छत्रपती शिवाजी महाराज महाराजराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन

गारखेडा (ता. जामनेर) महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव अंतर्गत 100 दिवसांच्या कृती आराखड्यानुसार आणि जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत “छत्रपती शिवाजी महाराज महाराजराजस्व समाधान शिबीर अभियान” दिनांक 23 मे 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता राम मंदिर सभागृह, गारखेडा ता. जामनेर येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिरात सर्व शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार असून, विविध शासकीय विभागांतर्गत येणाऱ्या जनतेच्या समस्या व तक्रारींचे निवारण तत्काळ करण्यात येणार आहे. या शिबिराचा गारखेडा महसूल मंडळातील तसेच संपूर्ण जामनेर तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.

Read More

ग्रामपंचायत अधिकाऱ्यास 40 हजारांची लाच घेताना अटक

जळगांव(प्रतिनिधी)लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ला.प्र.वि.) धुळे युनिटच्या पथकाने पारोळा तालुक्यातील तामसवाडी ग्रामपंचायतीचे अधिकारी दिनेश वासुदेव साळुंखे (वय 53) यांना 40,000 रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. तक्रारदार हे शासकीय बांधकाम ठेकेदार असून त्यांनी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत तामसवाडी येथे सुमारे 5 लाख रुपये किंमतीचे रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण केले होते. या कामासाठी 4 लाख रुपयांची देय रक्कम ग्रामपंचायतीकडून तक्रारदारांच्या खात्यावर जमा झाली होती. या पार्श्वभूमीवर तक्रारदार आपल्या चुलत काकांसह 7 दिवसांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात इतर कामासंदर्भात गेले असता आरोपी दिनेश साळुंखे यांनी त्यांच्या खात्यात जमा झालेल्या रकमेच्या 10 टक्के म्हणजेच 40,000 रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराने ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कळवली. त्यानंतर 19 मे रोजी पडताळणी करून पथकाने सापळा रचला. आरोपीने अंमळनेर येथील दगडी दरवाजा समोरील राजे संभाजी चौकात तक्रारदाराकडून 40,000 रुपये स्वीकारले आणि दुचाकीवरून पळून गेला. मात्र त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्याची चौकशी सुरू आहे. या कारवाईसाठी सापळा पर्यवेक्षण अधिकारी श्री. सचिन साळुंखे, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. धुळे आणि तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पो.हवा. राजन कदम व पो.कॉ. प्रशांत बागुल यांनी सापळा कारवाईत सहभाग घेतला. संपूर्ण कारवाई मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परीक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Read More

श्री शामराव पाटील कुरे व सौभाग्यवती चौत्राबाई शामराव कुरे यांचा 51 वा लग्नाचा सुवर्ण महोत्सव उत्साहात साजरा

