Headlines

पोलीस यंत्रणा कोमात,लोहारा परिसरात अवैध धंदे जोरात

प्रतिनिधी(गजानन क्षीरसागरलोहारा तालुका पाचोरालोहारा गावासह ग्रामीण भागातील गावोगावी अवैध धंदे जोरात सुरू आहेत, सट्टा,पत्ता,विषारी हातभट्टी दारू विक्री सुरू आहे. त्याचबरोबर विना परवाना देशी-विदेशी दारू विक्रीही जोमात चालू आहे. या विषारी हातभट्टी दारूमुळे अनेकजण मरण पावले आहेत. तर अनेकजण मरणाच्या दारावर आहेत. अनेकांचे दारूमुळे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या अवैध दारू विक्रेत्यांवर किरकोळ कारवाई केली जाते, तर या पकडलेल्या किती दारू विक्रेत्यांवर कोणत्या विभागात गुन्हे दाखल होतात. हा संशोधनाचा विषय आहे. अनेकवेळा महिन्यातून एकदा राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी खासगी गाडी घेऊन येतात. दारू विक्री करणार्‍यांना पकडतात. त्यांच्याकडून हजार रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंत रोख रक्कम घेऊन त्यांना त्याच ठिकाणी सोडून देतात. ही अवैध हातभट्टी दारू व विना परवाना देशी-विदेशी दारू विक्री राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी विभाग व पोलीस यंत्रणा यांच्या आशीर्वादाने जोमात सुरू आहे. याचा त्रास महिला, सर्वसामान्य नागरिक यांना होत आहे. गावामध्ये भांडण तंटे , मारामाऱ्या , दारू पिऊन अश्लील भाषेत शिवीगाळ करणे यामुळे लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. लोहारा गावात गल्ली-बोळात व्यावसायिकांनी हातभट्टी व देशी-विदेशी दारू विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. या विक्रेत्यांना हातभट्टी दारू पुरवठा करण्यासाठी तालुक्यातील अनेक भागात हातभट्टीचे केंद्रही सुरू केले आहेत. ही हातभट्टी दारू युरिया काही रासायनिक व केमिकल वापरून तयार केलेली असते. त्यातच खराब गूळ, इतर रासायनिक केमिकल यामुळे या दारूचा उग्र वास येत असतो. तसेच ही दारू कसल्याही भांड्यात, बाटल्यात, डब्यात व ट्यूबमध्ये भरली जाते. यामुळे ही दारू विषारी झाली आहे. ही हातभट्टी दारू ओढ्याला, डोंगरदर्‍या, झाडी यामध्ये राजरोसपणे उत्पादन केली जाते. याकडे पोलीस लक्ष देत नाही कारण त्यांचे फक्त हप्ते वसुलीवर लक्ष असते. लोहारा बस स्टँड परिसरामध्ये सट्टा पिढीचे,गावठी दारूचे दुकाने मोठ्या ताटात थाटले आहेत, पोलिसांना वेळेवर हफ्ते मिळत असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही असा सूर सर्वसामान्य जनतेमधून निघत आहे.सट्टा,गावठी दारूमुळे युवा पिढी बरबाद होतेय, तरुण मुले बापाच्या अगोदर स्वर्गवासी होत आहेत त्यांच्या घराचा आधार हिरावला जात आहे लोहारा दूर क्षेत्रामध्ये असलेले पोलीस कर्मचारी फक्त हप्ते घेण्यासाठी असतात का असा सवाल सर्वसामान्य जनता करीत आहे. लोहारा गावात आतापर्यंत झालेल्या चोरी प्रकरणांचा तपास का लागत नाही हा देखील एक संशोधनाचा विषय आहे. लोहारा परिसरातील अवैध धंदे लवकरात लवकर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून बंद करावेत अशी मागणी लोहारा परिसरातील गावकऱ्यांमधून होत आहे.

