जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द परिसरात ढगफुटी:शेतकऱ्याचे अतोनात नुकसान-राष्टवादी कॉग्रेस नेत्यांची पाहणी, भरपाईसाठी शासनाला इशारा….

जे. बी. एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी-सुपडू जाधव आज बेटावद खुर्द परिसरात ढगफुटी झाल्यावर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे सर तालुका अध्यक्ष किशोर आप्पा पाटील बेटावद खुर्द परिसरात शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी केली शासनाने त्वरित पंचनामे करून योग्य भरपाई न दिल्यास लवकरच शेतकऱ्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चाचे आयोजन करू असा शब्द शेतकऱ्यांना दिला

Read More

भगवान सेना तर्फे डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी

भगवान सेना तर्फे डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी जामनेर (प्रतिनिधी)जामनेर तालुक्यातील भगवान सेना तर्फे डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात भगवान सेना प्रतिनिधींनी यांनी जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन सादर केले.या वेळी भगवान सेना जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, तालुकाध्यक्ष गजानन वासुदेव घ्यार, ज्येष्ठ समाजसेवक वसंत व्यवहारे, दत्तात्रेय नामदेव पाटील, प्रदीप तुकाराम पाटील, अतुल सुभाष पढार व शहराध्यक्ष जितेंद्र श्रीराम काळे उपस्थित होते.भगवान सेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यूमागील कारणांचा शोध घेऊन संबंधितांना शिक्षा होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत. या निवेदनावर शासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

Read More

जिल्हा परिषद प्रशाला अजिंठा येथे १९ वर्षांनंतर स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न

दि.२७.१०.२५२००५-०६च्या बॅचच्या माजी शिक्षक – विद्यार्थ्यांची शाळेत गाठीभेट,आठवणींना उजाळाअजिंठा येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे तब्बल १९वर्षांनंतर २००५-०६ च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात पार पडला.दिनांक २६ ऑक्टोंबर रोजी आयोजित या सोहळ्यासाठी माजी विद्यार्थी सकाळी ९.०० वाजता आपल्या जुन्या शाळेत एकत्र जमले आणि शाळेच्या आठवणींनी सर्वांचे डोळे पाणावले,कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेत नियमित परिपाठ घेण्यात आला. त्यामध्ये प्रतिज्ञा, प्रार्थना, राष्ट्रगीत आणि सुविचार घेण्यात आले. यानंतर शिक्षकांनी सर्वांना संस्कारपूर्ण जीवनाचे मार्गदर्शन केले. “कुटुंबात कसे राहावे, सासू-सासरे व आई-वडिलांचा आदर करावा, मोबाईलचा वापर मर्यादित ठेवावा आणि एकमेकांना नेहमी मदत करून संपर्कात राहावे” असे मौल्यवान विचार शिक्षकांनी मांडले.कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणी, अनुभव आणि शिक्षणानंतरच्या प्रवासाबद्दल मनोगत व्यक्त केले. माझा हा बेंच… तू इथे बसायचास…अशा जुन्या आठवणींनी शाळेच्या वर्गखोल्यांत भावनिक वातावरण निर्माण झाले. एकमेकांच्या कुटुंबांविषयी, व्यवसायांविषयी माहिती देत सर्वांनी बालपणीच्या दिवसांना उजाळा दिला.या स्नेहमिलन सोहळ्यास अध्यक्षस्थानी कुलकर्णी सर होते. मार्गदर्शन निळकंठ लोसरवार सर, शंकर गाडेकर सर, राजेंद्र सरदार सर, अण्णा जगताप सर, बनकर मॅडम, श्रीरामवार मॅडम, बोरसे मॅडम, रवी गौंड सर, विजय कालभिले, पवार सर, सोनावणे सर, पाटील मॅडम, काळे मॅडम, शारदा मॅडम व सीमा मॅडम यांनी केले.कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन डॉ. शवर्षा देशमुख,संध्या झलवार यांनी केले.या सोहळ्यात अश्विनी खंडेलवाल, विद्या देशमुख, नलिनी जाधव, ज्योती तायडे, उज्वला लाड, वैशाली पोळ, सोनू राठोड, पूजा वैष्णव, माया नैनाव, दिपाली चव्हाण, सुषमा मानकर, अंकिता चोंडिये, आरती झलवार, अनिता गुप्ता, अनिता आगवाल, भारती झलवार, तसेच विष्णू मुके शास्त्री (पत्रकार), दिपक मुके, विनोद सोनावणे, राहुल सपकाळ, अंकुश लोखंडे, गोपाल पैठणकर, सागर ढाकरे, राजू कासुधने, इम्रान शेख, जफर, अभिषेक, चेतन कुमावत, रितेश माली, विशाल खंडेलवाल, निलेश पवार आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.शिक्षकांना कार्यक्रमाची आठवण म्हणून माजी विद्यार्थ्यांनी समूह छायाचित्र फ्रेम भेटवस्तू म्हणून दिली,कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी शाळेतील शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि पुढील काळात असे स्नेहमेलन आयोजित करण्याचा निर्धार केला,प्रत्येक मनुष्य आजीवन विद्यार्थीच असतो. शाळेतील सुवर्णक्षणांनी आज पुन्हा एकदा आम्हा सर्वांना बालपणात नेले,” असे उपस्थित विद्यार्थ्यांनी भावनिकपणे सांगितलेस्नेह मिलन एक ऊर्जा देणारा कार्यक्रम. माणूसपण जपणाऱ्या व संस्कार घडवणाऱ्या अशा प्रेरक व मार्गदर्शक कार्यक्रमांचे आयोजन प्रत्येक शाळेमधून व्हायला हवे.

