Headlines

सिद्धगड भवनी माता मंदिर व परिसराच विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार — नामदार गिरीश महाजन

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधव जामनेर —गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रामपूर ता. जामनेर येथील श्री सिद्धगड भवानी माता मंदिर संस्थानच्या नूतन श्री सिध्दगड भवानी माता मंदिराचा भूमिपूजन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला.जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी सपत्नीक भूमिपूजन आज केले.श्री सिद्धगड भवानी माता मंदिर संस्थानचा अध्यक्ष म्हणून मंदिराचा व मंदिर परिसराचा विकास व्हावा यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांना संस्थानच्या इतर सहकाऱ्यांची व भाविकांची मिळणारी खंबीर साथ बळ देणारी आहे असे मनोगत नामदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केले .याप्रसंगी भाजपा पदाधिकारी , कार्यकर्ते परिसरातील नागरिक उपस्थित होते .

Read More

मुल्यवर्धन प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्याचा आत्मविशवास आणि कार्य क्षमता वाढेल…. गटशिक्षणाधिकारी विष्णू काळे

शेंदुर्णी – मुल्यवर्धन विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी महत्वाचा आहे. या प्रशिक्षणामुळे शिक्षाकांची कार्य क्षमता सुधारेल आणी त्यांना विद्याथ्यामध्ये मुल्ये रुजवण्याचा आत्मविश्वास मिळेल. असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी विष्णू काळे यांनी शेंदुर्णी येथे गरुड प्राथमिक शाळेत आयोजीत प्रशिक्षणत केले.महाराष्ट्र शासन व शांतीलाल मुथ्था फॉउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मूल्यवर्धन प्रशिक्षण 3. 0 दिनांक – 01-10-2025 पासून 08-10-2025 पर्यंत दोन टप्प्यात समूह साधन केंद्र शेंदुर्णी येथे आ. ग. गरुड विद्यालय शेंदुर्णी येथे सुरु असून या प्रशिक्षणात जामनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विष्णू काळे , मूल्यवर्धन उपक्रमाचे तालुका समन्वयक, लखन कुमावत यांनी भेट दिली.गटशिक्षाणाधिकारी विष्णू काळे यांनी मार्गदर्शन करतांना या प्रशिक्षणाची उपयोगीता व शिक्षकाची भुमिका स्पष्ट केली. तसेचे विद्यार्थ्यामध्ये नैतिक मुल्यांची रुजवणूक करणे, सामाजीक जवाबदारीची जाणीव निर्माण करणे, संवेदनशील आणी सहकार्यशील नागरीक घडवणे, शाळामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करणे.असे मूल्यवर्धनाची उदिष्ठे स्पष्ट केली.यावेळी कुलाचे कुलसंचालक तथा केंद्रप्रमुख निवृत्ती जोहरे , गरुड शाळेच्या मुख्याध्यापिका सौदामिनी गरुड , तसेच सुलभक रविंद्र सपकाळे व योगेश इंगळे हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गोपाल कुमावत यांनी केले.

Read More

डॉ.ऐश्वर्री राठोड यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मध्ये “सचिव पदी “निवड झाल्याबद्दल जळगाव जिल्हा व तसेच जामनेर तालुक्यामध्ये सर्वत्र अभिनंदन चा वर्षाव.

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी जामनेर – महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतलेले कार्य अहवालाची दखल. जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाली असताना, पक्ष सोबत खंबीरपणे एकनिष्ठतेने उभे राहणे. आणि तसेच पक्षाच्या संघटनांमध्ये मजबुतीने सहभाग घेणे व संघटनाला महत्त्व देणे. प्रत्येक आंदोलन पक्षासाठी विविधरित्या कार्य करण्याची क्षमता .ही भूमिका डॉ. ऐश्वर्री राठोड यांनी नेहमीच आपल्या पक्षासाठी एकनिष्ठतेने दाखवली. आणि त्याचीच ही पोचपावती. वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा बरेच आरोग्य शिबिरे ,सामाजिक उपक्रम ,विविध उत्कृष्टरित्या जळगाव जिल्ह्यामध्ये तसेच जामनेर तालुक्यामध्ये डॉ. ऐश्वर्री राठोड यांनी राबविलेले आहेत. त्याची दखल AICC न्यू दिल्ली अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेजी आणि के.सी वेणूगोपालजी यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री .हर्षवर्धन सपकाळ यांच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र काँग्रेस कमिटी मध्ये सचिव पदी डॉ. ऐश्वर्री राठोड यांची निवड झाली.

