पिंपरी नांदू (ता. मुक्ताईनगर) येथे उत्साहात शिवजयंती साजरी

पिंपरी नांदू (ता. मुक्ताईनगर) – पिंपरी नांदू ग्रामपंचायतच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. गावातील मुख्य चौकात उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सरपंच प्रतिभा पाटील, उपसरपंच योगेश कोळी तसेच सदस्य भागवत पाटील, किशोर पेटारे, विशाल चौधरी, प्रतिभा निकम व दिनकर निकम यांच्या उपस्थितीत श्री हरी चौधरी व हरी कोळी यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. मधुकर भोई यांनी आरती केली तर अतुल चौधरी यांनी श्रीफळ फोडून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी विनोद भोई, आजिनाथ कोळी, शांताराम चौधरी, प्रमोद भोई, चिंधूलाल भोई, वैभव भोई, रितेश कोळी, चेतन न्यावी, विजय कोळी, मयूर कोळी, गणेश कोळी यांच्यासह गावातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत अधिकारी कैलास भगत, ग्रामपंचायत शिपाई समाधान कोळी तसेच पाणीपुरवठा कर्मचारी विकास कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Read More

खडकी ता. जामनेर येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

खडकी गावात संत सेवालाल महाराज जयंती भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरी करण्यात आली. यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक वेशभूषा आणि स्वच्छता अभियान राबवत गावकऱ्यांनी एक आदर्श उपक्रम साकारला. संपूर्ण गावाच्या सहभागातून झालेल्या या उपक्रमामुळे सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन सुशील भाऊ नाईक यांनी केले होते. कार्यक्रमाला राज्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन तसेच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली.गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे जयंती उत्सवाला भव्य स्वरूप प्राप्त झाले.

Read More

जळगाव महानगरपालिका स्थायी समितीत अरविंद देशमुख यांची निवड

जळगाव (प्रतिनिधी) – पहूर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून राजकारणात आलेल्या अरविंद देशमुख यांनी जळगाव शहराच्या राजकारणात पुन्हा एकदा आपली छाप पाडली आहे. जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी विजय मिळवल्यानंतर आता सुमारे 2000 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्प असलेल्या महानगरपालिकेच्या स्थायी समितीवर त्यांची निवड झाली आहे.महानगरपालिकेची स्थायी समिती ही आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. शहरातील विकासकामे, विविध प्रकल्पांची मंजुरी, खर्चाचे नियोजन आणि आर्थिक धोरणांबाबतचे महत्त्वपूर्ण निर्णय या समितीत घेतले जातात. त्यामुळे देशमुख यांची या प्रभावी समितीत झालेली निवड जळगाव शहरासाठी आणि त्यांच्या समर्थकांसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.अरविंद देशमुख यांची ओळख केवळ नगरसेवक म्हणून मर्यादित नसून ते महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू सहकारी व ‘संकटमोचक’ कार्यकर्ता म्हणूनही ओळखले जातात. जिल्ह्यातील विविध राजकीय घडामोडींमध्ये त्यांनी प्रभावी नियोजन व संघटन कौशल्य दाखवत नेतृत्वाला बळकटी दिली आहे.स्थायी समितीतील त्यांच्या कामगिरीकडे आता जळगावकरांचे लक्ष लागले असून, शहराच्या विकासाला गती देण्यासाठी ते ठोस आणि परिणामकारक निर्णय घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Read More

