Headlines

नि.पं.पाटील विद्यालयात संस्था वर्धापन दिन साजरा

पळासखेडे मिराचे दि १७ जुलै २०२५(प्रतिनिधी ) नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे मिराचे शाळेत मातृहृदयी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन पवार हे होते. सर्वप्रथम कै.आचार्य बापूसो. गजाननराव गरुड व कै. अण्णासाहेब भास्करराव गरूड यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष , संस्था संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेचा इतिहास व प्रगती विषयी माहिती दिली.त्यानंतर विद्यार्थ्याची वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.विद्यालयाचे पर्यवेक्षक जे.आर.पाटील यांनी कै. आचार्य बापूंना अभिप्रेत असलेला विद्यार्थी याबद्दल मत व्यक्त केले.विद्यालयातील उपशिक्षक एस. जे. सोनवणे यांनी मनोगतात संस्थेची स्थापना व व्याप्ती याबद्दल विद्यार्थ्यांची हितगुज केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन पवार यांनी अध्यक्ष भाषणात कै.आचार्य गजाननराव बापूंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्था संचालक व सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील,चंद्रशेखर काळे,अब्दुल नबी तांबोळी,डी. पी .पाटील, संजू पवार,.शालिक पाटील,अशोक माळी,बळीराम माळी,लता पाटील हे मान्यवर उपस्थित होते.वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक – हर्षाली प्रवीण पाटील द्वितीय क्रमांक – हितेश वर्जन चव्हाण तृतीय क्रमाक – ओम संतोष चौधरी यांनी मिळविला. त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.त्याप्रसंगी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना व गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी 50 शालेय गणवेश वाटप करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाने ,सर्व शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष जी.पी. पाटील यांनी केले तर आभार व्ही. डी. पाटील यांनी मानले.

Read More

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,क्रीडा व युवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणेजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव द्वारा आयोजित तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत वाकोद विद्यालयाचे यश

दि.02/08/2025 वार शनिवार जामनेर येथे ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय आज 14 वर्ष,17 वर्ष,19 वर्ष वयोगटातील मुले व मुली तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या. यात राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयातील14 वर्षे वयोगटात (मुले)52 किलो वजन गटात कु. कार्तिक रणजीत सोनेत17 वर्ष वयोगटात (मुले)48 किलो वजन गटात कु. गोपाल आनंद सोनेत19 वर्ष वयोगटात(मुली) 57 किलो वजन गटात कुमारी गायत्री रणजीत सोनेत विजय होऊन जिल्हास्तरावर निवड झाली या निवडीबद्दल संस्थेचे चेअरमन आदरणीय दादासाहेब श्री. संजयरावजी गरुड संस्थेचे व्हा. चेअरमन आबासाहेब श्री.भीमराव शेळके संस्थेचे सचिव काकासाहेब श्री.सागरमलजी जैन संस्थेचे सहसचिव दादासो श्री.यु.यु.पाटील संस्थेचे कार्यालयीन सचिव भाऊसाहेब श्री.दीपकरावजी गरुड ,वस्तीगृह सचिव सूर्यवंशी भाऊसाहेब संस्थेचे सर्व संचालक मंडळ जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष आदरणीय श्री. अशोक भाऊ जैन जैन फॉर्म वाकोद व्यवस्थापक आदरणीय श्री. विनोद सिंहजी राजपूत गावचे सरपंच, पोलीस पाटील, पंचक्रोशीतील गावकरी,खेळाडूंचे पालक शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस.टी.चिंचोले पर्यवेक्षक श्री एन.टी.पाटील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वस्तीगृहाचे कर्मचारी, यांनी खेळाडूचे कौतुक केले.

