Headlines

तब्बल एकदा नव्हे तिसऱ्यांदा झाली चोरी.कुऱ्हाड येथे पुन्हा चोरट्यांची सलामी

जामनेरलोहारा रस्त्यावरील तारांगण हॉटेल मध्यरात्रीनंतर फोडलेचोरट्यांनी चक्क सीसीटीव्ही, DVR लांबविले.दुकानात असलेली जवळपास चार ते पाच हजार रुपयाची चिल्लर लांबवली.तसेच शरीरासाठी आवश्यक असलेली महत्वाची जवळपास दहा हजार रुपये किमतीची टॉनिक देखील चोरून नेली.बहुतेक लोहारा येथे काल रात्री पाच ते सहा दुकाना फोडून त्यांनी आपला मोर्चा कुऱ्हाड गावाकडे वळविला असेल.सबंधित चोरीचा तपास जलदगतीने लावण्याची ग्रामस्थांची मागणी

Read More

वाकडी येथे बसस्थानक परिसरासह अवैध धंदे दारुचा व सट्टाचा महापूर

====================वाकडी.ता.जामनेर.दि.०३/०२/२६ वाकडी बसस्थानक सह परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारुचा महापूर सुरू असून यात अनेकांचे संसार उद्धवस्त झाले,बसस्थानक परिसरात खुले आम अवैधधंदे बोकाळाले असतांनाही या दारु विक्रेत्यांवर पोलीसांकडून कुठलेही कार्यवाही होत नसल्याने गावातील नागरिक ञस्त झाले आहे, महिला वर्ग शालेय विध्यार्थी हैराण झाले आहे गावात गेल्या अनेक दिवसांपासून गावांच्या चारही बाजूंनी अवैध दारुची खुलेआम विक्री होत असून यात अनेक जवान तरुण व्यसनाच्या आहारी गेले आहे , मुली-बाळीचे संसार उद्धवस्त होत आहे, बराच मुली विधवा झाल्या आहेत, त्याचे संसार उघड्यावर पडले आहे नवीन निवडुन आलेल्या सरपंच व सभासदांना च्या वतीने गावातील दारू बंद व्हावी यासाठी पहूर पोलिस ठाणे येथे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लेखी ठराव दिला, काही वेळा पुरती वाकडी येथील दारुवाल्याचे धाबे दणाणले होते, परंतु पुन्हा देशी दारूचा महापूर बसस्थानक परिसरात चालू आहे,त्याच्यावर कोण्याच्याही लगाम नाही, किंवा दचक नाही, बसस्थानक परिसरात देशी, इंग्लिश,गावठी, दारूचा महापूर चालू आहे, दारू विक्रेत्यांवर पोलीसांच्या वचक दिसून येत नाही असे गावकरी मधून चर्चा करताना दिसत आहेत ,अवैध दारू विक्रेत्यांनी धुमाकूळ घातला आहे त्यावर वरिष्ठ स्तरांवर कार्यवाही अशी मागणी गावकरी करीत आहेत.

Read More

गरुड विद्यालयात विद्याथ्यांनी स्वता बनवले रंगबेरंगीआकाश कंदिल.

शेंदुर्णी – येथील आ ग.र.ग माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी रंगबेरंगी आकाश कंदिल बनवले..आपल्या घरासाठी नेहमी आपण चांगल्या प्रकारचे सुंदर दिसावे म्हणून बाजारातून आकाश कंदील खरेदी करत असतो परंतु स्वताच्या हाताने आकाश कंदिल बनवून ते घरी लावाणे. यात मुलांना वेगळा आंनद मिळतो.मुलांनी चांगल्या प्रकारचे आकाश कंदील बनवण्याचे विचार करून ते प्रत्यक्ष करून दाखविले यासाठी वर्गांमध्ये शिकवण्याच्या विषयामध्ये कार्यानुभव अंतर्गत हा विषय प्रसंगोपात सोपे प्रकार मध्ये शिकविला जातो यासाठी विद्यालयाचे सहशिक्षक श्री जी टी कुमावत सर यांनी मुलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून आकाश कंदील तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले होते विद्यार्थ्यांनी यासाठी लागणारे साहित्य खरेदी करून कमी खर्चामध्ये सुंदर व आकर्षक असे आकाश कंदील तयार केले यामध्ये प्रामुख्याने कलाशिक्षक श्री डी एच बारी सर व श्री एस आर चव्हाण सर यांनी सुद्धा सहकार्य केले यासाठी इयत्ता आठवीचे वर्ग आकाश कंदील बनवण्यासाठी घेण्यात आले उपक्रम बनवत असताना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर एस चौधरी सर ,पर्यवेक्षक श्री व्ही एम शिरापुरे सर .किमान कौशल विभागाचे प्राध्यापक श्री शैलेंद्र शेळके सर ,श्री राहुल गरुड सर ,श्री सुरवाडे सर .उपक्रम पाहण्यासाठी उपस्थित होते तसेच इयत्ता आठवीच्या वर्गाचे सर्व वर्गशिक्षक यांचेही सहकार्य मिळाले हा चांगला आणि स्तुत्य उपक्रम म्हणून घेण्यात आला .हा दरवर्षी कार्यानुभव अंतर्गत उपक्रम घेण्यात येतो .शिका आणि कमवा यासाठी पण हा उपक्रम घेण्यात येतो .वर्षामध्ये स्वबळावर कौशल्य निर्माण करून रोजगारही मिळवला जाऊ शकतो

