Headlines

तलावातील गाळ काढण्यासाठी BJS कार्यकर्त्यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

जामनेर, ५ मार्च (जे. बी. एन. महाराष्ट्र न्यूज): जळगाव जिल्ह्यातील तलावांचे पुनरुज्जीवन आणि जलस्रोत संवर्धनाच्या उद्देशाने भारतीय जैन संघटना (BJS) आणि जिल्हा प्रशासन यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत तलावातील गाळ काढण्यासह गाळयुक्त शिवार, गाळमुक्त बंधारे, नाला खोलीकरण यासारख्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीला जळगावचे जिल्हाधिकारी मा. आयुष प्रसाद, उपजिल्हाधिकारी श्रीमती अर्चना मोरे, जलसंधारण विभागाचे अधिकारी आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. तसेच BJS संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री विनय पारख, जलप्रकल्प जिल्हा प्रमुख सुमीत मुणोत, जळगाव तालुका प्रमुख पंकज जैन, रावेर तालुका प्रमुख देवेंद्र शाह व उज्वल देरेकर, भुसावळ तालुका प्रमुख चेतन जैन, धरणगाव तालुका प्रमुख नीलेश ओस्तवाल, BJS जळगाव अध्यक्ष अजय राखेचा आणि जिल्हा समन्वयक गणेश कोळी यांनीही सहभाग घेतला. BJS कार्यकर्त्यांनी या बैठकीत शेतकऱ्यांना तलावातील गाळ शेतात नेण्यासाठी जनजागृती करण्याचा संकल्प केला. या मोहिमेच्या प्रचारासाठी १५ तालुक्यांतील BJS पदाधिकारी आणि कार्यकर्ते गावागावात जाऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार असल्याचे विनय पारख यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी (BDO) आणि सरपंच यांच्यासोबत लवकरच बैठक घेण्याचे निर्देश दिले. तसेच या बैठकीत BJS कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्याचे आश्वासन दिले. ही मोहीम यशस्वी झाल्यास जिल्ह्यातील तलाव व जलस्रोतांचे पुनरुज्जीवन होईल आणि शेतकऱ्यांना सुपीक गाळ उपलब्ध होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Read More

जामनेर – पाण्याचे काम हे पुण्यार्जनाचे काम आहे – शांतीलाल मुथा

जामनेर(वा.)- जैन समाज हा दुष्काळामुळे राजस्थानातून बाहेर पडला.पूर्वी नुसती पाणपोई बांधली तरी समाधान होते, आता तलाव बांधायची वेळ आली आहे.तलावातील गाळ काढल्यामुळे पाण्याची क्षमता वाढेल.पुर्ण गाव पाणीमय होईल. काढलेला गाळ शेतात टाकल्यामुळे बंजर जमीन सुपीक बनेल. प्यायला पूर्ण गावाला,जनावरांना पाणी मिळेल. शेतात गाळ आल्यामुळे वर्षातून तिनदा पिके घेतील. ग्रामीण अर्थव्यवस्था बदलेल.असे मत भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांनी व्यक्त केले. ते पुणे येथील वर्धमान प्रतिष्ठान सभागृहात संघटनेच्या महाराष्ट्रातील पदाधिकारी,कार्यकर्ते, जिल्हा समन्वयक यांच्या आयोजित बैठकीत बोलत होते. नवकार महामंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली.राज्य अध्यक्ष केतन शाह यांनी उपस्थितांचे स्वागत केले.राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर सांखला यांनी प्रास्तविक केले.मुथा म्हणाले, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार आणि नाला खोलिकरण व रुंदीकरण ही सरकारच्या मृदु व जलसंधारण विभागाची योजना आहे. ही योजना गावागावात,शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच जास्तीत जास्त गावाकडून मागणी अर्ज येण्यासाठी संघटना लोकचळवळ निर्माण करेल. तसा करार शासनाशी झाला असुन या साठी सुहाना स्पाईसेस यांचे सहकार्य लाभत आहे.कार्यकर्त्यांचे सर्व शंकांचे निरासन मुथा यांनी केले.उपस्थितांना संघटनेने तयार केलेल्या ॲपमध्ये गावाची तलावातील गाळ काढण्यासाठी मागणी अर्ज भरुन काढण्याचे प्रात्यक्षिक संघटनेचे मेनेजिंग डायरेक्टर कोमल जैन यांनी दाखविले.लवकरच महाराष्ट्रातील संघटनेचे कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शासनाच्या या योजनेला सहकार्य करतील.सुहाना स्पाईसेस चे विशाल चोरडिया म्हणाले, भारतीय जैन संघटने बरोबर आम्हाला या कार्यात सहभागी होता येत आहे, याचा आनंद वाटतो. राष्ट्रीय सचिव दीपक चोपडा, राज्य सचिव प्रविण पारख यांनी मनोगत व्यक्त केले.या बैठकीला खानदेशातून विभाग अध्यक्ष प्रा.चंद्रकांत डागा(शिंदखेडा), विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत(जामनेर)जळगाव जिल्हा अध्यक्ष निर्मल बोरा, सचिव दर्शन देशलहरा(चोपडा),राजेश जैन(पाचोरा),मनोज कोचर (शहादा), गौरव छाजेड, जय मुथा (बोदवड), महावीर डागा, शुभम डागा (अक्कलकुवा),देवेंद्र शाह, उज्ज्वल डेरेकर (रावेर)) पंकज जैन (जळगाव), चेतन जैन (भुसावळ), संदिप जैन, शीतल जैन, चेतन जैन (शेंदुर्णी), रोशन गोलेछा(चाळीसगाव) उपस्थितीत होते. आभर केतन शाह यांनी मानले.

