Headlines

हिंदू सूर्य महाराणा प्रताप जयंतीनिमित्त भाजप कार्यालयात अभिवादन

जामनेर (प्रतिनिधी): शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी जामनेर शहर कार्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, सरचिटणीस अतिश झाल्टे, शहर मंडळ अध्यक्ष रविंद्र रमेश झाल्टे, डॉ. प्रशांत भोंडे, दिपक तायडे, बाबुराव हिवराळे, सुहास पाटील, मुकुंदा सुरवाडे, दत्तू जोहरे, सुनील पाटील, प्रल्हाद सोनवणे, सुभाष पवार, गोकुळ माळी, पप्पू पाटील, दिपक डांगी, योगेश मोते आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी महाराणा प्रताप यांच्या पराक्रम, त्याग आणि स्वाभिमानाच्या आदर्शातून प्रेरणा घेत राष्ट्रसेवेचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमात राष्ट्रभक्तीचा उत्साहपूर्ण माहोल निर्माण झाला होता. 🚩

Read More

ग्रामपंचायत अधिकाऱ्यास 40 हजारांची लाच घेताना अटक

जळगांव(प्रतिनिधी)लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ला.प्र.वि.) धुळे युनिटच्या पथकाने पारोळा तालुक्यातील तामसवाडी ग्रामपंचायतीचे अधिकारी दिनेश वासुदेव साळुंखे (वय 53) यांना 40,000 रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. तक्रारदार हे शासकीय बांधकाम ठेकेदार असून त्यांनी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत तामसवाडी येथे सुमारे 5 लाख रुपये किंमतीचे रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण केले होते. या कामासाठी 4 लाख रुपयांची देय रक्कम ग्रामपंचायतीकडून तक्रारदारांच्या खात्यावर जमा झाली होती. या पार्श्वभूमीवर तक्रारदार आपल्या चुलत काकांसह 7 दिवसांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात इतर कामासंदर्भात गेले असता आरोपी दिनेश साळुंखे यांनी त्यांच्या खात्यात जमा झालेल्या रकमेच्या 10 टक्के म्हणजेच 40,000 रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराने ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कळवली. त्यानंतर 19 मे रोजी पडताळणी करून पथकाने सापळा रचला. आरोपीने अंमळनेर येथील दगडी दरवाजा समोरील राजे संभाजी चौकात तक्रारदाराकडून 40,000 रुपये स्वीकारले आणि दुचाकीवरून पळून गेला. मात्र त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्याची चौकशी सुरू आहे. या कारवाईसाठी सापळा पर्यवेक्षण अधिकारी श्री. सचिन साळुंखे, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. धुळे आणि तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पो.हवा. राजन कदम व पो.कॉ. प्रशांत बागुल यांनी सापळा कारवाईत सहभाग घेतला. संपूर्ण कारवाई मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परीक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Read More

वाघूर उपसा सिंचन योजना – शेतकऱ्यांसाठी जलसंपन्न भविष्य!

जामनेर (जि. जळगाव) – जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! वाघूर उपसा सिंचन योजना क्र. 1 अंतर्गत 2020 शेततळ्यांच्या निर्मितीचे काम वेगाने सुरू असून, यामुळे जिल्ह्यातील शेतीला मुबलक पाणीपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा प्रशासनाने या योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विशेष मोहिम राबवली आहे. शेतकरी आणि ग्रामस्थांशी थेट संवाद! आज अधीक्षक अभियंता यशवंत भदाणे, तहसीलदार नानासाहेब आगळे, तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी यांनी जामनेर तालुक्यातील विविध गावे भेट देऊन शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. या योजनेमुळे शेतीसाठी शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होणार असल्याने उत्पादनवाढीस मोठा फायदा होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा विशेष पाठपुरावा! या प्रकल्पाची गती वाढावी आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा यासाठी जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन हे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने आढावा घेत आहेत. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी ते विशेष प्रयत्नशील आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेही लक्ष! शेतकऱ्यांना वेळेत सिंचन सुविधा मिळावी आणि शेती समृद्ध व्हावी, यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील देखील प्रकल्पावर लक्ष ठेऊन आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांना काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! वाघूर उपसा सिंचन योजनेमुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांना सिंचनाच्या सुविधा मिळून शेती जलसंपन्न होईल. प्रशासनाने शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