Read More

जामनेर प्रभारी गट शिक्षण अधिकारी श्री विष्णू काळे यांची तात्काळ बदली करा – मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांची शिक्षणाधिकारी यांच्याकडे मागणी

आज 30 जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने जळगाव जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे उप शिक्षणाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जामनेर येथून रावेर येथे बदली झालेले श्री विष्णू वामन काळे यांच्याकडून जामनेर प्रभारी गट शिक्षणाधिकारी व शालेय पोषण आहार अधीक्षक पदाचा पदभार काढून घेणे बाबत निवेदन देण्यात आले.जामनेर येथे कार्यरत असलेले प्रभारी गट शिक्षणाधिकारी तथा शालेय पोषण आहार अधीक्षक श्री विष्णू वामन काळे यांची 13 मे 2025 रोजी जामनेर येथून रावेर येथे पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून बदली करण्यात आली होती मात्र अद्यापही श्री विष्णू काळे यांनी आपला पदभार जामनेर येथून सोडलेला नाही. रावेर येथील पूर्ण वेळ पदाचा कारभार न पाहता जामनेर येथील अतिरिक्त पदभार स्वीकारण्यात इतके स्वारस्य का? असा प्रश्न जामनेर तालुक्यात शिक्षण विभागात चर्चेचा विषय बनला आहे कारण गेल्या 10 ते 12 वर्ष जामनेर तालुक्यात ठाण मांडून बसलेले श्री विष्णू काळे यांच्यावर कुणाचे वरद हस्त आहे. असा सवाल निर्माण होत आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी श्री विष्णू काळे यांची जामनेर गट शिक्षणाधिकारी म्हणून अतिरिक्त पदभार स्वीकारला आहे. मात्र जामनेर तालुक्यात नावीन्य पूर्ण व पात्रता असलेले तीन – तीन कार्यक्षम शिक्षण विस्तार अधिकारी असताना रावेर येथे नुकतीच बदली झालेल्या अधिकाऱ्यांना अतिरिक्त पदभार कोणत्या अनुषंगाने देण्यात आला याबद्दल जामनेर तालुका अनभिज्ञ आहे. तालुक्यातील तिन्ही कार्यक्षम शिक्षण विस्तार अधिकारी हा पदभार स्वीकारण्यास पात्र असताना व संबंधित शिक्षण खात्याचा कारभार पाहण्यासाठी सक्षम शिक्षण विस्तार अधिकारी असताना इतर तालुक्यात बदली करण्यात आलेल्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर ही कृपादृष्टी तालुक्यात चर्चेचा विषय बनलेला आहे. तरी जामनेर येथील विद्यमान प्रभारी गट शिक्षणाधिकारी श्री . विष्णू वामन काळे यांची जामनेर येथून तात्काळ उचल बांगळी करून त्यांना रावेर येथील पदभार देण्यात यावा व जामनेर येथील शिक्षण विस्तार अधिकारी यापैकी एका सक्षम व कार्यक्षम शिक्षण विस्तार अधिकारी यांची अतिरिक्त गट शिक्षण अधिकारी म्हणून नेमणूक करून त्यांचे मनोबल वाढवण्यात यावे . असं न घडल्यास बदली या संकल्पनेवर कर्मचारी व अधिकारी यांचा विश्वास राहणार नाही तो विश्वास उडेल म्हणून आपण ही जिल्हाधिकारी साहेब यांच्या “क” व “ड” श्रेणीतील कर्मचारी बदली प्रक्रियेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कोणताही वशिला व आकस मनात न ठेवता, बदली प्रक्रियेत पारदर्शकता निर्माण होणे आवश्यक आहे.अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जामनेर तालुका मनसे स्टाईल ने कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी दिला आहे. यावेळी मनविसे तालुकाध्यक्ष किशोर पाटील , तालुका उपाध्यक्ष संदीप मराठे , तालुका उपाध्यक्ष आशुतोष पाटील , वाल्मीक कोळी , जगदीश कुरकुरे , रतन देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत बस पास योजना” अंतर्गत शालेय विद्यार्थिनींना बस पास वाटप – जामनेर आगार आपल्या दारी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जामनेर, ता. २६ जून – महाराष्ट्र शासनाच्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत बस पास वाटप योजने” अंतर्गत आज मोराड, बिलवाडी आणि मेणगाव या गावांमध्ये “जामनेर आगार आपल्या दारी” या अभिनव संकल्पनेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थिनींसाठी बस पासचे वाटप करण्यात आले. स्नेहदीप गरुड फाउंडेशन आणि जामनेर बस आगार यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित या उपक्रमात गावोगावी विद्यार्थिनींसाठी मोफत बस पास वितरणाची व्यवस्था करण्यात आली. या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी आवश्यक असणारी सुरक्षित व सुलभ प्रवास सेवा मिळणार आहे. कार्यक्रमास युवानेते स्नेहदीपभाऊ संजय राव गरुड यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्यासोबत गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक, पोलीस पाटील, तसेच गरुड महाविद्यालयाचे मुख्याध्यापक र.एस. चौधरी सर व सहकारी शिक्षक, गावातील प्रतिष्ठित पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जामनेर बस आगार तसेच शेंदुर्णी बस स्थानकाचे प्रतिनिधी श्री. भारुडे व मनोज पाटील यांनी विद्यार्थिनींना योजना आणि प्रवास व्यवस्थेबाबत माहिती दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना शिक्षणात अधिक संधी प्राप्त होणार असून, शासनाच्या या उपक्रमाचा ग्रामीण भागात सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

