Jalgaon
छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिरास जिल्हाधिकारी यांची उपस्थिती
नेरी दिगर (ता. जामनेर) | दिनांक ०४ जून २०२५ रोजी महसूल मंडळ नेरी अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर ग्रामपंचायत नेरी दिगर येथील महादेव मंदिर सभामंडपात मोठ्या उत्साहात व व्यापक जनसहभागातून संपन्न झाले. या शिबिरात विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून जळगाव जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल, उपविभागीय अधिकारी श्री विनय गोसावी यांच्यासह सर्व विभागांचे तालुका प्रमुख उपस्थित होते. शिबिराची सुरुवात उपविभागीय अधिकारी श्री विनय गोसावी यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी शिबिराच्या उद्दिष्टांबाबत सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी नागरिकांसमोर आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “राजस्व समाधान शिबिरे ही सेवा पुरवठ्यापेक्षा अधिक असून, शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा सशक्त करण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे.” मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांनी अशा शिबिरांच्या फलश्रुतीवर भर देत सांगितले की, “ग्रामस्तरावर अशा उपक्रमांमुळे योजनांची अंमलबजावणी कृतीशीलपणे होते व लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचते.” शिबिरातील विभागनिहाय लाभ: ठळक उपक्रम: कार्यक्रमाची सांगता तहसीलदार श्री नानासाहेब आगळे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. त्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व विभागप्रमुख, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे आभार मानले.
प्रॉपर्टी डीलर म्हणून ओळख असलेल्या रामेश्वर नथू बिजागरे यांची गळफास घेऊन आत्महत्या
जामनेर तालुक्यात मंगळवारी दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली. प्रॉपर्टी डीलर म्हणून ओळख असलेल्या रामेश्वर नथू बिजागरे (वय 40, रा. चिंचखेडा तवा) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एका मित्राला फोन करून ही माहिती दिली होती, मात्र मदतीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, रामेश्वर बिजागरे हे लाखोंच्या जमिनीच्या व्यवहारांमुळे जामनेर परिसरात परिचित होते. मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे जामनेर-बोदवड रोडवरील भवानी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. नंतर काही मित्रांसह धाब्यावर जेवणही केले. त्यानंतर त्यांनी एका निकटवर्तीय मित्राला फोन करून “आपण आत्महत्या करत आहे,” असे सांगितले. संबंधित मित्राने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु काही वेळाने त्यांचा फोन बंद यायला लागला. यानंतर मित्रांनी लोकेशनवरून शोध घेत भवानी घाट परिसर गाठला असता, बिजागरे यांचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृत्यूपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी असल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, या चिठ्ठीत काही व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली असून, पैशांचे व्यवहार, देणे-घेणे यांचा उल्लेख असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, मृत्यूमागील कारणे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. रामेश्वर बिजागरे यांनी अल्पावधीतच आर्थिक प्रगती केली होती. प्रॉपर्टी डीलिंगच्या माध्यमातून त्यांचे अनेकांशी व्यवहार होते. या व्यवहारांमुळे मानसिक तणाव होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे चिंचखेडा गावात तसेच जामनेर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
छत्रपती शिवाजी ब्रिगेड जामनेर तालुकाध्यक्ष पदी अमोल ठोंबरे.तर उपाध्यक्षपदी प्रविण गावंडे.