Read More

तहसिलदाराची बनावट सही, २९ लाख ६३ हजारांत सरकारलाच महसूल सहायकाने ‘कूळ’ दाखवले !जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपी हर्षल पाटील फरार

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर जामनेर येथील तहसिलदारांच्या स्वाक्षरीचा बनावट पध्दतीने वापर करुन जामनेर मथील वर्ग २ ची शेतजमिन वर्ग १ मध्ये रुपांतर करुन शासनाचा २१ लाख ६३ हजार २८५ रुपयांचा महसूल बुडवून फसवणूक केल्या प्रकरणी जामनेर तहसिल कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी (कुळ कायदा) हर्षल विश्वनाथ पाटील यांच्या विरुध्द जामनेर पोलीस ठाण्यात शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल होताच हर्षल पाटील हा अधिकारी फरार झाल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी जामनेरचे तहसिलदार नानासाहेब आगळे यांच्या फिर्यादीवरुन हर्षल पाटील यांच्याविरुध्द जामनेर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या धक्कादायक प्रकरणाची अधिक माहिती अशी की, जामनेर येथील गट क्र. ८३६/२ ही शेत जमिन मालक अर्जदार नाजीयाबी शेख सत्तार, शेख फरहान हिसामुद्दीन यांनी वर्ग २ प्रकाराची जमिन वर्ग १ प्रकारात व्हावी म्हणून तहसिलदार जामनेर यांना अर्ज सादर केला होता. त्यांच्या अर्जावरुन वर्ग २ ची शेत जमिन वर्ग १ मध्ये करण्यासाठी नजराणा भरणा आवश्यक होते. जमिनीचे बाजारमूल्य ४३ लाख २६ हजार ५७० रुपये एवढे आहे. त्यानुसार ५० टक्के नजराणा रक्कम म्हणून २१ लाख ६३ हजार २८५ रुपये शासकीय कोषागारात भरणा केल्याशिवाय जमिनीची नोंद अथवा रुपांतर वर्ग एक मध्ये करता येणार नाही, असा आदेश तहसिलदार जामनेर यांनी दिला. त्यांच्या आदेशावर अर्जदारांनी एवढी मोठी रक्कम आम्हाला ५० टक्के नजराणा भरणा शक्य नाही, असे लेखी कळविले. त्यामुळे तहसिलदार जामनेर यांनी त्यांचा अर्ज निकाली काढला. या प्रकरणात सहाय्यक महसूल अधिकारी हर्षल पाटील यांनी फेरफार करुन तहसिलदार जामनेर यांचा स्वाक्षरीचा दुरुपयोग केला. तसेच नजराणा रकमेचा भरणा बँकेत केल्याचे बनावट दस्तावेज तयार केले. ही बाब तहसिलदार जामनेर यांच्या तपासणीत आढळून आल्यानंतर हर्षल पाटील याचे बिंग फुटले. त्यामुळे त्याने फसवणूक केल्याचे व बनावट दस्ताऐवज केल्याचे कबूल करीत तहसिलदार जामनेर यांना विनंती केली. तथापी हे प्रकरण धक्कादायक आणि गंभीर असल्याने हर्षल पाटील यांच्या विरुध्द तहसिलदार जामनेर यांनी रितसर फिर्याद दाखल केली. त्यामुळे हर्षल पाटील विरुध्द विविध कलमाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Read More

