Headlines

जामनेर तालुक्यातील २० नागरिकांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी,४ हजारांहून अधिक नागरिकांना मिळाला लाभ

जळगाव : राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या ‘गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षा’च्या माध्यमातून जामनेर तालुक्यात आरोग्य सेवेचा मोठा यज्ञ सुरू आहे. नुकतेच या अभियानांतर्गत २० रुग्णांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या. विशेष म्हणजे, या उपक्रमाद्वारे आतापर्यंत ४ हजार पेक्षा अधिक नागरिकांच्या डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टीदान देण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभागया मोहिमेत तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने आपली सेवा बजावली. यामध्ये प्रामुख्याने डॉ. प्रवीण पाटील, डॉ. मयूरी राठोड, डॉ. प्रियंका पाटील, डॉ. सोबीया अन्सारी, डॉ. विलास बाविस्कर यांनी रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या. टीम वर्क आणि समन्वयशस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले. यामध्ये इनचार्ज सिस्टर सुनीता वक्ते, अधिपरिचारक सागर कोळी आणि हिरा पालवी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या संपूर्ण अभियानाचे नियोजन आणि अंमलबजावणी ‘गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षा’चे समन्वयक तथा आरोग्यदूत पै. शिवाजी रामदास पाटील आणि समाजसेविका रुचिता चौधरी यांनी केली. खाजगी रुग्णालयातील शस्त्रक्रियेचा खर्च परवडत नसलेल्या ग्रामीण भागातील गरजू नागरिकांसाठी हे अभियान वरदान ठरत आहे. ‘प्रत्येकाला उत्तम आरोग्य आणि दृष्टी मिळावी’ या ध्येयाने प्रेरित होऊन हे कार्य अविरत सुरू असून, लाभार्थ्यांनी मंत्री गिरीश महाजन आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार मानले आहेत.

Read More

संत निरंकारी मंडळातर्फे “मिशन अमृत – स्वच्छ जल, स्वच्छ मन” अंतर्गत सफाई अभियान

जे बी एन महाराष्ट्र न्यूज, जामनेरजामनेर प्रतिनिधी सद्गुरु बाबा हरदेव सिंग जी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त संत निरंकारी मंडळाच्या वतीने “मिशन अमृत – स्वच्छ जल, स्वच्छ मन” या उपक्रमांतर्गत जामनेर शहर व तालुक्यात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जामनेर ब्रांच सेवादल युनिट क्रमांक १३५९ अंतर्गत सर्व सेवादल सदस्यांनी एकत्र येत दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी (रविवार) सोनबर्डी येथे जामनेर शहराच्या पाणीपुरवठा जलकुंभ परिसरात सफाई मोहीम राबवली. आदरणीय सौ. साधनाताई गिरीशजी महाजन (प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा) यांच्या प्रेरणेने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. या वेळी सेवादल युनिट १३५९ चे अधिकारी रतनसिंग परदेशी (सेवादल संचालक), प्रवीणजी शिंदे यांच्यासह देविदासजी पाटील, रवींद्र शिंदे, शंकर माळी, आबाजी पाटील तसेच सेवादलाचे सर्व सदस्य व बंधू-भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आबाजी पाटील सर यांनी सर्वांचे आभार मानले. या उपक्रमासाठी जामनेर नगर परिषद तसेच पाणीपुरवठा प्रमुख संजय सोनार आणि फिल्टर हाऊस ऑपरेटर अशोक माळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. जर हवे असेल तर मी याला अजून थोडी “पेपर स्टाइल” हेडलाईन व लहान करून न्यूज फॉरमॅटमध्येही करून देऊ शकतो.

Read More

जामनेरच्या टाकली खुर्द गावाच्या सरपंचाचा राज्यस्तरीय गौरव सरपंच जितेंद्र माळी यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान

*जामनेरच्या टाकली खुर्द गावाच्या सरपंचाचा राज्यस्तरीय गौरव सरपंच जितेंद्र माळी यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान …*जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी -सुपडू जाधवजामनेर, दि. ६ एप्रिल – ग्रामीण भागातील विकासाच्या वाटचालीत झपाट्याने प्रगती करत टाकली खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. जितेंद्र प्रल्हाद माळी यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या याच प्रेरणादायी कार्याची दखल घेत राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मिडिया समूह यांच्या वतीने त्यांना ‘राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुण्यातील S4G हॉटेल येथे आयोजित भव्य सोहळ्यात सिनेअभिनेता महेशदादा देवकाते पाटील, सिनेअभिनेत्री निलोफर पठाण, प्राची पालवे आणि प्रांजली पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.गावात स्वच्छता, पाणी योजना, हरित ग्राम संकल्पना, ग्रामसडक योजना, महिला सक्षमीकरण, लोकसहभागातून विकास आदी क्षेत्रात त्यांनी घेतलेले पुढाकार हे या सन्मानामागचे मोलाचे कारण ठरले.या गौरवाने टाकली खुर्द गावात आनंदाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, तसेच जामनेर तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सरपंच जितेंद्र माळी यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.या यशाबद्दल बोलताना सरपंच माळी म्हणाले, हा सन्मान संपूर्ण टाकली खुर्द गावासाठी आहे. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले. भविष्यातही विकासकामे अधिक जोमाने राबवणार आहे.

