Headlines

पुरुषांकडे शक्तीच मातृत्व असलं तरीही जगात मातृत्वाची शक्ती ही महिलांकडेच आहे.म्हणून समाजात वावरतांना महिला म्हणून जबाबदारीने वागा.–अँड.शुभांगी फासे.

जामनेर – प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यापासून तो त्याच्या कर्तृत्वासाठी श्रेष्ठच आहे.मग तो पुरुष असो व स्त्री.उलट काही बाबतीत स्त्रिया या पुरुषांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत.असंख्य क्षेत्रात महिला आज प्रतिनिधित्व करीत आहेत.त्याच बरोबरीने महिलांसाठीचे अधिकार त्यांचे कायदे हे देखील त्यांच्या लक्षात आणून देणे गरजेचे आहे.आज महिलांवरील अत्याचारांच प्रमाण वाढलेलं आहे,तुम्ही शिक्षणाबरोबर स्वतःच्या संरक्षणासाठी स्वयंसिद्ध प्रशिक्षण घ्या.कोणत्याही नात्यात येतांना स्वतःवर असलेल्या जबाबदारी चं भान ठेवा.आणि तिच्या नकार हा कायम नाहीच असतो, नकाराला होकार समजू नका.जी.एम.नर्सिंग इन्स्टिट्यूट,जामनेर तर्फे महीला दिनानिमित्त विशेष शैक्षणिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी जामनेर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय,जामनेर येथील अधिवक्ता आणि युवा व्याख्याता अँड.शुभांगी विठ्ठल फासे या प्रमुख वक्त्या तसेच अँड.आदित्य देशमुख हे देखिल या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यानंतर अॅड.फासे यांनी विद्यार्थ्यांना महीला सक्षमीकरण आणि सामाजिक जीवन मूल्य,कायदेशीर जागरूकता आणि जबाबदार नागरिकत्व या विषयांवर अत्यंत प्रभावी व समजण्यास सोपी अशी माहिती दिली.विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून सक्रिय सहभाग नोंदवला.तसेच अॅड.देशमुख यांनी देखील विद्यार्थ्यांना लहान बालकांसंबंधीचे कायदे (पॉक्सो कायदा) वर मार्गदर्शन केले.महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा.अश्विनी चौधरी यांनी वक्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नागरी जाणीवा व मानवी मूल्यांची दृढ पायाभरणी होत असल्याचे सांगितले.

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती उत्सव समितीची बैठक संपन्न

जामनेर (प्रतिनिधी- सुपडू जाधव) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती उत्सव समितीची बैठक संपन्न विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती उत्सवानिमित्त सम्राट अशोक नगर येथील त्रिरत्न बुद्ध विहारात नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत उत्सव समितीची सर्वानुमते निवड करण्यात आली. बैठकीत राहुल लक्ष्मण साबळे यांची अध्यक्ष, तुषार प्रकाश मेहेरे यांची उपाध्यक्ष, रोहित संजय दांडगे यांची सचिव, अमोल राजू सोनवणे यांची खजिनदार, तर आनंद ईश्वरलाल सुरडकर यांची सह-खजिनदार म्हणून निवड करण्यात आली. याशिवाय अजय बाविस्कर यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. समिती सदस्य म्हणून कल्पेश सोनवणे, आदित्य भिमडे, रोशन पाटील, वैभव सुरवाडे, विशाल अहिरे, श्रींकांत शेंडे, आदित्य सपकाळे, वैभव नन्नवरे, अतुल वाघ आणि शुभम सुरवाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीत जयंती उत्सवाच्या विविध कार्यक्रमांची रुपरेषा ठरविण्यात आली असून, भविष्यातील नियोजनासाठी सर्व सदस्यांनी सहकार्य करण्याचे ठरवले आहे.