जामनेर (प्रतिनिधी):- छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुकाध्यक्ष म्हणून अमोल ठोंबरे यांची तर उपाध्यक्ष म्हणून प्रविण गावंडे यांची निवड करण्यात आली.त्यांना छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले.छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी जामनेर तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून नवनियुक्त अध्यक्ष,उपाध्यक्ष यांच्यावर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.यावेळी तालुका कार्यकारणी बैठकिला संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे, डॉ.धनंजय बेंद्रे,जिल्हा उपाध्यक्ष कैलास पाटील , सामाजिक कार्यकर्ते अरुण पाटील , नितीन पाटील, l नारायण महाजन, प्रमोद पाटील, कैलास बडगुजर , शरद मोरे, दीपक बावस्कर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्याध्यापकाचा लाचखोरीचा प्रयत्न उधळला; लाच मागणाऱ्या मुख्याध्यापकावर दुसऱ्यांदा कारवाई
निपाणे (ता. एरंडोल), जि. जळगाव | प्रतिनिधी संत हरिहर माध्यमिक विद्यालय, निपाणे येथील मुख्याध्यापकाने शाळेतील शिपायाकडून वैद्यकीय बिल मंजुरीसाठी ३६०० रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव युनिटने या प्रकरणी सापळा कारवाई करत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार हे शाळेत शिपाई म्हणून कार्यरत असून त्यांच्या पत्नीच्या ₹२३,८१५/- रुपयांच्या वैद्यकीय खर्चाचे बिल मंजूर करून घेण्यासाठी मुख्याध्यापक संदिप प्रभाकर महाजन (वय ४५, रा. नेपाणे) यांनी ₹५,०००/- लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम ₹३,६००/- ठरली होती. या संदर्भात तक्रारदाराने २१ डिसेंबर २०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी करत असताना मुख्याध्यापक महाजन यांनी पुन्हा लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. मात्र, लाच स्वीकारण्यापूर्वीच विभागाने कारवाई करत आरोपीविरुद्ध कासोदा पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ८५/२०२५, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८, कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही संदिप महाजन यांच्यावर वेतन निश्चितीच्या फरकाच्या ₹२,५३,७८०/- रुपयांवरून ५ टक्के लाचेची मागणी करून ₹१०,०००/- रु. स्वीकारल्याचा गुन्हा २७ जून २०२४ रोजी दाखल करण्यात आला होता (गु.र.क्र. १०५/२०२४). ही कारवाई पोलीस उप अधीक्षक श्री. योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा पथकात सफौ सुरेश पाटील, पोहेकॉ किशोर महाजन, पो.ना. बाळू मराठे, पोकॉ प्रदीप पोळ यांचा समावेश होता. ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली
तोरनाळा येथे महाराणा प्रतापसिंह जयंती उत्साहात साजरी
तोरनाळा (ता. जामनेर) | प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील तोरनाळा येथे आज महाराणा प्रतापसिंह यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास मंत्री ना. गिरीश महाजन यांचे खंदे समर्थक तथा जळगाव जिल्हाध्यक्ष चंद्रकांत (चंदू भाऊ) बाविस्कर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासह कार्यक्रमाला गणेश भाऊ राजपूत (माजी जिल्हा परिषद सदस्य, बुलढाणा), मयूर भाऊ पाटील (तालुका अध्यक्ष, जामनेर), नवल भाऊ पाटील (माजी सभापती, जामनेर), युवराज भाऊ पाटील (माजी सरपंच, तोरनाळा), विश्वजीत भाऊ (जामनेर), रमेश भाऊ राजपूत (सदस्य, ग्रामपंचायत तोरनाळा), तसेच आरोग्यदूत जालमसिंग भाऊ राजपूत (जामनेर) हे सन्माननीय उपस्थित होते. कार्यक्रमास तोरनाळा व परिसरातील कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराणा प्रतापसिंह यांच्या शौर्यगाथेचे स्मरण करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकत प्रेरणादायी विचार मांडले.
शहापूर येथे घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ; २०८ लाभार्थ्यांना ऑनलाईन पासचे वितरण
शहापूर (ता. जामनेर) | प्रतिनिधीजामनेर तालुक्यातील शहापूर गावात घरकुल योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी मा. विनय गोसावी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ऑनलाईन पद्धतीने ETP पास जनरेट करून खडकी नदीपात्रातून वाळूचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामार्फत घरकुल बांधणीसाठी आवश्यक वाळू सरकारी पातळीवरून मोफत देण्यात येत असून, गरजू लाभार्थ्यांना या सुविधेचा थेट लाभ मिळाला आहे. एकूण २०८ लाभार्थ्यांना ऑनलाईन पासेस वितरित करण्यात आले. उपस्थित मान्यवर:या कार्यक्रमावेळी तहसीलदार जामनेर, गटविकास अधिकारी जामनेर, ग्राम महसूल अधिकारी शहापूर, ग्रामपंचायत अधिकारी शहापूर, पोलीस पाटील शहापूर, व घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तांत्रिक पारदर्शकता आणि सुलभता:ETP प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली गेली असून लाभार्थ्यांनी शासनाच्या या सुविधेचे स्वागत केले आहे. गावकऱ्यांनी या उपक्रमामुळे घरकुल बांधणीला गती मिळेल, अशी भावना व्यक्त केली.
