Headlines

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गट विकास अधिकाऱ्यांची आढावा बैठक

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली आज गट विकास अधिकाऱ्यांची (BDO) आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामे, शासकीय योजनांची अंमलबजावणी, निधीचा उपयोग, तसेच नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या सेवांचा आढावा घेण्यात आला. बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे: ✅ शासकीय योजनांची अंमलबजावणी: विविध योजनांची प्रगती व अडथळ्यांवर चर्चा.✅ ग्रामपंचायतस्तरावरील कामांचे परीक्षण: स्थानिक विकासकामांची स्थिती व नियोजन.✅ पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण व स्वच्छता: या क्षेत्रांमध्ये सुरू असलेल्या योजनांचे पुनरावलोकन.✅ निधीचा योग्य वापर व पारदर्शकता: निधी वितरणाची समीक्षा व कार्यक्षमतेवर भर.✅ जनतेच्या तक्रारींचे निवारण: नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी अधिकाऱ्यांना कार्यप्रणाली अधिक प्रभावी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, ठरवलेल्या वेळेत कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. “लोकहिताची कामे जलद व प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी सर्व स्तरांवरील अधिकाऱ्यांनी समन्वय साधून कार्य करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला गेला असून, गट विकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे तात्काळ पालन करून प्रशासनाच्या जबाबदाऱ्या अधिक परिणामकारकरीत्या पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला.

Read More

जळगाव जिल्ह्याचा विकास वेगवान – 756 कोटींपैकी 91.60% निधी वितरित

जळगाव, 22 मार्च: जळगाव जिल्ह्याच्या विकासकामांना गती देण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा वार्षिक नियोजन 2024-25 अंतर्गत मंजूर झालेल्या 756 कोटी रुपयांपैकी तब्बल 91.60% निधी वितरित करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. पालकमंत्र्यांनी 31 मार्च 2025 पूर्वी सर्व प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच, जळगाव जिल्ह्याचा विकास राज्यात आघाडीवर राहण्यासाठी सर्व यंत्रणांनी अधिक गतीने आणि समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले. बैठकीतील महत्त्वाचे निर्णय आणि चर्चा: १. आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा: ✅ जिल्हा नियोजन निधीतून 8 नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे लवकरच लोकार्पण✅ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या बळकटीकरणासाठी विशेष निधी – गोरगरीब रुग्णांना मोफत उपचारांचा मोठा दिलासा✅ पशुसंवर्धन विभागासाठी अतिरिक्त निधी – जिल्ह्यातील पशुधनासाठी दर्जेदार उपचार उपलब्ध २. पर्यटन आणि पर्यावरण संरक्षण: ✅ वन विभागासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर – विकासकामांना वेग देण्याचे आदेश✅ वन सफारी सुरू करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश✅ पारोळा किल्ल्याचे सुशोभिकरण आणि अतिक्रमण हटवण्यासाठी ठोस निर्णय ३. महिला सशक्तीकरण आणि सामाजिक प्रकल्प: ✅ महिला भवन व वन स्टॉप सेंटरची उभारणी पूर्ण✅ क्रीडा विभागाने व्यायामशाळा प्रकल्पाला गती द्यावी ४. शहरी आणि ग्रामीण पायाभूत सुविधा: ✅ सार्वजनिक बांधकाम विभागाने अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत✅ महानगरपालिकेच्या प्रलंबित प्रकल्पांसाठी आयुक्तांनी विशेष लक्ष द्यावे✅ ग्रामीण भागात रस्ते आणि सिंचन प्रकल्पांना प्राधान्य बैठकीस उपस्थित प्रमुख अधिकारी: ✔ जिल्हाधिकारी: आयुष प्रसाद✔ जिल्हा पोलीस अधीक्षक: डॉ. महेश्वर रेड्डी✔ जिल्हा परिषदेच्या CEO: मीनल करनवाल✔ महानगरपालिका आयुक्त: ज्ञानेश्वर ढेरे✔ जिल्हा नियोजन अधिकारी: विजय शिंदे✔ समाजकल्याण विभाग सहायक आयुक्त: योगेश पाटील✔ आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी: अरुण पवार निष्कर्ष: ✔ 31 मार्च 2025 पूर्वी सर्व विकासकामे पूर्ण करण्याचा निर्धार✔ विभागीय समन्वय वाढवून जिल्ह्याचा विकास वेगाने पुढे नेण्याचे निर्देश✔ जळगाव जिल्हा राज्यातील आघाडीच्या विकास जिल्ह्यांपैकी एक राहणार!