Read More

शेतकऱ्याच्या पिवळे सोन मक्याला अकराशे रुपये भाव कापसाची ही सहा हजारावर विक्री

प्रतिनिधी- सुपडू जाधवऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून सुरू झालेला पाऊस अधूनमधून पडत राहिला. सप्टेंबरमध्येही सरींनी शेतकऱ्यांच्या धांदल्यावर थोडेसे संकट आणले, तर ऑक्टोबरमध्ये पावसाने उघडीप दिली. अतिवृष्टी आणि पूरस्थितीतून वाचलेल्या कापूस, मका, सोयाबीन आणि तूर पीक शेतकऱ्यांच्या हाती लागले. मात्र, शासनाच्या सीसीआय आणि नाफेडच्या खरेदी केंद्रांची अनुपलब्धता शेतकऱ्यांसाठी मोठा प्रश्न ठरला आहे.जामनेर तालुक्यात यावर्षी पांढऱ्या सोन्याप्रमाणे ओळखल्या जाणान्या कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली SM होती. तसेच ‘पिवळे सोनं म्हणविल्या जाणाऱ्या मक्याची लागवड गतवर्षीच्यातुलनेत अधिक झाली. पिकांची स्थिती सुरुवातीला उत्कृष्ट होती. ज्यामुळे शेतकऱ्यांनी मोठे उत्पादन मिळेल आणि त्यांना चांगला लाभ होईल, असा विश्वास बाळगला होता. मात्र, सप्टेंबर महिन्यातील ढगफुटीसारख्या पावसामुळे शेतकन्यांच्या प्रयत्नांचा परिणाम क्षणात नष्ट झाला. मक्याचे दाणे काळवंडले, अनेक कणसे भरल्या गेल्या नाहीत, ज्या भरल्या होत्या त्यावर अतिपावसामुळे कॉब फुटले, त्यामुळे उत्पन्न खूप घटले. कापूसव सोयाबीन पिकांबाबतही हाच परिणाम दिसून येत आहे. पाऊस थांबल्यानंतर शेतकऱ्यांनी कापूस आणि मका विक्रीसाठी काढले. मात्र, शासनाचे खरेदी केंद्र उपलब्ध नसल्यामुळे खासगी व्यापायांनी विविध कारणे देत माल खरेदी करणे सुरू केले. कापूस ७७१० ते ८११० रुपये प्रतिक्विंटल असतानाही व्यापान्यांनी ६००० ते ६२०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी सुरू केली आहे. मक्या ला हमीभाव २२०० ते २२८० रुपये प्रतिक्विंटल असूनही स्थानिक व्यापारीशेतकऱ्यांकडून ११०० ते १३१० रुपये दराने खरेदी करत आहेत.शेतकऱ्यांच्या मते, ही परिस्थिती त्यांच्यासाठी मोठा आर्थिक फटका ठरत आहे. पिकांच्या चांगल्या उत्पादनाचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आला आपली मेहनत आणि आर्थिक गुंतवणूक कमी भावात विकावी लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी शासनाकडे व व्यापा-यांवळे तातडीने मार्ग काढून परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Read More

कापूस खरेदी सुरू करण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शेंदुर्णी येथे शेतकरी मेळावा संपन्न

कापूस खरेदी सुरू करण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शेंदुर्णी येथे शेतकरी मेळावा संपन्न जळगाव, दि.१६: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सीसीआयने बंद केलेली कापूस खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा उत्पादित माल घरातच राहणार नाही, याची काळजी राज्य शासन घेईल. या परिसराचे चित्र बदलण्यासाठी आवश्यक ते सहकार्य राज्य शासन करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दी शेंदुर्णी सेकंडरी को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त अमृत ग्रंथ प्रकाशन आणि नूतन इमारतीचा पायाभरणी समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, खासदार स्मिताताई वाघ, आमदार संजय कुटे, सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास राज्य शासनाचे प्राधान्य आहे. वीज आणि पाणी यासंदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याला शासनाने प्राधान्य दिले आहे. सौर पंपासाठी पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना पुढच्या १५ दिवसात आणि मागणी नोंदवल्या नंतर प्रत्येक शेतकऱ्याला दोन महिन्याच्या आत जोडणी देण्यात येईल. शेतकऱ्यांना २०२६ पर्यंत दिवसाची वीज देण्यासाठी सौर फिडरचे काम वेगाने सुरू आहे. शेतकऱ्याचा माल कोणत्याही परिस्थितीत पडू दिला जाणार नाही, त्याची खरेदी करण्यात येईल. या भागाचे चित्र बदलण्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, चक्रधर स्वामींचे वास्तव्य लाभलेली ही भूमी आहे. या ऐतिहासिक संस्थेत येण्याची संधी मिळाली. स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर ही शिक्षण संस्था स्थापन झाली. गावातल्या मुलामुलींना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी गजानन राव गरुड यांनी या संस्थेची स्थापना केली. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. संस्थेच्या समस्या सोडविण्याच्या प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी नावारूपाला आले. स्वतः बापूसाहेब गरुड यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते, विविध विषयांचा व्यासंग होता. या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वामुळे ते प्रसिद्ध झाले. सरपंच ते विधानसभा उपाध्यक्ष अशा अनेक भूमिकांना त्यांनी न्याय दिला. आज त्यांचे कार्य संस्था पुढे नेत आहे. नुकतीच पायाभरणी केलेली ही अतिशय सुंदर आणि पर्यावरण पूरक इमारत असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते शेंदुर्णी नगरपंचायतीच्या नगरोत्थान योजनेंतर्गत मलनिस्सारण प्रकल्प आणि रस्ता कामाचे शुभारंभ करण्यात आला. सुरुवातीला संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, विविध ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More

