरोबर विना परवाना देशी-विदेशी दारू विक्रीही जोमात चालू आहे. या विषारी हातभट्टी दारूमुळे अनेकजण मरण पावले आहेत. तर अनेकजण मरणाच्या दारावर आहेत. अनेकांचे दारूमुळे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या अवैध दारू विक्रेत्यांवर किरकोळ कारवाई केली जाते, तर या पकडलेल्या किती दारू विक्रेत्यांवर कोणत्या विभागात गुन्हे दाखल होतात. हा संशोधनाचा विषय आहे. अनेकवेळा महिन्यातून एकदा राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी खासगी गाडी घेऊन येतात. दारू विक्री करणार्‍यांना पकडतात. त्यांच्याकडून हजार रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंत रोख रक्कम घेऊन त्यांना त्याच ठिकाणी सोडून देतात. ही अवैध हातभट्टी दारू व विना परवाना देशी-विदेशी दारू विक्री राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी विभाग व पोलीस यंत्रणा यांच्या आशीर्वादाने जोमात सुरू आहे. याचा त्रास महिला, सर्वसामान्य नागरिक यांना होत आहे. गावामध्ये भांडण तंटे , मारामाऱ्या , दारू पिऊन अश्लील भाषेत शिवीगाळ करणे यामुळे लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. लोहारा गावात गल्ली-बोळात व्यावसायिकांनी हातभट्टी व देशी-विदेशी दारू विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. या विक्रेत्यांना हातभट्टी दारू पुरवठा करण्यासाठी तालुक्यातील अनेक भागात हातभट्टीचे केंद्रही सुरू केले आहेत. ही हातभट्टी दारू युरिया काही रासायनिक व केमिकल वापरून तयार केलेली असते. त्यातच खराब गूळ, इतर रासायनिक केमिकल यामुळे या दारूचा उग्र वास येत असतो. तसेच ही दारू कसल्याही भांड्यात, बाटल्यात, डब्यात व ट्यूबमध्ये भरली जाते. यामुळे ही दारू विषारी झाली आहे. ही हातभट्टी दारू ओढ्याला, डोंगरदर्‍या, झाडी यामध्ये राजरोसपणे उत्पादन केली जाते. याकडे पोलीस लक्ष देत नाही कारण त्यांचे फक्त हप्ते वसुलीवर लक्ष असते. लोहारा बस स्टँड परिसरामध्ये सट्टा पिढीचे,गावठी दारूचे दुकाने मोठ्या ताटात थाटले आहेत, पोलिसांना वेळेवर हफ्ते मिळत असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही असा सूर सर्वसामान्य जनतेमधून निघत आहे.सट्टा,गावठी दारूमुळे युवा पिढी बरबाद होतेय, तरुण मुले बापाच्या अगोदर स्वर्गवासी होत आहेत त्यांच्या घराचा आधार हिरावला जात आहे लोहारा दूर क्षेत्रामध्ये असलेले पोलीस कर्मचारी फक्त हप्ते घेण्यासाठी असतात का असा सवाल सर्वसामान्य जनता करीत आहे. लोहारा गावात आतापर्यंत झालेल्या चोरी प्रकरणांचा तपास का लागत नाही हा देखील एक संशोधनाचा विषय आहे. लोहारा परिसरातील अवैध धंदे लवकरात लवकर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून बंद करावेत अशी मागणी लोहारा परिसरातील गावकऱ्यांमधून होत आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!