Headlines

आपले सरकार’ सेवांतील विलंबावर आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांना दररोज एक हजार रुपये दंड लावण्याचे निर्देश

‘आपले सरकार’ सेवांतील विलंबावर आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांना दररोज एक हजार रुपये दंड लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे विविध सामाजिक क्षेत्रांसंदर्भातील वॉररूम बैठक पार पडली. बैठकीमध्ये ‘आपले सरकार’ पोर्टलवरील नागरिकांना मिळणाऱ्या विविध सेवा वेळेत आणि कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट निर्देश दिले की, सेवा वेळेत न पुरवणाऱ्या संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुखांवर दररोज ₹1000 इतका दंड आकारण्यात यावा. तसेच, यासंदर्भात मुख्य सचिवांनी तात्काळ परिपत्रक जारी करावे, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. राज्यात सेवा हक्क अधिनियमांतर्गत एकूण 1027 सेवा अधिसूचित करण्यात आल्या असून, त्यापैकी 527 सेवा सध्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर कार्यरत आहेत. उर्वरित 138 सेवा 31 मे 2025 पर्यंत आणि राहिलेल्या 306 सेवा 15 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या डिजिटल योजनेच्या अंमलबजावणीसाठी ‘महाआयटी’ला ऑनलाईन प्रक्रियेचे प्रमाणीकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ऑक्टोबर 2025 पर्यंत महाराष्ट्राने सेवा डिजिटायझेशनमध्ये देशात आघाडी घेतली पाहिजे. तसेच, नागरिकांनी एका अर्जामार्फत अनेक योजनांचा लाभ घेता यावा यासाठी प्रणालीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याचे आदेशही, मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले. सामाजिक सुरक्षा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रिअल-टाईम ट्रॅकिंग प्रणाली सक्षम करण्यावरही भर देण्यात आला, जेणेकरून आदिवासी, शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना योजनांची अचूक माहिती वेळेत मिळू शकेल. बैठकीत आदिवासी विकास विभागाच्या योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे कार्यान्वयन आणि अ‍ॅग्रीस्टॅक उपक्रम यांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. आदिवासी विकास विभागाच्या संदर्भात, पीएम जनमन योजनेअंतर्गत सर्व उद्दिष्टे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले. त्यात वाड्यापाड्यांमध्ये पायाभूत सुविधा, पक्की घरे, मोबाईल मेडिकल युनिट्सचे जिओटॅगिंग, बहुउद्देशीय केंद्रांचे हस्तांतरण आणि रस्त्यांसाठी विशेष निधीची तरतूद करून कामे गतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. त्याचबरोबर, नाशिक, नंदुरबार, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतील आदिवासी नागरिकांच्या मालमत्ताधिकारांचे प्रकरणे तातडीने निकाली काढावीत तसेच प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (PM DA-JGUA) च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यानुसार 32 जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय समित्यांच्या माध्यमातून कार्यवाही केली जावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. शासकीय वैद्यकीय शिक्षणविषयक धोरणाचा भाग म्हणून, राज्यातील 10 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रकल्पांचा बैठकीत आढावा घेऊन, अंबरनाथ, वर्धा व पालघर येथे महाविद्यालयांसाठी जागा निश्चित करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. भविष्यातील विस्तारासाठी किमान 20 एकर क्षेत्र राखीव ठेवण्याची आवश्यकता बैठकीत अधोरेखित करण्यात आली. यावेळी मंत्री डॉ. अशोक ऊईके, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Read More

निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी पळसखेडे (मिराचे), दि. १४ एप्रिल –धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटी लि., शेंदुर्णी संचलित नीळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालय, पळसखेडे मिरा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात व अभिमानपूर्वक साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक किरण सोनवणे होते. यावेळी मुख्याध्यापक विकास रघुनाथ पाटील, पर्यवेक्षक जे. आर. पाटील सर, उपशिक्षक संदीप सोनवणे सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर मुख्याध्यापक विकास पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची प्रसंगिकता विषद केली. पर्यवेक्षक जे. आर. पाटील सर आणि संदीप सोनवणे सर यांनीही आपल्या मनोगतातून बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. या प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनीही आपल्या प्रभावी भाषणांतून डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा गौरव केला. कार्यक्रमाचे संयोजन व सुत्रसंचालन तीर्थराज इंगळे सर यांनी प्रभावीपणे पार पाडले. कार्यक्रमाचा समारोप आभारप्रदर्शनाने झाला, डी. आर. चौधरी सर यांनी केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समतेचे भान आणि संविधानिक मूल्यांची जाणीव जागवली गेली.