Read More

वाढदिवसानिमित्ताने अनावश्यक खर्च न करता शेळगाव उपसरपंच निळकंठ पाटील यांनी अन्नदान करून वाढदिवस केला साजरा.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जामनेर तालुक्याची नेते दिलीप खोडपे सर,फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विजय पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, युवा नेते विश्वतेराजे पाटील, व्ही जी एन टी सेलचे तालुका अध्यक्ष रोहन राठोड, कार्तिक भाऊ काळे,वासुदेव भाऊ साखरे, विकास अहिरे, पत्रकार महेंद्र पाटील, बी जी माळी सर,चरण सिंग पाटील,रवी माळी, आकाश बावस्कर संपुर्ण आत्मसन्मान टिम बोदवड आदी उपस्थित होते. आत्मसमान फाउंडेशन संचलित बोदवड येथील मनोरुग्ण,बेसहारा, मानसिक व बौध्दीक अपंगत्व आलेले लोकांचा सांभाळ करण्याचे व त्यांचा उपचार करण्याची काम आत्म सन्मान फाउंडेशन करीत आहे तरी अशा लोकांना शेळगाव येथील उप सरपंच निळकंठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने अनावश्यक खर्च न करता आज 21 मार्च रोजी अन्नदान करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

Read More

जामनेर तालुक्यातील तेली समाजाचे निस्वार्थ समाजसेवक अजय भाऊ अशोक चौधरी यांची महाराष्ट्रात मोठ्या पदावर नियुक्ती!

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी सुपडू जाधव जामनेर तालुक्यातील तेली समाजाच्या निस्वार्थ समाजसेवेसाठी सतत कार्यरत असलेल्या अजय भाऊ अशोक चौधरी यांची श्री संताजी नवयुवक मंडळ, महाराष्ट्र राज्य या प्रतिष्ठित संस्थेच्या उत्तर महाराष्ट्र प्रसिद्ध प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषजी घाटे साहेब यांनी त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत चौधरी यांची ही नियुक्ती जाहीर केली. अजय भाऊ चौधरी यांनी तेली समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक कार्यासाठी अनेक वर्षे निस्वार्थ सेवा दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या हिताचे अनेक उपक्रम राबवले गेले आहेत. यावेळी संस्थेचे माहिती अध्यक्ष श्री भटू पुंडलिक नेरकर यांनीही अजय भाऊ चौधरी यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या नियुक्तीमुळे जामनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण असून समाजातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Read More

तरुणाला आर्थिक मदत करण्यासाठी मित्रपरिवारा कडून सोशलमिडिया वरती आवाहण

वाकी खुर्द (ता. जामनेर) येथील २२ वर्षीय तरुण रितेश शांताराम माहोर याला भीषण अपघातात गंभीर दुखापत झाली आहे. काल ट्रक आणि मोटारसायकलच्या अपघातात त्याला जबर मार लागला असून सध्या छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे. रितेशच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असून, आतापर्यंतच्या उपचारांसाठी २ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. पुढील उपचारांसाठी सुमारे ५ लाख रुपयांची गरज आहे. त्याच्या कुटुंबीयांसाठी ही मोठी आर्थिक अडचण असल्यामुळे सर्व समाज बांधवांनी आपल्या परीने आर्थिक मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. आपली मदत थेट पोहोचवण्यासाठी खालील QR कोड स्कॅन करून आर्थिक मदत करता येईल. छोट्या मदतीतूनही मोठा आधार मिळू शकतो. आपली मदत रितेशला नवजीवन देऊ शकते! (कृपया अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या संपर्कावर संपर्क साधावा.)

