Headlines

जामनेर येथे अत्याधुनिक जी. एम. फिजिओथेरपी सेंटर व नव्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण

जामनेर येथे अत्याधुनिक जी. एम. फिजिओथेरपी सेंटर व नव्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण जामनेर (प्रतिनिधी): जामनेर शहरातील न्यू रुबीस्टार हॉस्पिटलच्या वतीने अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज जी. एम. फिजिओथेरपी सेंटर तसेच नव्या सुसज्ज रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे जामनेर व परिसरातील नागरिकांना अधिक दर्जेदार, आधुनिक आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. न्यू रुबीस्टार हॉस्पिटलने आरोग्यसेवेच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि प्रशिक्षित तज्ज्ञांच्या माध्यमातून जी. एम. फिजिओथेरपी सेंटर सुरू केले आहे. या केंद्रामध्ये विविध शारीरिक व्याधी, दुखापतीनंतरचे पुनर्वसन, सांधेदुखी, मणक्यांचे आजार तसेच इतर फिजिओथेरपी उपचार आधुनिक पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याचबरोबर रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीची सेवा मिळावी यासाठी नव्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेचेही लोकार्पण करण्यात आले. या रुग्णवाहिकेमुळे गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार केंद्रात पोहोचविणे अधिक सोयीचे होणार असून आरोग्यसेवेची गुणवत्ता आणखी उंचावणार आहे. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण उपचार सेवा आणि रुग्णकेंद्रित दृष्टिकोन यांच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना सक्षम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या न्यू रुबीस्टार हॉस्पिटलच्या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या स्तुत्य उपक्रमासाठी न्यू रुबीस्टार हॉस्पिटलच्या संपूर्ण व्यवस्थापन, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाचे नागरिकांनी अभिनंदन केले असून, भविष्यातही अशाच दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Read More

समाजातील सुमारे 30 वर्षीय तरुणाने गावाशेजारील जंगलात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या

मुदखेडा येथील आकाश सोनवणे या भिल समाजातील सुमारे 30 वर्षीय तरुणाने गावाशेजारील जंगलात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आकाश सोनवणे जंगलात जाऊन विष घेतले. बराच वेळ तो घरी परतला नसल्याने घरच्यांनी शोध घेतला असता तो अर्धमूच्र्छित अवस्थेत आढळून आला. कुटुंबीयांनी तातडीने त्याला जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अधिकच बिघडल्याने पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, वाटेतच त्याचा मृत्यू झाला.या घटनेने मुदखेडा गावात शोककळा पसरली आहे. आकाश हा स्वभावाने शांत व मनमिळावू होता, असे गावकऱ्यांनी सांगितले. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही.

Read More

खडकी ता. जामनेर येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

खडकी गावात संत सेवालाल महाराज जयंती भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरी करण्यात आली. यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक वेशभूषा आणि स्वच्छता अभियान राबवत गावकऱ्यांनी एक आदर्श उपक्रम साकारला. संपूर्ण गावाच्या सहभागातून झालेल्या या उपक्रमामुळे सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन सुशील भाऊ नाईक यांनी केले होते. कार्यक्रमाला राज्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन तसेच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली.गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे जयंती उत्सवाला भव्य स्वरूप प्राप्त झाले.

Read More

जामनेर : सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधवजामनेर शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले श्री. प्रदीप गायके, श्री. मनोज महाले, श्री. जीवन सपकाळ, प्रवीण गावंडे, यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.जामनेर निवास स्थानी महाराष्ट्राचे मंत्री श्री. गिरीशभाऊ महाजन यांनी नवागत कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत बाविस्कर, ज्येष्ठ नेते श्री. जे. के. चव्हाण, जामनेर शहर मंडल अध्यक्ष श्री. रविंद्र झाल्टे, जिल्हा सरचिटणीस श्री. आतिष झाल्टे, श्री. जितेंद्र पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाची जामनेर शहरातील संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.

Read More

शिक्षक, पदवीधर आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन

टप्पा अनुदान शाळांना अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करावी, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, संच मान्यतेचा जाचक जीआर रद्द करावा, समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांना कायम करावे, यासह इतर मागण्यांसाठी आज (शुक्रवारी)शिक्षक व पदवीधर आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलने केले. या आंदोलनात आमदार जयंत आसगावकर, आमदार विक्रम काळे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार किशोर दराडे, आमदार अभिजीत वंजारी, आमदार सुधाकर आडबाले, आमदार अभ्यंकर सहभागी झाले होते. जोपर्यंत शासन शिक्षकांच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असल्याचे यावेळी आमदार जयंत आसगावकर यांनी सांगितले.

