Headlines

जामनेर – पाण्याचे काम हे पुण्यार्जनाचे काम आहे – शांतीलाल मुथा

जामनेर(वा.)- जैन समाज हा दुष्काळामुळे राजस्थानातून बाहेर पडला.पूर्वी नुसती पाणपोई बांधली तरी समाधान होते, आता तलाव बांधायची वेळ आली आहे.तलावातील गाळ काढल्यामुळे पाण्याची क्षमता वाढेल.पुर्ण गाव पाणीमय होईल. काढलेला गाळ शेतात टाकल्यामुळे बंजर जमीन सुपीक बनेल. प्यायला पूर्ण गावाला,जनावरांना पाणी मिळेल. शेतात गाळ आल्यामुळे वर्षातून तिनदा पिके घेतील. ग्रामीण अर्थव्यवस्था बदलेल.असे मत भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांनी व्यक्त केले. ते पुणे येथील वर्धमान प्रतिष्ठान सभागृहात संघटनेच्या महाराष्ट्रातील पदाधिकारी,कार्यकर्ते, जिल्हा समन्वयक यांच्या आयोजित बैठकीत बोलत होते. नवकार महामंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली.राज्य अध्यक्ष केतन शाह यांनी उपस्थितांचे स्वागत केले.राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर सांखला यांनी प्रास्तविक केले.मुथा म्हणाले, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार आणि नाला खोलिकरण व रुंदीकरण ही सरकारच्या मृदु व जलसंधारण विभागाची योजना आहे. ही योजना गावागावात,शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच जास्तीत जास्त गावाकडून मागणी अर्ज येण्यासाठी संघटना लोकचळवळ निर्माण करेल. तसा करार शासनाशी झाला असुन या साठी सुहाना स्पाईसेस यांचे सहकार्य लाभत आहे.कार्यकर्त्यांचे सर्व शंकांचे निरासन मुथा यांनी केले.उपस्थितांना संघटनेने तयार केलेल्या ॲपमध्ये गावाची तलावातील गाळ काढण्यासाठी मागणी अर्ज भरुन काढण्याचे प्रात्यक्षिक संघटनेचे मेनेजिंग डायरेक्टर कोमल जैन यांनी दाखविले.लवकरच महाराष्ट्रातील संघटनेचे कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शासनाच्या या योजनेला सहकार्य करतील.सुहाना स्पाईसेस चे विशाल चोरडिया म्हणाले, भारतीय जैन संघटने बरोबर आम्हाला या कार्यात सहभागी होता येत आहे, याचा आनंद वाटतो. राष्ट्रीय सचिव दीपक चोपडा, राज्य सचिव प्रविण पारख यांनी मनोगत व्यक्त केले.या बैठकीला खानदेशातून विभाग अध्यक्ष प्रा.चंद्रकांत डागा(शिंदखेडा), विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत(जामनेर)जळगाव जिल्हा अध्यक्ष निर्मल बोरा, सचिव दर्शन देशलहरा(चोपडा),राजेश जैन(पाचोरा),मनोज कोचर (शहादा), गौरव छाजेड, जय मुथा (बोदवड), महावीर डागा, शुभम डागा (अक्कलकुवा),देवेंद्र शाह, उज्ज्वल डेरेकर (रावेर)) पंकज जैन (जळगाव), चेतन जैन (भुसावळ), संदिप जैन, शीतल जैन, चेतन जैन (शेंदुर्णी), रोशन गोलेछा(चाळीसगाव) उपस्थितीत होते. आभर केतन शाह यांनी मानले.

