जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द परिसरात ढगफुटी:शेतकऱ्याचे अतोनात नुकसान-राष्टवादी कॉग्रेस नेत्यांची पाहणी, भरपाईसाठी शासनाला इशारा….

जे. बी. एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी-सुपडू जाधव आज बेटावद खुर्द परिसरात ढगफुटी झाल्यावर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे सर तालुका अध्यक्ष किशोर आप्पा पाटील बेटावद खुर्द परिसरात शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी केली शासनाने त्वरित पंचनामे करून योग्य भरपाई न दिल्यास लवकरच शेतकऱ्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चाचे आयोजन करू असा शब्द शेतकऱ्यांना दिला

Read More

छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकविला…

जेबीएन महाराष्ट्र न्यूजप्रतिनिधी जामनेर प्रतिनिधी. जब्बार तडवी दिनांक 01/11 /2025 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व कलागुणांना चालना देणारी आमची संस्था. संस्थाध्यक्ष भाऊराव कोलते पा.जय कालंका देवी शिक्षण संस्था संचलित छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थीनी तिने जिल्हास्तरीय एथलेटिक्स स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून तृतीय क्रमांक मिळवून संस्थेचा बहूमान वाढविला संस्थेच्या वतीने विद्यार्थिनीचा व क्रीडा शिक्षकांचा जाहीर सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत दरवर्षीय राज्यातील विविध शाळेतून क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात या क्रीडा स्पर्धेमध्ये प्रत्येक तालुक्यातून एक विद्यार्थिनी सोनम तडवी या विद्यार्थिनीने हा बहुमान पटकावून ही जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये तालुकास्तरावरती प्रथम क्रमांक पटकावला होता. यामधून विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होती ग्रामीण भागातील अतिशय होतकरू आदिवासी समाजातील अतिशय कष्टाळू व गरीब कुटुंबातील ही विद्यार्थिनी असून अभ्यासात हुशार असणारी परिस्थितीवर मात करत आपल्या कला व मेहनतीच्या बळावर तीन हजार मीटर स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळून शाळेचा व संस्थेचा बहुमान वाढवला. सोनम तडवी हिनी माध्यमांशी बोलताना सांगितले की मी दररोज व्यायाम व सकस आहार आणि कठोर मेहनत हेच माझ्या यशाचे गुपित असून यासाठी मला शाळेतील प्राचार्य संस्थाचालक व क्रीडाशिक्षकांचे वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन लाभले आहे त्यांच्या या मार्गदर्शनामुळेच मी आज हे यश मिळू शकले त्याबद्दल तिच्या घरच्यांनी व तिने स्वतः शाळेचे व संस्थेचे विशेष आभार मानले.जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे पार पडल्या सोनम कबीर तडवी बारावी वाणिज्य या मुलीने तृतीय क्रमांक पटकवून विद्यार्थ्यांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला त्याबद्दल संस्थाध्यक्ष भाऊराव कोलते व संचलाक मंडळ यांनी तिच्या जाहिर सत्कार केला तिच्या यशाबद्दल प्राचार्य नारायण कोलते यांनी क्रीडा शिक्षक जय राम घोती व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ही कामगिरी अतिशय चांगल्या प्रकारे बजावल्यामुळे त्यांचा सुद्धा सन्मान केला. या विद्यार्थिनीला माध्यमिक शिक्षणापासून क्रीडा शिक्षक विजय सिंग राजपूत भास्कर कमांड सुदामसिंगराठोड व डॉ. प्रा.जयराम घोती यांचे विशेष मार्गदर्शन होते याबद्दल सर्वांचे अभिनंदन करून आभार जीवन कोलते यांनी मानले.

