बेटावद खुर्द येथे घरफोडी

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी जामनेरजामनेर : मुलगा दवाखान्याच्या कामासाठी मुंबईला गेल्याने त्याला उपचारासाठी आईने चांदीच्या पाटल्या विकून मिळालेले २० हजार व ५० हजाराचे सोन्याचे दागिने लोखंडी पेटीत ठेवले. मात्र चोरट्यांनी गुरुवारी रात्री घरफोडी करीत ७० हजाराचा मुद्देमाल लांबवल्याची घटना बेटावद खुर्द येथे घडली. राजेंद्र सुपडू पाटील (बेटावद खुर्द, ता. जामनेर) यांचे मोठे भाऊ दवाखान्याच्या कामासाठी मुंबईला गेले होते. २० हजाराची रोकड, २० ग्रॅमची सोन्याची पोत व ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी असा ऐवज त्यांनी लोखंडी पेटीत ठेवला. खोलीला कुलूप लावून शेजारच्या घरात झोपायला गेले असताना ही चोरी झाली.

Read More

जामनेर – जिवन कसे जगावे हे शिक्षक शिकवितात – प्रा.चंद्रकांत डागा- जामनेर येथे 37शिक्षक व 4 समाजसेवी यांचा केला सत्कार – भारतीय जैन संघटनेचा उपक्रम

जामनेर(वा.)- शिक्षक केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही तर सामाजिक व कौटुंबिक समज देऊन जिवन कसे जगावे याचे मार्गदर्शन ही शिक्षक करतात असे प्रतिपादन भारतीय जैन संघटनेचे खानदेश विभाग अध्यक्ष निवृत्त प्रा.चंद्रकांत डागा यांनी केले.ते येथील महावीर भवनमध्ये संघटनेच्या गुरू दक्षिणा फाउंडेशन कार्यक्रम अंतर्गत शिक्षा सारथी सन्मान सोहळ्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन ओसवाल संघाचे अध्यक्ष व प्रायोजक ईश्वरलाल कोठारी होते.कार्यक्रमाची सुरुवात नमस्कार महामंत्र व सरस्वती पूजनाने झाली. एकूण 37शिक्षक व 4समाजसेवी यांचा सत्कार केला गेला.प्रा.डागा म्हणाले, शिक्षक दिननिमित्त आमच्या,आमच्या मुलांचा,आचार्यांचा,आई- वडिलांचा सन्मान करण्याचा हा दिवस.त्यांना बोलवून त्यांचा सन्मान करणे, त्यांचे दर्शन घेऊन, आशीर्वाद घेणे व पुढील पिढीला गुरुजनांचा सन्मान केला पाहिजे ही शिकवण यातुन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.प्रा.डागा संघटनेमार्फत स्मार्ट गर्ल्स,नव दंपत्ती सक्षमीकरण, दिल का जिगशॉ,परिणय पथ, एमएसएमई,अल्पसंख्याक कार्यशाळा, ईडब्ल्यूएस,कौटुंबिक लवाद आदि चालत असलेल्या कार्यक्रमाबद्दल माहिती देऊन,ते राबविण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. जामनेर ता.एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुरेश धाडीवाल म्हणाले, गुरू शिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय जिवन नाही. अध्यापन हे विद्यार्थी केंद्रीत असले पाहिजे. जे पडद्यामागे कार्य करतात अशा व्यक्तींना शोधून समाजापुढे आणले पाहिजे.महिला जिल्हाध्यक्ष सोनल कोठारी,शिक्षक विजय सेतवाल,उमेश बेदमुथा, संजय भुरट यांनी मनोगत व्यक्त केले.**या शिक्षकांचा झाला सन्मानरामचंद्र सैतवाल,सुदर्शन सैतवाल,प्रिती संघई,नितीन सैतवाल मिलिंद वास्कर, अनंत अरतकर,प्रा.राहुल शिंपी,अजय जैन,आरती सुदर्शन सैतवाल,शिल्पा कारंजकर, संदीप वाशिमकर,कविता वाशिमकर,तुषार जैन,निकिता अरतकर,रोहिणी शिंपी, कोमल चतुर,निकिता सुर्यवंशी,मंदाकिनी छाजेड, छगणलाल छाजेड, डॉ.दिपक सिसोदियामनीषा कोठारी,वंदना चोरडिया,आरती लोढा, मयूर भुरट,रूपल भुरट,मयूर संकलेचा,अतुल साबद्रा,सविता बोहरा,डॉ श्वेता राका,उमेशजी बेदमुथा,रीना चंडालिया, सारिका चोपडा,दिपाली चोरडिया,सोनाली सिसोदिया,ईश्वर चोरडिया,संजय भुरट,प्रा.चंद्रकांत डागासमाजसेवी ईश्वरलाल साबद्रा,महेंद्र नवलखा,प्रकाश सैतवाल,पारस ललवाणी आदींचा सत्कार शाल,सन्मानपत्र व माळा देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ.सोनाली सिसोदिया तर आभारप्रदर्शन सचिन चोपडा यांनी केले.ओसवाल संघाचे मंत्री डॉ.कांतीलाल ओसवाल,संघटनेचे विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत,माजी जिल्हा कार्याध्यक्ष शितल लोढा,सचिव संकल्प लोढा,सह सचिव आदित्य मंडलेचा, उपाध्यक्ष दर्शन भुरट,महिला सदस्य भावना बोहरा,प्रोजेक्ट हेड विकास ललवाणी,वैभव छाजेड,सौ मनिषा कोठारी,सौ वंदना चोरडिया आदी सदस्य उपस्थित होते.

