Headlines

जामनेर प्रभारी गट शिक्षण अधिकारी श्री विष्णू काळे यांची तात्काळ बदली करा – मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांची शिक्षणाधिकारी यांच्याकडे मागणी

आज 30 जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने जळगाव जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे उप शिक्षणाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जामनेर येथून रावेर येथे बदली झालेले श्री विष्णू वामन काळे यांच्याकडून जामनेर प्रभारी गट शिक्षणाधिकारी व शालेय पोषण आहार अधीक्षक पदाचा पदभार काढून घेणे बाबत निवेदन देण्यात आले.जामनेर येथे कार्यरत असलेले प्रभारी गट शिक्षणाधिकारी तथा शालेय पोषण आहार अधीक्षक श्री विष्णू वामन काळे यांची 13 मे 2025 रोजी जामनेर येथून रावेर येथे पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून बदली करण्यात आली होती मात्र अद्यापही श्री विष्णू काळे यांनी आपला पदभार जामनेर येथून सोडलेला नाही. रावेर येथील पूर्ण वेळ पदाचा कारभार न पाहता जामनेर येथील अतिरिक्त पदभार स्वीकारण्यात इतके स्वारस्य का? असा प्रश्न जामनेर तालुक्यात शिक्षण विभागात चर्चेचा विषय बनला आहे कारण गेल्या 10 ते 12 वर्ष जामनेर तालुक्यात ठाण मांडून बसलेले श्री विष्णू काळे यांच्यावर कुणाचे वरद हस्त आहे. असा सवाल निर्माण होत आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी श्री विष्णू काळे यांची जामनेर गट शिक्षणाधिकारी म्हणून अतिरिक्त पदभार स्वीकारला आहे. मात्र जामनेर तालुक्यात नावीन्य पूर्ण व पात्रता असलेले तीन – तीन कार्यक्षम शिक्षण विस्तार अधिकारी असताना रावेर येथे नुकतीच बदली झालेल्या अधिकाऱ्यांना अतिरिक्त पदभार कोणत्या अनुषंगाने देण्यात आला याबद्दल जामनेर तालुका अनभिज्ञ आहे. तालुक्यातील तिन्ही कार्यक्षम शिक्षण विस्तार अधिकारी हा पदभार स्वीकारण्यास पात्र असताना व संबंधित शिक्षण खात्याचा कारभार पाहण्यासाठी सक्षम शिक्षण विस्तार अधिकारी असताना इतर तालुक्यात बदली करण्यात आलेल्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर ही कृपादृष्टी तालुक्यात चर्चेचा विषय बनलेला आहे. तरी जामनेर येथील विद्यमान प्रभारी गट शिक्षणाधिकारी श्री . विष्णू वामन काळे यांची जामनेर येथून तात्काळ उचल बांगळी करून त्यांना रावेर येथील पदभार देण्यात यावा व जामनेर येथील शिक्षण विस्तार अधिकारी यापैकी एका सक्षम व कार्यक्षम शिक्षण विस्तार अधिकारी यांची अतिरिक्त गट शिक्षण अधिकारी म्हणून नेमणूक करून त्यांचे मनोबल वाढवण्यात यावे . असं न घडल्यास बदली या संकल्पनेवर कर्मचारी व अधिकारी यांचा विश्वास राहणार नाही तो विश्वास उडेल म्हणून आपण ही जिल्हाधिकारी साहेब यांच्या “क” व “ड” श्रेणीतील कर्मचारी बदली प्रक्रियेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कोणताही वशिला व आकस मनात न ठेवता, बदली प्रक्रियेत पारदर्शकता निर्माण होणे आवश्यक आहे.अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जामनेर तालुका मनसे स्टाईल ने कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी दिला आहे. यावेळी मनविसे तालुकाध्यक्ष किशोर पाटील , तालुका उपाध्यक्ष संदीप मराठे , तालुका उपाध्यक्ष आशुतोष पाटील , वाल्मीक कोळी , जगदीश कुरकुरे , रतन देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

शिवसाई कन्स्ट्रक्शन ची हुकूमशाही सुरुकायद्याला न मानणाऱ्या या शिवसाई कंट्रक्शन ने माजवला हुकूमशाहीचा तांडव

