Headlines

मका खरेदीत अडवणूक: तक्रार करा!जामनेर बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांचे आवाहन….

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधवजामनेर,समितीत मका खरेदी करताना व्यापान्यांकडून ओलसर असल्याचे कारण पुढे करून तो कमी दराने खरेदी करणे किंवा शेतकऱ्यांची अडवणूक करणे असे प्रकार केले जात असतील तर त्याची बाजार समितीकडे तक्रार करावी. जेणेकरून बाजार समिती प्रशासनाला संबंधित दोषी व्यापाऱ्याच्या विरोधात कारवाई करता येईल, असे आवाहन येथील बाजार समितीचे सभापती अशोक पाटील व सचिव प्रसाद पाटील यांनी केले आहे.सभापती श्री. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की या हंगामातील मक्याचा पेरा वाढल्याने उत्पादन वाढण्याची स्थिती आहे. परंतु बहुतांश शेतकरी एकाचवेळी मका विक्रीसाठी आणत असल्याने मका खरेदी केंद्रावर प्रचंड गर्दी होत आहे. विक्रीसाठी आणलेल्या मक्यामधील आर्द्रता तुर्तास जास्त असल्याने हा मका चाळविण्यासाठी बऱ्याच खरेदीदारांकडे जागेची अडचण आहे. त्यामुळे मका खरेदीत अडचणी उद्भवत आहेत, अनेक शेतकरी बांधवांनी त्यांचा मका हमी भावापेक्षा कमी दरात खरेदी होत असल्याच्या व व्यापाऱ्यांकडून त्यांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी आपला मका ‘एफएक्यू’ दर्जानुसार वाळवून सुकवून व टप्प्याटप्याने विक्रीसाठी आणावा, जेणेकरून आपली गैरसोय होणार नाही अथवा आर्द्रतेच्या अतिरिक्त प्रमाणामुळेआर्थिक नुकसान होणार नाही. बरेच शेतकरी ओला मका विक्रीची घाई करतात. त्यांनी देखील बाजारभावाचा व विक्री योग्य स्थितीचा अंदाज घेऊन घाबरून न जाता, योग्य वेळी माल विक्री करावा, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस राज्यात वादळी वारा व पावसाची शक्यता आहे. याचाही विचार करून मका विक्रीची घाई करू नये असे आवाहनही सभापती अशोक पाटील व सचिव प्रसाद पाटील यांनी केले आहे.

Read More

JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलचे यशस्वी 9 वर्ष पूर्ण.संचालक मनोजजी कावडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयात वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलने यशस्वी ९ वर्ष पूर्ण करून १० व्या वर्षात पदार्पण केले. या निमित्ताने संचालक मनोजजी कावडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयात वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी मनोज कावडिया यांनी चॅनेलच्या यशस्वी वाटचालीबद्दल विशेष कौतुक करत भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यानंतर केक कापून वर्धापनदिनाचा आनंद साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला संचालक किरण सोनवणे, संपादक शांताराम जाधव, कार्यकारी संपादक ईश्वर चोरडिया, अँकर मीनल चौधरी, कॅमेरामन विलास ढाकरे, सुपडू जाधव, सुनील जाधव,सचिन माळी, प्रविण गावंडे, आबा पाटील आणि इतर सहकारी उपस्थित होते. JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलने पत्रकारितेच्या क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली असून, निष्पक्ष आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनेलची ओळख आहे.

Read More

पाळधी जिल्हा परिषद शाळेत नव्याने सुरू झालेल्या 5 वी वर्गातील विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी मोफत मार्गदर्शिकांचे वाटप.

पाळधी जिल्हा परिषद शाळेत नव्याने सुरू झालेल्या 5 वी वर्गातील विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी मोफत मार्गदर्शिकांचे वाटप. पाळधी ता. जामनेर : जिल्हा परिषद केंद्र शाळा पाळधी येथे आज दिनांक २५ जून २०२६ रोजी इयत्ता पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी प्रत्येकी ४०० रुपये किमतीची नवोदय मार्गदर्शिका मोफत वितरित करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांची योग्य तयारी करता यावी, या उद्देशाने शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. मार्गदर्शिकेमुळे विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेश परीक्षेचा अभ्यास अधिक सोपा व प्रभावी पद्धतीने करता येणार आहे.यावेळी विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करत मनापासून आभार मानले. शाळेच्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडूनही कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळा नेहमीच अशा शैक्षणिक उपक्रमांना प्राधान्य देत असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.“गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या यशासाठी जिल्हा परिषद केंद्र शाळा पाळधी सदैव कटिबद्ध!” 📖✨

Read More

संत शिरोमणी सावता माळी महाराज पुण्यतिथी समाधी सोहळ्याचे पाळधी येथे आयोजन.