Read More

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,क्रीडा व युवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणेजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव द्वारा आयोजित तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत वाकोद विद्यालयाचे यश

दि.02/08/2025 वार शनिवार जामनेर येथे ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय आज 14 वर्ष,17 वर्ष,19 वर्ष वयोगटातील मुले व मुली तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या. यात राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयातील14 वर्षे वयोगटात (मुले)52 किलो वजन गटात कु. कार्तिक रणजीत सोनेत17 वर्ष वयोगटात (मुले)48 किलो वजन गटात कु. गोपाल आनंद सोनेत19 वर्ष वयोगटात(मुली) 57 किलो वजन गटात कुमारी गायत्री रणजीत सोनेत विजय होऊन जिल्हास्तरावर निवड झाली या निवडीबद्दल संस्थेचे चेअरमन आदरणीय दादासाहेब श्री. संजयरावजी गरुड संस्थेचे व्हा. चेअरमन आबासाहेब श्री.भीमराव शेळके संस्थेचे सचिव काकासाहेब श्री.सागरमलजी जैन संस्थेचे सहसचिव दादासो श्री.यु.यु.पाटील संस्थेचे कार्यालयीन सचिव भाऊसाहेब श्री.दीपकरावजी गरुड ,वस्तीगृह सचिव सूर्यवंशी भाऊसाहेब संस्थेचे सर्व संचालक मंडळ जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष आदरणीय श्री. अशोक भाऊ जैन जैन फॉर्म वाकोद व्यवस्थापक आदरणीय श्री. विनोद सिंहजी राजपूत गावचे सरपंच, पोलीस पाटील, पंचक्रोशीतील गावकरी,खेळाडूंचे पालक शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस.टी.चिंचोले पर्यवेक्षक श्री एन.टी.पाटील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वस्तीगृहाचे कर्मचारी, यांनी खेळाडूचे कौतुक केले.

Read More

खडकी ता. जामनेर येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

खडकी गावात संत सेवालाल महाराज जयंती भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरी करण्यात आली. यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक वेशभूषा आणि स्वच्छता अभियान राबवत गावकऱ्यांनी एक आदर्श उपक्रम साकारला. संपूर्ण गावाच्या सहभागातून झालेल्या या उपक्रमामुळे सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन सुशील भाऊ नाईक यांनी केले होते. कार्यक्रमाला राज्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन तसेच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली.गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे जयंती उत्सवाला भव्य स्वरूप प्राप्त झाले.

Read More

‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याच्या चौकशी समितीच्या अध्यक्षालाच अटक. शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

