Headlines

शिक्षक, पदवीधर आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन

टप्पा अनुदान शाळांना अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करावी, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, संच मान्यतेचा जाचक जीआर रद्द करावा, समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांना कायम करावे, यासह इतर मागण्यांसाठी आज (शुक्रवारी)शिक्षक व पदवीधर आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलने केले. या आंदोलनात आमदार जयंत आसगावकर, आमदार विक्रम काळे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार किशोर दराडे, आमदार अभिजीत वंजारी, आमदार सुधाकर आडबाले, आमदार अभ्यंकर सहभागी झाले होते. जोपर्यंत शासन शिक्षकांच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असल्याचे यावेळी आमदार जयंत आसगावकर यांनी सांगितले.

Read More

खडकी ता. जामनेर येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

खडकी गावात संत सेवालाल महाराज जयंती भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरी करण्यात आली. यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक वेशभूषा आणि स्वच्छता अभियान राबवत गावकऱ्यांनी एक आदर्श उपक्रम साकारला. संपूर्ण गावाच्या सहभागातून झालेल्या या उपक्रमामुळे सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन सुशील भाऊ नाईक यांनी केले होते. कार्यक्रमाला राज्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन तसेच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली.गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे जयंती उत्सवाला भव्य स्वरूप प्राप्त झाले.

Read More

वाकडी गरुड विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी. एस. पाटील यांना राज्यस्तरीय “महाराष्ट्र भूषण २०२६” पुरस्कार

जामनेर (प्रतीनिधी) वाकडी गरुड विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री पी. एस. पाटील (अप्पासाहेब) यांना उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल राज्यस्तरीय “महाराष्ट्र भूषण २०२६” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निसर्ग मित्र समिती जळगाव व सार्वजनिक सेवा मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने हा सन्मान प्रदान करण्यात आला. नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते श्री पाटील सरांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री पी. एस. पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक व पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, “पाणी अडवा–पाणी जिरवा” उपक्रम, पशू-पक्षी संवर्धन तसेच प्रदूषणमुक्त दिवाळी अभियान यांसारखे उपक्रम प्रभावीपणे राबवून समाजात जनजागृती केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय सन्मान देण्यात आला. या कार्यक्रमास जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष, संचालक मंडळ तसेच सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. श्री पी. एस. पाटील यांना मिळालेल्या या गौरवाबद्दल धी शेंदूर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी चे चेअरमन आदरणीय दादासाहेब संजयराव गरुड, उपाध्यक्ष आबासाहेब भीमराव शेळके, सचिव सागरमल जैन, सहसचिव यु. यु. पाटील, कार्यालयीन सचिव भाऊसाहेब दिपक गरुड व सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले. तसेच अण्णासाहेब भास्करराव गरुड माध्यमिक विद्यालय चे पर्यवेक्षक श्री ए. डी. राजपूत, सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही पाटील सरांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Read More

जामनेर – टाकळी बुद्रुक येथे दुर्दैवी घटना – 43 वर्षीय युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू

जामनेर तालुक्यातील टाकळी (बुद्रुक) गावात शुक्रवारी (दि. २२ ऑगस्ट) संध्याकाळच्या सुमारास भीषण घटना घडली. गावातील निलेश मुरलीधर माळी (वय ४३) या व्यक्तीचा विहिरीत बुडून मृत्यू झाला असून, ही घटना गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त करत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मृत निलेश माळी आपल्या काही मित्रांसह गावाबाहेरील एका विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. दरम्यान त्याने विहिरीत उडी घेतली असता, डोक्याला जोराचा मार लागून तो बेशुद्ध झाला. त्यामुळे त्याला पाण्यातून वर येता आले नाही आणि त्याचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.घटनेनंतर मित्र व ग्रामस्थांनी तातडीने प्रयत्न करून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर त्याला तातडीने जामनेर येथील सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले.

Read More

शेंदुर्णीच्या खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत ६ सुवर्ण ६ रजत व ३ कांस्य पदकांची कमाईराज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

