जामनेर येथे विश्व कॅन्सर दिनानिमित्त जनजागृती
जामनेर (वा.)-भारतीय जैन संघटना जामनेर शाखा यांच्यातर्फे विश्व कैंसर दिवसा निमित्त कैंसर जनजागृती व मार्गदर्शन संबधी व्याख्यानाचे आयोजन नविन महावीर भवन येथे आयोजित करण्यात आले.
जामनेर (वा.)-भारतीय जैन संघटना जामनेर शाखा यांच्यातर्फे विश्व कैंसर दिवसा निमित्त कैंसर जनजागृती व मार्गदर्शन संबधी व्याख्यानाचे आयोजन नविन महावीर भवन येथे आयोजित करण्यात आले.
लोहारा ता.पाचोरामहात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्ताने समता,बंधुता,सदाचार व शांतीचा संदेश देण्यासाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन दादाश्री विश्व लॉन्स डॉ जे जी पंडित माध्यमिक विद्यालय पाचोरा रोड लोहारा येथे आयोजित करण्यात आले होते. रेबीन कापून स्पर्धेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. खुला गट वय १६ ते ४०रन अप ६ किलोमीटर, प्रथम बक्षीस दीपक भोई शेंदुर्णी, द्वितीय क्रमांक बक्षीस गोपाल कोळी ,तृतीय क्रमांक सौरव राजपूत, तीन किलोमीटर खुल्या गटात प्रथम बक्षीस सुरज माळी शाहपुरा द्वितीय बक्षीस हर्षल भोई शेंदुर्णी तृतीय बक्षीस कराड नवघरे शेंदुर्णी 200 मीटर स्पर्धेत शालेय मुलांच्या गटात प्रथम बक्षीस प्रथमेश धोबी लोहारा, द्वितीय बक्षीस प्रितेश कुंभार लोहारा तृतीय बक्षीस भूषण मीना कासमपुरा 200 मीटर मुलींच्या गटात प्रथम बक्षीस निहार राजपूत कासमपुरा,द्वितीय बक्षीस मोनाली कोळी लोहारा ,तृतीय बक्षीस डिंपल थोरात कासमपुरा. 100 मीटर शालेय मुलींच्या गटात प्रथम बक्षीस दुर्गेश्वरी परदेशी कासमपुरा,द्वितीय बक्षीस खुशी गोंधळे लोहारा ,तृतीय बक्षीस विशाखा खाटीक लोहारा. 100 मीटर शालेय गट मुलांचा प्रथम बक्षीस आसिफ पिंजारी लोहारा,द्वितीय बक्षिस मोहन कोळी लोहारा, तृतीय बक्षीस सार्थक चौधरी लोहारा, या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी यशोदाबेन मोदी कृषीभूषण कृषीरत्न विश्वासराव पाटील, ,डॉ सागर गरुड,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, सरपंच अक्षय जैस्वाल, डॉ प्रितेश चौधरी,विकासो चेअरमन प्रभाकर चौधरी, माजी सरपंच अमृत चौधरी, माजी मुख्याध्यापक अ अ पटेल, ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण माळी, भोसंडे गुरुजी, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर देशमुख, सुरेश चौधरी, पत्रकार दीपक पवार, रमेश शेळके, चंद्रकांत पाटील, दिलीप चौधरी, ज्ञानेश्वर राजपूत, गजानन क्षीरसागर, अनिल तडवी, उपस्थित होते. स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून तडवी सर,धोनी सर,गायकवाड सर, गुजर सर, पी .एम.सुर्वे सर यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी उमेश देशमुख,नंदू सुर्वे,हितेश पालीवाल,रमेश कोळी,नाना चौधरी,गुणवंत सरोदे,सुनील बाविस्कर,भूषण शिवदे, यांनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम कलाल यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन भाजपाचे जेष्ठ नेते शरद सोनार,ईश्वर देशमुख, सुरेश चौधरी,जनजागृती बहुउद्देशीय संस्था लोहारा यांनी केले होते.
जामनेर: महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 (माध्यमिक विभाग) “जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण (TOT) २०२४-२५” चे आयोजन दि.३ ते ७ फेब्रुवारी २०२५ दरम्यान जी एच रायसोनी कॉलेज शिरसोली रोड,जळगाव येथे करण्यात आले होते. या प्रशिक्षणात जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे हिंदी तथा क्रीडा उपशिक्षक प्रा.समीर विष्णू घोडेस्वार, व भौतिकशास्त्र उपशिक्षक प्रा.सचिन तानाजी गडाख यांनी उस्फूर्त सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव प्राचार्य डॉ.अनिल झोपे यांच्या हस्ते “प्रशिक्षणार्थी” म्हणून शासकीय प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले सोबत राज्यस्तरीय सुलभक डॉ.जगदीश पाटील, डॉ.अतुल इंगळे आदी. मान्यवरांची उपस्थिती होती.
