Headlines

सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेंद्र पगारे यांना “टॉप कॉप ऑफ द मंथ” पुरस्काराने सन्मानित

जे बी एन महाराष्ट्र न्यूज, जामनेरप्रतिनिधी: सुपडू जाधव जामनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेंद्र सुपडू पगारे (A.S.I. 2651) यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल “टॉप कॉप ऑफ द मंथ” या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने फेब्रुवारी 2025 महिन्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पोलीस दलातील उल्लेखनीय सेवा आणि कर्तव्यनिष्ठ कार्यगिरीबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सत्कार समारंभात पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. धनंजय येरुळे यांच्या हस्ते जयेंद्र पगारे यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. या वेळी जामनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार उपस्थित होते. त्यांनी जयेंद्र पगारे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. कर्तव्यदक्षता आणि जनसेवेसाठी समर्पित अधिकाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. जयेंद्र पगारे यांच्या सन्मानामुळे जामनेर पोलीस दलात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी सहकाऱ्यांकडून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Read More

जि.प.प्राथमिक शाळा वाकडी येथे केंद्रीय शिक्षण परिषद उत्साहात साजरी

वाकडी येथे दि.३० सप्टेंबर रोजी वाकडी केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद मराठी केंद्रशाळा वाकडी येथे आयोजित करण्यात आली. त्या शिक्षण परिषदेचे अध्यक्षस्थान वडगाव सद्दो शाळेचे मुख्याध्यापक श्री कौतिक आवटे यांनी भूषवले. या शिक्षण परिषदेसाठी जामनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री विष्णू काळे साहेब उपस्थित होते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या अध्ययन सरानुसार विद्यार्थ्यांचे विश्लेषण करून त्याप्रमाणे कृती कार्यक्रम राबवून आपण निश्चितपणाने अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करून गुणवत्ता निर्माण करू शकतो असा विश्वास काळे साहेबांनी उपस्थित शिक्षकांना दिला. तसंच ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणारा शिक्षणकप सद्यस्थितीत प्रथम क्रमांक वर असलेला जामनेर तालुका निश्चितपणाने उचलेल अशी अपेक्षा व्यक्त केली आणि त्यासाठी आजपर्यंत सर्व शिक्षकांनी केलेल्या कार्याचे कौतुक आदरणीय काळे साहेबांनी आपल्या मनोगतात केले. वाकडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री ज्ञानेश्वर पाटील सर यांनी केंद्रातील शाळांच्या निपुण महाराष्ट्र अभियान संदर्भात आढावा घेऊन मार्गदर्शन केले. त्यानंतर शिक्षण परिषदेस उपस्थित असलेले फतेपूर व तोंडापूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री संदीप पाटील सर यांनी सुद्धा अध्ययन स्तर निश्चितीच्या संदर्भात उपस्थितांना सविस्तार मार्गदर्शन केले.वाकडी शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रल्हाद शिंदे सर यांनी आपल्या प्रस्ताविकातून शाळेची यशोगाथा सर्वांसमोर मांडली. तर तर श्री विनोद नाईकडा यांनी जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमासंदर्भात मार्गदर्शन केले.शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर कवडे सर यांनी केले तर आभार श्री सूर्याजी काकडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री ज्ञानेश्वर शामराव पाटील, श्री शेखर महाजन व श्री प्रकाश कुमावत यांनी परिश्रम घेतले.

