जळगाव जिल्ह्याचा विकास वेगवान – 756 कोटींपैकी 91.60% निधी वितरित

जळगाव, 22 मार्च: जळगाव जिल्ह्याच्या विकासकामांना गती देण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा वार्षिक नियोजन 2024-25 अंतर्गत मंजूर झालेल्या 756 कोटी रुपयांपैकी तब्बल 91.60% निधी वितरित करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. पालकमंत्र्यांनी 31 मार्च 2025 पूर्वी सर्व प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच, जळगाव जिल्ह्याचा विकास राज्यात आघाडीवर राहण्यासाठी सर्व यंत्रणांनी अधिक गतीने आणि समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले. बैठकीतील महत्त्वाचे निर्णय आणि चर्चा: १. आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा: ✅ जिल्हा नियोजन निधीतून 8 नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे लवकरच लोकार्पण✅ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या बळकटीकरणासाठी विशेष निधी – गोरगरीब रुग्णांना मोफत उपचारांचा मोठा दिलासा✅ पशुसंवर्धन विभागासाठी अतिरिक्त निधी – जिल्ह्यातील पशुधनासाठी दर्जेदार उपचार उपलब्ध २. पर्यटन आणि पर्यावरण संरक्षण: ✅ वन विभागासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर – विकासकामांना वेग देण्याचे आदेश✅ वन सफारी सुरू करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश✅ पारोळा किल्ल्याचे सुशोभिकरण आणि अतिक्रमण हटवण्यासाठी ठोस निर्णय ३. महिला सशक्तीकरण आणि सामाजिक प्रकल्प: ✅ महिला भवन व वन स्टॉप सेंटरची उभारणी पूर्ण✅ क्रीडा विभागाने व्यायामशाळा प्रकल्पाला गती द्यावी ४. शहरी आणि ग्रामीण पायाभूत सुविधा: ✅ सार्वजनिक बांधकाम विभागाने अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत✅ महानगरपालिकेच्या प्रलंबित प्रकल्पांसाठी आयुक्तांनी विशेष लक्ष द्यावे✅ ग्रामीण भागात रस्ते आणि सिंचन प्रकल्पांना प्राधान्य बैठकीस उपस्थित प्रमुख अधिकारी: ✔ जिल्हाधिकारी: आयुष प्रसाद✔ जिल्हा पोलीस अधीक्षक: डॉ. महेश्वर रेड्डी✔ जिल्हा परिषदेच्या CEO: मीनल करनवाल✔ महानगरपालिका आयुक्त: ज्ञानेश्वर ढेरे✔ जिल्हा नियोजन अधिकारी: विजय शिंदे✔ समाजकल्याण विभाग सहायक आयुक्त: योगेश पाटील✔ आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी: अरुण पवार निष्कर्ष: ✔ 31 मार्च 2025 पूर्वी सर्व विकासकामे पूर्ण करण्याचा निर्धार✔ विभागीय समन्वय वाढवून जिल्ह्याचा विकास वेगाने पुढे नेण्याचे निर्देश✔ जळगाव जिल्हा राज्यातील आघाडीच्या विकास जिल्ह्यांपैकी एक राहणार!

Read More

जामनेर तालुक्यातील तेली समाजाचे निस्वार्थ समाजसेवक अजय भाऊ अशोक चौधरी यांची महाराष्ट्रात मोठ्या पदावर नियुक्ती!

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी सुपडू जाधव जामनेर तालुक्यातील तेली समाजाच्या निस्वार्थ समाजसेवेसाठी सतत कार्यरत असलेल्या अजय भाऊ अशोक चौधरी यांची श्री संताजी नवयुवक मंडळ, महाराष्ट्र राज्य या प्रतिष्ठित संस्थेच्या उत्तर महाराष्ट्र प्रसिद्ध प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषजी घाटे साहेब यांनी त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत चौधरी यांची ही नियुक्ती जाहीर केली. अजय भाऊ चौधरी यांनी तेली समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक कार्यासाठी अनेक वर्षे निस्वार्थ सेवा दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या हिताचे अनेक उपक्रम राबवले गेले आहेत. यावेळी संस्थेचे माहिती अध्यक्ष श्री भटू पुंडलिक नेरकर यांनीही अजय भाऊ चौधरी यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या नियुक्तीमुळे जामनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण असून समाजातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Read More