शेंदुणी येथे गरुड विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

जामनेर तालुक्यातील ‘धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को ऑप सोसायटी लिमिटेड’, शेंदुर्णी संचालित आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी ता जामनेर जि जळगांव येथील शाळेच्या प्रांगणात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न.कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजयरावजी गरुड होते.प्रमुख वक्ते हर्षल पाटील, संस्थेचे सचिव काकासो सागरमल जैन, संस्थेचे सह सचिव दादासो यु यु पाटील, शेंदुर्णी नगरपंचायत स्विकृत सदस्य बापुसाहेब शांताराम गुजर, माजी उपसभापती (पंस,जामनेर) अण्णासो सुधाकर बारी, कार्यालयीन सचिव भाऊसाहेब दिपकराव गरुड, लोकमत प्रतिनिधि दिपक जाधव, पुण्यनगरीचे पत्रकार विलास आहेरे, लोकशाहीचे प्रतिनिधि ॲड देवेंद्र पारळकर, माजी उप-मुख्याध्यापक एच डी चौधरी, प्राचार्य आर एस चौधरी, उप-मुख्याध्यापक बी एम कुमावत, पर्यवेक्षक जे एस जुबळे, विनोद पाटील, आदि उपस्थित.कार्यक्रमाची सुरुवात ईश्वस्तवन व स्वागत गिताने तसेच मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती, ब्रम्हीभूत हरी प्रसाद महाराज, संस्थेचे विश्वस्त आचार्य गजाननराव गरुड, संस्थेचे प्रेरणास्रोत अण्णासो भास्कराव खंडेराव गरुड आदिंच्या प्रतिमांचे पुजन तसेच माल्यार्पण करून करण्यात आली.सदर प्रसंगी मान्यवरांचे प्रेमवस्त्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य आर एस चौधरी यांनी केले.विद्यार्थी मनोगत खुशी डामरे, अविनाश चव्हाण, अमोल चव्हाण यांनी करत शाळेबदल तसेच शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.शिक्षक मनोगत एल पी मोहणे यांनी व्यक्त केले.सदर प्रसंगी गांधी रिसर्च फाउंडेशन,जळगांव यांच्या वतीने गांधी विचार परीक्षेत जिल्ह्यात यश संपादन केल्याबद्दल सई मराठे, मानसी पाटील या विद्यार्थ्यांनींना पदक व प्रमाणप्रत्र देऊन गौरवण्यात आले.अतिथी मार्गदर्शन काकासाहेब सागरमल जैन यांनी करत मुलांचे मन जिंकून अनेक प्रेरणादायी उदाहणे दिली.प्रमुख वक्ते हर्षल पाटील यांनीही मुलांशी संवाद साधून येणाऱ्या परीक्षेबाबत योग्य मार्गदर्शन करत काॅफी पासून दुर रहा, अपयशाने खचुन जाऊ नका, भाषेमधील साम्यता, कला साहित्य यांच्याशी जोडलेले रहा, जगन तुमचे समृद्ध करा, शब्दांचे सामर्थ्य, बाजारामध्ये चातुर्याने पैसे कसे कमाऊ शकता आदी मुद्द्यांवरही विद्यार्थ्यांशी संवाद साधला.कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासाहेब संजयरावजी गरुड विद्यार्थी यांनी काॅफी मुक्त परीक्षेला सामोरे जाण्याबाबत, संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढीला महत्व दिले, अपयशाने खचुन न जाता यशाची पहीली पायरी बनवा पुढे स्पर्धात्मक परीक्षा देण्याबाबत मागदर्शन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुत्रंसचलन पी जी पाटील यांनी केले.शेवटी आभार डी बी पाटील यांनी मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

