Headlines

अलवर (राजस्थान) येथे आयोजित खासदार क्रीडा महोत्सवास; केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित..

अलवर (राजस्थान) येथे स्थानिक लोकसभा खासदार व केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री श्री. भूपेंद्र यादव जी यांच्या मार्फत आयोजित “खासदार क्रीडा महोत्सव” कार्यक्रमास आज केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्या. यावेळी त्यांनी स्पर्धक व उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, अलवर खासदार क्रीडा महोत्सव ही केवळ क्रीडा स्पर्धा नाही, तर युवाशक्तीचा उत्साह, खिलाडूवृत्ती आणि निरोगी भारताच्या निर्धाराचे प्रतीक आहे. पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी जी यांच्या ‘खेलो इंडिया’ आणि ‘फिट इंडिया’ मोहिमेला पुढे नेण्यासाठी क्रीडा महाकुंभ हे एक सशक्त माध्यम आहे. युवा खेळाडूंचा उत्साह, परिश्रम आणि संघर्ष पाहून मला पूर्ण विश्वास वाटला की भारताचे भविष्य क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील कलागुणांना पुढे येण्याची मोठी संधी मिळत आहे असे उद्गार त्यांनी काढले. या भव्य कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी यावेळी स्थानिक खासदार व केंद्रीय मंत्री श्री. भूपेंद्र यादव जी यांचे यावेळी अभिनंदन करून सर्व सहभागी स्पर्धकांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Read More

छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकविला…

जेबीएन महाराष्ट्र न्यूजप्रतिनिधी जामनेर प्रतिनिधी. जब्बार तडवी दिनांक 01/11 /2025 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व कलागुणांना चालना देणारी आमची संस्था. संस्थाध्यक्ष भाऊराव कोलते पा.जय कालंका देवी शिक्षण संस्था संचलित छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थीनी तिने जिल्हास्तरीय एथलेटिक्स स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून तृतीय क्रमांक मिळवून संस्थेचा बहूमान वाढविला संस्थेच्या वतीने विद्यार्थिनीचा व क्रीडा शिक्षकांचा जाहीर सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत दरवर्षीय राज्यातील विविध शाळेतून क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात या क्रीडा स्पर्धेमध्ये प्रत्येक तालुक्यातून एक विद्यार्थिनी सोनम तडवी या विद्यार्थिनीने हा बहुमान पटकावून ही जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये तालुकास्तरावरती प्रथम क्रमांक पटकावला होता. यामधून विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होती ग्रामीण भागातील अतिशय होतकरू आदिवासी समाजातील अतिशय कष्टाळू व गरीब कुटुंबातील ही विद्यार्थिनी असून अभ्यासात हुशार असणारी परिस्थितीवर मात करत आपल्या कला व मेहनतीच्या बळावर तीन हजार मीटर स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळून शाळेचा व संस्थेचा बहुमान वाढवला. सोनम तडवी हिनी माध्यमांशी बोलताना सांगितले की मी दररोज व्यायाम व सकस आहार आणि कठोर मेहनत हेच माझ्या यशाचे गुपित असून यासाठी मला शाळेतील प्राचार्य संस्थाचालक व क्रीडाशिक्षकांचे वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन लाभले आहे त्यांच्या या मार्गदर्शनामुळेच मी आज हे यश मिळू शकले त्याबद्दल तिच्या घरच्यांनी व तिने स्वतः शाळेचे व संस्थेचे विशेष आभार मानले.जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे पार पडल्या सोनम कबीर तडवी बारावी वाणिज्य या मुलीने तृतीय क्रमांक पटकवून विद्यार्थ्यांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला त्याबद्दल संस्थाध्यक्ष भाऊराव कोलते व संचलाक मंडळ यांनी तिच्या जाहिर सत्कार केला तिच्या यशाबद्दल प्राचार्य नारायण कोलते यांनी क्रीडा शिक्षक जय राम घोती व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ही कामगिरी अतिशय चांगल्या प्रकारे बजावल्यामुळे त्यांचा सुद्धा सन्मान केला. या विद्यार्थिनीला माध्यमिक शिक्षणापासून क्रीडा शिक्षक विजय सिंग राजपूत भास्कर कमांड सुदामसिंगराठोड व डॉ. प्रा.जयराम घोती यांचे विशेष मार्गदर्शन होते याबद्दल सर्वांचे अभिनंदन करून आभार जीवन कोलते यांनी मानले.

