पाळधी जि.प.केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.

पाळधी ता.जामनेर :- येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप संभारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शैलेश पाटील, व तुळशीराम वाघ होते. आपल्या प्रेरणादायी भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना महत्वाचा संदेश दिला. त्यांनी सांगितले की शिक्षणात कधीही खंड पडू देऊ नका.आई वडिलांचे,आपल्या शाळेचे आणि आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा.ते पुढे म्हणाले तुम्ही डॉक्टर ,इंजिनियर,शिक्षक, व्यवसायिक बना,जे काही तुमचे स्वप्न असेल ते पूर्ण करा.मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेवटी एक चांगला माणूस बना अशी प्रेरणादायी सदिच्छा त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत शाळेच्या गोड आठवणींना उजाळा दिला.शाळेतील शिक्षक चंदन राजपूत, संभाजी हावडे, सतीश बावस्कर, जितेंद्र नाईक, अमित मुंडे,मगंला धनुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद कोळी, निलेश भोंबे, सदस्य मनोज नेवे,नाना माळी, गजानन राजपूत, विनोद पाटील,अशोक पाटील, विकास धनगर कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

Read More

मांडवे बु. येथे जागतिक हिवताप दिन साजरा…

मांडवे बु. येथे जागतिक हिवताप दिन साजरा… चला हिवतापाला संपवू या : पुन्हा योगदान द्या, पूर्णविचार करा, पुन्हा सक्रिय व्हा. *जे बी एन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (एकनाथ कोळी) दि . २५/४/२०२५ रोजी मांडवे बु. तालुका जामनेर येथे डॉ. राजेश सोनवणे (तालुका वैद्यकीय अधिकारी जामनेर) यांच्या सूचनेनुसार व श्री.अण्णा जाधव (तालुका हिवताप पर्यवेक्षक), श्री.विक्रमसिंग राजपूत (आरोग्य सहाय्यक वाकडी) यांच्या मार्गदर्शनाखाली २५ एप्रिल जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला व उपस्थित डॉ. वैभव पाटील (स.आ.अधिकारी) व श्री. हेमंत पाटील (आरोग्यसेवक) यांनी हिवतापाबद्दल सखोल माहिती व मार्गदर्शन खालील प्रमाणे केले. हिवताप हा किटकजन्य आजार असुन अनेक आजारांपैकी एक गंभीर व मानवाचा जीवघेणा आजार आहे. भारतात प्लाझमोडियम व्हायव्हँक्स व प्लाझमोडियम फँल्सीफेरम हे दोन प्रकारचे रोगजंतु आढळतात. या रोगाचे प्रमुख खाद्य हे मानवी रक्तातील तांबड्या रक्तपेशीतील हिमोग्लोबीन आहे. या रोगजंतुमुळे हिवताप हा आजार होतो. हिवताप आजाराचा शोध लागलेला नव्हता तोपर्यंत या आजाराबाबत समाजात अनेक गैरसमज पसरलेले होते व त्यावर योग्य तो उपचार माहित नसल्यामुळे त्यावेळी हिवतापामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडत होते. सर्वप्रथम सन 1889 मध्ये डाँ.सर रोनाल्ड राँस यांनी रोग जंतुचा शोध लावला. त्यामुळे हिवतापाच्या रुग्णांवर योग्य उपचार देणे शक्य होऊन हिवतापामुळे होणाऱ्या मृत्युंची संख्या कमी झाली. 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिवस म्हणुन जगभरात साजरा केला जातो. हिवतापाचा प्रसार अँनाफेलीस ह्या जातीच्या डासांच्या मादींमार्फत होतो.ह्या मादी स्वच्छ पाण्यात अंडी घालतात. त्यांत पाण्याच्या टाक्या,हौद,डबके,नारळाच्या करवंट्या,कुलर,टायरे,फुलदाण्या आदी ठिकाणी ही मादी अंडी घालतात.हिवतापाला रोखायचे झाल्यास डासांची उत्पत्ती रोखणे हाच रामबाण उपाय आहे.डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आठवड्यातुन एक दिवस कोरडा पाळुन घरातील पाण्याची भांडी घासुन-पुसुन स्वच्छ करणे, कोरडी करणे, पाण्याच्या टाक्यांवर घट्ट झाकणे ठेवावी,परिसरातील पाण्याची डबकी बुजवावी अथवा त्यांत आईल किंवा राँकेल टाकावे, डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडावीत.आरोग्य विभागामार्फत कंटेनर्स सव्हेक्षण करुन पाण्याच्या टाक्यांमध्ये टेमीफाँस नावाचे औषध टाकले जाते. त्यामुळे डासांच्या अंडी मरुन जातात. गावात रॅली काढून हस्तपत्रिका वाटप करून जनजागृती करण्यात आली.सदरप्रसंगी मांडवे बु. येथील श्री. महेमुद तडवी सरपंच, श्रीम.समीना तडवी उपसरपंच,इतर ग्रा. प. सदस्य, जि. प. शाळा मुख्याध्यापक, इतर शिक्षकवृंद, आशासेविका श्रीम.अलका जाधव, जिजाबाई पाटील, सुलोचनाबाई शिंदे व तुळसाबाई चव्हाण व गावातील नागरिक उपस्थित होते.