Read More

उज्वला दिपक तायडे यांची बिनविरोध नगरसेवक पदी निवड,भाजपाची 27-0 च्या दिशेने वाटचाल

जामनेर (प्रतिनिधी) जामनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी आज संपन्न झाली या छाननेत वार्ड क्रमांक 11 ब च्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार उज्वला दीपक तायडे या बिनविरोध झाले आहेत त्यांच्या विरोधातील मंगला – भगवान खोडपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता उमेदवारी अर्जतील प्रतिज्ञापत्र चूक असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननी दरम्यान बाद ठरवला आहे. यामुळे मंत्री गिरीश महाजन यांचे स्वियसहाय्यक दीपक तायडे यांच्या सौभाग्यवती उज्वला दीपक तायडे या बिनविरोध निवड झाल्याची घोषणा याप्रसंगी करण्यात आली.बिनविरोध झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे मतदाना आधीच नगरसेवक पदाचे पहिले खाते उघडले आणि यामुळे सर्वत्र जामनेर तालुक्यामध्ये चर्चेला उधाण आले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी तसेच जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांनी उज्वला दीपक तायडे यांना पुष्पगुच्छ दिले तर भाजपा पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेसमोर फटाके फोडत पुष्पगुच्छ देत विजयी उमेदवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Read More

तरुणाला आर्थिक मदत करण्यासाठी मित्रपरिवारा कडून सोशलमिडिया वरती आवाहण

वाकी खुर्द (ता. जामनेर) येथील २२ वर्षीय तरुण रितेश शांताराम माहोर याला भीषण अपघातात गंभीर दुखापत झाली आहे. काल ट्रक आणि मोटारसायकलच्या अपघातात त्याला जबर मार लागला असून सध्या छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे. रितेशच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असून, आतापर्यंतच्या उपचारांसाठी २ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. पुढील उपचारांसाठी सुमारे ५ लाख रुपयांची गरज आहे. त्याच्या कुटुंबीयांसाठी ही मोठी आर्थिक अडचण असल्यामुळे सर्व समाज बांधवांनी आपल्या परीने आर्थिक मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. आपली मदत थेट पोहोचवण्यासाठी खालील QR कोड स्कॅन करून आर्थिक मदत करता येईल. छोट्या मदतीतूनही मोठा आधार मिळू शकतो. आपली मदत रितेशला नवजीवन देऊ शकते! (कृपया अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या संपर्कावर संपर्क साधावा.)

Read More

२५ वर्षांपासून सुरू असलेला शेत रस्त्याचा वाद सामोपचाराने मिटला!– मौजे हिंगणे (न.क.), ता. जामनेर येथे आदर्श समन्वयाची दखल

जामनेर तालुक्यातील मौजे हिंगणे (न.क.) येथे तब्बल २५ वर्षांपासून सुरू असलेला शेत रस्त्याचा वाद अखेर तहसील कार्यालय, जामनेर येथे दिनांक ०३ जुलै २०२५ रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान सामोपचाराने व आपसी समजुतीने निकाली काढण्यात आला. सदर वाद सन २००० पासून विविध न्यायालयात, तसेच मा. उच्च न्यायालयात देखील सुरू होता. या वादात गट क्र. २८ चे धारक प्रमिलाबाई विजयसिंग पाटील व इतर व गट क्र. ५३ चे प्रतिवादी कवरसिंग दयाराम पाटील यांच्यात शेत रस्त्याच्या वहिवाटीबाबत दीर्घकाळ संघर्ष सुरू होता. स्थानिक पातळीवर पोलीस पाटील सुभाष जुलालसिंग पाटील, तसेच जामनेर नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर यांनी मध्यस्थीचे महत्त्वपूर्ण कार्य पार पाडून दोन्ही पक्षकारांमध्ये समेट घडवून आणला. या सामोपचाराच्या निमित्ताने तहसीलदार जामनेर (नानासाहेब आगळे) यांच्या हस्ते दोन्ही पक्षकारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व गावातील नागरिकांनी याचे विशेष कौतुक केले. 🟩 प्रशासनाकडून विशेष आवाहन:जामनेर तालुक्यातील इतर शेतकरी बांधवांनी देखील शेत शिवारातील पानंद रस्ते, शेत रस्त्यांचे वाद व वहिवाट विषयक प्रश्न सामोपचारातून सोडवावेत, जेणेकरून न्यायालयीन खर्च, वेळ व मनस्ताप वाचेल आणि गावांमध्ये सामाजिक सलोखा व विकासास चालना मिळेल. अशा प्रकारचे समंजस निर्णय हा इतर गावांसाठीही आदर्श ठरेल