Read More

मा.खा.ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर ३० रोजी जामनेरात

जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथे २१ वर्षीय सुलेमान खान या तरुणाचा जामनेर येथे कॅफेवर बसलेला असताना , बाहेर काढून १० ते १२ जणांनी अमानुषपणे मारहाण करत खून केला होता.या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र मोठी खळबळ उडाली होती.याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर दिनांक ३० ऑगस्ट,शनिवार रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,जामनेरला येणार आहे. त्यानंतर ते पुढे बेटावद खुर्द येथे जाऊन मयत सुलेमान खान याच्या कुटुंबीयांची ते भेट घेणार आहेत.यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील,युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार,महिला जिल्हाध्यक्ष वंदना सोनवणे,जिल्हा महासचिव योगेश तायडे,जिल्हा उपाध्यक्ष राहुल इंगळे,जिल्हा उपाध्यक्ष इम्रान तडवी, जिल्हा सचिव रफिक बेग, ॲड.राजू मोगरे पाटील,जिल्हा संघटक बबन कांबळे,यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे जामनेर तालुकाध्यक्ष सचिन सुरवाडे यांनी कळविले आहे.

Read More

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या अबिद हुसेन यास फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी शेंदुर्णीत प्रचंड मुक मोर्चा हजारो पुरुष महिलांचा सहभाग

