Headlines

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मुदतवाढ, सुप्रीम कोर्टाने थेट तारीख सांगत दिले आदेश!

नवी दिल्ली : जिल्हा परिषदांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिलाय. याआधी ३० जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. त्यात आता मुदतवाढ देण्यात आलीय. आता १५ फेब्रुवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत. यामुळे लवकरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असून आचारसंहिता लागू होऊ शकते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात दाखल जालेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मदुतवाढ मिळावी अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाची मागणी मान्य करत मुदतवाढ दिली आहे. याआधी ३१ जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. मात्र आता १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद निवडणूक घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे राज्य निवडणूक आयोगाला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीला सुप्रीम कोर्टानं दोन आठवड्यांची मुदतवाढ दिलीय. तर इतर सर्व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसंदर्भात २१ तारखेला पुन्हा सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाकडून १० फेब्रुवारी पर्यंत सर्व निवडणुका पार पाडू असा अर्ज कोर्टात करण्यात आला होता. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून तयारी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पूर्वतयारीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींना निवडणूक वेळेत घेण्यासाठी आदेश दिले आहेत. याबाबत निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही पाठवण्यात आलंय.

Read More

बेटावद खुर्द येथे घरफोडी

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी जामनेरजामनेर : मुलगा दवाखान्याच्या कामासाठी मुंबईला गेल्याने त्याला उपचारासाठी आईने चांदीच्या पाटल्या विकून मिळालेले २० हजार व ५० हजाराचे सोन्याचे दागिने लोखंडी पेटीत ठेवले. मात्र चोरट्यांनी गुरुवारी रात्री घरफोडी करीत ७० हजाराचा मुद्देमाल लांबवल्याची घटना बेटावद खुर्द येथे घडली. राजेंद्र सुपडू पाटील (बेटावद खुर्द, ता. जामनेर) यांचे मोठे भाऊ दवाखान्याच्या कामासाठी मुंबईला गेले होते. २० हजाराची रोकड, २० ग्रॅमची सोन्याची पोत व ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी असा ऐवज त्यांनी लोखंडी पेटीत ठेवला. खोलीला कुलूप लावून शेजारच्या घरात झोपायला गेले असताना ही चोरी झाली.

Read More

प्रविण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

प्रविण दादा गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कार्यवाहीची मागणी!!संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, बामसेफ यांच्यासह परिवर्तन वादी संघटना कडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !!! शिवतीर्थावर प्रवीण गायकवाड यांच्या प्रतिमेस घातला दुग्धाभिषेक!!! ! जळगाव (प्रतिनीधी)जळगाव जिल्हा संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ बामसेफ यांच्यासह परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांकडून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा.प्रविणदादा गायकवाड यांच्या प्रतिमेस शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाजवळ दुग्धाभिषेक करून प्रविणदादा यांच्यावर झालेला भ्याड हल्ल्याच्या आरोपींना अटक करुन या घटनेची सखोल चौकशी करत कठोर कार्यवाही व्हावी या बाबत खालील आशयाचे निवेदन जळगाव जिल्हाधिकारी यांना देण्यात आले रविवार १३ जुलै २०२५ रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा. प्रविणदादा गायकवाड यांच्यावर काही गुंड प्रवृतींच्या लोकांनी शाईफेक करून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करत भ्याड हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून हा हल्ला फक्त प्रविणदादा यांच्यावर नसून हा हल्ला या देशातील तमाम शिवराय – फुले – शाहु – आंबेडकर यांच्या समता , बंधुता व न्यायाच्या तत्वांवर चालणाऱ्या विचारवंतांवर असून यापूर्वी देखील या देशात याच मार्गाने अंधश्रद्धा निर्मूलनाचा मंत्र देणारे मा.नरेंद्र दाभोळकर , कॉ.गोविंद पानसरे , पत्रकार गौरी लंकेश व ज्येष्ठ विचारवंत एम.एम.कलबुर्गी यांच्या हत्त्या घडवून आणण्यात आल्या आहेत. प्रसारमाध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला दीपक काटे नावाचा गुंड व त्याच्या आठ ते दहा इतर गुंड साथीदारांनी मिळून केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु स्थानिक पोलिसांनी या आरोपींना अटक न करता सोडून दिले आहे. तरी महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने या प्रकरणात बारकाईने लक्ष देत या हल्ल्यातील सर्व आरोपी व त्यांच्या मागे असणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी अन्यथा याच पद्धतीने विचारवंतांना संपवण्याचे प्रयत्न सुरु राहिल्यास महात्मा गांधीच्या अहिंसेच्या विचारांवर चालणाऱ्या भारत देशाची प्रतिमा जगात मलीन होऊन हा देश अराजकतेच्या मार्गावर जाण्यास वेळ लागणार नाही. यावेळी संभाजी ब्रिगेड सामाजिक चे प्रदेश संघटक श्याम पाटील , जिल्हाध्यक्ष तुषार सांवत , संभाजी ब्रिगेड राजकीय चे जळगाव पुर्व जिल्हा प्रदिप गायके, जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष विजय पाटिल शहर कार्याध्यक्ष मयूर चौधरी , लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे , बामसेफचे मुकुंद सपकाळे , मराठा सेवा संघाचे सुरेश पाटील , सुरेंद्र पाटील , राम पवार , शोभाराम प्रतिष्ठाचे नरेंद्र पाटील , अनिरुद्ध शिसोदे , शुभम पवार , गणेश पाटील,कल्पेश पाटील, भरत पाटील, अविनाश पाटील ,संदीप मांडोळे, सतीश लाठी, राकेश राजपूत, राकेश जैन, संदीप पाटील,रवींद्र पाटील, धवल पाटील,प्रमोद पाटील,राहुल पाटील,संजय चव्हाण,सुमित्र अहिरे, देवानंद निकम,रवींद्र तायडे,देशमुख साहेब यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते

Read More

तोंडापूरच्या जैन विद्यालयात टिळक, साठे यांना अभिवादन

अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित निबंध स्पर्धेत् लहान गटातून श्रद्धा, तर मोठ्या गटातून दिव्या पाटील प्रथम———————————- तोंडापूर ता जामनेरयेथील शेंदुर्णी शिक्षण संस्था संचलित श्रीमती र सु जैन माध्यमिक विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सतीश देशमुख होते तर व्यासपीठावर मुख्याध्यापक पी डी रोनखेडे के एस माळी एस पी पाटील उपस्थित होतेयावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जामनेर तालुका यांच्या माध्यमातून आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करून प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली या परीक्षेचे समन्वयक व परीक्षक म्हणून आर सी लोडते यांनी काम केलेअंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल275 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलालहान गटप्रथम : श्रद्धा अनिल रायपूरेद्वितीय : लोकेश सुपडू जिरीतृतीय : सृष्टी मनोज चौधरी मोठा गटप्रथम : दिव्या दीपक पाटीलद्वितीय : गणेश संजय काटकरतृतीय : वैशाली धनराज गव्हले, गायत्री गव्हारेदोन्ही गटातून 16 विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आलेयावेळी आर एस पाटील के व्ही देशमुख मुख्याध्यापक पी डी रोनखेडे यांनी मनोगतातून मार्गदर्शन केले याप्रसंगी पार्थ पाटील वैभवी मुके कोमल गव्हाणे आदी विद्यार्थ्यांनी देखील मनोगते व्यक्त केले .श्री देशमुख यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले सूत्रसंचलणं आर सी लोडते यांनी केले तर आभार अमोल साळुंके यांनी मानलेकार्यक्रमावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Read More

कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप, पहूर येथील कार्यक्रम यशस्वी

कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप, पहूर येथील कार्यक्रम यशस्वी पहूर प्रतिनिधी: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने पहूर येथे गृहपयोगी वस्तू वाटपाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला स्थानिक कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे आणि नियोजनबद्ध कामामुळे शेवटच्या व्यक्तीपर्यंत भांडी पोहोचू शकली, ज्यामुळे कामगारांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या दोन-तीन दिवसांत नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने काही प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, स्थानिक कार्यकर्ते, नेते आणि पुढारी यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अहोरात्र मेहनत घेतली. गर्दीचे योग्य नियोजन करून, प्रत्येक पात्र लाभार्थ्याला गृहपयोगी वस्तू मिळाल्याची खात्री केली. ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत भांडी पोहोचवण्यात आली, याचे समाधान लाभार्थ्यांमध्ये स्पष्टपणे दिसत होते.याप्रसंगी खालील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतलीपहूर भारतीय जनता पक्ष कार्यालयांचे प्रमुख राहुल ढेंगाळे, व सरपंचपती शंकर जाधव, उपसरपंच राजू जाधव, चेतन रोकडे,जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख तसेच वासुदेव घोंगडे, रामेश्वर पाटील, समाधान पाटील, राजेंद्र पांडे, शाम सावळे, महेश पाटील, लक्ष्मण गोरे, ईश्वर बारी, सलीम शेख, भारत पाटील, संदीप बेढे, मधुकर बनकर, शिवाजी राऊत, शरद बेलपत्रे, योगेश बनकर, शुभम गोधनखेड़े यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले

Read More

डॉ.ऐश्वर्री राठोड यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मध्ये “सचिव पदी “निवड झाल्याबद्दल जळगाव जिल्हा व तसेच जामनेर तालुक्यामध्ये सर्वत्र अभिनंदन चा वर्षाव.

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी जामनेर – महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतलेले कार्य अहवालाची दखल. जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाली असताना, पक्ष सोबत खंबीरपणे एकनिष्ठतेने उभे राहणे. आणि तसेच पक्षाच्या संघटनांमध्ये मजबुतीने सहभाग घेणे व संघटनाला महत्त्व देणे. प्रत्येक आंदोलन पक्षासाठी विविधरित्या कार्य करण्याची क्षमता .ही भूमिका डॉ. ऐश्वर्री राठोड यांनी नेहमीच आपल्या पक्षासाठी एकनिष्ठतेने दाखवली. आणि त्याचीच ही पोचपावती. वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा बरेच आरोग्य शिबिरे ,सामाजिक उपक्रम ,विविध उत्कृष्टरित्या जळगाव जिल्ह्यामध्ये तसेच जामनेर तालुक्यामध्ये डॉ. ऐश्वर्री राठोड यांनी राबविलेले आहेत. त्याची दखल AICC न्यू दिल्ली अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेजी आणि के.सी वेणूगोपालजी यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री .हर्षवर्धन सपकाळ यांच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र काँग्रेस कमिटी मध्ये सचिव पदी डॉ. ऐश्वर्री राठोड यांची निवड झाली.

