कायदा-सुव्यवस्थेसाठी कटिबद्ध… जामनेर पोलीस स्टेशनला उपनिरीक्षक किशोर पाटील यांची नियुक्ती

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधवजामनेर: जामनेर शहराच्या सुरक्षेसाठी आणि कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, किशोर पाटील यांची जामनेर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या आगमनामुळे शहरातील नागरिकांमध्ये नवीन विश्वास निर्माण झाला असून, कायद्याच्या अंमलबजावणीला अधिक बळकटी मिळणार आहे किशोर पाटील यांनी जामनेर शहराच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना राबवण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. पोलिस आणि नागरिक यांच्यात समन्वय वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.संवादादरम्यान, उपनिरीक्षक पाटील यांनी जामनेरमध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जातील असे स्पष्ट केले. बेकायदेशीर कृत्यांवर त्वरित कारवाई केली जाईल, तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जातील.नवनियुक्त उपनिरीक्षक पाटील यांची नियुक्ती झाल्यापासून स्थानिक नागरिक, व्यापारी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सर्व स्तरांतून त्यांचे स्वागत होत असून, शहराच्या सुरक्षेसाठी त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे.जामनेरच्या विकासात आणि सुरक्षिततेच्या दिशेने ही एक मोठी पावले उचलली गेली असून, उपनिरीक्षक किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली जामनेर पोलिसांकडून प्रभावी कार्यवाही अपेक्षित आहे.

Read More

जिल्हास्तरीय लोकशाही दिन संपन्न; तक्रार निवारणास गती

महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यांचे त्वरित निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे जिल्हास्तरीय लोकशाही दिन उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे नागरिक व प्रशासन यांच्यात थेट संवाद साधला जाऊन तक्रार निवारण प्रक्रियेला गती मिळाली.या वेळी नागरिकांनी विविध शासकीय विभागांशी संबंधित तक्रारी, निवेदने व मागण्या मांडल्या. प्रत्येक अर्जाची अधिकृत नोंद घेऊन तक्रारदारांचे म्हणणे संयमाने ऐकून घेण्यात आले. संबंधित विभागप्रमुख व क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर तक्रारींच्या तातडीने निपटाऱ्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली.प्रलंबित प्रकरणे ठराविक कालावधीत निकाली काढण्याचे तसेच संबंधित नागरिकांना त्याची माहिती देण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले. तक्रार निवारण प्रक्रियेत पारदर्शकता, नियमबद्धता आणि तटस्थता राखण्यावर विशेष भर देण्यात आला.लोकशाही दिन हा केवळ तक्रारी मांडण्याचा मंच नसून सुशासन आणि लोकसहभाग यांचा प्रभावी दुवा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. प्रशासन नागरिकांच्या समस्या संवेदनशीलतेने हाताळून त्यांचे वेळेत निराकरण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. “नागरिकांच्या समस्यांकडे संवेदनशीलतेने पाहून त्यांचे विहित कालावधीत निराकरण करणे हे प्रशासनाचे प्राथमिक कर्तव्य आहे. लोकशाही दिनामुळे प्रशासन थेट जनतेच्या संपर्कात येऊन कामकाज अधिक गतिमान होत आहे,” असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

Read More

राज्य पोलीस दलातील 22 पोलीस अधीक्षकांच्या बदल्या.