पहूर येथे DBT शिबिरास लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; शासन योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत
पहूर | प्रतिनिधीजामनेर तालुक्यातील पहूर येथे संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांसाठी आयोजित विशेष डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) शिबिरास लाभार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आधार आणि बँक खात्यांच्या लिंकिंगसह आधार अपडेट करण्याच्या सुविधा या शिबिरात उपलब्ध करून देण्यात आल्या. शहर किंवा तहसील कार्यालयात जाऊन आधार लिंकिंग करणे हा प्रक्रिया वृद्ध, दिव्यांग व निराधार लाभार्थ्यांसाठी त्रासदायक ठरत असल्याने उपसरपंच राजू जाधव यांच्या पुढाकाराने आणि तहसीलदार श्री. नानासाहेब आगळे यांच्या सहकार्याने हे शिबिर पहूर ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन मा. जिल्हाधिकारी जळगाव श्री. आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. संजय गांधी योजनेच्या नायब तहसीलदार श्रीमती माया शिवदे तसेच सहायक महसूल अधिकारी श्री. सुहास कोटे यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. शिबिरावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. राजधर पांढरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री. वासुदेव घोंगडे, सरपंच श्री. अब्बू तडवी, माजी उपसरपंच श्री. रवींद्र मोरे आणि श्री. चेतन रोकडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. शासनाच्या योजनांचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी श्रीमती पूजा नागरे, श्रीमती पल्लवी सोळुंके, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी श्री. भूषण राजपूत, श्री. आनंदा शिंदे व श्री. विजय सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष सेवा देत लाभार्थ्यांना आधार लिंकिंग, बँक खाते लिंकिंग आणि इतर प्रक्रिया समजावून सांगितल्या. या शिबिराला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला असून गावकऱ्यांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले आहे. शासनाच्या सेवा घरपोच मिळाल्याने समाधान व्यक्त करत संयोजकांचे आभार मानण्यात आले
राज्य पोलीस दलातील 22 पोलीस अधीक्षकांच्या बदल्या.
मुबंई (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील 22 पोलीस अधीक्षक आणि उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर सिंधुदुर्ग, धाराशिव, रायगड अशा बड्या जिल्ह्यांचा समावेश आहे. रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली अहिल्यानगरला झाली… तर अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची बृहन्मुंबईला पोलीस उपायुक्त म्हणून वर्णी लागली आहे. सोमनाथ घार्गे यांच्या बदलीनंतर आंचल दलाल यांची रायगडच्या पोलीस अधीक्षक पदी निवड झाली आहे.धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सांगली येथील अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. सातारचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलिस दलात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुणे अधीक्षक तुषार दोषी यांची साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक पदी वर्णी लागली आहे. अकोल्यात गेल्या वर्षभरापासून वादग्रस्त ठरलेले जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांची बदली नागपूरला राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक ४ ला करण्यात आली असून त्यांच्या जागेवर नागपूर शहर पोलिस आयुक्तालयात उप आयुक्त पदावर कार्यरत असलेले अर्चित चांडक यांची बदली करण्यात आली आहे.