Read More

जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षणात जामनेर तालुक्याचे प्रा.समीर घोडेस्वार व प्रा.सचिन गडाख यांना प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र देऊन सन्मानित:

जामनेर: महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 (माध्यमिक विभाग) “जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण (TOT) २०२४-२५” चे आयोजन दि.३ ते ७ फेब्रुवारी २०२५ दरम्यान जी एच रायसोनी कॉलेज शिरसोली रोड,जळगाव येथे करण्यात आले होते. या प्रशिक्षणात जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे हिंदी तथा क्रीडा उपशिक्षक प्रा.समीर विष्णू घोडेस्वार, व भौतिकशास्त्र उपशिक्षक प्रा.सचिन तानाजी गडाख यांनी उस्फूर्त सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव प्राचार्य डॉ.अनिल झोपे यांच्या हस्ते “प्रशिक्षणार्थी” म्हणून शासकीय प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले सोबत राज्यस्तरीय सुलभक डॉ.जगदीश पाटील, डॉ.अतुल इंगळे आदी. मान्यवरांची उपस्थिती होती.

Read More

ईद-ए-मिलाद उत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा

Jbn न्यूज जामनेर प्रतिनिधी दिनांक 5/09 20025 सोयगाव तालुक्यातील सावळदबारा गावामध्ये मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद-उन-नबीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. सकाळी मुस्लिम बांधवांनी मशिदींमध्ये एकत्र जमून नमाज अदा केली. त्यानंतर प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनकार्याची आठवण करून देण्यात आली. तसेच गावातून शोभायात्रा काढण्यात आली. या जुलूसामध्ये मुलांनी धार्मिक झेंडे, फलक घेऊन सहभाग घेतला. ठिकठिकाणी गावात नागरिकांनी गुलाबपुष्प वर्षाव करून एकमेकांना पेढे वाटप करून जुलूसाचे स्वागत केले.शांती, बंधुभाव आणि ऐक्याचा संदेश देत हा उत्सव पार पडला. आणि संकाळी धार्मिक व्याख्याने, कव्वाली तसेच मिलाद शरीफचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमानंतर मुस्लिम बांधवांनी व नागरिकांनी एकत्र येऊन शिरखुर्मा गोड जेवण व विविध पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेतला. या संपूर्ण उत्सवामध्ये ज्येष्ठ नागरिक शब्बीर सेट सरपंच आरिफ लोकमान शिवाप्पा चोपडे,ईश्वर कोळपे, मोहम्मद तालीम मोहम्मद अफसर मोहम्मद अस्लम आसिफ शेख रियाज शेख सामाजिक कार्यकर्ते जीवन कोलते, गणेश खैरे पोलीस पाटील विलास कुल्ली रोशन मोहम्मद गफार तडवी कदिर तडवी अशपाक मोहम्मद दिलीप देशमुख सुनील चोरमाले पत्रकार बंधू व सर्व गावातील नागरिक यांनी कार्यक्रमात आनंद व्यक्त केलातसेच कुणाला गालबोट लागणार नाही याची खबरदारी घेत पोलीस कर्मचारी जमादार मिरखा तडवी शिवदास गोपाळ व त्यांचे सवंगडी होमगार्ड यांनी चोक बंदोबस्त दिला होता