Read More

जामनेर तालुक्यातील १०७ ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत तारीख जाहीर.कोणाचे उघडणार नशीब,तर कोणाचे खेळ बिघडणार.

जामनेर तालुक्यातील आगामी काळातील ग्रामपंचायतीच्या १०७ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत तारीख जाहीर करण्यात आली आहे. यामधे जामनेर तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत २१ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २ वाजता सोडत जाहीर करण्यात येणार आहे. यामधे खालील प्रमाणे जागा सोडत होणार आहे.अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे-१०, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-१५, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-२८, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-५४, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-५, अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब- ८, नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- १४, सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-२७ – एकूण अ बकड – ५४. याप्रकारे सोडत निघणार आहे.

Read More

जळगाव येथे सूर्या फाऊंडेशन आयोजित खान्देश करिअर महोत्सवात राजकुंवर बहुद्देशीय संस्थेला उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल संस्था पुरस्कार प्रदान

जळगाव येथील जी.एस.ग्राउंड मैदानावर सूर्या फाऊंडेशन यांच्यावतीने खान्देश करिअर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.याठिकाणी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्था,शिक्षक,महिला यासह इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याचा सन्मान करण्यात येत आहे. यावेळी सामाजिक,शैक्षणिक, क्रिडा, पर्यावरण,आरोग्य,महिला बाल विकास युवा कल्याण या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉ.भगवानसिंग डोभाळ यांच्या राजकुंवर बहुद्देशीय संस्थेला सन्मानित करण्यात आले आहे.यावेळी सन्मान स्वीकारण्यासाठी संस्थेच्यावतीने कोषाध्यक्ष श्री गणेश शिवसिंग डोभाळ,राजकुंवर कॉलेज फर्दापूरचे उपप्राचार्य डॉ अंबरसिंग बेडवाल, प्रा.ईश्वर चोरडिया हे उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.भगवानसिंग डोभाळ ,सचिव सौ संगीता डोभाळ,प्रशासकीय अधिकारी श्री अमित राजपूत, यांच्यासह संस्थेचे सदस्य सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य,शिक्षक व सहकारी यांनी अभिनंदन केले आहे.

Read More

जामनेरच्या टाकली खुर्द गावाच्या सरपंचाचा राज्यस्तरीय गौरव सरपंच जितेंद्र माळी यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान

*जामनेरच्या टाकली खुर्द गावाच्या सरपंचाचा राज्यस्तरीय गौरव सरपंच जितेंद्र माळी यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान …*जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी -सुपडू जाधवजामनेर, दि. ६ एप्रिल – ग्रामीण भागातील विकासाच्या वाटचालीत झपाट्याने प्रगती करत टाकली खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. जितेंद्र प्रल्हाद माळी यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या याच प्रेरणादायी कार्याची दखल घेत राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मिडिया समूह यांच्या वतीने त्यांना ‘राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुण्यातील S4G हॉटेल येथे आयोजित भव्य सोहळ्यात सिनेअभिनेता महेशदादा देवकाते पाटील, सिनेअभिनेत्री निलोफर पठाण, प्राची पालवे आणि प्रांजली पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.गावात स्वच्छता, पाणी योजना, हरित ग्राम संकल्पना, ग्रामसडक योजना, महिला सक्षमीकरण, लोकसहभागातून विकास आदी क्षेत्रात त्यांनी घेतलेले पुढाकार हे या सन्मानामागचे मोलाचे कारण ठरले.या गौरवाने टाकली खुर्द गावात आनंदाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, तसेच जामनेर तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सरपंच जितेंद्र माळी यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.या यशाबद्दल बोलताना सरपंच माळी म्हणाले, हा सन्मान संपूर्ण टाकली खुर्द गावासाठी आहे. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले. भविष्यातही विकासकामे अधिक जोमाने राबवणार आहे.