Read More

छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयातील दिव्या सदाशिवे या विद्यार्थिनीला छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुण रत्न प्रथम पुरस्कार*

छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयातील दिव्या सदाशिवे या विद्यार्थिनीला छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुण रत्न प्रथम पुरस्कार* जे. बी. एन. महाराष्ट्र न्यूज जामनेरसावळदबारा प्रतिनिधी -जबार एस तडवी गुणवंत्त विध्यार्थ्यांना हा पुरस्कार दिला जातो त्यासाठी अभ्यास करणे ही काळाची गरज. प्रा नारायण कोलते पा.सविस्तर वृत्त असे की जय कालंका देवी शिक्षण प्रसारक संस्था संचलित छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सावळदबारा येथील वर्ग दहावीची सन फेब्रुवारी/मार्च 2024 मध्ये उत्तीर्ण झालेली अतिशय हुशार व कुशाग्र बुद्धिमत्तेची विद्यार्थिनी आपल्या घरच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करत अतिशय तन-मन-धनाने शिक्षण घेणारी व वर्ग दहावीला 93.80 गुण घेऊन उत्तीर्ण झालेली कुमारी दिव्या रावसाहेब सदाशिवे या विद्यार्थिनीला छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता गुणरत्न पुरस्कार सन 24-25 मध्ये विशेष जिल्हा सामाजिक विभाग समाज कल्याण विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत जाहीर करण्यात आला आज रोजी विद्यार्थिनीचे पालक या नात्याने महाविद्यालयाचे प्राचार्य नारायण कोलते व सर्व सहकारी शिक्षक यांच्यामार्फत तिच्या पालकांना देण्यात आला हा पुरस्कार प्राप्त करणारी विद्यालयाची पहिली महिला विद्यार्थिनी मानकरी ठरली आहे तिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे चेक द्वारे तिला 5000 रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं त्याबद्दल तिच्या पालकांनी व गावकऱ्यांनी संस्थेचे विद्यालयाचे विशेष आभार मानले. पुरस्कार देताना प्राचार्य कोलते यांनी सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की, तुम्ही सुद्धा या पुरस्काराचे मानकरी होऊ शकतात फक्त शिक्षण मन लावून आत्मसात करा आपली संपूर्ण विद्यार्थी दशेचे आयुष्य हे अभ्यासासाठी समर्पित करा आपोआपच यश तुमच्या पायथ्याशी लोळण घेईल त्यासाठी तुमच्या अंगामध्ये अभ्यास करण्याची जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास हा ठासून भरायला पाहिजे तरस तुम्ही यश मिळू शकता याचा ज्वलंत उदाहरण म्हणजे दिव्या सदाशिवे आपल्या शालेय जीवनात या विद्यार्थिनी कधी शाळेला दांडी मारली नाही दररोज शाळेत येऊन नियमित अभ्यास करणे शाळेतील सर्व शालेय उपक्रमामध्ये सहभाग नोंदविणे व उत्कृष्ट अशा निबंध स्पर्धेमध्ये सुद्धा या विद्यार्थिनीने पारितोषिक मिळवले आहे घरची परिस्थिती अतिशय हलाकीची वडिलांचे छत्र लहानपणीच हरवलेले पण आपल्या आईनी मोलमजुरी करून या विद्यार्थिनीला शिक्षण दिले वतीने आपल्या आईच्या मेहनतीचे पारणे फेडले. आज छत्रपती संभाजी नगर सारख्या देवगिरी महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत आहे केवळ स्वतःचा आत्मविश्वास व जिद्द याच्या भरोशावर स्वतःला सिद्ध करण्यासाठी मेहनतीने व जिद्दीने अभ्यास करीत आहे मित्रांनो आपल्या एवढ्या ग्रामीण भागात व खेड्यात सुद्धा गुणवत्ता व गुण रत्न विद्यार्थी घडू शकता असे प्राचार्य नारायण कोलते यांनी दैनिकाशी बोलताना मनोगत व्यक्त केले रोख रक्कम पुरस्कार मिळाल्याबद्दल तिचे पालक व भाऊ पालकांनी संस्थेचे अध्यक्ष भाऊराव लक्ष्मणराव कोलते व संचालक मंडळ तसेच शाळेतील सर्व प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सुद्धा आभार मानले याप्रसंगी शाळेतील शिक्षक भास्कर ससाने विकास पाटील, विजय सिंग राजपूत, मुकुंदा व्यवहारे, भास्कर खमाट, भूषण देसले भास्कर ससाने, पोपटराव सोनवणे ज्ञानेश्वर राठोड विनोद जाधव संजय जोशी जीवन कोलते अजबराव चव्हाण श्याम जाधव बाबासाहेब कोलते व विद्यार्थी पालक पत्रकार बंधू उपस्थित होते.अशी माहिती प्रा जीवन कोलते यांनी दिली