Read More

हिवरखेडे दिगर ते पिंपळगाव बु पानंद रस्त्याने घेतला मोकळा श्वास

जामनेर तालुक्यात पानंद रस्ते खुले करणे मोहिमेस प्रशासनाकडून सुरुवात महाराष्ट्र राज्यातील सर्व शिव पानंद रस्ते खुले करण्याची मोहीम शासनाने हाती घेतली असून त्या योजनेचा शुभारंभ आज जामनेर तालुक्यात करण्यात आला असून मौजे हिवरखेडे दिगर ते पिंपळगाव बु असा शिव पानंद रस्ता आज रोजी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री विनय गोसावी व तहसीलदार जामनेर श्री नानासाहेब आगळे यांचे मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी तोंडापूर व ग्राम महसूल अधिकारी तोंडापूर यांनी संबंधित गावचे ग्राम विकास अधिकारी,सरपंच,पोलीस पाटील तसेच शेतकरी ग्रामस्थ यांचे मदतीने सदरचा शिव पानंद रस्ता अतिक्रमण आज रोजी JCB द्वारे काढण्यात येऊन सदरचा पानंद रस्ता शेतकरी बांधवांसाठी खुला करण्यात आलेला आहे.सदर रस्त्याचे एकूण अंतर हे अंदाजे २ किमी इतके असून अतिक्रमीत अंतर 0.500 km इतके आहे.सदर शिव रस्त्याचे अतिक्रमण काढल्याने या भागातील किमान १४० शेतकरी यांना याचा फायदा होणार आहे.सदरच्या मोहिमेतून सर्व शिव पानंद रस्त्याच्या हद्दी निश्चित करून समृद्ध गावांसाठी दर्जेदार शेतरस्ते तयार करण्यासाठी रोजगार हमी योजना व ग्रामविकास विभागाचे योजनेतून कामकाज करण्यात येणार आहे.सदर खुले करण्यात आलेल्या शेतरस्त्यांची नोंदी गावचे नकाशावर करणे बाबत शासन स्तरावरून नियोजन करण्यात येत आहे.तसेच शेतजमिनीच्या वाटप आदेशाचे अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ चे आदेशात देखील शेत रस्त्याचा उल्लेख करणे बाबत निर्देश शासन स्तरावरून देण्यात आलेले आहेत.सदर शिवरस्ता खुला केल्याने परिसरातील नागरिक व शेतकरी बांधवानी शासनाच्या या योजनेबाबत समाधान व्यक्त केले आहे.सदरची अतिक्रमण खुले करण्याची कार्यवाही मंडळ अधिकारी तोंडापूर विजयकुमार बागडे, ग्राम महसूल अधिकारी श्री घुगे,ग्रामविस्तार अधिकारी,सरपंच व पोलीस पाटील व शेतकरी बांधव यांचे मदतीने लोकसहभागातून खुला करण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे.

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती उत्सव समितीची बैठक संपन्न

जामनेर (प्रतिनिधी- सुपडू जाधव) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती उत्सव समितीची बैठक संपन्न विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती उत्सवानिमित्त सम्राट अशोक नगर येथील त्रिरत्न बुद्ध विहारात नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत उत्सव समितीची सर्वानुमते निवड करण्यात आली. बैठकीत राहुल लक्ष्मण साबळे यांची अध्यक्ष, तुषार प्रकाश मेहेरे यांची उपाध्यक्ष, रोहित संजय दांडगे यांची सचिव, अमोल राजू सोनवणे यांची खजिनदार, तर आनंद ईश्वरलाल सुरडकर यांची सह-खजिनदार म्हणून निवड करण्यात आली. याशिवाय अजय बाविस्कर यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. समिती सदस्य म्हणून कल्पेश सोनवणे, आदित्य भिमडे, रोशन पाटील, वैभव सुरवाडे, विशाल अहिरे, श्रींकांत शेंडे, आदित्य सपकाळे, वैभव नन्नवरे, अतुल वाघ आणि शुभम सुरवाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीत जयंती उत्सवाच्या विविध कार्यक्रमांची रुपरेषा ठरविण्यात आली असून, भविष्यातील नियोजनासाठी सर्व सदस्यांनी सहकार्य करण्याचे ठरवले आहे.

Read More

नामदार गिरीश महाजन यांनी नाशिक येथील महाकुंभ मेळाव्याच्या जागेची केली पाहणी

नाशिक –नाशिक येथे सन २०२७ मध्ये होणाऱ्या महाकुंभमेळा या ऐतिहासिक आणि धार्मिक सोहळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने आज नाशिकमधील विविध धार्मिक स्थळांना भेट दिली. या भेटीदरम्यान रामकुंड, काळाराम मंदिर, सीता गुफा, गोदाघाट, दशक पंचक, नाशिकरोड रेल्वे स्टेशन आणि तपोवन आदी ठिकाणी पाहणी करून महाकुंभमेळ्याच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला. महाकुंभमेळा २०२७ हा सुरक्षित, सुव्यवस्थित व भव्यदिव्य व्हावा यासाठी नियोजनबद्ध तयारीला सुरुवात झाली आहे. कुंभमेळा हा नाशिकच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वैभवाचे प्रतीक असून, भाविकांसाठी हा सोहळा एक अविस्मरणीय अनुभव ठरेल, यासाठी प्रशासन सज्ज आहे. याप्रसंगी आ. सौ. देवयानी फरांदे, आ. सौ. सीमा हिरे, जिल्हाधिकारी श्री. जलज शर्मा, महापालिका आयुक्त सौ. मनीषा खत्री, पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक तसेच विविध प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला बचत गटांना पाठिंबा