जामनेर येथे विश्व कॅन्सर दिनानिमित्त जनजागृती

जामनेर (वा.)-भारतीय जैन संघटना जामनेर शाखा यांच्यातर्फे विश्व कैंसर दिवसा निमित्त कैंसर जनजागृती व मार्गदर्शन संबधी व्याख्यानाचे आयोजन नविन महावीर भवन येथे आयोजित करण्यात आले.

Read More

मुल्यवर्धन प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्याचा आत्मविशवास आणि कार्य क्षमता वाढेल…. गटशिक्षणाधिकारी विष्णू काळे

शेंदुर्णी – मुल्यवर्धन विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी महत्वाचा आहे. या प्रशिक्षणामुळे शिक्षाकांची कार्य क्षमता सुधारेल आणी त्यांना विद्याथ्यामध्ये मुल्ये रुजवण्याचा आत्मविश्वास मिळेल. असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी विष्णू काळे यांनी शेंदुर्णी येथे गरुड प्राथमिक शाळेत आयोजीत प्रशिक्षणत केले.महाराष्ट्र शासन व शांतीलाल मुथ्था फॉउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मूल्यवर्धन प्रशिक्षण 3. 0 दिनांक – 01-10-2025 पासून 08-10-2025 पर्यंत दोन टप्प्यात समूह साधन केंद्र शेंदुर्णी येथे आ. ग. गरुड विद्यालय शेंदुर्णी येथे सुरु असून या प्रशिक्षणात जामनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विष्णू काळे , मूल्यवर्धन उपक्रमाचे तालुका समन्वयक, लखन कुमावत यांनी भेट दिली.गटशिक्षाणाधिकारी विष्णू काळे यांनी मार्गदर्शन करतांना या प्रशिक्षणाची उपयोगीता व शिक्षकाची भुमिका स्पष्ट केली. तसेचे विद्यार्थ्यामध्ये नैतिक मुल्यांची रुजवणूक करणे, सामाजीक जवाबदारीची जाणीव निर्माण करणे, संवेदनशील आणी सहकार्यशील नागरीक घडवणे, शाळामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करणे.असे मूल्यवर्धनाची उदिष्ठे स्पष्ट केली.यावेळी कुलाचे कुलसंचालक तथा केंद्रप्रमुख निवृत्ती जोहरे , गरुड शाळेच्या मुख्याध्यापिका सौदामिनी गरुड , तसेच सुलभक रविंद्र सपकाळे व योगेश इंगळे हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गोपाल कुमावत यांनी केले.

Read More

जामनेर तहसिल कार्यालयात तालुकास्तरीय लोकशाही दिन –तहसिलदार श्री आगळे यांनी नागरिकांच्य ऐकुन घेतल्या समस्या तक्रारी

जामनेर – ( प्रतिनिधी )जामनेर तहसिल कार्यालयाततालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले .या प्रसंगी नागरिकांच्या विविध विभागाशी संबंधित समस्या व तक्रारींची संक्षिप्त चौकशी करून आवश्यक कार्यवाही तहसिलदार श्री नाना साहेब आगळे यांच्या कडून करण्यात आली.यावेळी नायब तहसिलदार , इतर विभागाचे अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते . विभागप्रमुखांनी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या व तातडीने निराकरणासाठी पावले उचलली. लोकशाही दिनाच्या माध्यमातून शासन-प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक परिणामकारक होत आहे.

