बोदवड शहरातील पाणीपुरवठा विहिरीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

बोदवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ईदगाह परिसरातील रस्त्यालगत असलेल्या विहिरीला अद्याप सुरक्षा जाळी बसविण्यात आलेली नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गंभीर बाबीकडे नगर पंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शहर विकास आघाडीने केला आहे. शहर विकास आघाडीच्या म्हणण्यानुसार, संबंधित विहिरीत भविष्यात एखादा प्राणी किंवा पक्षी पडल्यास पाणी दूषित होण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. यापूर्वी सारोळा पाणीपुरवठा योजनेच्या टाकीत बैल पडून मृत झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. पाणीपुरवठा विहिरीवर त्वरित सुरक्षा जाळी बसविण्याची मागणी करत शहर विकास आघाडीने नगर पंचायत प्रशासनाला इशारा दिला आहे. मागणीची दखल न घेतल्यास शहरभर “भीक मागो आंदोलन” छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, या आरोपांबाबत नगर पंचायत प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Read More

गरुड विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर एस चौधरी यांना निरोप

गरुड विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर एस चौधरी यांना निरोप धी.शेंदुर्णी से.एज्यु.को-ऑप सोसायटी संचलित,आ.ग.र.गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी येथे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर एस चौधरी यांच्या शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीतील प्रदीर्घ अशा सेवेनंतर वयो काल मर्यादे नुसार सरांना सेवापूर्तीनिमित्त निरोप देण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव काकासो.सागरमलजी जैन यांच्या समवेत संस्थेचे सहसचिव दादासो यु यु पाटील, शेंदुर्णी शहराचे प्रथम नागरिक गोविंद जी अग्रवाल,माजी शिक्षक आमदार सुधीरजी तांबे,प्रमुख व्याख्याते माजी शिक्षणाधिकारी निळकंठजी गायकवाड,युवा नेतृत्व भैय्यासाहेब स्नेहदीपजी गरुड,ज.जि.माध्य. शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष एस.डी भिरुड, महिला संचालिका उज्वलाताई काशीद,ज.जि माध्यमिक पतपेढी माजी अध्यक्ष संभाजी पाटील मार्गदर्शक जुक्टो संघटना बापूसो.सुनील गरुड वस्तीगृह सचिव गो.गो.सूर्यवंशी , ज जि माध्यमिक पतपेढी माजी अध्यक्ष आर एच बाविस्कर, अध्यक्ष मुख्याध्यापक संघ जळगांव गोपाल पाटील,जि प्रे सो चेअरमन दगडू विष्णू पाटील, शेदुणी संस्थेचे सह सचिव यु यु पाटील चेअमन वस्तीगृह किशोर मानसिंग पाटील, शेंदुणी संस्था संचालक विजयराव ज्ञानदेवराव गरुड जिल्हा मुख्याध्यापक संघ सचिव आर ए पाटील मुख्याध्यापक जामनेर तालुका अध्यक्ष प्रमोद खलसे, माजी उपसभापती सुधाकर अण्णा बारी माजी पचायत सदस्य डाॅ किरण सुर्यवंशी, प्रदिप धनगर, प्राचार्य संजय भोळे, एस के पाटील जुक्टो संघना जळगांव शैलेश राणे, ए ए पटेल, जैन चाॅरिटीजचे व्यवस्थापक विनोद सिंह राजपूत, ज जि माध्यमिक पतपेढी संचालक सिध्देश्र्वर वाघुळदे, जे पी सपकाळ, जावळेसर, भावेश अहिरवार, आबा पाटील, नाईक सर आरिफ सर या मान्यवरांसह अनेक मान्यवर व्यास मंचावर उपस्थित होते.प्रथमतः कार्यक्रमाचे प्रास्ताविक किमान कौशल्य विभागाचे प्रमुख शैलेंद्र शेळके यांनी प्रास्ताविकात चौधरी सरांच्या जीवन प्रवासाबद्दल माहिती कथन करत.