Headlines

उज्वला दिपक तायडे यांची बिनविरोध नगरसेवक पदी निवड,भाजपाची 27-0 च्या दिशेने वाटचाल

जामनेर (प्रतिनिधी) जामनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी आज संपन्न झाली या छाननेत वार्ड क्रमांक 11 ब च्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार उज्वला दीपक तायडे या बिनविरोध झाले आहेत त्यांच्या विरोधातील मंगला – भगवान खोडपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता उमेदवारी अर्जतील प्रतिज्ञापत्र चूक असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननी दरम्यान बाद ठरवला आहे. यामुळे मंत्री गिरीश महाजन यांचे स्वियसहाय्यक दीपक तायडे यांच्या सौभाग्यवती उज्वला दीपक तायडे या बिनविरोध निवड झाल्याची घोषणा याप्रसंगी करण्यात आली.बिनविरोध झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे मतदाना आधीच नगरसेवक पदाचे पहिले खाते उघडले आणि यामुळे सर्वत्र जामनेर तालुक्यामध्ये चर्चेला उधाण आले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी तसेच जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांनी उज्वला दीपक तायडे यांना पुष्पगुच्छ दिले तर भाजपा पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेसमोर फटाके फोडत पुष्पगुच्छ देत विजयी उमेदवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Read More

वाघूर उपसा सिंचन योजना – शेतकऱ्यांसाठी जलसंपन्न भविष्य!

जामनेर (जि. जळगाव) – जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! वाघूर उपसा सिंचन योजना क्र. 1 अंतर्गत 2020 शेततळ्यांच्या निर्मितीचे काम वेगाने सुरू असून, यामुळे जिल्ह्यातील शेतीला मुबलक पाणीपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा प्रशासनाने या योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विशेष मोहिम राबवली आहे. शेतकरी आणि ग्रामस्थांशी थेट संवाद! आज अधीक्षक अभियंता यशवंत भदाणे, तहसीलदार नानासाहेब आगळे, तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी यांनी जामनेर तालुक्यातील विविध गावे भेट देऊन शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. या योजनेमुळे शेतीसाठी शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होणार असल्याने उत्पादनवाढीस मोठा फायदा होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा विशेष पाठपुरावा! या प्रकल्पाची गती वाढावी आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा यासाठी जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन हे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने आढावा घेत आहेत. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी ते विशेष प्रयत्नशील आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेही लक्ष! शेतकऱ्यांना वेळेत सिंचन सुविधा मिळावी आणि शेती समृद्ध व्हावी, यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील देखील प्रकल्पावर लक्ष ठेऊन आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांना काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! वाघूर उपसा सिंचन योजनेमुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांना सिंचनाच्या सुविधा मिळून शेती जलसंपन्न होईल. प्रशासनाने शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

Read More

आजारी असतानाही कर्तव्याला प्राधान्य: गिरीशभाऊ महाजन तातडीने पहेलगाम संकटासाठी श्रीनगरला रवाना