Read More

सावळदबारा सरपंचपदी आमदार अब्दुल सत्तार समर्थकांची वर्णी मोहम्मद आरिफ मोहम्मद लुकमान यांची सरपंच पदी निवड ; बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने करण्यात आला जल्लोष

*सावळदबारा सरपंचपदी आमदार अब्दुल सत्तार समर्थकांची वर्णी मोहम्मद आरिफ मोहम्मद लुकमान यांची सरपंच पदी निवड ; बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने करण्यात आला जल्लोषजे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरसोयगाव ( प्रतिनिधी ) जब्बार तडवी तालुक्यातील अत्यंत महत्वाचे समजल्या जाणाऱ्या सावळतबारा गावच्या सरपंच पदी आमदार अब्दुल सत्तार समर्थक मोहम्मद आरिफ मोहम्मद लुकमान यांची निवड झाली आहे. या निवडीनंतर बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने गावात जल्लोष करण्यात आला. मोहम्मद आरिफ मोहम्मद लुकमान यांची सरपंच पदी निवड होताच बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने जल्लोष करण्यात आला. यावेळी सिल्लोड बाजार समितीचे उपसभापती दारासिंग चव्हाण,माजी सरपंच लोकमान शेठ ,बाजार समितीचे माजी सभापती शिवाप्पा चोपडे , माझी सभापती धर्मसिंग चव्हाण माजी सभापती सांडूभाऊ तडवी , माजी सरपंच मैताप तडवी , मा.चेअरमन पंजाबराव देशमुख , माजी सरपंच मोहम्मद फिरोज ,मोहम्मद लुखमान, माजी उपसरपंच वसंता चोरमले निलेश आप्पा चोपडे ,अशोक देशमुख , फिरोज खा शेख गफार, अमजद तडवी ,अनिल पाटील , संजय देशमुख, गजानन चोपडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More

हिवरखेडा वाडी येथे कन्या पुजण्याची परंपरा कायमगोसावी समाज बांधव सरसावले

हिवरखेडा वाडी येथे कन्या पुजण्याची परंपरा कायमगोसावी समाज बांधव सरसावले जे.बी.एन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (एकनाथ कोळी)हीवरखेडा तवा. तालुका जामनेर येथे गोसावी बंधवामार्फत कन्या पूजनाची प्रथा अकरा वर्षापासून सुरू आहे. शुक्रवारी कन्या पूजन करण्यात आले . या निमित्त वैष्णवी देवी भंडाराची प्रथा सुरू ठेवली आहे नऊ अविवाहित मुलींचे पाय पाण्याने व दुधाने धुतले जातात पूजन करून पायाचे पाणी प्रसाद म्हणून पिण्याची प्रथा आहे जन्माला आलेली प्रत्येक मुलगी ही लक्ष्मी आहे. त्यामुळे पूजन करून त्यामुळे पूजन करून कन्याची गावभर मिरवणूक काढल्या जाते. गावातील व बाहेर गाव वरून आलेले भाविक दर्शन घेतात, त्यानंतर महाप्रसाद दिला जातो. त्यासाठी पुजारी अनिल चव्हाण,सुनील चव्हाण, मुकेश चव्हाण,धीरज चव्हाण,राज चव्हाण,रामेश्वर चव्हाण,आशिष चव्हाण इ. असतात.

Read More

कचरा संकलन करणाऱ्या कामगारांच्या मुलां सोबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा अल्पोहार

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजळगाव — ( प्रतिनिधी )कचरा संकलन करणाऱ्या कामगारांच्या मुलांना खास निमंत्रण देऊन आज जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्यासोबत वेळ घालवला व अल्पोपहार केला. या छोट्या मुलांशी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील अडचणी, त्यांची स्वप्ने व आकांक्षा याबाबत संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रार्थना व्यक्त केली की, एक दिवस हीच मुले सर्व अडथळे पार करून जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून समाजाचे नेतृत्व करतील. हा क्षण खऱ्या अर्थाने आशा, समानता आणि गणेशोत्सवाच्या उत्साहाचा उत्सव ठरला – जो आपल्याला आठवण करून देतो की प्रत्येक मुलाला मोठी स्वप्ने पाहण्याचा व त्यांची पूर्तता करण्याचा अधिकार आहे.

Read More

जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजनांनी दिल्या मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा.

जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजनांनी दिल्या मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा. जामनेर –आज रमजान ईद निमित्त जामनेर शहरातील ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवांना नमाज पठणानंतर जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या..याप्रसंगी भाजपा चे पदाधिकारी , उपस्थित होते .

Read More
error: Don't Try To Copy !!