दिनांक 01/112025 जे बी एन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (जब्बार तडवी) अवैध वृक्षतोड करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजने चे ही बोगस काम करून वाजवले रोड चे तीन तेरा.. मात्र अभियंता.. उप अभियंता गाढ झोपेत. या हुकूमशाहीला कंटाळून शेतकरी त्रस्त झाला आहे.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील नांदा. तांडा ते चारूतांडा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सध्याला कोट्यावधी रुपयांचे रोड चे काम सुरू आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे बोगस काम सुरू असून या कामावरती थातूरमातूर मुरूम निकृष्ट दर्जाचे बोगस मटेरियल वापरले जात आहे. त्यावरती रोलर ने व्यवस्थित दबाई केली जात नाही.त्यामुळे पूर्ण गिट्टी वरती पडलेली आहे तसेच या रोडला कोणतीही साईड ड्रम नाली काढलेली नाही त्यामुळे या ठिकाणी पाणी साचून शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची व शेताची मोठी हानी होऊन नुकसान होत आहे असा संताप जनक प्रकार शेतकऱ्यांनी सांगितला आहे. तसेच मुरमाचे खोदकाम सुरू असताना शिवसाई या कंट्रक्शनच्या मालकाने कोणतीही परवानगी न घेता सर्रासपणे अवैध रित्या सागवान,लिंब, व इतर प्रजातीच्या वृक्षांची सर्रासपणे पोकलँड च्या साह्याने कत्तल करून हुकूमशाही चा तांडव माजवलेला आहे. शिवसाई कंट्रक्शन हे बोगस काम करून कोट्यावधी रुपयांचा शासनाला चुना लावून शिवसाई कंट्रक्शन फक्त पैसा कमाविण्याचे एक गोरख धंदा करीत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले .मागील वर्षी याच कंट्रक्शन ने नांदा.गाव येथे पुलाचे निकृष्ट दर्जाचे बोगस काम केले होते.त्या संदर्भामध्ये गावकऱ्यांनी हे बोगस काम अडविले सुद्धा होते. व अनेक ग्रामस्थांची तक्रार सुद्धा होती त्याच पद्धतीने परत या रोडचे पूर्ण बोगस काम शिवसाई कंट्रक्शन ने सुरू केलेले आहे तरी या हुकूमशाही करणाऱ्या शिवसाई कंट्रक्शन वरती तात्काळ शासनाने, प्रशासनाने कारवाई करण्यात यावी अशी ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे. अवैध कत्तल केलेल्या वृक्षांचा पंचनामा अजिंठा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत सावळदबारा वन परिमंडळ च्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी हजर होऊन पंचनामा करून पुढील कारवाईसाठी तपास सुरू आहे

Read More

प्रॉपर्टी डीलर म्हणून ओळख असलेल्या रामेश्वर नथू बिजागरे यांची गळफास घेऊन आत्महत्या

जामनेर तालुक्यात मंगळवारी दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली. प्रॉपर्टी डीलर म्हणून ओळख असलेल्या रामेश्वर नथू बिजागरे (वय 40, रा. चिंचखेडा तवा) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एका मित्राला फोन करून ही माहिती दिली होती, मात्र मदतीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, रामेश्वर बिजागरे हे लाखोंच्या जमिनीच्या व्यवहारांमुळे जामनेर परिसरात परिचित होते. मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे जामनेर-बोदवड रोडवरील भवानी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. नंतर काही मित्रांसह धाब्यावर जेवणही केले. त्यानंतर त्यांनी एका निकटवर्तीय मित्राला फोन करून “आपण आत्महत्या करत आहे,” असे सांगितले. संबंधित मित्राने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु काही वेळाने त्यांचा फोन बंद यायला लागला. यानंतर मित्रांनी लोकेशनवरून शोध घेत भवानी घाट परिसर गाठला असता, बिजागरे यांचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृत्यूपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी असल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, या चिठ्ठीत काही व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली असून, पैशांचे व्यवहार, देणे-घेणे यांचा उल्लेख असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, मृत्यूमागील कारणे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. रामेश्वर बिजागरे यांनी अल्पावधीतच आर्थिक प्रगती केली होती. प्रॉपर्टी डीलिंगच्या माध्यमातून त्यांचे अनेकांशी व्यवहार होते. या व्यवहारांमुळे मानसिक तणाव होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे चिंचखेडा गावात तसेच जामनेर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Read More