मोटरसायकल चोरून आणलेल्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मोटरसायकल चोरून आणलेल्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या दि.07/01/2025 रोजी 11:00 वा.च्या सुमारास पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक दिपक रोठे,व पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, पो.हे. कॉ जयेंद्र पगारे, पो.हे. कॉ दिपक जाधव, पो.हे. कॉ सुशील सत्रे, पो.हे.कॉ अनिल राठोड, पो.कॉ. सचिन महाजन असे खादगाव बिटमध्ये खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना 11:30 वाजेच्या सुमारास जामनेर शहराच्या बाहेर खादगाव रोडवर चार ईसम हे दोन मोटरसायकल वर विना नंबरच्या मोटरसायकल घेऊन जात जात असतांना दिसले. त्यांना थांबवून त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव 1)सागर अमृत चौधरी वय 34 वर्ष. 2)सागर शिवाजी चौधरी वय 26 वर्ष. 3)संजय युवराज पाटील वय 45 वर्ष. 4)योगेश भाऊराव गावंडे वय 39 वर्ष. सर्व रा. खादगाव ता. जामनेर असे असल्याचे सांगितले त्यावेळी त्यांना सदर मोटरसायकलच्या नंबर व कागदपत्र बाबत विचारपूस केली असता त्यांना सदर मोटरसायकलच्या बाबतीत काही एक सांगता येत नसून ते उडवा उडवीचे उत्तरे देत होते. त्यावरून पोलिसांची खात्री झाली की सदरच्या मोटरसायकल या नमूद ईसमानी लबाडीने मिळवलेल्या आहे किंवा त्यांच्या मालकीच्या नसतांना ताब्यात बाडगलेल्या आहेत सदरच्या मोटरसायकलीचे वर्णन खालील प्रमाणे 1)20000/-रु किंमतीची एक काळ्या रंगाची ड्रिम युगा जिचा इंजिन नंबर JC58EG0012548 व 2) 20000/-रु कि सिटी 100 कंपनीची मोटरसायकल इंजिन नंबर DUYPJM13145 व 3) 40000/-रु किं.च्या दोन मोटरसायकल दोन पंचा समक्ष जागीच जप्त करून ताब्यात घेतल्या आहे त्याचा सविस्तर पंचनामा करण्यात आला आहे. वरील वर्णन व किंमतीच्या दोन मोटरसायकल मालकी नसतांना त्यांच्या कब्जात बाळगून मोटर सायकलच्या मालकी बाबत कोणतेही समाधान कारक उत्तर न देता मिळून आले म्हणून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 124 प्रमाणे जामनेर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला असून सदर तपासात असे निष्पन्न झाले की, सदरच्या मोटरसायकल ह्या बिस्टान पोलीस स्टेशन जि. खरगोन मध्य प्रदेश व छैगाव माखन पोलीस स्टेशन जि. खंडवा मध्यप्रदेश येथून चोरी करून आणल्याचे निष्पन्न झाले असून सदर आरोपी हे बिस्टान पोलीस स्टेशन जि. खरगोन मध्यप्रदेश यांच्याकडे तपासाकामी देण्यात आले आहे.

Read More

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गट विकास अधिकाऱ्यांची आढावा बैठक

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली आज गट विकास अधिकाऱ्यांची (BDO) आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामे, शासकीय योजनांची अंमलबजावणी, निधीचा उपयोग, तसेच नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या सेवांचा आढावा घेण्यात आला. बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे: ✅ शासकीय योजनांची अंमलबजावणी: विविध योजनांची प्रगती व अडथळ्यांवर चर्चा.✅ ग्रामपंचायतस्तरावरील कामांचे परीक्षण: स्थानिक विकासकामांची स्थिती व नियोजन.✅ पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण व स्वच्छता: या क्षेत्रांमध्ये सुरू असलेल्या योजनांचे पुनरावलोकन.✅ निधीचा योग्य वापर व पारदर्शकता: निधी वितरणाची समीक्षा व कार्यक्षमतेवर भर.✅ जनतेच्या तक्रारींचे निवारण: नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी अधिकाऱ्यांना कार्यप्रणाली अधिक प्रभावी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, ठरवलेल्या वेळेत कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. “लोकहिताची कामे जलद व प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी सर्व स्तरांवरील अधिकाऱ्यांनी समन्वय साधून कार्य करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला गेला असून, गट विकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे तात्काळ पालन करून प्रशासनाच्या जबाबदाऱ्या अधिक परिणामकारकरीत्या पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला.

