जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मुदतवाढ, सुप्रीम कोर्टाने थेट तारीख सांगत दिले आदेश!

नवी दिल्ली : जिल्हा परिषदांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिलाय. याआधी ३० जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. त्यात आता मुदतवाढ देण्यात आलीय. आता १५ फेब्रुवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत. यामुळे लवकरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असून आचारसंहिता लागू होऊ शकते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात दाखल जालेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मदुतवाढ मिळावी अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाची मागणी मान्य करत मुदतवाढ दिली आहे. याआधी ३१ जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. मात्र आता १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद निवडणूक घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे राज्य निवडणूक आयोगाला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीला सुप्रीम कोर्टानं दोन आठवड्यांची मुदतवाढ दिलीय. तर इतर सर्व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसंदर्भात २१ तारखेला पुन्हा सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाकडून १० फेब्रुवारी पर्यंत सर्व निवडणुका पार पाडू असा अर्ज कोर्टात करण्यात आला होता. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून तयारी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पूर्वतयारीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींना निवडणूक वेळेत घेण्यासाठी आदेश दिले आहेत. याबाबत निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही पाठवण्यात आलंय.

Read More

भारतीय जैन संघटनेतर्फे जामनेरला बालकांसाठी विविध कार्यक्रम संपन्न

जे. बी. एन महाराष्ट्र न्यूज जामनेर( जामनेर -प्रतिनिधी )- येथील भारतीय जैन संघटनेतर्फे बाल दिनानिमित्त पाच वर्षापासून ते वीस वर्षापर्यंतच्या बालकांसाठी महावीर भवन येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन बाल दिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात बालकांसाठी खो-खो,संगीत खुर्ची,रस्सीखेच,पास कप खेळांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धाही ठेवण्यात आल्या होत्या या स्पर्धेत 115 बालकांनी सहभाग नोंदविला. ज्या मुलांनी स्पर्धेत विजय मिळवला त्यांना बक्षिसे देण्यात आली. राकेश हिरालालजी संचेती हे प्रायोजक म्हणून होते.जळगाव जिल्हा महिला विंग जिल्हाध्यक्षा सोनल कोठारी यांनी सुत्रसंचलन केले. खानदेश विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत, जिल्हा उपाध्यक्ष विकास कोठारी, माजी जिल्हा कार्याध्यक्ष शितल लोढा, जय बोहरा, रितेश कोठारी, विशाल ओस्तवाल एवं बीजेएस महिला अध्यक्षा सौ. मोना चोरडीया, सदस्या सौं जयश्री लोढा, सौ. सोनाली सिसोदीया, महावीर पाठशाळा प्राध्यापक सौ. वनमाला कोठारी, सौ वैशाली बागमार, सौ. सपना ब्रम्हेचा, सौ. ऊषा पोरवाल, सौ. रोशनी भंडारी, सौ.शितल संचेती, सौ. नमिता चोपडा,आदी पदाधीकारी उपस्थित होते. प्रोजेक्ट हेड म्हणून विकास ललवाणी, सौ दिपाली चोरडिया यांनी काम पाहीले.

Read More

माळपिंपरी येथील कृषीदुतांनी मधुरम नर्सरीला दिली भेट. नर्सरी व्यवस्थापनाची माहिती घेतली जाणून.

जामनेर (प्रतिनिधी):- डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथील अंतिम वर्षातील कृषिदूत सुशांत जाधव, पवन बुवा , संग्राम पवार आणि सौरभ पाटील यांनी प्राचार्य डॉ. शैलेश तायडे आणि कार्यक्रम समन्वयक प्रा. बी. एम गोणशेटवाड , कार्यक्रम अधिकारी प्रो. व्हि.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मधुरम नर्सरी येथे भेट देऊन गट चर्चा प्रात्यक्षिक राबविले. मधुरम नर्सरीचे संचालक मा.श्री.योगेश पाटील यांनी रोपवाटिका (Nursery) व्यवस्थापन म्हणजे बियाणे, कलमे यांपासून रोपे तयार करणे, त्यांची योग्य निगा राखणे (पाणी, खत, कीटकनाशके), आणि योग्य पद्धतीने विक्री करणे यासाठीचे नियोजन होय. यशस्वी नर्सरीसाठी वनस्पतींची गरज, सिंचन, खत व्यवस्थापन, तापमान नियंत्रण, रोग-कीड नियंत्रण आणि मार्केटिंगचे ज्ञान आवश्यक आहे, ज्यात नियोजनबद्ध काम आणि रोपांविषयीची आवड यांची माहिती जाणून घेतली.