ना गपूर (प्रतिनिधी) राज्य भर गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याच्या चौकशी समितीचे अध्यक्ष राहिलेले विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांना गुरुवारी रात्री अटक केली. विशेष म्हणजे, शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासासाठी सुरुवातीला चिंतामण वंजारी यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती.त्यांच्या अहवालाच्या आधारेच या संपूर्ण चौकशीला नवीन वळण मिळाले. आता स्वतः वंजारीच चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत.नागपूर जिल्ह्यात २०१९ पासून गैरमार्गाने ‘शालार्थ आयडी’ प्रदान करून वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात आले. नागपूर विभागीय उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी रवींद्र पाटील यांनी १२ मार्च रोजी पोलिसांकडे या घोटाळ्याचीपाटील यांनी १२ मार्च रोजी पोलिसांकडे या घोटाळ्याची तक्रार केली. उल्हास नरड यांच्या सांगण्यावरून ही तक्रार करण्यात आली होती. प्राथमिक माहिती अहवालानुसार, विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने फेब्रुवारी २०२५ मध्ये शिक्षण आयुक्तांना अहवाल सादर केला होता. उपसंचालक कार्यालयाने २११ प्राथमिक शिक्षक, २ मुख्याध्यापक, १८ कनिष्ठ लिपिक, १३ शिपाई अशी २४४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यादी दिली होती. त्यानंतर शिक्षण आयुक्तांनी वंजारी यांच्या अहवालाच्या आधारे कठोर भूमिका घेत तपासणी सुरू केली.यासाठी २०१९ ते २०२५ पर्यंत नागपूर जिल्ह्यातील संशयित प्राथमिक शाळांमधील ‘शालार्थ आयडी’चा तपास सुरू केला होता. परंतु, आता वंजारी यांनाच अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, वंजारी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होण्यापूर्वी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी होते.या दरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकारी असलेले मृत सोमेश्वर नैताम यांची खोटी स्वाक्षरी करून २०१० ते २०१४ या काळात शिक्षक रुजू झाल्याचे दाखवण्यात आले आहे.तसेच, त्यांचे ‘शालार्थ आयडी’ २०१९ ते २०२५ या काळात निर्माण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे वंजारी यांना अटक करण्यात आली असून या दिशेने तपास केला जाणार आहे.

Read More

जामनेर तालुका – अतिवृष्टीग्रस्त क्षेत्राची पाहणी

जामनेर तालुक्यातील रोटवद , नाचणखेडा व लाखोली परिसरातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राची पाहणी दिनांक १८.०८.२०२५ रोजी मा. अपर जिल्हाधिकारी श्री. विजयकुमार ढगे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार जामनेर ,स्थानिक पदाधिकारी व अधिकारी कर्मचारी यांच्यासमवेत करण्यात आली. सदर पाहणी दरम्यान संबंधित गावाचे सरपंच, पोलिस पाटील, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, साहाय्यक कृषी अधिकारी, महसूल मंडळ अधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. बाधित कुटुंबांची पाहणी अतिवृष्टीमुळे मौजे लाखोली येथील कुटुंब प्रमुख उस्मान तेजबशहा फकीर, शांताबाई देवराम चौधरी, नामदेव काशिनाथ पाटील व माणिक भील यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झालेले आहे. याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. शेती नुकसानीची पाहणी• मौजे भिलखेडा शिवार गट क्र. 35/3 धारक श्री. विद्याधर रघुनाथ पाटील• मौजे नाचणखेडा शिवार गट क्र. 8 धारक श्री. विलास अशोक चौधरी• मौजे रोटवद शिवार गट क्र. 29, 184, 274, 193, 194 व 190 धारक श्री. भारत काशीनाथ देशमुख, सौ. कमलाबाई शालिक देशमुख, सौ. मीना भगवान देशमुख, श्री. विजय शालिक देशमुख, श्री. शालिक गोवा देशमुख व श्री. राजू शालिक देशमुख यांच्या शेतशिवारालगतच्या नाल्यात पूरस्थिती निर्माण होऊन कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आले. प्रशासनाचे निर्देश मा. अपर जिल्हाधिकारी यांनी बाधित शेतकरी व नागरिकांशी संवाद साधून शासन स्तरावर करण्यात येत असलेल्या मदत व उपाययोजना याबाबत माहिती दिली. तसेच संबंधित ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून प्रस्ताव सादर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

Read More

समता व सामाजिक एकात्मतेचा आदर्श; जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष विवाह नोंदणी संपन्न

जळगाव, दि. ९ एप्रिल — (प्रतिनिधी ) समाजातील भेदभाव दूर करून सर्वसमावेशकतेला चालना देणाऱ्या ‘दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजने’च्या उद्दिष्टांना अधोरेखित करणारा एक आदर्श विवाह सोहळा आज जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे पार पडला.तांदलवाडी (ता. रावेर) येथील श्री. महेंद्र श्रीराम पाटील (दिव्यांग) आणि श्रीमती दमयंती दिनकर कुंवर (अव्यंग) यांनी नोंदणी पद्धतीने विवाह करून सामाजिक समता, परस्पर स्वीकार आणि एकात्मतेचा संदेश दिला. या विवाहामुळे समाजासमोर एक सकारात्मक व प्रेरणादायी उदाहरण उभे राहिले आहे. या प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी नवदांपत्याची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांच्या उज्ज्वल, सुखमय वैवाहिक जीवनासाठी मंगलकामना व्यक्त केल्या. दिव्यांग व सुदृढ व्यक्तींच्या अशा विवाहांमुळे सामाजिक समतोल राखण्यास मदत होत असून दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणाला बळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.राज्य शासनाच्या धोरणानुसार अशा दांपत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. सामाजिक रूढींना छेद देणारा हा विवाह ‘समावेशक समाजा’कडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. “विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा मिलाफ नसून तो सामाजिक बदलाचा एक महत्त्वाचा घटक आहे. महेंद्र आणि दमयंती यांनी स्वीकारलेला हा मार्ग इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल,” असे मत जिल्हा प्रशासनाने व्यक्त केले.