Read More

उज्जैन (मध्य प्रदेश) येथे भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर ‘सन्मान अभियान’ कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे ह्या उपस्थित

उज्जैन (मध्य प्रदेश) येथे भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर ‘सन्मान अभियान’ कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे ह्या उपस्थित. बाबासाहेब यांच्या जन्मस्थान महू (मध्यप्रदेश) येथे भेट देऊन भूमीला नतमस्तक. भारतरत्न डॉ.भीमराव आंबेडकर ‘सन्मान अभियान’ या मोहिमेअंतर्गत, भारतीय जनता पक्ष १४ एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन बाबा साहेब यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवणार असून, आज त्याच अभियानाचा भाग म्हणून उज्जैन (मध्य प्रदेश) येथे भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर ‘सन्मान अभियान’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असता केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले. संविधानाची निर्मिती साकार करून, बाबासाहेबांनी देशाच्या सर्वांगीण विकासाचा आणि कोट्यवधी लोकांच्या उन्नतीचा मार्ग मोकळा केला आहे. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली, भाजपा सरकारने बाबा साहेबांच्या महान तत्वांचे अनुसरण करून, आज भाजपा ‘विकसित भारत’ चा संकल्प साध्य करण्यात प्रयत्नशील आहे. प्रत्येक घटकाचा विकास आणि सामाजिक सलोखा हे भाजपा चे ध्येय आहे. असे यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सांगितले. तसेच यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थान असलेले महू (मध्यप्रदेश) येथे भेट देऊन या पवित्र भूमीला नतमस्तक करून त्यांच्या विचारांची, संघर्षांची आणि सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याची जाणीव पुन्हा नव्याने केली. व शिक्षण, समता आणि न्यायासाठी झगडण्याची नवी ऊर्जा मिळाली. त्या मातीला स्पर्श करून मन विचारांच्या तेजाने उजळून निघालं. बाबासाहेबांनी दिलेला स्वाभिमान, शिक्षण आणि न्यायाचं बळ मनाला पुन्हा एकदा जाणीव करून देऊन गेलं. असे उद्गार यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी काढले.