शेंदुर्णी ता जामनेर … क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद पुणे , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व जळगाव जिल्हा तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय शालेय तायक्वांडो क्रीडा स्पर्धा नुकत्याच क्रीडा संकुल जळगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या .शेंदुर्णी येथील श्री छत्रपती स्पोर्ट्स क्लब च्या तायक्वांडो खेळांडूनी झालेल्या शालेय विभागीय तायक्वांडो स्पर्धेत ६ सुवर्ण , ६ रौप्य व ३ कांस्य पदक प्राप्त केले, सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूची १३ आक्टो ते १७ आक्टो दरम्यान संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धे साठी निवड झाली . आ.ग.र.गरुड विद्यालय 1 ) कामिनी विश्वनाथ नाथ सुवर्ण पदक2)दक्ष विठ्ठल लोखंडे सुवर्ण पदक3)आर्यन शांताराम वानखेडे सुवर्ण पदक४) रागिणी सिद्धेश्वर पाटील सुवर्ण पदक५) विनायक योगेश जावरे रजत पदक६)प्रद्युम्न सचिन जगताप रजत पदक७) साहिल प्रवीण शेलार रजत पदक८) चिन्मय सुर्वे रजत पदक९) दृष्टी नितीन भारुडे कांस्य पदक१०)आरुषी वाघ कांस्य पदक श्रीकृष्ण माध्य.विद्यालय१)राधिका राजेंद्र गवळी सुवर्ण पदक२) नेहा संदीप गुजर रजत पदक३) तनिष्का बाळू सुळ रजत पदक४) उमेश दिलावर तडवी कांस्य पदक निर्मल इंटरनॅशनल स्कूल१) सर्वम संजय राजपूत सुवर्ण पदक असे यश संपादन केले.सदर खेळाडूना शेंदुर्णी येथील छत्रपती स्पोर्ट्स क्लब चे प्रशिक्षक लोचना चौधरी व मोहित चौधरी यांचे मार्गदर्शन लाभलेया यशा बद्दल खेळाडूंचे जळगाव जिल्हा तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल जोनवाल सचिव राजेंद्र जंजाळे सहसचिव श्रीकृष्ण चौधरी सर संचालक सुनिल मोरे श्री छत्रपती स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील शेंदुर्णी एज्युकेशन सोसा चे अध्यक्ष संजयदादा गरुड,सरस्वती शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र गुजर यांनी अभिनंदन केले आहे.

Read More

समाजासाठी येणारे काळ जोखमीचा नंदकिशोर साखला

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर प्रतिनिधी – सध्याची सामाजिक स्थिती पाहता येणारा काळ हा समाजासाठी जोखमीचा असेल, असे मत भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर साखला यांनी व्यक्त केले. ते साक्री तालुक्यातील बळासाने तीर्थ क्षेत्रात खानदेश विभागातर्फे आयोजीत खानदेश विभागाच्या पदाधिकारी व कार्यकर्ता स्नेह मिलनात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीओम विश्वकल्याण विमलनाथ तीर्थभूमी ट्रस्टचे खजिनदार व पंचायत समिती सदस्य महावीर जैन होते. नमस्कार महामंत्राने व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.खानदेश उपाध्यक्ष स्व. लतीश जैन यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पित केली.प्रास्ताविक खानदेश विभाग अध्यक्ष प्रा.चंद्रकांत डागा यांनी केले.साखला पुढे म्हणाले, समाजातील समस्या ओळखणे, त्यावर वैज्ञानिक पद्धतीने संशोधन करून उपाय सुचविणे ही संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांची कार्यशैली राहिली आहे. चाळीस वर्षापासून निरंतर हे काम सुरू आहे. समाजात अनेक बदल झाले आहेत. मुला-मुलींमध्ये शैक्षणिक स्तर भिन्न झाला आहे. मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवल्याने समस्या वाढल्या आहेत. कुटुंब व्यवस्था उध्वस्त होत आहे. त्यासाठी आपल्या व्यवहाराने संस्काराने राहणीमानाच्या पद्धतीने सुरक्षा कवच निर्माण करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय सचिव दीपक चोपडा यांनी संघटनेच्या पाया मजबूत करण्यासाठी संघटने बारा महिन्यात 14 कार्यक्रम दिले हे कार्यक्रम यशस्वी करणे प्रत्येक शाखेचे आद्य कर्तव्य असल्याचे सांगितले. राज्य महासचिव प्रवीण पारख यांनी, कार्यकर्ता हा संघटनेचा आत्मा आहे.समाजकारणात करता करता अनेक जण राजकारणात गेले. खानदेशात पंचवीस शाखा कार्यरत असून वर्षभरात 120 फाउंडेशन कार्यक्रम त्यांनी घेतले. महाराष्ट्रातील एकूण कार्यक्रमात 40% हिस्सा आहे.राज्य उपाध्यक्ष विनय पारखे यांनी येत्या वर्षात खानदेशाने किती कार्यक्रम घेतले पाहिजे याचे टार्गेट दिले. माजी राज्य उपाध्यक्ष हरकचंद बोरा यांनी संघटनेने नव्याने सुरू केलेले पारिवारीक अदालत विषयी माहिती दिली. राज्य सचिव विजय दुगड यांनी संघटनेचे कार्यक्रम घेण्याचे आव्हान केले. डॉक्टर कांतीलाल टाटीया यांनी संघटनेने पाण्याच्या संदर्भात केलेल्या कार्याची व संघटनेचे महत्व विशद केले तर जयश्री गोगड यांनी अंकाचे महत्व सांगितले.**कार्यक्रम दरम्यान नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार सन्मानपत्र देऊन केला.ललित रमनलाल छाजेड(शहादा), दीपक प्रवीणजी डांगी (जामनेर), धीरज ओस्तवाल(शेंदुर्णी), देवेंद्र चंदनमल जैन (नंदुरबार),अमर जैन(जळगांव), निर्मल कोठारी( भुसावळ), नितीन जैन (मुक्ताईनगर )जयश्री विनोदकुमार पगारिया (साक्री) तर विविध क्षेत्रात नियुक्ती झालेल्या राजेंद्र टाटिया (साक्री जैन संघ अध्यक्ष),चंद्रकांत डागा(ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या राज्य कार्यकारिणी सदस्य),जोशीला पगारिया(गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या केंद्रीय महिला अध्यक्ष)मनोज डागा(अखिल भारतीय खरतरगछ परिषद राष्ट्रीय उपाध्यक्ष), सुमित मुनोत(समस्त ज़िला समन्वयक), जयश्री गोगड (एस्ट्रॉलॉजर) यांचा सत्कार शॉल, माळा देऊन मान्यवरांच्या हस्ते केला गेला.**सन 2025मध्ये जिल्ह्यात सर्वाधिक फाउंडेशन कार्यक्रम घेतल्या बद्दलतळोदा,जामनेर व शिंदखेडा शाखेचे अध्यक्ष राहूल जैन, कुशल बोहरा,सौ मोना चोरड़िया व मयुर ओस्तवाल यांचा त्यांच्या टीम सह ट्रॉफी देऊन सत्कार केला.नवनिर्वाचित नगरसेवक ललित छाजेड, जयश्री पगारिया यांनी मनोगत व्यक्त केले तर सूत्रसंचालन जळगाव महिला जिल्हाध्यक्ष सोनाली कोठारी तर आभार विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत यांनी मानले.

