Headlines

जामनेर शहरात महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियानाचे आयोजन…

प्रतिनिधी -सुपडू जाधवमहाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने जामनेर शहरात विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.हे स्वच्छता अभियान रविवार, दिनांक 2 मार्च 2025 रोजी सकाळी 8:30 वाजता नगरपरिषद चौक, जामनेर येथे सुरू होणार आहे. या अभियानाचा शुभारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री श्री. गिरीशभाऊ महाजन आणि जामनेर माजी नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन यांच्या हस्ते होणार आहे.शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असून, नागरिकांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशनला चालना देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.या अभियानात स्थानिक नागरिक, प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, नगरपरिषद कर्मचारी, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, विद्यार्थी आणि प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जामनेर शहराच्या स्वच्छतेसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याने नागरिकांनी स्वतः सहभागी होऊन सामाजिक योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Read More

पुरुषांकडे शक्तीच मातृत्व असलं तरीही जगात मातृत्वाची शक्ती ही महिलांकडेच आहे.म्हणून समाजात वावरतांना महिला म्हणून जबाबदारीने वागा.–अँड.शुभांगी फासे.

जामनेर – प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यापासून तो त्याच्या कर्तृत्वासाठी श्रेष्ठच आहे.मग तो पुरुष असो व स्त्री.उलट काही बाबतीत स्त्रिया या पुरुषांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत.असंख्य क्षेत्रात महिला आज प्रतिनिधित्व करीत आहेत.त्याच बरोबरीने महिलांसाठीचे अधिकार त्यांचे कायदे हे देखील त्यांच्या लक्षात आणून देणे गरजेचे आहे.आज महिलांवरील अत्याचारांच प्रमाण वाढलेलं आहे,तुम्ही शिक्षणाबरोबर स्वतःच्या संरक्षणासाठी स्वयंसिद्ध प्रशिक्षण घ्या.कोणत्याही नात्यात येतांना स्वतःवर असलेल्या जबाबदारी चं भान ठेवा.आणि तिच्या नकार हा कायम नाहीच असतो, नकाराला होकार समजू नका.जी.एम.नर्सिंग इन्स्टिट्यूट,जामनेर तर्फे महीला दिनानिमित्त विशेष शैक्षणिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी जामनेर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय,जामनेर येथील अधिवक्ता आणि युवा व्याख्याता अँड.शुभांगी विठ्ठल फासे या प्रमुख वक्त्या तसेच अँड.आदित्य देशमुख हे देखिल या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यानंतर अॅड.फासे यांनी विद्यार्थ्यांना महीला सक्षमीकरण आणि सामाजिक जीवन मूल्य,कायदेशीर जागरूकता आणि जबाबदार नागरिकत्व या विषयांवर अत्यंत प्रभावी व समजण्यास सोपी अशी माहिती दिली.विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून सक्रिय सहभाग नोंदवला.तसेच अॅड.देशमुख यांनी देखील विद्यार्थ्यांना लहान बालकांसंबंधीचे कायदे (पॉक्सो कायदा) वर मार्गदर्शन केले.महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा.अश्विनी चौधरी यांनी वक्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नागरी जाणीवा व मानवी मूल्यांची दृढ पायाभरणी होत असल्याचे सांगितले.

Read More

भारतीय सुरक्षा दलांना जळगावकरांचे अभिवादन !

भारतीय सुरक्षा दलांना जळगावकरांचे अभिवादन !जळगाव —पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली, लोकभावानेचा आदर करत भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानात घुसून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. भारतीय लष्कराच्या या शौर्याला अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जळगाव शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या तिरंगा रॅलीत सहभागी होऊन ‘भारत माता की जय, जय हिंद’ अशा घोषणांनी भारतीय लष्कराचा विजयोत्सव साजरा केला. यावेळी नामदार गिरीश महाजन ,खा. श्रीमती स्मिताताई वाघ, आ. श्री. सुरेशमामा भोळे, जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांच्यासह जळगावकर विराट संख्येने सहभागी झाले.