Read More

नि.पं.पाटील विद्यालयात संस्था वर्धापन दिन साजरा

पळासखेडे मिराचे दि १७ जुलै २०२५(प्रतिनिधी ) नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे मिराचे शाळेत मातृहृदयी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन पवार हे होते. सर्वप्रथम कै.आचार्य बापूसो. गजाननराव गरुड व कै. अण्णासाहेब भास्करराव गरूड यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष , संस्था संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेचा इतिहास व प्रगती विषयी माहिती दिली.त्यानंतर विद्यार्थ्याची वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.विद्यालयाचे पर्यवेक्षक जे.आर.पाटील यांनी कै. आचार्य बापूंना अभिप्रेत असलेला विद्यार्थी याबद्दल मत व्यक्त केले.विद्यालयातील उपशिक्षक एस. जे. सोनवणे यांनी मनोगतात संस्थेची स्थापना व व्याप्ती याबद्दल विद्यार्थ्यांची हितगुज केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन पवार यांनी अध्यक्ष भाषणात कै.आचार्य गजाननराव बापूंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्था संचालक व सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील,चंद्रशेखर काळे,अब्दुल नबी तांबोळी,डी. पी .पाटील, संजू पवार,.शालिक पाटील,अशोक माळी,बळीराम माळी,लता पाटील हे मान्यवर उपस्थित होते.वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक – हर्षाली प्रवीण पाटील द्वितीय क्रमांक – हितेश वर्जन चव्हाण तृतीय क्रमाक – ओम संतोष चौधरी यांनी मिळविला. त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.त्याप्रसंगी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना व गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी 50 शालेय गणवेश वाटप करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाने ,सर्व शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष जी.पी. पाटील यांनी केले तर आभार व्ही. डी. पाटील यांनी मानले.

Read More

समाजातील सुमारे 30 वर्षीय तरुणाने गावाशेजारील जंगलात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या

मुदखेडा येथील आकाश सोनवणे या भिल समाजातील सुमारे 30 वर्षीय तरुणाने गावाशेजारील जंगलात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आकाश सोनवणे जंगलात जाऊन विष घेतले. बराच वेळ तो घरी परतला नसल्याने घरच्यांनी शोध घेतला असता तो अर्धमूच्र्छित अवस्थेत आढळून आला. कुटुंबीयांनी तातडीने त्याला जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अधिकच बिघडल्याने पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, वाटेतच त्याचा मृत्यू झाला.या घटनेने मुदखेडा गावात शोककळा पसरली आहे. आकाश हा स्वभावाने शांत व मनमिळावू होता, असे गावकऱ्यांनी सांगितले. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही.

Read More

गरुड विद्यालयात विद्याथ्यांनी स्वता बनवले रंगबेरंगीआकाश कंदिल.

शेंदुर्णी – येथील आ ग.र.ग माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी रंगबेरंगी आकाश कंदिल बनवले..आपल्या घरासाठी नेहमी आपण चांगल्या प्रकारचे सुंदर दिसावे म्हणून बाजारातून आकाश कंदील खरेदी करत असतो परंतु स्वताच्या हाताने आकाश कंदिल बनवून ते घरी लावाणे. यात मुलांना वेगळा आंनद मिळतो.मुलांनी चांगल्या प्रकारचे आकाश कंदील बनवण्याचे विचार करून ते प्रत्यक्ष करून दाखविले यासाठी वर्गांमध्ये शिकवण्याच्या विषयामध्ये कार्यानुभव अंतर्गत हा विषय प्रसंगोपात सोपे प्रकार मध्ये शिकविला जातो यासाठी विद्यालयाचे सहशिक्षक श्री जी टी कुमावत सर यांनी मुलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून आकाश कंदील तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले होते विद्यार्थ्यांनी यासाठी लागणारे साहित्य खरेदी करून कमी खर्चामध्ये सुंदर व आकर्षक असे आकाश कंदील तयार केले यामध्ये प्रामुख्याने कलाशिक्षक श्री डी एच बारी सर व श्री एस आर चव्हाण सर यांनी सुद्धा सहकार्य केले यासाठी इयत्ता आठवीचे वर्ग आकाश कंदील बनवण्यासाठी घेण्यात आले उपक्रम बनवत असताना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर एस चौधरी सर ,पर्यवेक्षक श्री व्ही एम शिरापुरे सर .किमान कौशल विभागाचे प्राध्यापक श्री शैलेंद्र शेळके सर ,श्री राहुल गरुड सर ,श्री सुरवाडे सर .उपक्रम पाहण्यासाठी उपस्थित होते तसेच इयत्ता आठवीच्या वर्गाचे सर्व वर्गशिक्षक यांचेही सहकार्य मिळाले हा चांगला आणि स्तुत्य उपक्रम म्हणून घेण्यात आला .हा दरवर्षी कार्यानुभव अंतर्गत उपक्रम घेण्यात येतो .शिका आणि कमवा यासाठी पण हा उपक्रम घेण्यात येतो .वर्षामध्ये स्वबळावर कौशल्य निर्माण करून रोजगारही मिळवला जाऊ शकतो