Read More

जि.प.मराठी शाळा वाकडी येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी संदीप परदेशी यांची निवड

वाकडी.ता.जामनेर.दि.११/१०/२५ जि.प.मराठी शाळा येथे शालेय व्यवस्थापन समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली, यावेळी अध्यक्षपदी संदीप परदेशी व उपाध्यक्ष अक्रम तडवी यांची निवड करण्यात आली,जि.प.मराठी मुलांची केंद्र शाळेची नूतन व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली,ही व्यवस्था समितीची रचना पालकांमधून शासकीय निर्देशानुसार करण्यात आली, सर्वानुमते शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संदीप परदेशी,तर उपाध्यक्षपदी अक्रम तडवी यांची निवड करण्यात आली,सदर वाकडी केंद्रचे केंद्र प्रमुख ज्ञानेश्वर पाटील,मुख्याध्यापक प्रल्हाद शिंदे, यांच्या अध्यक्षतेखाली उत्तम प्रकारे पार पडली, तसेच सभेकरिता पालक वर्ग देखील उपस्थित होते,यामधून व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद मराठी शाळा वाकडी मुलांचे पालक आनंदा जोशी,कोमल सिंग राजपूत,गौतम लोखंडे, अतुल न्हावी,सौ.सोनाली कोळी,सौ.जयश्री बिडके,शकीला तडवी,सौ.ज्योती कोळी,सौ.उज्जला राजपूत, युवराज बिजागरे, रमेश गायकवाड,या मान्यवरांनी समितीवर करण्यात आली,सदर सभेची रुपरेखा सुर्याजी काकडे यांनी मांडली यांनी यावेळी उपस्थित ज्ञानेश्वर कवडे,शेखर महाजन,प्रकाश कुमावत आदी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते

Read More

मासिक पाळी लाज नाही, अभिमान आहे – मीनल करनवाल

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधव सेवापंधरवड्यानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयंतीपासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत जामनेर सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत महिलांचे सशक्तीकरण आणि उत्तम आरोग्य सेवा यासाठी “स्वस्थ नारी सशक्त परिवार” हे अभियान राबवले जात आहे.या अभियानाअंतर्गत शेंदुर्णी येथे महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व वैयक्तिक स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करून सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी जि.प. सदस्य संजयदादा गरुड यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, शेंदुर्णी नगरपरिषद मुख्याधिकारी विवेक धांडे, इंडियन डेंटल असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष डॉ. आशिष महाजन, गोदावरी मेडिकल कॉलेजचे डॉ. जतिन बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.“मासिक पाळी ही शाप नसून वरदान आहे. सर्व महिलांनी व किशोरवयीन मुलींनी या विषयावर मोकळेपणाने बोलले पाहिजे. मासिक पाळी लाज नसून अभिमान आहे. स्त्रीने स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे,” असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी मनोगतात केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी केले तर आभार वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहितकुमार जोहरे यांनी मानले. सूत्रसंचालन पी.जे. पाटील यांनी केले.महिला आरोग्य अधिकारी डॉ. पल्लवी राऊत यांनी किशोरवयीन मुलींना मासिक पाळीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. आदित्य पाटील, डॉ. श्रद्धा पाटील, गजानन माळी, राजश्री पाटील, सूर्यभान पाटील, विजया पाटील, अनुरथ रहाडे, योगेश पाटील, सुधाकर माळी, संयम हिवाळे, दीपक मोरे, ईश्वर कोळी, मंजू जवळे, रेखा इंगळे, विजय बेलदार आदींनी परिश्रम घेतले.

Read More

जामनेरकरानो ऐआय अतिशय घातक / आपल्या मुला-मुलीची काळजी घ्या जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधवआज आपण जानुन घेणार ऐआय म्हणजे कुत्रिम वस्तुने दर्शविलेल्या बुद्धिमान वर्तनास कुत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशियल इंटेलीजेंअस) ऐआय असे म्हणतात.आजच्या युगात प्रत्येक घरात लहान मोठे मुल मुली विद्यार्थी विद्यार्थीनी मोबाइल लॅपटाॉप वापरतात. यांचा वापर कधी कधी आपल्या कुटुंबा साठी घातक ठरतो. मोबाईल मध्ये असलेल्या प्लेस्टोअर वरुन अनेक जण वेगवेगडी फोटो ईडिटीगची अॅप डाऊनलोड करतात. यातीलच ऐक अॅप चर्चेत आहे ते म्हणजे ऐआय या संबधीचे अनेक अॅप आहेत. ते मानवी जिवनासाठी हे घातक ठरत आहे. याचे मोठे धोके आहेत. या धोक्याना ओळखणे गरजेचे आहे. या मुळे आपल्या सुरक्षा हक्कावर परीणाम होतो. या बद्दल जागरुक राहणे गरजेचे आहे. ऐआयचा वापर ऐखाद्या हानी साठी होण्यासाठीचा वापर वाढलाय.काही ऐआय आवाज फोटोच /विडीओच विश्लेषण करत. या मुळे आपल्या मोबाईल मधील आपला सुरक्षित डेटा सुद्धा चोरीला हडपला जातों. आयचा चालु असलेला आवाज/ फोटो/विडीयो ट्रेड घातक रुप धारण करत आहे. म्हणजे सर्व माहीत असुनही आपण आपल्या सोबत फ्राॉड करुन घेतोय. या ऐआय चा वापर काही मस्करी म्हणुन तर काही ऐखाद्याची हानी करण्यासाठी जास्त होतोय. या मार्फत आपला आवाज बनवला जातो फेस ऐखाद्या विडीओ फोटोत वापरला जातो जो खराखुरा भासतो. यांचा वापर अश्लिलिलतेत सुद्धा होतो. या मुळे ऐखाद्या व्यक्तिच जीवन ऊद्धवस्त होण्याची वेळ येते. आपल्या मोबाईल वरती आपली फोटो विडीयो कुटुंबा तील व्यक्तिची फोटो आपण आपलोड करत असतो.त्याचा वापर आपली हनी_बदनामी करण्यासाठी कुणाकडुनही होतो अशे प्रकार आपल्या जामनेर शहरात सुद्धा ऊघडकीस आलेले आहे. ते सर्व कुत्रिम रित्या बनवलेल असत परंतु ते दिसायला खर वाटत अशी भयानक ति आवाजाची फोटो/वाडीओची ईडिटीग असते. जे ततोतंत खरी वाटते. या मुळे अनेकाचे आयुष्य ऊद्धवस्त झालेत तर आत्महत्या चे प्रमाणही वाढलेल आहे. ऐखाद्याच्या बदनामी साठी अश्लीलता वापरुन ऐआय व्दारे बनवलेले विडीओ/फोटो/ ऑडिओ रेकाॉर्डीग ऐखाद्यास आत्महत्यास मंजबुर करु शकते. काही दिवस आधीच शहरातील शिवभक्त अविनाश बोरसे याचे व्हाट्सएप/ इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करुन त्याचा वापर चुकीच्या पद्धतीनी केला गेला. हजारो लाखो लाईक फाॉलो असलेल अकाउंट बंद पाडले गेले.बोरसेचा आवाजाचा व फोटोचा वापर सुद्दा काही फेक अकाउंट व्दारे फसवणुकीसाठी बदनामी साठी केला गेल्याच समोर आल होत. बोरसेनी धाडसाने हिमंतीने या गोष्टीचा सामना केला. तशी तक्रार सुद्धा त्यानी दाखल केलेली आहे. सर्व जामनेर शहरातील तालुक्यातील सर्व नागरीकाना जनतेला अवाहन आहे. आपल्या कुटुंबा चे तुमचे मुलामुलीचे भविष्य ऐआय मुळे ऊद्धवस्त होणार नाही यांची काळजी घ्या