आजारी असतानाही कर्तव्याला प्राधान्य: गिरीशभाऊ महाजन तातडीने पहेलगाम संकटासाठी श्रीनगरला रवाना दि. २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकले असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू केले असून, संकटसमयी नेहमी अग्रेसर असणारे मा. ना. श्री. गिरीशभाऊ महाजन आज तातडीने श्रीनगरकडे रवाना झाले आहेत. शारीरिक आजाराची पर्वा न करता कर्तव्याला प्राधान्य गिरीशभाऊंशी माझा थेट संवाद झाला तेव्हा त्यांनी सांगितले की, गेले दोन-तीन दिवस विकनेसचा त्रास जाणवत होता आणि ते मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते.अशा स्थितीतही, जेव्हा पहेलगाम घटनेची माहिती मिळाली, तेव्हा गिरीशभाऊंनी आपल्या शारीरिक स्थितीकडे दुर्लक्ष करत तातडीने श्रीनगरला जाण्याचा निर्णय घेतला.स्वतःच्या तब्येतीची पर्वा न करता जनतेच्या मदतीसाठी धावून जाण्याची त्यांची ही भावना केवळ प्रेरणादायीच नाही, तर संकटसमयी खंबीर नेतृत्व कसे असते याचे ज्वलंत उदाहरण आहे. “अशा धाडसी आणि सेवाभावी नेत्याचा आम्हाला अभिमान आहे!” संकटकाळातले प्रेरणादायी नेतृत्व गिरीशभाऊ महाजन हे नेहमीच संकटात धावून जाणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. महापुरात मदत कार्य, कोविड काळात नागरिकांसाठी वैद्यकीय व जीवनावश्यक सेवा पुरवणं, पूरग्रस्त भागातील बचावकार्य, अशा अनेक प्रसंगी त्यांनी लोकहितासाठी स्वतःला झोकून दिले आहे. श्रीनगरमध्ये तातडीचा समन्वय श्रीनगरमध्ये दाखल होताच, गिरीशभाऊ महाजन यांनी लष्कर, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून बचावकार्य अधिक गतीमान केले आहे. अडकलेल्या पर्यटकांची माहिती संकलित करणे, सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना करणे, गरज असल्यास महाराष्ट्र शासनाकडून विशेष विमानाची सोय करणे, अशा उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. कार्यकर्त्यांचा अभिमान गिरीशभाऊ महाजन यांच्या या कर्तव्यनिष्ठ आणि धाडसी वृत्तीवर आम्हा सर्व कार्यकर्त्यांचा अपार अभिमान आहे. संकटाच्या कोणत्याही क्षणी ते अग्रभागी असतात, हे पाहून आम्ही नेहमीच प्रेरित होतो. “आजारी असूनही जनतेच्या सेवेसाठी धावून जाणारा नेता म्हणजे खरा नेता! आम्ही गर्वाने सांगतो — आम्ही गिरीशभाऊंचे कार्यकर्ते आहोत!” महाराष्ट्राला अभिमान गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संकटातून सुरक्षित बाहेर पडतो, ही संपूर्ण राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. जय हिंद! जय महाराष्ट्र! “आजारी शरीराने नाही, तर धडाडीच्या मनाने संकटांवर मात केली जाते.मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाही पुलवामा संकटासाठी धावलेला आमचा नेता — गिरीशभाऊ महाजन!संकटातही महाराष्ट्राचा आधारस्तंभ! गिरीशभाऊमहाजन #संकटमोचकनेतृत्व #महाराष्ट्राचाअभिमान”

Read More

बेटावद खुर्द येथे घरफोडी

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी जामनेरजामनेर : मुलगा दवाखान्याच्या कामासाठी मुंबईला गेल्याने त्याला उपचारासाठी आईने चांदीच्या पाटल्या विकून मिळालेले २० हजार व ५० हजाराचे सोन्याचे दागिने लोखंडी पेटीत ठेवले. मात्र चोरट्यांनी गुरुवारी रात्री घरफोडी करीत ७० हजाराचा मुद्देमाल लांबवल्याची घटना बेटावद खुर्द येथे घडली. राजेंद्र सुपडू पाटील (बेटावद खुर्द, ता. जामनेर) यांचे मोठे भाऊ दवाखान्याच्या कामासाठी मुंबईला गेले होते. २० हजाराची रोकड, २० ग्रॅमची सोन्याची पोत व ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी असा ऐवज त्यांनी लोखंडी पेटीत ठेवला. खोलीला कुलूप लावून शेजारच्या घरात झोपायला गेले असताना ही चोरी झाली.

Read More

जामनेरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू.. हातगाडी, टपरीधारकांमध्ये नाराजी, राष्ट्रवादीचे दिलीप खोडपे करणार हस्तक्षेप

जामनेर, ७ मार्च २०२५ (प्रतिनिधी: सुपडू जाधव, जे.बी.एन महाराष्ट्र न्यूज) जामनेर नगर पालिकेने शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम गतिमान केली असून, याअंतर्गत अनेक रस्त्यांवरील हातगाड्या आणि टपऱ्या हटविण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या मते, शहराचे सौंदर्य राखणे आणि वाहतूक सुरळीत ठेवणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. मात्र, या कारवाईमुळे छोटे व्यावसायिक आणि हातगाडीधारकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह यावर अवलंबून आहे. अचानक कारवाई केल्यामुळे त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. प्रभावित व्यावसायिकांनी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. या परिस्थितीची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप खोडपे पुढील दोन दिवसांत नगर पालिका प्रशासनाशी चर्चा करून व्यावसायिकांचे मत मांडणार असल्याचे सांगितले. तसेच, या कारवाईमुळे अडचणीत आलेल्या व्यावसायिकांना न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील अनेक नागरिकांनीही प्रशासनाच्या कठोर भूमिकेवर आक्षेप घेत, काही प्रमाणात सवलत मिळावी, अशी मागणी केली आहे. या मुद्द्यावर प्रशासन आणि स्थानिक नेत्यांमध्ये कोणता तोडगा निघतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Read More