Read More

तोंडापूरच्या जैन विद्यालयात टिळक, साठे यांना अभिवादन

अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित निबंध स्पर्धेत् लहान गटातून श्रद्धा, तर मोठ्या गटातून दिव्या पाटील प्रथम———————————- तोंडापूर ता जामनेरयेथील शेंदुर्णी शिक्षण संस्था संचलित श्रीमती र सु जैन माध्यमिक विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सतीश देशमुख होते तर व्यासपीठावर मुख्याध्यापक पी डी रोनखेडे के एस माळी एस पी पाटील उपस्थित होतेयावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जामनेर तालुका यांच्या माध्यमातून आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करून प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली या परीक्षेचे समन्वयक व परीक्षक म्हणून आर सी लोडते यांनी काम केलेअंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल275 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलालहान गटप्रथम : श्रद्धा अनिल रायपूरेद्वितीय : लोकेश सुपडू जिरीतृतीय : सृष्टी मनोज चौधरी मोठा गटप्रथम : दिव्या दीपक पाटीलद्वितीय : गणेश संजय काटकरतृतीय : वैशाली धनराज गव्हले, गायत्री गव्हारेदोन्ही गटातून 16 विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आलेयावेळी आर एस पाटील के व्ही देशमुख मुख्याध्यापक पी डी रोनखेडे यांनी मनोगतातून मार्गदर्शन केले याप्रसंगी पार्थ पाटील वैभवी मुके कोमल गव्हाणे आदी विद्यार्थ्यांनी देखील मनोगते व्यक्त केले .श्री देशमुख यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले सूत्रसंचलणं आर सी लोडते यांनी केले तर आभार अमोल साळुंके यांनी मानलेकार्यक्रमावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Read More

महसूल सप्ताह २०२५ अंतर्गत “हरित शिवरस्ता” उपक्रम — सोनारी – मालदाभाडी रस्त्यावर दुतर्फा वृक्षारोपण!

जामनेर तालुका महसूल विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या महसूल सप्ताह २०२५ अंतर्गत सोनारी – मालदाभाडी शिवरस्त्यावर दुतर्फा वृक्ष लागवड मोहीम मोठ्या उत्साहात पार पडली. या उपक्रमामागील उद्देश शिवरस्त्याच्या अधिकृत हद्दीत कोणतेही अतिक्रमण होऊ नये आणि पर्यावरणपूरक व हरित ग्रामविकासास चालना देणे हा होता. यासाठी मोजणी विभागाने निश्चित केलेल्या सीमारेषेनुसार रस्ता हद्द निश्चित करून, त्या दोन्ही बाजूंनी वृक्षारोपण करण्यात आले. या प्रेरणादायी उपक्रमात मंडळ अधिकारी मालदाभाडी, ग्राम महसूल अधिकारी मालदाभाडी, सोनारी व वाघारी, सोनारी व मालदाभाडी येथील सरपंच, पोलीस पाटील, तसेच ग्रामस्थांचे उत्स्फूर्त सहकार्य लाभले. कार्यक्रमात शेकडो वृक्षांची लागवड करण्यात आली. “झाडे लावा, झाडे जगवा”, “शिवरस्त्याला हरित कवच” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या उपक्रमाच्या माध्यमातून महसूल विभागाने एक नवा पायंडा पाडत, शासनाच्या महसूल रस्त्यांच्या जतनासोबतच हरित विकासाचा नवा मार्ग निर्माण केला आहे. स्थानिक ग्रामपंचायतीमार्फत वृक्षांची देखभाल व संरक्षणाची जबाबदारीही स्वीकारण्यात आली आहे. ⸻ “हरित शिवरस्ता – सुरक्षित व सुंदर ग्रामविकासाचा पाया!”