प्रतिनिधी हानुमंत चंदनकर ====================== नांदेडच्या नायगांव तालुक्यातील ताकबीड येथील श्री शामराव पाटील कुरे सौभाग्यवती चौत्राबाई शामराव कुरे यांच्या लग्नाचा 51 वा सुवर्ण महोत्सव आज दिनांक 19 मे रोजी साई तीर्थ मंगल कार्यालय नायगाव येथे मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला त्यांच्या मुलांनी यशवंत कुरे, बसवंत कुरे, भास्कर कुरे,कैलास कुरे या चार भावांच्या संकल्पनेतून आयोजित केलेला हा सोहळा आनंदी उत्साहात संपन्न झाला यांत आई वडीलांचा आनंद साजरा करण्यासाठी विवाह प्रसंगा प्रमाणे आई वडीलांना दाग दागिने, पारंपारिक शाही पोशाख धोतर सदरा फेटा दोन अंगठी, गळ्यातील चैन आईसाठी नववधू प्रमाणे सर्व अलंकार ऐटबाज दोघांची ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक लग्नाचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी श्री केशवराव बळवंतरावजी पाटील चव्हाण, सुधाकररावजी पाटील चव्हाण व नायगांव नगरपंचायतीचे नगर उपाध्यक्ष युवा नेते विजय पाटील चव्हाण, तंटामुक्त समितीचे तालुका अध्यक्ष हनमंतराव पाटील चव्हाण, नायगाव तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्रीनिवासरावजी पाटील चव्हाण, माधवरावजी बेळगे, देविदासजी बोमनाळे व जिल्हा परिषद शिक्षण सभापती संजयजी बेळगे साहेब डॉ. शिंपाळे साहेब, डॉ. कुऱ्हाडे साहेब व पत्रकार बाळासाहेब पांडे सर, चंदनकर सर, राम मोरे सर व नगरसेवक संजय पा. चव्हाण, शिवाजी पा. कल्याण नगरसेवक विठ्ठल आप्पा बेळगे, नगरसेवक पांडुरंग पा. चव्हाण, साहेबराव पा शिंदे, माधव शंकरराव बेळगे, दत्तात्रय शिंदे सर, पवन गादेवार, बसंतराव मुंके सुभाषराव मुंके आणि चव्हाण पाटील मित्र मंडळ व ताकबीड येथील सरपंच रंजीत पा. कुरे, सराफा व्यापारी ज्ञानेश्वर सावकार कवटीकवर, हनमंत पा. चव्हाण कैलास पा. कल्याण व इतर सर्व सराफा व्यापारी व किराणा व्यापारी रमेश सावकर चिद्रावार प्रकाश सावकार कवटीवार अनिल गादेवार व सर्व किराणा व्यापारी तसेच सौभाग्यवती चौत्राबई शामराव कुरे यांचे माहेर लालवंडी येथील बाबुरावजी लंगडापुरे ,भगवानरावजी लंगडापुरे व शंकररावजी दगडगावे विश्वनाथजी केरुरे पिराजी भुसेवाड बाबुराव दगडगावे व लालवंडी, ताकबीड व नायगाव येथील सर्व नागरिक कुरे परिवारातील सर्व बाईलेकीचे पाहुणे मंडळी व करामुंगे,शिराळे, जनकवाडे, परिवार, व इतर सर्व आप्तस्वकीय नातेवाईक यांसह परिसरातील नागरिक उपस्थित राहून भरभरून शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमात आई-वडिलांबद्दल या चार भावंडांनी केलेला हा आई-वडिलांचा सोहळा आज उपयोगी समाजाला प्रेरणादायी ठरू शकते असे मनोगत व्यक्त केले आणि या चार भावंडांचे कौतुक व शुभेच्छा रुपी आशीर्वाद दिले व मोलाचे मार्गदर्शन नगर पंचायत उपाध्यक्ष विजयजी पाटील चव्हाण ,संजयजी बेळगे साहेब व सौ. सरोजिनी शिंपाळे मॅडम यांनी केले कार्यक्रमाची प्रस्तावना व्यंकट पाटील शिंदे व कार्यक्रमाचे आभार कैलास कुरे यांनी केले

