Headlines

JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलचे यशस्वी 9 वर्ष पूर्ण.संचालक मनोजजी कावडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयात वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलने यशस्वी ९ वर्ष पूर्ण करून १० व्या वर्षात पदार्पण केले. या निमित्ताने संचालक मनोजजी कावडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयात वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी मनोज कावडिया यांनी चॅनेलच्या यशस्वी वाटचालीबद्दल विशेष कौतुक करत भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यानंतर केक कापून वर्धापनदिनाचा आनंद साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला संचालक किरण सोनवणे, संपादक शांताराम जाधव, कार्यकारी संपादक ईश्वर चोरडिया, अँकर मीनल चौधरी, कॅमेरामन विलास ढाकरे, सुपडू जाधव, सुनील जाधव,सचिन माळी, प्रविण गावंडे, आबा पाटील आणि इतर सहकारी उपस्थित होते. JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलने पत्रकारितेच्या क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली असून, निष्पक्ष आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनेलची ओळख आहे.

Read More

लुबाडलेले 1600 रुपये काही मिनिटांतच सैनिकाच्या खात्यात परत

पाचोरा – निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारिता हे लोकशाहीचे चौथे स्तंभ म्हणून ओळखले जाते, याचे जिवंत उदाहरण नुकतेच पाचोरा येथे पाहायला मिळाले पत्रकार संदीप महाजन यांनी अनधिकृत रेल्वे तिकीट एजंटकडून भारतीय सैनिकाची करण्यात आलेली आर्थिक लुबाडणूक उघडकीस आणताच संबंधित भामट्याने युद्धजन्य परिस्थिती काळात अफरातफरीत केलेली फसवणूक लपवण्यासाठी केवळ काही मिनिटांतच सैनिकाच्या खात्यात 1600 रुपये परत वर्ग केले.ही घटना आहे पिंपरी सार्वे येथील रहिवासी आणि सध्या CISF मध्ये कार्यरत असलेल्या जवान प्रदीप बाविस्कर यांच्या बाबतीत. देशात युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्यामुळे जवानांना तातडीने त्यांच्या सेवास्थळी परत हजर राहण्याचे आदेश मिळाले होते. या घाईत त्यांनी रेल्वे तिकीट काढण्यासाठी पाचोरा येथील तिकीट एजंटची मदत घेतली. मात्र त्या एजंटने एका सामान्य तिकिटासाठी वाजवी रक्कमेपेक्षा तब्बल 1600 रुपये जास्त रक्कम आकारून लुबाडणूक केली.या प्रकाराची माहिती पत्रकार संदीप महाजन यांना मिळताच त्यांनी या विषयावर सखोल चौकशी केली आणि समाजमाध्यमांद्वारे, तसेच ‘ध्येय न्यूज’च्या माध्यमातून ही धक्कादायक बातमी सर्वांसमोर आणली. पत्रकारितेतील जबाबदारी आणि लोकहितासाठी त्यांनी दाखवलेली तत्परता पाहून ही बातमी काही वेळातच व्हायरल झाली. बातमीचा समाजावर, प्रशासनावर आणि संबंधित एजंटवर इतका परिणाम झाला की, संबंधित एजंटने काही मिनिटांत जवानाच्या खात्यावर 1600 रुपयांची रक्कम परत पाठवली.ही घटना ही केवळ पत्रकाराच्या सचोटीची विजयगाथा नाही, तर हे एक जिवंत उदाहरण आहे की सत्याचे धारदार लेखणीसमोर अन्याय करणाऱ्यांची लाचारी उघड होते. पत्रकार महाजन यांनी या प्रकरणात कोणत्याही आमिषाला बळी न पडता, केवळ सैनिकाचा हक्क परत मिळावा या हेतूने ही बातमी उघडकीस आणली.या प्रकरणानंतर शहरातील जनमानसात पत्रकार महाजन यांच्या कार्याची भरभरून स्तुती होत असून अनेकांनी सोशल मीडियावर “हीच खरी पत्रकारिता” असे म्हटले आहे. शिवाय, यामुळे भविष्यात या आणि अशाप्रकारे लूट करणाऱ्या अनधिकृत रेल्वे एजंटांचा धसका बसेल व सामान्य नागरिकांची लुबाडणूक टळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.प्रशासनाने सुद्धा या भामट्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. पत्रकारिता म्हणजे केवळ माहिती पोहोचवणे नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्याचे हत्यार आहे, याचे हे अत्यंत प्रभावी उदाहरण आहे.