Read More

जामनेर नगरपरिषद निवडणूक : प्रभाग 12-अ मधून अरविंद शांताराम तायडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जामनेर – नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होताच प्रभाग क्रमांक 12-अ मध्ये राजकीय तापमान चढले आहे. अजित पवार गटाकडून अरविंद शांताराम तायडे यांनी आज दिमाखात आपला उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक लढविण्याची अधिकृत घोषणा केली. अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांची उपस्थिती, उत्साह आणि घोषणाबाजी यामुळे परिसरात निवडणुकीची रंगत चांगलीच वाढलेली दिसली. समाजसेवक, सक्रिय युवा नेता म्हणून प्रभागात ठसठशीत ओळख निर्माण केलेले अरविंद तायडे गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत आहेत. नागरिकांशी थेट संवाद, सामाजिक कार्यात सहभाग आणि प्रभागातील मूलभूत सुविधांसाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यांची जनसंपर्काची मजबूत पकड निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना तायडे म्हणाले, “पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता यांसह नागरिकांच्या दैनंदिन अडचणींना प्राधान्य देऊन काम करणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. जनतेचा विश्वास जिंकून त्यांच्या अपेक्षांवर खरे उतरण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.” तायडे यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग 12-अ मध्ये चुरस अधिक तीव्र होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. युवा मतदारांमध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे बोलले जात असून, अंतिम टप्प्यात कोणाच्या बाजूने जनमत कलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read More

जैन समाजाच्या एकीपुढे महापालिकेने टेकले गुडघे: विलेपार्लेचे मंदिर पाडणाऱ्या सहायक आयुक्तांची बदली,त्याच ठिकाणी जैन मंदिर बांधून देणार!

जैन समाजाच्या एकीपुढे महापालिकेने टेकले गुडघे: विलेपार्लेचे मंदिर पाडणाऱ्या सहायक आयुक्तांची बदली,त्याच ठिकाणी जैन मंदिर बांधून देणार! मुंबई-विलेपार्ले (पूर्व) येथील २७ वर्षे जुने श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडण्यात आले. ते त्याच ठिकाणी पुन्हा बांधण्यास महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी तोंडी संमती दिली आहे. यासोबतच जैन समाजाच्या १० हजारांहून अधिक लोकांच्या अहिंसा रॅलीपुढे महापालिका प्रशासन नमले आणि सहायक महापालिका आयुक्त नवनाथ घाडगे पाटील यांची के-पूर्व प्रभागातून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी स्वप्नंज क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २७ वर्षांपूर्वी बांधलेले श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ शनिवारी जैन समाजाच्या १० हजारांहून अधिक लोकांनी अहिंसा रॅली काढली. अहिंसा रॅलीत सहभागी झालेल्या सर्वांनी तब्बल ४ किमी २ तास पायी चालत अंधेरी (पूर्व) येथील सहायक महापालिका आयुक्त कार्यालय गाठून निषेध व्यक्त केला. स्थानिक खासदार वर्षा गायकवाड (काँग्रेस) आणि स्थानिक आमदार पराग अलवाणी (भाजप) हे जैन समुदायासह येथे उपस्थित होते. २७ वर्षे जुने जैन मंदिर का पाडण्यात आले, असा खडा सवाल गायकवाड आणि अलवाणी यांनी सहायक महापालिका आयुक्त पाटील यांना विचारला. त्यावर उत्तर देताना पाटील म्हणाले की, महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कायद्याचे पालन करत जैन मंदिर पाडले. त्यामुळे उपस्थित लोकप्रतिनिधी आणि त्यांच्यात जोरदार वाद झाला. कारण पाटील जैन मंदिराचा मलबा काढून त्याच ठिकाणी पुन्हा पूजा करण्याची परवानगी देण्यास नकार देत होते. विलेपार्ले पूर्व येथील दिगंबर जैन मंदिर प्रकरण न्यायालयात असताना न्यायालयाच्या निकालाची वाट न पाहता मनपा अधिकाऱ्यांनी मंदिर जमीनदोस्त केले. जैन मंदिर पाडताना जैन तीर्थंकरांच्या मूर्ती, जिनवाणी आणि पुरातन ग्रंथ आणि धर्मग्रंथांचाही घोर अपमान करण्यात आला. हा पूर्वनियोजित कट असून भाजप युतीचे ‘बुलडोझर सरकार’च त्यास जबाबदार आहे.-वर्षा गायकवाड, खासदार लवकरच शेड तयार होणार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी विलेपार्ले येथील चारही जैन समुदायांच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले आहे की, त्याच ठिकाणी जैन मंदिर पुन्हा बांधून दिले जाईल. सध्या पर्यायी व्यवस्था म्हणून अभिषेक व पूजा टीनच्या शेडमध्ये करण्यात येणार आहे. भाविकांसाठी लवकरच हे शेड तयार केले जाईल.-श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट

Read More

नामदार गिरीश महाजन यांनी नाशिक येथील महाकुंभ मेळाव्याच्या जागेची केली पाहणी

नाशिक –नाशिक येथे सन २०२७ मध्ये होणाऱ्या महाकुंभमेळा या ऐतिहासिक आणि धार्मिक सोहळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने आज नाशिकमधील विविध धार्मिक स्थळांना भेट दिली. या भेटीदरम्यान रामकुंड, काळाराम मंदिर, सीता गुफा, गोदाघाट, दशक पंचक, नाशिकरोड रेल्वे स्टेशन आणि तपोवन आदी ठिकाणी पाहणी करून महाकुंभमेळ्याच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला. महाकुंभमेळा २०२७ हा सुरक्षित, सुव्यवस्थित व भव्यदिव्य व्हावा यासाठी नियोजनबद्ध तयारीला सुरुवात झाली आहे. कुंभमेळा हा नाशिकच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वैभवाचे प्रतीक असून, भाविकांसाठी हा सोहळा एक अविस्मरणीय अनुभव ठरेल, यासाठी प्रशासन सज्ज आहे. याप्रसंगी आ. सौ. देवयानी फरांदे, आ. सौ. सीमा हिरे, जिल्हाधिकारी श्री. जलज शर्मा, महापालिका आयुक्त सौ. मनीषा खत्री, पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक तसेच विविध प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

जामठी येथील महाजन विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा – “आठवणींचा सोहळा २०२५” उत्साहात संपन्न..