Read More

मुल्यवर्धन प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्याचा आत्मविशवास आणि कार्य क्षमता वाढेल…. गटशिक्षणाधिकारी विष्णू काळे

शेंदुर्णी – मुल्यवर्धन विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी महत्वाचा आहे. या प्रशिक्षणामुळे शिक्षाकांची कार्य क्षमता सुधारेल आणी त्यांना विद्याथ्यामध्ये मुल्ये रुजवण्याचा आत्मविश्वास मिळेल. असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी विष्णू काळे यांनी शेंदुर्णी येथे गरुड प्राथमिक शाळेत आयोजीत प्रशिक्षणत केले.महाराष्ट्र शासन व शांतीलाल मुथ्था फॉउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मूल्यवर्धन प्रशिक्षण 3. 0 दिनांक – 01-10-2025 पासून 08-10-2025 पर्यंत दोन टप्प्यात समूह साधन केंद्र शेंदुर्णी येथे आ. ग. गरुड विद्यालय शेंदुर्णी येथे सुरु असून या प्रशिक्षणात जामनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विष्णू काळे , मूल्यवर्धन उपक्रमाचे तालुका समन्वयक, लखन कुमावत यांनी भेट दिली.गटशिक्षाणाधिकारी विष्णू काळे यांनी मार्गदर्शन करतांना या प्रशिक्षणाची उपयोगीता व शिक्षकाची भुमिका स्पष्ट केली. तसेचे विद्यार्थ्यामध्ये नैतिक मुल्यांची रुजवणूक करणे, सामाजीक जवाबदारीची जाणीव निर्माण करणे, संवेदनशील आणी सहकार्यशील नागरीक घडवणे, शाळामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करणे.असे मूल्यवर्धनाची उदिष्ठे स्पष्ट केली.यावेळी कुलाचे कुलसंचालक तथा केंद्रप्रमुख निवृत्ती जोहरे , गरुड शाळेच्या मुख्याध्यापिका सौदामिनी गरुड , तसेच सुलभक रविंद्र सपकाळे व योगेश इंगळे हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गोपाल कुमावत यांनी केले.