Read More

जामनेरात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्टान तर्फे स्वच्छता अभियानात १०.३७० टन कचरा संकलन

रविवार, २ मार्च, २०२५जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर प्रतिनिधी सुपडू जाधवजामनेर दि.२ मार्च -महाराष्ट्र भुषण आदरणीय तीर्थरूप डॉ . श्री . नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तर्फे जामनेर शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. दि. २ मार्च रोजी जामनेर नगरपालिके समोर जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई महाजन यांच्या हस्ते सकाळी ८ वाजुन ३० मिनिटांनी महास्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली. या वेळी नगर परिषदेचे सी.ई.ओ. नितीन बागुल, महेंद्र बाविस्कर, आतिश झालटे, जितू पाटील, डॉक्टर प्रशांत भोंडे इ. मान्यवर व श्री बैठकीतील श्रीसदस्य स्वच्छता अभियान प्रसंगी उपस्थित होते. महास्वच्छता अभियानामध्ये जामनेर शहरातील मुख्य रस्ते दोन्ही बाजूनी स्वच्छ करण्यात आले. तसेच शासकिय इमारतीं , शासकिय तांत्रिक विद्यालय, आय टी. आय कॉलेज, विश्रामगृह , पोलिस निरीक्षक बंगला, सरकारी हॉस्पिटल, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, बस स्टॉप, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, नगर परिषर कार्यालय , न्यायालय परिसर, मधूबन कॉलनी सह अनेक ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.या स्वच्छता अभियानामध्ये १२ ट्रैक्टर, ७ मालवाहू रीक्षा या वाहनांमार्फत ६८१ श्री सदस्यांकडून 3.५२० टन ओला कचरा व ६.८५० टन सुका कचरा.असा एकूण १०.३७० टन कचरा संकलित करण्यात आला. या सर्व कचऱ्याची विल्हेवाट ओझर रस्त्यावरील डम्पिंग ग्राऊंड याठिकाणी करण्यात आली.जामनेर शहरात केलेल्या डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे महास्वच्छता अभियानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read More

जळगाव जिल्ह्यातील संताप जनक प्रकार आता मंत्र्यांच्या मुली सुरक्षित राहिल्या नसून सामान्य नागरिकांच्या मुलीचे काय? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे

जळगाव जिल्ह्यातील संताप जनक प्रकार आता मंत्र्यांच्या मुली सुरक्षित राहिल्या नसून सामान्य नागरिकांच्या मुलीचे काय? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे जळगाव : महाराष्ट्रात महिलांच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. अशातच जळगाव जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची मुक्ताईनगर यात्रा महोत्सवात काही टवाळखोर तरुणांनी छेड काढली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्ताईनगर येथे महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी संत मुक्ताईची यात्रा असते. यंदाही यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान, २६ रोजी रात्री केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची मुलगी यात्रेत गेली असता, काही टवाळखोर तरुणांनी तिची छेड काढली. या प्रकरानंतर केंद्रीय रक्षा मंत्री रक्षा खडसे यांनी मुलीसह महिलांना घेऊन पोलीस स्टेशन गाठलं. या वेळी त्यांनी मंत्र्यांच्याच मुलीची छेड होत असेल इतरांचं काय? असा संतप्त सवाल उपस्थित करीत, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात टवाळखोर तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात महिलांच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. आता मंत्र्यांच्या मुली सुरक्षित राहिल्या नसून सामान्य नागरिकांच्या मुलीचे काय? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Read More

