Headlines

‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करावे’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करावे’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सेवा सुविधांसंदर्भात आढावा बैठक पार पाडली. या जयंती सोहळ्याचे भव्य, दिव्य आणि दिमाखदार आयोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. जयंतीसाठी देशभरातून लाखो नागरिक चैत्यभूमीवर येतात. त्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंत्रणांना दिलेले निर्देश:✅सर्व यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे✅मुंबई महानगरपालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रम व अन्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने होत असलेल्या तरतुदीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करावे✅चैत्यभूमी येथे अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे, महापालिका, गृह विभाग व सामाजिक न्याय विभाग तसेच संबंधीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे✅संबंधित यंत्रणांनी स्वच्छतेबाबतही दक्षता घ्यावी✅गर्दी टाळण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यावी. तसेच दादर आणि संबंधित परिसरात वाहतूक पोलिसांनी रहदारीचे योग्य नियंत्रण व जागोजागी सूचना फलक लावावेत✅चैत्यभूमी परिसरात अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी आणि नागरिकांसाठी उन्हापासून संरक्षणासाठी मंडप, प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था करणे✅बेस्ट प्रशासनानेही दादर स्टेशन ते चैत्यभूमीदरम्यान पुरेशा प्रमाणात बससेवा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून नागरिकांना सुविधा होईल सदर बैठकीत पोलीस पथक मानवंदना, चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, शिवाजी महाराज मैदानावरील भव्य निवास मंडप, तेथील आपत्कालीन व्यवस्थेसह, आरोग्य सुविधा, प्रदर्शन मंडप, चैत्यभूमी स्तूप व परिसराची सजावट, “लोकराज्य” विशेषांक, शासकीय जाहिरात प्रसिध्दी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सबंधीत विभाग व यंत्रणांना आवश्यक ते दिशानिर्देश दिले. बैठकीत मुंबई महापालिकेच्या वतीने नियोजनाची सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे मुख्यमंत्री व उपस्थितांना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या हस्ते महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या पोस्टरचे अनावरण देखील करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. संजय बनसोडे, राज्याच्या मुख्य सचिव, राज्याच्या पोलीस महासंचालक, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीचे सरचिटणीस यांच्यासह दादर चैत्यभूमी स्मारक समितीचे प्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Read More

जामनेर आगाराला ५ नवीन बसेस –माननीय जितेंद्र पाटील व तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या हस्ते लोकार्पण….

*जामनेर आगाराला ५ नवीन बसेस –माननीय जितेंद्र पाटील व तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या हस्ते लोकार्पण…..जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधवजामनेर आगाराला मिळाल्या पाच नवीन बसेस कर्मचाऱ्यांनी जल्लोषात केले स्वागत. जामनेर बस आगाराला महाराष्ट्र शासनाकडून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नामुळे पाच नवीन बसेस मिळाल्या असून याचा आनंद व जल्लोष कर्मचाऱ्यांनी मोठा उत्साहात साजरा केला यावेळी नवीन मिळालेल्या बसेसचे लोकार्पण व पूजन जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी सचिव जितेंद्र पाटील तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार डॉक्टर प्रशांत भोंडे अतिश झाल्टे जामनेर बस आगार प्रमुख दिनेश नाईक बस आगार चे अधिकारी गोविंद पवार अमोल सुरवळकर गोपाल वाघ सुनील पाटील ग्रुपसिंग महाजन मोहन जैन जीएम करवंदे अनिल वंजारी गणेश पाटील वैभव पाटील अनिल जैन यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते अनेक दिवसापासून जामनेर बस आगारांमध्ये जुन्या गाड्या चालू असून यामुळे मोठा त्रास वाहक व कर्मचाऱ्यांना होत होता त्यामुळे नवीन बसेसची मागणी करण्यात आली होती महाराष्ट्र शासनातर्फे पाच नवीन लाल परी बसेस जामनेर व सागराला मिळाले असून याचा जल्लोष व स्वागत डीजेच्या तालावर नाचत करण्यात आला या नवीन बसेसमुळे जामनेर व सागरातील प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध होणार आहे.

Read More

मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे विद्यार्थ्यांचे साकडे नवीदाभाडी येथील शिक्षकांची बदली थांबविण्याची मागणी

मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे विद्यार्थ्यांचे साकडे नवीदाभाडी येथील शिक्षकांची बदली थांबविण्याची मागणीजे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधवजि. प. शाळा नवीदाभाडी येथील विद्यार्थी व पालकांनी ना. गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री यांच्याकडे शाळेतील बदलीपात्र शिक्षकांची बदली न होण्यासाठी साकडे घातले. जि. प. शाळा नवीदाभाडी येथे तीन शिक्षक कार्यरत असून त्यामधील गजानन मंडवे व ऋषिकेश शिंदे या दोन शिक्षकांच्या बदली होऊ नये यासाठी आज गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी नवीदाभाडी या गावातून अनेक पालक, महिला आणि शाळेतील मुले गिरीश महाजन यांना भेटण्यासाठी आले होते. विद्यार्थी म्हणाले,आमच्या शाळेतील शिक्षकांच्या बदल्या झाल्यास आम्ही शाळेत जाणार नाही.आम्हाला तेच शिक्षक द्या आमचे शिक्षक आम्हाला छान शिकवतात,असे कथन ना.मा. गिरीश महाजन यांना सांगत होते. सदर प्रकरणाची पालकांकडून माहिती घेतली असता सदर शाळेत पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग असून ८० विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेला यावर्षी ‘”मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या अभियानात तिसरा क्रमांक प्राप्त झालेला आहे. या शाळेतील विद्यार्थी पाचवी स्कॉलरशिप मध्ये सहा ते सात विद्यार्थी पात्रता धारक असतात. सदर शाळेत मंथन प्रज्ञाशोध परीक्षा, एम .टी .एस परीक्षाचे अभ्यास वर्ग घेतले जातात आणि विद्यार्थी जिल्हा व तालुका गुणवत्ता यादीत झळकतात. आता झालेल्या जामनेर टॅलेंट सर्च ( जे. टी. एस.) परीक्षेत जामनेर तालुक्यातून इयत्ता चौथीतील विद्यार्थी पहिल्या दहा मध्ये तीन विद्यार्थी नवीदाभाडी शाळेचे आहे. अशा प्रकारची शाळेची यशोगाथा या शिक्षकांनी निर्माण केलेली आहे असे गावकऱ्यांनी सांगितले.म्हणून गजानन मंडवे व ऋषिकेत शिंदे या शिक्षकांची बदली थांबवावी अशी पालकांची शाळेतील मुलांची व महिलांची मागणी होती.

Read More

सावळदबारा सरपंचपदी आमदार अब्दुल सत्तार समर्थकांची वर्णी मोहम्मद आरिफ मोहम्मद लुकमान यांची सरपंच पदी निवड ; बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने करण्यात आला जल्लोष

*सावळदबारा सरपंचपदी आमदार अब्दुल सत्तार समर्थकांची वर्णी मोहम्मद आरिफ मोहम्मद लुकमान यांची सरपंच पदी निवड ; बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने करण्यात आला जल्लोषजे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरसोयगाव ( प्रतिनिधी ) जब्बार तडवी तालुक्यातील अत्यंत महत्वाचे समजल्या जाणाऱ्या सावळतबारा गावच्या सरपंच पदी आमदार अब्दुल सत्तार समर्थक मोहम्मद आरिफ मोहम्मद लुकमान यांची निवड झाली आहे. या निवडीनंतर बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने गावात जल्लोष करण्यात आला. मोहम्मद आरिफ मोहम्मद लुकमान यांची सरपंच पदी निवड होताच बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने जल्लोष करण्यात आला. यावेळी सिल्लोड बाजार समितीचे उपसभापती दारासिंग चव्हाण,माजी सरपंच लोकमान शेठ ,बाजार समितीचे माजी सभापती शिवाप्पा चोपडे , माझी सभापती धर्मसिंग चव्हाण माजी सभापती सांडूभाऊ तडवी , माजी सरपंच मैताप तडवी , मा.चेअरमन पंजाबराव देशमुख , माजी सरपंच मोहम्मद फिरोज ,मोहम्मद लुखमान, माजी उपसरपंच वसंता चोरमले निलेश आप्पा चोपडे ,अशोक देशमुख , फिरोज खा शेख गफार, अमजद तडवी ,अनिल पाटील , संजय देशमुख, गजानन चोपडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More

JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलचे यशस्वी 9 वर्ष पूर्ण.संचालक मनोजजी कावडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयात वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलने यशस्वी ९ वर्ष पूर्ण करून १० व्या वर्षात पदार्पण केले. या निमित्ताने संचालक मनोजजी कावडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयात वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी मनोज कावडिया यांनी चॅनेलच्या यशस्वी वाटचालीबद्दल विशेष कौतुक करत भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यानंतर केक कापून वर्धापनदिनाचा आनंद साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला संचालक किरण सोनवणे, संपादक शांताराम जाधव, कार्यकारी संपादक ईश्वर चोरडिया, अँकर मीनल चौधरी, कॅमेरामन विलास ढाकरे, सुपडू जाधव, सुनील जाधव,सचिन माळी, प्रविण गावंडे, आबा पाटील आणि इतर सहकारी उपस्थित होते. JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलने पत्रकारितेच्या क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली असून, निष्पक्ष आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनेलची ओळख आहे.

Read More

JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलचे यशस्वी 9 वर्ष पूर्ण.संचालक श्री मनोजजी कावडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयात वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा

JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलचे यशस्वी 9 वर्ष पूर्ण.संचालक श्री मनोजजी कावडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयात वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा. JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलचे गुढीपाडव्याच्या शुभमहूर्तावर 9 वर्ष पूर्ण 10 व्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण केले आहे. यावेळी कार्यालयात संचालक श्री मनोजजी कावडिया यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी श्री मनोज कावडिया त्यांनी चॅनेल बाबत कौतुक करीत भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.यानंतर केक काटत वर्धापन दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला संचालक श्री किरण सोनवणे,संपादक शांताराम जाधव,कार्यकारी संपादक ईश्वर चोरडिया,अँकर मीनल चौधरी,कॅमेरामन विलास ढाकरे,सुपडू जाधव,सचिन माळी, प्रविण गावंडे,आबा पाटील,यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते.

