Headlines

डॉ.ऐश्वर्री राठोड यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मध्ये “सचिव पदी “निवड झाल्याबद्दल जळगाव जिल्हा व तसेच जामनेर तालुक्यामध्ये सर्वत्र अभिनंदन चा वर्षाव.

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी जामनेर – महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतलेले कार्य अहवालाची दखल. जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाली असताना, पक्ष सोबत खंबीरपणे एकनिष्ठतेने उभे राहणे. आणि तसेच पक्षाच्या संघटनांमध्ये मजबुतीने सहभाग घेणे व संघटनाला महत्त्व देणे. प्रत्येक आंदोलन पक्षासाठी विविधरित्या कार्य करण्याची क्षमता .ही भूमिका डॉ. ऐश्वर्री राठोड यांनी नेहमीच आपल्या पक्षासाठी एकनिष्ठतेने दाखवली. आणि त्याचीच ही पोचपावती. वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा बरेच आरोग्य शिबिरे ,सामाजिक उपक्रम ,विविध उत्कृष्टरित्या जळगाव जिल्ह्यामध्ये तसेच जामनेर तालुक्यामध्ये डॉ. ऐश्वर्री राठोड यांनी राबविलेले आहेत. त्याची दखल AICC न्यू दिल्ली अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेजी आणि के.सी वेणूगोपालजी यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री .हर्षवर्धन सपकाळ यांच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र काँग्रेस कमिटी मध्ये सचिव पदी डॉ. ऐश्वर्री राठोड यांची निवड झाली.

Read More

” ज्ञान गौरव, तप गौरव एवं समाज गौरव “

भारतीय जैन संघठणा जामनेर शाखा तर्फे ” ज्ञान गौरव, तप गौरव एवं समाज गौरव ” हा कार्यक्रम गुणवंत विद्यार्थीजे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजैसे 10 वी,12 वी मध्ये85 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थीतसेच उच्च शिक्षण पूर्ण केलेल्या डॉक्टर,वकील,सीए, आर्किटेक्ट, एमबीए,इंजीनियर,एम फार्म, पीएचडी इ.सर्व विद्यार्थीकला व क्रीड़ा क्षेत्रामध्ये में विशेष कामगिरी करणाऱ्या सर्व सदस्य आणि8 उपवास किंवा त्यापेक्षा जास्त तपस्याकरणारे तपस्वी तसेचवर्षीतप तपस्वी56 विद्यार्थी आणि तपस्विंचा आणिसमाजसाठी गौरवनिय कार्य करणाऱ्यासमाजातील 5 सदस्यांचासादर सत्कार आणि सन्मानकरण्यात आला समाजामध्ये विशेष कार्य करणे हेतूसमाज गौरव पुरस्कार दिले गेले.सर्वांचा शाल,माळा,सन्मानपत्र आणि जैन धर्माचे प्रतिकचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष बीजेस राज्य उपाध्यक्षश्री विनयजी पारख यांनी सभेलाभविष्यात होणाऱ्या बीजेस च्य कार्यक्रमांची अनमोल माहिती देऊन मार्गदर्शन केले|महिला जिल्हा अध्यक्षसौ सोनल कोठारी यांनी बीजेस बद्दल माहिती दीलीlकार्यक्रम के प्रायोजक डॉ कांतिलालजी कल्पेशजी परेशजी ओस्तवाल परिवार यांच्यातर्फे केलेले होते lकार्यक्रमाचे सूत्र संचालनसौ मनिषा कोठारी आणि आभार प्रदर्शनसौ वंदना चोरडिया यांनी केलेकार्यक्रमामध्ये बीजेस खान्देश उपाध्यक्ष सुमित मुनोत,खानदेश कार्यकारिणी सदस्य सचिन चोपडा,जिल्हा उपाध्यक्ष विकास कोठारी,शहर अध्यक्ष कुशल बोहरा,शहर उपाध्यक्ष दर्शन भुरटशहर सचिव संकल्प लोढासदस्य विकास ललवाणी,डॉ नरेंद्र रांका,डॉ दीपक कोठारी,वैभव छाजेड, आदि सदस्य एवममहिला विंग जिल्हा अध्यक्ष सौ सोनल कोठारी,जिल्हा महासचिव सौ संगीता मंडलेचा,महिला शहर अध्यक्ष सौ मोना चोरडिया,सचिव सौ रुपाली बोहरा, उपाध्यक्ष सौ शीतल चोरडिया,सदस्य मनिषा कोठारी,वंदना चोरडिया इ. सदस्य उपस्थित होते|कार्यक्रमाचे प्रोजेक्ट हेडदर्शन भुरट,दर्शन बागमार,सौ सोनाली सिसोदिया आणिसौ स्नेहल मुनोत हे होतेl