Read More

मासिक पाळी लाज नाही, अभिमान आहे – मीनल करनवाल

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधव सेवापंधरवड्यानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयंतीपासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत जामनेर सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत महिलांचे सशक्तीकरण आणि उत्तम आरोग्य सेवा यासाठी “स्वस्थ नारी सशक्त परिवार” हे अभियान राबवले जात आहे.या अभियानाअंतर्गत शेंदुर्णी येथे महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व वैयक्तिक स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करून सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी जि.प. सदस्य संजयदादा गरुड यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, शेंदुर्णी नगरपरिषद मुख्याधिकारी विवेक धांडे, इंडियन डेंटल असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष डॉ. आशिष महाजन, गोदावरी मेडिकल कॉलेजचे डॉ. जतिन बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.“मासिक पाळी ही शाप नसून वरदान आहे. सर्व महिलांनी व किशोरवयीन मुलींनी या विषयावर मोकळेपणाने बोलले पाहिजे. मासिक पाळी लाज नसून अभिमान आहे. स्त्रीने स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे,” असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी मनोगतात केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी केले तर आभार वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहितकुमार जोहरे यांनी मानले. सूत्रसंचालन पी.जे. पाटील यांनी केले.महिला आरोग्य अधिकारी डॉ. पल्लवी राऊत यांनी किशोरवयीन मुलींना मासिक पाळीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. आदित्य पाटील, डॉ. श्रद्धा पाटील, गजानन माळी, राजश्री पाटील, सूर्यभान पाटील, विजया पाटील, अनुरथ रहाडे, योगेश पाटील, सुधाकर माळी, संयम हिवाळे, दीपक मोरे, ईश्वर कोळी, मंजू जवळे, रेखा इंगळे, विजय बेलदार आदींनी परिश्रम घेतले.

Read More

आजी-माजी सैनिकांच्या प्रश्नांवर तालुका स्तरीय समितीची बैठक संपन्न

जामनेर, ५ मार्च (जे. बी. एन. महाराष्ट्र न्यूज) – तालुक्यातील आजी-माजी सैनिक, शहीद सैनिक कुटुंबे, माजी सैनिक विधवा तसेच कार्यरत सैनिकांच्या शासकीय कामांसाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या दृष्टीने तालुका स्तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली. तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत विविध विभागांशी संबंधित शासकीय प्रक्रिया जलद आणि प्राधान्याने पूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीस जामनेरचे गटविकास अधिकारी श्री. काळे, पोलीस निरीक्षक श्री. मुरलीधर कासार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. संजय गायकवाड तसेच माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. या चर्चासत्रात माजी सैनिकांच्या प्रलंबित शासकीय कामांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच, त्यांच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे ठरले. ही बैठक यशस्वी ठरल्यास तालुक्यातील आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या विविध लाभदायक योजनांचा जलद लाभ मिळू शकणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Read More

शहापूर धरणाजवळ भीषण अपघात बसच्या धडकेत एस.टी. कंडक्टर ईश्वर कंडागळे यांचा मृत्यू – गावात शोककळा

जामनेर (२५ ऑगस्ट):जे रोज प्रवाशांच्या जीवाची काळजी घेत बसने सुरक्षित घरी पोहोचवत होते… त्यांचेच जीवन बसच्या चाकाखाली संपले अशा शब्दांत आज गावकऱ्यांनी ईश्वर अरुण कंडागळे यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली. जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा येथील ईश्वर कंडागळे (वय 33) हे एस.टी. महामंडळात कंडक्टर म्हणून कार्यरत होते. आज सायंकाळी शहापूर धरणाजवळ झालेल्या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वर कंडागळे हे स्वतःच्या दुचाकीवरून जात असताना एस.टी. बस (क्र. MH 20 BL 3360) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर एवढा भीषण होता की ते जागीच कोसळले आणि मृत्यूने त्यांना कवटाळले.विडंबना म्हणजे ज्यांनी आयुष्यभर प्रवाशांची सेवा केली, त्यांचाच जीव अखेर एस.टी. बसच्या धडकेत गेला. या घटनेने सहकारी व ग्रामस्थ स्तब्ध झाले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.अपघातानंतर नागरिकांनी धाव घेत तात्काळ मदत केली. ईश्वर कंडागळे यांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण चिंचखेडा गाव शोकसागरात बुडाले आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे अशी माहिती मिळाली

Read More

ग्रामीण विकासात आजच्या युवतींची भूमिका मोलाची

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जनविश्वास सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात संजयदादा गरुड यांचे प्रतिपादन शेंदुर्णी येथील आप्पासाहेब रघुनाथराव गरुड महाविद्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संयुक्त आयोजित सजग युवती-सक्षम युवती उपक्रमाच्या व्याख्यान कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संजयदादा गरुड यांनी अध्यक्षपदावरून ग्रामीण भागातील रचनेत आणि विकासात युवतींचा सहभाग आणि भूमिका अत्यंत मोलाची आहे असे मत मांडले.युवती केवळ कुटुंबाचा नव्हे,तर ग्रामीण समाजाचा देखील अविभाज्य घटक असल्याने त्यांनी आत्मविश्वासाने आपल्या क्षेत्रात भरारी घेतली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या जनविश्वास सप्ताहामागील विवेचन युवती काँग्रेसच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षा कु.भाग्यश्री विवेकानंद ठाकरे यांनी मांडले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर नाना पाटील,जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शिंदे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव थोरात,शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे सचिव सागरमल जैन,युवा नेते स्नेहदीप गरुड,नगरसेवक धीरज जैन तसेच जंगीपूरा येथील उपसरपंच मनोज पाटील यांची विशेष उपस्थिती होती. चौकट (1)अत्यंत मौलिक विषयांवर युवतींना मिळाले मार्गदर्शन : या उपक्रमात युवतींसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.ॲड.केतन सोनार यांनी ‘सोशल मीडिया हाताळताना युवतींनी घ्यावयाची काळजी’ या विषयावर दैनंदिन घडामोडी,फेक न्यूज,ऑनलाइन फसवणूक याविषयी सजग राहण्याच्या दृष्टीने सउदाहरण विदयार्थीनींना अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात व्याख्यान दिले.ॲड. उमेश मराठे यांनी ‘युवती व कौशल्य विकास कार्यक्रमातून उपलब्ध संधी’ या विषयावर विवेचन करताना कौशल्य विकास म्हणजे केवळ पार्लर किंवा शिवणकाम पुरते मर्यादित नसून, सामाजिक आणि व्यवसायिक क्षेत्रातही युवतींना अनेक संधी असल्याचे असे आपल्या व्याख्यानातून नमूद केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.संजय भोळे, आर.एस. चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन दिनेश थोरात यांनी केले तर आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य साळुंखे यांनी मानले. चौकट (2) वटवृक्षारोपण व दहा युवतींना रोपांची जबाबदारी : ‘एक झाड माझ्या दादांचं…!’ या उपक्रमांतर्गत राष्ट्रवादी युवती काँग्रेसने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दहा विद्यार्थिनींना वटवृक्षाचे रोप भेट देत त्यांच्याकडून जगविण्याचे वचन घेतले. यावेळी संस्थेच्या आवारात अध्यक्ष श्री. संजयदादा गरुड यांच्याहस्ते वटवृक्ष लावण्यात आले तृप्ती बारी,रोहिणी गुजर,नेहा न्हावी, वृषाली पाटील, गायत्री पाटील, कोमल म्हस्के, सानिया गुजर, निकिता पाटील, आरती पाटील आणि योगेश्वरी वाघ या दहा युवतींनी झाडांचे संगोपन करण्याचा संकल्प केला.

Read More

गरुड विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर एस चौधरी यांना निरोप