नागपूर, ८ मार्च २०२५: आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिला शक्ती, समानता आणि स्वावलंबनाचे प्रतीक आहे. जगभरातील महिलांच्या योगदानाची ओळख पटवून देण्यासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या संदर्भात, अदानी फाउंडेशनने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आणि ग्रामपंचायत आलेसुर येथील हनुमान मंदिराजवळील ‘श्री महालक्ष्मी स्वयंसहाय्यता गटाला’ उपजीविकेसाठी मदत केली. या उपक्रमांतर्गत, गटाला केटरिंग साहित्य पुरवण्यात आले जेणेकरून ते त्यांचा व्यवसाय वाढवू शकतील आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनू शकतील. त्यात १०० केटरिंग प्लेट्स, २०० वट्ट्या, २ भात वाढण्याचे साहित्य, ४ वाट्या, १ जर्मन भांडे, २ भाजीपाला वाढण्याचे चमचे आणि २ चमचे समाविष्ट आहेत. हे सर्व साहित्य वापरकर्त्यांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे, जेणेकरून ते आवश्यकतेनुसार योग्यरित्या वापरता येतील. याशिवाय, गोंडखैरी गावाच्या सरपंच श्रीमती वर्षा आतकरी, आलेसुर गावाच्या सरपंच श्रीमती मालाबाई निकोसे, बचत गटाच्या सीआरओ श्रीमती नीता म्हस्के आणि इतर बचत गट सदस्यांचाही सन्मान करण्यात आला. या प्रसंगी वात्सल्य एनजीओचे श्री. हरीश लाड, ग्रामपंचायत सदस्य श्री. देविदास मोहरले, आलेसुर गावाचे उपसरपंच श्री. मारुती सोनुले उपस्थित होते. कार्यक्रमात वृक्षारोपणही करण्यात आले. ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे या प्राथमिक उद्देशाने अदानी फाउंडेशनच्या उपजीविका प्रोत्साहन योजनांतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सध्या ग्रामीण महिला स्वयंरोजगाराद्वारे त्यांच्या कुटुंब आणि समाजात योगदान देत आहेत. अशा परिस्थितीत, या प्रकारच्या मदतीमुळे ते त्यांचा व्यवसाय अधिक प्रभावीपणे चालवू शकतात आणि त्यांच्या कौशल्यांचा अधिक चांगला वापर करू शकतात. या कार्यक्रमात, अदानी फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी समूहातील महिलांना प्रोत्साहन दिले आणि सांगितले की संस्थेचे उद्दिष्ट केवळ महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे नाही तर त्यांना स्वावलंबी होण्याच्या मार्गावर नेणे देखील आहे. ग्रामीण भागात जेव्हा महिला संघटित पद्धतीने काम करतात तेव्हा त्या केवळ त्यांच्या कुटुंबांची आर्थिक स्थिती सुधारत नाहीत तर समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. आनंद व्यक्त करताना ग्रुपमधील एका सदस्याने सांगितले की, “अदानी फाउंडेशनकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे आमच्या व्यवसायाला एक नवीन दिशा मिळेल. आता आम्ही आमच्या केटरिंग सेवेचा विस्तार चांगल्या सुविधांसह करू शकतो आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो. या मदतीमुळे आम्हाला स्वावलंबी होण्यास खूप मदत होईल.” कार्यक्रमाच्या शेवटी, गटातील महिलांनी अदानी फाउंडेशनचे या पाठिंब्याबद्दल आभार मानले आणि भविष्यातही अशाच प्रकारच्या पाठिंब्याची आशा व्यक्त केली. या उपक्रमाचा फायदा केवळ ‘श्री महालक्ष्मी बचत गटाला’ होणार नाही तर इतर महिलांना स्वयंरोजगार करण्यासाठी प्रेरणा मिळेल. असे उपक्रम महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहेत, जे ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी होण्यास प्रेरित करतात आणि त्यांच्या आर्थिक विकासात मदत करतात.

Read More
error: Don't Try To Copy !!