Headlines

आजी-माजी सैनिकांच्या प्रश्नांवर तालुका स्तरीय समितीची बैठक संपन्न

जामनेर, ५ मार्च (जे. बी. एन. महाराष्ट्र न्यूज) – तालुक्यातील आजी-माजी सैनिक, शहीद सैनिक कुटुंबे, माजी सैनिक विधवा तसेच कार्यरत सैनिकांच्या शासकीय कामांसाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या दृष्टीने तालुका स्तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली. तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत विविध विभागांशी संबंधित शासकीय प्रक्रिया जलद आणि प्राधान्याने पूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीस जामनेरचे गटविकास अधिकारी श्री. काळे, पोलीस निरीक्षक श्री. मुरलीधर कासार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. संजय गायकवाड तसेच माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. या चर्चासत्रात माजी सैनिकांच्या प्रलंबित शासकीय कामांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच, त्यांच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे ठरले. ही बैठक यशस्वी ठरल्यास तालुक्यातील आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या विविध लाभदायक योजनांचा जलद लाभ मिळू शकणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Read More

मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे विद्यार्थ्यांचे साकडे नवीदाभाडी येथील शिक्षकांची बदली थांबविण्याची मागणी

मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे विद्यार्थ्यांचे साकडे नवीदाभाडी येथील शिक्षकांची बदली थांबविण्याची मागणीजे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधवजि. प. शाळा नवीदाभाडी येथील विद्यार्थी व पालकांनी ना. गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री यांच्याकडे शाळेतील बदलीपात्र शिक्षकांची बदली न होण्यासाठी साकडे घातले. जि. प. शाळा नवीदाभाडी येथे तीन शिक्षक कार्यरत असून त्यामधील गजानन मंडवे व ऋषिकेश शिंदे या दोन शिक्षकांच्या बदली होऊ नये यासाठी आज गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी नवीदाभाडी या गावातून अनेक पालक, महिला आणि शाळेतील मुले गिरीश महाजन यांना भेटण्यासाठी आले होते. विद्यार्थी म्हणाले,आमच्या शाळेतील शिक्षकांच्या बदल्या झाल्यास आम्ही शाळेत जाणार नाही.आम्हाला तेच शिक्षक द्या आमचे शिक्षक आम्हाला छान शिकवतात,असे कथन ना.मा. गिरीश महाजन यांना सांगत होते. सदर प्रकरणाची पालकांकडून माहिती घेतली असता सदर शाळेत पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग असून ८० विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेला यावर्षी ‘”मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या अभियानात तिसरा क्रमांक प्राप्त झालेला आहे. या शाळेतील विद्यार्थी पाचवी स्कॉलरशिप मध्ये सहा ते सात विद्यार्थी पात्रता धारक असतात. सदर शाळेत मंथन प्रज्ञाशोध परीक्षा, एम .टी .एस परीक्षाचे अभ्यास वर्ग घेतले जातात आणि विद्यार्थी जिल्हा व तालुका गुणवत्ता यादीत झळकतात. आता झालेल्या जामनेर टॅलेंट सर्च ( जे. टी. एस.) परीक्षेत जामनेर तालुक्यातून इयत्ता चौथीतील विद्यार्थी पहिल्या दहा मध्ये तीन विद्यार्थी नवीदाभाडी शाळेचे आहे. अशा प्रकारची शाळेची यशोगाथा या शिक्षकांनी निर्माण केलेली आहे असे गावकऱ्यांनी सांगितले.म्हणून गजानन मंडवे व ऋषिकेत शिंदे या शिक्षकांची बदली थांबवावी अशी पालकांची शाळेतील मुलांची व महिलांची मागणी होती.

Read More

भारतीय जैन संघटना व महावीर पब्लिक स्कूल आयोजित शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात व आनंदात संपन्न झाला