Read More

छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयातील दिव्या सदाशिवे या विद्यार्थिनीला छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुण रत्न प्रथम पुरस्कार*

छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयातील दिव्या सदाशिवे या विद्यार्थिनीला छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुण रत्न प्रथम पुरस्कार* जे. बी. एन. महाराष्ट्र न्यूज जामनेरसावळदबारा प्रतिनिधी -जबार एस तडवी गुणवंत्त विध्यार्थ्यांना हा पुरस्कार दिला जातो त्यासाठी अभ्यास करणे ही काळाची गरज. प्रा नारायण कोलते पा.सविस्तर वृत्त असे की जय कालंका देवी शिक्षण प्रसारक संस्था संचलित छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सावळदबारा येथील वर्ग दहावीची सन फेब्रुवारी/मार्च 2024 मध्ये उत्तीर्ण झालेली अतिशय हुशार व कुशाग्र बुद्धिमत्तेची विद्यार्थिनी आपल्या घरच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करत अतिशय तन-मन-धनाने शिक्षण घेणारी व वर्ग दहावीला 93.80 गुण घेऊन उत्तीर्ण झालेली कुमारी दिव्या रावसाहेब सदाशिवे या विद्यार्थिनीला छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता गुणरत्न पुरस्कार सन 24-25 मध्ये विशेष जिल्हा सामाजिक विभाग समाज कल्याण विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत जाहीर करण्यात आला आज रोजी विद्यार्थिनीचे पालक या नात्याने महाविद्यालयाचे प्राचार्य नारायण कोलते व सर्व सहकारी शिक्षक यांच्यामार्फत तिच्या पालकांना देण्यात आला हा पुरस्कार प्राप्त करणारी विद्यालयाची पहिली महिला विद्यार्थिनी मानकरी ठरली आहे तिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे चेक द्वारे तिला 5000 रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं त्याबद्दल तिच्या पालकांनी व गावकऱ्यांनी संस्थेचे विद्यालयाचे विशेष आभार मानले. पुरस्कार देताना प्राचार्य कोलते यांनी सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की, तुम्ही सुद्धा या पुरस्काराचे मानकरी होऊ शकतात फक्त शिक्षण मन लावून आत्मसात करा आपली संपूर्ण विद्यार्थी दशेचे आयुष्य हे अभ्यासासाठी समर्पित करा आपोआपच यश तुमच्या पायथ्याशी लोळण घेईल त्यासाठी तुमच्या अंगामध्ये अभ्यास करण्याची जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास हा ठासून भरायला पाहिजे तरस तुम्ही यश मिळू शकता याचा ज्वलंत उदाहरण म्हणजे दिव्या सदाशिवे आपल्या शालेय जीवनात या विद्यार्थिनी कधी शाळेला दांडी मारली नाही दररोज शाळेत येऊन नियमित अभ्यास करणे शाळेतील सर्व शालेय उपक्रमामध्ये सहभाग नोंदविणे व उत्कृष्ट अशा निबंध स्पर्धेमध्ये सुद्धा या विद्यार्थिनीने पारितोषिक मिळवले आहे घरची परिस्थिती अतिशय हलाकीची वडिलांचे छत्र लहानपणीच हरवलेले पण आपल्या आईनी मोलमजुरी करून या विद्यार्थिनीला शिक्षण दिले वतीने आपल्या आईच्या मेहनतीचे पारणे फेडले. आज छत्रपती संभाजी नगर सारख्या देवगिरी महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत आहे केवळ स्वतःचा आत्मविश्वास व जिद्द याच्या भरोशावर स्वतःला सिद्ध करण्यासाठी मेहनतीने व जिद्दीने अभ्यास करीत आहे मित्रांनो आपल्या एवढ्या ग्रामीण भागात व खेड्यात सुद्धा गुणवत्ता व गुण रत्न विद्यार्थी घडू शकता असे प्राचार्य नारायण कोलते यांनी दैनिकाशी बोलताना मनोगत व्यक्त केले रोख रक्कम पुरस्कार मिळाल्याबद्दल तिचे पालक व भाऊ पालकांनी संस्थेचे अध्यक्ष भाऊराव लक्ष्मणराव कोलते व संचालक मंडळ तसेच शाळेतील सर्व प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सुद्धा आभार मानले याप्रसंगी शाळेतील शिक्षक भास्कर ससाने विकास पाटील, विजय सिंग राजपूत, मुकुंदा व्यवहारे, भास्कर खमाट, भूषण देसले भास्कर ससाने, पोपटराव सोनवणे ज्ञानेश्वर राठोड विनोद जाधव संजय जोशी जीवन कोलते अजबराव चव्हाण श्याम जाधव बाबासाहेब कोलते व विद्यार्थी पालक पत्रकार बंधू उपस्थित होते.अशी माहिती प्रा जीवन कोलते यांनी दिली