Read More

भारतीय जैन संघटनेतर्फे जामनेरला बालकांसाठी विविध कार्यक्रम संपन्न

( जामनेर -प्रतिनिधी )- येथील भारतीय जैन संघटनेतर्फे बाल दिनानिमित्त पाच वर्षापासून ते वीस वर्षापर्यंतच्या बालकांसाठी महावीर भवन येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन बाल दिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात बालकांसाठी खो-खो,संगीत खुर्ची,रस्सीखेच,पास कप खेळांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धाही ठेवण्यात आल्या होत्या या स्पर्धेत 115 बालकांनी सहभाग नोंदविला. ज्या मुलांनी स्पर्धेत विजय मिळवला त्यांना बक्षिसे देण्यात आली. राकेश हिरालालजी संचेती हे प्रायोजक म्हणून होते.जळगाव जिल्हा महिला विंग जिल्हाध्यक्षा सोनल कोठारी यांनी सुत्रसंचलन केले. खानदेश विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत, जिल्हा उपाध्यक्ष विकास कोठारी, माजी जिल्हा कार्याध्यक्ष शितल लोढा, जय बोहरा, रितेश कोठारी, विशाल ओस्तवाल एवं बीजेएस महिला अध्यक्षा सौ. मोना चोरडीया, सदस्या सौं जयश्री लोढा, सौ. सोनाली सिसोदीया, महावीर पाठशाळा प्राध्यापक सौ. वनमाला कोठारी, सौ वैशाली बागमार, सौ. सपना ब्रम्हेचा, सौ. ऊषा पोरवाल, सौ. रोशनी भंडारी, सौ.शितल संचेती, सौ. नमिता चोपडा,आदी पदाधीकारी उपस्थित होते. प्रोजेक्ट हेड म्हणून विकास ललवाणी, सौ दिपाली चोरडिया यांनी काम पाहीले.

Read More

प्रभाग क्रमांक 12 मधून राजू चौधरी इच्छुक

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी सुपडू जाधवजामनेर शहरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असूनअनेक इच्छुक उमेदवार आपले उमेदवारी पक्षाकडून जाहीर व्हावे अशी मागणी करत आहेत. परंतु वाकी रोडवरील रहिवासी व राजू ऑटो गॅरेज चे संचालक राजू ईश्वरलाल चौधरी हे कोणत्याही पक्षाला उमेदवारी न मागता प्रभाग क्रमांक 12 मधून अपक्ष उमेदवार म्हणून लढणार आहेत.सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर म्हणून राहिलेले राजू ईश्वरलाल चौधरी हे नेहमी सामाजिक कार्यात व इतरांच्या सुखदुःखात सहभागी असतात सर्वांना परिचित असलेले राजू चौधरी हे एक व्यावसायिक असून त्यांचा चांगला जनसंपर्क आहे त्यामुळे त्यांनी कोणत्याही पक्षाकडे तिकीटाची सरळ मागणी न करता आपल्या परीने अपक्ष उमेदवार म्हणून आपण लढणार आहोत असे सांगितले. त्यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे प्रभागातील राजकिय समीकरण चांगलेच बदलू शकते राजू चौधरी यांच्या अपक्ष उमेदवारामुळे कोणाला फायदा व कोणाला तोटा होईल हे आता येणाऱ्या काळातच समजेल राजू चौधरी यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चा रंगू लागले आहे त्यामुळे समीकरणे हे निश्चित बदलणार आहेत.

Read More

जामनेर बसस्थानकात प्रवासी महिलेला लुटले; 25 ग्रॅम सोन्याची पोत चोरीला.

जामनेर तालुक्यातील हिवरखेडा बु. येथील मिराबाई राघो पाटील (वय 75) या ज्येष्ठ महिला जामनेर येथून पाचोरा जाणाऱ्या एस. टी. बसने प्रवास करत असताना त्यांच्याकडील 25 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना गुरुवारी (15 मे 2025) रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास घडली. मिराबाई पाटील या आंबे वडगाव येथे एका लग्नाच्या कार्यासाठी निघाल्या होत्या. त्या जामनेर एस. टी. बसस्थानकावरून पाचोरा मार्गे प्रवास करत असताना, गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून चोरली. ही घटना लक्षात येताच त्यांनी तपास केला, मात्र तोपर्यंत चोरट्याने पोत लंपास केली होती. या प्रकारामुळे जेष्ठ महिला अत्यंत हादरल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच त्यांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जामनेर बसस्थानकात सुरक्षेअभावी गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची माहिती समोर येत आहे. जरी मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून सुसज्ज बसपोर्ट उभारण्यात आले असले तरी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव आणि बसस्थानक व्यवस्थापनातील दुर्लक्षामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी बसस्थानकावर तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली आहे, जेणेकरून अशा घटना रोखता येतील. जामनेर आगार प्रमुखांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि भविष्यातील सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.[9:09 pm, 15/05/2025] Eshwer Chordiya 222: अवैध देशी व विदेशी दारू विक्रीस आळा घालण्यासाठी फत्तेपूर पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस उपनिरीक्षक अंकुश जाधव यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत मंगळवारी (दि. १३ मे २०२५) रोजी पहाटे एक मोठी कारवाई करत ओमनी गाडीतून देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या इसमाला अटक करण्यात आली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, फत्तेपूर शहरातील गोद्री रोडवरून ओमनी (क्रमांक MH 28 AN 4092) गाडीतून दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पो.ह. प्रवीण चौधरी, पो.कॉ. मुकेश पाटील आणि पो.कॉ. भूषण पाटील यांच्या पथकाने टी पॉईंटजवळ नाकाबंदी लावली. सकाळी ३.२० वाजताच्या सुमारास सदर वाहन थांबवून तपासणी केली असता, कमलाकर अण्णा सपकाळ (वय ३३, रा. शिवणा, ता. सिल्लोड, जि. संभाजीनगर) हा ५४ बॉक्स देशी दारूसह सापडला. या बॉक्समध्ये भिंगरी देशी दारूचे ३९ बॉक्स, टंगो पंच ५ बॉक्स आणि सखु संत्रा देशी दारूचे १० बॉक्स अशा एकूण ५४ बॉक्समध्ये अंदाजे रु. १.८२ लाखांचा दारूचा साठा आढळून आला. सदर आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत कलम ६५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा रजिस्टर नंबर ७१/२०२५ आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव व पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास सपोनि अंकुश जाधव करत आहेत. या कारवाईमुळे जामनेर तालुक्यातील अवैध दारू तस्करांमध्ये खळबळ उडाली असून, फत्तेपूर पोलीसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read More