Read More

मालेगाव मधील बलात्कार घटने प्रकरणी लोहारा गाव कडकडीत बंद.आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.. अशा घोषणांनी लोहारा परिसर दणाणला.

प्रतिनिधीलोहारा तालुका पाचोरा येथे मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील तीन वर्ष चिमुरडीवर झालेल्या अत्याचारा प्रकरणी आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत लोहारा मार्केट पूर्ण दिवसभर कडकडीत बंद ठेवण्यात आला होता या बंदला गावातील व्यापारी, तरुण, तरुणी, नागरिक महिला यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. नाशिकच्या मालेगावमधील एका 3 वर्षांच्या चिमुरडीच्या हत्या प्रकरणानं अवघा महाराष्ट्र हादरला आहे. सकाळी 9:00 वाजता लोहारा बस स्टॅन्ड परिसरापासून गावातून मुलींनी हातात निषेध नोंदवणारे पोस्टर घेऊन रॅली काढून आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या.आरोपीचा फोटो पेटवण्यात आला व त्याला असाच उभा पेटवा असा मानस व्यक्त केला. या रॅलीमध्ये सामाजिक कार्यकर्ते, तरुण तरुणी पुरुष महिला, पत्रकार बांधव उपस्थित होते.

Read More

जामनेर -भारतीय जैन संघटनेची व्यापारी सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर प्रतिनिधीजामनेर येथील व्यपाऱ्यांना उद्योग-व्यवसायात अधिक सक्षम बनविण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या व व्यापारी एसोसिएशन यांच्या वतीने विशेष कार्यशाळेचे येथील महावीर भवन मध्ये आयोजन करण्यात आले.खानदेशात तळोदा,शहादा,शिरपूर, धुळे,शिंदखेडा, पाचोरा , जळगांव या सात ठिकाणी कार्यशाळा होऊन जामनेर येथील ही 8 वी कार्यशाळा असून, राज्य अध्यक्ष केतन शहा, राज्य महासचिव प्रवीण पारख यांच्या मार्गदर्शनाने व उपाध्यक्ष विनय पारख, खानदेश विभाग अध्यक्ष प्रा.चंद्रकांत डागा यांच्या प्रयत्नाने केले गेले असल्याचे विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत यांनी सांगितले.कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक म्हणून सुनील भवरीलालजी गादीया यानी सहकार्य केले.या कार्यशाळेत उद्योजकतेसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सखोल माहिती देण्यात आली.कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून निरंजन जैन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी उद्योग-व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांची माहिती, त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया, तसेच कर्जासाठी लागणारी सिक्युरिटी (हमी) याबाबत सविस्तर विवेचन केले. योजनांमध्ये आवश्यकता नसते, तर काही योजना मर्यादित सिक्युरिटी घेतली जाते, माहिती त्यांनी दिली. या सेमिनारला ओसवाल जैन संघचे सचिव ईश्वरलालजी साबद्रा,पारसनाथ देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष प्रकाश सैतवाल,व्यापारी एसोसिएशन व किराना अध्यक्ष ताराचंद झांवर, उपाध्यक्ष पुखराज डांगी, एमआयडीसी अध्यक्ष सुभाष बोहरा, अड़त अध्यक्ष प्रकाश कोठारी,कृषि अध्यक्ष प्रदीप लोढ़ा, डॉक्टर्स अध्यक्ष डॉ कांतिलाल ओस्तवाल,मेडिकल अध्यक्ष पंढरी पाटिल,कपड़े व्यापारी अध्यक्ष संजय चिंचकर,सीए उपाध्यक्ष अनिल मुनोत कार्यशाळेला उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज़िला उपाध्यक्ष विकास कोठारी, जामनेर शहर अध्यक्ष कुशल बोहरा, उपाध्यक्ष अभिनंदन जैन,सदस्य विकास ललवानी,मयूर पोरवाल,संजय ललवानी,कुणाल चंडालिया,महिला सदस्य मनीषा कोठारी,वंदना चोरड़िया , भाग्यश्री लुंकड आदि सदस्यंनी प्रयत्न केले.कार्यशाळेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांना शासकीय योजनांविषयी स्पष्ट व उपयुक्त माहिती मिळाली असून,भविष्यात उद्योग वृद्धीसाठी या मार्गदर्शनाचा मोठा फायदा होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.सूत्र संचालन वंदना चोरड़िया आणि आभार प्रदर्शन डॉ कांतिलाल ओस्तवाल यानी केले.