नामदार गिरीश महाजन यांनी नाशिक येथील महाकुंभ मेळाव्याच्या जागेची केली पाहणी

नाशिक –नाशिक येथे सन २०२७ मध्ये होणाऱ्या महाकुंभमेळा या ऐतिहासिक आणि धार्मिक सोहळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने आज नाशिकमधील विविध धार्मिक स्थळांना भेट दिली. या भेटीदरम्यान रामकुंड, काळाराम मंदिर, सीता गुफा, गोदाघाट, दशक पंचक, नाशिकरोड रेल्वे स्टेशन आणि तपोवन आदी ठिकाणी पाहणी करून महाकुंभमेळ्याच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला. महाकुंभमेळा २०२७ हा सुरक्षित, सुव्यवस्थित व भव्यदिव्य व्हावा यासाठी नियोजनबद्ध तयारीला सुरुवात झाली आहे. कुंभमेळा हा नाशिकच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वैभवाचे प्रतीक असून, भाविकांसाठी हा सोहळा एक अविस्मरणीय अनुभव ठरेल, यासाठी प्रशासन सज्ज आहे. याप्रसंगी आ. सौ. देवयानी फरांदे, आ. सौ. सीमा हिरे, जिल्हाधिकारी श्री. जलज शर्मा, महापालिका आयुक्त सौ. मनीषा खत्री, पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक तसेच विविध प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला बचत गटांना पाठिंबा

नागपूर, ८ मार्च २०२५: आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिला शक्ती, समानता आणि स्वावलंबनाचे प्रतीक आहे. जगभरातील महिलांच्या योगदानाची ओळख पटवून देण्यासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या संदर्भात, अदानी फाउंडेशनने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आणि ग्रामपंचायत आलेसुर येथील हनुमान मंदिराजवळील ‘श्री महालक्ष्मी स्वयंसहाय्यता गटाला’ उपजीविकेसाठी मदत केली. या उपक्रमांतर्गत, गटाला केटरिंग साहित्य पुरवण्यात आले जेणेकरून ते त्यांचा व्यवसाय वाढवू शकतील आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनू शकतील. त्यात १०० केटरिंग प्लेट्स, २०० वट्ट्या, २ भात वाढण्याचे साहित्य, ४ वाट्या, १ जर्मन भांडे, २ भाजीपाला वाढण्याचे चमचे आणि २ चमचे समाविष्ट आहेत. हे सर्व साहित्य वापरकर्त्यांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे, जेणेकरून ते आवश्यकतेनुसार योग्यरित्या वापरता येतील. याशिवाय, गोंडखैरी गावाच्या सरपंच श्रीमती वर्षा आतकरी, आलेसुर गावाच्या सरपंच श्रीमती मालाबाई निकोसे, बचत गटाच्या सीआरओ श्रीमती नीता म्हस्के आणि इतर बचत गट सदस्यांचाही सन्मान करण्यात आला. या प्रसंगी वात्सल्य एनजीओचे श्री. हरीश लाड, ग्रामपंचायत सदस्य श्री. देविदास मोहरले, आलेसुर गावाचे उपसरपंच श्री. मारुती सोनुले उपस्थित होते. कार्यक्रमात वृक्षारोपणही करण्यात आले. ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे या प्राथमिक उद्देशाने अदानी फाउंडेशनच्या उपजीविका प्रोत्साहन योजनांतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सध्या ग्रामीण महिला स्वयंरोजगाराद्वारे त्यांच्या कुटुंब आणि समाजात योगदान देत आहेत. अशा परिस्थितीत, या प्रकारच्या मदतीमुळे ते त्यांचा व्यवसाय अधिक प्रभावीपणे चालवू शकतात आणि त्यांच्या कौशल्यांचा अधिक चांगला वापर करू शकतात. या कार्यक्रमात, अदानी फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी समूहातील महिलांना प्रोत्साहन दिले आणि सांगितले की संस्थेचे उद्दिष्ट केवळ महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे नाही तर त्यांना स्वावलंबी होण्याच्या मार्गावर नेणे देखील आहे. ग्रामीण भागात जेव्हा महिला संघटित पद्धतीने काम करतात तेव्हा त्या केवळ त्यांच्या कुटुंबांची आर्थिक स्थिती सुधारत नाहीत तर समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. आनंद व्यक्त करताना ग्रुपमधील एका सदस्याने सांगितले की, “अदानी फाउंडेशनकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे आमच्या व्यवसायाला एक नवीन दिशा मिळेल. आता आम्ही आमच्या केटरिंग सेवेचा विस्तार चांगल्या सुविधांसह करू शकतो आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो. या मदतीमुळे आम्हाला स्वावलंबी होण्यास खूप मदत होईल.” कार्यक्रमाच्या शेवटी, गटातील महिलांनी अदानी फाउंडेशनचे या पाठिंब्याबद्दल आभार मानले आणि भविष्यातही अशाच प्रकारच्या पाठिंब्याची आशा व्यक्त केली. या उपक्रमाचा फायदा केवळ ‘श्री महालक्ष्मी बचत गटाला’ होणार नाही तर इतर महिलांना स्वयंरोजगार करण्यासाठी प्रेरणा मिळेल. असे उपक्रम महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहेत, जे ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी होण्यास प्रेरित करतात आणि त्यांच्या आर्थिक विकासात मदत करतात.