शेंदुर्णी ता.जामनेर प्रतिनिधीशेंदुर्णी येथील अबिद हुसेन शेख याने तो ज्या शाळेच्या बसवर चालक होता त्याच शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर गुंगीचे औषध देऊन वेळोवेळी बलात्कार केला असुन याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी आरोपी व त्याच्या आईला अटक करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदु समाजाच्या वतीने मुक मोर्चा वाडी दरवाजा भागातुन काढण्यात आला.शहरातील मुख्य मार्गाने हा मुक मोर्चा शेंदुर्णी दुरक्षेत्र येथे पोहचला.या मोर्चात युवती, महिला, पुरुष यांचा मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग होता.हजारोच्या संख्येने हिंदु बांधव आरोपी यास फाशी झाली पाहिजे,लव्ह जिहाद बाबत फलक घेऊन मुक मोर्चात यात सहभागी झाले होते. यावेळी प्रखर वक्ते बजरंग दलाचे सह संयोजक प्रा.आशिष दुसाने,पुणे यांनी आपल्या घणाघाती भाषणात लव्ह जिहाद,हिंदु मुलींवर कसं जाळं फेकले जाते, त्यांना हळूहळू कसं अटकवलं जाते,मग मैत्री प्रेमाचं नाटक व नंतर लग्नाच्या साठी ब्लॅक मेल करुन धर्मांतर केले जाते यासाठी मोठं षडयंत्र असुन हिंदुंनी जागृत रहावे.मुलींना दुर्गा वाहीनीत तर मुलांना संघाच्या शाखेत पाठवावे आपण आपल्या धर्मासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.आरोपी व त्यांच्या सर्व साधीदाराला सुद्धा कडक शिक्षा व्हावी यासाठी जागृत राहुन ही प्रवृत्ती कायमस्वरूपी नष्ट व्हावी यासाठी सतर्क जागृत रहावे असे आवाहन केले.यावेळी उत्फुर्तपणे महिलांच्या वतीने सौ.लिना मनोज चव्हाण यांनी जोषपुर्ण भाषण केले व महिला मुलींना मार्गदर्शन केले. सकल हिंदु समाजाच्या वतीने विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा सह मंत्री भिका इंदरकर यांनी प्रास्ताविक केले व निवेदनाच्या मागण्या वाचुन दाखवल्या आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी रचनात्मक हा मुक मोर्चा असल्याचे सांगितले पहुर पोलिस व पिंपळगाव हरेश्वर पोलिस यांचे आभार मानले. मोर्चात सहभागी महिलांनी याबाबतचे निवेदन पोलिस उपअधीक्षक अरुण आव्हाड,पहुरचे सपोनि.प्रमोद कठोरे शेंदुर्णी दुर क्षेत्र चे पोउनि.नंदकुमार शिंंब्रे यांना दिले.सपोनि.प्रमोद कठोरे यांनी सांगितले की आपल्या निवेदनाची दखल घेऊन वरिष्ठांना याबाबत कळवले जाईल असं आश्वासन दिले.यासाठी विश्व हिंदु परिषदेच्या तालुका पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले

Read More

७० वर्षाची परंपरा जोपासत श्रीराम पेठेत बारागाड्या उत्साहात साजर्‍या.

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर /प्रतिनिधी – आपले सण आपले उत्सव आपणचं साजरे करणार या ब्रिद वाक्याखाली पारंपरिक पद्धतीने सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य दिव्य बारागाड्या उत्सव शहरातील श्रीराम पेठ भागातील दसरा मैदान ते हनुमान मंदिरात पर्यंत ओढल्या गेल्या स्व. देवचंदबाबा शिंदे यांच्या प्रेरणेने सुरु केलेल्या बारागाड्या उत्सवाला आज सुमारे ७० वर्षाची परंपरा लाभली आहे. सविस्तर माहिती अशी श्रीराम पेठ भागात असलेले श्रीराम पेठ वासियांचे ग्रामदैवत तथा आराध्य दैवत असलेले खंडेराव महाराज यांच्या नावाने या भागात बारागाड्या ओढल्या जातात. या उत्सवास आज ७० वर्षाची परंपरा लाभली आहे सामाजिक एकात्मता हिच श्रीराम पेठ वासियांची ओळख असल्याने हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. सद्ध्या तरी या बारागाड्या उत्सव काठीचा मान हा शिंदे परीवारा कडे असुन श्रीराम पेठ भागातील रहिवाश्यांकडुन तसेच शिंदे परीवारातील सदस्यांनी हा पारंपरिक व पुरातन वारसा कायम ठेवला आहे. दसरा मैदान ते हनुमान मंदिरात पर्यंत या बारागाड्या ओढल्या जातात तर पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येने भाविक या उत्स्वात हजारोंच्या संख्येने सहभागी होत सोहळा साजरा करतात तर “खंडेराव महाराज की जय” तर “येळकोट येळकोट जय मल्हार” या घोषणांनी आसमान दणाणून सोडला जातो. आज जरी श्रीराम पेठ भागातील रहिवासी शहराच्या अन्य भागात विखुरलेले असले तरी आजच्या दिवशी लहान पासुन ते वयोवृद्ध व्यक्ती तसेच महिला आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित होतात. आज इंटरनेट युगात सुद्धा हि परंपरा टिकवून ठेवल्याचा आनंद आहे असा विश्वास श्रीराम पेठ भागातील रहिवासी मान्य करतात. त्यामुळे हिच सामाजिक एकता शहरात कुतुहलाचे मुख्य कारण ठरले आहे हा भव्य दिव्य सोहळा मोबाईलच्या कॅमेर्‍यात भाविकांनी कैद केला. खोबरे भंडाऱ्याची उधळण करुन मोठ्या धार्मिक वातावरणात नियोजित भक्तां करवी बारागाड्या ओढल्या जातात तर बारागाड्या ओढल्या नंतर उडीद व भाकर भंडाऱ्याची तथा महाप्रसादाचा लाभ भाविक घेत असतात या महाप्रसाद वाटपासाठी खंडेराव महाराज सेवा समिती कार्यान्वित असते.