Read More

वाकडी येथे बसस्थानक परिसरासह अवैध धंदे दारुचा व सट्टाचा महापूर

====================वाकडी.ता.जामनेर.दि.०३/०२/२६ वाकडी बसस्थानक सह परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारुचा महापूर सुरू असून यात अनेकांचे संसार उद्धवस्त झाले,बसस्थानक परिसरात खुले आम अवैधधंदे बोकाळाले असतांनाही या दारु विक्रेत्यांवर पोलीसांकडून कुठलेही कार्यवाही होत नसल्याने गावातील नागरिक ञस्त झाले आहे, महिला वर्ग शालेय विध्यार्थी हैराण झाले आहे गावात गेल्या अनेक दिवसांपासून गावांच्या चारही बाजूंनी अवैध दारुची खुलेआम विक्री होत असून यात अनेक जवान तरुण व्यसनाच्या आहारी गेले आहे , मुली-बाळीचे संसार उद्धवस्त होत आहे, बराच मुली विधवा झाल्या आहेत, त्याचे संसार उघड्यावर पडले आहे नवीन निवडुन आलेल्या सरपंच व सभासदांना च्या वतीने गावातील दारू बंद व्हावी यासाठी पहूर पोलिस ठाणे येथे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लेखी ठराव दिला, काही वेळा पुरती वाकडी येथील दारुवाल्याचे धाबे दणाणले होते, परंतु पुन्हा देशी दारूचा महापूर बसस्थानक परिसरात चालू आहे,त्याच्यावर कोण्याच्याही लगाम नाही, किंवा दचक नाही, बसस्थानक परिसरात देशी, इंग्लिश,गावठी, दारूचा महापूर चालू आहे, दारू विक्रेत्यांवर पोलीसांच्या वचक दिसून येत नाही असे गावकरी मधून चर्चा करताना दिसत आहेत ,अवैध दारू विक्रेत्यांनी धुमाकूळ घातला आहे त्यावर वरिष्ठ स्तरांवर कार्यवाही अशी मागणी गावकरी करीत आहेत.

Read More

माळपिंपरी येथील कृषीदुतांनी मधुरम नर्सरीला दिली भेट. नर्सरी व्यवस्थापनाची माहिती घेतली जाणून.

जामनेर (प्रतिनिधी):- डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथील अंतिम वर्षातील कृषिदूत सुशांत जाधव, पवन बुवा , संग्राम पवार आणि सौरभ पाटील यांनी प्राचार्य डॉ. शैलेश तायडे आणि कार्यक्रम समन्वयक प्रा. बी. एम गोणशेटवाड , कार्यक्रम अधिकारी प्रो. व्हि.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मधुरम नर्सरी येथे भेट देऊन गट चर्चा प्रात्यक्षिक राबविले. मधुरम नर्सरीचे संचालक मा.श्री.योगेश पाटील यांनी रोपवाटिका (Nursery) व्यवस्थापन म्हणजे बियाणे, कलमे यांपासून रोपे तयार करणे, त्यांची योग्य निगा राखणे (पाणी, खत, कीटकनाशके), आणि योग्य पद्धतीने विक्री करणे यासाठीचे नियोजन होय. यशस्वी नर्सरीसाठी वनस्पतींची गरज, सिंचन, खत व्यवस्थापन, तापमान नियंत्रण, रोग-कीड नियंत्रण आणि मार्केटिंगचे ज्ञान आवश्यक आहे, ज्यात नियोजनबद्ध काम आणि रोपांविषयीची आवड यांची माहिती जाणून घेतली.

Read More

जामनेर तालुक्यातील २० नागरिकांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी,४ हजारांहून अधिक नागरिकांना मिळाला लाभ

जळगाव : राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या ‘गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षा’च्या माध्यमातून जामनेर तालुक्यात आरोग्य सेवेचा मोठा यज्ञ सुरू आहे. नुकतेच या अभियानांतर्गत २० रुग्णांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या. विशेष म्हणजे, या उपक्रमाद्वारे आतापर्यंत ४ हजार पेक्षा अधिक नागरिकांच्या डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टीदान देण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभागया मोहिमेत तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने आपली सेवा बजावली. यामध्ये प्रामुख्याने डॉ. प्रवीण पाटील, डॉ. मयूरी राठोड, डॉ. प्रियंका पाटील, डॉ. सोबीया अन्सारी, डॉ. विलास बाविस्कर यांनी रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या. टीम वर्क आणि समन्वयशस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले. यामध्ये इनचार्ज सिस्टर सुनीता वक्ते, अधिपरिचारक सागर कोळी आणि हिरा पालवी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या संपूर्ण अभियानाचे नियोजन आणि अंमलबजावणी ‘गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षा’चे समन्वयक तथा आरोग्यदूत पै. शिवाजी रामदास पाटील आणि समाजसेविका रुचिता चौधरी यांनी केली. खाजगी रुग्णालयातील शस्त्रक्रियेचा खर्च परवडत नसलेल्या ग्रामीण भागातील गरजू नागरिकांसाठी हे अभियान वरदान ठरत आहे. ‘प्रत्येकाला उत्तम आरोग्य आणि दृष्टी मिळावी’ या ध्येयाने प्रेरित होऊन हे कार्य अविरत सुरू असून, लाभार्थ्यांनी मंत्री गिरीश महाजन आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार मानले आहेत.