श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त पाळधी तालुका जामनेर येथे भव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमांमध्ये गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा मार्फत आदर्श कामगार पुरस्कार २०२५ मिळवलेल्या व आपल्या गावचे भूमिपुत्र गरवारे टेक्निकल फायबर इंडस्ट्रीज वाई येथे कार्यरत असणारे श्री दत्तात्रय खंडू जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला.सामाजिक कार्यक्रमांमध्ये श्री दत्तात्रय जाधव यांचा नेहमीच एक चांगला उत्कृष्ट सहभाग असतो, ज्यामध्ये वृक्षारोपण असेल शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत असेल समाजकार्य असेल या सर्वांची दखल घेऊन श्री संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून माळी समाज पंच अध्यक्ष श्री दगडू आनंदा माळी व उपाध्यक्ष देवेंद्र गोरे तसेच गावातील माजी सरपंच दिगंबर माळी ग्रामपंचायत सदस्य दीपक माळी पंच कमिटी व समाज बांधव यांच्या हस्ते सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता..

Read More

सकल मराठा समाज बैठक जामनेर येथे उत्साहात पार पडली

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर प्रतिनिधीजामनेर येथे सकल मराठा समाजाची महत्वाची बैठक उत्साहात व संघटनात्मक वातावरणात पार पडली. आगामी राज्यव्यापी कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर समाजबांधवांना संघटित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.राजमाता जिजाऊ यांच्या माहेरचे वंशज शिवाजी राजे जाधव यांचे मार्गदर्शनशिवाजी राजे जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनात राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज अधोरेखित केली.राजमाता जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेडराजा ते स्मृतीस्थळ पाचाड (रायगड) या जिजाऊ अभिवादन यात्रेत जामनेर तालुक्यातून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले. ही यात्रा केवळ श्रद्धेची नसून मराठा समाजाच्या एकतेचे व विचारप्रसाराचे प्रभावी माध्यम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. अशोक शिंदे यांचे विचारअशोक शिंदे यांनी आपल्या भाषणात मराठा समाजाने आपल्या गौरवशाली इतिहासाची जाणीव कायम ठेवावी, असे आवाहन केले.राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांवर आधारित संघटनात्मक कार्य उभारणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.छत्रपती शिवाजी ब्रिगेड अन्यायाविरुद्ध ठामपणे आवाज उठवत असून समाजाच्या प्रत्येक प्रश्नात सक्रियपणे हस्तक्षेप करत आहे. समाजातील एकोपा वाढवून न्यायासाठी लढण्याची भूमिका अधिक मजबूत करण्याचे त्यांनी आवाहन केले. अध्यक्षीय भाषण – प्रकाश पाटीलकार्यक्रमाचे अध्यक्ष भाग्योदय कलेक्शनचे श्री. प्रकाश पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठा समाजातील तरुणांना उद्योग-व्यवसाय क्षेत्रात पुढे येण्याचे आवाहन केले.छोटा असो वा मोठा व्यवसाय, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक तरुण उद्योजकाच्या पाठीशी संपूर्ण मराठा समाज ठामपणे उभा आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक – राहुल चव्हाणकार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल चव्हाण यांनी केले.त्यांनी सांगितले की, १४ जून ते १७ जून दरम्यान होणाऱ्या जिजाऊ अभिवादन यात्रेसाठी ग्रामपातळीवर बैठका आयोजित करून मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. मागील तीन वर्षांपासून आपण यात्रेत सहभागी होत आहोत, मात्र यंदा विक्रमी सहभाग नोंदवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. इतर मान्यवरांची उपस्थितीया बैठकीस अशोक आप्पा जाधव, समाधान वाघ, सुपडू पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.बैठकीत दिलीप खोडपे सर, व्ही.पी. पाटील सर, पप्पू पाटील, कैलास पाटील, ईश्वर पवार, अशोक पाटील, दिलीप पाटील, ईश्वर चवरे, रवि बंडे, सागर पाटील, दिपक पाटील, राहुलरॉय मुळे, सागर मराठे यांच्यासह असंख्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनकार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल ठोंबरे यांनी केले.या बैठकीतून मराठा समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी ठोस दिशा देण्यात आली असून, आगामी जिजाऊ अभिवादन यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात जनसहभाग घडवून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Read More