गरुड विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर एस चौधरी यांना निरोप धी.शेंदुर्णी से.एज्यु.को-ऑप सोसायटी संचलित,आ.ग.र.गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी येथे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर एस चौधरी यांच्या शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीतील प्रदीर्घ अशा सेवेनंतर वयो काल मर्यादे नुसार सरांना सेवापूर्तीनिमित्त निरोप देण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव काकासो.सागरमलजी जैन यांच्या समवेत संस्थेचे सहसचिव दादासो यु यु पाटील, शेंदुर्णी शहराचे प्रथम नागरिक गोविंद जी अग्रवाल,माजी शिक्षक आमदार सुधीरजी तांबे,प्रमुख व्याख्याते माजी शिक्षणाधिकारी निळकंठजी गायकवाड,युवा नेतृत्व भैय्यासाहेब स्नेहदीपजी गरुड,ज.जि.माध्य. शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष एस.डी भिरुड, महिला संचालिका उज्वलाताई काशीद,ज.जि माध्यमिक पतपेढी माजी अध्यक्ष संभाजी पाटील मार्गदर्शक जुक्टो संघटना बापूसो.सुनील गरुड वस्तीगृह सचिव गो.गो.सूर्यवंशी , ज जि माध्यमिक पतपेढी माजी अध्यक्ष आर एच बाविस्कर, अध्यक्ष मुख्याध्यापक संघ जळगांव गोपाल पाटील,जि प्रे सो चेअरमन दगडू विष्णू पाटील, शेदुणी संस्थेचे सह सचिव यु यु पाटील चेअमन वस्तीगृह किशोर मानसिंग पाटील, शेंदुणी संस्था संचालक विजयराव ज्ञानदेवराव गरुड जिल्हा मुख्याध्यापक संघ सचिव आर ए पाटील मुख्याध्यापक जामनेर तालुका अध्यक्ष प्रमोद खलसे, माजी उपसभापती सुधाकर अण्णा बारी माजी पचायत सदस्य डाॅ किरण सुर्यवंशी, प्रदिप धनगर, प्राचार्य संजय भोळे, एस के पाटील जुक्टो संघना जळगांव शैलेश राणे, ए ए पटेल, जैन चाॅरिटीजचे व्यवस्थापक विनोद सिंह राजपूत, ज जि माध्यमिक पतपेढी संचालक सिध्देश्र्वर वाघुळदे, जे पी सपकाळ, जावळेसर, भावेश अहिरवार, आबा पाटील, नाईक सर आरिफ सर या मान्यवरांसह अनेक मान्यवर व्यास मंचावर उपस्थित होते.प्रथमतः कार्यक्रमाचे प्रास्ताविक किमान कौशल्य विभागाचे प्रमुख शैलेंद्र शेळके यांनी प्रास्ताविकात चौधरी सरांच्या जीवन प्रवासाबद्दल माहिती कथन करत.सरांचे वडील प्राथमिक शिक्षक होते तर पाचवीत असतानाच पितृछत्र हरपल्याने संघर्षमय जीवन जगत असताना त्यांच्या मातोश्री अंजनाबाई या नाचनखेडा गावात सतत दहा वर्ष वि. का. सोसा. संचालिका म्हणून कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं शेंदुर्णी संस्थेत 1991 पासून तर आजतागायत 34 वर्ष 7 महिने एवढा मोठा कालावधी शिक्षक, पर्यवेक्षक, उप मुख्याध्यापक प्राचार्य कमऀचारी प्रतिनिधि,इथपर्यंत इमाने इतबारे सरांनी पार पाडला.विद्यार्थी हित कर्तव्य म्हणजे राज्य पातळी ते राष्ट्रीय पातळीपर्यंत सरांचे विद्यार्थी खेळामध्ये चमकलेत. त्यांच्या धर्मपत्नी चित्राताई तसेच मुलगा दिनेश व मुलगी प्रियंका या आपल्या कुटुंबाला वेळ देत त्यांनी सामाजिक कार्य तसेच शिक्षक संघटनांच्या माध्यमातून शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम सरांनी केले.तसेच समाजाशी एकरूप होऊन सामाजिक बांधिलकी त्यांनी जोपासल्याचे प्रास्ताविकातून शेळके सरांनी व्यक्त केले.तद्नंतर,बऱ्याच मान्यवरांनी सरांच्या जीवनकार्याची यशोगाथा सांगितली त्यात,गोविंदजी अग्रवाल,निळकंठजी गायकवाड,सुधीरजी तांबे,संभाजी पाटील, सुनिल गरड, यु यु दादा पाटील या मान्यवरांसह विद्यार्थी मनोगतात भाग्यश्री नाईक,अथर्व पाटील यांनी सरांच्या आठवणींना उजाळा दिला.तसेच सत्कारार्थी मनोगतात सरांनी देखील आपल्या भावनांच्या वाटा मोकळ्या करत आपल्यावर प्रेम करणाऱ्या प्रेमी जणांचे तसेच संस्थेचे श्रद्धास्थान आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड अण्णासाहेब भास्करराव गरुड, तसेच दादासाहेब संजय रावजी गरुड व संस्था यांच्या ऋणात राहून मी सदैव संस्थेच्या हित जोपासण्यासाठी तत्पर असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केले. तद्नंतर अध्यक्षीय मनोगतात शेंदुणी संस्थेचे सचिव काकासो.सागरमल जैन यांनी देखील आपले भावनिक विचार मांडले, प्रमुख उपस्थित मान्यवरांसह उपनगराध्यक्ष शरद बारी,नगरसेवक शांताराम बापू गुजर,टी.जे पाटील, नगरसेविकापती सुनील शिनकर माजी सरपंच नाचणखेडे हर्षल पाटील,सरपंच कैलास पाटील राजेंद्र पाटील सोयब पटेल अरुण कुलकर्णी, संजय गोतमारे,राजेद्र चौधरी, सुनिल चौधरी,,,एन ओ पाटील,सर,सुनंदाताई,बडोला हायस्कूल मुख्याध्यापिका श्रीमती पी एन पाटील,जुक्टो संघटनेचे शैलेश राणे,जे पी सपकाळे,व्ही के चौधरी,एस एस पाटील, एस टी पाटील, पी पी पाटील,एस के पाटील, पी आर गरुड, पी एल पाटील, राठी बापू, एस टी चिचोले,एस आर निकम, ए व्ही पाटील,पत्रकार विलास अहिरे, पंडित सर,एस टी पाटील,संगमनेर येथील महेश दिघे या मान्यवरांसह आप्तेष्ट नातेवाईक व इतर मित्र परिवार तसेच संस्थेतील आजी-माजी मुख्याध्यापक,महाविद्यालयाचे प्राचार्य, संजय भोळे,उप प्राचार्य,श्याम साळुंखे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उप प्राचार्य बी एम कुमावत, पर्यवेक्षक जे.एस.जुबंळे, विनोद पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.सरांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा दादासाहेब संजयरावजी गरुड तसेच भाऊसो.दीपक जी गरुड व इतर पत्रकार बांधव, शिक्षक आमदारकिशोरजी दराडे, ग स सोसायटी अध्यक्ष अजबसिंग पाटील या मान्यवरांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा कळविल्याचे समजले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.जी. पाटील यांनी केले तर आभार पी.पी. पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