Read More

लेवा पाटीदार महासंघाकडून सौ. पुनम विजय फालक यांचा गौरव म्हणजे आमच्या फालक परिवाराचा अभिमान— ताप्ती एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष मोहन फालक

भुसावळ –येथील ताप्ती पब्लिक विद्यालयाच्या ऊपशिक्षीका, आदर्श शिक्षिका पुरस्कार तसेच मानाचा शाहु महाराज मानाचा नारी रत्न पुरस्कार प्राप्त व आंतरराष्ट्रीय संस्थेकडून शिक्षा शिरोमणी पुरस्कार प्राप्त सौ.पूनम विजय फालक यांनी केलेल्या कार्याची दखल लेवा पाटीदार महासंघाने घेतली असून त्यांना थोपटे लॉन्स, रहाटणी, पुणे येथे लेवा पाटीदार महासंघातर्फे कर्तृत्ववान महिला हा पुरस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक व महानगरपालिकेचे सभागृह नेते तसेच स्मार्ट सिटी प्रोजेक्टचे संचालक,नामदेव दादा ढाके, लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले, डि.जी.पी डाँ सुहास वारके, गोदावरी फाउंडेशन च्याअध्यक्षा व भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा डाॅ. केतकी उल्हास पाटील, जळगाव लेवा समाज मंडळ अध्यक्ष , एल एम सी ग्रुप चे अध्यक्ष मिलींद चौधरी, तसेच लेवा पाटीदार महासंघाचे सदस्य विजय फालक ,भंगाळे गोल्ड जळगावच्या संचालिका सुरेखा भंगाळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत व शुभ हस्ते त्यांना गौरवण्यात आले. या प्रसंगी मोठ्या संखेने समाज बांधव व महिला ऊपस्थित होते.पुरस्कार सोहळ्यानंतर अँड.जयश्री पाचपांडे,दिपक पाचपांडे,समाजसेवी खुशबु फिरके,चंदन फिरके यांचेसह अनेक ऊपस्थीतांनी त्यांचे अभिनंदन केले. सौ.पुनम फालक यांनी पुरस्कारांचा चौकार मारल्याबद्यल कुर्‍हे पानाचे येथील जयलक्ष्मी अँकेडेमी ने अभिनंदन समारोहचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गणेश आरतीने झाली.हा पुरस्कार फक्त पुरस्कार नसुन फालक परिवाराचा अभिमान असून सौ. पूनम फालक यांनी घेतलेल्या मेहनतीचे, आदर्शाचे व कार्य तप्तरतेचे, चिकाटीचे,कार्यक्षमतेचे द्योतक आहे. यामुळे परीवाराला,समाजाला प्रेरणा मिळते. मला नमूद करावेसे वाटते की मी अध्यक्ष असलेल्या संस्थेत त्या कार्यरत आहे . त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटला असून यापुढे सुद्धा त्यांनी जिद्दीने, मेहनतीने नवनवीन क्षेत्र पदांक्रांत करून संस्थेचे, विद्यालयाचे व परिवाराचे नाव उज्वल करावे. त्यांनी आजपर्यंत घेतलेल्या मेहनतीचे कष्टाचे प्रयत्नाचे व संसार रुपी भवसागरात ठामपणे उभे राहिलेल्या व आदर्श निर्माण करणाऱ्या आदर्श व्यक्तीचा सत्कार करतांना आम्हाला धन्यता वाटत आहे व यांचाच आम्हाला अभिमान आहे असे संस्थाध्यक्ष मोहन मोरेश्वर फालक यांनी नमुद केले.