Read More

भगवान सेना तर्फे डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी

भगवान सेना तर्फे डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी जामनेर (प्रतिनिधी)जामनेर तालुक्यातील भगवान सेना तर्फे डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात भगवान सेना प्रतिनिधींनी यांनी जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन सादर केले.या वेळी भगवान सेना जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, तालुकाध्यक्ष गजानन वासुदेव घ्यार, ज्येष्ठ समाजसेवक वसंत व्यवहारे, दत्तात्रेय नामदेव पाटील, प्रदीप तुकाराम पाटील, अतुल सुभाष पढार व शहराध्यक्ष जितेंद्र श्रीराम काळे उपस्थित होते.भगवान सेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यूमागील कारणांचा शोध घेऊन संबंधितांना शिक्षा होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत. या निवेदनावर शासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

Read More

जिल्हा परिषद प्रशाला अजिंठा येथे १९ वर्षांनंतर स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न

दि.२७.१०.२५२००५-०६च्या बॅचच्या माजी शिक्षक – विद्यार्थ्यांची शाळेत गाठीभेट,आठवणींना उजाळाअजिंठा येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे तब्बल १९वर्षांनंतर २००५-०६ च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात पार पडला.दिनांक २६ ऑक्टोंबर रोजी आयोजित या सोहळ्यासाठी माजी विद्यार्थी सकाळी ९.०० वाजता आपल्या जुन्या शाळेत एकत्र जमले आणि शाळेच्या आठवणींनी सर्वांचे डोळे पाणावले,कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेत नियमित परिपाठ घेण्यात आला. त्यामध्ये प्रतिज्ञा, प्रार्थना, राष्ट्रगीत आणि सुविचार घेण्यात आले. यानंतर शिक्षकांनी सर्वांना संस्कारपूर्ण जीवनाचे मार्गदर्शन केले. “कुटुंबात कसे राहावे, सासू-सासरे व आई-वडिलांचा आदर करावा, मोबाईलचा वापर मर्यादित ठेवावा आणि एकमेकांना नेहमी मदत करून संपर्कात राहावे” असे मौल्यवान विचार शिक्षकांनी मांडले.कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणी, अनुभव आणि शिक्षणानंतरच्या प्रवासाबद्दल मनोगत व्यक्त केले. माझा हा बेंच… तू इथे बसायचास…अशा जुन्या आठवणींनी शाळेच्या वर्गखोल्यांत भावनिक वातावरण निर्माण झाले. एकमेकांच्या कुटुंबांविषयी, व्यवसायांविषयी माहिती देत सर्वांनी बालपणीच्या दिवसांना उजाळा दिला.या स्नेहमिलन सोहळ्यास अध्यक्षस्थानी कुलकर्णी सर होते. मार्गदर्शन निळकंठ लोसरवार सर, शंकर गाडेकर सर, राजेंद्र सरदार सर, अण्णा जगताप सर, बनकर मॅडम, श्रीरामवार मॅडम, बोरसे मॅडम, रवी गौंड सर, विजय कालभिले, पवार सर, सोनावणे सर, पाटील मॅडम, काळे मॅडम, शारदा मॅडम व सीमा मॅडम यांनी केले.कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन डॉ. शवर्षा देशमुख,संध्या झलवार यांनी केले.या सोहळ्यात अश्विनी खंडेलवाल, विद्या देशमुख, नलिनी जाधव, ज्योती तायडे, उज्वला लाड, वैशाली पोळ, सोनू राठोड, पूजा वैष्णव, माया नैनाव, दिपाली चव्हाण, सुषमा मानकर, अंकिता चोंडिये, आरती झलवार, अनिता गुप्ता, अनिता आगवाल, भारती झलवार, तसेच विष्णू मुके शास्त्री (पत्रकार), दिपक मुके, विनोद सोनावणे, राहुल सपकाळ, अंकुश लोखंडे, गोपाल पैठणकर, सागर ढाकरे, राजू कासुधने, इम्रान शेख, जफर, अभिषेक, चेतन कुमावत, रितेश माली, विशाल खंडेलवाल, निलेश पवार आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.शिक्षकांना कार्यक्रमाची आठवण म्हणून माजी विद्यार्थ्यांनी समूह छायाचित्र फ्रेम भेटवस्तू म्हणून दिली,कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी शाळेतील शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि पुढील काळात असे स्नेहमेलन आयोजित करण्याचा निर्धार केला,प्रत्येक मनुष्य आजीवन विद्यार्थीच असतो. शाळेतील सुवर्णक्षणांनी आज पुन्हा एकदा आम्हा सर्वांना बालपणात नेले,” असे उपस्थित विद्यार्थ्यांनी भावनिकपणे सांगितलेस्नेह मिलन एक ऊर्जा देणारा कार्यक्रम. माणूसपण जपणाऱ्या व संस्कार घडवणाऱ्या अशा प्रेरक व मार्गदर्शक कार्यक्रमांचे आयोजन प्रत्येक शाळेमधून व्हायला हवे.