ता.जामनेर __ : ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील ग्रामपंचायतींना भेट देऊन लोकशाही प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभागाचा अनुभव घेतला. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या पुस्तकाबाहेरचा अनोखा अनुभव ठरला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी आंबीलहोळ, पळसखेडे, वाकी आणि तळेगाव येथील ग्रामपंचायतींना भेट देऊन त्यांच्या कामकाजाविषयी सखोल माहिती घेतली. त्यांनी ग्रामपंचायतीच्या अधिकार, कर्तव्ये, गावाच्या विकासासाठी होणारे उपक्रम आणि ग्रामसभेच्या कार्यपद्धतीविषयी समजून घेतले. सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांशी संवाद साधून त्यांनी शासकीय योजनांविषयी आणि ग्रामविकासाबाबत माहिती मिळवली. श्री. विजय कोळी, श्री. विनय खोंडे, श्री. विलास पाटील, श्री. अनिल देशमुख, श्री. रुपेश क्षिरसागर, सौ. स्नेहल पाटील, सौ. वंदना उंबरकर, सौ. मनीषा भारंबे आणि सौ. रोहिणी चौधरी मॅडम यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला. या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणालीविषयी जागरूकता निर्माण झाली. तसेच, भविष्यात गावाच्या विकासात योगदान देण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली. विद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. जे. सोनवणे, श्री. अशोक पालवे, सरपंच श्री. भिका तायडे, श्री. ललीत लामखेडे, श्री. राजेंद्र खरे, सौ. आरतीताई कोळी, दिलीप चव्हाण, प्रशांत वाघ, ग्रामसेवक श्री. योगेश पालवे, सौ. उज्वला महाजन, श्री. व्ही. एम. पवार, श्री. चिंतामण राठोड तसेच पालक व ग्रामस्थ यांच्या विशेष मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. या अनोख्या कृतीयुक्त उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष अनुभव मिळवल्याने त्यांना भविष्यात मोठा फायदा होईल, असे प्राचार्य श्री. आर. जे. सोनवणे यांनी वाकी येथे झालेल्या क्षेत्रभेटीच्या वेळी सांगितले.
अलवर (राजस्थान) येथे स्थानिक लोकसभा खासदार व केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री श्री. भूपेंद्र यादव जी यांच्या मार्फत आयोजित “खासदार क्रीडा महोत्सव” कार्यक्रमास आज केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्या. यावेळी त्यांनी स्पर्धक व उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, अलवर खासदार क्रीडा महोत्सव ही केवळ क्रीडा स्पर्धा नाही, तर युवाशक्तीचा उत्साह, खिलाडूवृत्ती आणि निरोगी भारताच्या निर्धाराचे प्रतीक आहे. पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी जी यांच्या ‘खेलो इंडिया’ आणि ‘फिट इंडिया’ मोहिमेला पुढे नेण्यासाठी क्रीडा महाकुंभ हे एक सशक्त माध्यम आहे. युवा खेळाडूंचा उत्साह, परिश्रम आणि संघर्ष पाहून मला पूर्ण विश्वास वाटला की भारताचे भविष्य क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील कलागुणांना पुढे येण्याची मोठी संधी मिळत आहे असे उद्गार त्यांनी काढले. या भव्य कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी यावेळी स्थानिक खासदार व केंद्रीय मंत्री श्री. भूपेंद्र यादव जी यांचे यावेळी अभिनंदन करून सर्व सहभागी स्पर्धकांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पळासखेडे मिराचे – धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी लिमिटेड, शेंदुर्णी संचलित निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालय, पळासखेडे मिराचे येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संजयरावजी गरुड होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून सातपुडा ऑटोमोबाईलचे संचालक डी. डी. बच्छाव सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेतील यश आणि भविष्यातील संधी याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव सागरमलजी जैन यांनी देखील आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना यशाच्या दिशेने वाटचाल करण्याचे मार्गदर्शन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील सर यांनी प्रास्ताविकात शाळेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. कार्यक्रमास ठानसिंग पाटील, दशरथ पाटील, संस्थेचे सहसचिव यू. यू. पाटील, ज्येष्ठ संचालक भीमराव पाटील, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य पदम बाबा, जनार्दन पवार, गायके बाबा, चंद्रकांत कुलकर्णी, संजय कुलकर्णी, कैलास साबळे, डी. पी. पाटील सर आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. आर. पाटील सर, सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी. टी. इंगळे सर यांनी केले तर व्ही. डी. पाटील सर यांनी आभारप्रदर्शन करून समारंभाची सांगता झाली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून सध्या राज्यात मोठे राजकीय वादळ उठले आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न सोडवला असल्याचे कोर्टात सांगण्यात आले, तरी निवडणुकांच्या तारखांसंदर्भात अनिश्चितता कायम आहे. सुप्रीम कोर्टाने आज, म्हणजे २५ फेब्रुवारीची तारीख निवडणुकीच्या सुनावणीसाठी निश्चित केली आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुप्रीम कोर्टाने दिली पुढील तारीख सुरुवातीला या प्रकरणाची सुनावणी ५ फेब्रुवारी रोजी होणार होती. मात्र, दिल्लीतील निवडणुकांमुळे ही तारीख पुढे ढकलली गेली. आजच्या सुनावणीत ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून जो गोंधळ निर्माण झाला होता, तो दूर झाल्याचे स्पष्ट झाले. राज्य सरकारने निवडणुका लवकरात लवकर घेण्याची तयारी दर्शवली आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न क्लिअर झाला, पण निवडणुका लांबणीवर राज्य सरकार आणि याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात स्पष्ट केले की, ओबीसी राजकीय आरक्षणाचा विषय आता निकाली निघाला आहे. सर्वपक्षीय सहमती असल्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षात मतभेद नाहीत. मात्र, निवडणुकांच्या तारखा निश्चित करण्यात अजूनही वेळ लागत आहे. राजकीय वर्तुळात तणाव कायम राजकीय वर्तुळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत तणावाचे वातावरण आहे. निवडणुका लांबणीवर गेल्यामुळे सर्वच पक्षांची तयारी प्रभावित झाली आहे. निवडणुका लांबणीवर जात असल्याने स्थानिक पातळीवर नेतृत्वाला आणखी वेळ मिळेल,अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे. २५ फेब्रुवारीचा निर्णय महत्त्वाचा २५ फेब्रुवारीच्या सुनावणीत सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेते, यावर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. जर या तारखेला अंतिम निर्णय घेण्यात आला, तर निवडणुका एप्रिल किंवा मेमध्ये घेता येतील. या निर्णयामुळे राज्यातील राजकीय चित्र आणखी स्पष्ट होईल. निवडणुका वेळेवर होण्यासाठी प्रयत्न सुरू राज्य सरकारच्या वतीने लवकरात लवकर निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयासमोर भूमिका मांडण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटल्याने निवडणुकीला आणखी काही अडथळा येणार नाही, असे सरकारने सांगितले आहे. राजकीय आरक्षणाच्या संदर्भातील गुंता संपला ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातील प्रमुख मुद्दा राज्य सरकारने न्यायालयात मांडून निकाली काढल्याचे सांगितले.
जामनेर सोंनबर्डी येथे स्विमिंग पुल मध्ये 15 वर्षीय बालकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु, यामुळे स्विमिंग पुल बांधकाम आणि त्यासाठी ची नियमावली बघता. स्विमिंग पूल व्यवस्थापन आणि परवानगी देणारे प्रशासन झोपा झोडत होते का?? स्विमिंग पूल हा क्रीडा प्रकारात येतो. परंतु, कोणत्या क्रीडा प्रकारासाठी सदर पुल बांधण्यात आला. त्यामुळे याला परवानगी देत असताना अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती का??त्यानंतर पुलाची रचना बघता येथे नियमानुसार तज्ञ मार्गदर्शक आणि आपत्कालीन सुविधा उपलब्ध का नव्हत्या???सदर पुल मध्ये उतरतांना परवानगी घेणे बंधनकारक आहे. परंतु, कोणीही कसे या खोल पुलात उतरून पोहू शकते??असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत असून नगरपालिका प्रशासन आणि क्रीडा विभाग वेळोवेळी तपासणी करीत होते का??हा ही प्रश्न मोठा जिकरीचा झाला आहे. यामुळे एका निष्पाप जीवाला हकनाक बळी जावे लागले असल्याचे मत जनमानसात आहे.यावर आता प्रशासन कोणती कार्यवाही करते याकडे नागरिकांच्या नजरा लागून आहे. की, राजकीय वरद हस्तात प्रकरण निकाली निघेल हे बघणे औचीत्याचे ठरेल.