Read More

नाफेड कडून गोपद्म शेतकरी उत्पादक कंपनीचा गौरव.

नाफेड कडून गोपद्म शेतकरी उत्पादक कंपनीचा गौरव..जे. बी. एन महाराष्ट्र न्यूज जामनेर“१०,००० शेतकरी उत्पादक संघटनांची निर्मिती आणि प्रोत्साहन” या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत ‘गोपद्म शेतकरी उत्पादक कंपनीच्या’ उत्कृष्ट आणि प्रभावी कामगिरीबद्दल नवी दिल्ली येथे श्री.दिपक अग्रवाल सर,IAS, MD, (नाफेड) यांच्या हस्ते श्री. रोहन लोखंडे,मुख्य कार्यकारी अधिकारी व श्री. प्रदिप महाजन, चेअरमन यांना सन्मानित करण्यात आले. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली केंद्रीय क्षेत्र योजना अंतर्गत जामनेरच्या गोपद्म फेड शेतकरी उत्पादक कंपनीचा समावेश आहे. नाफेड आणि कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीचे कामकाज विविध क्षेत्रात सुरू आहे. यावेळी शेतकरी उत्पादक कंपन्यानी बांबू लागवड व विविध कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करुन कृषी क्षेत्रात क्रांतीसाठी हातभार लावावा असे प्रतिपादन श्री. अग्रवाल यांनी केले. यावेळी गोपद्म कंपनीला शेतकर्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी नाफेड कडून ‘नाफेड बाजार’ या त्यांच्या शाॅंपिग माॅल सुरू करणेस परवानगी पत्र देण्यात आले. यावेळी नाफेडने तयार केलेल्या देशातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या १० ‘एफपीसींना गौरवण्यात आले. या सन्मान सोहळावेळी पंकज प्रसाद, अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक, अनुराग तिवारी, महाव्यवस्थापक, पुजा टमटा, व्यवस्थापक, लिजा भटाचार्य,मोहनजी, व्यवस्थापक,इक्विटी अनुदान,व देशभरातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Read More