पशुधन उत्तमरित्या जपण्यासाठी नूतन तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय उपयोगी ठरेल — नामदार गिरीश भाऊ महाजन.

जामनेर -आज जामनेर येथील तालुका लघुपशुवैद्यकीय चिकित्सालयाचे भूमिपूजन नामदार गिरीश भाऊ महाजन यांचे हस्ते करण्यात आले. जामनेर तालुका पशुधनाने समृध्द आहे. हे पशुधन उत्तमरित्या जपण्यासाठी नूतन तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय उपयोगी ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी तहसिलदार नाना साहेब आगळे , सा.बां विभागाचे कार्यकारी अभियंता आर डी पाटील , उपअभियंता एस बी चासकर , जितेंद्र पाटील यांचे सह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More

वाढदिवसानिमित्ताने अनावश्यक खर्च न करता शेळगाव उपसरपंच निळकंठ पाटील यांनी अन्नदान करून वाढदिवस केला साजरा.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जामनेर तालुक्याची नेते दिलीप खोडपे सर,फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विजय पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, युवा नेते विश्वतेराजे पाटील, व्ही जी एन टी सेलचे तालुका अध्यक्ष रोहन राठोड, कार्तिक भाऊ काळे,वासुदेव भाऊ साखरे, विकास अहिरे, पत्रकार महेंद्र पाटील, बी जी माळी सर,चरण सिंग पाटील,रवी माळी, आकाश बावस्कर संपुर्ण आत्मसन्मान टिम बोदवड आदी उपस्थित होते. आत्मसमान फाउंडेशन संचलित बोदवड येथील मनोरुग्ण,बेसहारा, मानसिक व बौध्दीक अपंगत्व आलेले लोकांचा सांभाळ करण्याचे व त्यांचा उपचार करण्याची काम आत्म सन्मान फाउंडेशन करीत आहे तरी अशा लोकांना शेळगाव येथील उप सरपंच निळकंठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने अनावश्यक खर्च न करता आज 21 मार्च रोजी अन्नदान करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

Read More

जामनेर : सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधवजामनेर शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले श्री. प्रदीप गायके, श्री. मनोज महाले, श्री. जीवन सपकाळ, प्रवीण गावंडे, यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.जामनेर निवास स्थानी महाराष्ट्राचे मंत्री श्री. गिरीशभाऊ महाजन यांनी नवागत कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत बाविस्कर, ज्येष्ठ नेते श्री. जे. के. चव्हाण, जामनेर शहर मंडल अध्यक्ष श्री. रविंद्र झाल्टे, जिल्हा सरचिटणीस श्री. आतिष झाल्टे, श्री. जितेंद्र पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाची जामनेर शहरातील संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.