Read More

जामठी येथील महाजन विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा – “आठवणींचा सोहळा २०२५” उत्साहात संपन्न..

जे. बी. एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी-सुपडू जाधवजामठी, दि. २५ ऑक्टोबर (वार्ताहर)श्रीमती चि. स. महाजन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामठी येथे “माजी विद्यार्थी मेळावा – आठवणींचा सोहळा २०२५” हा सोहळा अत्यंत उत्साहवर्धक आणि भावनिक वातावरणात माजी विद्यार्थ्यांच्या स्वखर्चातून मोठ्या आनंदात पार पडला. या उपक्रमाने सन २०१० बॅचमधील माजी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शालेय जीवनातील सुवर्ण क्षणांची अनुभूती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. कैलास सत्रे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव श्री. भगवान महाजन, संचालक श्री. बी. इ. भुसारी, श्री. बी. सी. शेळके,श्री एम.ए.सत्रे तसेच मुख्याध्यापक श्री. पी. पी. पवार उपस्थित होते.कार्यक्रमास निवृत्त मुख्याध्यापक व शिक्षकवृंदांपैकी श्री. के. आर. पाटील, श्री. के. एस. बारी, श्री. एस. आर. तायडे, श्री. एस. टी. कोळी, श्री. एस. डी. महाजन, श्री. बी. डी. दांडगे, श्री. पी. डी. पाटील, श्री. पी. एस. सरोदे,श्री. जी.बी. गावंडे,श्रीमती पी. एस. पाटील, श्री. एस. एस. पाटील, श्री. जी. एस. पाटील, श्री. एन. पी. चौधरी, श्री. व्ही. आर. चौधरी,श्री.ए.आर.जंगले,श्री.एस.व्ही.पंडीत,श्री.के.बी.महाजन,श्री.अमित परखड, \ श्री.डि.यु.राठोड, श्री.सुधाकर गाढे, श्री. बावस्कर, श्री. गोरे श्री.चांगदेव सपकाळ तसेच शाळेतील सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन कोमल शर्मा व रोहन लोखंडे यांनी प्रभावीपणे केले.माजी विद्यार्थ्यांकडून विद्यालय परिसरात विविध फळझाडांची रोपं लावण्यात आली. तसेच २०१० च्या माजी विद्यार्थी संघातर्फे शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांना विशेष मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय यावेळी करून दिला.कार्यक्रमात श्री. के. आर. पाटील व श्री. एस. आर. तायडे यांनी आपली मनोगते व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा दिला. श्री. के. एस. बारी यांनी विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव एक सुंदर कविता सादर करून सर्वांना भावविभोर केले आणि मनोगत व्यक्त केले. तसेच श्रीमती पी. एस. पाटील मॅडम यांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व आनंद व्यक्त केला.माजी विद्यार्थ्यांनी स्वखर्चाने शाळेला ज्ञानदिप व मोठा फोकस लाईट यावेळी सप्रेम भेट दिला. मनोगतात श्री. रोहन लोखंडे यांनी १५ वर्षांनी संस्थेचा झालेला आमूलाग्र कायापालट, शिक्षकांच्या गोड आठवणी आणि शाळेबद्दलचे आत्मीय संबंध यांचा भावपूर्ण उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, “शाळा ही फक्त शिक्षणाची जागा नसून आयुष्याच्या पाया रचणारे मंदिर आहे. आज पुन्हा त्या आठवणींमध्ये रमण्याचा योग आला, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.” अध्यक्षीय भाषणात श्री. कैलास सत्रे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, संस्कार व सामाजिक जबाबदारी यांवर सखोल प्रकाश टाकला. त्यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. रोहन लोखंडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.या मेळाव्यामुळे विद्यालयाचा परिसर पुन्हा एकदा आनंद, आठवणी आणि भावनांनी ओथंबून गेला.