Read More

माजी सभापतींच्या पतीची आत्महत्या; चिठ्ठ्या सापडल्याने गूढ वाढले

जामनेर, ता.२२ (प्रतिनिधी) जामनेर शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. सोनबर्डी परिसरातील एका निर्जनस्थळी माजी सभापती सुनंदाबाई पाटील यांचे पती प्रल्हाद पाटील (वय ६२, रा. मोयखेडा, ता. जामनेर) यांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली असून, मयत प्रल्हाद पाटील यांच्या खिशात काही चिठ्ठ्या सापडल्याची प्राथमिक माहिती मिळत असल्याने आत्महत्येमागील गूढ वाढले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मोयखेडा येथील रहिवासी असलेले प्रल्हाद पाटील यांनी आज संध्याकाळी सोनबर्डी परिसराच्या मागील बाजूस असलेल्या एका निर्जनस्थळी झाडाला गळफास लावून आपले जीवन संपवले. प्रल्हाद पाटील हे व्यवसायाने शिक्षक होते आणि त्यांनी २०२१ साली स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्याच सुमारास त्यांच्या पत्नी सुनंदाबाई पाटील जामनेर पंचायत समितीच्या सभापती म्हणून कार्यरत होत्या.घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्रल्हाद पाटील यांनी आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठ्यांमुळे आत्महत्येमागे काही कारण असावे असा पोलिसांना संशय आहे. जामनेर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.प्रल्हाद पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून आणि तीन नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येने मोयखेडा आणि जामनेर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Read More