जे. बी. एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी-सुपडू जाधवजामठी, दि. २५ ऑक्टोबर (वार्ताहर)श्रीमती चि. स. महाजन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामठी येथे “माजी विद्यार्थी मेळावा – आठवणींचा सोहळा २०२५” हा सोहळा अत्यंत उत्साहवर्धक आणि भावनिक वातावरणात माजी विद्यार्थ्यांच्या स्वखर्चातून मोठ्या आनंदात पार पडला. या उपक्रमाने सन २०१० बॅचमधील माजी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शालेय जीवनातील सुवर्ण क्षणांची अनुभूती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. कैलास सत्रे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव श्री. भगवान महाजन, संचालक श्री. बी. इ. भुसारी, श्री. बी. सी. शेळके,श्री एम.ए.सत्रे तसेच मुख्याध्यापक श्री. पी. पी. पवार उपस्थित होते.कार्यक्रमास निवृत्त मुख्याध्यापक व शिक्षकवृंदांपैकी श्री. के. आर. पाटील, श्री. के. एस. बारी, श्री. एस. आर. तायडे, श्री. एस. टी. कोळी, श्री. एस. डी. महाजन, श्री. बी. डी. दांडगे, श्री. पी. डी. पाटील, श्री. पी. एस. सरोदे,श्री. जी.बी. गावंडे,श्रीमती पी. एस. पाटील, श्री. एस. एस. पाटील, श्री. जी. एस. पाटील, श्री. एन. पी. चौधरी, श्री. व्ही. आर. चौधरी,श्री.ए.आर.जंगले,श्री.एस.व्ही.पंडीत,श्री.के.बी.महाजन,श्री.अमित परखड, \ श्री.डि.यु.राठोड, श्री.सुधाकर गाढे, श्री. बावस्कर, श्री. गोरे श्री.चांगदेव सपकाळ तसेच शाळेतील सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन कोमल शर्मा व रोहन लोखंडे यांनी प्रभावीपणे केले.माजी विद्यार्थ्यांकडून विद्यालय परिसरात विविध फळझाडांची रोपं लावण्यात आली. तसेच २०१० च्या माजी विद्यार्थी संघातर्फे शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांना विशेष मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय यावेळी करून दिला.कार्यक्रमात श्री. के. आर. पाटील व श्री. एस. आर. तायडे यांनी आपली मनोगते व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा दिला. श्री. के. एस. बारी यांनी विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव एक सुंदर कविता सादर करून सर्वांना भावविभोर केले आणि मनोगत व्यक्त केले. तसेच श्रीमती पी. एस. पाटील मॅडम यांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व आनंद व्यक्त केला.माजी विद्यार्थ्यांनी स्वखर्चाने शाळेला ज्ञानदिप व मोठा फोकस लाईट यावेळी सप्रेम भेट दिला. मनोगतात श्री. रोहन लोखंडे यांनी १५ वर्षांनी संस्थेचा झालेला आमूलाग्र कायापालट, शिक्षकांच्या गोड आठवणी आणि शाळेबद्दलचे आत्मीय संबंध यांचा भावपूर्ण उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, “शाळा ही फक्त शिक्षणाची जागा नसून आयुष्याच्या पाया रचणारे मंदिर आहे. आज पुन्हा त्या आठवणींमध्ये रमण्याचा योग आला, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.” अध्यक्षीय भाषणात श्री. कैलास सत्रे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, संस्कार व सामाजिक जबाबदारी यांवर सखोल प्रकाश टाकला. त्यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. रोहन लोखंडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.या मेळाव्यामुळे विद्यालयाचा परिसर पुन्हा एकदा आनंद, आठवणी आणि भावनांनी ओथंबून गेला.

Read More

जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजनांनी दिल्या मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा.

जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजनांनी दिल्या मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा. जामनेर –आज रमजान ईद निमित्त जामनेर शहरातील ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवांना नमाज पठणानंतर जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या..याप्रसंगी भाजपा चे पदाधिकारी , उपस्थित होते .

Read More

प्रभाग क्रमांक 12 मधून राजू चौधरी इच्छुक

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी सुपडू जाधवजामनेर शहरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असूनअनेक इच्छुक उमेदवार आपले उमेदवारी पक्षाकडून जाहीर व्हावे अशी मागणी करत आहेत. परंतु वाकी रोडवरील रहिवासी व राजू ऑटो गॅरेज चे संचालक राजू ईश्वरलाल चौधरी हे कोणत्याही पक्षाला उमेदवारी न मागता प्रभाग क्रमांक 12 मधून अपक्ष उमेदवार म्हणून लढणार आहेत.सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर म्हणून राहिलेले राजू ईश्वरलाल चौधरी हे नेहमी सामाजिक कार्यात व इतरांच्या सुखदुःखात सहभागी असतात सर्वांना परिचित असलेले राजू चौधरी हे एक व्यावसायिक असून त्यांचा चांगला जनसंपर्क आहे त्यामुळे त्यांनी कोणत्याही पक्षाकडे तिकीटाची सरळ मागणी न करता आपल्या परीने अपक्ष उमेदवार म्हणून आपण लढणार आहोत असे सांगितले. त्यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे प्रभागातील राजकिय समीकरण चांगलेच बदलू शकते राजू चौधरी यांच्या अपक्ष उमेदवारामुळे कोणाला फायदा व कोणाला तोटा होईल हे आता येणाऱ्या काळातच समजेल राजू चौधरी यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चा रंगू लागले आहे त्यामुळे समीकरणे हे निश्चित बदलणार आहेत.

Read More
error: Don't Try To Copy !!