Read More

वाकडी येथे मॅरेथॉन स्पर्धा संपन्न इगतपुरीचा ऋषिकेश वावरे प्रथम

वाकडी.ता.जामनेर.दि.२६/०७/०२५ आज वाकडी गावांमध्ये प्रथमच मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, वाकडी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रविण गायकवाड व ग्रामस्थांच्या सहभागातून घेण्यात आले, यावेळी स्पर्धांचे उद्घाटन फत्तेपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले,यावेळी अंकुश जाधव यांनी हिरवी दिंडी दाखवून स्पर्धाला सुरुवात करण्यात आली, उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर यामध्ये अनिसचे जिल्हा सचिव प्रल्हाद बोराडे,लक्ष अकॅडमीचे संचालक जळगाव पोलीस निलेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे, रमेश गायकवाड, पोलीस पाटील घनश्याम पाटील, शिक्षक प्रेमी विनोद तेली,अहजर तांबोळी,विजय राजपूत, राजेंद्र भोई, अतुल पाटील, शब्बीर तडवी, अनिल जाधव,रवी परदेशी,कुणाल बारबुदे, निलेश वाणी, देशदूत प्रतिनिधी ज्ञानेश्वर वंजारी,व रनर गृपचे सदस्य प्रथमच होत असलेल्या स्पर्धांसाठी तालुक्यातील व जिल्हा भरातून इगतपुरी नाशिक बुलढाणा, येथून आलेले स्पर्धक यामध्ये मुला व मुलीसह एकुण ७० ते ८० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला असता, स्पर्धेचे ठिकाण तळेगाव रोड पाच किलोमीटर पर्यंत ठेवण्यात आले होते,सर्व आलेल्या स्पर्धकांनी आपले प्राविण्य दाखवत जिंकण्यासाठी प्रयत्न केले, यापैकी मुलांमधून पाच व मुली मधून पाच स्पर्धक यशस्वी झाले, यावेळी यशस्वी झालेल्या स्पर्धकांना रोख बक्षीस व ट्राॅफी पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या हस्ते देण्यात आली, यावेळी अंकुश जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या स्पर्धेमुळे मुलांना चैतन्य निर्माण होऊन स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय छान असा उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे कौतुक करुन पुढील काळात मुख्यमंत्री यांनी घोषित केलेल्या पोलीस भरतीसाठी स्पर्धकांना नक्कीच फायदाचे ठरेल असे त्यांनी व्यक्त केले, स्पर्धक मुलांसाठी बक्षीस देणारे प्रथम आलेले इगतपुरीचा ऋषिकेश वावरे आला ३००० हजार व द्वितीय आलेला तेजश सपकाळे,याला २००० हजार देण्यात आले, तसेच तळवेल बक्षीस सामाजिक कार्यकर्ते प्रविण गायकवाड यांच्या कडून तृतीय आलेला शुभम ओलांडे, देण्यात आले,चतुर्थ आलेला आदित्य येवले यांना देण्यात आले, जळगाव राजेंद्र भोई व ट्राॅफी देणारे बजरंग दल वाकडी स्पर्धक मुलींसाठी प्रथम बक्षीस जानवी रोजोदे जळगाव हिला अनिल जाधव पहूर यांच्या हस्ते पंधराशे रोक देण्यात आले, यावेळी स्पर्धकांच्या आरोग्याची काळजी घेत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धकांच्या पाठोपाठ राहून अम्बुलन्स सेवा जावेद तडवी, रुपाली जोनवाळ,व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले, दूर आलेल्या स्पर्धकांना भोजनाची व्यवस्था प्रविण गायकवाड व राजेंद्र भोई यांनी केली, यावेळी रनर गृपच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

Read More

नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे (मि)शाळेत वृक्षारोपण

आज दि २५ जुलै २०२५ रोजी पळासखेडा( मिराचे) तालुका जामनेर येथील नि पं. पाटील विद्यालयात वृक्षारोपण संपन्न झाले.श्रावण मासारंभ चे औचित्य साधून आज विद्यालयात धी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन बापूसाहेब श्री. भीमराव पाटील यांच्या हस्ते व त्याचबरोबर विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक श्री. डी .पी .पाटील सर व गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री पवार बाबा यांचे हस्ते ५० मोठ्या रोपांची लागवड करण्यात आली. मे महिन्याच्या वादळात विद्यालयातील उन्मळून पडलेल्या वृक्षांच्या जागेवर पुन्हा जेसीबीने मोठे खड्डे तयार करून तिथे रोपांची लागवड करण्यात आली.रोपांची लागवड केल्यावर त्या खड्ड्यांमध्ये शेणखत मिश्रित काळी माती टाकण्यात आली.विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी प्रत्येकी एक व त्यापेक्षा जास्त रोपांसाठी आर्थिक योगदान दिले.त्याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांच्या संकल्पनेतून एक शिक्षक, शिक्षिका व चार विद्यार्थी त्या रोपांचे जतन व संवर्धन करतील त्या अनुषंगाने प्रत्येक टीमला एक रोप दत्तक घेण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. व्ही.आर.पाटील सर, विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.जे.आर. पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने व सर्व शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने सदर वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

