Headlines

तब्बल एकदा नव्हे तिसऱ्यांदा झाली चोरी.कुऱ्हाड येथे पुन्हा चोरट्यांची सलामी

जामनेरलोहारा रस्त्यावरील तारांगण हॉटेल मध्यरात्रीनंतर फोडलेचोरट्यांनी चक्क सीसीटीव्ही, DVR लांबविले.दुकानात असलेली जवळपास चार ते पाच हजार रुपयाची चिल्लर लांबवली.तसेच शरीरासाठी आवश्यक असलेली महत्वाची जवळपास दहा हजार रुपये किमतीची टॉनिक देखील चोरून नेली.बहुतेक लोहारा येथे काल रात्री पाच ते सहा दुकाना फोडून त्यांनी आपला मोर्चा कुऱ्हाड गावाकडे वळविला असेल.सबंधित चोरीचा तपास जलदगतीने लावण्याची ग्रामस्थांची मागणी

Read More

गरुड विद्यालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य तपासणी यशस्वी

शेंदुर्णी : येथील दी शेंदुर्णी एज्युकेशन को-ऑप सोसायटी संचलित आ.ग.र. गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय, जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिता राठोड, डॉ. जितेंद्र वानखेडे, औषध निर्माता प्रियंका वानखेडे, आरोग्य सेविका हर्षा गवळी यांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य परीक्षण पूर्ण केले. तसेच, काही विद्यार्थ्यांना किरकोळ तक्रारी असल्यास त्यांच्यासाठी प्राथमिक उपचार करून पुढील तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, शेंदुर्णी येथे पाठविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना संतुलित आहाराचे महत्त्व, स्वच्छता आणि आरोग्य जपण्याचे विविध उपाय यावर मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. अनिता राठोड व डॉ. जितेंद्र वानखेडे यांनी आरोग्य जागृतीसाठी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या उपक्रमास विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. चौधरी, पर्यवेक्षक व्ही. एम. शिरापुरे, पर्यवेक्षक विनोद पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या आरोग्य तपासणीला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

Read More

निरंकारी बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सत्संग व सफाई अभियान

जामनेर : संत निरंकारी मिशनच्या वतीने परम पूज्य निरंकारी बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सत्संग व स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत “मिशन अमृत – स्वच्छ जल, स्वच्छ मन” या मोहिमेअंतर्गत जामनेर शहरातील जलशुद्धीकरण केंद्र सोनबर्डी येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या अभियानामध्ये जामनेर ब्रांच आणि सेवादल UNIT – 1359 चे सर्व सेवादल भाई आणि बहन यांनी सक्रिय सहभाग घेतला. सद्गुरु माता सुदिक्षा जी महाराज यांच्या असीम कृपेने हे अभियान यशस्वीपणे पार पडले. या प्रसंगी प्रल्हादजी वाघ, रतनसिंग परदेशी, देविदास पाटील, रवींद्र शिंदे, शंकर माळी, शालिग्राम घुले, नामदेव सुरळकर, देविदास चिंचोले तसेच जामनेर, नवी दाभाडी, सोनारी, बोरगाव, पहूर येथून अनेक सेवादल सदस्य उपस्थित होते.

Read More

जामनेर पंचायत समितीमार्फत 9820 लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास घरकुल मंजुरीपत्र वाटप

जामनेर रविवार, 23 फेब्रुवारी, 2025 जामनेर प्रतिनिधी (सुपडू जाधव )प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा क्रमांक दोन अंतर्गत देशभरात 20 लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे आदेश देण्यात आले असून, त्यामध्ये जामनेर तालुक्यातील 9820 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. पंचायत समितीमार्फत लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले असून, त्यातील 7744 लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याचे 15,000 रुपये जमा करण्यात आले आहेत. यावेळी झालेल्या कार्यक्रमात माजी बांधकाम अभियंता जे. के. चव्हाण, माजी उपसभापती नवल राजपूत, माजी पंचायत समिती सदस्य अमर पाटील, रमण चौधरी, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, माजी सरपंच कमलाकर पाटील, तुकाराम निकम, शांताराम बिलोरे, धनराज मोरे, आनंदा लावरे, जितेंद्र माळी, विस्तार अधिकारी अशोक पालवे यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला एकूण ₹1,46,000 अनुदान मिळणार आहे. पहिला हप्ता जमा झाल्यानंतर लाभार्थ्यांनी तात्काळ घरकुल बांधकाम सुरू करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांचे पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण होणार असून, सरकारच्या घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे.