सरांचे वडील प्राथमिक शिक्षक होते तर पाचवीत असतानाच पितृछत्र हरपल्याने संघर्षमय जीवन जगत असताना त्यांच्या मातोश्री अंजनाबाई या नाचनखेडा गावात सतत दहा वर्ष वि. का. सोसा. संचालिका म्हणून कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं शेंदुर्णी संस्थेत 1991 पासून तर आजतागायत 34 वर्ष 7 महिने एवढा मोठा कालावधी शिक्षक, पर्यवेक्षक, उप मुख्याध्यापक प्राचार्य कमऀचारी प्रतिनिधि,इथपर्यंत इमाने इतबारे सरांनी पार पाडला.विद्यार्थी हित कर्तव्य म्हणजे राज्य पातळी ते राष्ट्रीय पातळीपर्यंत सरांचे विद्यार्थी खेळामध्ये चमकलेत. त्यांच्या धर्मपत्नी चित्राताई तसेच मुलगा दिनेश व मुलगी प्रियंका या आपल्या कुटुंबाला वेळ देत त्यांनी सामाजिक कार्य तसेच शिक्षक संघटनांच्या माध्यमातून शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम सरांनी केले.तसेच समाजाशी एकरूप होऊन सामाजिक बांधिलकी त्यांनी जोपासल्याचे प्रास्ताविकातून शेळके सरांनी व्यक्त केले.तद्नंतर,बऱ्याच मान्यवरांनी सरांच्या जीवनकार्याची यशोगाथा सांगितली त्यात,गोविंदजी अग्रवाल,निळकंठजी गायकवाड,सुधीरजी तांबे,संभाजी पाटील, सुनिल गरड, यु यु दादा पाटील या मान्यवरांसह विद्यार्थी मनोगतात भाग्यश्री नाईक,अथर्व पाटील यांनी सरांच्या आठवणींना उजाळा दिला.तसेच सत्कारार्थी मनोगतात सरांनी देखील आपल्या भावनांच्या वाटा मोकळ्या करत आपल्यावर प्रेम करणाऱ्या प्रेमी जणांचे तसेच संस्थेचे श्रद्धास्थान आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड अण्णासाहेब भास्करराव गरुड, तसेच दादासाहेब संजय रावजी गरुड व संस्था यांच्या ऋणात राहून मी सदैव संस्थेच्या हित जोपासण्यासाठी तत्पर असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केले. तद्नंतर अध्यक्षीय मनोगतात शेंदुणी संस्थेचे सचिव काकासो.सागरमल जैन यांनी देखील आपले भावनिक विचार मांडले, प्रमुख उपस्थित मान्यवरांसह उपनगराध्यक्ष शरद बारी,नगरसेवक शांताराम बापू गुजर,टी.जे पाटील, नगरसेविकापती सुनील शिनकर माजी सरपंच नाचणखेडे हर्षल पाटील,सरपंच कैलास पाटील राजेंद्र पाटील सोयब पटेल अरुण कुलकर्णी, संजय गोतमारे,राजेद्र चौधरी, सुनिल चौधरी,,,एन ओ पाटील,सर,सुनंदाताई,बडोला हायस्कूल मुख्याध्यापिका श्रीमती पी एन पाटील,जुक्टो संघटनेचे शैलेश राणे,जे पी सपकाळे,व्ही के चौधरी,एस एस पाटील, एस टी पाटील, पी पी पाटील,एस के पाटील, पी आर गरुड, पी एल पाटील, राठी बापू, एस टी चिचोले,एस आर निकम, ए व्ही पाटील,पत्रकार विलास अहिरे, पंडित सर,एस टी पाटील,संगमनेर येथील महेश दिघे या मान्यवरांसह आप्तेष्ट नातेवाईक व इतर मित्र परिवार तसेच संस्थेतील आजी-माजी मुख्याध्यापक,महाविद्यालयाचे प्राचार्य, संजय भोळे,उप प्राचार्य,श्याम साळुंखे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उप प्राचार्य बी एम कुमावत, पर्यवेक्षक जे.एस.जुबंळे, विनोद पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.सरांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा दादासाहेब संजयरावजी गरुड तसेच भाऊसो.दीपक जी गरुड व इतर पत्रकार बांधव, शिक्षक आमदारकिशोरजी दराडे, ग स सोसायटी अध्यक्ष अजबसिंग पाटील या मान्यवरांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा कळविल्याचे समजले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.जी. पाटील यांनी केले तर आभार पी.पी. पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