श्री शामराव पाटील कुरे व सौभाग्यवती चौत्राबाई शामराव कुरे यांचा 51 वा लग्नाचा सुवर्ण महोत्सव उत्साहात साजरा

प्रतिनिधी हानुमंत चंदनकर ====================== नांदेडच्या नायगांव तालुक्यातील ताकबीड येथील श्री शामराव पाटील कुरे सौभाग्यवती चौत्राबाई शामराव कुरे यांच्या लग्नाचा 51 वा सुवर्ण महोत्सव आज दिनांक 19 मे रोजी साई तीर्थ मंगल कार्यालय नायगाव येथे मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला त्यांच्या मुलांनी यशवंत कुरे, बसवंत कुरे, भास्कर कुरे,कैलास कुरे या चार भावांच्या संकल्पनेतून आयोजित केलेला हा सोहळा आनंदी उत्साहात संपन्न झाला यांत आई वडीलांचा आनंद साजरा करण्यासाठी विवाह प्रसंगा प्रमाणे आई वडीलांना दाग दागिने, पारंपारिक शाही पोशाख धोतर सदरा फेटा दोन अंगठी, गळ्यातील चैन आईसाठी नववधू प्रमाणे सर्व अलंकार ऐटबाज दोघांची ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक लग्नाचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी श्री केशवराव बळवंतरावजी पाटील चव्हाण, सुधाकररावजी पाटील चव्हाण व नायगांव नगरपंचायतीचे नगर उपाध्यक्ष युवा नेते विजय पाटील चव्हाण, तंटामुक्त समितीचे तालुका अध्यक्ष हनमंतराव पाटील चव्हाण, नायगाव तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्रीनिवासरावजी पाटील चव्हाण, माधवरावजी बेळगे, देविदासजी बोमनाळे व जिल्हा परिषद शिक्षण सभापती संजयजी बेळगे साहेब डॉ. शिंपाळे साहेब, डॉ. कुऱ्हाडे साहेब व पत्रकार बाळासाहेब पांडे सर, चंदनकर सर, राम मोरे सर व नगरसेवक संजय पा. चव्हाण, शिवाजी पा. कल्याण नगरसेवक विठ्ठल आप्पा बेळगे, नगरसेवक पांडुरंग पा. चव्हाण, साहेबराव पा शिंदे, माधव शंकरराव बेळगे, दत्तात्रय शिंदे सर, पवन गादेवार, बसंतराव मुंके सुभाषराव मुंके आणि चव्हाण पाटील मित्र मंडळ व ताकबीड येथील सरपंच रंजीत पा. कुरे, सराफा व्यापारी ज्ञानेश्वर सावकार कवटीकवर, हनमंत पा. चव्हाण कैलास पा. कल्याण व इतर सर्व सराफा व्यापारी व किराणा व्यापारी रमेश सावकर चिद्रावार प्रकाश सावकार कवटीवार अनिल गादेवार व सर्व किराणा व्यापारी तसेच सौभाग्यवती चौत्राबई शामराव कुरे यांचे माहेर लालवंडी येथील बाबुरावजी लंगडापुरे ,भगवानरावजी लंगडापुरे व शंकररावजी दगडगावे विश्वनाथजी केरुरे पिराजी भुसेवाड बाबुराव दगडगावे व लालवंडी, ताकबीड व नायगाव येथील सर्व नागरिक कुरे परिवारातील सर्व बाईलेकीचे पाहुणे मंडळी व करामुंगे,शिराळे, जनकवाडे, परिवार, व इतर सर्व आप्तस्वकीय नातेवाईक यांसह परिसरातील नागरिक उपस्थित राहून भरभरून शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमात आई-वडिलांबद्दल या चार भावंडांनी केलेला हा आई-वडिलांचा सोहळा आज उपयोगी समाजाला प्रेरणादायी ठरू शकते असे मनोगत व्यक्त केले आणि या चार भावंडांचे कौतुक व शुभेच्छा रुपी आशीर्वाद दिले व मोलाचे मार्गदर्शन नगर पंचायत उपाध्यक्ष विजयजी पाटील चव्हाण ,संजयजी बेळगे साहेब व सौ. सरोजिनी शिंपाळे मॅडम यांनी केले कार्यक्रमाची प्रस्तावना व्यंकट पाटील शिंदे व कार्यक्रमाचे आभार कैलास कुरे यांनी केले