Read More

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल जामनेर शाळेचे घवघवित यश

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल जामनेर शाळेचे घवघवित यशजे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधवराष्ट्रीय परीक्षा परिषद नवी दिल्ली तर्फे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक प्रज्ञाशोध परीक्षेत न्यु इंग्लिश स्कूल जामनेरचे 10 विद्यार्थी गुणवत्ता यादीत उत्तीर्ण झाले आहेत. प्रत्येक विद्यार्थी 48 हजार रुपये शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे . प्रज्ञाशोध परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी पासून ते बारावीपर्यंत प्रतिवर्षी प्रत्येकी 12 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी .१) यश अनिल डोंगरे२) निशा गजानन पाटील३) प्राची प्रवीण पाटील४) नेहा उल्हास पाटील५) सोनल मनोज भामरे६) सृष्टी नंदू शेळके७) अंकिता योगेश पाटील८) रितिका रवींद्र पाटील९) दिशा नंदकिशोर सुरळकर१०) भावेश गणेश काठोटेसर्व पात्र विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री एस पी महाजन सर समिती प्रमुखश्री डी एच परदेशी सरसहप्रमुख श्री सी यू पानपाटील सर वश्री व्ही ए पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले सर्व गुणवंतांसह मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार संस्थाध्यक्ष श्री जितेंद्र बाबुराव पाटील व सचिव श्री जितेंद्र रमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सर्व संचालक मंडळाने गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले

Read More

हिवरखेडा वाडी येथे कन्या पुजण्याची परंपरा कायमगोसावी समाज बांधव सरसावले

हिवरखेडा वाडी येथे कन्या पुजण्याची परंपरा कायमगोसावी समाज बांधव सरसावले जे.बी.एन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (एकनाथ कोळी)हीवरखेडा तवा. तालुका जामनेर येथे गोसावी बंधवामार्फत कन्या पूजनाची प्रथा अकरा वर्षापासून सुरू आहे. शुक्रवारी कन्या पूजन करण्यात आले . या निमित्त वैष्णवी देवी भंडाराची प्रथा सुरू ठेवली आहे नऊ अविवाहित मुलींचे पाय पाण्याने व दुधाने धुतले जातात पूजन करून पायाचे पाणी प्रसाद म्हणून पिण्याची प्रथा आहे जन्माला आलेली प्रत्येक मुलगी ही लक्ष्मी आहे. त्यामुळे पूजन करून त्यामुळे पूजन करून कन्याची गावभर मिरवणूक काढल्या जाते. गावातील व बाहेर गाव वरून आलेले भाविक दर्शन घेतात, त्यानंतर महाप्रसाद दिला जातो. त्यासाठी पुजारी अनिल चव्हाण,सुनील चव्हाण, मुकेश चव्हाण,धीरज चव्हाण,राज चव्हाण,रामेश्वर चव्हाण,आशिष चव्हाण इ. असतात.