Read More

जामनेर येथे अत्याधुनिक जी. एम. फिजिओथेरपी सेंटर व नव्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण

जामनेर येथे अत्याधुनिक जी. एम. फिजिओथेरपी सेंटर व नव्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण जामनेर (प्रतिनिधी): जामनेर शहरातील न्यू रुबीस्टार हॉस्पिटलच्या वतीने अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज जी. एम. फिजिओथेरपी सेंटर तसेच नव्या सुसज्ज रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे जामनेर व परिसरातील नागरिकांना अधिक दर्जेदार, आधुनिक आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. न्यू रुबीस्टार हॉस्पिटलने आरोग्यसेवेच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि प्रशिक्षित तज्ज्ञांच्या माध्यमातून जी. एम. फिजिओथेरपी सेंटर सुरू केले आहे. या केंद्रामध्ये विविध शारीरिक व्याधी, दुखापतीनंतरचे पुनर्वसन, सांधेदुखी, मणक्यांचे आजार तसेच इतर फिजिओथेरपी उपचार आधुनिक पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याचबरोबर रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीची सेवा मिळावी यासाठी नव्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेचेही लोकार्पण करण्यात आले. या रुग्णवाहिकेमुळे गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार केंद्रात पोहोचविणे अधिक सोयीचे होणार असून आरोग्यसेवेची गुणवत्ता आणखी उंचावणार आहे. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण उपचार सेवा आणि रुग्णकेंद्रित दृष्टिकोन यांच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना सक्षम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या न्यू रुबीस्टार हॉस्पिटलच्या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या स्तुत्य उपक्रमासाठी न्यू रुबीस्टार हॉस्पिटलच्या संपूर्ण व्यवस्थापन, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाचे नागरिकांनी अभिनंदन केले असून, भविष्यातही अशाच दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Read More

छत्रपती शिवाजी ब्रिगेड जामनेर तालुकाध्यक्ष पदी अमोल ठोंबरे.तर उपाध्यक्षपदी प्रविण गावंडे.

जामनेर (प्रतिनिधी):- छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुकाध्यक्ष म्हणून अमोल ठोंबरे यांची तर उपाध्यक्ष म्हणून प्रविण गावंडे यांची निवड करण्यात आली.त्यांना छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले.छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी जामनेर तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून नवनियुक्त अध्यक्ष,उपाध्यक्ष यांच्यावर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.यावेळी तालुका कार्यकारणी बैठकिला संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे, डॉ.धनंजय बेंद्रे,जिल्हा उपाध्यक्ष कैलास पाटील , सामाजिक कार्यकर्ते अरुण पाटील , नितीन पाटील, l नारायण महाजन, प्रमोद पाटील, कैलास बडगुजर , शरद मोरे, दीपक बावस्कर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

गुढीपाडव्याचे औचित्य साधत जामनेर तालुक्यातील पाळधी येथील शेतकरी श्री.शशिकांत त्रंबक पाटील यांनी वाटसरूंसाठी केली पाणपोईची सुविधा

गुढीपाडव्याचे औचित्य साधत जामनेर तालुक्यातील पाळधी येथील शेतकरी श्री.शशिकांत त्रंबक पाटील यांनी वाटसरूंसाठी केली पाणपोईची सुविधा. कडक उन्हामध्ये रस्त्याने येणारे जाणारे वाटसरू,तसेच शेतकरी यांना थंडगार पाणी मिळावे म्हणून मागील 14 वर्षापासून पाळधी खर्चाना रस्त्यावर दर गुढीपाडव्याला पूजन करून लोकांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याचा अखंडित नित्यक्रम शेतकरी शशिकांत पाटील यांनी सुरू ठेवला आहे. जामनेर तालुक्यामध्ये आपापल्या क्षमतेनुसार वेगवेगळ्या माध्यमातून मानवतेसाठी काम करणारे असे अनेक लोक आहेत. “पाणी हेच जीवन आहे” पाण्याचे महत्व समजून त्यासाठी जीवन वाहून घेतलेल्या शशिकांत भाऊंना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