Read More

आजारी असतानाही कर्तव्याला प्राधान्य: गिरीशभाऊ महाजन तातडीने पहेलगाम संकटासाठी श्रीनगरला रवाना

आजारी असतानाही कर्तव्याला प्राधान्य: गिरीशभाऊ महाजन तातडीने पहेलगाम संकटासाठी श्रीनगरला रवाना दि. २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकले असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू केले असून, संकटसमयी नेहमी अग्रेसर असणारे मा. ना. श्री. गिरीशभाऊ महाजन आज तातडीने श्रीनगरकडे रवाना झाले आहेत. शारीरिक आजाराची पर्वा न करता कर्तव्याला प्राधान्य गिरीशभाऊंशी माझा थेट संवाद झाला तेव्हा त्यांनी सांगितले की, गेले दोन-तीन दिवस विकनेसचा त्रास जाणवत होता आणि ते मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते.अशा स्थितीतही, जेव्हा पहेलगाम घटनेची माहिती मिळाली, तेव्हा गिरीशभाऊंनी आपल्या शारीरिक स्थितीकडे दुर्लक्ष करत तातडीने श्रीनगरला जाण्याचा निर्णय घेतला.स्वतःच्या तब्येतीची पर्वा न करता जनतेच्या मदतीसाठी धावून जाण्याची त्यांची ही भावना केवळ प्रेरणादायीच नाही, तर संकटसमयी खंबीर नेतृत्व कसे असते याचे ज्वलंत उदाहरण आहे. “अशा धाडसी आणि सेवाभावी नेत्याचा आम्हाला अभिमान आहे!” संकटकाळातले प्रेरणादायी नेतृत्व गिरीशभाऊ महाजन हे नेहमीच संकटात धावून जाणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. महापुरात मदत कार्य, कोविड काळात नागरिकांसाठी वैद्यकीय व जीवनावश्यक सेवा पुरवणं, पूरग्रस्त भागातील बचावकार्य, अशा अनेक प्रसंगी त्यांनी लोकहितासाठी स्वतःला झोकून दिले आहे. श्रीनगरमध्ये तातडीचा समन्वय श्रीनगरमध्ये दाखल होताच, गिरीशभाऊ महाजन यांनी लष्कर, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून बचावकार्य अधिक गतीमान केले आहे. अडकलेल्या पर्यटकांची माहिती संकलित करणे, सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना करणे, गरज असल्यास महाराष्ट्र शासनाकडून विशेष विमानाची सोय करणे, अशा उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. कार्यकर्त्यांचा अभिमान गिरीशभाऊ महाजन यांच्या या कर्तव्यनिष्ठ आणि धाडसी वृत्तीवर आम्हा सर्व कार्यकर्त्यांचा अपार अभिमान आहे. संकटाच्या कोणत्याही क्षणी ते अग्रभागी असतात, हे पाहून आम्ही नेहमीच प्रेरित होतो. “आजारी असूनही जनतेच्या सेवेसाठी धावून जाणारा नेता म्हणजे खरा नेता! आम्ही गर्वाने सांगतो — आम्ही गिरीशभाऊंचे कार्यकर्ते आहोत!” महाराष्ट्राला अभिमान गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संकटातून सुरक्षित बाहेर पडतो, ही संपूर्ण राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. जय हिंद! जय महाराष्ट्र! “आजारी शरीराने नाही, तर धडाडीच्या मनाने संकटांवर मात केली जाते.मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाही पुलवामा संकटासाठी धावलेला आमचा नेता — गिरीशभाऊ महाजन!संकटातही महाराष्ट्राचा आधारस्तंभ! गिरीशभाऊमहाजन #संकटमोचकनेतृत्व #महाराष्ट्राचाअभिमान”

Read More

हिवरखेडा पूल ते वाघूर उपसा सिंचन योजना पंप हाऊस (मेजाय रस्ता) रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भव्य भूमिपूजन