Read More

जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत गरुड विद्यालयाचे घवघवीत यश

धी शेंदुर्णी एज्युकेशन को-ऑप सोसायटीचेआ.ग.र गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी येथील विद्यार्थ्यांचे तायक्वांदो स्पर्धेत यश व विभागावर निवळ नुकत्याच जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेतील ज्या विद्यार्थ्यांची जिल्ह्यावर निवड झाली यापैकी 11 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून नुकताच जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेतून विजयी होत.सुवर्णपदक प्राप्त विजेते विद्यार्थी केवीन रवींद्र चौधरी, दक्ष लोखंडे,प्रद्युम्न जगताप,आर्यन वानखेडे,साहिल शेलार,चिन्मय सुर्वे, रागिणी पाटील,दृष्टी भारुडे,कामिनी नाथ,विनायक भोई,या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक मिळाले असून त्यांची विभागावर निवड झालेली आहे. तायक्वांदो स्पर्धेत 11 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक मिळाले 4 विद्यार्थ्यांना रौप्य पदक मिळालेले आहे . या 11 विद्यार्थ्यांची विभागावर निवड झालेली आहे.म्हणून या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजय रावजी गरुड व्हाईस चेअरमन आबासाहेब भीमराव शेळके,सचिव काकासोसागर मलजी जैन,सहसचिव दादासो यु यु पाटील, कार्यालयीन सचिव भाऊसो दीपकजी गरुड,वस्तीगृह सचिव गो गो सूर्यवंशी,विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर एस चौधरी, पर्यवेक्षक व्ही.एम शिरपुरे,पर्यवेक्षक विनोद पाटील या मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे देखील अभिनंदन केले.तसेच फिजिकल टीचर पी पी पाटील,अमोल पाटील,आर.एम.सपकाळे,पी एम पाटील,सचिन सुर्वे इत्यादी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Read More

पळासखेडे मिराचे येथे विकसित भारत का अमृत काल सेवा ११ सालनिमित्त पंचायत चौपाल सभेचे

पळासखेडे(प्रतिनिधी)जामनेर तालुक्यातील पळासखेडे मिराचे येथे विकसित भारत का अमृत काल सेवा सुशासन गरीब कल्याण के ११ साल निमित्त पंचायत चौपाल सभेचे आयोजन करण्यात आले होते मा ना पंत प्रधान नरेंद्र जी मोदी सरकारने भारतीय जनते साठी केलेल्या कल्याणकारी योजना हिताची कामे देश्याला प्रगती पथावर नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची माहिती वक्त्यांनी दिली राम मंदीर ३७० कलम ऑपरेशन सिंदूर अश्या अनेक गोष्टी उपस्थीत नागरिकांसमोर मांडल्या.कार्यक्रमांचे अध्यक्ष स्थानी प्रा शरद पाटील होते तर जामनेर पश्चिम मंडल अध्यक्ष कमलाकर भाऊ पाटील गट नेते अमर भाऊ पाटील अण्णा भाऊ पिठोडे संजय निराधार चे अध्यक्ष भगवान भाऊ इंगळे भैय्या शेठ अस्लम शेख अन्वर शेख शबीर शेख आशिष भाऊ रवी भाऊ पाचपोळे निवृत्ती भाऊ पाटील गोविंद भाऊ राजपूत संजय भाऊ पवार मंगल राजपूत अर्जुन मगर अरुण पवार विजू भाऊ पाटील व इतर मंडळी उपस्थित होते सूत्र संचालन रवि हडप यांनी केले तर आशिष दामोदर यांनी आभार व्यक्त केले

Read More

७० वर्षाची परंपरा जोपासत श्रीराम पेठेत बारागाड्या उत्साहात साजर्‍या.