Read More

जामनेरात मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळे संपन्न

जामनेर (प्रतिनिधी):जामनेर नगरपरिषदेच्या वतीने आज विविध विकासकामांचे भव्य भूमिपूजन व लोकार्पण सोहळे जल्लोषात पार पडले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्राचे मंत्री गिरीशभाऊ महाजन होते. त्यांच्या हस्ते अनेक महत्त्वाच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नगरपरिषदेचे माजी नगरसेवक, नगरसेविका, पक्षपदाधिकारी तसेच शहरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या निमित्ताने जामनेर शहरातील नागरिकांना सुविधा पुरवणारी, शहराचा विकास वेगाने करणारी अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत.लक्ष्मी कॉलनी (गट क्र. 391/2) — कंपाउंड वॉल व लादीकरण — 64.51 लाख, गिरिजा कॉलनी (गट क्र. 458) — संतोषी माता मंदिर परिसरात क्लब हाऊस बांधकाम — 79.36 लाख, पाचोरा रोड (गट क्र. 206) — क्लब हाऊस व कंपाउंड वॉल — 128.93 लाख,शिव कॉलनी — कंपाउंड वॉल, लादीकरण व बगीचा विकास — 45.34 लाख, मधुबन कॉलनी (गट क्र. 43/2 व 431/2) — खुल्या जागेचा विकास — 47.13 लाख व 69.83 लाख,शहाजान शहावली दर्गा परिसर — सौंदर्यीकरण व विकास कार्य — 100 लाख, विवेकानंद नगर — व्यायामशाळा बांधकाम — 49.82 लाखगट क्र. 292/2 — व्यायामशाळा बांधकाम — 72.72 लाखगट क्र. 5 — कुस्ती आखाडा बांधकाम — 52.74 लाख या सर्व कामांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशासक तथा मुख्याधिकारी नितीन बागुल आणि नगरपरिषद कर्मचारीवृंद यांनी मोलाचे परिश्रम घेतले. या कार्यक्रमाद्वारे जामनेर शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळणार असून, नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.

Read More

जामनेर-जळगाव रोडवरील खड्ड्यांचा ‘फोटोशूट’ – नगरपरिषद व ठेकेदारांच्या कामावर प्रश्नचिन्ह!”

जे. बी. एन. महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर | प्रतिनिधीजामनेर-जळगाव रोडवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला असून, नगरपरिषदेकडून हजारो कोटी रुपयांचा खर्च करून करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाची वास्तविकता आता उघड होत आहे.(दि. 28 ऑगस्ट 2025) दुपारी समाजसेवक अविनाश बोरसे यांनी जामनेर-जळगाव रोडवरील प्रचंड खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी एक आगळावेगळा मार्ग निवडला. त्यांनी प्रत्यक्ष खड्ड्यात बसून “फोटोशूट” करून नगरपरिषद प्रशासन व ठेकेदारांच्या निष्काळजी कामावर तिखट टीका केली. अविनाश बोरसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले: “नगरपरिषदेकडून हजारो कोटी रुपये खर्च करूनही जामनेर-जळगाव रोडची अशी दयनीय अवस्था पाहून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ठेकेदार आणि नगरपरिषद अधिकाऱ्यांनी दर्जेदार काम न केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.” स्थानिक नागरिक, वाहनधारक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. तसेच, दोषी ठेकेदारांवर कारवाई करून भविष्यात दर्जेदार रस्ते बांधकाम व्हावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Read More

७० वर्षाची परंपरा जोपासत श्रीराम पेठेत बारागाड्या उत्साहात साजर्‍या.