Read More

जि.प. केंद्र शाळा मुलांची पाळधी येथे शालेय व्यवस्थापन समितीची कार्यकारणी जाहीरअध्यक्षपदी कैलास राजपूत, तर उपाध्यक्षपदी गोपाल वाणी यांची निवड.

प्रतिनिधी.पाळधी ता जामनेर येथील जि प मुलांची केंद्र शाळेची नूतन व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली. ही व्यवस्था समितीची रचना पालकांमधून शासकीय निर्देशानुसार करण्यात आली.सर्वानुमते शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी कैलास राजपूत तर उपाध्यक्षपदी गोपाल वाणी यांची निवड करण्यात आली. सदर सभा शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सोनाली ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्तम प्रकारे पार पडली तसेच सभेकरिता पालक वर्ग व महिला पालक वर्ग देखील उपस्थित होते. यामधून व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद पारधी शाळा मुलांची सर्वानुमते पालका मधून विनोद वाघ,गजानन शिंदे, मुकेश मराठे,उत्तम वाणी, गोपाल वाणी ,कैलास राजपूत ,योगेश भोंबे, प्रवीण सुरवाडे, शांताराम वाघ, शितल शिंदे, या मान्यवरांची समितीवर निवड झाली. सदर सभेची रुपरेषा संभाजी हावडे यांनी मांडली तसेच या सर्व निवडक आम्ही शालेय शिक्षक वृंद नंदा अपार मॅडम, हेमलता पाटील मॅडम, जितेंद्र नाईक अमित मुंडे या सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

Read More

कुंभारी बु येथील तरुणांचा पत्नी सासू सासरे साला याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

वाकडी ता जामनेर दि कुंभारी बु येथील तरुणांचा ग्राम लपालि ता मोताळा येथे पत्नी सासु सासरे. शालक याच्या त्रासाला कंटाळून विष पाषाण करून आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचि घटना काल दि ८/ रोजी दुपारी २ ते ३ वाजेच्या दरम्यान सासुरवाडी येथे घडल्याने धामणगाव बडे .पो स्टेशन ला अमलदार गजानन पाटील यानी २८२/२०२५ कलम १०८,३(५)भारतीय न्याय सहिंता २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलकुंभारी बु ता जामनेर येथील तरूण बादल हवसु मंडाळे हा काल दि ८ रोजी लपालि येथे सासुरवाडी ला पत्नी रुपाली हि गरोदरपणात माहेरी असल्याने व तिने पोटातील बाळ पाडले असे माहिती घेण्यासाठी व पत्नीला सोबत घेवून येतो असे भाचा यास सांगून गेला होता मात्र तिन वाजेच्या दरम्यान श्रीराम जोशी यांना फोन वरुन माहिती पडले कि बादल हवसु मंडाळे हा विषारि औषधी घेवून लपालि येथे मरण पावला सदर तरुण लपालि येथील बंडु होसा एकनार याच्या घरी नातेवाईक याना आढळून आला असता ग्रामस्थांनी दिलेल्या माहिती नुसार बादल हवसु मंडाळे व पत्नी रुपाली बादल मंडाळे .संजय जयराम भवर सासरा. लिलाबाई संजय भंवर सासू .अक्षय संजय भंवर शालक रा ग्राम लपालि याच्यात जोरदार वाद झाल्याने व त्याचे त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून मरण पावला असे फिर्यादी इंदूबाई चिंधु मुके रा कुंभारी बु ता जामनेर यांनी धामणगाव बडे पोलीस स्टेशन फिर्याद देण्यात आली आहे अमलदार गजानन पाटील यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उप निरीक्षक राहुल वरारकर याच्याकडे देण्यात आला आहे

Read More
error: Don't Try To Copy !!