Read More

ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासह महसूल प्रशासनाला गती देण्यासाठी जिल्हादंडाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पोलीस पाटलांसाठी एक दिवसीय विशेष कार्यशाळा

जळगाव, दि. ७ एप्रिल (प्रतिनिधी) — ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासह महसूल प्रशासनाला गती देण्यासाठी जिल्हादंडाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पोलीस पाटलांसाठी एक दिवसीय विशेष कार्यशाळा जिल्हा नियोजन सभागृहात उत्साहात पार पडली. या कार्यशाळेस जिल्हाभरातील पोलीस पाटलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी श्री. श्रीमंत हारकर, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते तसेच अपर जिल्हादंडाधिकारी श्रीमती वैशाली चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विविध विभागांच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी पोलीस पाटलांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.महसूल प्रशासनासंदर्भात उपविभागीय दंडाधिकारी (फैजपूर) श्री. बबन काकडे यांनी पोलीस पाटलांची भूमिका स्पष्ट केली, तर उपविभागीय पोलीस अधिकारी (जळगाव) श्री. नितीन गणापुरे यांनी गुन्हे नियंत्रणासाठी पोलीस दलाशी समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. नरवीर रावळ यांनी आपत्तीच्या काळात प्रथम प्रतिसादक म्हणून पोलीस पाटलांची जबाबदारी विशद केली. तसेच उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती अर्चना मोरे यांनी आचारसंहिता पालन व सुरक्षित मतदान प्रक्रियेतील कर्तव्यांबाबत माहिती दिली.गाव पातळीवर प्रशासन व नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील कार्यरत असून त्यांच्या सजगतेमुळे ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ होते. या कार्यशाळेमुळे त्यांच्या कामकाजात अधिक स्पष्टता व गती येणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.“पोलीस पाटील हे गावातील प्रशासनाचे डोळे आणि कान आहेत. त्यांच्या सजगतेमुळेच ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्थेचे पालन सुलभ होते,” असे जिल्हा प्रशासनाने नमूद केले.जिल्हा प्रशासनाने अशा प्रशिक्षणात्मक उपक्रमांद्वारे ग्रामीण प्रशासन अधिक सक्षम व उत्तरदायी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Read More

पहूरच्या दोन लेकींचा अपघाती मृत्यू!पिंपळगाव हरेश्वरमध्ये अंत्यसंस्कार; परिसरात शोककळा

पहूर, ता. जामनेर –दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये पहूर येथील दोन लेकींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्यांच्यावर सासरी पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पहिली घटना शनिवारी (ता. १२ जुलै) दुपारी घडली. कल्पना एकनाथ क्षीरसागर (वय ३२, रा. उल्हासनगर) यांचा दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान निधन झाले. दुसरी हृदयद्रावक घटना रविवारी (ता. १३ जुलै) सकाळी आठच्या सुमारास घडली. प्रीती तुकाराम गीते या पिंपळगाव हरेश्वर येथून पहूर येथे नातेवाईकांच्या रक्षाविसर्जनासाठी दुचाकीने येत असताना चिलगाव फाट्याजवळ अपघातात त्यांचे निधन झाले. दोघीही महिलांचा मूळ संबंध पहूर गावाशी असून त्या सध्या सासरी पिंपळगाव हरेश्वर येथे राहात होत्या. या दुहेरी अपघाती मृत्यूच्या घटनेने पहूर व पिंपळगाव हरेश्वर परिसरात शोककळा पसरली आहे.संपर्कात असलेल्या नातेवाइकांत हळहळ व्यक्त केली जात असून, अपघात रोखण्यासाठी अधिक सुरक्षिततेची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Read More

पंढरपूरात राज्यस्तरीय पुरस्कारांचा जल्लोषविविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव – भगवंत पांडुरंगाच्या साक्षीने सोहळ्याला उत्साहाची उधाण – वाकडी च्या बाळु जोशी याना सन्मानित