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर /प्रतिनिधी – आपले सण आपले उत्सव आपणचं साजरे करणार या ब्रिद वाक्याखाली पारंपरिक पद्धतीने सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य दिव्य बारागाड्या उत्सव शहरातील श्रीराम पेठ भागातील दसरा मैदान ते हनुमान मंदिरात पर्यंत ओढल्या गेल्या स्व. देवचंदबाबा शिंदे यांच्या प्रेरणेने सुरु केलेल्या बारागाड्या उत्सवाला आज सुमारे ७० वर्षाची परंपरा लाभली आहे. सविस्तर माहिती अशी श्रीराम पेठ भागात असलेले श्रीराम पेठ वासियांचे ग्रामदैवत तथा आराध्य दैवत असलेले खंडेराव महाराज यांच्या नावाने या भागात बारागाड्या ओढल्या जातात. या उत्सवास आज ७० वर्षाची परंपरा लाभली आहे सामाजिक एकात्मता हिच श्रीराम पेठ वासियांची ओळख असल्याने हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. सद्ध्या तरी या बारागाड्या उत्सव काठीचा मान हा शिंदे परीवारा कडे असुन श्रीराम पेठ भागातील रहिवाश्यांकडुन तसेच शिंदे परीवारातील सदस्यांनी हा पारंपरिक व पुरातन वारसा कायम ठेवला आहे. दसरा मैदान ते हनुमान मंदिरात पर्यंत या बारागाड्या ओढल्या जातात तर पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येने भाविक या उत्स्वात हजारोंच्या संख्येने सहभागी होत सोहळा साजरा करतात तर “खंडेराव महाराज की जय” तर “येळकोट येळकोट जय मल्हार” या घोषणांनी आसमान दणाणून सोडला जातो. आज जरी श्रीराम पेठ भागातील रहिवासी शहराच्या अन्य भागात विखुरलेले असले तरी आजच्या दिवशी लहान पासुन ते वयोवृद्ध व्यक्ती तसेच महिला आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित होतात. आज इंटरनेट युगात सुद्धा हि परंपरा टिकवून ठेवल्याचा आनंद आहे असा विश्वास श्रीराम पेठ भागातील रहिवासी मान्य करतात. त्यामुळे हिच सामाजिक एकता शहरात कुतुहलाचे मुख्य कारण ठरले आहे हा भव्य दिव्य सोहळा मोबाईलच्या कॅमेर्‍यात भाविकांनी कैद केला. खोबरे भंडाऱ्याची उधळण करुन मोठ्या धार्मिक वातावरणात नियोजित भक्तां करवी बारागाड्या ओढल्या जातात तर बारागाड्या ओढल्या नंतर उडीद व भाकर भंडाऱ्याची तथा महाप्रसादाचा लाभ भाविक घेत असतात या महाप्रसाद वाटपासाठी खंडेराव महाराज सेवा समिती कार्यान्वित असते.

Read More

आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत भुसावळ येथे ‘योग संगम’ कार्यक्रमाचे आयोजन

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून “एक पृथ्वी, एक स्वास्थ्य के लिए योग” या धरतीवर या वर्षीचा ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन च्या “योग संगम” कार्यक्रमाचे आयुष मंत्रालय, भारत सरकार, सेंट्रल रेल्वे, भुसावळ विभाग व जिल्हाधिकारी जळगाव आणि भारतीय खेळ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत, भुसावळ येथील सेन्ट्रल रेल्वे मैदान येथे दि.२१ जून रोजी सकाळी ६ वा. आयोजित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री श्री.संजयजी सावकारे, भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडे, जळगाव जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, भारतीय खेळ प्राधिकरण क्षेत्रीय निदेशक श्री.पांडुरंग चाटे, श्री. राजेंद्र फातले यांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे. सदर ‘योग संगम’ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भुसावळ शहर व परिसरातील इच्छुक नागरिकांनी दि.२१ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या आधी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद;

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा जाहीर राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद; जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा जाहीर मुंबई (प्रतिनिधी):राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तारखांची अधिकृत घोषणा करण्यात आली. या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली असून प्रशासकीय तयारीलाही वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १६ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक प्रक्रिया जाहीर होणार असून त्याच दिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १६ ते २१ जानेवारीदरम्यान पार पडणार आहे. अर्जांची छाननी २२ जानेवारी रोजी केली जाणार आहे. उमेदवारांना २७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारी घेता येणार असून त्यानंतर दुपारी ३.३० नंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती आयोगाने दिली. दरम्यान, निवडणुका शांततेत व पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निवडणुकांकडे राज्यातील राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून येत्या काही दिवसांत प्रचाराला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read More

जैन इंटरनॅशनल स्कूल, जामनेर येथे विज्ञान व भाषा प्रदर्शन उत्साहात संपन्न

जामनेर | प्रतिनिधीजैन इंटरनॅशनल स्कूल, जामनेर येथे दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी विज्ञान तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी विषयांचे प्रदर्शन उत्साहात पार पडले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक मॉडेल्स, प्रयोग, भाषाविषयक चार्ट, कविता तसेच सर्जनशील लेखन सादर करून आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे सचिव आदरणीय श्री. मनोज कुमारजी कावडिया व संस्थेचे सदस्य आदरणीय श्री. मयूर कावडिया प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका फिरोजा खान मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रदर्शनास शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना व सादरीकरणाचे कौतुक केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, भाषिक कौशल्ये तसेच सर्जनशीलतेला चालना मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Read More

वाकडी गरुड विद्यालयात सेवापूर्ती सोहळा संपन्न दिनांक ३० ऑगस्ट२०२५ रोजी अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड माध्यमिक विद्यालय वाकडी येथे विद्यालयाचे पर्यवेक्षक