Read More

शेंदुर्णी नगरपंचायतीच्या निवडणुकीत आज तब्बल ४० जणांनी भरले नामनिर्देशन पत्रनगराध्यक्ष पदासाठी गोविंद अग्रवाल अमृत खलसे यांचेही अर्ज दाखल

शेंदुर्णी ता.जामनेर प्रतिनिधीदि.२ डिसेंबर रोजी होत असलेल्या शेंदुर्णी नगरपंचायतीच्या निवडणुकीत आज नगरपंचायत कार्यालयात उमेदवारांनी प्रचंड गर्दी केली होती.आज तब्बल ४० जणांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले.यात नगराध्यक्ष पदासाठी ४ जणांनी तर सदस्यांसाठी ३६ जणांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.भाजपच्या वतीने निवडणुक लढवणाऱ्यांची मोठी यादी असुन महाविकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी सौ.उज्वला काशिद यांनीही आपला अर्ज दाखल केला असुन भाजपचे दोन दिग्गज नेते गोविंद अग्रवाल अमृत खलसे यांनी सुद्धा आज अर्ज दाखल केले आहेत.पक्षाच्या वतीने आपल्यालाच ए.बी.फॉर्म मिळेल अशी सगळ्याच इच्छुकांची आशा आहे.अजुन काही दिग्गज नेते नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे कळते आहे.मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले उमेदवार यंदाच्या निवडणुकीत मात्र हम साथ साथ है असे चित्र असुन सगळ्याच इच्छुकांनी एकत्रीत आपल्या वार्डात घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला आहे.आता पर्यंत नगराध्यक्ष पदासाठी ५ तर सदस्यांसाठी ४२ जणांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.मतमोजणी अप्पासाहेब र.भा.गरुड महाविद्यालयाच्या इनडोअर स्टेडियम मध्ये होणार आहे.निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नानासाहेब आगळे सहायक निवडणुक अधिकारी मुख्याधिकारी विवेक धांडे हे आहे.

Read More

छत्रपती शिवाजी ब्रिगेड जामनेर तालुकाध्यक्ष पदी अमोल ठोंबरे.तर उपाध्यक्षपदी प्रविण गावंडे.

जामनेर (प्रतिनिधी):- छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुकाध्यक्ष म्हणून अमोल ठोंबरे यांची तर उपाध्यक्ष म्हणून प्रविण गावंडे यांची निवड करण्यात आली.त्यांना छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले.छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी जामनेर तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून नवनियुक्त अध्यक्ष,उपाध्यक्ष यांच्यावर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.यावेळी तालुका कार्यकारणी बैठकिला संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे, डॉ.धनंजय बेंद्रे,जिल्हा उपाध्यक्ष कैलास पाटील , सामाजिक कार्यकर्ते अरुण पाटील , नितीन पाटील, l नारायण महाजन, प्रमोद पाटील, कैलास बडगुजर , शरद मोरे, दीपक बावस्कर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

बीजेएस कार्यकर्ते आणि जिल्हाधीकारीं यांचे सोबत या वर्षी तलावातिल गाळ काढणे बाबत चर्चा संपन्न