मुबंई (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील 22 पोलीस अधीक्षक आणि उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर सिंधुदुर्ग, धाराशिव, रायगड अशा बड्या जिल्ह्यांचा समावेश आहे. रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली अहिल्यानगरला झाली… तर अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची बृहन्मुंबईला पोलीस उपायुक्त म्हणून वर्णी लागली आहे. सोमनाथ घार्गे यांच्या बदलीनंतर आंचल दलाल यांची रायगडच्या पोलीस अधीक्षक पदी निवड झाली आहे.धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सांगली येथील अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. सातारचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलिस दलात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुणे अधीक्षक तुषार दोषी यांची साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक पदी वर्णी लागली आहे. अकोल्यात गेल्या वर्षभरापासून वादग्रस्त ठरलेले जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांची बदली नागपूरला राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक ४ ला करण्यात आली असून त्यांच्या जागेवर नागपूर शहर पोलिस आयुक्तालयात उप आयुक्त पदावर कार्यरत असलेले अर्चित चांडक यांची बदली करण्यात आली आहे.खालीलप्रमाणे झाल्यात पोलीस बदल्या –आंचल दलाल – समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, पुणे पोलीस अधीक्षक, रायगडसोमनाथ घार्गे – पोलीस अधीक्षक, रायगड → पोलीस अधीक्षक, अहिल्यानगरमहेंद्र पंडित – पोलीस अधीक्षक, कोल्हापूर पोलीस उप आयुक्त, ठाणे शहरयोगेश गुप्ता – पोलीस अधीक्षक, नागरी सुरक्षा, नांदेड पोलीस अधीक्षक, कोल्हापूरबच्चन सिंग – पोलीस अधीक्षक, अकोला समादेशक,रा. पो. बल, गट क्र. 4, नागपूरराकेश ओला – पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, पोलीसउपदेश, बृहन्मुंबईअर्चित चांडक – पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर पोलीस अधीक्षक, अकोलामंगेश शिंदे – आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, नागपूरराजातिलक रोशन – सहायक पोलिस महासंचालक, मुंबई पोलिस उप, बृहन्मुंबईबाळासाहेब पाटील – पोलीस अधीक्षक, पालघरपोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीणयतिन देशमुख – अप्पर पोलीस अधीक्षक, गडचिरोली पोलीस अधीक्षक, पालघरसौरभ अग्रवाल – पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग गुन्हे अन्वेषण विभाग, पुणेमोहन दहिकर – पोलीस उप आयुक्त, ठाणे पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्गविश्व पानसरे – पोलीस अधीक्षक, बुलढाणा → समादेशक,रा. रा. पो. बल गट क्र. 9, अमरावती

Read More

वाकडी येथे महिला मुतारीचे बांधकाम बोगस

वाकडी.ता.जामनेर.दि.२२/०२/०२६ वाकडी येथे बसस्थानक परिसरात मध्ये सहा महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महिला मुतारी बांधकाम करण्यात आले होते, मात्र निकृष्ट दर्जाचे झाल्याने आज रोजी महिला मुतारीची दुरवस्था झाली आहे,मुतारी च्या आजूबाजूला अवैध धंदे गावठी,देशी,इंग्लिश,दारू विक्री होताना मोठ्या प्रमाणात होत आहे त्याचा त्रास महिला वर्ग व विध्यार्थी याना होत आहे महिला व शाळेकरी विद्यार्थ्यांनी लघुशंकेसाठी कोठे जावे हा प्रश्न निर्माण झाला आहे, महिला मुतारीचे बांधकाम करुन सहा महिने सुध्दा झाले नसले तरी , मुतारी ही नदी किनारी असल्याने मुतारी मध्ये मोठे पोकळ ढिगाळ पडले आहे,खालून मोठे बोगदे पडल्याने उतार निर्माण होवून एखादी महिला किंवा विद्यार्थ्यांनी लघुशंकेसाठी जर मुतारी मध्ये गेली तर पाय घसरून पडण्याचा संभव आहे,मुतारी मध्ये भराव न टाकता बोगस काम करून मोकळे झाले आहे त्यामुळे बसस्थानक परिसरात दुसऱ्या लघुशंकेसाठी जागा नाही,यामुळे महिलांमध्ये भिंतीचे वातावरण आहे,या बसस्थानक परिसरात परिसरातील कर्णफाटा, राहेरा, कासली,गोराडखेडा,शेंगोळा,चिंचखेडा,हिवरखेडा,लोणी जाणाऱ्या महिला वर्ग व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थांबतात त्यांना हि त्रास सहन करावा लागत असल्याने स्थानिक ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी याकडे लक्ष्य देवून दुरवस्था झालेल्या मुतारीचे बांधकाम पुन्हा करावे अशी मागणी महिला करतांना दिसत आहे.

Read More

सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेंद्र पगारे यांना “टॉप कॉप ऑफ द मंथ” पुरस्काराने सन्मानित

जे बी एन महाराष्ट्र न्यूज, जामनेरप्रतिनिधी: सुपडू जाधव जामनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेंद्र सुपडू पगारे (A.S.I. 2651) यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल “टॉप कॉप ऑफ द मंथ” या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने फेब्रुवारी 2025 महिन्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पोलीस दलातील उल्लेखनीय सेवा आणि कर्तव्यनिष्ठ कार्यगिरीबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सत्कार समारंभात पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. धनंजय येरुळे यांच्या हस्ते जयेंद्र पगारे यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. या वेळी जामनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार उपस्थित होते. त्यांनी जयेंद्र पगारे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. कर्तव्यदक्षता आणि जनसेवेसाठी समर्पित अधिकाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. जयेंद्र पगारे यांच्या सन्मानामुळे जामनेर पोलीस दलात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी सहकाऱ्यांकडून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Read More