Read More

समाजासाठी येणारे काळ जोखमीचा नंदकिशोर साखला

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर प्रतिनिधी – सध्याची सामाजिक स्थिती पाहता येणारा काळ हा समाजासाठी जोखमीचा असेल, असे मत भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर साखला यांनी व्यक्त केले. ते साक्री तालुक्यातील बळासाने तीर्थ क्षेत्रात खानदेश विभागातर्फे आयोजीत खानदेश विभागाच्या पदाधिकारी व कार्यकर्ता स्नेह मिलनात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीओम विश्वकल्याण विमलनाथ तीर्थभूमी ट्रस्टचे खजिनदार व पंचायत समिती सदस्य महावीर जैन होते. नमस्कार महामंत्राने व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.खानदेश उपाध्यक्ष स्व. लतीश जैन यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पित केली.प्रास्ताविक खानदेश विभाग अध्यक्ष प्रा.चंद्रकांत डागा यांनी केले.साखला पुढे म्हणाले, समाजातील समस्या ओळखणे, त्यावर वैज्ञानिक पद्धतीने संशोधन करून उपाय सुचविणे ही संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांची कार्यशैली राहिली आहे. चाळीस वर्षापासून निरंतर हे काम सुरू आहे. समाजात अनेक बदल झाले आहेत. मुला-मुलींमध्ये शैक्षणिक स्तर भिन्न झाला आहे. मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवल्याने समस्या वाढल्या आहेत. कुटुंब व्यवस्था उध्वस्त होत आहे. त्यासाठी आपल्या व्यवहाराने संस्काराने राहणीमानाच्या पद्धतीने सुरक्षा कवच निर्माण करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय सचिव दीपक चोपडा यांनी संघटनेच्या पाया मजबूत करण्यासाठी संघटने बारा महिन्यात 14 कार्यक्रम दिले हे कार्यक्रम यशस्वी करणे प्रत्येक शाखेचे आद्य कर्तव्य असल्याचे सांगितले. राज्य महासचिव प्रवीण पारख यांनी, कार्यकर्ता हा संघटनेचा आत्मा आहे.समाजकारणात करता करता अनेक जण राजकारणात गेले. खानदेशात पंचवीस शाखा कार्यरत असून वर्षभरात 120 फाउंडेशन कार्यक्रम त्यांनी घेतले. महाराष्ट्रातील एकूण कार्यक्रमात 40% हिस्सा आहे.राज्य उपाध्यक्ष विनय पारखे यांनी येत्या वर्षात खानदेशाने किती कार्यक्रम घेतले पाहिजे याचे टार्गेट दिले. माजी राज्य उपाध्यक्ष हरकचंद बोरा यांनी संघटनेने नव्याने सुरू केलेले पारिवारीक अदालत विषयी माहिती दिली. राज्य सचिव विजय दुगड यांनी संघटनेचे कार्यक्रम घेण्याचे आव्हान केले. डॉक्टर कांतीलाल टाटीया यांनी संघटनेने पाण्याच्या संदर्भात केलेल्या कार्याची व संघटनेचे महत्व विशद केले तर जयश्री गोगड यांनी अंकाचे महत्व सांगितले.**कार्यक्रम दरम्यान नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार सन्मानपत्र देऊन केला.ललित रमनलाल छाजेड(शहादा), दीपक प्रवीणजी डांगी (जामनेर), धीरज ओस्तवाल(शेंदुर्णी), देवेंद्र चंदनमल जैन (नंदुरबार),अमर जैन(जळगांव), निर्मल कोठारी( भुसावळ), नितीन जैन (मुक्ताईनगर )जयश्री विनोदकुमार पगारिया (साक्री) तर विविध क्षेत्रात नियुक्ती झालेल्या राजेंद्र टाटिया (साक्री जैन संघ अध्यक्ष),चंद्रकांत डागा(ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या राज्य कार्यकारिणी सदस्य),जोशीला पगारिया(गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या केंद्रीय महिला अध्यक्ष)मनोज डागा(अखिल भारतीय खरतरगछ परिषद राष्ट्रीय उपाध्यक्ष), सुमित मुनोत(समस्त ज़िला समन्वयक), जयश्री गोगड (एस्ट्रॉलॉजर) यांचा सत्कार शॉल, माळा देऊन मान्यवरांच्या हस्ते केला गेला.**सन 2025मध्ये जिल्ह्यात सर्वाधिक फाउंडेशन कार्यक्रम घेतल्या बद्दलतळोदा,जामनेर व शिंदखेडा शाखेचे अध्यक्ष राहूल जैन, कुशल बोहरा,सौ मोना चोरड़िया व मयुर ओस्तवाल यांचा त्यांच्या टीम सह ट्रॉफी देऊन सत्कार केला.नवनिर्वाचित नगरसेवक ललित छाजेड, जयश्री पगारिया यांनी मनोगत व्यक्त केले तर सूत्रसंचालन जळगाव महिला जिल्हाध्यक्ष सोनाली कोठारी तर आभार विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत यांनी मानले.

