Headlines

पहूर कसबे ग्रामसभेत अधिकाऱ्यांवर संतप्त हल्लाबोल !आजी – माजी ग्रामविकास अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव? ग्रामस्थांनी वाचला समस्यांचा पाढा !

पहूर, ता. जामनेर :पहूर कसबे ग्रामपंचायत कार्यालयातील आजची ग्रामसभा संतापाच्या वातावरणात पार पडली. तब्बल दहा महिने उलटूनही माजी ग्रामविकास अधिकाऱ्याने दप्तर सुपूर्द केले नाही, या गंभीर प्रकारावरून ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला जाब विचारला. माजी प्रशासक रामचंद्र वानखेडे यांनी थेट सवाल करत प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जनतेला वेठीस धरून नेमकं कोणाचं रक्षण केलं जातंय?” असा त्यांचा संतप्त सवाल सभागृहात चर्चेचा विषय ठरला. गुरुवारी (ता. ७) सकाळी ९ वाजता प्रशासक सौ. आशाताई शंकर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. या वेळी विद्यमान ग्रामविकास अधिकारी शिवदास गव्हाळे यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले की,माजी ग्रामविकास अधिकारी अशोक बाविस्कर यांनी केवळ चालू वर्षाचा चार्ज दिला असून, मागील कार्यकाळातील दप्तर अद्याप त्यांच्याच ताब्यात आहे. या प्रकारामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. सार्वजनिक कार्यालयाचे दप्तरच उपलब्ध नसेल, तर जनतेला माहिती वेळेत कशी मिळणार ? असा सवाल उपस्थित करण्यात आला. दरम्यान तत्कालीन ग्रामविकास अधिकारी अशोक बाविस्कर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की सदर दप्तर हे ग्रामपंचायत कार्यालयातच आहे, शासकीय दप्तर मी घरी कशाला घेऊन येऊ? असा प्रश्न करून त्यांनी दप्तर ग्रामपंचायत मध्येच शोधण्याचा सल्ला दिला. माहिती अधिकारालाही अडथळादप्तर उपलब्ध नसल्यामुळे माहिती अधिकाराखाली मागविलेली माहिती वेळेत देता येत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, संबंधितांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. पार्टटाईम अधिकाऱ्यांमुळे कारभारावर परिणाम पहूर कसबे सारख्या मोठ्या गावासाठी पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नसणे ही गंभीर बाब असल्याचे ग्रामस्थांनी मांडले. विद्यमान अधिकारी शिवदास गव्हाळे यांच्याकडे रांजणी गावाचाही कार्यभार असल्याने स्थानिक समस्या दुर्लक्षित होत असल्याची तक्रार करण्यात आली. पहूरसाठी कायमस्वरूपी अधिकारी नेमण्याची मागणी करण्यात आली. ग्रामस्थांनी मांडल्या विविध समस्याग्रामसभेत नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. वाघूर धरणाची पाणी योजना अद्याप सुरू न होणे याविषयी मधुकर पवार अशोक जाधव यांनी आवाज उठविला .स्मशानभूमी व गावातील रस्त्यांची दुरवस्था, वैकुंठ रथ व शववाहिकेची गरज, शेंदुर्णी मार्गावरील दिव्यांची अनियमितता, जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना सवलत देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते ईश्वर हिवाळे यांनी केली . गट क्रमांक १३५८ अतिक्रमण हटविण्याची तीव्र मागणी माजी उपसरपंच युसूफ बाबा यांनी करून पोलीस बंदोबस्तात कारवाई करावी अन्यथा आंदोलन छडण्याचा इशारा देखील त्यांनी दिला .श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर परिसरातील पर्यटन विभागाअंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांमध्ये ठेकेदारांची मनमानी व दडपशाही याविषयी विश्वस्त किशोर बनकर व अशोक जाधव यांनी आवाज उठवला . ग्रामसभेच्या प्रारंभी प्रगणक शंकर भामेरे यांनी नागरिकांना स्वगणनेत सहभागी होण्याचे आवाहन केले. सभेला आजी-माजी पदाधिकारी, प्रशासकीय समिती सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. एकूणच, दप्तर न सुपूर्द करण्याच्या प्रकारामुळे पहूर कसबे ग्रामपंचायतीतील प्रशासनाचा कारभार चर्चेत आला असून, आता या प्रकरणात ठोस कारवाई होते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read More