वाकडी.ता.जामनेर.दि.२/०४/२६सांस्कृतिक, सामाजिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत ३१ मार्च २०२६ रोजी पंढरपूर येथे “राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २०२६” मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित भव्य सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले त्यात बाळू जोशी वाकडी ता जामनेर दैनिक सकाळ चे पत्रकार यांना हि सन्मानित करण्यात आले . या सोहळ्याचे खास आकर्षण ठरल्या त्या प्रसिद्ध निवेदिका ऐश्वर्या चासकर ! आपल्या ओघवत्या, प्रभावी आणि हृदयस्पर्शी निवेदन शैलीने महाराष्ट्रभर प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या ऐश्वर्या चासकर यांना या मंचावर सन्मानित करण्यात आले. त्यांच्या आवाजातील जादू, मंचावरील आत्मविश्वास आणि प्रत्येक कार्यक्रमाला उंची देण्याची कला यामुळे त्या आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. त्यांच्या सन्मानावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना भरभरून दाद दिली. या सोहळ्यात महाराष्ट्र समाज भूषण, आदर्श पत्रकार, आदर्श शिक्षक, सेवा धन्वंतरी भूषण, कृषी भूषण, कलारत्न भूषण, गानसम्राज्ञी, साहित्यभूषण, अभियंता भूषण, भारत भूषण, आदर्श माता, शौर्य पुरस्कार, पर्यावरण पुरस्कार, साहित्यरत्न, काव्य भूषण, आदर्श लेखक, वृक्षमित्र, आरोग्यदूत, क्रीडारत्न, नारिशक्ती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महाराष्ट्र रत्न, जीवन गौरव, उत्कृष्ट सरपंच, आदर्श शेतकरी, संत तुकाराम महाराज जीवन गौरव पुरस्कार, महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार, यांसारख्या अनेक मानाच्या पुरस्कारांनी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यात आला. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, अध्यात्मिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, कृषी वैद्यकीय, पत्रकारिता, पोलिस सेवा तसेच देशसेवेसाठी योगदान देणारे सैनिक, युवा वर्ग आणि शौर्य दाखवणाऱ्या बालकांनाही या सोहळ्यात राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन संतराज पॅलेस, विसावा मंदिराशेजारी, बुलेट शोरूम समोर, पुणे रोड, पंढरपूर येथे करण्यात आले होते. भगवंत पांडुरंगाच्या पवित्र भूमीत झालेल्या या सोहळ्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच आध्यात्मिक उंची लाभली. उपस्थितांना पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभघेता आला तसेच कार्यक्रमानंतर स्वादिष्ट भोजनाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. या प्रसंगी श्री संत शिरोमणी सावता महाराजांचे 19 वे वंशज सावता महाराज वसेकर, पंढरपूरच्या नगराध्यक्ष प्रणिती भालके, वनरक्षक अधिकारी अनिता शिंदे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अॅड. प्रणव परिचारक, द युवा ग्रामीण पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख, ऐकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनंत कराड राष्ट्रीय महिला अध्यक्षा कल्पना पवार, राज्याध्यक्ष शकील मनियार, सचिव बाळासाहेब कोठुळे, महिला सचिव मंगलताई सासवडे, महाराष्ट्राची भूमी मुख्य संपादक आनंद बारवकर, सोलापूर जिल्हा कार्यकारणी, पुणे जिल्हा कार्यकारणी, सांगली जिल्हा कार्यकारिणी, जळगाव जिल्हा कार्यकारिणी, यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम नसून, समाजातील कर्तृत्वाला सलाम करणारा, प्रेरणा देणारा आणि नवचैतन्य निर्माण करणारा ठरला. विशेषतः ऐश्वर्या चासकर यांच्या निवेदनामुळे कार्यक्रमाला एक ग्लॅमर आणि अभिमानाची झळाळी प्राप्त झाली.

Read More

प्रॉपर्टी डीलर म्हणून ओळख असलेल्या रामेश्वर नथू बिजागरे यांची गळफास घेऊन आत्महत्या

जामनेर तालुक्यात मंगळवारी दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली. प्रॉपर्टी डीलर म्हणून ओळख असलेल्या रामेश्वर नथू बिजागरे (वय 40, रा. चिंचखेडा तवा) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एका मित्राला फोन करून ही माहिती दिली होती, मात्र मदतीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, रामेश्वर बिजागरे हे लाखोंच्या जमिनीच्या व्यवहारांमुळे जामनेर परिसरात परिचित होते. मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे जामनेर-बोदवड रोडवरील भवानी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. नंतर काही मित्रांसह धाब्यावर जेवणही केले. त्यानंतर त्यांनी एका निकटवर्तीय मित्राला फोन करून “आपण आत्महत्या करत आहे,” असे सांगितले. संबंधित मित्राने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु काही वेळाने त्यांचा फोन बंद यायला लागला. यानंतर मित्रांनी लोकेशनवरून शोध घेत भवानी घाट परिसर गाठला असता, बिजागरे यांचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृत्यूपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी असल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, या चिठ्ठीत काही व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली असून, पैशांचे व्यवहार, देणे-घेणे यांचा उल्लेख असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, मृत्यूमागील कारणे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. रामेश्वर बिजागरे यांनी अल्पावधीतच आर्थिक प्रगती केली होती. प्रॉपर्टी डीलिंगच्या माध्यमातून त्यांचे अनेकांशी व्यवहार होते. या व्यवहारांमुळे मानसिक तणाव होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे चिंचखेडा गावात तसेच जामनेर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!