खालीलप्रमाणे झाल्यात पोलीस बदल्या –आंचल दलाल – समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, पुणे पोलीस अधीक्षक, रायगडसोमनाथ घार्गे – पोलीस अधीक्षक, रायगड → पोलीस अधीक्षक, अहिल्यानगरमहेंद्र पंडित – पोलीस अधीक्षक, कोल्हापूर पोलीस उप आयुक्त, ठाणे शहरयोगेश गुप्ता – पोलीस अधीक्षक, नागरी सुरक्षा, नांदेड पोलीस अधीक्षक, कोल्हापूरबच्चन सिंग – पोलीस अधीक्षक, अकोला समादेशक,रा. पो. बल, गट क्र. 4, नागपूरराकेश ओला – पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, पोलीसउपदेश, बृहन्मुंबईअर्चित चांडक – पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर पोलीस अधीक्षक, अकोलामंगेश शिंदे – आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, नागपूरराजातिलक रोशन – सहायक पोलिस महासंचालक, मुंबई पोलिस उप, बृहन्मुंबईबाळासाहेब पाटील – पोलीस अधीक्षक, पालघरपोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीणयतिन देशमुख – अप्पर पोलीस अधीक्षक, गडचिरोली पोलीस अधीक्षक, पालघरसौरभ अग्रवाल – पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग गुन्हे अन्वेषण विभाग, पुणेमोहन दहिकर – पोलीस उप आयुक्त, ठाणे पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्गविश्व पानसरे – पोलीस अधीक्षक, बुलढाणा → समादेशक,रा. रा. पो. बल गट क्र. 9, अमरावती
‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याच्या चौकशी समितीच्या अध्यक्षालाच अटक. शैक्षणिक क्षेत्रात खळबळ
ना गपूर (प्रतिनिधी) राज्य भर गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याच्या चौकशी समितीचे अध्यक्ष राहिलेले विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांना गुरुवारी रात्री अटक केली. विशेष म्हणजे, शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासासाठी सुरुवातीला चिंतामण वंजारी यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती.त्यांच्या अहवालाच्या आधारेच या संपूर्ण चौकशीला नवीन वळण मिळाले. आता स्वतः वंजारीच चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत.नागपूर जिल्ह्यात २०१९ पासून गैरमार्गाने ‘शालार्थ आयडी’ प्रदान करून वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात आले. नागपूर विभागीय उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी रवींद्र पाटील यांनी १२ मार्च रोजी पोलिसांकडे या घोटाळ्याचीपाटील यांनी १२ मार्च रोजी पोलिसांकडे या घोटाळ्याची तक्रार केली. उल्हास नरड यांच्या सांगण्यावरून ही तक्रार करण्यात आली होती. प्राथमिक माहिती अहवालानुसार, विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने फेब्रुवारी २०२५ मध्ये शिक्षण आयुक्तांना अहवाल सादर केला होता. उपसंचालक कार्यालयाने २११ प्राथमिक शिक्षक, २ मुख्याध्यापक, १८ कनिष्ठ लिपिक, १३ शिपाई अशी २४४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यादी दिली होती. त्यानंतर शिक्षण आयुक्तांनी वंजारी यांच्या अहवालाच्या आधारे कठोर भूमिका घेत तपासणी सुरू केली.यासाठी २०१९ ते २०२५ पर्यंत नागपूर जिल्ह्यातील संशयित प्राथमिक शाळांमधील ‘शालार्थ आयडी’चा तपास सुरू केला होता. परंतु, आता वंजारी यांनाच अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, वंजारी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होण्यापूर्वी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी होते.या दरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकारी असलेले मृत सोमेश्वर नैताम यांची खोटी स्वाक्षरी करून २०१० ते २०१४ या काळात शिक्षक रुजू झाल्याचे दाखवण्यात आले आहे.तसेच, त्यांचे ‘शालार्थ आयडी’ २०१९ ते २०२५ या काळात निर्माण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे वंजारी यांना अटक करण्यात आली असून या दिशेने तपास केला जाणार आहे.
समाजातील सुमारे 30 वर्षीय तरुणाने गावाशेजारील जंगलात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या
मुदखेडा येथील आकाश सोनवणे या भिल समाजातील सुमारे 30 वर्षीय तरुणाने गावाशेजारील जंगलात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आकाश सोनवणे जंगलात जाऊन विष घेतले. बराच वेळ तो घरी परतला नसल्याने घरच्यांनी शोध घेतला असता तो अर्धमूच्र्छित अवस्थेत आढळून आला. कुटुंबीयांनी तातडीने त्याला जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अधिकच बिघडल्याने पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, वाटेतच त्याचा मृत्यू झाला.या घटनेने मुदखेडा गावात शोककळा पसरली आहे. आकाश हा स्वभावाने शांत व मनमिळावू होता, असे गावकऱ्यांनी सांगितले. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही.