Read More

माजी सभापतींच्या पतीची आत्महत्या; चिठ्ठ्या सापडल्याने गूढ वाढले

जामनेर, ता.२२ (प्रतिनिधी) जामनेर शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. सोनबर्डी परिसरातील एका निर्जनस्थळी माजी सभापती सुनंदाबाई पाटील यांचे पती प्रल्हाद पाटील (वय ६२, रा. मोयखेडा, ता. जामनेर) यांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली असून, मयत प्रल्हाद पाटील यांच्या खिशात काही चिठ्ठ्या सापडल्याची प्राथमिक माहिती मिळत असल्याने आत्महत्येमागील गूढ वाढले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मोयखेडा येथील रहिवासी असलेले प्रल्हाद पाटील यांनी आज संध्याकाळी सोनबर्डी परिसराच्या मागील बाजूस असलेल्या एका निर्जनस्थळी झाडाला गळफास लावून आपले जीवन संपवले. प्रल्हाद पाटील हे व्यवसायाने शिक्षक होते आणि त्यांनी २०२१ साली स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्याच सुमारास त्यांच्या पत्नी सुनंदाबाई पाटील जामनेर पंचायत समितीच्या सभापती म्हणून कार्यरत होत्या.घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्रल्हाद पाटील यांनी आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठ्यांमुळे आत्महत्येमागे काही कारण असावे असा पोलिसांना संशय आहे. जामनेर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.प्रल्हाद पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून आणि तीन नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येने मोयखेडा आणि जामनेर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Read More

तालुका क्रीडा नियोजन बैठक ठरली फलदायी; प्रा. समीर घोडेस्वार, ऋग्वेद पेडगांवकर व कार्तिकी लामखेडे यांचा सन्मान

जामनेर, ता.१६ जुलै:महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आणि पंचायत समिती, जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या नियोजनासाठी सहविचार सभा दिनांक १६ जुलै रोजी दुपारी ११ वा. पंचायत समिती, जामनेर येथे उत्साहात संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी क्रीडा अधिकारी सचिन निकम, विशाल बोडके, गटशिक्षणाधिकारी विष्णू काळे, विस्तार अधिकारी संजय पाटील, स्पर्धा समिती सचिव जी.सी. पाटील, मुख्याध्यापक शेख जलाल, गटसाधन केंद्र समन्वयक पंकज रानोटकर यांसह तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी डॉ. आसिफ खान यांनी चालू शैक्षणिक वर्षातील विविध क्रीडा योजना, क्रीडा शिक्षकांच्या योगदानाचे सन्मान, ‘लाईफटाईम अचीवमेंट’ पुरस्कार, व विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या शाळांचा गौरव अशा महत्त्वाच्या बाबींवर सविस्तर माहिती दिली. याशिवाय तालुक्यातील १० प्रमुख खेळांची नियोजनपूर्वक आखणी व शालेय पत्रिकेविषयी चर्चा झाली. जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी ‘माझी शाळा – सुंदर पटांगण’ ही अभिनव संकल्पना मांडून, शाळांमध्ये खेळांच्या अद्ययावत सुविधा व उत्स्फूर्त सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी उपस्थित शिक्षकांच्या शंकांचे निरसनही त्यांनी केले. या प्रसंगी विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा गौरव करण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक श्रीपाद पेडगावकर यांचे चिरंजीव ऋग्वेद यांनी इ.८ वी स्कॉलरशिप परीक्षेत तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल तर वाकी बुद्रुक येथील सरपंच व क्रीडा शिक्षक ललित लामखडे यांच्या कन्या कार्तिकी हिने इ.१० वी बोर्ड परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल सत्कार करण्यात आले. तसेच इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. समीर घोडेस्वार यांना जिल्हास्तरीय सुलभक म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सभेचे सूत्रसंचालन डॉ. आसिफ खान यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा.समीर घोडेस्वार यांनी केले.या बैठकीस तालुक्यातील ७२ क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेच्या यशस्वीतेसाठी डी के चौधरी, नरेंद्र पाटील, व्ही एन पाटील, आनंद मोरे, पी डी पाटील, शाहिद शेख जहीर खान, देवा पाटील आदी.परिश्रम घेतले.