Read More

सावळदबारा ग्रामपंचायतचे मुद्दामहून येणाऱ्या वॉटर सप्लाय कडे दुर्लक्ष मेन पाईपलाईन वरती प्रेशर व्हाल फोडून व गावाजवळ अवैधरित्या नळ कनेक्शन

सावळदबारा ग्रामपंचायतचे मुद्दामहून येणाऱ्या वॉटर सप्लाय कडे दुर्लक्ष मेन पाईपलाईन वरती प्रेशर व्हाल फोडून व गावाजवळ अवैधरित्या नळ कनेक्शन सोयगाव तालुका.. प्रतिनिधी जब्बार एस तडवी सोयगाव तालुक्यातील सावळदबारा ग्रामपंचायत कार्यालयाचे सर्व ग्रामपंचायतबॉडी व ग्रामसेवक यांच्या नाहक हलगर्जीपणामुळे देव्हारी पिंपळवाडी इथून वाटर सप्लाय विहिरीवरून येणारी मेन पाईपलाईन वरती देव्हारे येथील शेतकऱ्यांनी प्रेशर व्हाल फोडून आपल्या शेतात शेती मालाला व इतर पिकांना पाणी देण्यासाठी नळ जोडणी पाईपलाईन करून घेतली आहे व त्यातूनच नव्हे तर सावळदबारा फाट्याजवळ सुद्धा काही अज्ञात लोकांनी नळ कनेक्शन घेतलेले आहे ग्रामपंचायत सावळदबारा कार्यालयाला व संबंधित सरपंच व सर्व सदस्यांना माहिती असून सुद्धा या अवैधरित्या नळ कनेक्शन घेतलेल्या लोकांवर काहीही कारवाई न करता 24 तास पाणी सुविधा देण्यात येत आहे पाणी वॉटर सप्लाय विहीर व मोटार ही सावळद बारा ग्रामपंचायतची व अवधरीत्या पाणी उपसा तेथील शेतकरी काही लोक सर्रासपणे शेतीला व इतर कामाला पाणी घालत आहे सावळदबारा गावामध्ये वाटर सप्लाय टाकीमध्ये उशिरा पाणी येते आठ-दहा दिवसाआड पाणी येत आहे यांचा नाहक त्रास गावकऱ्यांना भोगाव लागत आहे ग्रामपंचायत कार्यालयाने अवैधरित्या नळ कनेक्शन वरती कारवाई न केल्याने काही देणे घेणे करून नळ कनेक्शन देण्यात आले आहे अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये चालू आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंचायत समिती जिल्हा परिषद कार्यालयातर्फे याची सखोल चौकशी करून ग्रामपंचायत कार्यालय व त्या संबंधित शेतकऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे .सध्या उन्हाळ्याची चाहूल लागल्याने पाणी जास्त प्रमाणात लागत आहे अवैध नळ घेतल्याने कृत्रिम पाणी टंचाई भासू लागली आहे ग्रामपंचायत च्या दुर्लक्षामुळे नळ कनेक्शन घेतली जात आहेजब्बार तडवी ,(सामाजिक कार्यकर्ते) सावळदबारा सर्कल

Read More

मैत्रेंय प्रकरण:- कोर्टात महत्त्वाची सुनावणी, मालमत्ता विक्रीसाठी आदेश.