जामनेर शहरात महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियानाचे आयोजन…

प्रतिनिधी -सुपडू जाधवमहाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने जामनेर शहरात विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.हे स्वच्छता अभियान रविवार, दिनांक 2 मार्च 2025 रोजी सकाळी 8:30 वाजता नगरपरिषद चौक, जामनेर येथे सुरू होणार आहे. या अभियानाचा शुभारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री श्री. गिरीशभाऊ महाजन आणि जामनेर माजी नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन यांच्या हस्ते होणार आहे.शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असून, नागरिकांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशनला चालना देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.या अभियानात स्थानिक नागरिक, प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, नगरपरिषद कर्मचारी, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, विद्यार्थी आणि प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जामनेर शहराच्या स्वच्छतेसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याने नागरिकांनी स्वतः सहभागी होऊन सामाजिक योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Read More

जामनेर येथून आरोपीस अटक – बेटावद खुर्द (ता. जामनेर) येथे केली होती घरफोडी

जे.बी.एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजळगाव: बेटावद खुर्द (ता. जामनेर) येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी समीर उर्फ बाल्या याला जामनेर येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले असून, पोलिस प्रशासनाने पुन्हा एकदा सिद्ध केले की, कायद्यापासून कोणीही सुटू शकत नाही. दि. ८ फेब्रुवारी २०२५ रोजी बेटावद खुर्द (ता. जामनेर) येथे घरफोडीची घटना घडली होती. अज्ञात व्यक्तीने एका बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू लंपास केल्या होत्या. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस क्रमांक ६०/२०२५, भादंवि कलम ३०५ , 331 (४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. गुप्त माहितीवरून जामनेरमध्ये अटक: गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता, आरोपी जामनेर येथे लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामनेर येथे सापळा रचून आरोपीला अटक केली. पोलीस प्रशासनाची जलद कारवाई: 🔹 घरफोडीप्रकरणी तपास सुरू असताना, आरोपी जामनेर येथे असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.🔹 स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.🔹 बेटावद खुर्द (ता. जामनेर) येथील घरफोडी प्रकरणातील हा मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हेगारांवर वचक निर्माण करणारी पोलीस यंत्रणा या यशस्वी कारवाईमुळे पोलिस प्रशासनाने दाखवून दिले की, गुन्हेगार कितीही लपण्याचा प्रयत्न करत असले तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाहीत. पोलिसांच्या या त्वरित हालचालीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष योगदान: या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक डोमाळे , पो.हे.का विनोद पाटील , पो.ना रणजीत जाधव, पो.का ईश्वर पाटील, पो.का राहुल महाजन तसेच जामनेर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या उत्कृष्ट समन्वयामुळे आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली. पोलिसांचा नागरिकांना संदेश: ➡ कोणतीही संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.➡ गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.➡ घरफोडी, चोरी यासारख्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क आहे. गावकऱ्यांकडून पोलिसांचे कौतुक: या जलद कारवाईमुळे बेटावद खुर्द (ता. जामनेर) आणि जामनेर परिसरातील नागरिकांनी जळगाव पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे भविष्यात अशा कठोर कारवाया सुरूच राहाव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ➡ “कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Read More

वाघूर उपसा सिंचन योजना – शेतकऱ्यांसाठी जलसंपन्न भविष्य!