Read More

शेतकऱ्याच्या पिवळे सोन मक्याला अकराशे रुपये भाव कापसाची ही सहा हजारावर विक्री

प्रतिनिधी- सुपडू जाधवऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून सुरू झालेला पाऊस अधूनमधून पडत राहिला. सप्टेंबरमध्येही सरींनी शेतकऱ्यांच्या धांदल्यावर थोडेसे संकट आणले, तर ऑक्टोबरमध्ये पावसाने उघडीप दिली. अतिवृष्टी आणि पूरस्थितीतून वाचलेल्या कापूस, मका, सोयाबीन आणि तूर पीक शेतकऱ्यांच्या हाती लागले. मात्र, शासनाच्या सीसीआय आणि नाफेडच्या खरेदी केंद्रांची अनुपलब्धता शेतकऱ्यांसाठी मोठा प्रश्न ठरला आहे.जामनेर तालुक्यात यावर्षी पांढऱ्या सोन्याप्रमाणे ओळखल्या जाणान्या कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली SM होती. तसेच ‘पिवळे सोनं म्हणविल्या जाणाऱ्या मक्याची लागवड गतवर्षीच्यातुलनेत अधिक झाली. पिकांची स्थिती सुरुवातीला उत्कृष्ट होती. ज्यामुळे शेतकऱ्यांनी मोठे उत्पादन मिळेल आणि त्यांना चांगला लाभ होईल, असा विश्वास बाळगला होता. मात्र, सप्टेंबर महिन्यातील ढगफुटीसारख्या पावसामुळे शेतकन्यांच्या प्रयत्नांचा परिणाम क्षणात नष्ट झाला. मक्याचे दाणे काळवंडले, अनेक कणसे भरल्या गेल्या नाहीत, ज्या भरल्या होत्या त्यावर अतिपावसामुळे कॉब फुटले, त्यामुळे उत्पन्न खूप घटले. कापूसव सोयाबीन पिकांबाबतही हाच परिणाम दिसून येत आहे. पाऊस थांबल्यानंतर शेतकऱ्यांनी कापूस आणि मका विक्रीसाठी काढले. मात्र, शासनाचे खरेदी केंद्र उपलब्ध नसल्यामुळे खासगी व्यापायांनी विविध कारणे देत माल खरेदी करणे सुरू केले. कापूस ७७१० ते ८११० रुपये प्रतिक्विंटल असतानाही व्यापान्यांनी ६००० ते ६२०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी सुरू केली आहे. मक्या ला हमीभाव २२०० ते २२८० रुपये प्रतिक्विंटल असूनही स्थानिक व्यापारीशेतकऱ्यांकडून ११०० ते १३१० रुपये दराने खरेदी करत आहेत.शेतकऱ्यांच्या मते, ही परिस्थिती त्यांच्यासाठी मोठा आर्थिक फटका ठरत आहे. पिकांच्या चांगल्या उत्पादनाचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आला आपली मेहनत आणि आर्थिक गुंतवणूक कमी भावात विकावी लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी शासनाकडे व व्यापा-यांवळे तातडीने मार्ग काढून परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Read More

जामनेरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला धक्का — राज्य संघटक राहुल चव्हाण यांचा भाजपात प्रवेश

जामनेर (प्रतिनिधी) जामनेरच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण करणारी घटना आज घडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्य संघटक आणि निष्ठावान कार्यकर्ते राहुल चव्हाण यांनी आज पक्षाच्या सर्व पदांवरून व सदस्यत्वावरून राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश जामनेर येथे पार पडला असून, कार्यक्रमास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत राहुल चव्हाण यांनी अधिकृतरित्या भाजपचा झेंडा हाती घेतला. या प्रसंगी भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राहुल चव्हाण यांच्या प्रवेशामुळे जामनेरच्या स्थानिक राजकारणात नवीन राजकीय समीकरणे आकार घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेतील सक्रिय व प्रभावी पदाधिकारी म्हणून ओळखले जाणारे चव्हाण यांचा पक्षत्याग हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. भाजपात प्रवेशानंतर राहुल चव्हाण यांनी सांगितले की, “मंत्री गिरीश महाजन यांच्या विकासाच्या राजकारणाने प्रेरित होऊन मी भाजपात प्रवेश केला आहे. जनतेच्या हितासाठी आणि जामनेरच्या सर्वांगीण विकासासाठी मी कार्य करणार आहे.” या प्रवेशामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जामनेरमधील राजकीय समीकरणे अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Read More

जामनेरात मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळे संपन्न

जामनेर (प्रतिनिधी):जामनेर नगरपरिषदेच्या वतीने आज विविध विकासकामांचे भव्य भूमिपूजन व लोकार्पण सोहळे जल्लोषात पार पडले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्राचे मंत्री गिरीशभाऊ महाजन होते. त्यांच्या हस्ते अनेक महत्त्वाच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नगरपरिषदेचे माजी नगरसेवक, नगरसेविका, पक्षपदाधिकारी तसेच शहरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या निमित्ताने जामनेर शहरातील नागरिकांना सुविधा पुरवणारी, शहराचा विकास वेगाने करणारी अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत.लक्ष्मी कॉलनी (गट क्र. 391/2) — कंपाउंड वॉल व लादीकरण — 64.51 लाख, गिरिजा कॉलनी (गट क्र. 458) — संतोषी माता मंदिर परिसरात क्लब हाऊस बांधकाम — 79.36 लाख, पाचोरा रोड (गट क्र. 206) — क्लब हाऊस व कंपाउंड वॉल — 128.93 लाख,शिव कॉलनी — कंपाउंड वॉल, लादीकरण व बगीचा विकास — 45.34 लाख, मधुबन कॉलनी (गट क्र. 43/2 व 431/2) — खुल्या जागेचा विकास — 47.13 लाख व 69.83 लाख,शहाजान शहावली दर्गा परिसर — सौंदर्यीकरण व विकास कार्य — 100 लाख, विवेकानंद नगर — व्यायामशाळा बांधकाम — 49.82 लाखगट क्र. 292/2 — व्यायामशाळा बांधकाम — 72.72 लाखगट क्र. 5 — कुस्ती आखाडा बांधकाम — 52.74 लाख या सर्व कामांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशासक तथा मुख्याधिकारी नितीन बागुल आणि नगरपरिषद कर्मचारीवृंद यांनी मोलाचे परिश्रम घेतले. या कार्यक्रमाद्वारे जामनेर शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळणार असून, नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.

Read More

गरुड विद्यालयात विद्याथ्यांनी स्वता बनवले रंगबेरंगीआकाश कंदिल.