मुंबई: 17 फेब्रुवारी 2025 – मुंबई सत्र न्यायालयात आज वर्षा मधुसुदन सत्पाळकर आणि अन्य आरोपींविरुद्ध महत्त्वाची सुनावणी पार पडली. विशेष सत्र न्यायालय क्रमांक 20 मधील न्यायमूर्ती एन. जी. शुक्ला यांच्या समोर ही सुनावणी झाली. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखा (EOW) आणि विविध गुंतवणूकदारांचे लक्ष लागून आहे.राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील (SPP) प्रदीप घरत यांनी बाजू मांडली, तर एपीआय (EOW) श्री. सालुंके आणि पीसी श्री. डी. सुर्यभान हे देखील उपस्थित होते. गुंतवणूकदारांचे प्रतिनिधित्व करणारे अधिवक्ता एस. बी. भटगुनाकी आणि त्यांच्या संघाने युक्तिवाद केला. मात्र, आरोपी जामिनावर असूनही कोर्टात अनुपस्थित होते, याची नोंद घेण्यात आली. यावेळी, सीए श्री. रविंद्र शिंगाडे यांनी मालमत्ता विक्रीसंदर्भातील अहवाल सादर केला, ज्याला “टॉर एक्झ.16” म्हणून चिन्हांकित करण्यात आले. या अहवालानुसार, राज्य सरकारने क्विकर रिअॅलिटी प्रा. लिमिटेड या वित्तीय आस्थापनेची नेमणूक केली आहे. मैत्रेया ग्रुप ऑफ कंपन्या या गटाच्या संलग्न मालमत्तांची लिलाव विक्री करण्यासाठी ही नेमणूक करण्यात आली आहे.कोर्टाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 मार्च 2025 रोजी ठेवली असून, त्यापर्यंत लिलाव प्रक्रियेच्या पुढील टप्प्यांबाबत सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत.आर्थिक गैरव्यवहार, गुंतवणूकदारांची फसवणूक आणि मालमत्ता जप्ती यामुळे गाजत असलेल्या या प्रकरणाकडे सर्वांचेच लक्ष आहे. पुढील सुनावणीत लिलाव प्रक्रियेचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

Read More

जामनेर बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांचा दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्रांवर डल्ला..

जामनेर,दि.17. प्रतिनिधी~ जामनेरहून भुसावळ ला जाणाऱ्या बस मध्ये चढणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मंगळसूत्र लंपास केल्याची घटना घडली असून जामनेर बस स्थानक परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे पोलीस प्रशासनाने नियमित पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांतून केल्या जात आहे.∆सविस्तर वृत्त असे की,आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास जामनेर बस स्थानकात पुणे~भुसावळ बस क्र.MH.20,BL.4020 उभी होती आणि या ठिकाणी जामनेर हून कुऱ्हा(पानाचे) येथे जाण्यासाठी उभ्या असलेल्या जयश्री पाटील व प्रतिभा तायडे या दोन महिला बस मध्ये गर्दीत चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केले.चोरी झाल्याचा प्रकार लक्षात येताच या दोन्ही महिलांनी बस मधील प्रवाशांची ड्रायव्हर , कंडक्टर यांना झडती घ्यायला सांगितले.परंतु काहीही मिळून आले नाही.या दोन्ही महिलांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठत घडलेला प्रकार सांगितला.दोन्ही महिलांच्या फिर्यादी वरून जामनेर पोलीसात अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.राज्य सरकारने महिलांना एस.टी. प्रवास भाड्यात सवलत दिल्याने दिवसा गणिक एस.टी.ने प्रवास करणाऱ्यात महिला प्रवाशांची संख्या वाढत आहे.राज्यातील प्रत्येक बस स्थानका वर बसने प्रवास करणाऱ्या पुरुषां पेक्षा महिलांची अधिक गर्दी पाहायला मिळत आहे.सध्या लग्न सराई चे दिवस असून प्रत्येक बस स्थानकात प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे,या गर्दीचा फायदा घेत चोरीच्या घटना घडत आहेत.जामनेर बस स्थानकावर देखील प्रवाश्यांची दररोज गर्दी पाहायला मिळत आहे.गेल्या काही दिवसां पासून या बस स्थानकावर चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दर दिवसाआड येथे चोरीच्या घटना घडत आहेत.कुणाचा खिसा कापला जातो,तर कुणाची बॅग लंपास तर कुणाच्या गळ्यातील मंगळसूत्र,चैन,कानातील दागिन्यांवर चोरटे बिनधास्त डल्ला मारत असतात.सध्या बाजारपेठेत सोन्याचे दर हे दिवसागणिक गगनाला भिडत असून सर्वसामान्यांना आजघडीला सोने खरेदी करणे अवक्या बाहेरची बाब असतांना चोरट्यांची मात्र या चोरी सत्रामुळे चांगलीच चांदी होत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.काही वर्षांपूर्वी जुने बस स्थानक असताना या बस स्थानक परिसरात होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण रोखण्यासाठी स्वतंत्र पोलीस चौकी कार्यरत होती.मात्र नवीन बस स्थानक झाल्या नंतर या ठिकाणी एखादा पोलीस कर्मचारी देखील कार्यरत नसल्याने चोरट्यांचे चांगलेच फावले आहे.चोऱ्यांचे प्रमाण रोखण्यासाठी जामनेर पोलीस स्टेशनच्या वतीने या बस स्थानकावर नियमित दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून केल्या जात आहे.