Read More

‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करावे’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करावे’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सेवा सुविधांसंदर्भात आढावा बैठक पार पाडली. या जयंती सोहळ्याचे भव्य, दिव्य आणि दिमाखदार आयोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. जयंतीसाठी देशभरातून लाखो नागरिक चैत्यभूमीवर येतात. त्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंत्रणांना दिलेले निर्देश:✅सर्व यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे✅मुंबई महानगरपालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रम व अन्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने होत असलेल्या तरतुदीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करावे✅चैत्यभूमी येथे अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे, महापालिका, गृह विभाग व सामाजिक न्याय विभाग तसेच संबंधीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे✅संबंधित यंत्रणांनी स्वच्छतेबाबतही दक्षता घ्यावी✅गर्दी टाळण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यावी. तसेच दादर आणि संबंधित परिसरात वाहतूक पोलिसांनी रहदारीचे योग्य नियंत्रण व जागोजागी सूचना फलक लावावेत✅चैत्यभूमी परिसरात अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी आणि नागरिकांसाठी उन्हापासून संरक्षणासाठी मंडप, प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था करणे✅बेस्ट प्रशासनानेही दादर स्टेशन ते चैत्यभूमीदरम्यान पुरेशा प्रमाणात बससेवा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून नागरिकांना सुविधा होईल सदर बैठकीत पोलीस पथक मानवंदना, चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, शिवाजी महाराज मैदानावरील भव्य निवास मंडप, तेथील आपत्कालीन व्यवस्थेसह, आरोग्य सुविधा, प्रदर्शन मंडप, चैत्यभूमी स्तूप व परिसराची सजावट, “लोकराज्य” विशेषांक, शासकीय जाहिरात प्रसिध्दी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सबंधीत विभाग व यंत्रणांना आवश्यक ते दिशानिर्देश दिले. बैठकीत मुंबई महापालिकेच्या वतीने नियोजनाची सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे मुख्यमंत्री व उपस्थितांना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या हस्ते महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या पोस्टरचे अनावरण देखील करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. संजय बनसोडे, राज्याच्या मुख्य सचिव, राज्याच्या पोलीस महासंचालक, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीचे सरचिटणीस यांच्यासह दादर चैत्यभूमी स्मारक समितीचे प्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Read More

जामनेर आगाराला ५ नवीन बसेस –माननीय जितेंद्र पाटील व तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या हस्ते लोकार्पण….

*जामनेर आगाराला ५ नवीन बसेस –माननीय जितेंद्र पाटील व तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या हस्ते लोकार्पण…..जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधवजामनेर आगाराला मिळाल्या पाच नवीन बसेस कर्मचाऱ्यांनी जल्लोषात केले स्वागत. जामनेर बस आगाराला महाराष्ट्र शासनाकडून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नामुळे पाच नवीन बसेस मिळाल्या असून याचा आनंद व जल्लोष कर्मचाऱ्यांनी मोठा उत्साहात साजरा केला यावेळी नवीन मिळालेल्या बसेसचे लोकार्पण व पूजन जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी सचिव जितेंद्र पाटील तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार डॉक्टर प्रशांत भोंडे अतिश झाल्टे जामनेर बस आगार प्रमुख दिनेश नाईक बस आगार चे अधिकारी गोविंद पवार अमोल सुरवळकर गोपाल वाघ सुनील पाटील ग्रुपसिंग महाजन मोहन जैन जीएम करवंदे अनिल वंजारी गणेश पाटील वैभव पाटील अनिल जैन यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते अनेक दिवसापासून जामनेर बस आगारांमध्ये जुन्या गाड्या चालू असून यामुळे मोठा त्रास वाहक व कर्मचाऱ्यांना होत होता त्यामुळे नवीन बसेसची मागणी करण्यात आली होती महाराष्ट्र शासनातर्फे पाच नवीन लाल परी बसेस जामनेर व सागराला मिळाले असून याचा जल्लोष व स्वागत डीजेच्या तालावर नाचत करण्यात आला या नवीन बसेसमुळे जामनेर व सागरातील प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध होणार आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!