Read More

देव्हारी फाटा ते चक्रधर स्वामी मंदिर रस्त्यावर अतिक्रमण व घाणीच्या साम्राज्याचा प्रश्न; ग्रामस्थांचा आमरण उपोषणाचा इशारा.

सोयगाव / जेबीएन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी ….. देव्हारी फाटा ते चक्रधर स्वामी मंदिर गेट या मुख्य रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाबाबत व गेटसमोर साचलेल्या घाणीबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. वारंवार अर्ज करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.ग्रामपंचायत सोयगाव व पंचायती समितीकडून देखील या संदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला होता. तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. या मुख्य रस्त्याने संपूर्ण गावची ये-जा असून रस्ता अरुंद झाल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, चक्रधर स्वामी मंदिर गेटसमोर मोठ्या प्रमाणात घाण-कचरा टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले असून ग्रामस्थांनी तातडीने कारवाईची मागणी केली आहे. या सर्व बाबींवर लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास येत्या २४ सप्टेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. भारत नप्ते, संदीप काळे, अभय पुजारी, बारकू गावडे, घनश्याम शिंदे, राहुल पुजारी, गोपाल कुरंकार, शुभम पुजारी, आकाश कळसकर, राहुल न्हावी, प्रदिप काळे, संजय गिरी, गोपाल गाडवे, प्रशांत ठिकाणी, योगेश गायकवाड, संजय काळे, महेश खडके, संदीप कोलते, राजू गलबले, पवन कुल्ले, मधुकर गावडे आदी ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

Read More

जामनेर तालुक्यातील शिवभक्त अविनाश बोरसे ला अपघात झाल्याचे खोटे सांगुन त्याचा घातपात करण्याचा प्रयत्न, बोरसे पुराव्यानिशी पोलिसात तक्रार दाखल करणार