Read More

निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार एस.एस.सी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

पळसखेडे मिराचे, प्रतिनिधी : धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी, शेंदुर्णी संचलित निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालय, पळसखेडे मिराचे येथे फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेत सेमी व मराठी माध्यमातून प्रथम पाच क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज दि. 9 मे रोजी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री व्ही. आर. पाटील सर प्रमुख उपस्थित होते. तसेच इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक श्री व्ही. डी. पाटील सर, श्री जी. पी. पाटील सर, श्री पी. के. राजपूत सर, श्री व्ही. ए. पाटील सर, सीनियर क्लार्क श्री के. आर. सोनवणे भाऊसाहेब तसेच ग्रंथपाल श्री डी. एस. बोरसे सर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. यावेळी विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी मुख्याध्यापक आदरणीय नानासाहेब यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत यशाची परंपरा कायम राखण्यासाठी मेहनत, सातत्य व शिस्त यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते.

Read More

जळगाव जिल्ह्यातील संताप जनक प्रकार आता मंत्र्यांच्या मुली सुरक्षित राहिल्या नसून सामान्य नागरिकांच्या मुलीचे काय? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे

जळगाव जिल्ह्यातील संताप जनक प्रकार आता मंत्र्यांच्या मुली सुरक्षित राहिल्या नसून सामान्य नागरिकांच्या मुलीचे काय? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे जळगाव : महाराष्ट्रात महिलांच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. अशातच जळगाव जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची मुक्ताईनगर यात्रा महोत्सवात काही टवाळखोर तरुणांनी छेड काढली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्ताईनगर येथे महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी संत मुक्ताईची यात्रा असते. यंदाही यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान, २६ रोजी रात्री केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची मुलगी यात्रेत गेली असता, काही टवाळखोर तरुणांनी तिची छेड काढली. या प्रकरानंतर केंद्रीय रक्षा मंत्री रक्षा खडसे यांनी मुलीसह महिलांना घेऊन पोलीस स्टेशन गाठलं. या वेळी त्यांनी मंत्र्यांच्याच मुलीची छेड होत असेल इतरांचं काय? असा संतप्त सवाल उपस्थित करीत, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात टवाळखोर तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात महिलांच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. आता मंत्र्यांच्या मुली सुरक्षित राहिल्या नसून सामान्य नागरिकांच्या मुलीचे काय? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Read More

पाळधी गावात मध्यरात्री दुचाकी चोरी व घरफोडीची घटना;पहूर पोलिसांकडून तपास सुरू.गावातील तिसरा डोळा ठरतोय का शोपिस,नागरिकांमध्ये चर्चा.

पाळधी –  गावात मध्यरात्री दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये काहीशी दहशत निर्माण झाली आहे. राजेंद्र सुभाष परदेशी (रा. पाळधी ता. जामनेर) यांनी आपली युनिकान दुचाकी क्रमांक MH 19 EC 6474 ही दिनांक ०२/१२/२०२७ रोजी संध्याकाळी सुमारे ५ वाजता घरासमोर लॉक करून उभी केली होती. परंतु अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेल्याची तक्रार त्यांनी पहूर पोलिस स्टेशनमध्ये नोंदवली आहे. दरम्यान, नितीन भास्कर माळी (रा. पाळधी) हे पुण्यात कामानिमित्त गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील वस्तूंची नासधूस केली असून काय चोरीस गेले आहे याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही. या दोन्ही गुन्ह्यांचा पहूर पोलीस ठाण्याकडून समांतर तपास सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून पुढील तपास सुरू आहे.