Read More

चार लाख रुपये समुदाय गुंतवणूक निधी व्यवसायासाठी बचत गटांना वाटप

जळगाव ता. जि. जळगावआज जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत पद्मालय महीला प्रभाग संघातील म्हसावद बोरणार प्रभागातील श्री स्वामी समर्थ ग्रामसंघ वसंतवाडी यांच्या माध्यमातून चार लाख रुपये समुदाय गुंतवणूक निधी व्यवसायासाठी बचत गटांना वाटप करण्यात आला होता त्या बचतगटाच्या महिलांनी वसंतवाडी व जळके बस स्थानक याठिकाणी शॉपिंगगाळे भाडेतत्त्वावर घेऊन आपल्या व्यवसायाला आज जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करणवाल यांच्या हस्ते फित कापुन सुरुवात केली. यात आदर्श समुहातुन सौ. सोनाली नरेंद्र पाटील यांना चहा फरसाण उपहारगृहासाठी, शिवकृपा समुहातील सौ. सोनाली लक्ष्मण पाटील यांना पाणी पुरी स्टॉलसाठी, आदर्श समुहातील सौ. अनिता धनराज पाटील साडी विक्री सेंटरसाठी, उडान स्वयंसहाय्यता समुहातील सौ. कविता सोनवणे यांना शिवणकामसाठी तर सत्यमेव जयते समुहातील सौ. सरला संजय दांडगे फुटवेअर विक्री अशा वेगवेगळ्या व्यवसायासाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपये उपजीविकेसाठी निधी प्राप्त करून देण्यात आल्याची माहिती रविंद्र सुर्यवंशी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका व्यवस्थापक यांनी दिली. यावेळी जळगाव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजु लोखंडे, जळगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सरला पाटील, प्रभाग समन्वयक जळगाव दिनेश न्हाळदे, स्वप्नील पाटील पंचायत समिती जळगाव, सरुबाई जाधव वावडदा, कल्पना ठोंबरे विटनेर, विद्या पाटील पाथरी, मालुबाई पाटील वसंतवाडी, मोनिका पाटील जळके, रपेशा पाटील वडली या सर्व C.R.P. तसेच साधना सपके वसंतवाडी बॅक सखी, मनिषा पाटील वडली पशुसखी, वैशाली घाडगे विटनेर पशुसखी, विजया पाटील वावडदा कृषी सखी, तसेच जळगाव जिल्हा दुध संघाचे संचालक रमेश पाटील, जळगाव जिल्हा शिवसेना (शिंदे गट) शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष पि.के. पाटील, वसंतवाडी सरपंच विनोद पाटील, ग्रामसेवक बबन वाघ, सामाजिक कार्यकर्ते दिपक पाटील व मोठ्या संख्येने बचत गट महीला व गावातील नागरिक उपस्थित होते.

Read More

मैत्रेंय प्रकरण:- कोर्टात महत्त्वाची सुनावणी, मालमत्ता विक्रीसाठी आदेश.

मुंबई: 17 फेब्रुवारी 2025 – मुंबई सत्र न्यायालयात आज वर्षा मधुसुदन सत्पाळकर आणि अन्य आरोपींविरुद्ध महत्त्वाची सुनावणी पार पडली. विशेष सत्र न्यायालय क्रमांक 20 मधील न्यायमूर्ती एन. जी. शुक्ला यांच्या समोर ही सुनावणी झाली. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखा (EOW) आणि विविध गुंतवणूकदारांचे लक्ष लागून आहे.राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील (SPP) प्रदीप घरत यांनी बाजू मांडली, तर एपीआय (EOW) श्री. सालुंके आणि पीसी श्री. डी. सुर्यभान हे देखील उपस्थित होते. गुंतवणूकदारांचे प्रतिनिधित्व करणारे अधिवक्ता एस. बी. भटगुनाकी आणि त्यांच्या संघाने युक्तिवाद केला. मात्र, आरोपी जामिनावर असूनही कोर्टात अनुपस्थित होते, याची नोंद घेण्यात आली. यावेळी, सीए श्री. रविंद्र शिंगाडे यांनी मालमत्ता विक्रीसंदर्भातील अहवाल सादर केला, ज्याला “टॉर एक्झ.16” म्हणून चिन्हांकित करण्यात आले. या अहवालानुसार, राज्य सरकारने क्विकर रिअॅलिटी प्रा. लिमिटेड या वित्तीय आस्थापनेची नेमणूक केली आहे. मैत्रेया ग्रुप ऑफ कंपन्या या गटाच्या संलग्न मालमत्तांची लिलाव विक्री करण्यासाठी ही नेमणूक करण्यात आली आहे.कोर्टाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 मार्च 2025 रोजी ठेवली असून, त्यापर्यंत लिलाव प्रक्रियेच्या पुढील टप्प्यांबाबत सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत.आर्थिक गैरव्यवहार, गुंतवणूकदारांची फसवणूक आणि मालमत्ता जप्ती यामुळे गाजत असलेल्या या प्रकरणाकडे सर्वांचेच लक्ष आहे. पुढील सुनावणीत लिलाव प्रक्रियेचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!