Read More

लुबाडलेले 1600 रुपये काही मिनिटांतच सैनिकाच्या खात्यात परत

पाचोरा – निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारिता हे लोकशाहीचे चौथे स्तंभ म्हणून ओळखले जाते, याचे जिवंत उदाहरण नुकतेच पाचोरा येथे पाहायला मिळाले पत्रकार संदीप महाजन यांनी अनधिकृत रेल्वे तिकीट एजंटकडून भारतीय सैनिकाची करण्यात आलेली आर्थिक लुबाडणूक उघडकीस आणताच संबंधित भामट्याने युद्धजन्य परिस्थिती काळात अफरातफरीत केलेली फसवणूक लपवण्यासाठी केवळ काही मिनिटांतच सैनिकाच्या खात्यात 1600 रुपये परत वर्ग केले.ही घटना आहे पिंपरी सार्वे येथील रहिवासी आणि सध्या CISF मध्ये कार्यरत असलेल्या जवान प्रदीप बाविस्कर यांच्या बाबतीत. देशात युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्यामुळे जवानांना तातडीने त्यांच्या सेवास्थळी परत हजर राहण्याचे आदेश मिळाले होते. या घाईत त्यांनी रेल्वे तिकीट काढण्यासाठी पाचोरा येथील तिकीट एजंटची मदत घेतली. मात्र त्या एजंटने एका सामान्य तिकिटासाठी वाजवी रक्कमेपेक्षा तब्बल 1600 रुपये जास्त रक्कम आकारून लुबाडणूक केली.या प्रकाराची माहिती पत्रकार संदीप महाजन यांना मिळताच त्यांनी या विषयावर सखोल चौकशी केली आणि समाजमाध्यमांद्वारे, तसेच ‘ध्येय न्यूज’च्या माध्यमातून ही धक्कादायक बातमी सर्वांसमोर आणली. पत्रकारितेतील जबाबदारी आणि लोकहितासाठी त्यांनी दाखवलेली तत्परता पाहून ही बातमी काही वेळातच व्हायरल झाली. बातमीचा समाजावर, प्रशासनावर आणि संबंधित एजंटवर इतका परिणाम झाला की, संबंधित एजंटने काही मिनिटांत जवानाच्या खात्यावर 1600 रुपयांची रक्कम परत पाठवली.ही घटना ही केवळ पत्रकाराच्या सचोटीची विजयगाथा नाही, तर हे एक जिवंत उदाहरण आहे की सत्याचे धारदार लेखणीसमोर अन्याय करणाऱ्यांची लाचारी उघड होते. पत्रकार महाजन यांनी या प्रकरणात कोणत्याही आमिषाला बळी न पडता, केवळ सैनिकाचा हक्क परत मिळावा या हेतूने ही बातमी उघडकीस आणली.या प्रकरणानंतर शहरातील जनमानसात पत्रकार महाजन यांच्या कार्याची भरभरून स्तुती होत असून अनेकांनी सोशल मीडियावर “हीच खरी पत्रकारिता” असे म्हटले आहे. शिवाय, यामुळे भविष्यात या आणि अशाप्रकारे लूट करणाऱ्या अनधिकृत रेल्वे एजंटांचा धसका बसेल व सामान्य नागरिकांची लुबाडणूक टळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.प्रशासनाने सुद्धा या भामट्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. पत्रकारिता म्हणजे केवळ माहिती पोहोचवणे नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्याचे हत्यार आहे, याचे हे अत्यंत प्रभावी उदाहरण आहे.

Read More

भारतीय सुरक्षा दलांना जळगावकरांचे अभिवादन !

भारतीय सुरक्षा दलांना जळगावकरांचे अभिवादन !जळगाव —पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली, लोकभावानेचा आदर करत भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानात घुसून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. भारतीय लष्कराच्या या शौर्याला अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जळगाव शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या तिरंगा रॅलीत सहभागी होऊन ‘भारत माता की जय, जय हिंद’ अशा घोषणांनी भारतीय लष्कराचा विजयोत्सव साजरा केला. यावेळी नामदार गिरीश महाजन ,खा. श्रीमती स्मिताताई वाघ, आ. श्री. सुरेशमामा भोळे, जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांच्यासह जळगावकर विराट संख्येने सहभागी झाले.

Read More

पशुधन उत्तमरित्या जपण्यासाठी नूतन तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय उपयोगी ठरेल — नामदार गिरीश भाऊ महाजन.

जामनेर -आज जामनेर येथील तालुका लघुपशुवैद्यकीय चिकित्सालयाचे भूमिपूजन नामदार गिरीश भाऊ महाजन यांचे हस्ते करण्यात आले. जामनेर तालुका पशुधनाने समृध्द आहे. हे पशुधन उत्तमरित्या जपण्यासाठी नूतन तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय उपयोगी ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी तहसिलदार नाना साहेब आगळे , सा.बां विभागाचे कार्यकारी अभियंता आर डी पाटील , उपअभियंता एस बी चासकर , जितेंद्र पाटील यांचे सह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More

जामनेर बसस्थानकात प्रवासी महिलेला लुटले; 25 ग्रॅम सोन्याची पोत चोरीला.