प्रभाग क्रमांक 12-ब मधून सौ. स्वामिनी जगदीश भामरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जामनेर : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, वार्ड क्रमांक 12-ब (सर्वसाधारण महिला राखीव) या प्रभागातून सौ. स्वामिनी जगदीश भामरे (सोनार) यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. माननीय नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षातर्फे हा अर्ज दाखल झाल्याची माहिती देण्यात आली. सौ. भामरे यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागात भाजपकडून निवडणुकीची अधिकृत तयारी सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्ज दाखल करताना त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. सौ. स्वामिनी भामरे या जगदीश बाबुराव भामरे यांच्या अर्धांगिनी असून सामाजिक क्षेत्रात त्यांच्या सक्रिय योगदानामुळे त्या परिसरात परिचित आहेत. नगरपरिषद निवडणुकीची राजकीय तापटता दिवसेंदिवस वाढत असताना, वार्ड 12-ब मधील या उमेदवारीमुळे मुकाबला अधिक चुरशीचा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read More

” ज्ञान गौरव, तप गौरव एवं समाज गौरव “

भारतीय जैन संघठणा जामनेर शाखा तर्फे ” ज्ञान गौरव, तप गौरव एवं समाज गौरव ” हा कार्यक्रम गुणवंत विद्यार्थीजे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजैसे 10 वी,12 वी मध्ये85 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थीतसेच उच्च शिक्षण पूर्ण केलेल्या डॉक्टर,वकील,सीए, आर्किटेक्ट, एमबीए,इंजीनियर,एम फार्म, पीएचडी इ.सर्व विद्यार्थीकला व क्रीड़ा क्षेत्रामध्ये में विशेष कामगिरी करणाऱ्या सर्व सदस्य आणि8 उपवास किंवा त्यापेक्षा जास्त तपस्याकरणारे तपस्वी तसेचवर्षीतप तपस्वी56 विद्यार्थी आणि तपस्विंचा आणिसमाजसाठी गौरवनिय कार्य करणाऱ्यासमाजातील 5 सदस्यांचासादर सत्कार आणि सन्मानकरण्यात आला समाजामध्ये विशेष कार्य करणे हेतूसमाज गौरव पुरस्कार दिले गेले.सर्वांचा शाल,माळा,सन्मानपत्र आणि जैन धर्माचे प्रतिकचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष बीजेस राज्य उपाध्यक्षश्री विनयजी पारख यांनी सभेलाभविष्यात होणाऱ्या बीजेस च्य कार्यक्रमांची अनमोल माहिती देऊन मार्गदर्शन केले|महिला जिल्हा अध्यक्षसौ सोनल कोठारी यांनी बीजेस बद्दल माहिती दीलीlकार्यक्रम के प्रायोजक डॉ कांतिलालजी कल्पेशजी परेशजी ओस्तवाल परिवार यांच्यातर्फे केलेले होते lकार्यक्रमाचे सूत्र संचालनसौ मनिषा कोठारी आणि आभार प्रदर्शनसौ वंदना चोरडिया यांनी केलेकार्यक्रमामध्ये बीजेस खान्देश उपाध्यक्ष सुमित मुनोत,खानदेश कार्यकारिणी सदस्य सचिन चोपडा,जिल्हा उपाध्यक्ष विकास कोठारी,शहर अध्यक्ष कुशल बोहरा,शहर उपाध्यक्ष दर्शन भुरटशहर सचिव संकल्प लोढासदस्य विकास ललवाणी,डॉ नरेंद्र रांका,डॉ दीपक कोठारी,वैभव छाजेड, आदि सदस्य एवममहिला विंग जिल्हा अध्यक्ष सौ सोनल कोठारी,जिल्हा महासचिव सौ संगीता मंडलेचा,महिला शहर अध्यक्ष सौ मोना चोरडिया,सचिव सौ रुपाली बोहरा, उपाध्यक्ष सौ शीतल चोरडिया,सदस्य मनिषा कोठारी,वंदना चोरडिया इ. सदस्य उपस्थित होते|कार्यक्रमाचे प्रोजेक्ट हेडदर्शन भुरट,दर्शन बागमार,सौ सोनाली सिसोदिया आणिसौ स्नेहल मुनोत हे होतेl

Read More

वाकडी गरुड विद्यालयात सेवापूर्ती सोहळा संपन्न दिनांक ३० ऑगस्ट२०२५ रोजी अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड माध्यमिक विद्यालय वाकडी येथे विद्यालयाचे पर्यवेक्षक