Read More

जामनेर तालुक्यातील २० नागरिकांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी,४ हजारांहून अधिक नागरिकांना मिळाला लाभ

जळगाव : राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या ‘गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षा’च्या माध्यमातून जामनेर तालुक्यात आरोग्य सेवेचा मोठा यज्ञ सुरू आहे. नुकतेच या अभियानांतर्गत २० रुग्णांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या. विशेष म्हणजे, या उपक्रमाद्वारे आतापर्यंत ४ हजार पेक्षा अधिक नागरिकांच्या डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टीदान देण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभागया मोहिमेत तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने आपली सेवा बजावली. यामध्ये प्रामुख्याने डॉ. प्रवीण पाटील, डॉ. मयूरी राठोड, डॉ. प्रियंका पाटील, डॉ. सोबीया अन्सारी, डॉ. विलास बाविस्कर यांनी रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या. टीम वर्क आणि समन्वयशस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले. यामध्ये इनचार्ज सिस्टर सुनीता वक्ते, अधिपरिचारक सागर कोळी आणि हिरा पालवी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या संपूर्ण अभियानाचे नियोजन आणि अंमलबजावणी ‘गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षा’चे समन्वयक तथा आरोग्यदूत पै. शिवाजी रामदास पाटील आणि समाजसेविका रुचिता चौधरी यांनी केली. खाजगी रुग्णालयातील शस्त्रक्रियेचा खर्च परवडत नसलेल्या ग्रामीण भागातील गरजू नागरिकांसाठी हे अभियान वरदान ठरत आहे. ‘प्रत्येकाला उत्तम आरोग्य आणि दृष्टी मिळावी’ या ध्येयाने प्रेरित होऊन हे कार्य अविरत सुरू असून, लाभार्थ्यांनी मंत्री गिरीश महाजन आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार मानले आहेत.

Read More

जामनेर – पाण्याचे काम हे पुण्यार्जनाचे काम आहे – शांतीलाल मुथा

जामनेर(वा.)- जैन समाज हा दुष्काळामुळे राजस्थानातून बाहेर पडला.पूर्वी नुसती पाणपोई बांधली तरी समाधान होते, आता तलाव बांधायची वेळ आली आहे.तलावातील गाळ काढल्यामुळे पाण्याची क्षमता वाढेल.पुर्ण गाव पाणीमय होईल. काढलेला गाळ शेतात टाकल्यामुळे बंजर जमीन सुपीक बनेल. प्यायला पूर्ण गावाला,जनावरांना पाणी मिळेल. शेतात गाळ आल्यामुळे वर्षातून तिनदा पिके घेतील. ग्रामीण अर्थव्यवस्था बदलेल.असे मत भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांनी व्यक्त केले. ते पुणे येथील वर्धमान प्रतिष्ठान सभागृहात संघटनेच्या महाराष्ट्रातील पदाधिकारी,कार्यकर्ते, जिल्हा समन्वयक यांच्या आयोजित बैठकीत बोलत होते. नवकार महामंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली.राज्य अध्यक्ष केतन शाह यांनी उपस्थितांचे स्वागत केले.राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर सांखला यांनी प्रास्तविक केले.मुथा म्हणाले, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार आणि नाला खोलिकरण व रुंदीकरण ही सरकारच्या मृदु व जलसंधारण विभागाची योजना आहे. ही योजना गावागावात,शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच जास्तीत जास्त गावाकडून मागणी अर्ज येण्यासाठी संघटना लोकचळवळ निर्माण करेल. तसा करार शासनाशी झाला असुन या साठी सुहाना स्पाईसेस यांचे सहकार्य लाभत आहे.कार्यकर्त्यांचे सर्व शंकांचे निरासन मुथा यांनी केले.उपस्थितांना संघटनेने तयार केलेल्या ॲपमध्ये गावाची तलावातील गाळ काढण्यासाठी मागणी अर्ज भरुन काढण्याचे प्रात्यक्षिक संघटनेचे मेनेजिंग डायरेक्टर कोमल जैन यांनी दाखविले.लवकरच महाराष्ट्रातील संघटनेचे कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शासनाच्या या योजनेला सहकार्य करतील.सुहाना स्पाईसेस चे विशाल चोरडिया म्हणाले, भारतीय जैन संघटने बरोबर आम्हाला या कार्यात सहभागी होता येत आहे, याचा आनंद वाटतो. राष्ट्रीय सचिव दीपक चोपडा, राज्य सचिव प्रविण पारख यांनी मनोगत व्यक्त केले.या बैठकीला खानदेशातून विभाग अध्यक्ष प्रा.चंद्रकांत डागा(शिंदखेडा), विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत(जामनेर)जळगाव जिल्हा अध्यक्ष निर्मल बोरा, सचिव दर्शन देशलहरा(चोपडा),राजेश जैन(पाचोरा),मनोज कोचर (शहादा), गौरव छाजेड, जय मुथा (बोदवड), महावीर डागा, शुभम डागा (अक्कलकुवा),देवेंद्र शाह, उज्ज्वल डेरेकर (रावेर)) पंकज जैन (जळगाव), चेतन जैन (भुसावळ), संदिप जैन, शीतल जैन, चेतन जैन (शेंदुर्णी), रोशन गोलेछा(चाळीसगाव) उपस्थितीत होते. आभर केतन शाह यांनी मानले.