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर /प्रतिनिधी – आपले सण आपले उत्सव आपणचं साजरे करणार या ब्रिद वाक्याखाली पारंपरिक पद्धतीने सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य दिव्य बारागाड्या उत्सव शहरातील श्रीराम पेठ भागातील दसरा मैदान ते हनुमान मंदिरात पर्यंत ओढल्या गेल्या स्व. देवचंदबाबा शिंदे यांच्या प्रेरणेने सुरु केलेल्या बारागाड्या उत्सवाला आज सुमारे ७० वर्षाची परंपरा लाभली आहे. सविस्तर माहिती अशी श्रीराम पेठ भागात असलेले श्रीराम पेठ वासियांचे ग्रामदैवत तथा आराध्य दैवत असलेले खंडेराव महाराज यांच्या नावाने या भागात बारागाड्या ओढल्या जातात. या उत्सवास आज ७० वर्षाची परंपरा लाभली आहे सामाजिक एकात्मता हिच श्रीराम पेठ वासियांची ओळख असल्याने हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. सद्ध्या तरी या बारागाड्या उत्सव काठीचा मान हा शिंदे परीवारा कडे असुन श्रीराम पेठ भागातील रहिवाश्यांकडुन तसेच शिंदे परीवारातील सदस्यांनी हा पारंपरिक व पुरातन वारसा कायम ठेवला आहे. दसरा मैदान ते हनुमान मंदिरात पर्यंत या बारागाड्या ओढल्या जातात तर पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येने भाविक या उत्स्वात हजारोंच्या संख्येने सहभागी होत सोहळा साजरा करतात तर “खंडेराव महाराज की जय” तर “येळकोट येळकोट जय मल्हार” या घोषणांनी आसमान दणाणून सोडला जातो. आज जरी श्रीराम पेठ भागातील रहिवासी शहराच्या अन्य भागात विखुरलेले असले तरी आजच्या दिवशी लहान पासुन ते वयोवृद्ध व्यक्ती तसेच महिला आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित होतात. आज इंटरनेट युगात सुद्धा हि परंपरा टिकवून ठेवल्याचा आनंद आहे असा विश्वास श्रीराम पेठ भागातील रहिवासी मान्य करतात. त्यामुळे हिच सामाजिक एकता शहरात कुतुहलाचे मुख्य कारण ठरले आहे हा भव्य दिव्य सोहळा मोबाईलच्या कॅमेर्‍यात भाविकांनी कैद केला. खोबरे भंडाऱ्याची उधळण करुन मोठ्या धार्मिक वातावरणात नियोजित भक्तां करवी बारागाड्या ओढल्या जातात तर बारागाड्या ओढल्या नंतर उडीद व भाकर भंडाऱ्याची तथा महाप्रसादाचा लाभ भाविक घेत असतात या महाप्रसाद वाटपासाठी खंडेराव महाराज सेवा समिती कार्यान्वित असते.

Read More

गरुड विद्यालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य तपासणी यशस्वी

शेंदुर्णी : येथील दी शेंदुर्णी एज्युकेशन को-ऑप सोसायटी संचलित आ.ग.र. गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय, जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिता राठोड, डॉ. जितेंद्र वानखेडे, औषध निर्माता प्रियंका वानखेडे, आरोग्य सेविका हर्षा गवळी यांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य परीक्षण पूर्ण केले. तसेच, काही विद्यार्थ्यांना किरकोळ तक्रारी असल्यास त्यांच्यासाठी प्राथमिक उपचार करून पुढील तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, शेंदुर्णी येथे पाठविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना संतुलित आहाराचे महत्त्व, स्वच्छता आणि आरोग्य जपण्याचे विविध उपाय यावर मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. अनिता राठोड व डॉ. जितेंद्र वानखेडे यांनी आरोग्य जागृतीसाठी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या उपक्रमास विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. चौधरी, पर्यवेक्षक व्ही. एम. शिरापुरे, पर्यवेक्षक विनोद पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या आरोग्य तपासणीला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

Read More

मा.खा.ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर ३० रोजी जामनेरात

जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथे २१ वर्षीय सुलेमान खान या तरुणाचा जामनेर येथे कॅफेवर बसलेला असताना , बाहेर काढून १० ते १२ जणांनी अमानुषपणे मारहाण करत खून केला होता.या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र मोठी खळबळ उडाली होती.याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर दिनांक ३० ऑगस्ट,शनिवार रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,जामनेरला येणार आहे. त्यानंतर ते पुढे बेटावद खुर्द येथे जाऊन मयत सुलेमान खान याच्या कुटुंबीयांची ते भेट घेणार आहेत.यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील,युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार,महिला जिल्हाध्यक्ष वंदना सोनवणे,जिल्हा महासचिव योगेश तायडे,जिल्हा उपाध्यक्ष राहुल इंगळे,जिल्हा उपाध्यक्ष इम्रान तडवी, जिल्हा सचिव रफिक बेग, ॲड.राजू मोगरे पाटील,जिल्हा संघटक बबन कांबळे,यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे जामनेर तालुकाध्यक्ष सचिन सुरवाडे यांनी कळविले आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!