Read More

बेटावद खुर्दला ५ ठिकाणी चोऱ्या – अज्ञाताविरूध्द

बेटावद खुर्दला ५ ठिकाणी चोऱ्या – अज्ञाताविरूध्द जामनेर पोलिसात गुन्हा दाखल जे बी एन महाराष्ट्र न्यूज-जामनेर (प्रतिनिधी सुपडू जाधव): बेटावद खुर्द (ता. जामनेर) येथे रविवारी रात्री चोरट्यांनी पाच ठिकाणी ■ घरफोडी करून ७० हजारांची रोकड व १३ हजाराचे सोन्याचे दागिने लांबविल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्तम राजाराम बर्डे (बेटावद खुर्द, ता. जामनेर) हे पत्नीला उपचारासाठी जामठी … (ता. बोदवड) येथे घेऊन गेले होते. त्यांच्या बंद घरातून चोरट्यांनी ३० हजार रोख व दागिने लांबविले. याच रात्री चोरट्यांनी गावातील इतरही चौघांच्या घरातून रोकड व दागिने लांबवल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान, एकाच वेळी पाच ठिकाणी चोऱ्या झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून हवालदार रवींद्र बिन्हाडे तपास करीत आहेत.

Read More

जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द परिसरात ढगफुटी:शेतकऱ्याचे अतोनात नुकसान-राष्टवादी कॉग्रेस नेत्यांची पाहणी, भरपाईसाठी शासनाला इशारा….

जे. बी. एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी-सुपडू जाधव आज बेटावद खुर्द परिसरात ढगफुटी झाल्यावर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे सर तालुका अध्यक्ष किशोर आप्पा पाटील बेटावद खुर्द परिसरात शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी केली शासनाने त्वरित पंचनामे करून योग्य भरपाई न दिल्यास लवकरच शेतकऱ्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चाचे आयोजन करू असा शब्द शेतकऱ्यांना दिला

Read More

सजगता : राष्ट्रवादी काँग्रेसचा शिक्षण विभागाकडे पाठपुरावा सुरु,महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ दूर करण्याची मागणी

जळगाव : शासनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने यंदाच्या नवीन वर्षाच्या प्रवेशांमध्ये अगदी सुसूत्रता व काटेकोर धोरणाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश यापूर्वीच दिलेले असल्याने स्थानिक स्तरावर शाळा-कॉलेज व संस्थानी गोंधळाची परिस्थिती निर्माण करू नये,यासाठी शिक्षण सहसंचालक कार्यालयाने महाविद्यालय निहाय झोनल ऑफिसर नियुक्त करावे,अशी मागणी करत राष्ट्रवादी युवती काँग्रेस व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने संयुक्तरित्या प्रशासनाला साकडे घातले आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश कार्यक्रम संयोजक तथा रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षा कु.भाग्यश्री विवेक ठाकरे,जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष मोनालिका पवार व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आज,१५ जून (सोमवार) रोजी येथील उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ.पराग मसराम व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना चव्हाण यांची भेट घेऊन यंदाच्या नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने ठरवून दिलेल्या सुटसुटीत व पारदर्शक धोरणाची अंमलबजावणी काटेकोर होण्यासाठी उपाययोजना राबविण्यात याव्यात अशी निवेदन देत मागणी केली. याबाबत व्हावी काटेकोर अंमलबजावणी : १. शासनाने ०४ जानेवारी २०१६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट देताना विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क वसूल करण्यात येऊ नये,अशा स्पष्ट सूचना असताना जिल्ह्यातील काही संस्था विद्यार्थ्यांकडून २०० ते ५०० रुपये घेत असल्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे तक्रारी आल्या असल्याने अशा प्रकारचे बेकायदा पैसे वसुल करू नये असे जिल्ह्यातील सर्व संस्थांना तात्काळ आदेश व्हावेत. २. शासनाने ०८ जुलै २०२४ रोजी निर्गमित केलेल्या निर्णयानुसार व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दुर्बल घटक,सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग तसेच इतर मागासवर्गीय या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काचा १०० टक्के लाभ मंजुरीचा निर्णय झालेला असल्याने म्हणजे सरसकट मोफत शिक्षण मिळणार असल्याने प्रवेशावेळी मुलींना शुल्कासाठी वेठीस धरण्यात येऊ नये. ३. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मागणीप्रमाणे गेल्या वर्षी केलेल्या उपाययोजनेप्रमाणे मुलींना सरसकट मोफत प्रवेश देण्याच्या संदर्भात त्या-त्या महाविद्यालयांसाठी ‘नोडल ऑफिसर’ नेमण्याची तातडीने कार्यवाही करण्यात यावी.याबाबत केलेल्या कार्यवाहीची महाविद्यालय निहाय नेमण्यात आलेल्या झोनल ऑफिसरची माहिती सर्वांना सोयीसाठी जाहीर करण्यात यावी अशी मागणी दोन्ही विभागाशी निगडित अधिकाऱ्यांकडे पदाधिकाऱ्यांनी केली. शिष्टमंडळात यांचा होता सहभाग :शिक्षण विभागाच्या दोन्ही कार्यालयांच्या प्रमुखांशी बैठक करतांना सकलीन शेख रफिक,प्रांजल सुनील सोनार,श्रद्धा छगन सोनवणे,मानसी भास्कर ठाकरे,प्रिन्सि राकेश दारा,कीर्ती अरुण कुलकर्णी आदीविद्यार्थ्यांचा शिष्टमंडळात सहभाग होता.