हिवरखेडा पूल ते वाघूर उपसा सिंचन योजना पंप हाऊस (मेजाय रस्ता) रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भव्य भूमिपूजन हिवरखेडा (ता. जामनेर) : हिवरखेडा पूल ते वाघूर उपसा सिंचन योजना पंप हाऊस (मेजाय रस्ता) या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री मा. ना. श्री. गिरीषभाऊ महाजन यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. हा रस्ता वाघूर उपसा सिंचन योजना, जामनेर नगरपालिका वॉटर सप्लाय योजना तसेच आजूबाजूच्या अनेक शेतकऱ्यांचा मुख्य संपर्क मार्ग असल्यामुळे, पाच किलोमीटर लांबीच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी वाघूर विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. यशवंत भदाणे, कार्यकारी अभियंता श्री. गोकुळ महाजन, कार्यकारी अभियंता श्री. विनोद पाटील, उपविभागीय अभियंता श्री. अमोल कुमावत यांची उपस्थिती होती. तसेच पंचायत समिती भाजप गटनेते श्री. अमर शिवाजीराव पाटील, सरपंच श्री. देविदास दशरथ जोहरे, पोलीस पाटील श्री. लिलाधर मालखेडे, माजी सरपंच डॉ. रमेश पाटील, श्री. जितेंद्र भिला पाटील, श्री. अमोल सुधाकर पाटील, श्री. उमेश महाजन, विकास सोसायटी चेअरमन श्री. अरूण शंकर चौधरी, तसेच चिचखेडा येथील बापू पाटील, नामदेव झावरे, सुभाष जासुद आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या डांबरीकरणामुळे परिसरातील नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. ग्रामस्थांनी जलसंपदा मंत्री यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Read More

जैन समाजाच्या एकीपुढे महापालिकेने टेकले गुडघे: विलेपार्लेचे मंदिर पाडणाऱ्या सहायक आयुक्तांची बदली,त्याच ठिकाणी जैन मंदिर बांधून देणार!

जैन समाजाच्या एकीपुढे महापालिकेने टेकले गुडघे: विलेपार्लेचे मंदिर पाडणाऱ्या सहायक आयुक्तांची बदली,त्याच ठिकाणी जैन मंदिर बांधून देणार! मुंबई-विलेपार्ले (पूर्व) येथील २७ वर्षे जुने श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडण्यात आले. ते त्याच ठिकाणी पुन्हा बांधण्यास महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी तोंडी संमती दिली आहे. यासोबतच जैन समाजाच्या १० हजारांहून अधिक लोकांच्या अहिंसा रॅलीपुढे महापालिका प्रशासन नमले आणि सहायक महापालिका आयुक्त नवनाथ घाडगे पाटील यांची के-पूर्व प्रभागातून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी स्वप्नंज क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २७ वर्षांपूर्वी बांधलेले श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ शनिवारी जैन समाजाच्या १० हजारांहून अधिक लोकांनी अहिंसा रॅली काढली. अहिंसा रॅलीत सहभागी झालेल्या सर्वांनी तब्बल ४ किमी २ तास पायी चालत अंधेरी (पूर्व) येथील सहायक महापालिका आयुक्त कार्यालय गाठून निषेध व्यक्त केला. स्थानिक खासदार वर्षा गायकवाड (काँग्रेस) आणि स्थानिक आमदार पराग अलवाणी (भाजप) हे जैन समुदायासह येथे उपस्थित होते. २७ वर्षे जुने जैन मंदिर का पाडण्यात आले, असा खडा सवाल गायकवाड आणि अलवाणी यांनी सहायक महापालिका आयुक्त पाटील यांना विचारला. त्यावर उत्तर देताना पाटील म्हणाले की, महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कायद्याचे पालन करत जैन मंदिर पाडले. त्यामुळे उपस्थित लोकप्रतिनिधी आणि त्यांच्यात जोरदार वाद झाला. कारण पाटील जैन मंदिराचा मलबा काढून त्याच ठिकाणी पुन्हा पूजा करण्याची परवानगी देण्यास नकार देत होते. विलेपार्ले पूर्व येथील दिगंबर जैन मंदिर प्रकरण न्यायालयात असताना न्यायालयाच्या निकालाची वाट न पाहता मनपा अधिकाऱ्यांनी मंदिर जमीनदोस्त केले. जैन मंदिर पाडताना जैन तीर्थंकरांच्या मूर्ती, जिनवाणी आणि पुरातन ग्रंथ आणि धर्मग्रंथांचाही घोर अपमान करण्यात आला. हा पूर्वनियोजित कट असून भाजप युतीचे ‘बुलडोझर सरकार’च त्यास जबाबदार आहे.-वर्षा गायकवाड, खासदार लवकरच शेड तयार होणार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी विलेपार्ले येथील चारही जैन समुदायांच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले आहे की, त्याच ठिकाणी जैन मंदिर पुन्हा बांधून दिले जाईल. सध्या पर्यायी व्यवस्था म्हणून अभिषेक व पूजा टीनच्या शेडमध्ये करण्यात येणार आहे. भाविकांसाठी लवकरच हे शेड तयार केले जाईल.-श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट

Read More

मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप –दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव वितरण शिबिर यशस्वी संपन्न

मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप –दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव वितरण शिबिर यशस्वी संपन्न जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी -सुपडू जाधवआपल्या जिद्दीला साथ माणुसकीची!” या प्रेरणादायी घोषवाक्याखाली एक स्तुत्य उपक्रम जामनेर येथे राबविण्यात आला. सक्षम देवगिरी प्रांत जळगाव, केशवस्मृती प्रतिष्ठान, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण विभाग, एस.आर. ट्रस्ट (मध्यप्रदेश), ALIMCO आणि जळगाव जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव बसवणे, कॅलिपर्सचे मोजमाप घेणे आणि तात्काळ वितरण करण्याचे शिबिर कृषी उत्पन्न बाजार समिती, जामनेर येथे संपन्न झाले. या उपक्रमात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित राहून दिव्यांग बंधू-भगिनींना कृत्रिम अवयव वाटप केले. आधुनिक तंत्रज्ञानाला माणुसकीची जोड मिळाल्यामुळे दिव्यांगांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद ही एक अत्यंत भावनिक आणि गौरवाची अनुभूती असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.या उपक्रमात अनेक दिव्यांगांना तात्काळ अवयव आणि सहाय्यक उपकरणे मिळाली, ज्यामुळे त्यांना आयुष्याला नव्याने सुरुवात करता येणार आहे. मंत्री महाजन यांनी आयोजकांचे मन:पूर्वक अभिनंदन करत पुढील काळात असे उपक्रम अधिक ठिकाणी राबवण्याचे आश्वासन दिले.या अभिनव उपक्रमातून समाजात दिव्यांगांविषयी जागरूकता निर्माण होत असून, त्यांना आत्मनिर्भरतेचा मार्गही खुला होत आहे.

Read More

आपले सरकार’ सेवांतील विलंबावर आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांना दररोज एक हजार रुपये दंड लावण्याचे निर्देश