वाढदिवसानिमित्ताने अनावश्यक खर्च न करता शेळगाव उपसरपंच निळकंठ पाटील यांनी अन्नदान करून वाढदिवस केला साजरा.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जामनेर तालुक्याची नेते दिलीप खोडपे सर,फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विजय पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, युवा नेते विश्वतेराजे पाटील, व्ही जी एन टी सेलचे तालुका अध्यक्ष रोहन राठोड, कार्तिक भाऊ काळे,वासुदेव भाऊ साखरे, विकास अहिरे, पत्रकार महेंद्र पाटील, बी जी माळी सर,चरण सिंग पाटील,रवी माळी, आकाश बावस्कर संपुर्ण आत्मसन्मान टिम बोदवड आदी उपस्थित होते. आत्मसमान फाउंडेशन संचलित बोदवड येथील मनोरुग्ण,बेसहारा, मानसिक व बौध्दीक अपंगत्व आलेले लोकांचा सांभाळ करण्याचे व त्यांचा उपचार करण्याची काम आत्म सन्मान फाउंडेशन करीत आहे तरी अशा लोकांना शेळगाव येथील उप सरपंच निळकंठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने अनावश्यक खर्च न करता आज 21 मार्च रोजी अन्नदान करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

Read More

सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेंद्र पगारे यांना “टॉप कॉप ऑफ द मंथ” पुरस्काराने सन्मानित

जे बी एन महाराष्ट्र न्यूज, जामनेरप्रतिनिधी: सुपडू जाधव जामनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेंद्र सुपडू पगारे (A.S.I. 2651) यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल “टॉप कॉप ऑफ द मंथ” या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने फेब्रुवारी 2025 महिन्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पोलीस दलातील उल्लेखनीय सेवा आणि कर्तव्यनिष्ठ कार्यगिरीबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सत्कार समारंभात पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. धनंजय येरुळे यांच्या हस्ते जयेंद्र पगारे यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. या वेळी जामनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार उपस्थित होते. त्यांनी जयेंद्र पगारे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. कर्तव्यदक्षता आणि जनसेवेसाठी समर्पित अधिकाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. जयेंद्र पगारे यांच्या सन्मानामुळे जामनेर पोलीस दलात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी सहकाऱ्यांकडून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Read More

शेंदुर्णी येथे प.पू. हरिप्रसाद महाराज पुण्यतिथी संगीत रजनीसह उत्साहात साजरी

शेंदुर्णी ता.जामनेर,येथे कमल किसन नगरात दादासाहेब संजयरावजी गरुड यांच्या निवासस्थानापासून परमपूज्य कै.हरिप्रसाद महाराज यांच्या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी,हरिप्रसाद महाराज यांच्या पणती विजया वाजपेयी यांची प्रमुख उपस्थिती होती प्रथमतःपालखी सोहळ्याचे पूजन व माल्यार्पण पंडित दादा गरुड, दादासाहेब संजयरावजी गरुड, ताईसो सरोजिनी गरुड,राहुल गरुड,शिवराज गरुड,स्नेहदीपजी गरुड,प्रियानंदा गरुड,रक्षंदा गरुड,माधुरी चव्हाण मॅम,कोमल देशमुख मॅम,यांच्या समवेत महेश भदाणे व सौ.उमा भदाने यांच्या हस्ते पूजन व मल्ल्यार्पण करण्यात आले.याप्रसंगी ढोल ताशांच्या गजरात दिंडी सोहळ्याची मिरवणूक वाजत गाजत संपूर्ण गावभर काढण्यात आली.या अनुषंगाने लेझीम पथक,टिपरी पथक,वृक्षदिंडी,एनसीसी कॅडेट पथक,यासह संत ज्ञानेश्वर,मुक्ताई, सोपानदेव निवृत्ती यांनी चालविलेली निर्जीव भिंत वेशभूषा आरास देखावा त्याचबरोबर विठ्ठल रुक्माई वेशभूषा देखावा या सर्वांचे,आरास देखावाउभारण्यात आले.या सर्व दिंडी सोहळ्याची सांगता वीस देवडी जवळ करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत दादासो यु.यु.पाटील, शांताराम बापू गुजर, सुधाकर आण्णा बारी,शिवपूजे मॅडम,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.चौधरी सर, गरुड प्राथमिक च्या मुख्याध्यापिका सौ.दामिनी गरुड, पर्यवेक्षक व्ही.एम.शिरपुरे,विनोद पाटील इत्यादी उपस्थित होते. या निमित्ताने प्राचार्य आर.एस चौधरी यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कारासह हरिप्रसाद महाराज यांच्या पणती विजया वाजपेयी यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार बरोबर आर एस चौधरी यांनी हरिप्रसाद महाराज यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला.याबरोबर रात्रीच्या कीर्तन सोहळ्यात ह.भ.प.पांडुरंग महाराज आवरकर यांनी त्यांचे अमृत बोल कथन केले. संध्या रजनी कार्यक्रम दादासाहेब संजयरावजी गरुड,काकासो.सागरमल जैन,शांताराम बापू गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत संगीत रजनी कार्यक्रम घेण्यात आला.याप्रसंगी संगीत विशारद श्रीमती मीनाक्षी शर्मा,उर्मिला ताई शिवपुजे,सुरेश भाऊ गर्गे,तबलावादक पांडुरंग पाटील, सोपान पाटील,एडॅ.पारळकर,दिग्विजय सूर्यवंशी व इतर पत्रकार बांधव,गाव परिसरातील,नागरिक,रसिक स्रोते शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक, प्राध्यापिका यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही एम शिरपुरे यांनी केले तर आभार डी.बी पाटील यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Read More