Read More

शेंदुर्णीच्या नगराध्यक्षपदी भाजपचे गोविंद अग्रवाल ६११ मतांनी विजयी…महा विकास आघाडीने दिली जोरदार लढत,…

शेंदुर्णी ( ता.जामनेर ) शेंदुर्णी नगरपंचायती साठी झालेल्या निवडणुकीच्या आजच्या निकालात भाजपने हॅड्रीक करत सलग तिसऱ्यांदा आपली एकहाती सत्ता स्थापन केली असुन महाविकास आघाडीने सुद्धा जोरदार लढत दिली .भाजपा चे अधिकृत ८ नगरसेवक विजयी झाले असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ४, इंदिरा कॉंग्रेस चे २ तर अपक्ष ३ नगर सेवक विजयी झालेअसून यामध्ये१ नगरसेवक भाजप पुरस्कृत तर १ नगरसेवक आधीच बिनविरोध झाला असून त्यांनी भाजपाला पाठींबा दिला आहे. शेंदुर्णी नगरपंचायत मध्ये २०४५३ एकुण मतदान होते यापैकी १४२९३ म्हणजे ६९.८८ टक्के मतदान झाले होते.नगराध्यक्षपदासाठी मुख्य लढत भाजपचे ज्येष्ठ नेते गोविंद अग्रवाल व महाविकास आघाडीच्या वतीने सौ.उज्वला काशिद यांच्या मध्ये थेट झाली.२ अपक्ष उमेदवार सुद्धा रिंगणात होते.नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार गोविंदअग्रवाल यांना ७१७० तर महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ.उज्वला काशिद यांना ६५५९ मते मिळाली असुन गोविंद अग्रवाल हे ६११ मतांनी विजयी झाले आहेत.सलग तिसऱ्या वेळी जनतेने भाजपच्या ताब्यात नगरपंचायत दिली आहे एक वेळ ग्रामपंचायत व आता सलग दुसऱ्यांदा नगरपंचायत मध्ये भाजपने आपली सत्ता अबाधित ठेवलीआहे. वार्ड क्र.१.भिसे नितीन रामदास.. (अपक्ष)… ३३७ मते वार्ड क्र.२…निकम उज्वल देविदास,.. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) कॉंग्रेस..३६१ मते वार्ड. क्र.३.सय्यद कलीम सलीम.. राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार ) कॉंग्रेस… २०७ मते वार्ड. क्र. ४.धनगर जागृती श्रीराम.. राष्ट्रवादी ( शरद चंद्र पवार)३४६ मते वार्ड क्र.५तांबोळी मिनाजबी तैसिफ. अपक्ष(भाजपा पुरस्कत )५७४ मते वार्ड क्र.६पाटील प्रियंका अभिजीत ( भाजपा )३७२ मते वार्ड. क्र.७जैन धिरज रमेश. (भाजपा)४३४ मते वार्ड क्र.८चौधरी कल्पनाबाई रमेशअपक्ष… बिनविरोध वार्ड.९.बारी मनिषा शैलेश..( भाजपा)३८६ मते वार्ड. क्र. १०पाटील बेबी तुकाराम ( भाजपा )३०७ मते वार्ड क्र ११बारी सुनिल रतन.. (भाजपा )५९९ मते वार्ड क्र १ २गरुड अश्विनी प्रविण..राष्ट्रवादी ( शरद चंद्र पवार ) कॉंग्रेस..५७५ मते वार्ड क्र. १३गरुड अंबरिश काशिनाथ ( क्रॉग्रेस )३३३ मते वार्ड क्र. १४शेख उजमा शरीफोद्दीन.. कॉंग्रेस७३५ मते वार्ड. क्र १५भिल जया सुनिल.. भाजपा५५१ मते वार्ड क्र.१६बारी शरद बाबूराव…..भाजपा५०१ मते : वार्ड.१७बारी अतुल प्रल्हाद..भाजपा ४२५ मते