Read More

शिक्षक, पदवीधर आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन

टप्पा अनुदान शाळांना अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करावी, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, संच मान्यतेचा जाचक जीआर रद्द करावा, समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांना कायम करावे, यासह इतर मागण्यांसाठी आज (शुक्रवारी)शिक्षक व पदवीधर आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलने केले. या आंदोलनात आमदार जयंत आसगावकर, आमदार विक्रम काळे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार किशोर दराडे, आमदार अभिजीत वंजारी, आमदार सुधाकर आडबाले, आमदार अभ्यंकर सहभागी झाले होते. जोपर्यंत शासन शिक्षकांच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असल्याचे यावेळी आमदार जयंत आसगावकर यांनी सांगितले.

Read More

प्रभू श्रीरामनवमी निमित्त शेंदुर्णी येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे भव्य शौर्य संचलन उत्साहात संपन्न.

प्रभू श्रीरामचंद्र जन्मोत्सवानिमित्त श्री क्षेत्र प्रति पंढरपूर शेंदुर्णी नगरीत प्रथमच विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने भव्य शौर्य संचलनाचे आयोजन करण्यात आले होते, प्रसंगी संचलनात २०० गणवेश धारक तसेच मंगल वेशातील १५५ पेक्षा अधिक बजरंगी सामील होते. श्रीराम जय राम जय जय राम, भारत माता की जय, वंदे मातरम अशा अनेक घोषणा तसेच देशभक्तीपर गीतांच्या तालावर संपूर्ण शेंदुर्णी नगरीत संचलन उत्साहात पार पडले. तसेच संचलन प्रकट कार्यक्रम हा नगरपंचायत मैदानावर पार पडला, त्यात मंचावर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री सिद्धेश्वरजी बिराजदार प्रांत धर्म जागरण प्रमुख तसेच विश्व हिंदू परिषद जिल्हा सह मंत्री भिका इंदरकर व वरून इंगळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भिका इंदरकर यांनी केले ते म्हणाले की “सदर संचालनाचा उद्देश हा सकल हिंदू समाजाला एकत्रित करणे देव देश धर्माचे रक्षण करणे, सेवा सुरक्षा संस्कार या त्रिसूत्रीवर चालणे. तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्यांनी देखील बजरंग दलाच्या स्थापनेपासून ते राम मंदिरांचे आंदोलन असेल तसेच आजपर्यंतचा प्रवास सर्व बजरंगी समोर मांडला. आजच्या या तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवणे. तसेच लव जिहादच्या जाळ्यातून, लँड जिहाद च्या तसेच अनेक जिहादी जाळ्यातून आपला हिंदू समाज सुरक्षित ठेवणे, पंचपरिवर्तन अशा अनेक विषयांना घेऊन या संचालनाचे आयोजन करण्यात आले असे ते म्हणाले. संचलनाचे सूत्रसंचालन मयूर माळी, सांघिक गीत भूषण दामधर, सुभाषित विक्रम माळी, आभार अर्जुन वाघ तसेच घनशाम माळी समरसता मंत्र घेऊन कार्यक्रम समारोप करण्यात आला.या कार्यक्रमासाठी विहिंप बजरंग दल सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले

Read More

पाळधी जि.प.केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.

पाळधी ता.जामनेर :- येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप संभारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शैलेश पाटील, व तुळशीराम वाघ होते. आपल्या प्रेरणादायी भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना महत्वाचा संदेश दिला. त्यांनी सांगितले की शिक्षणात कधीही खंड पडू देऊ नका.आई वडिलांचे,आपल्या शाळेचे आणि आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा.ते पुढे म्हणाले तुम्ही डॉक्टर ,इंजिनियर,शिक्षक, व्यवसायिक बना,जे काही तुमचे स्वप्न असेल ते पूर्ण करा.मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेवटी एक चांगला माणूस बना अशी प्रेरणादायी सदिच्छा त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत शाळेच्या गोड आठवणींना उजाळा दिला.शाळेतील शिक्षक चंदन राजपूत, संभाजी हावडे, सतीश बावस्कर, जितेंद्र नाईक, अमित मुंडे,मगंला धनुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद कोळी, निलेश भोंबे, सदस्य मनोज नेवे,नाना माळी, गजानन राजपूत, विनोद पाटील,अशोक पाटील, विकास धनगर कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

Read More
error: Don't Try To Copy !!