जे बी एल महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर प्रतिनिधीजामनेर शहरात पुर्ण तालुक्यात शिवभक्त म्हणुन ओळख असलेले अविनाश बोरसे कुठत्त्याही राजकीय पक्षात नाही संघटनेत नाही छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावानी अशिर्वादानी जनतेला अबडणारी सामाजिक क्षेशत अनेक मोव मोठी काम बोरसेनी कुणालाही न घाबरता केली. जामनेरातील तरुण वर्ग नेहमी बोरसेच्या पाठीशी ऊभा दिसतो. काही दिवस आधीच कॅफेचा मूद्रा बोरसेनी लाबुन घरला या कैफे मुळे पूर्ण जामनेर तालुक्यातील पालक वर्ग उस्त होते. बोरसेनी हा महत्वाचा विषय लाऊन धरत अखेर में बंद पाइले पुर्ण जामनेर तालुक्यात जळगाव जिल्ह्यात बोरसेना मोठा नालोकिक आहे. बोरसेचा चाहता नावलौकीक वाढलेली प्रतिष्ठा चपचत नसल्याने काही जण फेिक अकाउंट व्दारे काही दिवसापासुन बोरलेची बदनामी करत होते. हा सुद्धा एक प्रकार काही दिवस आधी समोर आला होता. दि.१० सप्टेंबर रोजी बोरसेना खोटी माहिती मैसेज व्दारे व फोन करून अपघात झाल्याची माहीती देत बोरसेना घराबाहेर बोलवले रात्री चारा ऐक बी मेळ असल्याने त्याने बोरसे ऐकटाच होता वाच गोष्टीचा फायदा उचलत खल्लेखोर तरुणानी संधी साधली ते सर्व दारुच्या नशेत असल्याचे ओरसेनी सांगितले, ५/६ तरुनानी बोरसेना घेरले व बेगडेच विषय दाखवत बदनामी सारख्या अश्लिल भाषेत बोलत धमक्या दिल्या. चोरसे पोलिस तक्रार करत असल्याचे कळल्याने नंतर पुन्हा जामनेर सोमबाड़ों परीसरात बोरसे फिरत असताना तिथ त्याना अडवुन जिथे मारण्याची धमकी देत पोलिस तक्रार केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्याच्याकडे जस असल्याचे बोरसेनी सागितले. आम्ही कोणालाथ घाबरत नाही माणु बोलु लागले. हे सर्व या तरुनामी २० हजार रुपये घेऊन हा प्रकार केल्याच समोर आले आहे. ज्यावेळी बोरसेना धमकी देणे सुरु होते त्यावेळी हे सर्व ऐक तरूम कुमाला तरी बीडीओ कॉल करन दाखवत असल्याचे बोरसेनी सागितले. बोरसेनी आपला जिव चाचचण्यासाठी सर्व सहन करत तिथुन निघुन गेल्याच सागितल बोरसेनी संयम ठेवल्याची माहीती मिळाली. धमकी धमकी देणारे अनोळखी होते. बोरसे पोलिसात तक्रार दाखल करत असुन लवकरच चेहरे नाव स्पष्ट होतील. एक वर्षापूर्वी अशाच प्रकारे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष सचिन बोरसे यांना यांच्या शेतात हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. चांगल काय करून नावलौकीक असे प्रकार योग्य नाही. सदरील घटना अत्यंत चुकीची असून जामनेरकर संताप व्यक्त करत आहे तर शिवभक्त अविनाश बोरसेंना जामनेर शहरायव्ह तालुक्यातील खेडापाडयातुन अजुनच अधिकच बाडता पाठिंबा जामनेरकर देत असल्याच दिसुन येत आहे.