Read More

विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि शालेय गणवेश वाटप करून तोंडापूर विद्यालयात संस्था वर्धापन दिन उत्साहात संपन्न….

तोंडापूर येथील श्रीमती र. सु.जैन माध्यमिक विद्यालयात शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा 81 वा वर्धापन दिन, एस.एस.सी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून व वस्तीगृहातील सर्व विद्यार्थी तसेच इतर गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प.नामदेव पल्हाळ हे होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीस ईशस्तवन व स्वागत गीत सादर करून प्रतिमांचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.डी.रोनखेडे यांनी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा इतिहास व शाळेने वर्षभरात केलेली उज्वल कामगिरी आपल्या प्रास्ताविकातून सादर केली. तद्नंतर वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांची मनोगते सादर करण्यात आली. त्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. एस.एस.सी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, भेटवस्तू व बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून संस्थेबद्दल ऋण व्यक्त केले. क्रीडा स्पर्धेतील खेळाडू व सीड्स बॉल तयार करण्याच्या स्पर्धेतील विजेत्यांचा गुणगौरव यावेळी करण्यात आला.याप्रसंगी जामनेर येथील दातृत्व लाभलेले व्यक्तिमत्व महेंद्र सोनवणे व ज्योती सोनवणे या दांपत्याकडून सालाबाधाप्रमाणे वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांना व शाळेतील इतर गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना तब्बल 20 हजार रुपये किमतीचे गणवेश मान्यवरांच्या शुभ हस्ते वितरित करण्यात आले. यावेळेस सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलून आलेला होता.स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष दिगंबर पाटील तसेच कुंभारी येथील माजी सरपंच सुरता जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषण नामदेव पल्हाळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.सी.लोडते यांनी केले तर आभार प्रदर्शन एस. एस.देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते शालेय प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Read More

नि.पं.पाटील विद्यालयात संस्था वर्धापन दिन साजरा

पळासखेडे मिराचे दि १७ जुलै २०२५(प्रतिनिधी ) नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे मिराचे शाळेत मातृहृदयी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन पवार हे होते. सर्वप्रथम कै.आचार्य बापूसो. गजाननराव गरुड व कै. अण्णासाहेब भास्करराव गरूड यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष , संस्था संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेचा इतिहास व प्रगती विषयी माहिती दिली.त्यानंतर विद्यार्थ्याची वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.विद्यालयाचे पर्यवेक्षक जे.आर.पाटील यांनी कै. आचार्य बापूंना अभिप्रेत असलेला विद्यार्थी याबद्दल मत व्यक्त केले.विद्यालयातील उपशिक्षक एस. जे. सोनवणे यांनी मनोगतात संस्थेची स्थापना व व्याप्ती याबद्दल विद्यार्थ्यांची हितगुज केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन पवार यांनी अध्यक्ष भाषणात कै.आचार्य गजाननराव बापूंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्था संचालक व सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील,चंद्रशेखर काळे,अब्दुल नबी तांबोळी,डी. पी .पाटील, संजू पवार,.शालिक पाटील,अशोक माळी,बळीराम माळी,लता पाटील हे मान्यवर उपस्थित होते.वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक – हर्षाली प्रवीण पाटील द्वितीय क्रमांक – हितेश वर्जन चव्हाण तृतीय क्रमाक – ओम संतोष चौधरी यांनी मिळविला. त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.त्याप्रसंगी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना व गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी 50 शालेय गणवेश वाटप करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाने ,सर्व शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष जी.पी. पाटील यांनी केले तर आभार व्ही. डी. पाटील यांनी मानले.

Read More

कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप, पहूर येथील कार्यक्रम यशस्वी

कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप, पहूर येथील कार्यक्रम यशस्वी पहूर प्रतिनिधी: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने पहूर येथे गृहपयोगी वस्तू वाटपाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला स्थानिक कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे आणि नियोजनबद्ध कामामुळे शेवटच्या व्यक्तीपर्यंत भांडी पोहोचू शकली, ज्यामुळे कामगारांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या दोन-तीन दिवसांत नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने काही प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, स्थानिक कार्यकर्ते, नेते आणि पुढारी यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अहोरात्र मेहनत घेतली. गर्दीचे योग्य नियोजन करून, प्रत्येक पात्र लाभार्थ्याला गृहपयोगी वस्तू मिळाल्याची खात्री केली. ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत भांडी पोहोचवण्यात आली, याचे समाधान लाभार्थ्यांमध्ये स्पष्टपणे दिसत होते.याप्रसंगी खालील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतलीपहूर भारतीय जनता पक्ष कार्यालयांचे प्रमुख राहुल ढेंगाळे, व सरपंचपती शंकर जाधव, उपसरपंच राजू जाधव, चेतन रोकडे,जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख तसेच वासुदेव घोंगडे, रामेश्वर पाटील, समाधान पाटील, राजेंद्र पांडे, शाम सावळे, महेश पाटील, लक्ष्मण गोरे, ईश्वर बारी, सलीम शेख, भारत पाटील, संदीप बेढे, मधुकर बनकर, शिवाजी राऊत, शरद बेलपत्रे, योगेश बनकर, शुभम गोधनखेड़े यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले

Read More

प्रविण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

प्रविण दादा गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कार्यवाहीची मागणी!!संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, बामसेफ यांच्यासह परिवर्तन वादी संघटना कडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !!! शिवतीर्थावर प्रवीण गायकवाड यांच्या प्रतिमेस घातला दुग्धाभिषेक!!! ! जळगाव (प्रतिनीधी)जळगाव जिल्हा संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ बामसेफ यांच्यासह परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांकडून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा.प्रविणदादा गायकवाड यांच्या प्रतिमेस शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाजवळ दुग्धाभिषेक करून प्रविणदादा यांच्यावर झालेला भ्याड हल्ल्याच्या आरोपींना अटक करुन या घटनेची सखोल चौकशी करत कठोर कार्यवाही व्हावी या बाबत खालील आशयाचे निवेदन जळगाव जिल्हाधिकारी यांना देण्यात आले रविवार १३ जुलै २०२५ रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा. प्रविणदादा गायकवाड यांच्यावर काही गुंड प्रवृतींच्या लोकांनी शाईफेक करून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करत भ्याड हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून हा हल्ला फक्त प्रविणदादा यांच्यावर नसून हा हल्ला या देशातील तमाम शिवराय – फुले – शाहु – आंबेडकर यांच्या समता , बंधुता व न्यायाच्या तत्वांवर चालणाऱ्या विचारवंतांवर असून यापूर्वी देखील या देशात याच मार्गाने अंधश्रद्धा निर्मूलनाचा मंत्र देणारे मा.नरेंद्र दाभोळकर , कॉ.गोविंद पानसरे , पत्रकार गौरी लंकेश व ज्येष्ठ विचारवंत एम.एम.कलबुर्गी यांच्या हत्त्या घडवून आणण्यात आल्या आहेत. प्रसारमाध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला दीपक काटे नावाचा गुंड व त्याच्या आठ ते दहा इतर गुंड साथीदारांनी मिळून केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु स्थानिक पोलिसांनी या आरोपींना अटक न करता सोडून दिले आहे. तरी महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने या प्रकरणात बारकाईने लक्ष देत या हल्ल्यातील सर्व आरोपी व त्यांच्या मागे असणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी अन्यथा याच पद्धतीने विचारवंतांना संपवण्याचे प्रयत्न सुरु राहिल्यास महात्मा गांधीच्या अहिंसेच्या विचारांवर चालणाऱ्या भारत देशाची प्रतिमा जगात मलीन होऊन हा देश अराजकतेच्या मार्गावर जाण्यास वेळ लागणार नाही. यावेळी संभाजी ब्रिगेड सामाजिक चे प्रदेश संघटक श्याम पाटील , जिल्हाध्यक्ष तुषार सांवत , संभाजी ब्रिगेड राजकीय चे जळगाव पुर्व जिल्हा प्रदिप गायके, जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष विजय पाटिल शहर कार्याध्यक्ष मयूर चौधरी , लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे , बामसेफचे मुकुंद सपकाळे , मराठा सेवा संघाचे सुरेश पाटील , सुरेंद्र पाटील , राम पवार , शोभाराम प्रतिष्ठाचे नरेंद्र पाटील , अनिरुद्ध शिसोदे , शुभम पवार , गणेश पाटील,कल्पेश पाटील, भरत पाटील, अविनाश पाटील ,संदीप मांडोळे, सतीश लाठी, राकेश राजपूत, राकेश जैन, संदीप पाटील,रवींद्र पाटील, धवल पाटील,प्रमोद पाटील,राहुल पाटील,संजय चव्हाण,सुमित्र अहिरे, देवानंद निकम,रवींद्र तायडे,देशमुख साहेब यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते

Read More
error: Don't Try To Copy !!