पहुर : भारतीय जैन संघटना आणि महावीर पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिक्षक सन्मान सोहळा अत्यंत उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. प्रमोद कठोरे (पी.आय, पहुर पोलीस स्टेशन) होते. प्रमुख उपस्थितीत श्री. प्रदीपभाऊ लोढा (चेअरमन, महावीर पब्लिक स्कूल), श्री. पवन रुणवाल (सह सचिव, भारतीय जैन संघटना, जळगाव जिल्हा), श्री. स्वप्निल छाजेड़ (शहराध्यक्ष, भारतीय जैन संघटना), श्री. अरविंद चौरडिया, श्री. सुनील लोढा, श्री. रूपेश लोढा आणि श्री. दीपक लोढा आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. ईश्वर मूळचंद चौरडिया, सुनयना मनोज रुणवाल, शंकर रंगनाथ भामरे यांच्यासह एकूण २० आदरणीय शिक्षकांना सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शहराध्यक्ष स्वप्निल भैया छाजेड़, श्री. सुनील लोढा, श्री. रूपेश लोढा, सौ. भाग्यश्री बेदमुथा, सौ. आरती कोटेचा यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. या सोहळ्याला पत्रकार संघटनेचे अध्यक्ष डॉ. क्षीरसागर, उपाध्यक्ष जोशी, सचिव भामरे सर, शरद बेलपत्रे तसेच अन्य पत्रकार बांधव आणि भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संघटनेच्या वतीने सर्व मान्यवर, शिक्षक आणि उपस्थितांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले

Read More

जामनेर न्यायालयात विधी सेवा व कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न

जामनेर : तालुका विधी सेवा समिती जामनेर व तालुका वकील संघ जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी व फौजदारी न्यायालय, जामनेर येथे 19 जून 2026 रोजी दुपारी 2 वाजता विधी सेवा शिबिर तथा कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश माननीय श्री. एम. एन. जैस्वाल उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. अनिलदादा सारस्वत, तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. पी. एन. देशमुख, अध्यक्ष श्री. के. पी. बारी, सचिव ॲड. डी. बी. गोतमारे यांच्यासह अनेक विधीज्ञ उपस्थित होते. कार्यक्रमात ॲड. एन. टी. चौधरी यांनी उपस्थित पक्षकारांना ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसंदर्भातील कायद्याची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. डी. व्ही. राजपूत यांनी केले. त्यांनी ज्येष्ठ नागरिक कायदा तसेच अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याविषयी थोडक्यात मार्गदर्शन केले. यानंतर सरकारी वकील ॲड. शेळके यांनी अंमली पदार्थांशी संबंधित कायदे आणि त्याचे सामाजिक परिणाम याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सह दिवाणी न्यायाधीश माननीय वाय. एस. आखरे यांनी ज्येष्ठ नागरिक कायदा, अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा तसेच विविध विधी सेवा योजनांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शक भाषणाने शिबिराचा समारोप झाला. या शिबिरास जामनेर तालुका वकील संघाचे सर्व विधीज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने पक्षकार उपस्थित होते. उपस्थितांनी शिबिराचा लाभ घेत समाधान व्यक्त केले.

Read More

‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करावे’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करावे’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सेवा सुविधांसंदर्भात आढावा बैठक पार पाडली. या जयंती सोहळ्याचे भव्य, दिव्य आणि दिमाखदार आयोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. जयंतीसाठी देशभरातून लाखो नागरिक चैत्यभूमीवर येतात. त्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंत्रणांना दिलेले निर्देश:✅सर्व यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे✅मुंबई महानगरपालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रम व अन्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने होत असलेल्या तरतुदीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करावे✅चैत्यभूमी येथे अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे, महापालिका, गृह विभाग व सामाजिक न्याय विभाग तसेच संबंधीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे✅संबंधित यंत्रणांनी स्वच्छतेबाबतही दक्षता घ्यावी✅गर्दी टाळण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यावी. तसेच दादर आणि संबंधित परिसरात वाहतूक पोलिसांनी रहदारीचे योग्य नियंत्रण व जागोजागी सूचना फलक लावावेत✅चैत्यभूमी परिसरात अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी आणि नागरिकांसाठी उन्हापासून संरक्षणासाठी मंडप, प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था करणे✅बेस्ट प्रशासनानेही दादर स्टेशन ते चैत्यभूमीदरम्यान पुरेशा प्रमाणात बससेवा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून नागरिकांना सुविधा होईल सदर बैठकीत पोलीस पथक मानवंदना, चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, शिवाजी महाराज मैदानावरील भव्य निवास मंडप, तेथील आपत्कालीन व्यवस्थेसह, आरोग्य सुविधा, प्रदर्शन मंडप, चैत्यभूमी स्तूप व परिसराची सजावट, “लोकराज्य” विशेषांक, शासकीय जाहिरात प्रसिध्दी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सबंधीत विभाग व यंत्रणांना आवश्यक ते दिशानिर्देश दिले. बैठकीत मुंबई महापालिकेच्या वतीने नियोजनाची सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे मुख्यमंत्री व उपस्थितांना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या हस्ते महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या पोस्टरचे अनावरण देखील करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. संजय बनसोडे, राज्याच्या मुख्य सचिव, राज्याच्या पोलीस महासंचालक, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीचे सरचिटणीस यांच्यासह दादर चैत्यभूमी स्मारक समितीचे प्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Read More