Read More

जामनेरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू.. हातगाडी, टपरीधारकांमध्ये नाराजी, राष्ट्रवादीचे दिलीप खोडपे करणार हस्तक्षेप

जामनेर, ७ मार्च २०२५ (प्रतिनिधी: सुपडू जाधव, जे.बी.एन महाराष्ट्र न्यूज) जामनेर नगर पालिकेने शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम गतिमान केली असून, याअंतर्गत अनेक रस्त्यांवरील हातगाड्या आणि टपऱ्या हटविण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या मते, शहराचे सौंदर्य राखणे आणि वाहतूक सुरळीत ठेवणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. मात्र, या कारवाईमुळे छोटे व्यावसायिक आणि हातगाडीधारकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह यावर अवलंबून आहे. अचानक कारवाई केल्यामुळे त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. प्रभावित व्यावसायिकांनी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. या परिस्थितीची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप खोडपे पुढील दोन दिवसांत नगर पालिका प्रशासनाशी चर्चा करून व्यावसायिकांचे मत मांडणार असल्याचे सांगितले. तसेच, या कारवाईमुळे अडचणीत आलेल्या व्यावसायिकांना न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील अनेक नागरिकांनीही प्रशासनाच्या कठोर भूमिकेवर आक्षेप घेत, काही प्रमाणात सवलत मिळावी, अशी मागणी केली आहे. या मुद्द्यावर प्रशासन आणि स्थानिक नेत्यांमध्ये कोणता तोडगा निघतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Read More

“बोधगया मुक्तीच्या लढ्यासाठी जळगावात आंदोलन

जळगाव | बोधगया महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा, या मागणीसाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क व इतर बौद्ध संघटनांनी एकत्र येत जळगावात जनजागृती मोहीम उघडली आहे. या लढ्याचा एक भाग म्हणून दि. ८ मार्च २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे कार्यकर्ते प्रचारासाठी शहरात परिश्रम घेत आहेत. सुमित्र अहिरे, रविंद्र बाविस्कर व विक्रम जावे यांनी त्रिभुवन कॉलनी, के.सी. पार्क, महामाया बुद्धविहार, आंबेडकर नगर, प्रबुद्धनगर पिंप्राळा, शंकरआप्पा नगर या भागात जाऊन जनजागृती केली. संघटनेच्या म्हणण्यानुसार, “बोधगया महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे.” आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

जामनेर तालुक्यात स्वस्त धान्याचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसीची मोहीम सुरू

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर, (प्रतिनिधी)सुपडू जाधव : तालुक्यातील रेशन धान्यास पात्र कुटुंबाची ई-केवायसी सुरू झाली आहे. प्रत्येक लाभार्थ्याने स्वस्त दुकानदाराकडे आवश्यक कागदपत्रे सादर करून ई-केवायसी करणे आवश्यक असून ३१ मार्च पर्यंत या करिता मुदत दिली आहे. वेळेत लाभार्थ्यांनी ई-केवायसी करावी असे अवाहन जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे व पुरवठा निरीक्षण अधिकारी नारायण सुर्वे यांनी केले आहे. अंतोदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे सर्व शिधा पत्रिका धारकांना ते अनिवार्य असून त्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदत आहे. मुदतीत आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी न केल्यास धान्य मिळणार नसल्याची माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे व पुरवठा निरीक्षण अधिकारी नारायण सुर्वे माहिती यांनी दिली.