Read More

शहापूर धरणाजवळ भीषण अपघात बसच्या धडकेत एस.टी. कंडक्टर ईश्वर कंडागळे यांचा मृत्यू – गावात शोककळा

जामनेर (२५ ऑगस्ट):जे रोज प्रवाशांच्या जीवाची काळजी घेत बसने सुरक्षित घरी पोहोचवत होते… त्यांचेच जीवन बसच्या चाकाखाली संपले अशा शब्दांत आज गावकऱ्यांनी ईश्वर अरुण कंडागळे यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली. जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा येथील ईश्वर कंडागळे (वय 33) हे एस.टी. महामंडळात कंडक्टर म्हणून कार्यरत होते. आज सायंकाळी शहापूर धरणाजवळ झालेल्या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वर कंडागळे हे स्वतःच्या दुचाकीवरून जात असताना एस.टी. बस (क्र. MH 20 BL 3360) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर एवढा भीषण होता की ते जागीच कोसळले आणि मृत्यूने त्यांना कवटाळले.विडंबना म्हणजे ज्यांनी आयुष्यभर प्रवाशांची सेवा केली, त्यांचाच जीव अखेर एस.टी. बसच्या धडकेत गेला. या घटनेने सहकारी व ग्रामस्थ स्तब्ध झाले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.अपघातानंतर नागरिकांनी धाव घेत तात्काळ मदत केली. ईश्वर कंडागळे यांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण चिंचखेडा गाव शोकसागरात बुडाले आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे अशी माहिती मिळाली

Read More

पाचोरा येथे फळ विक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू

पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात फळ विकणाऱ्या आनंद भोई या फळ विक्रेत्याचा मृत्यू उष्मघाताने मृत्यू झाल्याचा संशय जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात 32 वर्ष तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून आनंदा भोई असे मृत्यू झालेल्या फळ विक्रेत्या तरुणाचे नाव आहे. उष्माघातामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय हा व्यक्त केला जात आहे. फळ विक्री करताना फळ विक्रेत्या तरुणाची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या त्यास मृत घोषित केले.

Read More

शेतकऱ्याच्या पिवळे सोन मक्याला अकराशे रुपये भाव कापसाची ही सहा हजारावर विक्री

प्रतिनिधी- सुपडू जाधवऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून सुरू झालेला पाऊस अधूनमधून पडत राहिला. सप्टेंबरमध्येही सरींनी शेतकऱ्यांच्या धांदल्यावर थोडेसे संकट आणले, तर ऑक्टोबरमध्ये पावसाने उघडीप दिली. अतिवृष्टी आणि पूरस्थितीतून वाचलेल्या कापूस, मका, सोयाबीन आणि तूर पीक शेतकऱ्यांच्या हाती लागले. मात्र, शासनाच्या सीसीआय आणि नाफेडच्या खरेदी केंद्रांची अनुपलब्धता शेतकऱ्यांसाठी मोठा प्रश्न ठरला आहे.जामनेर तालुक्यात यावर्षी पांढऱ्या सोन्याप्रमाणे ओळखल्या जाणान्या कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली SM होती. तसेच ‘पिवळे सोनं म्हणविल्या जाणाऱ्या मक्याची लागवड गतवर्षीच्यातुलनेत अधिक झाली. पिकांची स्थिती सुरुवातीला उत्कृष्ट होती. ज्यामुळे शेतकऱ्यांनी मोठे उत्पादन मिळेल आणि त्यांना चांगला लाभ होईल, असा विश्वास बाळगला होता. मात्र, सप्टेंबर महिन्यातील ढगफुटीसारख्या पावसामुळे शेतकन्यांच्या प्रयत्नांचा परिणाम क्षणात नष्ट झाला. मक्याचे दाणे काळवंडले, अनेक कणसे भरल्या गेल्या नाहीत, ज्या भरल्या होत्या त्यावर अतिपावसामुळे कॉब फुटले, त्यामुळे उत्पन्न खूप घटले. कापूसव सोयाबीन पिकांबाबतही हाच परिणाम दिसून येत आहे. पाऊस थांबल्यानंतर शेतकऱ्यांनी कापूस आणि मका विक्रीसाठी काढले. मात्र, शासनाचे खरेदी केंद्र उपलब्ध नसल्यामुळे खासगी व्यापायांनी विविध कारणे देत माल खरेदी करणे सुरू केले. कापूस ७७१० ते ८११० रुपये प्रतिक्विंटल असतानाही व्यापान्यांनी ६००० ते ६२०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी सुरू केली आहे. मक्या ला हमीभाव २२०० ते २२८० रुपये प्रतिक्विंटल असूनही स्थानिक व्यापारीशेतकऱ्यांकडून ११०० ते १३१० रुपये दराने खरेदी करत आहेत.शेतकऱ्यांच्या मते, ही परिस्थिती त्यांच्यासाठी मोठा आर्थिक फटका ठरत आहे. पिकांच्या चांगल्या उत्पादनाचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आला आपली मेहनत आणि आर्थिक गुंतवणूक कमी भावात विकावी लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी शासनाकडे व व्यापा-यांवळे तातडीने मार्ग काढून परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!