Read More

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत बस पास योजना” अंतर्गत शालेय विद्यार्थिनींना बस पास वाटप – जामनेर आगार आपल्या दारी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जामनेर, ता. २६ जून – महाराष्ट्र शासनाच्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत बस पास वाटप योजने” अंतर्गत आज मोराड, बिलवाडी आणि मेणगाव या गावांमध्ये “जामनेर आगार आपल्या दारी” या अभिनव संकल्पनेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थिनींसाठी बस पासचे वाटप करण्यात आले. स्नेहदीप गरुड फाउंडेशन आणि जामनेर बस आगार यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित या उपक्रमात गावोगावी विद्यार्थिनींसाठी मोफत बस पास वितरणाची व्यवस्था करण्यात आली. या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी आवश्यक असणारी सुरक्षित व सुलभ प्रवास सेवा मिळणार आहे. कार्यक्रमास युवानेते स्नेहदीपभाऊ संजय राव गरुड यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्यासोबत गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक, पोलीस पाटील, तसेच गरुड महाविद्यालयाचे मुख्याध्यापक र.एस. चौधरी सर व सहकारी शिक्षक, गावातील प्रतिष्ठित पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जामनेर बस आगार तसेच शेंदुर्णी बस स्थानकाचे प्रतिनिधी श्री. भारुडे व मनोज पाटील यांनी विद्यार्थिनींना योजना आणि प्रवास व्यवस्थेबाबत माहिती दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना शिक्षणात अधिक संधी प्राप्त होणार असून, शासनाच्या या उपक्रमाचा ग्रामीण भागात सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

Read More

गरुड विद्यालयाची एसएससी परीक्षेत गरुड झेपशेंदुर्णी ता.जामनेर प्रतिनिधीविद्यालयाची गौरी शिनकर तालुक्यातून द्वितीय,सेमी विभागाचे प्रथम पाच विद्यार्थी शेंदुर्णी केंद्रातून प्रथम

शेंदुर्णी, प्रतिनिधी : धी. शेंदुर्णी से. एज्युकेशन को-ऑप. सोसायटी संचलित आ.ग.र. गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, शेंदुर्णी येथील एसएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विद्यालयाने 94.90 टक्के इतका उल्लेखनीय निकाल मिळविला आहे. विशेष म्हणजे सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विद्यालयातून एकूण 471 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 447 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षेत 201 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य संपादन केले असून 34 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. सेमी माध्यमातून कु. गौरी गोपाल शिनकर हिने 97 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला. कु. मानसी अमोल पाटील व कु. गौरी संजय आगे यांनी प्रत्येकी 96.40 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. कु. स्नेहल दगडू घनघाव हिने 96 टक्के गुणांसह तृतीय, कु. वैष्णवी मोहन पाटील हिने 95.60 टक्के गुणांसह चतुर्थ तर चि. दर्शन मनोज कापुरे याने 94.80 टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला. मराठी माध्यमातून चि. हितेश दीपचंद जाधव याने 90.20 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला. कु. खुशी सुनील डांबरे हिने 89.60 टक्के गुणांसह द्वितीय, कु. मयुरी गणेश पाटील हिने 89 टक्के गुणांसह तृतीय, कु. हर्षाली अमर सूर्यवंशी हिने 87 टक्के गुणांसह चतुर्थ तर कु. चेतना हिम्मत मोहने हिने 86.60 टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजयरावजी गरुड, व्हॉइस चेअरमन आबासो भीमराव शेळके, सचिव काकासो सागरमलजी जैन, सहसचिव दादासो यू.यू. पाटील, कार्यालयीन सचिव भाऊसो दीपकजी गरुड, वस्तीगृह सचिव गो.गो. सूर्यवंशी, महिला संचालिका ताईसो उज्वला काशीद तसेच सर्व संचालक मंडळ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती पी.एस. पाटील, उपप्राचार्य बी.एम. कुमावत, पर्यवेक्षक जे.एस. जुबंळे, विनोद पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Read More