भारतीय जैन संघटनेतर्फे जामनेरला बालकांसाठी विविध कार्यक्रम संपन्न

( जामनेर -प्रतिनिधी )- येथील भारतीय जैन संघटनेतर्फे बाल दिनानिमित्त पाच वर्षापासून ते वीस वर्षापर्यंतच्या बालकांसाठी महावीर भवन येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन बाल दिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात बालकांसाठी खो-खो,संगीत खुर्ची,रस्सीखेच,पास कप खेळांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धाही ठेवण्यात आल्या होत्या या स्पर्धेत 115 बालकांनी सहभाग नोंदविला. ज्या मुलांनी स्पर्धेत विजय मिळवला त्यांना बक्षिसे देण्यात आली. राकेश हिरालालजी संचेती हे प्रायोजक म्हणून होते.जळगाव जिल्हा महिला विंग जिल्हाध्यक्षा सोनल कोठारी यांनी सुत्रसंचलन केले. खानदेश विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत, जिल्हा उपाध्यक्ष विकास कोठारी, माजी जिल्हा कार्याध्यक्ष शितल लोढा, जय बोहरा, रितेश कोठारी, विशाल ओस्तवाल एवं बीजेएस महिला अध्यक्षा सौ. मोना चोरडीया, सदस्या सौं जयश्री लोढा, सौ. सोनाली सिसोदीया, महावीर पाठशाळा प्राध्यापक सौ. वनमाला कोठारी, सौ वैशाली बागमार, सौ. सपना ब्रम्हेचा, सौ. ऊषा पोरवाल, सौ. रोशनी भंडारी, सौ.शितल संचेती, सौ. नमिता चोपडा,आदी पदाधीकारी उपस्थित होते. प्रोजेक्ट हेड म्हणून विकास ललवाणी, सौ दिपाली चोरडिया यांनी काम पाहीले.

Read More

शेंदूर्णी सूतगिरणीला गती देण्यासाठी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक

मुंबई, दि. ७ एप्रिल (प्रतिनिधी) — जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सहकारी सूतगिरणीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी मंत्रालयात मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात ही बैठक झाली.बैठकीत वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्रीकृष्ण पवार यांनी सूतगिरणीच्या सद्यस्थितीचा आढावा सादर करत कामकाजातील अडचणी व प्रलंबित मुद्द्यांची सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सूतगिरणीच्या कार्यपद्धती, तांत्रिक बाबी व उत्पादन क्षमतेसंदर्भात चर्चा केली.सूतगिरणीसमोरील अडचणी दूर करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत मंत्री श्री. महाजन यांनी वस्त्रोद्योग विभागाला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यामुळे सूतगिरणीच्या कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.या बैठकीस वस्त्रोद्योग आयुक्त श्री. संजय दैने, मंत्री (वस्त्रोद्योग) यांचे खाजगी सचिव श्री. प्रल्हाद रोडे, मंत्री श्री. महाजन यांचे खाजगी सचिव जयराज कारभारी, प्रादेशिक उपआयुक्त श्री. दीपक खांडेकर, कक्ष अधिकारी श्री. हरीशकुमार कांबळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी ऑनलाइन प्रणालीद्वारे उपस्थित होते.सदर बैठकीत सूतगिरणीच्या प्रगतीसाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला असून, लवकरच ठोस निर्णयांची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read More

जिकरा न्यू उर्दू विद्यालयाचा दहावीला 98.40 टक्के निकालकु. मिसबाह शेख विद्यालयात प्रथम; यशाबद्दल सर्वत्र कौतुक

जामनेर, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात जिकरा एज्युकेशन सोसायटी संचलित जिकरा न्यू उर्दू माध्यमिक विद्यालय, जामनेर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयाचा एकूण निकाल 98.40 टक्के लागल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परीक्षेत कु. मिसबाह आसिफ शेख हिने 84.80 टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला. कु. अहेनिश नईम खान हिने 83.40 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर मोहम्मद अकदस निसार अहमद यांनी 83.20 टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक संपादन केला. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रहीम शेख तसेच सचिव जाकीर शेख यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे प्राचार्य इरशाद खान सर व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन करून त्यांच्या यशात मोलाचा वाटा उचलला. तसेच संस्थेच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला असून परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!