Read More

वाकडी गरुड विद्यालयात शिव जयंती सोहळा उत्साहात संपन्न

शेंदूर्णी (दि. १९ फेब्रुवारी २०२६) – शेंदूर्णी येथील धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटी लि., शेंदूर्णी संचलित अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपशिक्षक श्री व्ही. बी. पाटील सर होते. प्रारंभी अध्यक्ष तसेच श्री दीपकभाऊ परदेशी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. अध्यक्षांचे स्वागत विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री ए. डी. राजपूत सर यांनी केले.जयंतीनिमित्त विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि दूरदर्शी राज्यकारभाराविषयी प्रभावी मनोगते व्यक्त केली. तसेच विद्यार्थिनींनी गीतगायनातून महाराजांना मानाचा मुजरा अर्पण केला.उपशिक्षक श्री आर. एस. चौधरी सर यांनी आपल्या भाषणातून शिवरायांची थोरवी वर्णन केली व कवितेद्वारे मानवंदना दिली. अध्यक्षीय भाषणात श्री व्ही. बी. पाटील सर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडत त्यांच्या आदर्श राज्यपद्धती, सर्वधर्मसमभाव व लोककल्याणकारी धोरणांचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ए. एस. पाटील मॅडम यांनी केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री एस. एम. भुरट सर व श्रीमती व्ही. एस. पाटील यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री जे. एम. नाईक सर यांनी केले.याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More