मांडवे बु. येथे जागतिक हिवताप दिन साजरा…

मांडवे बु. येथे जागतिक हिवताप दिन साजरा… चला हिवतापाला संपवू या : पुन्हा योगदान द्या, पूर्णविचार करा, पुन्हा सक्रिय व्हा. *जे बी एन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (एकनाथ कोळी) दि . २५/४/२०२५ रोजी मांडवे बु. तालुका जामनेर येथे डॉ. राजेश सोनवणे (तालुका वैद्यकीय अधिकारी जामनेर) यांच्या सूचनेनुसार व श्री.अण्णा जाधव (तालुका हिवताप पर्यवेक्षक), श्री.विक्रमसिंग राजपूत (आरोग्य सहाय्यक वाकडी) यांच्या मार्गदर्शनाखाली २५ एप्रिल जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला व उपस्थित डॉ. वैभव पाटील (स.आ.अधिकारी) व श्री. हेमंत पाटील (आरोग्यसेवक) यांनी हिवतापाबद्दल सखोल माहिती व मार्गदर्शन खालील प्रमाणे केले. हिवताप हा किटकजन्य आजार असुन अनेक आजारांपैकी एक गंभीर व मानवाचा जीवघेणा आजार आहे. भारतात प्लाझमोडियम व्हायव्हँक्स व प्लाझमोडियम फँल्सीफेरम हे दोन प्रकारचे रोगजंतु आढळतात. या रोगाचे प्रमुख खाद्य हे मानवी रक्तातील तांबड्या रक्तपेशीतील हिमोग्लोबीन आहे. या रोगजंतुमुळे हिवताप हा आजार होतो. हिवताप आजाराचा शोध लागलेला नव्हता तोपर्यंत या आजाराबाबत समाजात अनेक गैरसमज पसरलेले होते व त्यावर योग्य तो उपचार माहित नसल्यामुळे त्यावेळी हिवतापामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडत होते. सर्वप्रथम सन 1889 मध्ये डाँ.सर रोनाल्ड राँस यांनी रोग जंतुचा शोध लावला. त्यामुळे हिवतापाच्या रुग्णांवर योग्य उपचार देणे शक्य होऊन हिवतापामुळे होणाऱ्या मृत्युंची संख्या कमी झाली. 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिवस म्हणुन जगभरात साजरा केला जातो. हिवतापाचा प्रसार अँनाफेलीस ह्या जातीच्या डासांच्या मादींमार्फत होतो.ह्या मादी स्वच्छ पाण्यात अंडी घालतात. त्यांत पाण्याच्या टाक्या,हौद,डबके,नारळाच्या करवंट्या,कुलर,टायरे,फुलदाण्या आदी ठिकाणी ही मादी अंडी घालतात.हिवतापाला रोखायचे झाल्यास डासांची उत्पत्ती रोखणे हाच रामबाण उपाय आहे.डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आठवड्यातुन एक दिवस कोरडा पाळुन घरातील पाण्याची भांडी घासुन-पुसुन स्वच्छ करणे, कोरडी करणे, पाण्याच्या टाक्यांवर घट्ट झाकणे ठेवावी,परिसरातील पाण्याची डबकी बुजवावी अथवा त्यांत आईल किंवा राँकेल टाकावे, डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडावीत.आरोग्य विभागामार्फत कंटेनर्स सव्हेक्षण करुन पाण्याच्या टाक्यांमध्ये टेमीफाँस नावाचे औषध टाकले जाते. त्यामुळे डासांच्या अंडी मरुन जातात. गावात रॅली काढून हस्तपत्रिका वाटप करून जनजागृती करण्यात आली.सदरप्रसंगी मांडवे बु. येथील श्री. महेमुद तडवी सरपंच, श्रीम.समीना तडवी उपसरपंच,इतर ग्रा. प. सदस्य, जि. प. शाळा मुख्याध्यापक, इतर शिक्षकवृंद, आशासेविका श्रीम.अलका जाधव, जिजाबाई पाटील, सुलोचनाबाई शिंदे व तुळसाबाई चव्हाण व गावातील नागरिक उपस्थित होते.