तोरनाळा येथे महाराणा प्रतापसिंह जयंती उत्साहात साजरी

तोरनाळा (ता. जामनेर) | प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील तोरनाळा येथे आज महाराणा प्रतापसिंह यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास मंत्री ना. गिरीश महाजन यांचे खंदे समर्थक तथा जळगाव जिल्हाध्यक्ष चंद्रकांत (चंदू भाऊ) बाविस्कर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासह कार्यक्रमाला गणेश भाऊ राजपूत (माजी जिल्हा परिषद सदस्य, बुलढाणा), मयूर भाऊ पाटील (तालुका अध्यक्ष, जामनेर), नवल भाऊ पाटील (माजी सभापती, जामनेर), युवराज भाऊ पाटील (माजी सरपंच, तोरनाळा), विश्वजीत भाऊ (जामनेर), रमेश भाऊ राजपूत (सदस्य, ग्रामपंचायत तोरनाळा), तसेच आरोग्यदूत जालमसिंग भाऊ राजपूत (जामनेर) हे सन्माननीय उपस्थित होते. कार्यक्रमास तोरनाळा व परिसरातील कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराणा प्रतापसिंह यांच्या शौर्यगाथेचे स्मरण करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकत प्रेरणादायी विचार मांडले.

Read More

पाळधी जिल्हा परिषद शाळेत नव्याने सुरू झालेल्या 5 वी वर्गातील विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी मोफत मार्गदर्शिकांचे वाटप.

पाळधी जिल्हा परिषद शाळेत नव्याने सुरू झालेल्या 5 वी वर्गातील विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी मोफत मार्गदर्शिकांचे वाटप. पाळधी ता. जामनेर : जिल्हा परिषद केंद्र शाळा पाळधी येथे आज दिनांक २५ जून २०२६ रोजी इयत्ता पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी प्रत्येकी ४०० रुपये किमतीची नवोदय मार्गदर्शिका मोफत वितरित करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांची योग्य तयारी करता यावी, या उद्देशाने शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. मार्गदर्शिकेमुळे विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेश परीक्षेचा अभ्यास अधिक सोपा व प्रभावी पद्धतीने करता येणार आहे.यावेळी विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करत मनापासून आभार मानले. शाळेच्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडूनही कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळा नेहमीच अशा शैक्षणिक उपक्रमांना प्राधान्य देत असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.“गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या यशासाठी जिल्हा परिषद केंद्र शाळा पाळधी सदैव कटिबद्ध!” 📖✨

Read More

नि.पं.पाटील विद्यालयात संस्था वर्धापन दिन साजरा

पळासखेडे मिराचे दि १७ जुलै २०२५(प्रतिनिधी ) नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे मिराचे शाळेत मातृहृदयी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन पवार हे होते. सर्वप्रथम कै.आचार्य बापूसो. गजाननराव गरुड व कै. अण्णासाहेब भास्करराव गरूड यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष , संस्था संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेचा इतिहास व प्रगती विषयी माहिती दिली.त्यानंतर विद्यार्थ्याची वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.विद्यालयाचे पर्यवेक्षक जे.आर.पाटील यांनी कै. आचार्य बापूंना अभिप्रेत असलेला विद्यार्थी याबद्दल मत व्यक्त केले.विद्यालयातील उपशिक्षक एस. जे. सोनवणे यांनी मनोगतात संस्थेची स्थापना व व्याप्ती याबद्दल विद्यार्थ्यांची हितगुज केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन पवार यांनी अध्यक्ष भाषणात कै.आचार्य गजाननराव बापूंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्था संचालक व सल्लागार समितीचे अध्यक्ष भिमराव पाटील,चंद्रशेखर काळे,अब्दुल नबी तांबोळी,डी. पी .पाटील, संजू पवार,.शालिक पाटील,अशोक माळी,बळीराम माळी,लता पाटील हे मान्यवर उपस्थित होते.वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक – हर्षाली प्रवीण पाटील द्वितीय क्रमांक – हितेश वर्जन चव्हाण तृतीय क्रमाक – ओम संतोष चौधरी यांनी मिळविला. त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.त्याप्रसंगी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना व गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी 50 शालेय गणवेश वाटप करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाने ,सर्व शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष जी.पी. पाटील यांनी केले तर आभार व्ही. डी. पाटील यांनी मानले.