Read More

गुढीपाडव्याचे औचित्य साधत जामनेर तालुक्यातील पाळधी येथील शेतकरी श्री.शशिकांत त्रंबक पाटील यांनी वाटसरूंसाठी केली पाणपोईची सुविधा

गुढीपाडव्याचे औचित्य साधत जामनेर तालुक्यातील पाळधी येथील शेतकरी श्री.शशिकांत त्रंबक पाटील यांनी वाटसरूंसाठी केली पाणपोईची सुविधा. कडक उन्हामध्ये रस्त्याने येणारे जाणारे वाटसरू,तसेच शेतकरी यांना थंडगार पाणी मिळावे म्हणून मागील 14 वर्षापासून पाळधी खर्चाना रस्त्यावर दर गुढीपाडव्याला पूजन करून लोकांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याचा अखंडित नित्यक्रम शेतकरी शशिकांत पाटील यांनी सुरू ठेवला आहे. जामनेर तालुक्यामध्ये आपापल्या क्षमतेनुसार वेगवेगळ्या माध्यमातून मानवतेसाठी काम करणारे असे अनेक लोक आहेत. “पाणी हेच जीवन आहे” पाण्याचे महत्व समजून त्यासाठी जीवन वाहून घेतलेल्या शशिकांत भाऊंना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

Read More

जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजनांनी दिल्या मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा.

जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजनांनी दिल्या मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा. जामनेर –आज रमजान ईद निमित्त जामनेर शहरातील ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवांना नमाज पठणानंतर जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या..याप्रसंगी भाजपा चे पदाधिकारी , उपस्थित होते .

Read More

जामनेर तालुका मराठा सेवा संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर…!

जामनेर :- दि. 30/03/2025 रोजी मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथ यात्रा व मराठा जोडो अभियान चे औचित्यसाधत जामनेर तालुका मराठा सेवा संघाची नुतन कार्यकारणी गठित करण्यात आली.जामनेर येथील मराठा समाज मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करत जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मा.शिवश्री सुमित पाटील तर प्रमुख अतिथी म्हणुन सेवा संघ राज्यउपाध्यक्ष मा.शिवश्री सुरेंद्र पाटील व संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष मा.शिवश्री सुरेश पाटील व निरीक्षक म्हणुन जिल्हा उपाध्यक्ष मा.शिवश्री बि.आर.पाटील सर व विशाल ला़ॅन चे संचालक डि. एन. चोैधरी विचारमंचावर उपस्थित होते. मराठा सेवा संघाच्या तालुकाध्यक्ष पदी शिवश्री दिपक ढोणी पाटील तर कार्याध्यक्षपदी शिवश्री. प्रमोद पाटील, उपाध्यक्षपदी शिवश्री दिपक वारांगणे पाटील, तालुका सचिव शिवश्री किशोर पाटील , शिवश्री प्रविण पाटील सहसचिवपदी व संघटक पदी शिवश्री दशरथ भाऊ पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या मार्गदर्शक मनोगता नंतर मान्यवरांच्या हस्ते नुतन कार्यकारणीचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या व 21 एप्रील रोजी मराठा सेवा संघ संचालित जिजाऊ रथ यात्रे संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी तालुक्यातील सेवा संघ कार्यकर्ते सामाजीक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी ,शिक्षक मंडळी ,वार्तांकन करणारे वार्ताहार, बहुजन परिवर्तनवादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हाकार्यध्यक्ष शिवश्री. योगेश पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले. शिवश्री दिपक वारांगणे पाटील यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर नवनियुक्त तालुकाध्यक्ष शिवश्री दिपक ढोणी पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानुन कार्यक्रमाची सांगता केली.

Read More

सिद्धगड भवनी माता मंदिर व परिसराच विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार — नामदार गिरीश महाजन

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधव जामनेर —गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रामपूर ता. जामनेर येथील श्री सिद्धगड भवानी माता मंदिर संस्थानच्या नूतन श्री सिध्दगड भवानी माता मंदिराचा भूमिपूजन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला.जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी सपत्नीक भूमिपूजन आज केले.श्री सिद्धगड भवानी माता मंदिर संस्थानचा अध्यक्ष म्हणून मंदिराचा व मंदिर परिसराचा विकास व्हावा यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांना संस्थानच्या इतर सहकाऱ्यांची व भाविकांची मिळणारी खंबीर साथ बळ देणारी आहे असे मनोगत नामदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केले .याप्रसंगी भाजपा पदाधिकारी , कार्यकर्ते परिसरातील नागरिक उपस्थित होते .

Read More
error: Don't Try To Copy !!