Read More

भारतीय जैन संघटनेतर्फे जामनेरला बालकांसाठी विविध कार्यक्रम संपन्न

जे. बी. एन महाराष्ट्र न्यूज जामनेर( जामनेर -प्रतिनिधी )- येथील भारतीय जैन संघटनेतर्फे बाल दिनानिमित्त पाच वर्षापासून ते वीस वर्षापर्यंतच्या बालकांसाठी महावीर भवन येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन बाल दिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात बालकांसाठी खो-खो,संगीत खुर्ची,रस्सीखेच,पास कप खेळांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धाही ठेवण्यात आल्या होत्या या स्पर्धेत 115 बालकांनी सहभाग नोंदविला. ज्या मुलांनी स्पर्धेत विजय मिळवला त्यांना बक्षिसे देण्यात आली. राकेश हिरालालजी संचेती हे प्रायोजक म्हणून होते.जळगाव जिल्हा महिला विंग जिल्हाध्यक्षा सोनल कोठारी यांनी सुत्रसंचलन केले. खानदेश विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत, जिल्हा उपाध्यक्ष विकास कोठारी, माजी जिल्हा कार्याध्यक्ष शितल लोढा, जय बोहरा, रितेश कोठारी, विशाल ओस्तवाल एवं बीजेएस महिला अध्यक्षा सौ. मोना चोरडीया, सदस्या सौं जयश्री लोढा, सौ. सोनाली सिसोदीया, महावीर पाठशाळा प्राध्यापक सौ. वनमाला कोठारी, सौ वैशाली बागमार, सौ. सपना ब्रम्हेचा, सौ. ऊषा पोरवाल, सौ. रोशनी भंडारी, सौ.शितल संचेती, सौ. नमिता चोपडा,आदी पदाधीकारी उपस्थित होते. प्रोजेक्ट हेड म्हणून विकास ललवाणी, सौ दिपाली चोरडिया यांनी काम पाहीले.

Read More

जळगावात पोलीस पाटलांसाठी विशेष कार्यशाळा; कायदा-सुव्यवस्थेला बळकटी

जळगाव, दि. ७ एप्रिल (प्रतिनिधी) — ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासह महसूल प्रशासनाला गती देण्यासाठी जिल्हादंडाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पोलीस पाटलांसाठी एक दिवसीय विशेष कार्यशाळा जिल्हा नियोजन सभागृहात उत्साहात पार पडली. या कार्यशाळेस जिल्हाभरातील पोलीस पाटलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी श्री. श्रीमंत हारकर, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते तसेच अपर जिल्हादंडाधिकारी श्रीमती वैशाली चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विविध विभागांच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी पोलीस पाटलांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.महसूल प्रशासनासंदर्भात उपविभागीय दंडाधिकारी (फैजपूर) श्री. बबन काकडे यांनी पोलीस पाटलांची भूमिका स्पष्ट केली, तर उपविभागीय पोलीस अधिकारी (जळगाव) श्री. नितीन गणापुरे यांनी गुन्हे नियंत्रणासाठी पोलीस दलाशी समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. नरवीर रावळ यांनी आपत्तीच्या काळात प्रथम प्रतिसादक म्हणून पोलीस पाटलांची जबाबदारी विशद केली. तसेच उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती अर्चना मोरे यांनी आचारसंहिता पालन व सुरक्षित मतदान प्रक्रियेतील कर्तव्यांबाबत माहिती दिली.गाव पातळीवर प्रशासन व नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील कार्यरत असून त्यांच्या सजगतेमुळे ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ होते. या कार्यशाळेमुळे त्यांच्या कामकाजात अधिक स्पष्टता व गती येणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.“पोलीस पाटील हे गावातील प्रशासनाचे डोळे आणि कान आहेत. त्यांच्या सजगतेमुळेच ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्थेचे पालन सुलभ होते,” असे जिल्हा प्रशासनाने नमूद केले.जिल्हा प्रशासनाने अशा प्रशिक्षणात्मक उपक्रमांद्वारे ग्रामीण प्रशासन अधिक सक्षम व उत्तरदायी करण्याचा निर्धार व्यक्त केला.[10:03 am, 9/4/2026] Kiran Jio Number: मुंबई, दि. ७ एप्रिल (प्रतिनिधी) — जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सहकारी सूतगिरणीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी मंत्रालयात मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात ही बैठक झाली.बैठकीत वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्रीकृष्ण पवार यांनी सूतगिरणीच्या सद्यस्थितीचा आढावा सादर करत कामकाजातील अडचणी व प्रलंबित मुद्द्यांची सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सूतगिरणीच्या कार्यपद्धती, तांत्रिक बाबी व उत्पादन क्षमतेसंदर्भात चर्चा केली.सूतगिरणीसमोरील अडचणी दूर करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत मंत्री श्री. महाजन यांनी वस्त्रोद्योग विभागाला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यामुळे सूतगिरणीच्या कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.या बैठकीस वस्त्रोद्योग आयुक्त श्री. संजय दैने, मंत्री (वस्त्रोद्योग) यांचे खाजगी सचिव श्री. प्रल्हाद रोडे, मंत्री श्री. महाजन यांचे खाजगी सचिव जयराज कारभारी, प्रादेशिक उपआयुक्त श्री. दीपक खांडेकर, कक्ष अधिकारी श्री. हरीशकुमार कांबळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी ऑनलाइन प्रणालीद्वारे उपस्थित होते.सदर बैठकीत सूतगिरणीच्या प्रगतीसाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला असून, लवकरच ठोस निर्णयांची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read More