Read More

आजी-माजी सैनिकांच्या प्रश्नांवर तालुका स्तरीय समितीची बैठक संपन्न

जामनेर, ५ मार्च (जे. बी. एन. महाराष्ट्र न्यूज) – तालुक्यातील आजी-माजी सैनिक, शहीद सैनिक कुटुंबे, माजी सैनिक विधवा तसेच कार्यरत सैनिकांच्या शासकीय कामांसाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या दृष्टीने तालुका स्तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली. तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत विविध विभागांशी संबंधित शासकीय प्रक्रिया जलद आणि प्राधान्याने पूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीस जामनेरचे गटविकास अधिकारी श्री. काळे, पोलीस निरीक्षक श्री. मुरलीधर कासार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. संजय गायकवाड तसेच माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. या चर्चासत्रात माजी सैनिकांच्या प्रलंबित शासकीय कामांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच, त्यांच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे ठरले. ही बैठक यशस्वी ठरल्यास तालुक्यातील आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या विविध लाभदायक योजनांचा जलद लाभ मिळू शकणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Read More

लुबाडलेले 1600 रुपये काही मिनिटांतच सैनिकाच्या खात्यात परत

पाचोरा – निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारिता हे लोकशाहीचे चौथे स्तंभ म्हणून ओळखले जाते, याचे जिवंत उदाहरण नुकतेच पाचोरा येथे पाहायला मिळाले पत्रकार संदीप महाजन यांनी अनधिकृत रेल्वे तिकीट एजंटकडून भारतीय सैनिकाची करण्यात आलेली आर्थिक लुबाडणूक उघडकीस आणताच संबंधित भामट्याने युद्धजन्य परिस्थिती काळात अफरातफरीत केलेली फसवणूक लपवण्यासाठी केवळ काही मिनिटांतच सैनिकाच्या खात्यात 1600 रुपये परत वर्ग केले.ही घटना आहे पिंपरी सार्वे येथील रहिवासी आणि सध्या CISF मध्ये कार्यरत असलेल्या जवान प्रदीप बाविस्कर यांच्या बाबतीत. देशात युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्यामुळे जवानांना तातडीने त्यांच्या सेवास्थळी परत हजर राहण्याचे आदेश मिळाले होते. या घाईत त्यांनी रेल्वे तिकीट काढण्यासाठी पाचोरा येथील तिकीट एजंटची मदत घेतली. मात्र त्या एजंटने एका सामान्य तिकिटासाठी वाजवी रक्कमेपेक्षा तब्बल 1600 रुपये जास्त रक्कम आकारून लुबाडणूक केली.या प्रकाराची माहिती पत्रकार संदीप महाजन यांना मिळताच त्यांनी या विषयावर सखोल चौकशी केली आणि समाजमाध्यमांद्वारे, तसेच ‘ध्येय न्यूज’च्या माध्यमातून ही धक्कादायक बातमी सर्वांसमोर आणली. पत्रकारितेतील जबाबदारी आणि लोकहितासाठी त्यांनी दाखवलेली तत्परता पाहून ही बातमी काही वेळातच व्हायरल झाली. बातमीचा समाजावर, प्रशासनावर आणि संबंधित एजंटवर इतका परिणाम झाला की, संबंधित एजंटने काही मिनिटांत जवानाच्या खात्यावर 1600 रुपयांची रक्कम परत पाठवली.ही घटना ही केवळ पत्रकाराच्या सचोटीची विजयगाथा नाही, तर हे एक जिवंत उदाहरण आहे की सत्याचे धारदार लेखणीसमोर अन्याय करणाऱ्यांची लाचारी उघड होते. पत्रकार महाजन यांनी या प्रकरणात कोणत्याही आमिषाला बळी न पडता, केवळ सैनिकाचा हक्क परत मिळावा या हेतूने ही बातमी उघडकीस आणली.या प्रकरणानंतर शहरातील जनमानसात पत्रकार महाजन यांच्या कार्याची भरभरून स्तुती होत असून अनेकांनी सोशल मीडियावर “हीच खरी पत्रकारिता” असे म्हटले आहे. शिवाय, यामुळे भविष्यात या आणि अशाप्रकारे लूट करणाऱ्या अनधिकृत रेल्वे एजंटांचा धसका बसेल व सामान्य नागरिकांची लुबाडणूक टळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.प्रशासनाने सुद्धा या भामट्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. पत्रकारिता म्हणजे केवळ माहिती पोहोचवणे नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्याचे हत्यार आहे, याचे हे अत्यंत प्रभावी उदाहरण आहे.