Read More

शॉर्टसर्किटमुळे ज्वारीच्या गंजीला आग; शेतकऱ्यांचे मोठे नुकसानरांजणी येथे दुर्दैवी घटना; पंचनाम्यासह तातडीच्या मदतीची मागणी

रांजणी, प्रतिनिधी — रांजणी येथे विजेच्या लोंबकळलेल्या तारांमुळे झालेल्या शॉर्टसर्किटमुळे शेतातील ज्वारीच्या गंजीला आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना घडली. या आगीत शेतकरी कौसल्याबाई जगदेव मगरे यांच्या शेतातील नुकतीच कापणी करून पुंज मारून ठेवलेली ज्वारी पूर्णपणे जळून खाक झाली.दुपारच्या सुमारास ही घटना घडली. परिसरातील विजेच्या तारांमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ठिणग्या पडून ज्वारीच्या गंजीने पेट घेतला. आग वेगाने पसरल्याने शेतमाल वाचविण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.हाता-तोंडाशी आलेला घास आगीत जळाल्याने मगरे कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. शेतीसाठी मोठ्या मेहनतीने व खर्च करून तयार केलेला माल काही क्षणांत नष्ट झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.दरम्यान, परिसरातील अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकलेले असून तारा लोंबकळत असल्याची गंभीर समस्या नागरिकांनी मांडली आहे. अशा धोकादायक परिस्थितीकडे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यातही अशा दुर्घटना घडू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. केवळ वीजबिल वसुलीवर भर देणाऱ्या वीज वितरण विभागाने तातडीने दुरुस्ती व देखभाल कामे करावीत, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.

Read More

तयारीला लागा… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मोठा निर्णय! सुप्रीम कोर्टात काय घडलं?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून सध्या राज्यात मोठे राजकीय वादळ उठले आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न सोडवला असल्याचे कोर्टात सांगण्यात आले, तरी निवडणुकांच्या तारखांसंदर्भात अनिश्चितता कायम आहे. सुप्रीम कोर्टाने आज, म्हणजे २५ फेब्रुवारीची तारीख निवडणुकीच्या सुनावणीसाठी निश्चित केली आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुप्रीम कोर्टाने दिली पुढील तारीख सुरुवातीला या प्रकरणाची सुनावणी ५ फेब्रुवारी रोजी होणार होती. मात्र, दिल्लीतील निवडणुकांमुळे ही तारीख पुढे ढकलली गेली. आजच्या सुनावणीत ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून जो गोंधळ निर्माण झाला होता, तो दूर झाल्याचे स्पष्ट झाले. राज्य सरकारने निवडणुका लवकरात लवकर घेण्याची तयारी दर्शवली आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न क्लिअर झाला, पण निवडणुका लांबणीवर राज्य सरकार आणि याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात स्पष्ट केले की, ओबीसी राजकीय आरक्षणाचा विषय आता निकाली निघाला आहे. सर्वपक्षीय सहमती असल्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षात मतभेद नाहीत. मात्र, निवडणुकांच्या तारखा निश्चित करण्यात अजूनही वेळ लागत आहे. राजकीय वर्तुळात तणाव कायम राजकीय वर्तुळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत तणावाचे वातावरण आहे. निवडणुका लांबणीवर गेल्यामुळे सर्वच पक्षांची तयारी प्रभावित झाली आहे. निवडणुका लांबणीवर जात असल्याने स्थानिक पातळीवर नेतृत्वाला आणखी वेळ मिळेल,अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे. २५ फेब्रुवारीचा निर्णय महत्त्वाचा २५ फेब्रुवारीच्या सुनावणीत सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेते, यावर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. जर या तारखेला अंतिम निर्णय घेण्यात आला, तर निवडणुका एप्रिल किंवा मेमध्ये घेता येतील. या निर्णयामुळे राज्यातील राजकीय चित्र आणखी स्पष्ट होईल. निवडणुका वेळेवर होण्यासाठी प्रयत्न सुरू राज्य सरकारच्या वतीने लवकरात लवकर निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयासमोर भूमिका मांडण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटल्याने निवडणुकीला आणखी काही अडथळा येणार नाही, असे सरकारने सांगितले आहे. राजकीय आरक्षणाच्या संदर्भातील गुंता संपला ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातील प्रमुख मुद्दा राज्य सरकारने न्यायालयात मांडून निकाली काढल्याचे सांगितले.

Read More

तब्बल एकदा नव्हे तिसऱ्यांदा झाली चोरी.कुऱ्हाड येथे पुन्हा चोरट्यांची सलामी

जामनेरलोहारा रस्त्यावरील तारांगण हॉटेल मध्यरात्रीनंतर फोडलेचोरट्यांनी चक्क सीसीटीव्ही, DVR लांबविले.दुकानात असलेली जवळपास चार ते पाच हजार रुपयाची चिल्लर लांबवली.तसेच शरीरासाठी आवश्यक असलेली महत्वाची जवळपास दहा हजार रुपये किमतीची टॉनिक देखील चोरून नेली.बहुतेक लोहारा येथे काल रात्री पाच ते सहा दुकाना फोडून त्यांनी आपला मोर्चा कुऱ्हाड गावाकडे वळविला असेल.सबंधित चोरीचा तपास जलदगतीने लावण्याची ग्रामस्थांची मागणी

Read More
error: Don't Try To Copy !!