Read More

खरीप हंगाम २०२६साठी जळगावात युरिया खतांची पहिली रेक दाखल

खरीप हंगाम २०२६साठी जळगावात युरिया खतांची पहिली रेक दाखलजळगाव, दि. ८ एप्रिल —(प्रतिनिधी ) खरीप हंगाम २०२६च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खतांचा वेळेवर व पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला असून, आज युरिया खतांची पहिली रेक जिल्ह्यात दाखल झाली.या रेकद्वारे सुमारे २६५० मेट्रिक टन युरिया खत जिल्ह्यासाठी प्राप्त झाले आहे. सदर खत पुरवठा Rashtriya Chemicals & Fertilizers (RCF) कंपनीमार्फत करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन खत साठ्याची पाहणी केली तसेच कंपनी प्रतिनिधी, वाहतूकदार व हमाल प्रतिनिधींशी संवाद साधून उतरवणूक आणि वितरण प्रक्रियेचा आढावा घेतला.खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले आहेत. खतांची विक्री आधार संलग्न (e-POS) प्रणालीद्वारेच करण्याचे आदेश देण्यात आले असून, साठवणूक, वाहतूक व विक्री प्रक्रियेत कोणतीही अनियमितता होऊ नये यासाठी यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेत, रास्त दरात आणि आवश्यक प्रमाणात खत उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.जिल्हा प्रशासनाने खतांचा तुटवडा भासू नये यासाठी सातत्याने नियोजन व पाठपुरावा सुरू ठेवला असून, या उपक्रमामुळे जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला बळकटी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.“शेतकऱ्यांची सोय आणि कृषी निविष्ठांची वेळेवर उपलब्धता ही प्रशासनाची प्राथमिकता आहे. खत विक्रीत पारदर्शकता राखण्यासाठी तांत्रिक प्रणालीचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,” असे जिल्हा प्रशासनाने नमूद केले.

Read More

करिअरच्या नव्या क्षितिजांकडे प्रेरणादायी वाटचाल-निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये रोटरी क्लबतर्फे व्याख्यान…!

पाचोरा :रोटरी क्लब पाचोरा-भडगावच्या वतीने “करिअरच्या विविध संधी” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये करण्यात आले. समाजहितासाठी नेहमीच उपक्रम राबवणाऱ्या रोटरी क्लबने विद्यार्थ्यांच्या भविष्यास दिशा देणारा हा उपक्रम राबवला.या कार्यक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या अमर्याद संधींविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. “प्रामाणिकपणा, सातत्य आणि परिश्रम या तीन मंत्रांनी यशाचे शिखर गाठता येते,” असा प्रेरणादायी संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि ध्येयदर्शन दिले.या प्रसंगी निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्षा मा. वैशालीताई सूर्यवंशी, निर्मल सीड्सचे संचालक डॉ. जे. सी. राजपूत, शाळेचे सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, रोटरी क्लब पाचोरा-भडगावचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली, सचिव डॉ. अजयसिंग परदेशी, प्राचार्य गणेश राजपूत, तसेच रोटरी उपप्रांतपाल भरत सिनकर, डॉ. प्रशांत सांगडे, डॉ. सिद्धांत तेली, डॉ. स्वप्नील पाटील, पिंकी जिनोदिया, लक्ष्मण जाधव, शाळेचे जनसंपर्क अधिकारी आय. बी. सिंग, समन्वयिका स्नेहल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली यांनी आपल्या भाषणात सांगितले की,“एकजुटीने आणि सेवाभावाने कार्य केल्यास कोणताही उपक्रम यशस्वी ठरतो; समाजसेवा हीच खरी समाधानाची दिशा आहे.”कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि आभारप्रदर्शन शाळेच्या समन्वयिका स्नेहल पाटील यांनी केले.करिअरविषयक मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांच्या मनात नव्या उमेद, नवे विचार आणि उज्ज्वल भविष्याचे स्वप्न उजळून निघाले.

Read More
error: Don't Try To Copy !!