लुबाडलेले 1600 रुपये काही मिनिटांतच सैनिकाच्या खात्यात परत

पाचोरा – निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारिता हे लोकशाहीचे चौथे स्तंभ म्हणून ओळखले जाते, याचे जिवंत उदाहरण नुकतेच पाचोरा येथे पाहायला मिळाले पत्रकार संदीप महाजन यांनी अनधिकृत रेल्वे तिकीट एजंटकडून भारतीय सैनिकाची करण्यात आलेली आर्थिक लुबाडणूक उघडकीस आणताच संबंधित भामट्याने युद्धजन्य परिस्थिती काळात अफरातफरीत केलेली फसवणूक लपवण्यासाठी केवळ काही मिनिटांतच सैनिकाच्या खात्यात 1600 रुपये परत वर्ग केले.ही घटना आहे पिंपरी सार्वे येथील रहिवासी आणि सध्या CISF मध्ये कार्यरत असलेल्या जवान प्रदीप बाविस्कर यांच्या बाबतीत. देशात युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्यामुळे जवानांना तातडीने त्यांच्या सेवास्थळी परत हजर राहण्याचे आदेश मिळाले होते. या घाईत त्यांनी रेल्वे तिकीट काढण्यासाठी पाचोरा येथील तिकीट एजंटची मदत घेतली. मात्र त्या एजंटने एका सामान्य तिकिटासाठी वाजवी रक्कमेपेक्षा तब्बल 1600 रुपये जास्त रक्कम आकारून लुबाडणूक केली.या प्रकाराची माहिती पत्रकार संदीप महाजन यांना मिळताच त्यांनी या विषयावर सखोल चौकशी केली आणि समाजमाध्यमांद्वारे, तसेच ‘ध्येय न्यूज’च्या माध्यमातून ही धक्कादायक बातमी सर्वांसमोर आणली. पत्रकारितेतील जबाबदारी आणि लोकहितासाठी त्यांनी दाखवलेली तत्परता पाहून ही बातमी काही वेळातच व्हायरल झाली. बातमीचा समाजावर, प्रशासनावर आणि संबंधित एजंटवर इतका परिणाम झाला की, संबंधित एजंटने काही मिनिटांत जवानाच्या खात्यावर 1600 रुपयांची रक्कम परत पाठवली.ही घटना ही केवळ पत्रकाराच्या सचोटीची विजयगाथा नाही, तर हे एक जिवंत उदाहरण आहे की सत्याचे धारदार लेखणीसमोर अन्याय करणाऱ्यांची लाचारी उघड होते. पत्रकार महाजन यांनी या प्रकरणात कोणत्याही आमिषाला बळी न पडता, केवळ सैनिकाचा हक्क परत मिळावा या हेतूने ही बातमी उघडकीस आणली.या प्रकरणानंतर शहरातील जनमानसात पत्रकार महाजन यांच्या कार्याची भरभरून स्तुती होत असून अनेकांनी सोशल मीडियावर “हीच खरी पत्रकारिता” असे म्हटले आहे. शिवाय, यामुळे भविष्यात या आणि अशाप्रकारे लूट करणाऱ्या अनधिकृत रेल्वे एजंटांचा धसका बसेल व सामान्य नागरिकांची लुबाडणूक टळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.प्रशासनाने सुद्धा या भामट्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. पत्रकारिता म्हणजे केवळ माहिती पोहोचवणे नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्याचे हत्यार आहे, याचे हे अत्यंत प्रभावी उदाहरण आहे.

Read More

तलावातील गाळ काढण्यासाठी BJS कार्यकर्त्यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

जामनेर, ५ मार्च (जे. बी. एन. महाराष्ट्र न्यूज): जळगाव जिल्ह्यातील तलावांचे पुनरुज्जीवन आणि जलस्रोत संवर्धनाच्या उद्देशाने भारतीय जैन संघटना (BJS) आणि जिल्हा प्रशासन यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत तलावातील गाळ काढण्यासह गाळयुक्त शिवार, गाळमुक्त बंधारे, नाला खोलीकरण यासारख्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीला जळगावचे जिल्हाधिकारी मा. आयुष प्रसाद, उपजिल्हाधिकारी श्रीमती अर्चना मोरे, जलसंधारण विभागाचे अधिकारी आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. तसेच BJS संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री विनय पारख, जलप्रकल्प जिल्हा प्रमुख सुमीत मुणोत, जळगाव तालुका प्रमुख पंकज जैन, रावेर तालुका प्रमुख देवेंद्र शाह व उज्वल देरेकर, भुसावळ तालुका प्रमुख चेतन जैन, धरणगाव तालुका प्रमुख नीलेश ओस्तवाल, BJS जळगाव अध्यक्ष अजय राखेचा आणि जिल्हा समन्वयक गणेश कोळी यांनीही सहभाग घेतला. BJS कार्यकर्त्यांनी या बैठकीत शेतकऱ्यांना तलावातील गाळ शेतात नेण्यासाठी जनजागृती करण्याचा संकल्प केला. या मोहिमेच्या प्रचारासाठी १५ तालुक्यांतील BJS पदाधिकारी आणि कार्यकर्ते गावागावात जाऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार असल्याचे विनय पारख यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी (BDO) आणि सरपंच यांच्यासोबत लवकरच बैठक घेण्याचे निर्देश दिले. तसेच या बैठकीत BJS कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्याचे आश्वासन दिले. ही मोहीम यशस्वी झाल्यास जिल्ह्यातील तलाव व जलस्रोतांचे पुनरुज्जीवन होईल आणि शेतकऱ्यांना सुपीक गाळ उपलब्ध होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Read More
error: Don't Try To Copy !!