Read More

जागतिक पटलावर देशाच्या खेळाडूंचा डंका ही अभिमानास्पद बाब-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जागतिक पटलावर देशाच्या खेळाडूंचा डंका ही अभिमानास्पद बाब-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव दि.१६: सध्या जागतिक पटलावर देशाच्या विशेषत: महाराष्ट्रातील खेळाडू आपले नाव कमावत असून ही देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. JBN जामनेर येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आयोजित केलेल्या ‘नमो कुस्ती महा कुंभ दोन’ अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, अनिल पाटील, संजय कुटे, चंद्रकांत सोनवणे, चंद्रकांत पाटील, अमोल पाटील, अमोल जावळे, अनुपभैय्या अग्रवाल यांच्यासह कुस्तीगीर संघटनेचे रामदास तडस, जामनेरच्या नगराध्यक्ष साधनाताई महाजन आदी उपस्थित होते.JBN मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ऑलम्पिक स्पर्धा, कॉमनवेल्थ, एशियन गेम अशा विविध स्पर्धांमध्ये देशातील खेळाडूंनी विशेषत: महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. मागील काळात मॅटवरील कुस्तीमुळे आपण थोडे मागे पडलो होतो. परंतु मातीवरील कुस्ती स्पर्धेत आपल्या देशाचे खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. कुस्तीच्या माध्यमातून देशाला ऑलम्पिकमधील पहिले पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव हे कुस्तीपटू होते. आजही महाराष्ट्राचे खेळाडू विजय चौधरी, सोनाली मंडलिक, राजीव पटेल यांनी आपल्या खेळाची चमक दाखवून परदेशातील कुस्तीपटूवर मात केली, असे सांगून त्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.JBN या स्पर्धेला नऊ देशातील जागतिक स्तरावरील कुस्तीपटू उपस्थित राहिल्याबद्दल या स्पर्धेची रंगत आणखीनच वाढल्याचे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन यांचेही त्यांनी यावेळी कौतुक केले. या स्पर्धेला नागरिकांचा मोठा सहभाग लाभला हेच या स्पर्धेचे यश असल्याचे श्री.फडणवीस म्हणाले. या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारतासह फ्रान्स, रोमानिया इस्टोनिया, उझेकिस्तान, जॉर्जिया आदी देशातील जागतिक विजेते ओलंपियन, हिंदकेसरी, रुस्तम ए हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी आदी विजेत्या खेळाडूंनी सहभाग घेतला. अशा स्पर्धा जामनेरमध्ये होणे हे कुस्तीसाठी चांगले वातावरण असल्याचेही ते म्हणाले. यावेळी विजेत्या कुस्तीपट्टूना मान्यवरांच्या हस्ते चांदीची गदा प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी, विविध देशातून आलेले कुस्तीगीर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More