जामनेर तालुक्यातील हिवरखेडा बु. येथील मिराबाई राघो पाटील (वय 75) या ज्येष्ठ महिला जामनेर येथून पाचोरा जाणाऱ्या एस. टी. बसने प्रवास करत असताना त्यांच्याकडील 25 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना गुरुवारी (15 मे 2025) रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास घडली. मिराबाई पाटील या आंबे वडगाव येथे एका लग्नाच्या कार्यासाठी निघाल्या होत्या. त्या जामनेर एस. टी. बसस्थानकावरून पाचोरा मार्गे प्रवास करत असताना, गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून चोरली. ही घटना लक्षात येताच त्यांनी तपास केला, मात्र तोपर्यंत चोरट्याने पोत लंपास केली होती. या प्रकारामुळे जेष्ठ महिला अत्यंत हादरल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच त्यांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जामनेर बसस्थानकात सुरक्षेअभावी गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची माहिती समोर येत आहे. जरी मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून सुसज्ज बसपोर्ट उभारण्यात आले असले तरी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव आणि बसस्थानक व्यवस्थापनातील दुर्लक्षामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी बसस्थानकावर तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली आहे, जेणेकरून अशा घटना रोखता येतील. जामनेर आगार प्रमुखांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि भविष्यातील सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.[9:09 pm, 15/05/2025] Eshwer Chordiya 222: अवैध देशी व विदेशी दारू विक्रीस आळा घालण्यासाठी फत्तेपूर पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस उपनिरीक्षक अंकुश जाधव यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत मंगळवारी (दि. १३ मे २०२५) रोजी पहाटे एक मोठी कारवाई करत ओमनी गाडीतून देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या इसमाला अटक करण्यात आली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, फत्तेपूर शहरातील गोद्री रोडवरून ओमनी (क्रमांक MH 28 AN 4092) गाडीतून दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पो.ह. प्रवीण चौधरी, पो.कॉ. मुकेश पाटील आणि पो.कॉ. भूषण पाटील यांच्या पथकाने टी पॉईंटजवळ नाकाबंदी लावली. सकाळी ३.२० वाजताच्या सुमारास सदर वाहन थांबवून तपासणी केली असता, कमलाकर अण्णा सपकाळ (वय ३३, रा. शिवणा, ता. सिल्लोड, जि. संभाजीनगर) हा ५४ बॉक्स देशी दारूसह सापडला. या बॉक्समध्ये भिंगरी देशी दारूचे ३९ बॉक्स, टंगो पंच ५ बॉक्स आणि सखु संत्रा देशी दारूचे १० बॉक्स अशा एकूण ५४ बॉक्समध्ये अंदाजे रु. १.८२ लाखांचा दारूचा साठा आढळून आला. सदर आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत कलम ६५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा रजिस्टर नंबर ७१/२०२५ आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव व पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास सपोनि अंकुश जाधव करत आहेत. या कारवाईमुळे जामनेर तालुक्यातील अवैध दारू तस्करांमध्ये खळबळ उडाली असून, फत्तेपूर पोलीसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read More

नाफेड कडून गोपद्म शेतकरी उत्पादक कंपनीचा गौरव.

नाफेड कडून गोपद्म शेतकरी उत्पादक कंपनीचा गौरव..जे. बी. एन महाराष्ट्र न्यूज जामनेर“१०,००० शेतकरी उत्पादक संघटनांची निर्मिती आणि प्रोत्साहन” या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत ‘गोपद्म शेतकरी उत्पादक कंपनीच्या’ उत्कृष्ट आणि प्रभावी कामगिरीबद्दल नवी दिल्ली येथे श्री.दिपक अग्रवाल सर,IAS, MD, (नाफेड) यांच्या हस्ते श्री. रोहन लोखंडे,मुख्य कार्यकारी अधिकारी व श्री. प्रदिप महाजन, चेअरमन यांना सन्मानित करण्यात आले. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली केंद्रीय क्षेत्र योजना अंतर्गत जामनेरच्या गोपद्म फेड शेतकरी उत्पादक कंपनीचा समावेश आहे. नाफेड आणि कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीचे कामकाज विविध क्षेत्रात सुरू आहे. यावेळी शेतकरी उत्पादक कंपन्यानी बांबू लागवड व विविध कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करुन कृषी क्षेत्रात क्रांतीसाठी हातभार लावावा असे प्रतिपादन श्री. अग्रवाल यांनी केले. यावेळी गोपद्म कंपनीला शेतकर्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी नाफेड कडून ‘नाफेड बाजार’ या त्यांच्या शाॅंपिग माॅल सुरू करणेस परवानगी पत्र देण्यात आले. यावेळी नाफेडने तयार केलेल्या देशातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या १० ‘एफपीसींना गौरवण्यात आले. या सन्मान सोहळावेळी पंकज प्रसाद, अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक, अनुराग तिवारी, महाव्यवस्थापक, पुजा टमटा, व्यवस्थापक, लिजा भटाचार्य,मोहनजी, व्यवस्थापक,इक्विटी अनुदान,व देशभरातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Read More