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर दक्षता पथकांची होणार स्थापना

मुंबई, : राज्यातील बांधकाम कामगारांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून त्यांच्याकडून आर्थिक फसवणूक करण्यासह शासनाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या बोगस बांधकाम कामगार आणि दलालांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध भागातून लोकप्रतिनिधी व बांधकाम कामगारांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नोंदणी, कीट वाटप व अन्य बाबतीत गैरप्रकार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून आता राज्यभरात जिल्हास्तरावर कामगारांची पडताळणी करण्यासाठी दक्षता पथके स्थापन करून प्रभावी तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. प्रत्येक विभागात, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा कार्यालय प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र जिल्हास्तरीय दक्षता पथक गठीत करण्यात येणार आहे. या पथकांचे कार्यक्षेत्र मात्र त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्याऐवजी दुसऱ्या जिल्ह्यावर असेल, जेणेकरून कारवाई अधिक निष्पक्ष आणि प्रभावी राहील. दक्षता पथकांना नेमून दिलेल्या जिल्ह्यांमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे होणारी नोंदणी, नोंदणीसाठी पैसे मागण्याचे प्रकार तसेच खोटे दाखले सादर करून मिळविले जाणारे लाभ या बाबींवर लक्ष केंद्रित करून तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. संबंधित दलालांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल. या मोहिमेसाठी क्षेत्रीय कार्यालयांना वाहन भाडेतत्वावर घेण्याची परवानगी देण्यात आली असून, तपासणीसाठी आवश्यक इतर खर्चही प्रशासकीय निधीतून नियमानुसार करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय दक्षता पथक प्रमुखांनी त्यांच्या कारवाईचा सविस्तर अहवाल विभागीय प्रमुखांना सादर करावयाचा आहे. विभागीय प्रमुख सर्व जिल्ह्यांचे अहवाल एकत्र करून आपल्या अभिप्रायासह मंडळ मुख्यालयास सादर करतील.ही विशेष तपासणी मोहीम प्रथम टप्प्यात १० जुलै, २०२५ अखेरपर्यंत राबविली जाणार आहे. या तपासणी दरम्यान ज्यांना काही तक्रारी असतील त्यांना त्या दक्षता पथकाकडे देता येतील. प्रत्येक पथकाने दरमहा किमान एक तपासणी करणे बंधनकारक असून, त्या तपासण्यांचे संकलित अहवाल मंडळास दरमहा सादर करणे आवश्यक राहील. या निर्णयामुळे राज्यातील बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्या दलालांवर प्रभावी आळा बसेल, अशी अपेक्षा कामगारमंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी व्यक्त केली आहे.

Read More

मोठी अपडेट | अपघातातील ठार झालेल्या तरुणाची ओळख पटली

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी जामनेरबुधवार, २२ एप्रिलजामनेर शहरातील बोदवड रस्त्यावरील नर्सरी जवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेत मृत व्यक्तीची ओळख आता पटली आहे.मृत तरुणाचे नाव विजय शिवाजी इंगळे असे असून, तो नाद्रा हवेली येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Read More