Read More

करिअरच्या नव्या क्षितिजांकडे प्रेरणादायी वाटचाल-निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये रोटरी क्लबतर्फे व्याख्यान…!

पाचोरा :रोटरी क्लब पाचोरा-भडगावच्या वतीने “करिअरच्या विविध संधी” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये करण्यात आले. समाजहितासाठी नेहमीच उपक्रम राबवणाऱ्या रोटरी क्लबने विद्यार्थ्यांच्या भविष्यास दिशा देणारा हा उपक्रम राबवला.या कार्यक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या अमर्याद संधींविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. “प्रामाणिकपणा, सातत्य आणि परिश्रम या तीन मंत्रांनी यशाचे शिखर गाठता येते,” असा प्रेरणादायी संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि ध्येयदर्शन दिले.या प्रसंगी निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्षा मा. वैशालीताई सूर्यवंशी, निर्मल सीड्सचे संचालक डॉ. जे. सी. राजपूत, शाळेचे सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, रोटरी क्लब पाचोरा-भडगावचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली, सचिव डॉ. अजयसिंग परदेशी, प्राचार्य गणेश राजपूत, तसेच रोटरी उपप्रांतपाल भरत सिनकर, डॉ. प्रशांत सांगडे, डॉ. सिद्धांत तेली, डॉ. स्वप्नील पाटील, पिंकी जिनोदिया, लक्ष्मण जाधव, शाळेचे जनसंपर्क अधिकारी आय. बी. सिंग, समन्वयिका स्नेहल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली यांनी आपल्या भाषणात सांगितले की,“एकजुटीने आणि सेवाभावाने कार्य केल्यास कोणताही उपक्रम यशस्वी ठरतो; समाजसेवा हीच खरी समाधानाची दिशा आहे.”कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि आभारप्रदर्शन शाळेच्या समन्वयिका स्नेहल पाटील यांनी केले.करिअरविषयक मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांच्या मनात नव्या उमेद, नवे विचार आणि उज्ज्वल भविष्याचे स्वप्न उजळून निघाले.

Read More

प्रत्येक निवडणुकीत एकाच घरातील सदस्यांना उमेदवारी का?

जे बी एन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी जब्बार एस तडवी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फरदापुर गणात राजकीय पक्षांकडून पुन्हा एकदा एकाच घरातील सदस्यांना उमेदवारी तिकीट दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व रोष उफाळून येताना व्यक्त होत आहे. प्रत्येक निवडणुकीत त्याच कुटुंबातील व्यक्तींनाच संधी दिली जात असल्याने सामान्य कार्यकर्ते व नव्या तरुण उमेदवारांवर अन्याय होत असल्याची भावना जनतेतून पुढे येत आहे.“पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्तांना डावलून घराणेशाहीला प्राधान्य दिले जाते,” अशी टीका स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. यामुळे लोकशाही मूल्यांना तडा जात असून पक्षांची विश्वासार्हता कमी होत आहे, त्यातच रस्ते, पाणी,आरोग्य, व शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये अपेक्षित सुधारणा झालेली नाही निवडणूक आली की आश्वासनाचा पाऊस आणि नंतर मात्र शांतता असा अनुभव जनतेने वारंवार घेतला आहे यावेळी मात्र जनतेचा सूर बदललेला दिसत आहे घराणे नाही काम पाहिजे अशी स्पष्ट भूमिका फरदापुर गणात परिवर्तनाची लाट निर्माण होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे असेही मत व्यक्त होत आहे.तरुण व सक्षम उमेदवारांना संधी न देता वारंवार एकाच घरातील सदस्यांना तिकीट दिल्यास निवडणुकीत याचा फटका पक्षांना बसू शकतो, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. याबाबत राजकीय पक्षांनी आत्मपरीक्षण करून न्याय्य व पारदर्शक उमेदवार निवड प्रक्रिया राबवावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!