‘आपले सरकार’ सेवांतील विलंबावर आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांना दररोज एक हजार रुपये दंड लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे विविध सामाजिक क्षेत्रांसंदर्भातील वॉररूम बैठक पार पडली. बैठकीमध्ये ‘आपले सरकार’ पोर्टलवरील नागरिकांना मिळणाऱ्या विविध सेवा वेळेत आणि कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट निर्देश दिले की, सेवा वेळेत न पुरवणाऱ्या संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुखांवर दररोज ₹1000 इतका दंड आकारण्यात यावा. तसेच, यासंदर्भात मुख्य सचिवांनी तात्काळ परिपत्रक जारी करावे, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. राज्यात सेवा हक्क अधिनियमांतर्गत एकूण 1027 सेवा अधिसूचित करण्यात आल्या असून, त्यापैकी 527 सेवा सध्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर कार्यरत आहेत. उर्वरित 138 सेवा 31 मे 2025 पर्यंत आणि राहिलेल्या 306 सेवा 15 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या डिजिटल योजनेच्या अंमलबजावणीसाठी ‘महाआयटी’ला ऑनलाईन प्रक्रियेचे प्रमाणीकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ऑक्टोबर 2025 पर्यंत महाराष्ट्राने सेवा डिजिटायझेशनमध्ये देशात आघाडी घेतली पाहिजे. तसेच, नागरिकांनी एका अर्जामार्फत अनेक योजनांचा लाभ घेता यावा यासाठी प्रणालीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याचे आदेशही, मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले. सामाजिक सुरक्षा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रिअल-टाईम ट्रॅकिंग प्रणाली सक्षम करण्यावरही भर देण्यात आला, जेणेकरून आदिवासी, शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना योजनांची अचूक माहिती वेळेत मिळू शकेल. बैठकीत आदिवासी विकास विभागाच्या योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे कार्यान्वयन आणि अ‍ॅग्रीस्टॅक उपक्रम यांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. आदिवासी विकास विभागाच्या संदर्भात, पीएम जनमन योजनेअंतर्गत सर्व उद्दिष्टे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले. त्यात वाड्यापाड्यांमध्ये पायाभूत सुविधा, पक्की घरे, मोबाईल मेडिकल युनिट्सचे जिओटॅगिंग, बहुउद्देशीय केंद्रांचे हस्तांतरण आणि रस्त्यांसाठी विशेष निधीची तरतूद करून कामे गतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. त्याचबरोबर, नाशिक, नंदुरबार, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतील आदिवासी नागरिकांच्या मालमत्ताधिकारांचे प्रकरणे तातडीने निकाली काढावीत तसेच प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (PM DA-JGUA) च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यानुसार 32 जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय समित्यांच्या माध्यमातून कार्यवाही केली जावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. शासकीय वैद्यकीय शिक्षणविषयक धोरणाचा भाग म्हणून, राज्यातील 10 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रकल्पांचा बैठकीत आढावा घेऊन, अंबरनाथ, वर्धा व पालघर येथे महाविद्यालयांसाठी जागा निश्चित करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. भविष्यातील विस्तारासाठी किमान 20 एकर क्षेत्र राखीव ठेवण्याची आवश्यकता बैठकीत अधोरेखित करण्यात आली. यावेळी मंत्री डॉ. अशोक ऊईके, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Read More

निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी पळसखेडे (मिराचे), दि. १४ एप्रिल –धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटी लि., शेंदुर्णी संचलित नीळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालय, पळसखेडे मिरा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात व अभिमानपूर्वक साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक किरण सोनवणे होते. यावेळी मुख्याध्यापक विकास रघुनाथ पाटील, पर्यवेक्षक जे. आर. पाटील सर, उपशिक्षक संदीप सोनवणे सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर मुख्याध्यापक विकास पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची प्रसंगिकता विषद केली. पर्यवेक्षक जे. आर. पाटील सर आणि संदीप सोनवणे सर यांनीही आपल्या मनोगतातून बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. या प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनीही आपल्या प्रभावी भाषणांतून डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा गौरव केला. कार्यक्रमाचे संयोजन व सुत्रसंचालन तीर्थराज इंगळे सर यांनी प्रभावीपणे पार पाडले. कार्यक्रमाचा समारोप आभारप्रदर्शनाने झाला, डी. आर. चौधरी सर यांनी केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समतेचे भान आणि संविधानिक मूल्यांची जाणीव जागवली गेली.

Read More

जामनेर तालुक्यातील १०७ ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत तारीख जाहीर.कोणाचे उघडणार नशीब,तर कोणाचे खेळ बिघडणार.

जामनेर तालुक्यातील आगामी काळातील ग्रामपंचायतीच्या १०७ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत तारीख जाहीर करण्यात आली आहे. यामधे जामनेर तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत २१ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २ वाजता सोडत जाहीर करण्यात येणार आहे. यामधे खालील प्रमाणे जागा सोडत होणार आहे.अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे-१०, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-१५, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-२८, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-५४, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-५, अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब- ८, नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- १४, सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-२७ – एकूण अ बकड – ५४. याप्रकारे सोडत निघणार आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!