अतिवृष्टी अनुदानासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन; आठ दिवसांत निधी वर्गाचे आश्वासन

जळगाव : अतिवृष्टी अनुदान वेळेत न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे धाव घेत अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांना निवेदन सादर केले. लवकरात लवकर निधी न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर निधी वर्ग करण्यात येईल असे आश्वासन दिले. याशिवाय शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महसूल अधिकारी अंगद कासटकर यांचीही भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. कासटकर यांनी जामनेर तहसीलदारांशी तत्काळ दूरध्वनीवरून चर्चा केली आणि येत्या आठ दिवसांत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट निधी वर्ग करण्यात येईल असे स्पष्ट केले. या आंदोलनात सुभाष ठोंबरे, अविनाश पाटील, गोपाल कदम, समाधान चौधरी, प्रकाश ठोंबरे, अशोक ढगे, रामचंद्र पवार, अजय मराठे आणि विशाल भगत यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

Read More

प्रभाग क्रमांक 12-ब मधून सौ. स्वामिनी जगदीश भामरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जामनेर : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, वार्ड क्रमांक 12-ब (सर्वसाधारण महिला राखीव) या प्रभागातून सौ. स्वामिनी जगदीश भामरे (सोनार) यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. माननीय नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षातर्फे हा अर्ज दाखल झाल्याची माहिती देण्यात आली. सौ. भामरे यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागात भाजपकडून निवडणुकीची अधिकृत तयारी सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्ज दाखल करताना त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. सौ. स्वामिनी भामरे या जगदीश बाबुराव भामरे यांच्या अर्धांगिनी असून सामाजिक क्षेत्रात त्यांच्या सक्रिय योगदानामुळे त्या परिसरात परिचित आहेत. नगरपरिषद निवडणुकीची राजकीय तापटता दिवसेंदिवस वाढत असताना, वार्ड 12-ब मधील या उमेदवारीमुळे मुकाबला अधिक चुरशीचा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read More

उज्जैन (मध्य प्रदेश) येथे भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर ‘सन्मान अभियान’ कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे ह्या उपस्थित

उज्जैन (मध्य प्रदेश) येथे भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर ‘सन्मान अभियान’ कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे ह्या उपस्थित. बाबासाहेब यांच्या जन्मस्थान महू (मध्यप्रदेश) येथे भेट देऊन भूमीला नतमस्तक. भारतरत्न डॉ.भीमराव आंबेडकर ‘सन्मान अभियान’ या मोहिमेअंतर्गत, भारतीय जनता पक्ष १४ एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन बाबा साहेब यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवणार असून, आज त्याच अभियानाचा भाग म्हणून उज्जैन (मध्य प्रदेश) येथे भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर ‘सन्मान अभियान’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असता केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले. संविधानाची निर्मिती साकार करून, बाबासाहेबांनी देशाच्या सर्वांगीण विकासाचा आणि कोट्यवधी लोकांच्या उन्नतीचा मार्ग मोकळा केला आहे. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली, भाजपा सरकारने बाबा साहेबांच्या महान तत्वांचे अनुसरण करून, आज भाजपा ‘विकसित भारत’ चा संकल्प साध्य करण्यात प्रयत्नशील आहे. प्रत्येक घटकाचा विकास आणि सामाजिक सलोखा हे भाजपा चे ध्येय आहे. असे यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सांगितले. तसेच यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थान असलेले महू (मध्यप्रदेश) येथे भेट देऊन या पवित्र भूमीला नतमस्तक करून त्यांच्या विचारांची, संघर्षांची आणि सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याची जाणीव पुन्हा नव्याने केली. व शिक्षण, समता आणि न्यायासाठी झगडण्याची नवी ऊर्जा मिळाली. त्या मातीला स्पर्श करून मन विचारांच्या तेजाने उजळून निघालं. बाबासाहेबांनी दिलेला स्वाभिमान, शिक्षण आणि न्यायाचं बळ मनाला पुन्हा एकदा जाणीव करून देऊन गेलं. असे उद्गार यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी काढले.