श्री डी एम गरुड हे दिनांक ३१/०७/२०२५ रोजी नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे.त्यांचा सेवापूर्ती निरोप सोहळा दिनांक ३० ऑगस्ट रोजी संपन्न झाला.या सोहळ्याचे अध्यक्षस्थान संस्थेचे सचिव आदरणीय काकासाहेब सागरमल जैन यांनी भूषविले. मा अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, उपस्थित मान्यवरांचे स्वागत गीताने स्वागत केले. त्यानंतर मा अध्यक्ष उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष काकासाहेब सागरमल जैन,प्रमुख पाहुणे संस्थेचे सहसचिव दादासाहेब यु यु पाटील,श्री राम दादा पवार,प्रा.सुनील गरुड यांचे स्वागत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पी एन पाटील मॅडम यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केले.याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर, श्री डी एम गरुड सर यांचे नातलग,मित्रमंडळी व अनेक शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे स्वागत विद्यालयाच्या वतीने करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पी एन पाटील यांनी केले.कार्यक्रमाची रूपरेषा सांगून त्यांनी श्री डी एम गरुड यांच्या यांच्या सेवाकालाविषयी माहिती दिली.सेवापूर्ती निमित्ताने त्यांना पुढील आनंददायी व आरोग्यमय जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. इ 10 वी च्या विद्यार्थीनीनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती ए एस पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.सत्कारमूर्ती श्री डी एम गरुड सर यांचा सपत्नीक ह्रदय सत्कार विद्यालयाच्या वतीने करण्यात आला. कपडे, साडी,भेटवस्तू ,शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ असे सत्काराचे स्वरूप होते.शेंदूर्णी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री संजय भोळे,श्री रामदादा पवार,प्रा.सुनील गरुड यांनी मनोगत व्यक्त करून श्री डी एम गरुड सरांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर संस्थेचे सहसचिव दादासाहेब यु यु पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. श्री डी एम गरुड सर यांच्या शैक्षणिक व क्रीडाशिक्षक म्हणून केलेल्या यशस्वी सेवेचा गौरव केला. तसेच संस्थेच्या हितासाठी निवृत्तीनंतर सुद्धा सतत शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात कार्यरत राहावे असे आवाहन केले.त्यांच्या भावी आनंददायी व आरोग्यमय जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. सत्कारमूर्ती श्री डी एम गरुड सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कै. अण्णासाहेबानी आपल्याला कशाप्रकारे सेवेची संधी दिली याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.संस्था परिवार कुटुंब व मित्रपरिवार यांचे मनपूर्वक आभार मानले.आपले प्रेरणास्थान कै अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड यांचा विद्यालयाच्या प्रांगणात पुतळा उभारणी साठी ५१००० रुपये देणगी जाहीर केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष काकासाहेब सागरमल जैन यांनी बहारदार शैलीत अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सरांना भावी आरोग्यमय जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर सर्व नातेवाईक मंडळी,मित्रपरिवार, विविध शाळांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी श्री डी एम गरुड सरांचा सत्कार केला. या प्रसंगी श्री डी एम गरुड सर यांचे सर्व आप्तस्वकीय नातलग व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री मुरलीधर दादा गरुड,श्री प्रभाकर दादा गरुड,श्री राम दादा पवार(मराठा सेवा संघ),प्रा.सुनीलजी गरुड,प्राचार्य श्री संजय भोळे सर,प्राचार्य श्री आर एस चौधरी सर श्री पी बी पाटील(माजी मुख्याध्यापक) श्री ए ए पटेल सर(माजी मुख्याध्यापक)प्रा.सांळूके सर,श्री व्ही आर पाटील(मुख्याध्यापक) श्री डी एस पाटील सर, श्री मोहन बेलेकर(सरपंच) श्री रहेमानभाऊ बारी,श्रीमती संगीताताई गायकवाड(सरपंच वाकडी) श्री घनश्याम पाटील (पोलीस पाटील) श्री सुनीलभाऊ घुगे,श्री संजय सुर्वे सर, श्री बाळासाहेब गरुड,डॉ देवेन्द्र शेळके,श्री विजयदादा गरुड, श्री संजय पाटील, श्री रमेशदादा गायकवाड, श्री मनोजभाऊ तडवी,श्री संजयभाऊ देशमुख, श्री अभिजित पवार,श्री अशोकदादा देशमुख, श्री अशोक बिडके,श्री रविंद्र माने,श्री शब्बीरभाऊ तडवी,श्री जगनदादा पाटील,श्री सुरेंद्र शेळके(लोहारा) श्री संजयभाऊ दांडगे, श्री तेजराव भाऊ ठोंबरे, श्री विजयदादा सुर्वे,श्री प्रमोदभाऊ गरुड,श्री ज्ञानेश्वरभाऊ घुगे(दैनिक देशदूत) श्री विलासभाऊ जोशी(दैनिक लोकमत) उपस्थित होते. विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले. श्री एस वाय चौधरी सर यांनी सूत्रसंचालन केले. श्री एस ए पाटील सर यांनी आभार मानले💐