जागतिक पटलावर देशाच्या खेळाडूंचा डंका ही अभिमानास्पद बाब-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जागतिक पटलावर देशाच्या खेळाडूंचा डंका ही अभिमानास्पद बाब-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव दि.१६: सध्या जागतिक पटलावर देशाच्या विशेषत: महाराष्ट्रातील खेळाडू आपले नाव कमावत असून ही देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. JBN जामनेर येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आयोजित केलेल्या ‘नमो कुस्ती महा कुंभ दोन’ अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, अनिल पाटील, संजय कुटे, चंद्रकांत सोनवणे, चंद्रकांत पाटील, अमोल पाटील, अमोल जावळे, अनुपभैय्या अग्रवाल यांच्यासह कुस्तीगीर संघटनेचे रामदास तडस, जामनेरच्या नगराध्यक्ष साधनाताई महाजन आदी उपस्थित होते.JBN मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ऑलम्पिक स्पर्धा, कॉमनवेल्थ, एशियन गेम अशा विविध स्पर्धांमध्ये देशातील खेळाडूंनी विशेषत: महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. मागील काळात मॅटवरील कुस्तीमुळे आपण थोडे मागे पडलो होतो. परंतु मातीवरील कुस्ती स्पर्धेत आपल्या देशाचे खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. कुस्तीच्या माध्यमातून देशाला ऑलम्पिकमधील पहिले पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव हे कुस्तीपटू होते. आजही महाराष्ट्राचे खेळाडू विजय चौधरी, सोनाली मंडलिक, राजीव पटेल यांनी आपल्या खेळाची चमक दाखवून परदेशातील कुस्तीपटूवर मात केली, असे सांगून त्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.JBN या स्पर्धेला नऊ देशातील जागतिक स्तरावरील कुस्तीपटू उपस्थित राहिल्याबद्दल या स्पर्धेची रंगत आणखीनच वाढल्याचे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन यांचेही त्यांनी यावेळी कौतुक केले. या स्पर्धेला नागरिकांचा मोठा सहभाग लाभला हेच या स्पर्धेचे यश असल्याचे श्री.फडणवीस म्हणाले. या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारतासह फ्रान्स, रोमानिया इस्टोनिया, उझेकिस्तान, जॉर्जिया आदी देशातील जागतिक विजेते ओलंपियन, हिंदकेसरी, रुस्तम ए हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी आदी विजेत्या खेळाडूंनी सहभाग घेतला. अशा स्पर्धा जामनेरमध्ये होणे हे कुस्तीसाठी चांगले वातावरण असल्याचेही ते म्हणाले. यावेळी विजेत्या कुस्तीपट्टूना मान्यवरांच्या हस्ते चांदीची गदा प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी, विविध देशातून आलेले कुस्तीगीर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More