Read More

जामनेरकरानो ऐआय अतिशय घातक / आपल्या मुला-मुलीची काळजी घ्या जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधवआज आपण जानुन घेणार ऐआय म्हणजे कुत्रिम वस्तुने दर्शविलेल्या बुद्धिमान वर्तनास कुत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशियल इंटेलीजेंअस) ऐआय असे म्हणतात.आजच्या युगात प्रत्येक घरात लहान मोठे मुल मुली विद्यार्थी विद्यार्थीनी मोबाइल लॅपटाॉप वापरतात. यांचा वापर कधी कधी आपल्या कुटुंबा साठी घातक ठरतो. मोबाईल मध्ये असलेल्या प्लेस्टोअर वरुन अनेक जण वेगवेगडी फोटो ईडिटीगची अॅप डाऊनलोड करतात. यातीलच ऐक अॅप चर्चेत आहे ते म्हणजे ऐआय या संबधीचे अनेक अॅप आहेत. ते मानवी जिवनासाठी हे घातक ठरत आहे. याचे मोठे धोके आहेत. या धोक्याना ओळखणे गरजेचे आहे. या मुळे आपल्या सुरक्षा हक्कावर परीणाम होतो. या बद्दल जागरुक राहणे गरजेचे आहे. ऐआयचा वापर ऐखाद्या हानी साठी होण्यासाठीचा वापर वाढलाय.काही ऐआय आवाज फोटोच /विडीओच विश्लेषण करत. या मुळे आपल्या मोबाईल मधील आपला सुरक्षित डेटा सुद्धा चोरीला हडपला जातों. आयचा चालु असलेला आवाज/ फोटो/विडीयो ट्रेड घातक रुप धारण करत आहे. म्हणजे सर्व माहीत असुनही आपण आपल्या सोबत फ्राॉड करुन घेतोय. या ऐआय चा वापर काही मस्करी म्हणुन तर काही ऐखाद्याची हानी करण्यासाठी जास्त होतोय. या मार्फत आपला आवाज बनवला जातो फेस ऐखाद्या विडीओ फोटोत वापरला जातो जो खराखुरा भासतो. यांचा वापर अश्लिलिलतेत सुद्धा होतो. या मुळे ऐखाद्या व्यक्तिच जीवन ऊद्धवस्त होण्याची वेळ येते. आपल्या मोबाईल वरती आपली फोटो विडीयो कुटुंबा तील व्यक्तिची फोटो आपण आपलोड करत असतो.त्याचा वापर आपली हनी_बदनामी करण्यासाठी कुणाकडुनही होतो अशे प्रकार आपल्या जामनेर शहरात सुद्धा ऊघडकीस आलेले आहे. ते सर्व कुत्रिम रित्या बनवलेल असत परंतु ते दिसायला खर वाटत अशी भयानक ति आवाजाची फोटो/वाडीओची ईडिटीग असते. जे ततोतंत खरी वाटते. या मुळे अनेकाचे आयुष्य ऊद्धवस्त झालेत तर आत्महत्या चे प्रमाणही वाढलेल आहे. ऐखाद्याच्या बदनामी साठी अश्लीलता वापरुन ऐआय व्दारे बनवलेले विडीओ/फोटो/ ऑडिओ रेकाॉर्डीग ऐखाद्यास आत्महत्यास मंजबुर करु शकते. काही दिवस आधीच शहरातील शिवभक्त अविनाश बोरसे याचे व्हाट्सएप/ इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करुन त्याचा वापर चुकीच्या पद्धतीनी केला गेला. हजारो लाखो लाईक फाॉलो असलेल अकाउंट बंद पाडले गेले.बोरसेचा आवाजाचा व फोटोचा वापर सुद्दा काही फेक अकाउंट व्दारे फसवणुकीसाठी बदनामी साठी केला गेल्याच समोर आल होत. बोरसेनी धाडसाने हिमंतीने या गोष्टीचा सामना केला. तशी तक्रार सुद्धा त्यानी दाखल केलेली आहे. सर्व जामनेर शहरातील तालुक्यातील सर्व नागरीकाना जनतेला अवाहन आहे. आपल्या कुटुंबा चे तुमचे मुलामुलीचे भविष्य ऐआय मुळे ऊद्धवस्त होणार नाही यांची काळजी घ्या

Read More
error: Don't Try To Copy !!