Read More

ऐन पावसाळ्याच्या तोंडी सावळ दबारा येथील 33 के व्ही उपकेंद्र सब स्टेशन वाऱ्यावर

ऐन पावसाळ्याच्या तोंडी सावळ दबारा येथील 33 के व्ही उपकेंद्र सब स्टेशन वाऱ्यावर J b n महाराष्ट्र सोयगाव प्रतिनिधी जब्बार एस तडवी सोयगाव तालुक्यातील शेवटचे टोक म्हटले तर सावळद बारा व उपकेंद्र असलेले ते 33 केव्ही सब स्टेशनला कुनी je वारसनसल्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडी या परिसरात झाडे tree कटिंग नसल्यामुळे वारंवार लाईट जाणे लाईट नसल्यामुळे नाहक भीषण अशा गर्मीमध्ये 18 गावातील नागरिकांना लहान थोर मुला बाळांना वयोवृद्धांना आणि शेतकऱ्यांना नाहक चा त्रास सहन करावा लागत आहे आणि मुख्य बाब म्हणजे लाईट नसली की अशा परिस्थिती मध्ये संपूर्ण सरकारी ऑनलाईन म्हटल तर शाळा कॉलेज बँक पोस्ट ऑफिस. आरोग्यवर्धिनी केंद्र . विद्यार्थ्यांचे ऍडमिशन होणारी कामे रखडतात आणि सावळद बारा ते 33 केव्हीं लां दोन डझन कर्मचारी ड्युटीला आहे पण त्या पैकी एकही कर्मचारी ड्युटीला हजर नसतो विशेष म्हणजे सावळदबारा 33 केव्हीला नुसते दोन थेंब पाण्याचे वावडे नेहमी झालेले असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे आणि एवढे कर्मचारी असून सुद्धा स्थानिक ड्युटी सोडून ते घरच्या ड्युट्या करत असतात व त्याला कारणीभूत त्यांचे वरिष्ठ अधिकारी नुसते उंटावरून शेळ्या राखण्यासारखी कामे या ते 33 के व्ही ला होत आहे अशा या कामचुकारू व बेजबाबदार कर्मचाऱ्यांना कोणाचाही धाक उरलेला दिसत नाही व त्यांचे वरिष्ठ अधिकारी मुख्य अभियंता सिल्लोड नुसते खुर्च्या गरम करणे इतकेच काम यांच्याकडे शिल्लक राहिलेल आहे ग्रामीण भाग असल्यामुळे कुणी अधिकारी इकडे फिरकून सुद्धा बघायला तयार नाही अशा परिस्थितीमध्ये 18 गावच्या नागरिकांनी काय करावे व कुणाकडे दाद मागावी असा प्रश्न या ठिकाणी जनता करीत आहे

Read More

पशुधन उत्तमरित्या जपण्यासाठी नूतन तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय उपयोगी ठरेल — नामदार गिरीश भाऊ महाजन.

जामनेर -आज जामनेर येथील तालुका लघुपशुवैद्यकीय चिकित्सालयाचे भूमिपूजन नामदार गिरीश भाऊ महाजन यांचे हस्ते करण्यात आले. जामनेर तालुका पशुधनाने समृध्द आहे. हे पशुधन उत्तमरित्या जपण्यासाठी नूतन तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय उपयोगी ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी तहसिलदार नाना साहेब आगळे , सा.बां विभागाचे कार्यकारी अभियंता आर डी पाटील , उपअभियंता एस बी चासकर , जितेंद्र पाटील यांचे सह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More

पहूरच्या दोन लेकींचा अपघाती मृत्यू!पिंपळगाव हरेश्वरमध्ये अंत्यसंस्कार; परिसरात शोककळा