ग्रामीण विकासात आजच्या युवतींची भूमिका मोलाची

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जनविश्वास सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात संजयदादा गरुड यांचे प्रतिपादन शेंदुर्णी येथील आप्पासाहेब रघुनाथराव गरुड महाविद्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संयुक्त आयोजित सजग युवती-सक्षम युवती उपक्रमाच्या व्याख्यान कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संजयदादा गरुड यांनी अध्यक्षपदावरून ग्रामीण भागातील रचनेत आणि विकासात युवतींचा सहभाग आणि भूमिका अत्यंत मोलाची आहे असे मत मांडले.युवती केवळ कुटुंबाचा नव्हे,तर ग्रामीण समाजाचा देखील अविभाज्य घटक असल्याने त्यांनी आत्मविश्वासाने आपल्या क्षेत्रात भरारी घेतली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या जनविश्वास सप्ताहामागील विवेचन युवती काँग्रेसच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षा कु.भाग्यश्री विवेकानंद ठाकरे यांनी मांडले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर नाना पाटील,जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शिंदे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव थोरात,शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे सचिव सागरमल जैन,युवा नेते स्नेहदीप गरुड,नगरसेवक धीरज जैन तसेच जंगीपूरा येथील उपसरपंच मनोज पाटील यांची विशेष उपस्थिती होती. चौकट (1)अत्यंत मौलिक विषयांवर युवतींना मिळाले मार्गदर्शन : या उपक्रमात युवतींसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.ॲड.केतन सोनार यांनी ‘सोशल मीडिया हाताळताना युवतींनी घ्यावयाची काळजी’ या विषयावर दैनंदिन घडामोडी,फेक न्यूज,ऑनलाइन फसवणूक याविषयी सजग राहण्याच्या दृष्टीने सउदाहरण विदयार्थीनींना अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात व्याख्यान दिले.ॲड. उमेश मराठे यांनी ‘युवती व कौशल्य विकास कार्यक्रमातून उपलब्ध संधी’ या विषयावर विवेचन करताना कौशल्य विकास म्हणजे केवळ पार्लर किंवा शिवणकाम पुरते मर्यादित नसून, सामाजिक आणि व्यवसायिक क्षेत्रातही युवतींना अनेक संधी असल्याचे असे आपल्या व्याख्यानातून नमूद केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.संजय भोळे, आर.एस. चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन दिनेश थोरात यांनी केले तर आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य साळुंखे यांनी मानले. चौकट (2) वटवृक्षारोपण व दहा युवतींना रोपांची जबाबदारी : ‘एक झाड माझ्या दादांचं…!’ या उपक्रमांतर्गत राष्ट्रवादी युवती काँग्रेसने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दहा विद्यार्थिनींना वटवृक्षाचे रोप भेट देत त्यांच्याकडून जगविण्याचे वचन घेतले. यावेळी संस्थेच्या आवारात अध्यक्ष श्री. संजयदादा गरुड यांच्याहस्ते वटवृक्ष लावण्यात आले तृप्ती बारी,रोहिणी गुजर,नेहा न्हावी, वृषाली पाटील, गायत्री पाटील, कोमल म्हस्के, सानिया गुजर, निकिता पाटील, आरती पाटील आणि योगेश्वरी वाघ या दहा युवतींनी झाडांचे संगोपन करण्याचा संकल्प केला.

Read More

जामनेर आगाराला ५ नवीन बसेस –माननीय जितेंद्र पाटील व तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या हस्ते लोकार्पण….