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी सुपडू जाधवआज दि 5 मार्च रोजी भारतीय जैन संघटना व मा जिल्हाधीकारी आयुष प्रसादसरांचीगाळयुत्त शिवार व गाळ मुक्त बंधारा/धरण, नाला खोलीकरण यां विषयांवर यांचे सोबत सविस्तर चर्चा संपन्न झाली या चर्चेत मा जिल्हा धिकारी, उपजिल्हाधिकारी श्रीमती अर्चना मोरे, जल संधारण विभागाचे अधिकारी व इतर संबंधित अधिकारी , तसेच भारतीय जैन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री विनय पारख, BJS जलप्रकल्प जिल्हा प्रमुख सुमीत मुणोत, जलंगाव तालुका प्रमुख पंकज जैन ,रावेर तालुका प्रमुख देवेंद्र शाह व उज्वल देरेकर , भुसावळ तालुका प्रमुख चेतन जैन, धरणगांव तालुका प्रमुख नीलेश ओस्तवाल व BJS जळगांव अध्यक्ष अजय राखेचा, bjs जलकार्य जिल्हा समनव्याक गणेश कोळी यांचे सोबत चर्चा संपन्न झाली तसेच 15 तालुक्यातील bjs चे सर्व पदाधिकारी शेतकरी बांधवां पर्यन्त पोहोचून तलावातील गाळ शेतात गहेवून घेवून जाणे साठी प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य करण्यासाठी तयार आहेत अशी हमी विनय पारख यांनी दिली. लवकरच प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार आणि बिडिओ आणि सरपंच यांचे सोबत मीटिंग घेताना bjs च्या कार्यकर्त्यांना आमंत्रित करावे असे जिल्हयाधिकाऱ्यांनी सांगितले .

Read More

पाचोरा-भडगाव तालुक्याच्या आढावा बैठकीत कार्यसम्राट आमदार मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शन..!

प्रतिनिधी (गजानन क्षीरसागर)पाचोरा: -आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज पाचोरा येथील निर्मल सीड्सच्या कृषीदालनात चाळीसगावचे कार्यसम्राट आमदार मंगेशजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचोरा-भडगाव मतदारसंघातील आढावा बैठक उत्साहात पार पडली. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची रणनीती, संघटनात्मक बळकटी, तसेच गट आणि कार्यकर्त्यांची भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीदरम्यान आमदार मंगेश चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, “निवडणुका या फक्त राजकीय नव्हेत, तर विकासाचा आराखडा ठरवणाऱ्या असतात. प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाच्या विचारधारेसह विकासाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावा.” त्यांनी संघटनशक्ती आणि तळागाळातील संवादाचे महत्त्व अधोरेखित करत कार्यकर्त्यांना उत्साहाने कामाला लागण्याचे आवाहन केले.या बैठकीत काही नव्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेशही आमदार चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. बैठकीत दिलीपभाऊ वाघ, वैशालीताई सुर्यवंशी, अमोलभाऊ शिंदे, प्रताप हरी पाटील, अमोल नाना पाटील, मधुभाऊ काटे, सुभाष पाटील, संजय नाना वाघ, गोविंद शेलार, दीपक माने, शोभाताई तेली, अनिल पाटील, विनोद नेरकर यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.या आढावा बैठकीमुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवी उर्मी आणि संघटनात्मक एकात्मता जाणवली.

Read More

देव्हारी फाटा ते चक्रधर स्वामी मंदिर रस्त्यावर अतिक्रमण व घाणीच्या साम्राज्याचा प्रश्न; ग्रामस्थांचा आमरण उपोषणाचा इशारा.

सोयगाव / जेबीएन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी ….. देव्हारी फाटा ते चक्रधर स्वामी मंदिर गेट या मुख्य रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाबाबत व गेटसमोर साचलेल्या घाणीबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. वारंवार अर्ज करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.ग्रामपंचायत सोयगाव व पंचायती समितीकडून देखील या संदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला होता. तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. या मुख्य रस्त्याने संपूर्ण गावची ये-जा असून रस्ता अरुंद झाल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, चक्रधर स्वामी मंदिर गेटसमोर मोठ्या प्रमाणात घाण-कचरा टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले असून ग्रामस्थांनी तातडीने कारवाईची मागणी केली आहे. या सर्व बाबींवर लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास येत्या २४ सप्टेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. भारत नप्ते, संदीप काळे, अभय पुजारी, बारकू गावडे, घनश्याम शिंदे, राहुल पुजारी, गोपाल कुरंकार, शुभम पुजारी, आकाश कळसकर, राहुल न्हावी, प्रदिप काळे, संजय गिरी, गोपाल गाडवे, प्रशांत ठिकाणी, योगेश गायकवाड, संजय काळे, महेश खडके, संदीप कोलते, राजू गलबले, पवन कुल्ले, मधुकर गावडे आदी ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

Read More
error: Don't Try To Copy !!