जामनेर तालुका – अतिवृष्टीग्रस्त क्षेत्राची पाहणी

जामनेर तालुक्यातील रोटवद , नाचणखेडा व लाखोली परिसरातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राची पाहणी दिनांक १८.०८.२०२५ रोजी मा. अपर जिल्हाधिकारी श्री. विजयकुमार ढगे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार जामनेर ,स्थानिक पदाधिकारी व अधिकारी कर्मचारी यांच्यासमवेत करण्यात आली. सदर पाहणी दरम्यान संबंधित गावाचे सरपंच, पोलिस पाटील, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, साहाय्यक कृषी अधिकारी, महसूल मंडळ अधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. बाधित कुटुंबांची पाहणी अतिवृष्टीमुळे मौजे लाखोली येथील कुटुंब प्रमुख उस्मान तेजबशहा फकीर, शांताबाई देवराम चौधरी, नामदेव काशिनाथ पाटील व माणिक भील यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झालेले आहे. याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. शेती नुकसानीची पाहणी• मौजे भिलखेडा शिवार गट क्र. 35/3 धारक श्री. विद्याधर रघुनाथ पाटील• मौजे नाचणखेडा शिवार गट क्र. 8 धारक श्री. विलास अशोक चौधरी• मौजे रोटवद शिवार गट क्र. 29, 184, 274, 193, 194 व 190 धारक श्री. भारत काशीनाथ देशमुख, सौ. कमलाबाई शालिक देशमुख, सौ. मीना भगवान देशमुख, श्री. विजय शालिक देशमुख, श्री. शालिक गोवा देशमुख व श्री. राजू शालिक देशमुख यांच्या शेतशिवारालगतच्या नाल्यात पूरस्थिती निर्माण होऊन कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आले. प्रशासनाचे निर्देश मा. अपर जिल्हाधिकारी यांनी बाधित शेतकरी व नागरिकांशी संवाद साधून शासन स्तरावर करण्यात येत असलेल्या मदत व उपाययोजना याबाबत माहिती दिली. तसेच संबंधित ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून प्रस्ताव सादर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

Read More

वाढदिवसानिमित्ताने अनावश्यक खर्च न करता शेळगाव उपसरपंच निळकंठ पाटील यांनी अन्नदान करून वाढदिवस केला साजरा.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जामनेर तालुक्याची नेते दिलीप खोडपे सर,फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विजय पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, युवा नेते विश्वतेराजे पाटील, व्ही जी एन टी सेलचे तालुका अध्यक्ष रोहन राठोड, कार्तिक भाऊ काळे,वासुदेव भाऊ साखरे, विकास अहिरे, पत्रकार महेंद्र पाटील, बी जी माळी सर,चरण सिंग पाटील,रवी माळी, आकाश बावस्कर संपुर्ण आत्मसन्मान टिम बोदवड आदी उपस्थित होते. आत्मसमान फाउंडेशन संचलित बोदवड येथील मनोरुग्ण,बेसहारा, मानसिक व बौध्दीक अपंगत्व आलेले लोकांचा सांभाळ करण्याचे व त्यांचा उपचार करण्याची काम आत्म सन्मान फाउंडेशन करीत आहे तरी अशा लोकांना शेळगाव येथील उप सरपंच निळकंठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने अनावश्यक खर्च न करता आज 21 मार्च रोजी अन्नदान करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

Read More

अखील भारतीय विद्यापीठ कुस्ती वतायकांदो स्पर्धात हरियाणा व ओडिसा राज्यात होणाऱ्या स्पर्धेसाठी गरुड महाविद्यालयातील खेळाडूंची निवड

अ. र.भा गरुड कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णी येथील कु. गौरी कुमावत (SYBSC ) कू हर्षदा चौधरी TYBsc व कु.लोचाना चौधरी SYBsc यांची निवड कुरुक्षेत्र हरियाणा येथे होणाऱ्या अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली व कु. गौरी कुमावत हिची निवड तयकांदो स्पर्धेसाठी बालासोर ओडिसा राज्यात होणाऱ्या अखिल भारतीय स्पर्धेसाठी निवड झालीयशस्वी विद्यार्थिनीचे अभिनंदन शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. दादासाहेब संजयराव भास्करराव गरुड, व्हा. चेअरमन मा. आबासाहेब भीमराव शामराव शेळके तसेच संस्थेचे सचिव मा. काकासाहेब सागरमलजी जैन, सहसचिव दादासाहेब यू.यू पाटील सर, कार्यालयीन सचिव भाऊसाहेब दीपकजी गरुड , सर्व संचालक मंडळ व सर्व संस्था परिवार , महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रा. डॉ.संजय भोळे , उपप्राचार्य डॉ. श्याम साळुंखे डॉ.अमर जावळे प्रा.आप्पा महाजन सर क्रीडा संचालक प्रा.डॉ.महेश पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी अभिनंदन केले

Read More
error: Don't Try To Copy !!