दुभाजकावर धडकून कारने घेतला पेटगर्भवती पत्नीचा जळून मृत्यू ; पती जखमीअर्ध्यावरती डाव मोडला . . . अधुरी एक कहाणीपहूर – वाकोद मार्गावर घडली दुर्घटना

पहूर ता जामनेर रस्ता दुभाजकावर धडकलेल्या कारने क्षणात पेट घेतला आणि भडकलेल्या ज्वाळांमध्ये गर्भवती मातेचा दुर्दैवी जळून मृत्यू झाला तर कारचालक पती जखमी झाल्याची दुर्घटना जळगाव – छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग ७५३ एफ वर पहूर वाकोद दरम्यान दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली .याबाबत अधिक माहिती अशी की , संग्राम मोरे ( रा . पूलमखेडा , ता . जि . बुलढाणा ) हे भुसावळ तालुक्यातील सासूरवाडीहून छत्रपती संभाजीनगरकडे पहूरमार्गे पत्नी जान्हवी संग्राम मोरे यांच्यासह मारुती ग्रँड व्हिटारा कारने जात होते . दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांची कार वाकोद नजीक येताच समोरच्या डिव्हाइडरवर धडकली .कार डिव्हायडर वर धडकताच मोठा आवाज झाला आणि क्षणात गाडीने पेट घेतला . काही कळायच्या आतच कारमधून प्रचंड ज्वाला आणि धुराचे लोट बाहेर पडू लागले . अशाच अवस्थेत वाहनचालक संग्राम मोरेबाहेर पडले मात्र कार मध्ये असलेल्या त्यांच्या पत्नी जान्हवी संग्राम मोरे ( वय २१ वर्षे ) या मात्र आगीच्या ज्वाळांनी होरपळून जागीच मृत्युमुखी पडल्या . घटना घडतात महामार्गावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश पाटील , परेश महाजन यांच्यासह स्थानिक नागरिक व ये -जा करणाऱ्या प्रवाशांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला .घटनेची माहिती मिळताच पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कोठारे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली .जखमी अवस्थेत असलेले संग्राम मोरे यांना तात्काळ पहूर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले . डॉ .राहुल निकम ,डॉ . जितेंद्र राजपूत ऋषिकेश भालेराव व सहकार्यांनी प्रथमोपचार केले .पुढील उपचारासाठी संग्राम पाटील यांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे . मयत जान्हवी मोरे यांचे शवविच्छेदन पहूर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले . दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ . राहुल निकम यांच्या खबरीवरून पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कोठारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे . अग्निशमन दलाचे प्रयत्न –शेंदुर्णी नगर परिषदेच्या अग्निशमन दलास घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते . वाकोद येथील रहिवाशांनी देखील टँकरद्वारे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला . उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट –दरम्यान पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहाम यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली . अर्ध्यावरती डाव मोडला . . . अधुरी एक कहाणी मार्च महिन्यात जान्हवी आणि संग्राम यांचा विवाह झाला होता . सुखी संसाराचे स्वप्न रंगवत लवकरच आपण आई होणार असल्याची चाहूल जान्हवी यांना लागली होती . मात्र दुर्दैवाने सहा महिन्यांचे बाळ उदरात असताना कारमध्येच अग्निज्वाळांच्या भडक्यामुळे जान्हवी मोरे यांची प्राणज्योत मालवली . कारमध्ये सीएनजी गॅस ?नेमका स्पोट कशामुळे झाला ? याबाबत घटनास्थळी वेगवेगळे तर्क लावले जात होते . कार सीएनजी गॅस इंधनावर होती की पेट्रोलवर याविषयी आरटीओ इन्स्पेक्शन मधून माहिती समोर येणार आहे . तथापि या घटनेमुळे पहूर आणि वाकोद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .

Read More

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची तब्येत अचानक बिघडली; मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू

महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान गुरुवारी (दि. ५ मार्च २०२६) विधानभवनात कामकाज सुरू असताना मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची अचानक तब्येत खालावली. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबई येथील सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालय व संशोधन केंद्र येथे दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे नेते व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रुग्णालयात भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून आमदार पाटील यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या. सध्या रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती त्यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी यांनी दिली आहे.

Read More

२५ वर्षांपासून सुरू असलेला शेत रस्त्याचा वाद सामोपचाराने मिटला!– मौजे हिंगणे (न.क.), ता. जामनेर येथे आदर्श समन्वयाची दखल

जामनेर तालुक्यातील मौजे हिंगणे (न.क.) येथे तब्बल २५ वर्षांपासून सुरू असलेला शेत रस्त्याचा वाद अखेर तहसील कार्यालय, जामनेर येथे दिनांक ०३ जुलै २०२५ रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान सामोपचाराने व आपसी समजुतीने निकाली काढण्यात आला. सदर वाद सन २००० पासून विविध न्यायालयात, तसेच मा. उच्च न्यायालयात देखील सुरू होता. या वादात गट क्र. २८ चे धारक प्रमिलाबाई विजयसिंग पाटील व इतर व गट क्र. ५३ चे प्रतिवादी कवरसिंग दयाराम पाटील यांच्यात शेत रस्त्याच्या वहिवाटीबाबत दीर्घकाळ संघर्ष सुरू होता. स्थानिक पातळीवर पोलीस पाटील सुभाष जुलालसिंग पाटील, तसेच जामनेर नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर यांनी मध्यस्थीचे महत्त्वपूर्ण कार्य पार पाडून दोन्ही पक्षकारांमध्ये समेट घडवून आणला. या सामोपचाराच्या निमित्ताने तहसीलदार जामनेर (नानासाहेब आगळे) यांच्या हस्ते दोन्ही पक्षकारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व गावातील नागरिकांनी याचे विशेष कौतुक केले. 🟩 प्रशासनाकडून विशेष आवाहन:जामनेर तालुक्यातील इतर शेतकरी बांधवांनी देखील शेत शिवारातील पानंद रस्ते, शेत रस्त्यांचे वाद व वहिवाट विषयक प्रश्न सामोपचारातून सोडवावेत, जेणेकरून न्यायालयीन खर्च, वेळ व मनस्ताप वाचेल आणि गावांमध्ये सामाजिक सलोखा व विकासास चालना मिळेल. अशा प्रकारचे समंजस निर्णय हा इतर गावांसाठीही आदर्श ठरेल

Read More

‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करावे’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करावे’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सेवा सुविधांसंदर्भात आढावा बैठक पार पाडली. या जयंती सोहळ्याचे भव्य, दिव्य आणि दिमाखदार आयोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. जयंतीसाठी देशभरातून लाखो नागरिक चैत्यभूमीवर येतात. त्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंत्रणांना दिलेले निर्देश:✅सर्व यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे✅मुंबई महानगरपालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रम व अन्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने होत असलेल्या तरतुदीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करावे✅चैत्यभूमी येथे अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे, महापालिका, गृह विभाग व सामाजिक न्याय विभाग तसेच संबंधीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे✅संबंधित यंत्रणांनी स्वच्छतेबाबतही दक्षता घ्यावी✅गर्दी टाळण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यावी. तसेच दादर आणि संबंधित परिसरात वाहतूक पोलिसांनी रहदारीचे योग्य नियंत्रण व जागोजागी सूचना फलक लावावेत✅चैत्यभूमी परिसरात अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी आणि नागरिकांसाठी उन्हापासून संरक्षणासाठी मंडप, प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था करणे✅बेस्ट प्रशासनानेही दादर स्टेशन ते चैत्यभूमीदरम्यान पुरेशा प्रमाणात बससेवा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून नागरिकांना सुविधा होईल सदर बैठकीत पोलीस पथक मानवंदना, चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, शिवाजी महाराज मैदानावरील भव्य निवास मंडप, तेथील आपत्कालीन व्यवस्थेसह, आरोग्य सुविधा, प्रदर्शन मंडप, चैत्यभूमी स्तूप व परिसराची सजावट, “लोकराज्य” विशेषांक, शासकीय जाहिरात प्रसिध्दी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सबंधीत विभाग व यंत्रणांना आवश्यक ते दिशानिर्देश दिले. बैठकीत मुंबई महापालिकेच्या वतीने नियोजनाची सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे मुख्यमंत्री व उपस्थितांना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या हस्ते महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या पोस्टरचे अनावरण देखील करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. संजय बनसोडे, राज्याच्या मुख्य सचिव, राज्याच्या पोलीस महासंचालक, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीचे सरचिटणीस यांच्यासह दादर चैत्यभूमी स्मारक समितीचे प्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Read More