Read More

नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे (मि)शाळेत वृक्षारोपण

आज दि २५ जुलै २०२५ रोजी पळासखेडा( मिराचे) तालुका जामनेर येथील नि पं. पाटील विद्यालयात वृक्षारोपण संपन्न झाले.श्रावण मासारंभ चे औचित्य साधून आज विद्यालयात धी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन बापूसाहेब श्री. भीमराव पाटील यांच्या हस्ते व त्याचबरोबर विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक श्री. डी .पी .पाटील सर व गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री पवार बाबा यांचे हस्ते ५० मोठ्या रोपांची लागवड करण्यात आली. मे महिन्याच्या वादळात विद्यालयातील उन्मळून पडलेल्या वृक्षांच्या जागेवर पुन्हा जेसीबीने मोठे खड्डे तयार करून तिथे रोपांची लागवड करण्यात आली.रोपांची लागवड केल्यावर त्या खड्ड्यांमध्ये शेणखत मिश्रित काळी माती टाकण्यात आली.विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी प्रत्येकी एक व त्यापेक्षा जास्त रोपांसाठी आर्थिक योगदान दिले.त्याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांच्या संकल्पनेतून एक शिक्षक, शिक्षिका व चार विद्यार्थी त्या रोपांचे जतन व संवर्धन करतील त्या अनुषंगाने प्रत्येक टीमला एक रोप दत्तक घेण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. व्ही.आर.पाटील सर, विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.जे.आर. पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने व सर्व शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने सदर वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

Read More

‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याच्या चौकशी समितीच्या अध्यक्षालाच अटक. शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

ना गपूर (प्रतिनिधी) राज्य भर गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याच्या चौकशी समितीचे अध्यक्ष राहिलेले विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांना गुरुवारी रात्री अटक केली. विशेष म्हणजे, शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासासाठी सुरुवातीला चिंतामण वंजारी यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती.त्यांच्या अहवालाच्या आधारेच या संपूर्ण चौकशीला नवीन वळण मिळाले. आता स्वतः वंजारीच चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत.नागपूर जिल्ह्यात २०१९ पासून गैरमार्गाने ‘शालार्थ आयडी’ प्रदान करून वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात आले. नागपूर विभागीय उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी रवींद्र पाटील यांनी १२ मार्च रोजी पोलिसांकडे या घोटाळ्याचीपाटील यांनी १२ मार्च रोजी पोलिसांकडे या घोटाळ्याची तक्रार केली. उल्हास नरड यांच्या सांगण्यावरून ही तक्रार करण्यात आली होती. प्राथमिक माहिती अहवालानुसार, विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने फेब्रुवारी २०२५ मध्ये शिक्षण आयुक्तांना अहवाल सादर केला होता. उपसंचालक कार्यालयाने २११ प्राथमिक शिक्षक, २ मुख्याध्यापक, १८ कनिष्ठ लिपिक, १३ शिपाई अशी २४४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यादी दिली होती. त्यानंतर शिक्षण आयुक्तांनी वंजारी यांच्या अहवालाच्या आधारे कठोर भूमिका घेत तपासणी सुरू केली.यासाठी २०१९ ते २०२५ पर्यंत नागपूर जिल्ह्यातील संशयित प्राथमिक शाळांमधील ‘शालार्थ आयडी’चा तपास सुरू केला होता. परंतु, आता वंजारी यांनाच अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, वंजारी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होण्यापूर्वी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी होते.या दरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकारी असलेले मृत सोमेश्वर नैताम यांची खोटी स्वाक्षरी करून २०१० ते २०१४ या काळात शिक्षक रुजू झाल्याचे दाखवण्यात आले आहे.तसेच, त्यांचे ‘शालार्थ आयडी’ २०१९ ते २०२५ या काळात निर्माण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे वंजारी यांना अटक करण्यात आली असून या दिशेने तपास केला जाणार आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!