*जामनेर आगाराला ५ नवीन बसेस –माननीय जितेंद्र पाटील व तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या हस्ते लोकार्पण…..जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधवजामनेर आगाराला मिळाल्या पाच नवीन बसेस कर्मचाऱ्यांनी जल्लोषात केले स्वागत. जामनेर बस आगाराला महाराष्ट्र शासनाकडून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नामुळे पाच नवीन बसेस मिळाल्या असून याचा आनंद व जल्लोष कर्मचाऱ्यांनी मोठा उत्साहात साजरा केला यावेळी नवीन मिळालेल्या बसेसचे लोकार्पण व पूजन जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी सचिव जितेंद्र पाटील तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार डॉक्टर प्रशांत भोंडे अतिश झाल्टे जामनेर बस आगार प्रमुख दिनेश नाईक बस आगार चे अधिकारी गोविंद पवार अमोल सुरवळकर गोपाल वाघ सुनील पाटील ग्रुपसिंग महाजन मोहन जैन जीएम करवंदे अनिल वंजारी गणेश पाटील वैभव पाटील अनिल जैन यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते अनेक दिवसापासून जामनेर बस आगारांमध्ये जुन्या गाड्या चालू असून यामुळे मोठा त्रास वाहक व कर्मचाऱ्यांना होत होता त्यामुळे नवीन बसेसची मागणी करण्यात आली होती महाराष्ट्र शासनातर्फे पाच नवीन लाल परी बसेस जामनेर व सागराला मिळाले असून याचा जल्लोष व स्वागत डीजेच्या तालावर नाचत करण्यात आला या नवीन बसेसमुळे जामनेर व सागरातील प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध होणार आहे.

Read More

मोटरसायकल चोरून आणलेल्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मोटरसायकल चोरून आणलेल्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या दि.07/01/2025 रोजी 11:00 वा.च्या सुमारास पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक दिपक रोठे,व पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, पो.हे. कॉ जयेंद्र पगारे, पो.हे. कॉ दिपक जाधव, पो.हे. कॉ सुशील सत्रे, पो.हे.कॉ अनिल राठोड, पो.कॉ. सचिन महाजन असे खादगाव बिटमध्ये खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना 11:30 वाजेच्या सुमारास जामनेर शहराच्या बाहेर खादगाव रोडवर चार ईसम हे दोन मोटरसायकल वर विना नंबरच्या मोटरसायकल घेऊन जात जात असतांना दिसले. त्यांना थांबवून त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव 1)सागर अमृत चौधरी वय 34 वर्ष. 2)सागर शिवाजी चौधरी वय 26 वर्ष. 3)संजय युवराज पाटील वय 45 वर्ष. 4)योगेश भाऊराव गावंडे वय 39 वर्ष. सर्व रा. खादगाव ता. जामनेर असे असल्याचे सांगितले त्यावेळी त्यांना सदर मोटरसायकलच्या नंबर व कागदपत्र बाबत विचारपूस केली असता त्यांना सदर मोटरसायकलच्या बाबतीत काही एक सांगता येत नसून ते उडवा उडवीचे उत्तरे देत होते. त्यावरून पोलिसांची खात्री झाली की सदरच्या मोटरसायकल या नमूद ईसमानी लबाडीने मिळवलेल्या आहे किंवा त्यांच्या मालकीच्या नसतांना ताब्यात बाडगलेल्या आहेत सदरच्या मोटरसायकलीचे वर्णन खालील प्रमाणे 1)20000/-रु किंमतीची एक काळ्या रंगाची ड्रिम युगा जिचा इंजिन नंबर JC58EG0012548 व 2) 20000/-रु कि सिटी 100 कंपनीची मोटरसायकल इंजिन नंबर DUYPJM13145 व 3) 40000/-रु किं.च्या दोन मोटरसायकल दोन पंचा समक्ष जागीच जप्त करून ताब्यात घेतल्या आहे त्याचा सविस्तर पंचनामा करण्यात आला आहे. वरील वर्णन व किंमतीच्या दोन मोटरसायकल मालकी नसतांना त्यांच्या कब्जात बाळगून मोटर सायकलच्या मालकी बाबत कोणतेही समाधान कारक उत्तर न देता मिळून आले म्हणून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 124 प्रमाणे जामनेर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला असून सदर तपासात असे निष्पन्न झाले की, सदरच्या मोटरसायकल ह्या बिस्टान पोलीस स्टेशन जि. खरगोन मध्य प्रदेश व छैगाव माखन पोलीस स्टेशन जि. खंडवा मध्यप्रदेश येथून चोरी करून आणल्याचे निष्पन्न झाले असून सदर आरोपी हे बिस्टान पोलीस स्टेशन जि. खरगोन मध्यप्रदेश यांच्याकडे तपासाकामी देण्यात आले आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!