जामनेर शहरातून एक दुदैवी घटना समोर आली आहे. प्रसिद्ध सोनबर्डी येथील स्विमिंग पुलाच्या पाण्यात एका पंधरा वर्षे मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळतात जामनेर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. संकेत निवृत्ती पाटील 15 वर्ष राहणार घोसला,त.सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजी नगर, हल्ली राहणार हिवरेखेडा रोड, ता.जामनेर असं मयत मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर येथील प्रसिद्ध सोनबर्डी येथे बॅक वॉटर बघण्यासाठी संकेत पाटील हा आपल्या मित्रांन सोबत आला होता. मात्र अचानक त्याचा पाण्यात तोल गेला आणि तो पाण्यात बुडाला. संकेत बुडाल्याची माहिती तात्काळ स्थानिकांनी पोलिसांना दिली त्यानंतर लागलीच त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. जि एम फाऊंडेशन च्या रुग्णवाहिकेवरील चालक जालमसिंग राजपूत आणि अजून एक तरुणाने संकेतला वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न केले. मात्र काही वेळा नंतर संकेतचा मृतदेह मिळून आला. संकेत निवृत्ती गावंडे ( पाटील ) हा जामनेर येथील शाळेमध्ये इयत्ता आठवीत शिकत होता. तो आपल्या लहान भाऊ आणि आजी सोबत जामनेर येथे वास्तव्यास होता. संकेत पाटील हा आज शाळा बुडवून पोहण्यासाठी सोनबर्डी येथील स्विमिंग पूल वर गेला होता गेल्या दोन वर्षापासून बंद असलेल्या स्विमिंग पूलमध्ये नुकतच पाणी भरण्यात आलं होतं. स्विमिंग पूल चालू करण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरू होते. त्यासाठी स्विंगपूलाची डागडूची आणि इतर काम पूर्ण करण्यावर नगरपालिका प्रशासन जोर देत होतं. मात्र आज अचानक संकेत पाटील आपल्या काही मित्रांसोबत स्विमिंग पूल येथे आला होता. या स्विमिंग पूल मध्ये मुलांना अडवण्यासाठी तिथे कोणीच सुरक्षा रक्षक किंवा कर्मचारी उपस्थित नव्हते. अशातच संकेत पाटील हा आपल्या मित्रांसोबत या स्विमिंग पूल मध्ये पोहण्यासाठी उतरला होता. मात्र हाच पोहण्याचा मोह संकेत पाटील च्या जीवावर बेतला आणि स्विमिंग पूल मधील पाण्यात तो बुडाला. स्विमिंग पूलाची डागडूजी करण्यात येत असल्याने तिथे पाणी भरण्यात आल्याची माहिती जामनेर नगर परिषदेचे सीईओ बागुल यांनी दिली आहे.
प्रतिनिधी श्रीरामपूर – भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले वीर जवान गणर जयवंत दिलीप परदेशी (आर्मी क्रमांक- 21022154X) यांचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना 16 जानेवारी 2025 रोजी रात्री 8.00 वाजता घडली. जयवंत परदेशी हे श्रीरामपूर येथे आपल्या आजी-आजोबांच्या भेटीसाठी आले असताना अचानक समोरून येणाऱ्या गाडीची धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची नोंद घेतली. जवानाचे पार्थिव शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, श्रीरामपूर येथे पाठवण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर भारतीय सैन्यदलाने त्यांच्या पार्थिवाला सन्मानपूर्वक त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले. गणर जयवंत दिलीप परदेशी हे कलकत्ता येथे सैन्यदलात कार्यरत होते. सुट्टीसाठी श्रीरामपूर येथे आले असताना रेल्वे अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 7.15 वाजता त्यांच्या मूळ गावी दोंदवाडे (ता. जामनेर, जि. जळगाव) येथे शासकीय इतमामात आणि चालीरीतीनुसार अंत्यविधी पार पडला. त्यानंतर आज 25 जानेवारी 2025 रोजी दशक्रिया विधी कार्यक्रम संपन्न झाला असून तेरवीचा बछडीचा कार्यक्रम मंगळवार, 22 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. घटनेनंतर नामदार गिरीश महाजन यांच्या पत्नी साधनाताई महाजन यांनी कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि कुटुंबाला धीर दिला. वीर जवान जयवंत दिलीप परदेशी हे कुटुंबातील एकमेव कमावते होते. त्यांच्या पश्चात आई-वडील व एक बहीण असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली असून कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.