जामनेर (जि. जळगाव) – जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! वाघूर उपसा सिंचन योजना क्र. 1 अंतर्गत 2020 शेततळ्यांच्या निर्मितीचे काम वेगाने सुरू असून, यामुळे जिल्ह्यातील शेतीला मुबलक पाणीपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा प्रशासनाने या योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विशेष मोहिम राबवली आहे. शेतकरी आणि ग्रामस्थांशी थेट संवाद! आज अधीक्षक अभियंता यशवंत भदाणे, तहसीलदार नानासाहेब आगळे, तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी यांनी जामनेर तालुक्यातील विविध गावे भेट देऊन शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. या योजनेमुळे शेतीसाठी शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होणार असल्याने उत्पादनवाढीस मोठा फायदा होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा विशेष पाठपुरावा! या प्रकल्पाची गती वाढावी आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा यासाठी जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन हे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने आढावा घेत आहेत. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी ते विशेष प्रयत्नशील आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेही लक्ष! शेतकऱ्यांना वेळेत सिंचन सुविधा मिळावी आणि शेती समृद्ध व्हावी, यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील देखील प्रकल्पावर लक्ष ठेऊन आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांना काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! वाघूर उपसा सिंचन योजनेमुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांना सिंचनाच्या सुविधा मिळून शेती जलसंपन्न होईल. प्रशासनाने शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

Read More

वाघूर उपसा सिंचन योजना – शेतकऱ्यांसाठी जलसंपन्न भविष्य!

जामनेर ( प्रतिनिधी सुपडू जाधव )जामनेर –जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! वाघूर उपसा सिंचन योजना क्र. 1 अंतर्गत 2020 शेततळ्यांच्या निर्मितीचे काम वेगाने सुरू असून, जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या शंका दूर करत आहे. 💬 शेतकरी व ग्रामस्थांशी थेट संवाद!आज अधीक्षक अभियंता श्री. यशवंत भदाणे, तहसीलदार श्री. नानासाहेब आगळे आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी यांनी जामनेर तालुक्यातील गावे भेट देऊन शेतकरी व ग्रामस्थांशी चर्चा केली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना पाण्याची शाश्वती मिळेल आणि शेती अधिक फायदेशीर ठरेल. जलसंवर्धन व जलद शेततळे निर्मितीसाठी जलसंपदा मंत्री ना. श्री. गिरीश महाजन हे आग्रही!या प्रकल्पाची गती वाढवण्यासाठी ना. गिरीश महाजन हे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नियमित आढावा घेत असून, प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत. पालकमंत्री ना. श्री. गुलाबराव पाटील यांचे विशेष लक्ष!जिल्ह्यातील शेती सुजलाम सुफलाम व्हावी, यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे देखील प्रकल्पावर लक्ष ठेऊन असून, शेतकऱ्यांना सिंचन सुविधा वेळेत मिळावी यासाठी मार्गदर्शन करत आहेत.

Read More

तब्बल एकदा नव्हे तिसऱ्यांदा झाली चोरी.कुऱ्हाड येथे पुन्हा चोरट्यांची सलामी

जामनेरलोहारा रस्त्यावरील तारांगण हॉटेल मध्यरात्रीनंतर फोडलेचोरट्यांनी चक्क सीसीटीव्ही, DVR लांबविले.दुकानात असलेली जवळपास चार ते पाच हजार रुपयाची चिल्लर लांबवली.तसेच शरीरासाठी आवश्यक असलेली महत्वाची जवळपास दहा हजार रुपये किमतीची टॉनिक देखील चोरून नेली.बहुतेक लोहारा येथे काल रात्री पाच ते सहा दुकाना फोडून त्यांनी आपला मोर्चा कुऱ्हाड गावाकडे वळविला असेल.सबंधित चोरीचा तपास जलदगतीने लावण्याची ग्रामस्थांची मागणी

Read More

गरुड विद्यालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य तपासणी यशस्वी

शेंदुर्णी : येथील दी शेंदुर्णी एज्युकेशन को-ऑप सोसायटी संचलित आ.ग.र. गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय, जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिता राठोड, डॉ. जितेंद्र वानखेडे, औषध निर्माता प्रियंका वानखेडे, आरोग्य सेविका हर्षा गवळी यांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य परीक्षण पूर्ण केले. तसेच, काही विद्यार्थ्यांना किरकोळ तक्रारी असल्यास त्यांच्यासाठी प्राथमिक उपचार करून पुढील तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, शेंदुर्णी येथे पाठविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना संतुलित आहाराचे महत्त्व, स्वच्छता आणि आरोग्य जपण्याचे विविध उपाय यावर मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. अनिता राठोड व डॉ. जितेंद्र वानखेडे यांनी आरोग्य जागृतीसाठी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या उपक्रमास विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. चौधरी, पर्यवेक्षक व्ही. एम. शिरापुरे, पर्यवेक्षक विनोद पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या आरोग्य तपासणीला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

Read More
error: Don't Try To Copy !!