पुनर्वसनाच्या प्रलंबित प्रश्नांना मिळणार गती; जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक आढावा बैठक

पुनर्वसनाच्या प्रलंबित प्रश्नांना मिळणार गती; जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक आढावा बैठकजळगाव, दि. २ जून (प्रतिनिधी) जिल्ह्यातील पुनर्वसन विषयक प्रलंबित प्रश्नांचा तातडीने निपटारा करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित विभागांची व्यापक आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पुनर्वसित गावठाणांतील विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली.बैठकीत पात्र लाभार्थ्यांना भूखंड वाटप, पुनर्वसित क्षेत्रातील रस्ते, पाणीपुरवठा व वीज यांसारख्या नागरी सुविधांची सद्यस्थिती, भूमी अभिलेख विभागाकडे प्रलंबित असलेल्या जमीन मोजणीची प्रकरणे, न्यायालयीन बाबी तसेच प्रकल्पग्रस्तांच्या स्थानिक अडचणींचा तपशीलवार आढावा घेण्यात आला.यावेळी जिल्हा अधीक्षक (भूमी अभिलेख), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), उपजिल्हाधिकारी, पाटबंधारे, मध्यम प्रकल्प व धरण विभागाचे कार्यकारी अभियंते, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच उपअधीक्षक भूमी अभिलेख हे प्रत्यक्ष व दूरचित्रवाणी प्रणालीद्वारे (व्हीसी) उपस्थित होते.प्रकल्पग्रस्तांचे हित लक्षात घेऊन सर्व विभागांनी परस्पर समन्वय वाढवून प्रलंबित विषयांना गती द्यावी व निर्धारित कालमर्यादेत त्यांची पूर्तता करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. या बैठकीमुळे जिल्ह्यातील पुनर्वसनाशी संबंधित अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Read More

अलवर (राजस्थान) येथे आयोजित खासदार क्रीडा महोत्सवास; केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित..

अलवर (राजस्थान) येथे स्थानिक लोकसभा खासदार व केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री श्री. भूपेंद्र यादव जी यांच्या मार्फत आयोजित “खासदार क्रीडा महोत्सव” कार्यक्रमास आज केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्या. यावेळी त्यांनी स्पर्धक व उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, अलवर खासदार क्रीडा महोत्सव ही केवळ क्रीडा स्पर्धा नाही, तर युवाशक्तीचा उत्साह, खिलाडूवृत्ती आणि निरोगी भारताच्या निर्धाराचे प्रतीक आहे. पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी जी यांच्या ‘खेलो इंडिया’ आणि ‘फिट इंडिया’ मोहिमेला पुढे नेण्यासाठी क्रीडा महाकुंभ हे एक सशक्त माध्यम आहे. युवा खेळाडूंचा उत्साह, परिश्रम आणि संघर्ष पाहून मला पूर्ण विश्वास वाटला की भारताचे भविष्य क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील कलागुणांना पुढे येण्याची मोठी संधी मिळत आहे असे उद्गार त्यांनी काढले. या भव्य कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी यावेळी स्थानिक खासदार व केंद्रीय मंत्री श्री. भूपेंद्र यादव जी यांचे यावेळी अभिनंदन करून सर्व सहभागी स्पर्धकांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Read More
error: Don't Try To Copy !!