Read More

बीडच्या मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी – शिवसेनेच्या वतीने जामनेर पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांना निवेदन

जामनेर (प्रतिनिधी सुपडू जाधव) – बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला अनेक महिने लोटले असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडसह सर्व दोषींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी जामनेर तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जामनेरचे पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार यांना निवेदन दिले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेने संपूर्ण समाजमन सुन्न झाले आहे. तपासादरम्यान काही धक्कादायक फोटो समोर आले असून, आरोपींनी दाखवलेली क्रूरता पाहता, त्यांना जलदगतीने कठोरातील कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवून दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी शिवसेनेची ठाम मागणी आहे. शिवसेना तालुका अध्यक्ष भरत पवार, उपजिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, शहर प्रमुख नरेंद्र धुमाळ, तालुका संघटक प्रवीण ठाकरे, गटप्रमुख सचिन सोनार, उपशहर प्रमुख खुशाल पवार, नितीन राजूरकर, विशाल, सुरेश चव्हाण आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. या मागणीची वरिष्ठ स्तरावर दखल घेतली जावी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा शिवसेनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

Read More

आजी-माजी सैनिकांच्या प्रश्नांवर तालुका स्तरीय समितीची बैठक संपन्न

जामनेर, ५ मार्च (जे. बी. एन. महाराष्ट्र न्यूज) – तालुक्यातील आजी-माजी सैनिक, शहीद सैनिक कुटुंबे, माजी सैनिक विधवा तसेच कार्यरत सैनिकांच्या शासकीय कामांसाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या दृष्टीने तालुका स्तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली. तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत विविध विभागांशी संबंधित शासकीय प्रक्रिया जलद आणि प्राधान्याने पूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीस जामनेरचे गटविकास अधिकारी श्री. काळे, पोलीस निरीक्षक श्री. मुरलीधर कासार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. संजय गायकवाड तसेच माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. या चर्चासत्रात माजी सैनिकांच्या प्रलंबित शासकीय कामांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच, त्यांच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे ठरले. ही बैठक यशस्वी ठरल्यास तालुक्यातील आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या विविध लाभदायक योजनांचा जलद लाभ मिळू शकणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Read More

तलावातील गाळ काढण्यासाठी BJS कार्यकर्त्यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

जामनेर, ५ मार्च (जे. बी. एन. महाराष्ट्र न्यूज): जळगाव जिल्ह्यातील तलावांचे पुनरुज्जीवन आणि जलस्रोत संवर्धनाच्या उद्देशाने भारतीय जैन संघटना (BJS) आणि जिल्हा प्रशासन यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत तलावातील गाळ काढण्यासह गाळयुक्त शिवार, गाळमुक्त बंधारे, नाला खोलीकरण यासारख्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीला जळगावचे जिल्हाधिकारी मा. आयुष प्रसाद, उपजिल्हाधिकारी श्रीमती अर्चना मोरे, जलसंधारण विभागाचे अधिकारी आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. तसेच BJS संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री विनय पारख, जलप्रकल्प जिल्हा प्रमुख सुमीत मुणोत, जळगाव तालुका प्रमुख पंकज जैन, रावेर तालुका प्रमुख देवेंद्र शाह व उज्वल देरेकर, भुसावळ तालुका प्रमुख चेतन जैन, धरणगाव तालुका प्रमुख नीलेश ओस्तवाल, BJS जळगाव अध्यक्ष अजय राखेचा आणि जिल्हा समन्वयक गणेश कोळी यांनीही सहभाग घेतला. BJS कार्यकर्त्यांनी या बैठकीत शेतकऱ्यांना तलावातील गाळ शेतात नेण्यासाठी जनजागृती करण्याचा संकल्प केला. या मोहिमेच्या प्रचारासाठी १५ तालुक्यांतील BJS पदाधिकारी आणि कार्यकर्ते गावागावात जाऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार असल्याचे विनय पारख यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी (BDO) आणि सरपंच यांच्यासोबत लवकरच बैठक घेण्याचे निर्देश दिले. तसेच या बैठकीत BJS कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्याचे आश्वासन दिले. ही मोहीम यशस्वी झाल्यास जिल्ह्यातील तलाव व जलस्रोतांचे पुनरुज्जीवन होईल आणि शेतकऱ्यांना सुपीक गाळ उपलब्ध होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Read More
error: Don't Try To Copy !!