Read More

शहापूर धरणाजवळ भीषण अपघात बसच्या धडकेत एस.टी. कंडक्टर ईश्वर कंडागळे यांचा मृत्यू – गावात शोककळा

जामनेर (२५ ऑगस्ट):जे रोज प्रवाशांच्या जीवाची काळजी घेत बसने सुरक्षित घरी पोहोचवत होते… त्यांचेच जीवन बसच्या चाकाखाली संपले अशा शब्दांत आज गावकऱ्यांनी ईश्वर अरुण कंडागळे यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली. जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा येथील ईश्वर कंडागळे (वय 33) हे एस.टी. महामंडळात कंडक्टर म्हणून कार्यरत होते. आज सायंकाळी शहापूर धरणाजवळ झालेल्या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वर कंडागळे हे स्वतःच्या दुचाकीवरून जात असताना एस.टी. बस (क्र. MH 20 BL 3360) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर एवढा भीषण होता की ते जागीच कोसळले आणि मृत्यूने त्यांना कवटाळले.विडंबना म्हणजे ज्यांनी आयुष्यभर प्रवाशांची सेवा केली, त्यांचाच जीव अखेर एस.टी. बसच्या धडकेत गेला. या घटनेने सहकारी व ग्रामस्थ स्तब्ध झाले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.अपघातानंतर नागरिकांनी धाव घेत तात्काळ मदत केली. ईश्वर कंडागळे यांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण चिंचखेडा गाव शोकसागरात बुडाले आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे अशी माहिती मिळाली

Read More

आप्पासाहेब र.भा.गरूड महाविद्यालयाच्या प्रांगणात संस्थेची सहविचार सभा संपन्न

धी.शेंदुर्णी से.एज्यु.को-ऑप सोसायटी संचलित, आप्पासाहेब र.भा.गरुड महाविद्यालयाच्या प्रांगणात संस्थेचे अध्यक्ष पदाधिकारी संचालक यांच्या उपस्थितीत शिक्षक,शिक्षकेतर सहविचार सभा पार पडली याप्रसंगी संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजयरावजी गरुड,उपाध्यक्ष आबासाहेब भीमराव शेळके,सचिव काकासो.सागरमलजी जैन,सहसचिव दादासो यु यु पाटील, ज्येष्ठ संचालक बापूसो भीमराव पाटील,संचालक डॉ.राजेंद्रजी शेळके,कार्यालयीन सचिव भाऊसो दीपकजी गरुड,संस्थेचे वस्तीगृह सचिव गो गो सूर्यवंशी,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य/मुख्याध्यापक,आर एस चौधरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजयजी भोळे,प्रा.डॉ.श्याम साळुंखे, पर्यवेक्षक व्ही.एम.शिरपुरे,विनोद पाटील तसेच सर्व शाखांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत सहविचार सभेप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे चेअरमन संजय दादा गरुड यांनी भूषविले सर्वप्रथम प्रतिमापूजन व माल्यार्पण नंतर प्रास्ताविक आर एस.चौधरी यांनी केले नंतर एस एस सी परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या संस्थेतील सर्व शाळांच्या,मुख्याध्यापकांचा व, शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. मान्यवरांच्या मनोगतात संस्थेचे सहसचिव यु यु पाटील यांनी सर्व कर्मचाऱ्यांना संबोधित करत विविध प्रकारच्या शालेय कामकाजाबद्दल व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबर त्यांच्या क्षमता वृंदिगत व्हाव्यात व विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आनंददायी अशा नाविन्यपूर्ण शैक्षणिक वाटचालीतून स्वयंपूर्णता विद्यार्थ्यांमध्ये रुजवावी अशी अपेक्षा व्यक्त केली.तद्नंतर सचिव सागरमलजी जैन यांनी शिक्षक आदर्श असून त्यांनी समाजापुढे व आपल्या विद्यार्थ्यांपुढे एक आदर्श निर्माण करावा असे विचार मांडले.अध्यक्षीय भाषणात संजय दादा गरुड यांनी आदेश वजा सूचनेच्या माध्यमातून मुख्याध्यापक व भाऊसाहेब यांनी स्वतःअपडेट राहून नवीन गोष्टींचा स्वीकार करावा तसेच कुठल्याही प्रकारची नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करून आपले जे टेक्नोसेवी काम असतील ते आपण स्वतः करावेत अशा सूचना केल्या.त्याबरोबर सर्व कर्मचाऱ्यांना आश्वासित करून नवीन शैक्षणिक धोरणाला तोंड देण्यासाठी सज्ज राहुन प्रत्येक शिक्षकाने बदल स्वीकारून स्वतःमध्ये व आपल्या विद्यार्थ्यांमध्ये बदल घडून आणावा अशा अपेक्षा व्यक्त करत नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक पी जी पाटील यांनी केले व आभार पर्यवेक्षक व्ही.एम.शिरपुरे यांनी मानले.

Read More
error: Don't Try To Copy !!