पहूर, ता. जामनेर –दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये पहूर येथील दोन लेकींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्यांच्यावर सासरी पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पहिली घटना शनिवारी (ता. १२ जुलै) दुपारी घडली. कल्पना एकनाथ क्षीरसागर (वय ३२, रा. उल्हासनगर) यांचा दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान निधन झाले. दुसरी हृदयद्रावक घटना रविवारी (ता. १३ जुलै) सकाळी आठच्या सुमारास घडली. प्रीती तुकाराम गीते या पिंपळगाव हरेश्वर येथून पहूर येथे नातेवाईकांच्या रक्षाविसर्जनासाठी दुचाकीने येत असताना चिलगाव फाट्याजवळ अपघातात त्यांचे निधन झाले. दोघीही महिलांचा मूळ संबंध पहूर गावाशी असून त्या सध्या सासरी पिंपळगाव हरेश्वर येथे राहात होत्या. या दुहेरी अपघाती मृत्यूच्या घटनेने पहूर व पिंपळगाव हरेश्वर परिसरात शोककळा पसरली आहे.संपर्कात असलेल्या नातेवाइकांत हळहळ व्यक्त केली जात असून, अपघात रोखण्यासाठी अधिक सुरक्षिततेची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Read More

प्र. प्राचार्य डॉ. संजय वामनराव भोळे यांना उत्कृष्ट प्राचार्य व प्रा. डॉ.योगिता चौधरी यांना उत्कृष्ट समन्वय पुरस्कार मिळाल्या बद्दल सत्कार……

शेंदुर्णी ता.जामनेर महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आयोजित करिअर कट्टा अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य डॉ. संजय वामनराव भोळे यांना उत्कृष्ट प्राचार्य व प्रा. डॉ.योगिता चौधरी यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट सह समन्वय पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचा सत्कार मा.श्री मनोज चौधरी उपमहापौर, महापालिका, जळगाव यांच्या हस्ते करण्यात आला . त्यांच्या सोबत मा.श्री चंद्रशेखर पाटील स्थायी समिती सभापती, महापालिका जळगाव ,मा.श्री दिपक सूर्यवंशी, शहर उपाध्यक्ष जळगाव ,श्री.गजानन देशमुख, माजी नगरसेवक,श्री शिवाजी पाटील, शिक्षण संस्था चालक धरणगाव,श्री मनोज कोळपकर, गृहरक्षक समादेशक, जळगाव ,नगरसेवक श्री संजय देविदास सूर्यवंशी , शेंदुर्णी , तसेच शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन मा .दादासाहेब संजयराव गरुड वप्रा. सुनील गरुड सर, जळगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आला.सत्कार व सन्मान केल्याबद्दल प्र.प्राचार्य डॉ. संजय भोळे व प्रा. डॉ. योगिता चौधरी यांनी त्यांचे आभार व्यक्त केले

Read More

जळगाव जिल्ह्यातील संताप जनक प्रकार आता मंत्र्यांच्या मुली सुरक्षित राहिल्या नसून सामान्य नागरिकांच्या मुलीचे काय? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे

जळगाव जिल्ह्यातील संताप जनक प्रकार आता मंत्र्यांच्या मुली सुरक्षित राहिल्या नसून सामान्य नागरिकांच्या मुलीचे काय? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे जळगाव : महाराष्ट्रात महिलांच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. अशातच जळगाव जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची मुक्ताईनगर यात्रा महोत्सवात काही टवाळखोर तरुणांनी छेड काढली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्ताईनगर येथे महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी संत मुक्ताईची यात्रा असते. यंदाही यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान, २६ रोजी रात्री केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची मुलगी यात्रेत गेली असता, काही टवाळखोर तरुणांनी तिची छेड काढली. या प्रकरानंतर केंद्रीय रक्षा मंत्री रक्षा खडसे यांनी मुलीसह महिलांना घेऊन पोलीस स्टेशन गाठलं. या वेळी त्यांनी मंत्र्यांच्याच मुलीची छेड होत असेल इतरांचं काय? असा संतप्त सवाल उपस्थित करीत, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात टवाळखोर तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात महिलांच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. आता मंत्र्यांच्या मुली सुरक्षित राहिल्या नसून सामान्य नागरिकांच्या मुलीचे काय? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Read More