Read More

जि.प.प्राथमिक शाळा वाकडी येथे केंद्रीय शिक्षण परिषद उत्साहात साजरी

वाकडी येथे दि.३० सप्टेंबर रोजी वाकडी केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद मराठी केंद्रशाळा वाकडी येथे आयोजित करण्यात आली. त्या शिक्षण परिषदेचे अध्यक्षस्थान वडगाव सद्दो शाळेचे मुख्याध्यापक श्री कौतिक आवटे यांनी भूषवले. या शिक्षण परिषदेसाठी जामनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री विष्णू काळे साहेब उपस्थित होते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या अध्ययन सरानुसार विद्यार्थ्यांचे विश्लेषण करून त्याप्रमाणे कृती कार्यक्रम राबवून आपण निश्चितपणाने अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करून गुणवत्ता निर्माण करू शकतो असा विश्वास काळे साहेबांनी उपस्थित शिक्षकांना दिला. तसंच ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणारा शिक्षणकप सद्यस्थितीत प्रथम क्रमांक वर असलेला जामनेर तालुका निश्चितपणाने उचलेल अशी अपेक्षा व्यक्त केली आणि त्यासाठी आजपर्यंत सर्व शिक्षकांनी केलेल्या कार्याचे कौतुक आदरणीय काळे साहेबांनी आपल्या मनोगतात केले. वाकडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री ज्ञानेश्वर पाटील सर यांनी केंद्रातील शाळांच्या निपुण महाराष्ट्र अभियान संदर्भात आढावा घेऊन मार्गदर्शन केले. त्यानंतर शिक्षण परिषदेस उपस्थित असलेले फतेपूर व तोंडापूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री संदीप पाटील सर यांनी सुद्धा अध्ययन स्तर निश्चितीच्या संदर्भात उपस्थितांना सविस्तार मार्गदर्शन केले.वाकडी शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रल्हाद शिंदे सर यांनी आपल्या प्रस्ताविकातून शाळेची यशोगाथा सर्वांसमोर मांडली. तर तर श्री विनोद नाईकडा यांनी जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमासंदर्भात मार्गदर्शन केले.शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर कवडे सर यांनी केले तर आभार श्री सूर्याजी काकडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री ज्ञानेश्वर शामराव पाटील, श्री शेखर महाजन व श्री प्रकाश कुमावत यांनी परिश्रम घेतले.

Read More

पळासखेडे मिराचे येथे विकसित भारत का अमृत काल सेवा ११ सालनिमित्त पंचायत चौपाल सभेचे

पळासखेडे(प्रतिनिधी)जामनेर तालुक्यातील पळासखेडे मिराचे येथे विकसित भारत का अमृत काल सेवा सुशासन गरीब कल्याण के ११ साल निमित्त पंचायत चौपाल सभेचे आयोजन करण्यात आले होते मा ना पंत प्रधान नरेंद्र जी मोदी सरकारने भारतीय जनते साठी केलेल्या कल्याणकारी योजना हिताची कामे देश्याला प्रगती पथावर नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची माहिती वक्त्यांनी दिली राम मंदीर ३७० कलम ऑपरेशन सिंदूर अश्या अनेक गोष्टी उपस्थीत नागरिकांसमोर मांडल्या.कार्यक्रमांचे अध्यक्ष स्थानी प्रा शरद पाटील होते तर जामनेर पश्चिम मंडल अध्यक्ष कमलाकर भाऊ पाटील गट नेते अमर भाऊ पाटील अण्णा भाऊ पिठोडे संजय निराधार चे अध्यक्ष भगवान भाऊ इंगळे भैय्या शेठ अस्लम शेख अन्वर शेख शबीर शेख आशिष भाऊ रवी भाऊ पाचपोळे निवृत्ती भाऊ पाटील गोविंद भाऊ राजपूत संजय भाऊ पवार मंगल राजपूत अर्जुन मगर अरुण पवार विजू भाऊ पाटील व इतर मंडळी उपस्थित होते सूत्र संचालन रवि हडप यांनी केले तर आशिष दामोदर यांनी आभार व्यक्त केले

Read More
error: Don't Try To Copy !!