Read More

ईद-ए-मिलाद उत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा

Jbn न्यूज जामनेर प्रतिनिधी दिनांक 5/09 20025 सोयगाव तालुक्यातील सावळदबारा गावामध्ये मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद-उन-नबीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. सकाळी मुस्लिम बांधवांनी मशिदींमध्ये एकत्र जमून नमाज अदा केली. त्यानंतर प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनकार्याची आठवण करून देण्यात आली. तसेच गावातून शोभायात्रा काढण्यात आली. या जुलूसामध्ये मुलांनी धार्मिक झेंडे, फलक घेऊन सहभाग घेतला. ठिकठिकाणी गावात नागरिकांनी गुलाबपुष्प वर्षाव करून एकमेकांना पेढे वाटप करून जुलूसाचे स्वागत केले.शांती, बंधुभाव आणि ऐक्याचा संदेश देत हा उत्सव पार पडला. आणि संकाळी धार्मिक व्याख्याने, कव्वाली तसेच मिलाद शरीफचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमानंतर मुस्लिम बांधवांनी व नागरिकांनी एकत्र येऊन शिरखुर्मा गोड जेवण व विविध पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेतला. या संपूर्ण उत्सवामध्ये ज्येष्ठ नागरिक शब्बीर सेट सरपंच आरिफ लोकमान शिवाप्पा चोपडे,ईश्वर कोळपे, मोहम्मद तालीम मोहम्मद अफसर मोहम्मद अस्लम आसिफ शेख रियाज शेख सामाजिक कार्यकर्ते जीवन कोलते, गणेश खैरे पोलीस पाटील विलास कुल्ली रोशन मोहम्मद गफार तडवी कदिर तडवी अशपाक मोहम्मद दिलीप देशमुख सुनील चोरमाले पत्रकार बंधू व सर्व गावातील नागरिक यांनी कार्यक्रमात आनंद व्यक्त केलातसेच कुणाला गालबोट लागणार नाही याची खबरदारी घेत पोलीस कर्मचारी जमादार मिरखा तडवी शिवदास गोपाळ व त्यांचे सवंगडी होमगार्ड यांनी चोक बंदोबस्त दिला होता

Read More

नि.पं.पाटील विद्यालयात संस्था वर्धापन दिन साजरा

पळासखेडे मिराचे दि १७ जुलै २०२५(प्रतिनिधी ) नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे मिराचे शाळेत मातृहृदयी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन पवार हे होते. सर्वप्रथम कै.आचार्य बापूसो. गजाननराव गरुड व कै. अण्णासाहेब भास्करराव गरूड यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष , संस्था संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेचा इतिहास व प्रगती विषयी माहिती दिली.त्यानंतर विद्यार्थ्याची वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.विद्यालयाचे पर्यवेक्षक जे.आर.पाटील यांनी कै. आचार्य बापूंना अभिप्रेत असलेला विद्यार्थी याबद्दल मत व्यक्त केले.विद्यालयातील उपशिक्षक एस. जे. सोनवणे यांनी मनोगतात संस्थेची स्थापना व व्याप्ती याबद्दल विद्यार्थ्यांची हितगुज केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन पवार यांनी अध्यक्ष भाषणात कै.आचार्य गजाननराव बापूंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्था संचालक व सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील,चंद्रशेखर काळे,अब्दुल नबी तांबोळी,डी. पी .पाटील, संजू पवार,.शालिक पाटील,अशोक माळी,बळीराम माळी,लता पाटील हे मान्यवर उपस्थित होते.वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक – हर्षाली प्रवीण पाटील द्वितीय क्रमांक – हितेश वर्जन चव्हाण तृतीय क्रमाक – ओम संतोष चौधरी यांनी मिळविला. त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.त्याप्रसंगी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना व गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी 50 शालेय गणवेश वाटप करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाने ,सर्व शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष जी.पी. पाटील यांनी केले तर आभार व्ही. डी. पाटील यांनी मानले.

Read More
error: Don't Try To Copy !!