प्रविण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

प्रविण दादा गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कार्यवाहीची मागणी!!संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, बामसेफ यांच्यासह परिवर्तन वादी संघटना कडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !!! शिवतीर्थावर प्रवीण गायकवाड यांच्या प्रतिमेस घातला दुग्धाभिषेक!!! ! जळगाव (प्रतिनीधी)जळगाव जिल्हा संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ बामसेफ यांच्यासह परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांकडून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा.प्रविणदादा गायकवाड यांच्या प्रतिमेस शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाजवळ दुग्धाभिषेक करून प्रविणदादा यांच्यावर झालेला भ्याड हल्ल्याच्या आरोपींना अटक करुन या घटनेची सखोल चौकशी करत कठोर कार्यवाही व्हावी या बाबत खालील आशयाचे निवेदन जळगाव जिल्हाधिकारी यांना देण्यात आले रविवार १३ जुलै २०२५ रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा. प्रविणदादा गायकवाड यांच्यावर काही गुंड प्रवृतींच्या लोकांनी शाईफेक करून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करत भ्याड हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून हा हल्ला फक्त प्रविणदादा यांच्यावर नसून हा हल्ला या देशातील तमाम शिवराय – फुले – शाहु – आंबेडकर यांच्या समता , बंधुता व न्यायाच्या तत्वांवर चालणाऱ्या विचारवंतांवर असून यापूर्वी देखील या देशात याच मार्गाने अंधश्रद्धा निर्मूलनाचा मंत्र देणारे मा.नरेंद्र दाभोळकर , कॉ.गोविंद पानसरे , पत्रकार गौरी लंकेश व ज्येष्ठ विचारवंत एम.एम.कलबुर्गी यांच्या हत्त्या घडवून आणण्यात आल्या आहेत. प्रसारमाध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला दीपक काटे नावाचा गुंड व त्याच्या आठ ते दहा इतर गुंड साथीदारांनी मिळून केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु स्थानिक पोलिसांनी या आरोपींना अटक न करता सोडून दिले आहे. तरी महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने या प्रकरणात बारकाईने लक्ष देत या हल्ल्यातील सर्व आरोपी व त्यांच्या मागे असणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी अन्यथा याच पद्धतीने विचारवंतांना संपवण्याचे प्रयत्न सुरु राहिल्यास महात्मा गांधीच्या अहिंसेच्या विचारांवर चालणाऱ्या भारत देशाची प्रतिमा जगात मलीन होऊन हा देश अराजकतेच्या मार्गावर जाण्यास वेळ लागणार नाही. यावेळी संभाजी ब्रिगेड सामाजिक चे प्रदेश संघटक श्याम पाटील , जिल्हाध्यक्ष तुषार सांवत , संभाजी ब्रिगेड राजकीय चे जळगाव पुर्व जिल्हा प्रदिप गायके, जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष विजय पाटिल शहर कार्याध्यक्ष मयूर चौधरी , लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे , बामसेफचे मुकुंद सपकाळे , मराठा सेवा संघाचे सुरेश पाटील , सुरेंद्र पाटील , राम पवार , शोभाराम प्रतिष्ठाचे नरेंद्र पाटील , अनिरुद्ध शिसोदे , शुभम पवार , गणेश पाटील,कल्पेश पाटील, भरत पाटील, अविनाश पाटील ,संदीप मांडोळे, सतीश लाठी, राकेश राजपूत, राकेश जैन, संदीप पाटील,रवींद्र पाटील, धवल पाटील,प्रमोद पाटील,राहुल पाटील,संजय चव्हाण,सुमित्र अहिरे, देवानंद निकम,रवींद्र तायडे,देशमुख साहेब यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते

Read More

शहापूर येथे घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ; २०८ लाभार्थ्यांना ऑनलाईन पासचे वितरण

शहापूर (ता. जामनेर) | प्रतिनिधीजामनेर तालुक्यातील शहापूर गावात घरकुल योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी मा. विनय गोसावी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ऑनलाईन पद्धतीने ETP पास जनरेट करून खडकी नदीपात्रातून वाळूचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामार्फत घरकुल बांधणीसाठी आवश्यक वाळू सरकारी पातळीवरून मोफत देण्यात येत असून, गरजू लाभार्थ्यांना या सुविधेचा थेट लाभ मिळाला आहे. एकूण २०८ लाभार्थ्यांना ऑनलाईन पासेस वितरित करण्यात आले. उपस्थित मान्यवर:या कार्यक्रमावेळी तहसीलदार जामनेर, गटविकास अधिकारी जामनेर, ग्राम महसूल अधिकारी शहापूर, ग्रामपंचायत अधिकारी शहापूर, पोलीस पाटील शहापूर, व घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तांत्रिक पारदर्शकता आणि सुलभता:ETP प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली गेली असून लाभार्थ्यांनी शासनाच्या या सुविधेचे स्वागत केले आहे. गावकऱ्यांनी या उपक्रमामुळे घरकुल बांधणीला गती मिळेल, अशी भावना व्यक्त केली.

Read More

“बोधगया मुक्तीच्या लढ्यासाठी जळगावात आंदोलन

जळगाव | बोधगया महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा, या मागणीसाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क व इतर बौद्ध संघटनांनी एकत्र येत जळगावात जनजागृती मोहीम उघडली आहे. या लढ्याचा एक भाग म्हणून दि. ८ मार्च २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे कार्यकर्ते प्रचारासाठी शहरात परिश्रम घेत आहेत. सुमित्र अहिरे, रविंद्र बाविस्कर व विक्रम जावे यांनी त्रिभुवन कॉलनी, के.सी. पार्क, महामाया बुद्धविहार, आंबेडकर नगर, प्रबुद्धनगर पिंप्राळा, शंकरआप्पा नगर या भागात जाऊन जनजागृती केली. संघटनेच्या म्हणण्यानुसार, “बोधगया महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे.” आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!