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला बचत गटांना पाठिंबा

नागपूर, ८ मार्च २०२५: आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिला शक्ती, समानता आणि स्वावलंबनाचे प्रतीक आहे. जगभरातील महिलांच्या योगदानाची ओळख पटवून देण्यासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या संदर्भात, अदानी फाउंडेशनने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आणि ग्रामपंचायत आलेसुर येथील हनुमान मंदिराजवळील ‘श्री महालक्ष्मी स्वयंसहाय्यता गटाला’ उपजीविकेसाठी मदत केली. या उपक्रमांतर्गत, गटाला केटरिंग साहित्य पुरवण्यात आले जेणेकरून ते त्यांचा व्यवसाय वाढवू शकतील आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनू शकतील. त्यात १०० केटरिंग प्लेट्स, २०० वट्ट्या, २ भात वाढण्याचे साहित्य, ४ वाट्या, १ जर्मन भांडे, २ भाजीपाला वाढण्याचे चमचे आणि २ चमचे समाविष्ट आहेत. हे सर्व साहित्य वापरकर्त्यांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे, जेणेकरून ते आवश्यकतेनुसार योग्यरित्या वापरता येतील. याशिवाय, गोंडखैरी गावाच्या सरपंच श्रीमती वर्षा आतकरी, आलेसुर गावाच्या सरपंच श्रीमती मालाबाई निकोसे, बचत गटाच्या सीआरओ श्रीमती नीता म्हस्के आणि इतर बचत गट सदस्यांचाही सन्मान करण्यात आला. या प्रसंगी वात्सल्य एनजीओचे श्री. हरीश लाड, ग्रामपंचायत सदस्य श्री. देविदास मोहरले, आलेसुर गावाचे उपसरपंच श्री. मारुती सोनुले उपस्थित होते. कार्यक्रमात वृक्षारोपणही करण्यात आले. ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे या प्राथमिक उद्देशाने अदानी फाउंडेशनच्या उपजीविका प्रोत्साहन योजनांतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सध्या ग्रामीण महिला स्वयंरोजगाराद्वारे त्यांच्या कुटुंब आणि समाजात योगदान देत आहेत. अशा परिस्थितीत, या प्रकारच्या मदतीमुळे ते त्यांचा व्यवसाय अधिक प्रभावीपणे चालवू शकतात आणि त्यांच्या कौशल्यांचा अधिक चांगला वापर करू शकतात. या कार्यक्रमात, अदानी फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी समूहातील महिलांना प्रोत्साहन दिले आणि सांगितले की संस्थेचे उद्दिष्ट केवळ महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे नाही तर त्यांना स्वावलंबी होण्याच्या मार्गावर नेणे देखील आहे. ग्रामीण भागात जेव्हा महिला संघटित पद्धतीने काम करतात तेव्हा त्या केवळ त्यांच्या कुटुंबांची आर्थिक स्थिती सुधारत नाहीत तर समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. आनंद व्यक्त करताना ग्रुपमधील एका सदस्याने सांगितले की, “अदानी फाउंडेशनकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे आमच्या व्यवसायाला एक नवीन दिशा मिळेल. आता आम्ही आमच्या केटरिंग सेवेचा विस्तार चांगल्या सुविधांसह करू शकतो आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो. या मदतीमुळे आम्हाला स्वावलंबी होण्यास खूप मदत होईल.” कार्यक्रमाच्या शेवटी, गटातील महिलांनी अदानी फाउंडेशनचे या पाठिंब्याबद्दल आभार मानले आणि भविष्यातही अशाच प्रकारच्या पाठिंब्याची आशा व्यक्त केली. या उपक्रमाचा फायदा केवळ ‘श्री महालक्ष्मी बचत गटाला’ होणार नाही तर इतर महिलांना स्वयंरोजगार करण्यासाठी प्रेरणा मिळेल. असे उपक्रम महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहेत, जे ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी होण्यास प्रेरित करतात आणि त्यांच्या आर्थिक विकासात मदत करतात.

Read More
error: Don't Try To Copy !!