Read More

तहसिलदाराची बनावट सही, २९ लाख ६३ हजारांत सरकारलाच महसूल सहायकाने ‘कूळ’ दाखवले !जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपी हर्षल पाटील फरार

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर जामनेर येथील तहसिलदारांच्या स्वाक्षरीचा बनावट पध्दतीने वापर करुन जामनेर मथील वर्ग २ ची शेतजमिन वर्ग १ मध्ये रुपांतर करुन शासनाचा २१ लाख ६३ हजार २८५ रुपयांचा महसूल बुडवून फसवणूक केल्या प्रकरणी जामनेर तहसिल कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी (कुळ कायदा) हर्षल विश्वनाथ पाटील यांच्या विरुध्द जामनेर पोलीस ठाण्यात शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल होताच हर्षल पाटील हा अधिकारी फरार झाल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी जामनेरचे तहसिलदार नानासाहेब आगळे यांच्या फिर्यादीवरुन हर्षल पाटील यांच्याविरुध्द जामनेर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या धक्कादायक प्रकरणाची अधिक माहिती अशी की, जामनेर येथील गट क्र. ८३६/२ ही शेत जमिन मालक अर्जदार नाजीयाबी शेख सत्तार, शेख फरहान हिसामुद्दीन यांनी वर्ग २ प्रकाराची जमिन वर्ग १ प्रकारात व्हावी म्हणून तहसिलदार जामनेर यांना अर्ज सादर केला होता. त्यांच्या अर्जावरुन वर्ग २ ची शेत जमिन वर्ग १ मध्ये करण्यासाठी नजराणा भरणा आवश्यक होते. जमिनीचे बाजारमूल्य ४३ लाख २६ हजार ५७० रुपये एवढे आहे. त्यानुसार ५० टक्के नजराणा रक्कम म्हणून २१ लाख ६३ हजार २८५ रुपये शासकीय कोषागारात भरणा केल्याशिवाय जमिनीची नोंद अथवा रुपांतर वर्ग एक मध्ये करता येणार नाही, असा आदेश तहसिलदार जामनेर यांनी दिला. त्यांच्या आदेशावर अर्जदारांनी एवढी मोठी रक्कम आम्हाला ५० टक्के नजराणा भरणा शक्य नाही, असे लेखी कळविले. त्यामुळे तहसिलदार जामनेर यांनी त्यांचा अर्ज निकाली काढला. या प्रकरणात सहाय्यक महसूल अधिकारी हर्षल पाटील यांनी फेरफार करुन तहसिलदार जामनेर यांचा स्वाक्षरीचा दुरुपयोग केला. तसेच नजराणा रकमेचा भरणा बँकेत केल्याचे बनावट दस्तावेज तयार केले. ही बाब तहसिलदार जामनेर यांच्या तपासणीत आढळून आल्यानंतर हर्षल पाटील याचे बिंग फुटले. त्यामुळे त्याने फसवणूक केल्याचे व बनावट दस्ताऐवज केल्याचे कबूल करीत तहसिलदार जामनेर यांना विनंती केली. तथापी हे प्रकरण धक्कादायक आणि गंभीर असल्याने हर्षल पाटील यांच्या विरुध्द तहसिलदार जामनेर यांनी रितसर फिर्याद दाखल केली. त्यामुळे हर्षल पाटील विरुध्द विविध कलमाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Read More

जामनेर तहसिल कार्यालयात तालुकास्तरीय लोकशाही दिन –तहसिलदार श्री आगळे यांनी नागरिकांच्य ऐकुन घेतल्या समस्या तक्रारी

जामनेर – ( प्रतिनिधी )जामनेर तहसिल कार्यालयाततालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले .या प्रसंगी नागरिकांच्या विविध विभागाशी संबंधित समस्या व तक्रारींची संक्षिप्त चौकशी करून आवश्यक कार्यवाही तहसिलदार श्री नाना साहेब आगळे यांच्या कडून करण्यात आली.यावेळी नायब तहसिलदार , इतर विभागाचे अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते . विभागप्रमुखांनी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या व तातडीने निराकरणासाठी पावले उचलली. लोकशाही दिनाच्या माध्यमातून शासन-प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक परिणामकारक होत आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!