शेंदुर्णी – येथील आ ग.र.ग माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी रंगबेरंगी आकाश कंदिल बनवले..आपल्या घरासाठी नेहमी आपण चांगल्या प्रकारचे सुंदर दिसावे म्हणून बाजारातून आकाश कंदील खरेदी करत असतो परंतु स्वताच्या हाताने आकाश कंदिल बनवून ते घरी लावाणे. यात मुलांना वेगळा आंनद मिळतो.मुलांनी चांगल्या प्रकारचे आकाश कंदील बनवण्याचे विचार करून ते प्रत्यक्ष करून दाखविले यासाठी वर्गांमध्ये शिकवण्याच्या विषयामध्ये कार्यानुभव अंतर्गत हा विषय प्रसंगोपात सोपे प्रकार मध्ये शिकविला जातो यासाठी विद्यालयाचे सहशिक्षक श्री जी टी कुमावत सर यांनी मुलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून आकाश कंदील तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले होते विद्यार्थ्यांनी यासाठी लागणारे साहित्य खरेदी करून कमी खर्चामध्ये सुंदर व आकर्षक असे आकाश कंदील तयार केले यामध्ये प्रामुख्याने कलाशिक्षक श्री डी एच बारी सर व श्री एस आर चव्हाण सर यांनी सुद्धा सहकार्य केले यासाठी इयत्ता आठवीचे वर्ग आकाश कंदील बनवण्यासाठी घेण्यात आले उपक्रम बनवत असताना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर एस चौधरी सर ,पर्यवेक्षक श्री व्ही एम शिरापुरे सर .किमान कौशल विभागाचे प्राध्यापक श्री शैलेंद्र शेळके सर ,श्री राहुल गरुड सर ,श्री सुरवाडे सर .उपक्रम पाहण्यासाठी उपस्थित होते तसेच इयत्ता आठवीच्या वर्गाचे सर्व वर्गशिक्षक यांचेही सहकार्य मिळाले हा चांगला आणि स्तुत्य उपक्रम म्हणून घेण्यात आला .हा दरवर्षी कार्यानुभव अंतर्गत उपक्रम घेण्यात येतो .शिका आणि कमवा यासाठी पण हा उपक्रम घेण्यात येतो .वर्षामध्ये स्वबळावर कौशल्य निर्माण करून रोजगारही मिळवला जाऊ शकतो

Read More

निर्मल इंटरनॅशनल स्कूलची श्रेया महालपुरे चमकली! विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड..!

प्रतिनिधीगजानन क्षीरसागरलोहारा तालुका पाचोरापाचोरा:-क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या विद्यमाने तथा जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव यांच्या मार्फत आयोजित जिल्हास्तर शालेय कॅरम स्पर्धेत निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या कु. श्रेया विनोद महालपुरे हिने १७ वर्षे वयोगटात उल्लेखनीय कामगिरी सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या झळाळत्या यशामुळे आता ती नाशिक येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.श्रेयाच्या या यशाने संपूर्ण शाळा परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. संस्थेच्या अध्यक्षा मा. वैशालीताई सुर्यवंशी, सचिव श्री. नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्य श्री. गणेश राजपूत, जनसंपर्क अधिकारी श्री. आय. बी. सिंग, उपप्राचार्य श्री. प्रदिप सोनवणे, समन्वयक सौ. स्नेहल पाटील व प्रशासकीय अधिकारी श्री. संतोष पाटील यांनी श्रेयाचे मन:पूर्वक अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.या यशामागे क्रीडा शिक्षक श्री. गणेश मोरे, श्री. नंदू पाटील, श्री.प्रवीण मोरे व श्री. सोमनाथ माळी यांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा असून, त्यांच्या अथक परिश्रमाचे फळ श्रेयाने विभागीय पातळीवरील संधीच्या रूपाने प्राप्त केले आहे.श्रेयाच्या या कामगिरीमुळे निर्मल इंटरनॅशनल स्कूलने पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रात आपली गुणवत्ता आणि प्राविण्य सिद्ध केले आहे .

Read More
error: Don't Try To Copy !!