कापूस खरेदी सुरू करण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शेंदुर्णी येथे शेतकरी मेळावा संपन्न

कापूस खरेदी सुरू करण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शेंदुर्णी येथे शेतकरी मेळावा संपन्न जळगाव, दि.१६: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सीसीआयने बंद केलेली कापूस खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा उत्पादित माल घरातच राहणार नाही, याची काळजी राज्य शासन घेईल. या परिसराचे चित्र बदलण्यासाठी आवश्यक ते सहकार्य राज्य शासन करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दी शेंदुर्णी सेकंडरी को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त अमृत ग्रंथ प्रकाशन आणि नूतन इमारतीचा पायाभरणी समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, खासदार स्मिताताई वाघ, आमदार संजय कुटे, सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास राज्य शासनाचे प्राधान्य आहे. वीज आणि पाणी यासंदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याला शासनाने प्राधान्य दिले आहे. सौर पंपासाठी पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना पुढच्या १५ दिवसात आणि मागणी नोंदवल्या नंतर प्रत्येक शेतकऱ्याला दोन महिन्याच्या आत जोडणी देण्यात येईल. शेतकऱ्यांना २०२६ पर्यंत दिवसाची वीज देण्यासाठी सौर फिडरचे काम वेगाने सुरू आहे. शेतकऱ्याचा माल कोणत्याही परिस्थितीत पडू दिला जाणार नाही, त्याची खरेदी करण्यात येईल. या भागाचे चित्र बदलण्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, चक्रधर स्वामींचे वास्तव्य लाभलेली ही भूमी आहे. या ऐतिहासिक संस्थेत येण्याची संधी मिळाली. स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर ही शिक्षण संस्था स्थापन झाली. गावातल्या मुलामुलींना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी गजानन राव गरुड यांनी या संस्थेची स्थापना केली. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. संस्थेच्या समस्या सोडविण्याच्या प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी नावारूपाला आले. स्वतः बापूसाहेब गरुड यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते, विविध विषयांचा व्यासंग होता. या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वामुळे ते प्रसिद्ध झाले. सरपंच ते विधानसभा उपाध्यक्ष अशा अनेक भूमिकांना त्यांनी न्याय दिला. आज त्यांचे कार्य संस्था पुढे नेत आहे. नुकतीच पायाभरणी केलेली ही अतिशय सुंदर आणि पर्यावरण पूरक इमारत असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते शेंदुर्णी नगरपंचायतीच्या नगरोत्थान योजनेंतर्गत मलनिस्सारण प्रकल्प आणि रस्ता कामाचे शुभारंभ करण्यात आला. सुरुवातीला संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, विविध ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More

बेटावद खुर्दला ५ ठिकाणी चोऱ्या – अज्ञाताविरूध्द

बेटावद खुर्दला ५ ठिकाणी चोऱ्या – अज्ञाताविरूध्द जामनेर पोलिसात गुन्हा दाखल जे बी एन महाराष्ट्र न्यूज-जामनेर (प्रतिनिधी सुपडू जाधव): बेटावद खुर्द (ता. जामनेर) येथे रविवारी रात्री चोरट्यांनी पाच ठिकाणी ■ घरफोडी करून ७० हजारांची रोकड व १३ हजाराचे सोन्याचे दागिने लांबविल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्तम राजाराम बर्डे (बेटावद खुर्द, ता. जामनेर) हे पत्नीला उपचारासाठी जामठी … (ता. बोदवड) येथे घेऊन गेले होते. त्यांच्या बंद घरातून चोरट्यांनी ३० हजार रोख व दागिने लांबविले. याच रात्री चोरट्यांनी गावातील इतरही चौघांच्या घरातून रोकड व दागिने लांबवल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान, एकाच वेळी पाच ठिकाणी चोऱ्या झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून हवालदार रवींद्र बिन्हाडे तपास करीत आहेत.

Read More
error: Don't Try To Copy !!