जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर प्रतिनिधी – सध्याची सामाजिक स्थिती पाहता येणारा काळ हा समाजासाठी जोखमीचा असेल, असे मत भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर साखला यांनी व्यक्त केले. ते साक्री तालुक्यातील बळासाने तीर्थ क्षेत्रात खानदेश विभागातर्फे आयोजीत खानदेश विभागाच्या पदाधिकारी व कार्यकर्ता स्नेह मिलनात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीओम विश्वकल्याण विमलनाथ तीर्थभूमी ट्रस्टचे खजिनदार व पंचायत समिती सदस्य महावीर जैन होते. नमस्कार महामंत्राने व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.खानदेश उपाध्यक्ष स्व. लतीश जैन यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पित केली.प्रास्ताविक खानदेश विभाग अध्यक्ष प्रा.चंद्रकांत डागा यांनी केले.साखला पुढे म्हणाले, समाजातील समस्या ओळखणे, त्यावर वैज्ञानिक पद्धतीने संशोधन करून उपाय सुचविणे ही संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांची कार्यशैली राहिली आहे. चाळीस वर्षापासून निरंतर हे काम सुरू आहे. समाजात अनेक बदल झाले आहेत. मुला-मुलींमध्ये शैक्षणिक स्तर भिन्न झाला आहे. मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवल्याने समस्या वाढल्या आहेत. कुटुंब व्यवस्था उध्वस्त होत आहे. त्यासाठी आपल्या व्यवहाराने संस्काराने राहणीमानाच्या पद्धतीने सुरक्षा कवच निर्माण करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय सचिव दीपक चोपडा यांनी संघटनेच्या पाया मजबूत करण्यासाठी संघटने बारा महिन्यात 14 कार्यक्रम दिले हे कार्यक्रम यशस्वी करणे प्रत्येक शाखेचे आद्य कर्तव्य असल्याचे सांगितले. राज्य महासचिव प्रवीण पारख यांनी, कार्यकर्ता हा संघटनेचा आत्मा आहे.समाजकारणात करता करता अनेक जण राजकारणात गेले. खानदेशात पंचवीस शाखा कार्यरत असून वर्षभरात 120 फाउंडेशन कार्यक्रम त्यांनी घेतले. महाराष्ट्रातील एकूण कार्यक्रमात 40% हिस्सा आहे.राज्य उपाध्यक्ष विनय पारखे यांनी येत्या वर्षात खानदेशाने किती कार्यक्रम घेतले पाहिजे याचे टार्गेट दिले. माजी राज्य उपाध्यक्ष हरकचंद बोरा यांनी संघटनेने नव्याने सुरू केलेले पारिवारीक अदालत विषयी माहिती दिली. राज्य सचिव विजय दुगड यांनी संघटनेचे कार्यक्रम घेण्याचे आव्हान केले. डॉक्टर कांतीलाल टाटीया यांनी संघटनेने पाण्याच्या संदर्भात केलेल्या कार्याची व संघटनेचे महत्व विशद केले तर जयश्री गोगड यांनी अंकाचे महत्व सांगितले.**कार्यक्रम दरम्यान नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार सन्मानपत्र देऊन केला.ललित रमनलाल छाजेड(शहादा), दीपक प्रवीणजी डांगी (जामनेर), धीरज ओस्तवाल(शेंदुर्णी), देवेंद्र चंदनमल जैन (नंदुरबार),अमर जैन(जळगांव), निर्मल कोठारी( भुसावळ), नितीन जैन (मुक्ताईनगर )जयश्री विनोदकुमार पगारिया (साक्री) तर विविध क्षेत्रात नियुक्ती झालेल्या राजेंद्र टाटिया (साक्री जैन संघ अध्यक्ष),चंद्रकांत डागा(ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या राज्य कार्यकारिणी सदस्य),जोशीला पगारिया(गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या केंद्रीय महिला अध्यक्ष)मनोज डागा(अखिल भारतीय खरतरगछ परिषद राष्ट्रीय उपाध्यक्ष), सुमित मुनोत(समस्त ज़िला समन्वयक), जयश्री गोगड (एस्ट्रॉलॉजर) यांचा सत्कार शॉल, माळा देऊन मान्यवरांच्या हस्ते केला गेला.**सन 2025मध्ये जिल्ह्यात सर्वाधिक फाउंडेशन कार्यक्रम घेतल्या बद्दलतळोदा,जामनेर व शिंदखेडा शाखेचे अध्यक्ष राहूल जैन, कुशल बोहरा,सौ मोना चोरड़िया व मयुर ओस्तवाल यांचा त्यांच्या टीम सह ट्रॉफी देऊन सत्कार केला.नवनिर्वाचित नगरसेवक ललित छाजेड, जयश्री पगारिया यांनी मनोगत व्यक्त केले तर सूत्रसंचालन जळगाव महिला जिल्हाध्यक्ष सोनाली कोठारी तर आभार विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत यांनी मानले.