श्री डी एम गरुड हे दिनांक ३१/०७/२०२५ रोजी नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे.त्यांचा सेवापूर्ती निरोप सोहळा दिनांक ३० ऑगस्ट रोजी संपन्न झाला.या सोहळ्याचे अध्यक्षस्थान संस्थेचे सचिव आदरणीय काकासाहेब सागरमल जैन यांनी भूषविले. मा अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, उपस्थित मान्यवरांचे स्वागत गीताने स्वागत केले. त्यानंतर मा अध्यक्ष उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष काकासाहेब सागरमल जैन,प्रमुख पाहुणे संस्थेचे सहसचिव दादासाहेब यु यु पाटील,श्री राम दादा पवार,प्रा.सुनील गरुड यांचे स्वागत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पी एन पाटील मॅडम यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केले.याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर, श्री डी एम गरुड सर यांचे नातलग,मित्रमंडळी व अनेक शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे स्वागत विद्यालयाच्या वतीने करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पी एन पाटील यांनी केले.कार्यक्रमाची रूपरेषा सांगून त्यांनी श्री डी एम गरुड यांच्या यांच्या सेवाकालाविषयी माहिती दिली.सेवापूर्ती निमित्ताने त्यांना पुढील आनंददायी व आरोग्यमय जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. इ 10 वी च्या विद्यार्थीनीनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती ए एस पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.सत्कारमूर्ती श्री डी एम गरुड सर यांचा सपत्नीक ह्रदय सत्कार विद्यालयाच्या वतीने करण्यात आला. कपडे, साडी,भेटवस्तू ,शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ असे सत्काराचे स्वरूप होते.शेंदूर्णी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री संजय भोळे,श्री रामदादा पवार,प्रा.सुनील गरुड यांनी मनोगत व्यक्त करून श्री डी एम गरुड सरांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर संस्थेचे सहसचिव दादासाहेब यु यु पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. श्री डी एम गरुड सर यांच्या शैक्षणिक व क्रीडाशिक्षक म्हणून केलेल्या यशस्वी सेवेचा गौरव केला. तसेच संस्थेच्या हितासाठी निवृत्तीनंतर सुद्धा सतत शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात कार्यरत राहावे असे आवाहन केले.त्यांच्या भावी आनंददायी व आरोग्यमय जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. सत्कारमूर्ती श्री डी एम गरुड सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कै. अण्णासाहेबानी आपल्याला कशाप्रकारे सेवेची संधी दिली याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.संस्था परिवार कुटुंब व मित्रपरिवार यांचे मनपूर्वक आभार मानले.आपले प्रेरणास्थान कै अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड यांचा विद्यालयाच्या प्रांगणात पुतळा उभारणी साठी ५१००० रुपये देणगी जाहीर केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष काकासाहेब सागरमल जैन यांनी बहारदार शैलीत अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सरांना भावी आरोग्यमय जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर सर्व नातेवाईक मंडळी,मित्रपरिवार, विविध शाळांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी श्री डी एम गरुड सरांचा सत्कार केला. या प्रसंगी श्री डी एम गरुड सर यांचे सर्व आप्तस्वकीय नातलग व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री मुरलीधर दादा गरुड,श्री प्रभाकर दादा गरुड,श्री राम दादा पवार(मराठा सेवा संघ),प्रा.सुनीलजी गरुड,प्राचार्य श्री संजय भोळे सर,प्राचार्य श्री आर एस चौधरी सर श्री पी बी पाटील(माजी मुख्याध्यापक) श्री ए ए पटेल सर(माजी मुख्याध्यापक)प्रा.सांळूके सर,श्री व्ही आर पाटील(मुख्याध्यापक) श्री डी एस पाटील सर, श्री मोहन बेलेकर(सरपंच) श्री रहेमानभाऊ बारी,श्रीमती संगीताताई गायकवाड(सरपंच वाकडी) श्री घनश्याम पाटील (पोलीस पाटील) श्री सुनीलभाऊ घुगे,श्री संजय सुर्वे सर, श्री बाळासाहेब गरुड,डॉ देवेन्द्र शेळके,श्री विजयदादा गरुड, श्री संजय पाटील, श्री रमेशदादा गायकवाड, श्री मनोजभाऊ तडवी,श्री संजयभाऊ देशमुख, श्री अभिजित पवार,श्री अशोकदादा देशमुख, श्री अशोक बिडके,श्री रविंद्र माने,श्री शब्बीरभाऊ तडवी,श्री जगनदादा पाटील,श्री सुरेंद्र शेळके(लोहारा) श्री संजयभाऊ दांडगे, श्री तेजराव भाऊ ठोंबरे, श्री विजयदादा सुर्वे,श्री प्रमोदभाऊ गरुड,श्री ज्ञानेश्वरभाऊ घुगे(दैनिक देशदूत) श्री विलासभाऊ जोशी(दैनिक लोकमत) उपस्थित होते. विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले. श्री एस वाय चौधरी सर यांनी सूत्रसंचालन केले. श्री एस ए पाटील सर यांनी आभार मानले💐

Read More
error: Don't Try To Copy !!