राज्यभरात ‘जामनेर’ पंचायत समिती चा नावलौकिक

जामनेर पंचायत समितीचा राज्यात नावलौकिक 2023-24 साठी उत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर समितीला राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक १७ लाख रुपये आणि विभागीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ११ लाख रुपये असे एकूण २८ लाख रुपयांचे पुरस्कार घोषित झाले जामनेर प्रतिनिधीराज्यभरात ‘जामनेर’ पंचायत समिती चा नावलौकिक जामनेर पंचायत समिती दुहेरी पुरस्कार ने सन्मानित गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांच्या कुशल नेतृत्वाखाली जामनेर पंचायत समितीचं घवघवीत यशसविस्तर..जामनेर (जि. जळगाव) पंचायत राज संस्थांमधील उत्कृष्ट कार्यासाठी दिल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानात जामनेर पंचायत समितीने राज्यभरात आपला ठसा उमटवत मोठे यश संपादन केले आहे. वर्ष 2023-24 साठी उत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर समितीला राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक १७ लाख रुपये आणि विभागीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ११ लाख रुपये असे एकूण २८ लाख रुपयांचे पुरस्कार घोषित झाले आहेत.ग्रामविकास, प्रशासन व्यवस्थापन, नवोपक्रम, पारदर्शकता आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांचा सखोल आढावा घेत ही निवड केली गेली. जामनेर पंचायत समितीने या सर्वच निकषांवर आपली ठसा उमटवत इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.या यशामागे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांचे कुशल नेतृत्व, समर्पित अधिकारी-कर्मचाऱ्यांची मेहनत आणि गाव पातळीवरील लोकप्रतिनिधींचा व कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग या सर्वांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या एकत्रित प्रयत्नातून जामनेर तालुक्याचा विकास मार्ग सुकर झाला असून, ग्रामविकासाच्या दिशेने एक नवे पर्व सुरू झाले आहे.या दणदणीत यशामुळे जामनेर तालुक्याचा राज्यस्तरीय नावलौकिक वाढला असून, पुढील वाटचालीसाठी एक भक्कम पायाभूत आधार मिळाला आहे

Read More

तहसिल कार्यालय, जामनेर येथे डिजिटल अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीचा शुभारंभ या नवीन प्रणालीमुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची भेट अधिक पारदर्शक, गतिमान होणार

तहसिल कार्यालय, जामनेर येथे डिजिटल अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीचा शुभारंभ या नवीन प्रणालीमुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची भेट अधिक पारदर्शक, गतिमान होणार जामनेर (ता. जामनेर) – महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तहसिल कार्यालय, जामनेर येथे डिजिटल अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीचा प्रारंभ करण्यात आला आहे. या नवीन प्रणालीमुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची भेट अधिक पारदर्शक, गतिमान आणि नियोजित होणार आहे. या प्रणाली अंतर्गत, कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने अधिकाऱ्यांची किंवा कर्मचाऱ्यांची भेट घेण्यापूर्वी कार्यालयात लावलेल्या QR कोड स्कॅन करून, आपल्या भेटीचा उद्देश व आवश्यक तपशील भरायचा आहे. यामुळे भेटींची नोंद डिजिटल स्वरूपात होणार असून, कामकाज अधिक सुकर व कार्यक्षम होणार आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना अनावश्यक प्रतीक्षा करावी लागणार नाही, तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांशी भेट अधिक नियोजित पद्धतीने होणार आहे. ही प्रणाली शासनाच्या “गतीमान व पारदर्शक सेवा” या ध्येयाशी सुसंगत होणार आहे जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, अप्पर जिल्हाधिकारी श्री. अंकुश पिनाटे आणि उपविभागीय अधिकारी श्री. विनय गोसावी यांचे मार्गदर्शनातून सदर योजनेची अमलबजावणी श्री नानासाहेब आगळे तहसीलदार जामनेर यांनी केली आहे. — तहसिल कार्यालय, जामनेर

Read More
error: Don't Try To Copy !!